Friday 13 December 2013

रामदास संत नव्हे; तर स्वराज्यातील जंत होता

-श्रीमंत कोकाटे (शिवचरित्र अभ्यासक, संशोधक)


शिवाजी राजांचा सर्वात खतरनाक शत्रू म्हणजे रामदास. त्याला राजांचा गुरु करण्याचा
अनैतिहासिक प्रयत्न जातीयवादी इतिहासकारांनी केला. खरे तर राजे आणि रामदास यांची कधीच भेट
झाली नाही. म्हणून रामदास हा राजांचा गुरु नव्हता हे सिद्ध होते. पण रामदास राजांचा शत्रू होता हे
बहुतांशी लोकांना माहीत नाही.
रामदास हा आदीलशहा आणि औरंगजेबाचा गुप्तहेर होता. अफजलखानाचा मित्र बाजी
घोरपडे याच्या आश्रयाला रामदास होता. एका बाजूला राजे गड जिंकत होते, किल्ले बांधत होते; तर दुसऱ्या बाजूने  रामदास समाजात भोळेपणा पसरविण्याचे काम करत होता. पुरोहित भटांना जगण्यासाठी रामदासांनी मंदिरे उभारली. राजे किल्ले बांधत होते. ज्याचे किल्ले त्याचे राज्य हा तो काळ होता. रामदास मात्र
मंदिर बांधत होता. कारण जेथे मंदीर तेथे ब्राह्मणांचे राज्य. राजे तर प्रयत्नांची पराकाष्टा करणारे
विज्ञाननिष्ठ राजे होते. राजांच्या या क्रांतीकार्याला विरोध करण्याचे काम या रामदासाने केले.
रामदास हा स्वत:च्या लग्नप्रसंगी सावधान म्हणताच बोहल्यावरुन पळाला. पळण्यापूर्वी तो
बोहल्यावर नवरदेव म्हणून उभा होता. म्हणजे त्याने मुलगी पसंत केली होती. लग्न ठरले होते. व-हाडी
मंडळी आली होती. वधू त्याच्या समोर उभी होती. मंगलाष्टके सुरु झाली. सर्व मंगलाष्टके झाली आणि
शेवटचे मंगलअष्टक म्हणजे ‘आता सावधान' म्हणताच रामदास बोहल्यावरुन पळून गेला. हे एक तर
मुर्खपणाचे किंवा समाजद्रोहीपणाचे लक्षण आहे. कारण त्या काळात अंगाला हळद लागली आणि लग्न
मोडले तर मुलींना पुन्हा आजन्म अविवाहित रहावे लागत होते. त्या काळात वधूच्या भवितव्याचा
आजिबात विचार न करता लग्न मंडपातून पळून जाणारा रामदास शिवाजीराजांसारख्या सामर्थ्यशाली
सम्राटाचा गुरु होऊच शकत नाही. खरे तर तो समाजद्रोही होऊ शकतो. कारण त्या वधूच्या जागी आपली
बहीण किवा  मुलगी असती तर आपल्याला काय वाटले असते? पुढे रामदासाला विधवा तरुणीशी
व्याभिचार करण्याची चटक लागली. वेण्णा आणि आक्का यांच्याशी रामदासाचे अनैतिक संबंध होते.
रामदास हा रंगेल आणि व्याभिचारी होता. (संदर्भ- इतिहासाचार्य प्रा. मा.म. देशमुख लिखित रामदास आणि पेशवाई) अशा स्त्रीलंपट
रामदासाचा राजांनी अनुग्रह घेतला अशी कल्पना करणेसुद्धा अक्षम्य गुन्हा आहे. असा स्त्रीलंपट
रामदास समोर जरी आला असता तरी त्याला राजांनी झोडपलेच असते म्हणूनच त्याने राजांची कधीच
भेट घेतली नाही. राजांच्या जीवनात आलेल्या कोणत्याही महत्वाच्या व रोमांचकारी प्रसंगाचेवेळी
रामदासाने राजांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मदत केल्याचा कोठेही इतिहासात उल्लेख नाही.
अफजलखान भेटीच्याप्रसंगी पन्हाळा वेढा, शाईस्तेखानावर हल्ला, आग्रा कैद, राज्याभिषेक या
कोणत्याही प्रसंगी रामदास राजांना मदत करण्यासाठी आलेला नव्हता. समकालीन जेधे शकावली,
सभासद बखर, शिवभारत इतर कोणेणत्याही ग्रंथात रामदासाचा साधा नामोल्लेख देखील नाही.
(जिज्ञासुंनी संदर्भ ग्रंथ वाचावेत ही विनंती)

