Showing posts with label पु. ल. देशपांडे. Show all posts
Showing posts with label पु. ल. देशपांडे. Show all posts

Wednesday, 26 December 2012

पु. ल. देशपांडे यांनी पिळलेली ब्राह्मणांची शेंडी आणि ब्राह्मणवाद्यांची फसगत


ब्राह्मणवादी ब्लॉगरांच्या विनोदाने महाराष्ट्र लोटपोट

--राजा मइंद

ब्राह्मण हे ब्राह्मणांशिवाय कोणाचाही उदो उदो करीत नाहीत. यालाच ब्राह्मणवाद म्हणतात. ब्राह्मणी जातीयवादामुळे अनेकदा मोठे विनोद घडून येतात. पु. ल. देशपांडे यांच्या +धर्म, अंधश्रद्धा आणि तुम्ही आम्ही+ या लेखाच्या संदर्भाने ब्राह्मणी जातीयवादाने असाच एक महाविनोद सध्या निर्माण केला आहे. पु. ल. देशपांडे यांच्या +एक शून्य मी+ या पुस्तकात हा लेख आहे. या लेखात पु. ल. देशपांडे यांनी ब्राह्मणी जातीयवादावर कोरडे ओढले आहेत. ब्राह्मण कसे मुर्ख आहेत, कसे समाजाला लुबाडून खातात, याचे विश्लेषण पु. ल. यांनी या लेखात आहे. +पु. ल. प्रेम+ या ब्लॉगवर हा लेख गेल्या महिन्यात टाकण्यात आला. +पु. ल. प्रेम+ हा ब्लॉग ब्राह्मणांकडून चालविण्यात येत आहे, हे ओघाने आलेच. इतरही अनेक ब्राह्मणवाद्यांनी तो आपल्या ब्लॉगवर शेअर केला. पण हा लेख ना +पु. ल. प्रेम+वाल्यांनी वाचला होता, ना तो शेअर करणाèया इतर ब्राह्मणी ब्लॉगरांनी. हा लेख जेव्हा ब्राह्मण वाचकांनी वाचला तेव्हा सर्वांना दे माय धरणी ठाय झाले. या लेखात पु. ल. देशपांडे यांनी ब्राह्मणांनाच 'दे मार' झोडपून काढले आहे. आता ब्राह्मण वाचक ब्लॉगवाल्यांना शिव्या घालीत आहेत. पु. ल. देशपांडे यांच्या साहित्याने कधी कोणाला हसू आले नाही. पण, या लेखाच्या निमित्ताने ब्राह्मणवाद्यांनी निर्माण केलेल्या विनोदाला मात्र संपूर्ण महाराष्ट्र सध्या खो खो हसत आहे. आधीच हास्यास्पद असलेले पु. ल. महाराज त्यामुळे आणखी केविलवाणे झाले आहे. पु. ल. देशपांडे हे स्वत:चा उल्लेख कधी-कधी पी. एल. देशपांडे असा करीत असत. त्याचा संदर्भ घेऊन ब्राह्मणवादी वाचक एकच प्रश्न विचारीत आहेत - अरे, हे पीएल देशपांडे आहेत की पीयेल (पिलेले) देशपांडे? 


ब्राह्मणांचा भोंदूपणा उघड करणारी
‘पीएल' देशपांडे यांची काही वाक्ये अशी : 

१. बाबासाहेब आंबेडकरांनी एके ठिकाणी म्हटले आहे, की ब्राम्हण इंग्रजी विद्या शिकले ते कारकुनी नोकऱ्या मिळाव्यात म्हणून. लाखात एखादा सोडला तर ब्राम्हणांच्या घरातही पाठ्यपुस्तकापलीकडे व्यासंगासाठी ग्रंथसंग्रह नव्हता. वेदांचा फक्त अभिमान बाळगायचा; त्याला अक्कल लागत नाही. पण वेद वाचून वेदांचा अभिमान बाळगणारे शोधून सापडायचे नाहीत. सारे अभिमान आंधळे! 

२. आमचे इतिहाससंग्रह हे जवळजवळ कल्पनारम्य पुराणासारखे. ऐतिहासिक घटनांचे विश्लेषण नाही, आत्मपरीक्षण नाही. सदैव वास्तव नाकारत जगायचे. कुठल्याही घटनांचे कार्यकारणभाव लावण्याच्या फंदात पडायचे नाही. सारा हवाला एक तर देवावर नाही तर दैवावर.

३. न्यायमूर्ती रानड्यांसारखी माणसेदेखील इंग्रजी राज्य हे Divine dispensation मानताना पाहिली की आश्चर्य वाटते. आमचे देवदेखील वरती हिंदुस्थानचा नकाशा घेऊन जरा चार इंग्रज पाठवून भारतीयांना शहाणे करू या म्हणत बसले होते. 