ब्राह्मणवादी रामदास 
रामदास हा पूर्ण ब्राह्मणवादी होता. रामदास म्हणतो,
देवी ब्राह्मणी सत्ता करी। तो एक मुर्ख।।६८।। (दासबोध-२:१:६८)
म्हणजे जो ब्राह्मणावर राज्य करतो तो मुर्ख असतो. म्हणजे ब्राह्मणेतराने
फक्त चाकरीच करावी हा त्याचा आग्रह होता. शिवाजीराजे राज्याभिषेकाने राजे झाले. त्यामुळे ब्राह्मणांना
देखील शिक्षा करण्याचा अधिकार राजांना प्राप्त झाला. यामुळे तो अस्वस्थ झाला आणि राजांना मुर्ख
म्हणण्यापर्यंत त्याची मजल गेली. पुढे तो म्हणतो :
निच प्राणी गुरुत्व पावला। तेथे आचरची बुडाला
वेदशास्त्र ब्राह्मणाला । कोण पुसे ।। (दासबोध-१४:७:२९)
रामदासाला बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार झाल्याने कमालीचे दु:ख झाले. अध्ययन हे
फक्त ब्राह्मणांनीच करावे हा त्याचा आग्रह आहे. समाजात अनाचार का वाढला तर शूद्रांनी शिकण्यास
सुरुवात केली म्हणून. आचार बुडाला अशी तक्रार तो करतो. बहुजन समाज शिक्षण घेऊ लागल्याने
वेदशास्त्रात पारंगत असलेल्या ब्राह्मणास कोणी विचारत नाही याचेच त्याला वाईट वाटते. म्हणजे तो
जातियवादी तर होताच पण वर्णव्यवस्थेचा कट्टर समर्थक होता, कडवा ब्राह्मण्यवादी होता. म्हणूनच
शूद्रांनी शिक्षण घेतल्यामुळे त्याच्या पोटात दुखु लागले. म्हणून तो पुढे म्हणतो :
राज्य नेले म्लेंच्छ क्षेत्री । गुरुत्व नेले कुपात्री ।।
आपण अरत्री ना परत्री । काहीच नाही (दासबोध-१४.७.३६)
राज्य मुसलमान आणि क्षत्रियांकडे गेले. शिवाजीराजांचे गुरुत्व संत तुकोबारायांकडे गेले
आपल्या ब्राह्मणांच्या हाती काहीच राहिले नाही म्हणून तो आरडा ओरडा करत होता. हे काही संताचे
लक्षण नव्हे. संताच्या कार्याला जात, पात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, देश आणि धर्माचे बंधन नसते. संत
हे सर्व सजिवांच्या कल्याणाकरता झटणारे असतात. पण तो फक्त ब्राह्मणांसाठीच झगडत होता म्हणूनच
रामदास हा संत नव्हे तर स्वराज्यातील जंत होता. तो ब्राह्मणांच्या उध्दारासाठी व बहुजनांच्या
-हासासाठी कसा झटत होता याचे पुरावे दासबोधातच आढळतात. रामदास म्हणतो :
गुरु तो सकळासी ब्राह्मण । जरी तो झाला क्रियाहीन
म्हणजे ब्राह्मण निष्क्रिय-क्रियाहीन असला तरी सर्व जाति धर्माच्या जनतेने
ब्राह्मणालाच गुरु करावे. म्हणजे ब्राह्मणी वर्चस्व राहावे व ब्राह्मणांना बिगर श्रमाचे धन मिळावे. ही
त्याची ओढ होती. शिक्षक ब्राह्मणांशिवाय कोणी होऊ नये ही त्याची इच्छा होती.
सकळांशी पूज्य ब्राह्मण । हे मुख्य वेदाज्ञा प्रमाण
ब्राह्मण वेद मुर्तिमंत । ब्राह्मण तोचि भगवंत
ब्राह्मणाला सर्वांनी देव मानावे हे वेद सांगतात. ब्राह्मण हाच वेद आणि देव आहे असे रामदास
म्हणतो. म्हणजे सर्वांनी ब्राह्मणांची पूजा करावी हा आग्रह रामदासाचा होता/
लक्षभोजनी ब्राह्मण । आन जातीस पुसे कोण
लक्षभोजन हा ब्राह्मणांचा हक्कच आहे. इतर जातीला विचारण्याचे कारणच नाही. असे त्याचे
मत आहे. म्हणजे ब्राह्मणांना फुकटात भोजन द्यावे असे तो म्हणतो :
असो ब्राह्मण सुरवर वंदिती । तेथे मानव बापुडे किती
आतातर रामदास बहुजन समाजाला भीतीच दाखवितो की ब्राह्मणाला देव वंदन करतात, तर
माणसाची काय गत आहे.
जरी ब्राह्मण मुढमती । तरी तो जगदवंद्य
आता तर रामदासाने कहरच केला तो म्हणतो ब्राह्मण मुर्ख असला तरी चालेल तो जगाला
वंदनिय असतो. (डॉ. आंबेडकरांच्या घटनेने बरे झाले नाहीतर सर्व मूर्ख ब्राह्मण सर्व पदांवर राहिले
असते.)