४. गोव्याच्या ख्रिस्ती लोकांत बामण खिरिस्तॉव आहेत. 

५. एक तर धर्म, ईश्वर, पूजा-पाठ ह्यात मला कधीही रस वाटला नाही. शिल्पकारांचे कौशल्य म्हणून मला मूर्ती पहायला आवडतात. समजू लागलेल्या वयापासून माझा कोणत्याही मूर्तीला नमस्कार घडलेला नाही. पूर्वजन्म, पुनर्जन्म वगैरे थोतांडावर माझा विश्वास नाही. 

६. उच्चार आणि आचार यांच्यात मेळ नसल्याचे कुणालाही दुःख नाही. ‘सहनाववतु सहनौ भुनक्तु' ही आमच्या वेदातील प्रार्थना, त्यातल्या मानवतेवेषयी गळा काढून बोलायचे आणि ‘सहनाववतुङ्क म्हणताना +दूर हो. विटाळ होईल.+ म्हणून माणसाला दूर लोटायचे. पुन्हा वेद श्रेष्ठ ते श्रेष्ठ, ते धडाधड पाठ म्हणणारे त्याहूनही श्रेष्ठ. त्यांना शासनाच्या वतीने शाली पांघरणारे आणखी श्रेष्ठ. 

७. पुण्याच्या फुले मंडईत त्या भिक्षुकशाहीविरोधी सत्यशोधकांच्या नावावर टिच्चून सार्वजनिक सत्य(?)नारायणाची पोथी वाचली जाते. लोक तीर्थप्रसाद घेऊन धन्य होतात आणि दिवसेंदिवस ह्या अंधश्रद्धेला शासनाकडून भरपूर खतपाणी घातले जात आहे.

८. माझ्या वयाची साठ वर्ष मी ओलांडली पण गेल्या काही वर्षांत मी ही जी काही हिंदी सिनेमा नट-नटींसारखी देवदेवता आणि बुवा-माताजी मंडळींची चलती पाहतोय, तशी माझ्या तरुणपणीही पाहिली नव्हती. 

९. देऊळ बांधणे हा सत्तेवरच्या राजकीय पक्षात जाण्याइतकाच किफायतशीर धंदा झाला आहे. कधी कुठल्या शंकराचार्यांचे नावदेखील ऐकले नव्हते. त्यांची दीड दीड हजार रुपये भरून पाद्यपूजा करायला भक्तांचा क्यू लागतो. 

१० उर्दू शायराच्या ढंगात बोलायचे झाले तर आजवर आयुष्याच्या वाटेत काट्यांपेक्षा फुलेच जास्त लाभली. ‘उपरा', ‘बलुतं', ‘आठवणीचे पक्षी' ह्या पुस्तकांसारखे काही वाचले, की आपले जगणे सामाजिक दृष्ट्या असंबद्ध वाटायला लागते. कुणी मोठेपणा द्यायला लागले की ओशाळल्यासारखे वाटते. 

(‘एक शुन्य मी' या पुस्तकातून)

Wednesday, 21 March 2012

अहो "पूल" महाराज, बन हे बांबूचे असते आंब्याचे नव्हे!



मराठी संस्कृती, मराठी भाषा आणि महाराष्ट्र याची फारशी माहिती नसलेल्या लोकांनी काही तरी लिहायचे. लिहिणाèयाच्या सग्या सोयèयांनी आणि जातबांधवांनी वाहवा करायची. आणि माध्यमांनी त्यांना महान, लाडके वगैरे विशेषणे लावून मिरवायचे! मराठी साहित्य क्षेत्रातील हे वास्तव आहे. पु. ल. देशपांडे या हरमालवाल्याने या वास्तवाचा किती लाभ उठविला हे सांगायलाच नको. आपले अज्ञान कसे लपवावे एवढीही अक्कल या इसमाला नव्हती. आंब्याची आमराई असते आणि वेळूचे बन असते, ही साधी गोष्टही पुलला माहिती नव्हती. म्हणून त्याने लिहून टाकले, नाच रे मोरा आंब्याच्या बनात! बाबारे बन वेळूचे असते, हे पूलला सांगायचे धाडस त्याच्या हयातीत अख्ख्या महाराष्ट्रात कोणालाही झाले नाही. त्याच्या मृत्यूनंतर तर त्याच्या खोटेपणाला महानतेच झाकण बसविण्यात आले. बा. सी. मर्ढेकरांसारख्या जातीवंत कवीला बन आणि आमराई यातला फरक बरोब्बर माहिती होता. म्हणूनच मर्ढेकर एका कवितेत म्हणतात - 
बन बांबूचे पिवळ्या गाते
आभाळातील अधोरेखिते