दलित विरोधक रामदास 
रामदास हा पक्का दलित विरोधक होत. तो म्हणतो:
अंत्यज शब्दज्ञाता बरवा । परी तो नेऊन काय करावा
ब्राह्मण संन्निध पूजावा । हे तो न घडे की ।
अंत्यज म्हणजेच दलित हा शब्दज्ञाता म्हणजेच पंडित असला तरी त्याचा उपयोग काय?  पण ब्राह्मणांची तो बरोबरी करु शकत नसतो. असे म्हणून त्याने जातियवादाचे टोकच गाठले आहे.
रामदास पुढे लिहितो :
अंतर एक तो खरे । परी सांगाते घेऊ न येती महारे
पंडित आणि चाटे पोरे । एक कैसी । ।।३।।
मनुष्य आणि गधडे । राजहंस आणि कोंबडे
राजे आणि माकडे । एक कैसी। ।।४।।
भागीरथीचे जळ आप । मोरी संवदणी तोही आप।
कुश्चिळ उदक अल्प। सेववेना ।।५।।
म्हणजे, ब्राह्मण आणि महार यांचा आत्मा एक असला तरी त्यांची आणि ब्राह्मणांची बरोबरी होऊ शकत नाही.
(या ठिकाणी रामदासाने यमकासाठी महार यांचे उदाहरण घेतले असले तरी सर्व जाती नीच आहेत,
फक्त ब्राह्मणच श्रेष्ठ आहेत असे त्याचे ठाम मत आहे.) ब्राह्मण सोडून सर्व जातीला तो गाढव, माकडे,
कोंबड्या, चावट, गटारीचे पाणी या उपमा देतो. तर ब्राह्मणाला तो राजा, हंस, गंगेचे पाणी या उपमा
देतो.

अशा बहुजनव्देष्ट्या रामदासाच्या "दासबोधव"र महाराष्ट्र शासनाने बंदी घालावी. रामदास व
रामदासी संप्रदायाच्या सर्व वाङमयावर बहुजन समाजाने बकिष्कार टाकावा. जगातील सर्व माणसे समान
आहेत. जगातील सर्व जाती, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, देश हे मानवनिर्मित आहेत. त्यामुळे  जातिभेद
पसरविणा-या रामदासी सांप्रदायावर ‘अ‍ॅट्रॉसिटी' कायद्याखाली खटला भरायला हवा.