"पूल"चे +नाच रे मोरा आंब्याच्या बनात+ हे गाणे गेली कित्येक दशके महाराष्ट्रात वाजतच आहे. तेही लहान मुलांचे बडबडगीत म्हणून पूलची बुद्धी लहान मुलांएवढीच होती, असा अर्थ त्यातून घ्यायचा का? आपण  काय शिकवतोय हा लहान मुलांना ?  उद्या एखाद्या मुलाने विचारलेच मला आंब्याचे बन दाखव, तर कसे दाखविणार? ...पुन्हा 'काळा- काळा कापूस पिंजला रे ! ' उद्या एखाद्या पोराने काळा कापूस कुठे असतो ? असे विचारले तर काय दाखवायचे ? मग हें गाणे मोरा साठी आहे की चोरा साठी ?  द्रोणाचार्यांनी ज्या प्रमाणे अश्वथाम्याला  तांदळाच्या पिठात पाणी कालवून तेच दुध म्हणून पाजले आणि तो देखील ( दुधाची चवच माहिती नसल्या मुळे) त्या पीठ पाण्याला दुध समजत राहिला. मराठी माणूसही तसाच आंब्याचे बन आणि काळा काळा कापूस म्हणतच राहिला.

थापा खोट्या.. अन म्हणे शाब्दिक कोट्या !
हीच गोष्ट पूलच्या विनोदाचीही आहे. मराठी साहित्यात देखील अस्सल विनोदाची चवच माहिती नसल्यामुळे पु ल दिलेले निकृष्ट निरस आणि बाष्कळ  विनोदच "पुलकित विनोद" म्हणून गणले गेले . वास्तविक पु ल चे विनोदी साहित्य म्हणजे मराठी साहित्य सरितेच्या काठावर साचलेल्या डबक्यातील गुळगुळीत आणि लिबलिबीत शेवाळ आहे हें अनेक उदाहरणांनी सांगता येयील.  पु ल चे कोणतेही पुस्तक घ्या ; काय आहे त्यात ? विनोद ! कुठल्या दर्जाचा विनोद ? तर कट्ट्यावरचा...सवंग ,बाष्कळ ,बालिश , कृतक आणि तद्दन खोट्या अनुभवाचा कोटीबाज फुलोरा ! याला विनोदी साहित्य म्हणायचे तर महाविद्यालयांच्या स्नेहसम्मेलनात होणाऱ्या फिशपोन्ड्स मध्ये आणि कट्ट्यावरच्या गप्पात मारल्या जाणाऱ्या टोन्ट मध्ये याहून दर्जेदार विनोद निर्मिती होते असे म्हणावे लागेल . 

मराठी माणसाचा पाणउतारा करणारा पु. ल.
मला सांगा व्यक्ती आणि वल्ली या व्यक्ती चित्रणातील आणि बटाट्याच्या चाळीतील कोणते व्यक्ती चित्र खरे आहे ? तर एकही नाही ! मराठी माणूस किती गबाळा , वेंधळा , अव्यवहारी,बावळट, तिरसट ,आळशी ,आडणी ,असमाजशील, आहे हेच बिम्बविण्याचा प्रयत्न यातून दिसतो ; शिवाय तुम्हाला पुणेकर ,नागपूरकर किंवा मुंबईकर ह्वायचे का या भाषण वजा लेखातही त्या त्या भागातील मराठी माणसाची वैशिष्टे अधोरेखित करण्या पेक्षा प्रतिमा बिघडवण्याचा उद्योग या महाभागाने केला आहे; मान्य आहे की मग विनोद कसा निर्माण होणार ? पण मग त्या करिता त्या भागातील माणसांची ,भाषेची ,परंपरांची खिल्ली उडवणे टवाळकी करणे याला पाणउतारा म्हणतात विनोद नव्हे !  

गुण गाईन कावडी....
पु ल चे गुण गाईन आवडी नावाचे एक प्रत्यक्षात होऊन गेलेल्या व्यक्तींच्या व्यक्तीचित्रणाचे  एक पुस्तक आहे, हें पुस्तक म्हणजे
थापेबाजीचा कळस आहे. संबधित माणसांचे कधीही न घडलेले किस्से आणि लांगुलचालानाचा अतिरेक म्हणजे हें पुस्तक! वाटीभर दुधात चार वाट्या साखर ओतून वीट आणि झीट आणणारी खिरापत म्हणजे हें पुस्तक. खरे तर यात पु ल ने गुण गाईन आवडी म्हणत कावडीच वहिल्या आहेत . 
-रवींद्र तहकिक.