औरंगजेबाला अनेकवेळा भेटला रामदास
हर हर महादेव ही राजांची सिंहगर्जना होती. कारण महादेव बहुजन समाजाचा आद्य
क्रांतीकारक होता. महादेव हा देव नव्हे. वैदिकांनी महादेवाचेही दैवतीकरण केलेले आहे. रामदासाची
घोषणा जय जय रघुवीर समर्थ अशी होती. रामदास आणि शिवाजीराजे यांच्या घोषणेतही साम्य नव्हते.
रामदास हा हिरवे कपडे परिधान करीत होता. रामदासाला उत्तम उर्दू येत होती. औरंगजेबाला रामदास
अनेकवेळा भेटलेला होता. दोघांनी मिळून भोजन केले होते. याचा अर्थ रामदास आणि औरंगजेबाचे
घनिष्ठ संबंध होते. दिल्ली येथे रामदासाने औरंगजेबाबरोबर भोजन केले होते ही वस्तुस्थिती आहे.
शिवाजीराजांना केशरी (भगवे) निशाण आणि राजमुद्रा शहाजी राजांना दिलेली होती. म्हणजे
गुरु म्हणून रामदासाचे राजाला कसलेही सहकार्य नाही. शिवरायांच्या अनेक गुप्त योजना त्याने
औरंगजेबाला-आदिलशहाला सांगितल्या होत्या. बाजी घोरपडेंना शिवरायांविरुद्ध चिथावले होते.
राजांच्या विरुद्ध मराठ्यांना भडकविण्याचे काम रामदासाने केले. ब्राह्मणांच्या उद्धारासाठी तो मरेपर्यंत
झिजला यात काही गैर नाही. पण स्वत:च्या जातीसाठी काम करीत असताना बहुजनसमाजाला आणि
शिवरायांना रामदासाने खूप त्रास दिला. शेवटी त्याने ब्राह्मणांच्या भवितव्यासाठी दासबोध ग्रंथ
लिहिला.

संत तुकोबांना संपविण्यासाठी रामदासाला शिवचरित्रात घुसविले 
शिवाजीराजांनी बाबा याकूत, मौनीबाबा, संत तुकाराम यांचा सल्ला घेतल्याचा अनेक ठिकाणी
उल्लेख आहे. कारण ते संत चारित्र्यसंपन्न, नि:स्वार्थी आणि बहुजन समाजाचे उध्दारक होते, म्हणुनच
राजांना त्यांच्याबद्दल नितांत आदर होता. पण राजे रामदासाच्या भेटीला कधीच गेलेले नाहीत. पण
त्याचे शिष्य अनेक वेळा महाराजांकडे भीक मागण्यासाठी आले होते. याप्रसंगी राजे त्यांना विचारतात
‘कोण हा रामदास?' याच अर्थ राजे रामदासाला ओळखत नव्हते. (अधिक माहितीसाठी वाचा
इतिहासाचार्य प्रा. मा.म. देशमुख लिखित रामदास आणि पेशवाई) संत तुकारामासारख्या चारित्र्यसंपन्न, समाजसुधारक गुरुला संपविण्यासाठीच वैदिकांनी रामदास हा शिवचरित्रात घुसवला. रामदासाला राजांचा गुरु ठरविण्यासाठी ब्राह्मणांनी अनेक खोटे पुरावे, दाखले, स्थळे, चित्रे निर्माण केली.

(शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? या पुस्तकातून)


प्रख्यात इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेले ‘शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?' हा ग्रंथ "अनिता पाटील विचार मंच"च्या वाचकांसाठी येथे उपलब्ध करून देत आहोत. जिज्ञासूंनी त्यावर प्रतिक्रिया जरूर द्याव्यात.

ग्रंथ प्रवेश 
भाग-१
भाग-४
  1. नेताजी पालकरांच्या धर्मांतराला विरोध, गंगाधर कुलकर्णीच्या धर्मांतराला मात्र समर्थन
  2. संभाजीराजांना मोगलांच्या ताब्यात देणारा विश्वासघातकी कवि कुलेश
  3. औरगजेबाने संभाजी राजांना मनुस्मृती संहितेप्रमाणे ठार मारले
  4. शिवशक बंद करुन मोगलांचा फसलीशक सुरु करणारे पेशवे
  5. शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला
  6. शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे

2 comments: