Thursday 4 December 2014

पुढील ५ वर्षे लेखणी बंद


पुढील ५ वर्षे लेखणी बंद......... पुढील ५ वर्षे लेखणी बंद.
पुढील ५ वर्षे लेखणी बंद......... पुढील ५ वर्षे लेखणी बंद.
पुढील ५ वर्षे लेखणी बंद......... पुढील ५ वर्षे लेखणी बंद.
पुढील ५ वर्षे लेखणी बंद......... पुढील ५ वर्षे लेखणी बंद.
पुढील ५ वर्षे लेखणी बंद......... पुढील ५ वर्षे लेखणी बंद.

पुढील ५ वर्षे लेखणी बंद......... पुढील ५ वर्षे लेखणी बंद.
पुढील ५ वर्षे लेखणी बंद......... पुढील ५ वर्षे लेखणी बंद.
पुढील ५ वर्षे लेखणी बंद......... पुढील ५ वर्षे लेखणी बंद.
पुढील ५ वर्षे लेखणी बंद......... पुढील ५ वर्षे लेखणी बंद.




Sunday 26 October 2014

"कविता सागर" दिवाळी अंकात "अपाविमं"चे लेख

जयसिंगपूर येथून ‘कविता सागर' हा दिवाळी अंक प्रसिद्ध होतो. अनिल दुधाट पाटील हे या दिवाळी अंकाचे संपादक असून, डॉ. सुनिल पाटील हे प्रकाशक आहेत. मोठा वाचक वर्ग असलेल्या या दिवाळी अंकात अपाविमंवरील दोन लेख प्रसिद्ध झाले आहेत. अपाविमंच्या संस्थापिका आदरणीय अनिता पाटील यांचा ‘कुणबी मराठा एकच : तुकाराम गाथ्यातील पुरावे' हा लेख या दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे अपाविमंचे कार्यकारी संपादक राजा मइंद यांची ‘ब्राह्मण तुकोबांवर का चवताळले' ही संपूर्ण लेखमाला कविता सागर दिवाळी अंकांत घेण्यात आली आहे. कविता सागर हा दिवाळी अंक अत्यंत दर्जेदार असून, वाचकांकडून त्याला उदंड प्रतिसाद मिळत आहे. कविता सागरच्या टिमला अपाविमंच्या मनापासून शुभेच्छा. 

'कविता सागर' हा दिवाळी अंक
कविता सागर हे केवळ कवितांसाठी प्रसिद्ध होणारे व जगभरात वाचक असलेले एकमेव नियतकालिक आहे; कवितासागरच्या या वेगळेपणाबद्दल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्ड यांनी कवितासागरच्या कार्याची दखल घेऊन विशेष पुरस्काराने सन्मानित केले असून कविता सागर राबवीत असलेल्या उपक्रमांची नोंद रेकॉर्ड बुकमध्ये करण्यात आली आहे. 

कवितासागर दिवाळी अंक जगभरात कुठेही फक्त एका क्लिकवर उपलब्ध करून दिल्यामुळे इंटरनेटच्या माध्यमातून वाचनाचा नवामार्ग स्वीकारणा-या नव्या दमाच्या वाचकांसाठी एक पर्वणी ठरला आहे.  मराठीत दरवर्षी एक हजारच्या आसपास दिवाळी अंकांच्या रूपाने दर्जेदार साहित्य तयार होत असतं. महाराष्ट्रातील मराठी साहित्य प्रेमींना याचा आस्वाद घेणे शक्य असते. पण महाराष्ट्राबाहेरील आणि परदेशात राहणा-या मराठी बांधवांना ऑनलाइनच्या माध्यमातून दर्जेदार साहित्य फारच कमी प्रमाणात पोहचते. कवितासागरमधील साहित्याचा आस्वाद घेऊ इच्छिणा-या रसिक वाचकांना इंटरनेटवरील दिवाळी अंक उपयुक्त ठरणारा आहे. कवितासागर दिवाळी अंक इंटरनेट बरोबरचं आयपॅड व स्मार्ट फोनवरही उपलब्ध आहे.
  
कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर गेल्या अनेक वर्षापासून ‘कवितासागर’ दिवाळी अंकाची सातत्याने निर्मिती करीत आहे. गतवर्षी कवितासागरच्या दिवाळी अंकाला आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटनेचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला होता, त्याचंबरोबर या पूर्वीही सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक म्हणून कवितासागरला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. 

Tuesday 16 September 2014

अपाविमंने पूर्ण केली ५ लाख वाचने!

सप्टेंबर २०१४ च्या उदयाबरोबर 'अनिता पाटील विचार मंच'ने ५ लाख वाचनांचा टप्पा ओलांडला. ५ लाख वाचने पूर्ण करणारा हा मराठीतील पहिला वैचारिक ब्लॉग ठरला आहे. अवघ्या ३ वर्षांच्या अवधीत ५ लाख वाचने पूर्ण करणाराही हा मराठीतल एकमेव ब्लॉग आहे. वाचकांच्या प्रेमामुळेच हा टप्पा गाठणे आम्हाला शक्य झाले. आम्ही सन्माननीय वाचकांचे ऋणी आहोत. हे प्रेम असेच टिकून राहील, याबाबत आमच्या मनात कोणतीही शंका नाही. 

गेली दोन वर्षे संपादक मंडळ ब्लॉगचे काम पाहत असला तरी ब्लॉगच्या यशाच्या खऱ्या शिल्पकार ब्लॉगच्या संस्थापिका आदरणीय अनिता ताई पाटील याच आहेत. महाराष्ट्राच्या मनात सलत असलेले प्रश्न अनिता ताई यांनी शोधून काढले. या प्रश्नांचा मूलगामी वेध घेऊन साध्या सोप्या शैलीत लेखन केले. ब्लॉगच्या तांत्रिक मांडणी आणि देखणेपणाकडेही तार्इंनी विशेष लक्ष दिले होते. अनिता ताई यांनी या ब्लॉगला दिलेल्या या आकारातच ब्लॉगचे यश सामावलेले आहे. 

अनिता ताई यांचा लेखनाचा झपाटाही मोठा. अवघ्या वर्षभराच्या काळात त्यांनी तब्बल १५० लेख ब्लॉगवर पोस्ट केले होते. हे सर्व लेखन तार्इंनी एकहाती केले होते. तसेच सर्व लेखांचे विषयही अत्यंत मूलभूत होते. तार्इंनी घालून दिलेल्या पायवाटेवरूनच संपादक मंडळ वाटचाल करीत आहे. ताई ब्लॉग लेखनापासून वेगळ्या झाल्या असल्या तरी, त्यांचे मार्गदर्शन संपादक मंडळाला नियमित लाभत आहे. गेल्या दोन वर्षांच्या काळात त्यांनी अनेक नवे विषय सूचविले, तसेच त्यांच्या मांडणीबाबतही मार्गदर्शन केले. संत जनाबाई यांच्या "घार हिंडते आकाशी । चित्त तिचे पिलापाशी ।।" या अभंग पंक्तीप्रमाणे त्यांचे बारीक लक्ष आहे, म्हणूनच संपादक मंडळ यशाच्या पायऱ्या चढू शकले. 

सन्याननीय वाचक आणि आदरणीय अनिता ताई पाटील यांचे ऋण व्यक्त करून हे निवेदन आम्ही येथेच संपवितो. 

-संपादक मंडळ, अनिता पाटील विचार मंच.

Monday 15 September 2014

पोलिसांनी नीट तपास न केल्यामुळे सावरकर हे महात्मा गांधी खून खटल्यातून सुटले

जीवनलाल कपूर आयोगाने सावरकरांवर ठेवला होता कटाचा ठपका


- राजा मइंद, कार्यकारी संपादक, अपाविमं.


महात्मा गांधी यांची हत्या करण्याच्या कटात विनायक दामोदर सावरकर हेही एक आरोपी होते. तथापि, न्यायालयाने त्यांची पुराव्यांअभावी मुक्तता केली. न्यायालयाने सावरकरांना सोडले तरी ते खरोखरच निर्दोष होते का?  सावरकर सुटण्यास दोन प्रमुख कारणे होती. 
१. हल्लेखोर अतिरेकी नथुराम गोडसे याने गांधी हत्येच्या कटाची आखणी आणि अंमलबजावणी याची संपूर्ण जबाबदारी स्वतः स्वीकारली. 
२. योग्य रितीने झाला नाही. पोलिस केवळ माफीच्या साक्षीदारावर अवलंबून राहिले. 
वरीलपैकी दुसरया कारणांचा या लेखात आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. माफीचा साक्षीदार बनलेला दिगंबर बडगे याच्या निवेदनावरच गांधी हत्येचा संपूर्ण खटला उभा होता. बडगेने पोलिसांना सांगितले की, "महात्मा गांधी यांना मारण्यापूर्वी नथुराम गोडसे सावरकरांना मुंबईत जाऊन भेटला होता. सावरकरांनी गोडसेला 'यशस्वी होऊन या' असा आशीर्वादही दिला होता." बडगेने दिलेल्या या जबाबातील तथ्ये तपासण्यासाठी कोणताही प्रयत्न पोलिसांनी केला नाही; त्यामुळेच सावरकर या खटल्यातून मुक्त होऊ शकले, असे कपूर कमिशनच्या अहवालातून समोर आलेल्या पुराव्यांवरून दिसते. 

महात्मा गांधी यांची हत्या होऊन जवळपास १७ वर्षे उलटल्यानंतर १९६५ साली केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती जीवनलाल कपूर यांच्या नेतृत्वाखाली आयोगाची स्थापना केली होती. आयोगाने या प्रकरणाचा बारकाईने तपास केला आणि त्याचा अहवाल केंद्र सरकारला सादर केला. या अहवालातील तथ्ये खळबळजनक आहेत. 

गांधी खून खटल्यातील माफीचा साक्षीदार दिगंबर बडगे याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, १७ जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसे सावरकरांना मुंबईतील त्यांच्या घरी भेटायला गेला. त्याच्या सोबत दिगंबर बडगे, नारायण आपटे आणि शंकर किस्तैया हेही होते. बडगे आणि किस्तैया हे सावरकरांच्या घराबाहेरच थांबले. नथुराम गोडसे आणि नारायण आपटे आत गेले. सावरकरांना भेटून बाहेर आल्यानंतर नारायण आपटे याने बडगेला सांगितले की, सावरकरांनी आम्हाला ‘यशस्वी होऊन या' असा आशीर्वाद दिला आहे. 

बडगेने दिलेली ही माहिती अत्यंत महत्त्वाची होती. तथापि, न्यायालयाने ती पूर्णतः ग्राह्य धरण्यास नकार दिला. पोलिसांनी अन्य कोणत्याही पुराव्यांच्या अथवा साक्षींच्या माध्यमांतून बडगेच्या या साक्षीची खातरजमा केली नाही, असा ठपका न्यायालयाने ठेवला. त्यामुळे सावरकर खटल्यातून सुटले. 

या खटल्यातील सावरकरांची सुटका तांत्रिक होती. तसेच बडगेने दिलेली माहिती खोटी नसून पूर्णतः खरी होती, हे नंतर कपूर आयोगाच्या चौैकशीतून स्पष्ट झाले. 

जीवनलाल कपूर आयोगाने या प्रकरणाची चौैकशी करताना दिगंबर बडगे याने सावरकरांच्या विरोधात दिलेल्या साक्षीला विशेष महत्त्व दिले. बडगेच्या साक्षीतील तथ्यांश शोधण्यासाठी आयोगाने इतर स्रोत तपासले. सावरकरांचा अंगरक्षक अप्पा रामचंद्र कासार आणि सचिव गजानन विष्णू दामले यांच्या साक्षी आयोगाने नोंदविल्या. या दोघांनीही बडगेची माहिती खरी असल्याचे आयोगाला सांगितले. कासार याने सांगितले की, ‘‘नथुराम गोडसे आणि नारायण आपटे हे दोघे २३-२४ जानेवारीच्या दरम्यान सावरकरांना भेटले." दामलेने सांगितले की, "जानेवारीच्या मध्यात केव्हा तरी गोडसे आणि आपटे सावरकरांना येऊन भेटले. सावरकरांच्या घराच्या आवारात असलेल्या बागेत ते दोघे त्यांच्यासोबत बसले होते."

रामचंद्र कासार आणि गजानन विष्णू दामले यांच्या साक्षीला कपूर आयोगाने महत्त्व दिले. आयोगाने आपला निष्कर्ष नोंदविताना म्हटले की, ‘‘सावरकर आणि त्यांच्या गटाने कट रचल्याचे या तथ्यांमधून स्पष्टपणे समोर येथे."

यातून एकच वास्तव समोर येते. ते असे की, विनायक दामोदर सावरकर हे भारतीय पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे गांधी हत्येच्या खटल्यातून मुक्त होऊ शकले. पोलिसांनी योग्य रितीने तपास केला असता, तर कटात सहभागी असल्याबद्दल सावरकरांना हमखास शिक्षा झाली असती. 

कपूर आयोगाच्या तपासावर भारतीय प्रसार माध्यमांतून मोठ्या प्रमाणात विचार मंथन झाले आहे. अलिकडेच "द हिंदू" या आघाडीच्या इंग्रजी दैनिकाने या संबंधीचा एक लेख प्रसिद्ध केला होता. जिज्ञासू वाचकांना हा लेख खालील लिंकवर वाचता येईल. How Savarkar escaped the gallows शीर्षकाचा हा लेख प्रसिद्ध अभ्यासक ए. जी. नुरानी यांनी लिहिला आहे.

How Savarkar escaped the gallows

Wednesday 10 September 2014

ब्राह्मणांनी महात्मा गांधी यांना का मारले?

५५ कोटीं हा तर निव्वळ बहाणा


- राजा मइंद, कार्यकारी संपादक, अपाविमं.



३० जानेवारी १९४८ रोजी दिल्लीतील बिर्ला हाऊस समोर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पुण्यातील ब्राह्मण अतिरेकी नथुराम गोडसे याने महात्मा गांधी यांच्यावर हाताच्या अंतरावरून तीन गोळ्या झाडल्या. गांधी हत्येच्या खटल्यात शंकर किस्तैैया आणि मदनलाल पहावा हे दोन आरोपी वगळता सर्व आरोपी महाराष्टराष्ट्रातील होते. तसेच सर्वच्या सर्व जण ब्राह्मण होते. गांधी हत्येच्या आरोपींमध्ये विनायक दामोदर सावरकर, दिगंबर बडगे (हा नंतर माफीचा साक्षीदार बनला.),  नारायण आपटे, विष्णू करकरे यांचा सामवेश होता. नथुराम गोडसे आणि नारायण आपटे यांना बेरेट्टा जातीचे पिस्तुल खरेदी करण्यासाठी दत्त्तात्रय परचुरे आणि गंगाधर दंडवते यांनी मदत केली. हे दोघेही ब्राह्मणच होते. 

येथे प्रश्न असा निर्माण होतो की, महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी महात्मा गांधी याना का मारले? ब्राह्मणांच्या मनात गांधीजींबद्दल असा कोणता राग होता?

या खटल्यातील एक आरोपी आणि नथुराम गोडसे याचा भाऊ गोपाळ गोडसे याने गांधी हत्येवर "५५ कोटींचे बळी" हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात केलेल्या दाव्याचा थोडक्यात तपशील असा : "भारताच्या फाळणीच्या वेळी भारत सरकारच्या कोषात जी शिल्लक होती, त्यातील ५५ कोटी रुपये पाकिस्तानच्या वाट्याला गेले होते. पाकिस्तानने काश्मिरात सैन्य घुसविल्यामुळे भारत सरकारने हे ५५ कोटी रुपये देण्याचे नाकारले. मात्र महात्मा गांधी यांनी अशा प्रकारे वचन मोडणे चुकीचे असल्याचे सांगून पाकिस्तानला ठरल्या प्रमाणे ५५ कोटी रुपये देण्यास सांगितले. इतकेच नव्हे, तर आठवड्यात उपोषणही केले. त्यामुळे १३ जानेवारी १९४८ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने एक पाकिस्तानला हा पैसा देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे प्रक्षुब्ध झालेल्या गोडसे आणि त्याच्या मित्रांनी महात्मा गांधी यांची हत्या केली..."

गोपाळ गोडसे याने केलेला हा दावा बिलकूल खोटा आहे. पहिला मुद्दा असा की, फाळणीच्या वेळी पाकिस्तानला एकूण ७५ कोटी रुपये देण्याचे मान्य करण्यात आले होते. त्यातील २० कोटी रुपयांचा पहिला हप्ता पाकिस्तानला देण्यातही आला होता. उरलेले ५५ कोटी रुपये देण्याचे भारत सरकारने रद्द केले नव्हते. या पैशाचे हस्तांतरण केवळ तात्पुरत्या स्वरूपात रोखण्यात आले होते. 

दुसरा मुद्दा असा की, १३ जानेवारी १९४८ रोजी भारत सरकारने पाकिस्तानला ५५ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला त्या आधी महात्मा गांधी यांना मारण्याचे एकूण ५ प्रयत्न झाले होते. १९३४ मध्येच गांधींना मारण्याचा पहिला प्रयत्न झाला होता. म्हणजेच ५५ कोटींच्या घटनेच्या तब्बल १४ वर्षे आधीपासून गांधींना मारण्याचे प्रयत्न ब्राह्मण करीत होते. त्यामुळे ५५ कोटींचे बळी हा गोपाळ गोडसे याचा दावाच खोटा ठरतो. 
महात्मा गांधी यांच्या हत्या कटातील आरोपींचा एकत्रित फोटो. उभे (डावीकडून) : शंकर किस्तैैया, गोपाळ गोडसे, मदनलाल पहावा, दिगंबर बडगे (माफीचा साक्षीदार).  खाली बसलेले (डावीकडून) : नारायण आपटे, विनायक दामोदर सावरकर, नथुराम गोडसे, विष्णू करकरे. 
मग प्रश्न उरतो की, ब्राह्मणांनी महात्मा गांधी यांना का मारले? या प्रश्नाची आम्हाला ३ प्रमुख उत्तरे आम्हाला सापडली आहेत. ही उत्तरे अशी : 

१. महात्मा गांधी हे भारताचे निर्विवाद नेते होते. इतकेच नव्हे, तर जगाच्या राजकारणावर त्यांच्या विचार-आचारांचा प्रभाव होता. असे असले तरी गांधी हे जातीने ब्राह्मण नव्हते. ते बहुजन समाजातून आले होते.ब्राह्मणेतर माणसाचा एवढा गाजावाजा होणे हे ब्राह्मण श्रेष्ठत्वाच्या गंडाने पछडलेल्या ब्राह्मणवाद्यांच्या पचनी पडत नव्हते.

२. महात्मा गांधी यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव इतका विलक्षण होता की, बहुजन समाजातीलच नव्हे, त्याकाळातील अनेक बडे ब्राह्मण नेते महात्मा गांधी यांची अनुयायी होते. पंडीत जवाहरलाल नेहरू हे यातील सर्वांत मोठे नाव. काश्मिरी ब्राह्मण असूनही नेहंनी गांधी यांचे अनुयायीत्व पत्करणे, ब्राह्मणवाद्यांना पसंत नव्हते. महाराष्टड्ढातूनही अनेक ब्राह्मण गांधीजींचे अनुयायी बनले होते. साने गुरुजी आणि विनोबा भावे ही त्यातील काही ठळक नावे. यामुळे महाराष्ट्रातील ब्राह्मणवादी खवळून उठले होते.

३. महात्मा गांधी यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांना आपले अध्यात्मिक गुरू मानले होते. तुकाराम महाराज हे महाराष्टड्ढातील ब्राह्मणवाद्यांच्या दृष्टसीने क्रमांक एकचे शत्रू होते. आणि नेमके त्यांनाच गांधीजींनी गुरुस्थानी मानल्याने ब्राह्मणवाद्यांचे पित्त न खवळते तरच नवल.

महात्या गांधी ब्राह्मण कुळात जन्मले असते आणि त्यांनी तुकोबांऐवजी रामदासांना गुरू मानले असते, तर महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी त्यांची हत्या केली नसती. त्याऐवजी त्यांचे मंदीर बांधून नित्यपुजा चालविली असती.

Thursday 4 September 2014

ब्राह्मण तुकोबांवर का चवताळले? भाग - ३

वेद प्रणित मार्गावर प्रहार

-राजा मइंद, कार्यकारी संपादक, अपाविमं.



जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्यावर ब्राह्मण चवताळून उठवण्यास आणखी एक प्रमुख कारण म्हणजे महाराजांनी वेद आणि स्मृतींनी प्रतिपादिलेल्या भेदभावकारक मार्गावर केलेला प्रहार होय. आधीच्या लेखांत म्हटल्यांप्रमाणे प्रत्यक्ष वेदांमध्ये भेदभावाला स्थान नसले तरी नंतरच्या स्मृती ग्रंथांनी वेदवाङ्मयास ब्राह्मणांच्या पायाशी आणून बांधले. ब्राह्मणांना फुकट बसून खाण्याची सोय आणि स्त्री-शुद्रांना फक्त ढोर मेहनत करण्याचे कर्तव्य, अशी व्यवस्था स्मृतींनी निर्माण केली. कलियुगात ब्राह्मण आणि शुद्र हे दोनच वर्ण आहेत, असा सिद्धांत ब्राह्मणांनी रुढ केला. त्यामुळे ब्राह्मण वगळता इतर सर्व जातींना कुठलाही धार्मिक अधिकार उरला नाही. त्यांनी फक्त ब्राह्मणांची सेवा करायची. या विषारी व्यवस्थेविरुद्ध तुकोबांनी बंड पुकारले.

वेदांचे करायचे काय?
वेदप्रणित धर्माचा भारतीय जनमानसावर एवढा प्रचंड पगडा आहे की, वेदांना नाकारणारे पंथ पाखांड ठरतात. उदा. वेदप्रमाण्य नाकारल्यामुळे महानुभाव पंथाला मधली अनेक शतके जवळपास अज्ञातवासात काढावी लागली. अशा परिस्थितीत वेदांचे करायचे काय? असा प्रश्न तुकोबांसमोर होता. तुकोबांनी वेदप्रमाण्यावर कोणतेही भाष्य न करता, भेदभावावर प्रहार केला. तसेच वेद वेद काय करता, खुद्द वेदांनीच विठ्ठलाची महती गायली आहे, असे सांगून ब्राह्मण धर्मावर कडी केली. ही मात्रा उत्तम लागू पडली. लोकांच्या झुंडी तुकोबांचा उपदेश ऐकायला येऊ लागल्या. तुकोबा त्यांना सांगत :
वेद अनंत बोलिला । अर्थ इतुकाची साधिला ।।
विठोबासी शरण जावे । निजनिष्ठ नाम गावे ।।
कर्मकांड सोडा. विठोबाला शरण जा आणि नामस्मरण करा. हे मी माझ्या पदरचे सांगत नाही, खुद्द वेदांनीच हे सांगितले आहे, असे तुकोबा या अर्भगात म्हणतात.
तुकोबांच्या या मुत्सद्दीपणावर ब्राह्मण हडबडले. काय करावे, हे त्यांना कळेना. अशातच काही ब्राह्मण मंडळींनी तुकोबांचा अनुग्रह घेतला. त्यामुळे चिडलेल्या ब्राह्मणांनी प्रचार सुरू केला की, "नुसते भजन म्हटल्याने कुठे देव गवसतो का, त्यासाठी ब्राह्मणांच्या हस्ते अनुष्ठाने आणि इतर कर्मकांडे करणे आवश्यक आहे", असा प्रचार ब्राह्मणांनी सुरू केला. त्यावर तुकोबांनी ब्राह्मणांना थेट आव्हान देत म्हटले की, ब्राह्मणा न कळे आपुले ते वर्म । गवसे परब्रह्म नामे एका ।।
तुकोबा म्हणतात, ब्राह्मणांना काहीच कळत नाही. नामस्मरणाने नक्की इश्वर भेटतो. नारायणाचे नाम घेणे हेच आचमन आणि संध्या होय. नित्य भजन हेच ब्रह्मकर्म होय.

कोणत्याही प्रकारे अर्थ समजून न घेता, वेदमंत्रांची घोकमपट्टी करणाèया ब्राह्मणांना तुकोबांनी वेडगळ म्हटले. तुकोबा म्हणतात : वेदांचे गव्हर न कळे पाठका । अधिकार लोका नाही येरा ।।
याच अर्भगात तुकोबांनी उच्छेद जाला मारगाचा असे म्हणून तुकोबांनी वेदमार्गाला पूर्ण पराभूत केले आहे. 

ब्राह्मणांच्या पोषाखीपणावर प्रहार
कर्मकांडे नष्ट करायची असतील, तर ब्राह्मणांचे ब्राह्मणपणा ज्या बाबींवर अवलंबून आहे, त्यावर प्रहार करायला हवा, हे ओळखून तुकोबांनी शेंडी, जाणवे, सोवळे या बाह्य संकेतांवर जोरदार प्रहार केला. "शिखा सूत्र तुझा गुंतला जमान । तंववरी तू जाण श्रुतिदास ।।" या अभंगात तुकोबांनी केलेला प्रहार किती घातक होता, हे लक्षात येते. तुकोबा म्हणतात की, शेंडी आणि जाणवे यात तुझा जीव अडकलेला आहे, तोपर्यंत तू श्रुतींचा म्हणजेच वेदांचा दासच राहशील. तुला यातून काहीच लाभ होणार नाही. तू नक्कीच नरकात जाशील.शेंडी आणि जाणव्याच्या बाह्य उपचारांपेक्षा आतून वृत्तीने तू निराळा हो, तेव्हाच तू खरा ब्राह्मण होशील. 
येथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, वेदप्रणित मार्गाचा उच्छेद करीत असताना तुकोबाराय नामस्मरणाचा सोपा पर्यायी मार्गही त्यासोबत देत आहेत. 

लेखात आलेले अभंग
(या लेखात आलेल्या अभंग पंक्ती पुढील अभंगांतून घेतल्या आहेत. देहू संस्थानने छापलेल्या गाथ्यातून या अभंग संहिता घेतल्या आहेत. वाचकांच्या सोयीसाठी गाथ्यातील अभंग क्रमांक अभंगांच्या शेवटी दिले आहेत.) 

ब्राह्मणा न कळे आपुले ते वर्म । गवसे परब्रह्म नामे एका ।।१।।
लहान थोरासी करितो प्रार्थना । दृढ नारायणा मनी धरा ।।ध्रु।।
सर्वांप्रति माझी हे चि असे विनंती । आठवा श्रीपती मनामाजी ।।२।।
केशव नारायणा करिता आचमन । ते चि संध्या स्नान कर्म क्रिया ।।३।।
नामे करा नित्य भजन भोजन । ब्रह्मकर्म ध्यान याचे पायी ।।४।।
तुका म्हणे हे चि निर्वाणीचे शस्त्र । म्हणोनि सर्वत्र स्मरा वेगी ।।५।।
(अभंग क्रमांक ४३५६) 
अर्थ : परब्रह्म हे नामामुळेच प्राप्त होते, हे वर्म ब्राह्मणाला कळत नाही. म्हणून माझी सर्व लहान थोरांस विनंती आहे की, त्यांनी नारायणाला मनी धरावे. श्रीपतीची आठवण मनात ठेवा ही माझी सर्वांना विनंती आहे. साधे पाणी पिताना केशव नारायणाची आठवण काढली की संध्या आणि स्नानादी कर्म होऊन जाते. भोजन करताना नामस्मरण केले की सर्व प्रकारची ब्रह्मकर्मे आपोआप पूर्ण होतात. तुकोबा सांगतात की, नामस्मरण हेच निर्वाणीचे शस्त्र आहे, म्हणून नामस्मरण करा.

वेदांचे गव्हर न कळे पाठका । अधिकार लोका नाही येरा ।।१।।
विठोबाचे नाम सुलभ सोपा रे । तरी एक सरे भवसिंधू ।।ध्रु।।
जाणत्या असाध्य मंत्र तंत्र काळ । येर तो सकळ मूढ लोक ।।२।।
तुका म्हणे विधी निषेध लोपला । उच्छेद या जाला मारगाचा ।।३।।
(अभंग क्रमांक ३१५) 
अर्थ - वेदांचे पठण करणा-यांनाही ते काय वाचित आहेत, हे कळत नाही. तसेच वेद वाचण्याचा आणि ऐकण्याचा अधिकारही इतरांना (स्त्री-शुद्रांना) नाही. वेद वाचण्यापेक्षा विठोबाचे नाम घेणे अधिक सुलभ आणि सोपे आहे. विठूनामाच्या स्मरणानेच भवसिंधू तरून जाता येईल. वेदांतील मंत्र-तंत्र जाणत्या लोकांनाही असाध्य आहेत, मग अज्ञानी लोकांची काय कथा? तुकोबा म्हणतात की, विठोबाच्या सोप्या नाम मार्गाने व्यर्थ विधिनिषेध सांगणारा वेदाचा मार्ग लोपला आहे. वेदाच्या मार्गाचा पूर्ण उच्छेदच झाला आहे. 

वेद अनंत बोलिला । अर्थ इतका चि शोधिला ।।१।।
विठोबासी शरण जावे । निजनिष्ठ नाम गावे ।।ध्रु।।
सकळ शास्त्रांचा विचार । अंति इतका चि निर्धार ।।२।।
अठरा पुराणी सिद्धांत । तुका म्हणे हा चि हेत ।।३।।
(अभंग क्रमांक ४०४९) 
अर्थ - वेदाने अनेक प्रकारची बडबड केली आहे. पण त्यातून त्याने एकच गोष्टशोधली. ती म्हणजे विठोबाला शरण जाणे आणि त्याचे नाम गाणे. सर्व शास्त्रांचा शेवटी हाच विचार आणि निर्धार आहे. तुकोबा सांगतात की, अठरा पुराणांत विठोबाला शरण जाणे हा एकच सिद्धांत आणि हेतू आहे. 

शिखा सूत्र तुझा गुंतला जमान । तंववरी तू जाण श्रुतिदास ।।१।।
त्याची तूज काही चुकता चि नीत । होशील पतित नरकवासी ।।ध्रु।। 
बहु जालासी चतुर शाहणा । शुद्ध आचरणा चुको नको ।।२।।
शिखा सूत्र याचा तोडी तूं संबंध । मग तुज बाध नाही काही ।।३।।
तुका म्हणे तरी वत्र्तुनि निराळा । उमटती कळा ब्रह्मीचिया ।।४।। 
(अभंग क्रमांक ३९१०) 
अर्थ - शेंडी (शिखा) आणि जाणवे (सूत्र) यात तुझा जीव अडकलेला आहे, तोपर्यंत तू श्रुतींचा म्हणजेच वेदांचा दासच राहशील. तुला यातून काहीच लाभ होणार नाही. तू नक्कीच नरकात जाशील. तू खूप चतूर, शहाणा असशील, पण ते निरुपयोगी असून शुद्ध आचरणच महत्वाचे आहे. त्यामुळे आचरण शुद्ध ठेवण्यास चुकू नको. शेंडी आणि जाणवे तू तोडून टाक, मगच तुला काही बाधा येणार नाही. तुकोबा म्हणतात, अशा प्रकारे शेंडी आणि जाणव्याच्या बाह्य उपचारांपेक्षा आतून वृत्तीने तू निराळा हो, तेव्हाच तुझ्यात ब्रह्मकळा उमटतील. 

Monday 18 August 2014

साध्वीवर होती "जोशी"ची वाईट नजर?

हे पाहा संघाचे संस्कार 


साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर हिच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक सुनील जोशी याची वाईट नजर होती आणि जोशी याच्या हत्येमागे ते एक प्रमुख कारण होते, अशी खळबळजनक बाब एनआयएच्या तपासातून पुढे आल्याचे सांगण्यात येत आहे. 

२००७ मध्ये झालेल्या सुनील जोशीच्या हत्येप्रकरणी मध्य प्रदेशमधील देवास पोलिसांनी आधीच साध्वी प्रज्ञा हिच्यावर आरोप ठेवलेले आहेत. आता एनआयए या प्रकरणात आरोपपत्र दाखल करणार असून साध्वीचे नाव पोलीस आणि एनआयए अशा दोन्ही तपास यंत्रणांच्या आरोपपत्रात असणार आहे.

'इंडियन एक्स्प्रेस' या इंग्रजी वर्तमानपत्राच्या वृत्तानुसार, जोशीची वाईट नजर साध्वीवर पडली होती. तो तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करत होता. शिवाय अजमेर बॉम्बस्फोटाबाबत जोशी सर्व माहिती उघड करेल, अशी भीती साध्वीला होती. त्यातूनच जोशीची हत्या घडवून आणण्यात आली असावी, असा एनआयएच्या तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

२९ डिसेंबर २००७ रोजी सुनील जोशी याची हत्या करण्यात आली होती. राजेंद्र आणि लोकेश या दोन आरोपींनी ही हत्या केली होती. हे दोघे आणखीही कटात सामिल होते. मुस्लिमांवर आणखी हल्ले करण्याची योजना ते आखत होते, असेही एनआयएच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

Wednesday 13 August 2014

ब्राह्मण तुकोबांवर का चवताळले? भाग- २

तुकोबांनी ब्राह्मणांच्या भोंदुगिरीचा पर्दाफाश केला

हिंदू धर्मातील परंपरेने ब्राह्मणांना कोणतेही काम न करता बसून खाण्याची व्यवस्था करून ठेवली आहे. ही व्यवस्था पूर्णतः भोंदूगिरीवर आधारलेली होती. तुकोबांनी या भोंदूगिरीला तीव्र विरोध केला. तुकोबांनी केलेला हा विरोध जनमानसाला पटला. तुकोबांना मोठा अनुयायी वर्ग मिळाला. ब्राह्मणांच्या भोंदूगिरीचे पितळ उघडे पाडणारे अभंग लोकांच्या तोंडी खेळू लागले. या पाश्र्वभूमीवर ब्राह्मणांच्या पोटापाण्याचा उद्योग धोक्यात आला. तसेच त्यांच्या अस्तित्वालाही धोका निर्माण झाला. त्यामुळे ब्राह्मण तुकोबांविरुद्ध चवताळून उठले. 
ब्राह्मणांचा पोटापाण्याचा उद्योग त्यांच्या भोंदूगिरीवर अवलंबून होता. आजही काही प्रमाणात आहे. तुकोबांनी बाह्य देखाव्याला नेहमीच विरोध केला. ब्राह्मणी कर्मकांडात बाह्य देखाव्यालाच महत्त्व होते. इतकेच काय ब्राह्मणांचा शेंडी, जानवे आणि कमरेचे सोवळे हा वेशही दिखाऊच होता. या वेशानुसा येणा-या आंतरिक शुद्धता ब्राह्मण पाळत नव्हते. या वेशाचा वापर केवळ दक्षिणा उकळण्यासाठी केला जात होता. बाह्य वेशाला पाहूनच लोक भूलतात आणि भोंदुगिरीचे शिकार होतात. उदा. रावण संन्याशाचा वेश परिधान करून आला, त्यामुळेच सीता लक्ष्मण रेषा ओलांडून त्याच्या तावडीत येऊ शकली. ब्राह्मणांचा शेंडी, जानवे आणि सोवळे हा वेशही याच प्रकारचा होता. त्यामुळे तुकोबांनी "शिखा सूत्र याचा तोडी तूं संबंध । मग तुज बाध नाही काही ।।" अशाा शब्दात शेंडी आणि जानवे तोडून फेकण्याचा सल्ला ब्राह्मणांना दिला. 

ब्राह्मणांच्या पैसे कमावण्याच्या उद्योगात पुराणे आणि पोथ्यांतील कथा सांगणे याचा मुख्यत्वाने समावेश होता. नुसती पुराणे सांगून आणि ऐकून काहीच होत नाही. माणसात आंतरिक बदल झाला पाहिजे, हे ओळखून तुकोबानी पुराण कथनावर प्रहार केला.  तुकोबा म्हणतात : 
जालासी पंडीत पुराण सांगसी । परी तू नेणसी मी हे कोण ।।
गाढवभरी पोथ्या उलथिसी पाने । परी गुरुगम्य खुणे नेणशी बापा ।।
अशा पोथ्या-पुराणे सांगण्याच्या या उद्योगाला तुकोबांनी थेट "गाढव ओझ्या"ची उपमा दिली आहे. हा आघात प्रचंड मोठा होता. 

तीर्थस्थाने हा ब्राह्मणांच्या कमाईचा आणखी एक भाग. तीर्थावर विविध प्रकारची व्रते आणि विधि करायला सांगून ब्राह्मण गोरगरिब आणि अज्ञानी लोकांकडून पैसे उकळित असत. त्यावर तुकोबांनी प्रहार केला. तीर्थस्थानांवर जाऊ नका. तेथे दगडधोंड्यांशिवाय काहीच नाही. तीर्थांवर तुम्हाला देव भेटणारच नाही. देव हा संत-सज्जनांमध्ये आहे. संतसज्जनांच्या सहवासात राहा, तुम्हाला देवाचा साक्षात्कार आपोआप होईल, असा उपदेश तुकोबांनी केला. "तीर्थी धोंड पाणी । देव रोकडा सज्जनी ।।" हा तुकोबांचा अभंग जिज्ञासूंनी जरूर पाहावा. 

ब्राह्मण स्वतः श्रेष्ठ समजत. इतर जातीतील कोणाही व्यक्तीचा स्पर्शही त्यांना वज्र्य होता. त्यासाठी ब्राह्मणांनी सोवळ्या-ओवळ्याची चाल लोकांत लावून दिली. ब्राह्मणांच्या या कथित श्रेष्ठत्वास तुकोबांनी "सोवळा तो जाला । अंगिकार देवे केला ।।" या शब्दांत सुरुंग लावला. देवाचा अंगिकार जेणे केला, तो प्रत्येक जण सोवळा म्हणजेच पवित्र आहे, अशी घोषणा तुकोबांनी केली. ब्राह्मणांचे जाती श्रेष्ठत्व तुकोबांनी अशा प्रकारे एका फटक्यात नष्ट करून टाकले. 

तुकोबांच्या या उपदेशामुळे ब्राह्मणांचे पोटापाण्याचे खोटारडे उद्योग बंद पडू लागले. त्यांचे जाती श्रेष्ठत्व धोक्यात आले. एक प्रकारे त्यांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला. त्यामुळे ब्राह्मण तुकोबांवर चवताळून उठले. 

या लेखांतील विवेचनात आलेले मूळ अभंग खाली देत आहोत. हे अभंग देहू संस्थानने प्रसिद्ध केलेल्या गाथ्यातून घेतले आहेत. मूळ गाथ्यात हे अभंग जिज्ञासूंना पाहता यावेत यासाठी त्यांचा गाथ्यातील क्रमांक अभंगाच्या शेवटी दिला आहे. 

शिखा सूत्र तुझा गुंतला जमान । तंववरी तू जाण श्रुतिदास ।।१।।
त्याची तूज काही चुकता चि नीत । होशील पतित नरकवासी ।।ध्रु।। 
बहु जालासी चतुर शाहणा । शुद्ध आचरणा चुको नको ।।२।।
शिखा सूत्र याचा तोडी तूं संबंध । मग तुज बाध नाही काही ।।३।।
तुका म्हणे तरी वत्र्तुनि निराळा । उमटती कळा ब्रह्मीचिया ।।४।। 
(अभंग क्रमांक  ३९१०) 
अर्थ -  शेंडी (शिखा) आणि जाणवे (सूत्र) यात तुझा जीव अडकलेला आहे, तोपर्यंत तू श्रुतींचा म्हणजेच वेदांचा दासच राहशील. तुला यातून काहीच लाभ होणार नाही. तू नक्कीच नरकात जाशील. तू खूप चतूर, शहाणा असशील, पण ते निरुपयोगी असून शुद्ध आचरणच महत्वाचे आहे. त्यामुळे आचरण शुद्ध ठेवण्यास चुकू नको. शेंडी आणि जाणवे तू तोडून टाक, मगच तुला काही बाधा येणार नाही. तुकोबा म्हणतात, अशा प्रकारे शेंडी आणि जाणव्याच्या बाह्य उपचारांपेक्षा आतून वृत्तीने तू निराळा हो, तेव्हाच तुझ्यात ब्रह्मकळा उमटतील.  

जालासी पंडीत पुराण सांगसी । परी तू नेणसी मी हे कोण ।।१।।
गाढवभरी पोथ्या उलथिसी पाने । परी गुरुगम्य खुणे नेणशी बापा ।।ध्रु।।
तुका कुणबियाचा नेणे शास्त्रमत । एक पंढरीनाथ विसंबेना ।।३।। 
(अभंग क्रमांक  ४३६९) 
अर्थ - तू पंडीत होऊन पुराण सांगतो आहेस, पण आपण कोण आहोत याचीच ओळख तुला नाही. गाढवाचे ओझे असलेल्या पोथ्यांची पाने तू उलटत राहतोस, पण गुरुला माहिती असलेली कोणतीही खूण (आत्मज्ञान) तू जाणत नाहीस. कुणब्याचे तुकोबा कोणतेही शास्त्रमत जाणत नाहीत, पण ते पंढरीनाथास विसरत नाहीत. (विठोबाला शरण जाणे हीच खरी आत्मखुण आहे. )

तीर्थी धोंडा पाणी । देव रोकडा सज्जनी ।।१।।
मिळालिया संत संग । समर्पिता भले अंग ।।ध्रु।।
तीर्थी भाव फळे । येथे अनाड ते वळे ।।२।।
तुका म्हणे पाप । गेले गेल्या कळे ताप ।।३।।
(अभंग क्रमांक  ११४) 
अर्थ - तीर्थ स्थळावर केवळ दगड आणि पाणी आहे. खरा देव सज्जन माणसांमध्येच आहे. तीर्थावर स्नान करून कोणाचेही अंग भले म्हणजे पवित्र होणार नाही. संतांची संगतीत समर्पित झाल्यानेच ते भले होईल. तीर्थावर भाव फळतो, म्हणजे तीर्थावरील ब्राह्मणाला दक्षिणेच्या रूपाने फळ मिळते. संतांच्या सहवासात मात्र अडाणीही योग्य वळणावर येतात. तुकोबा सांगतात की, संत संगतीने पाप आणि ताप जातो. याची प्रचितीही लगेच येते. 

सोवळा तो जाला । अंगिकार देवे केला ।।१।।
येर करिती भोजन । पोट पोसाया दुर्जन ।।ध्रु।।
चुकला हा भार । तयाचिच येर झार ।।२।।
तुका म्हणे दास । जाला तया नाही नास ।।३।। 
(अभंग क्रमांक  ४२२७) 
अर्थ - सोवळ्या ओवळ्याचे ढोंग पसरवू नकोस, कारण ज्याने देवाचा अंगिकार केला आहे, तो सोवळा झालेला आहे. इतरेजण (जे देवाचा अंगिकार करीत नाहीत असे) दुर्जन असून केवळ पोट पोसण्यासाठी भोजन करतात. जो देवाचा अंगिकार करीत नाही त्याला जन्ममृत्यूची येरझार अटळ आहे. तुकोबा म्हणतात की, जो विठ्ठलाचा दास होतो, त्याचा कधीही नाश होत नाही. 


संबंधित लेख


Friday 1 August 2014

ब्राह्मण तुकोबांवर का चवताळले? भाग-१

तुकोबांनी ब्राह्मणांचा धर्मावरील विशेषाधिकारच नाकारला

-राजा मइंद, कार्यकारी संपादक, अपाविमं.

महाराष्ट्रातील त्या काळातील ब्राह्मण तुकोबांवर का चवताळले? तुकोबांची हत्या करण्यापर्यंत त्यांची मजल का गेली? या प्रश्नांची उत्तरे तुकोबांच्या गाथ्यातच सापडतात. भारतात खोलवर रुजलला ब्राह्मणी धर्म भेदभावाच्या पायावर उभा आहे. ब्राह्मण ही जात यात मोठी लाभधारक आहे. या ब्राह्मण धर्माच्या पायावरच तुकोबांनी घाव घातला. परंपरेने ब्राह्मणांना जातीनिष्ठ श्रेष्ठत्व दिले होते. ते तुकोबांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले. केवळ ब्राह्मण कुळात जन्मला म्हणून कोणीही ब्राह्मण होत नाही, अशी घोषणा तुकोबांनी केली. इतकेच नव्हे, तर ब्राह्मण होण्याचा अधिकार कोणालाही आहे, अशी नवी व्याख्याही त्यांनी केली. तुकोबा म्हणतात की, एखादा मनुष्य अंत्यजाच्या कुळात (सर्वांत हीन जातीत) जन्मला असेल, मात्र तो निस्सीम विठ्ठल भक्त असेल, तर त्याला ब्राह्मणच समजायला हवे. तुकोबांचा या संबंधीचा अभंग असा -
ब्राह्मण तो याती अंतेज असता । मानावा तत्वता निश्चयेसी ।। रामकृष्ण नाम उच्चारी सरळे । आठवी सांवळे रूप मनी ।। 
याच्या विरुद्ध बाजूने विचार मांडताना तुकोबा म्हणतात की, भक्तीहीन असलेल्या ब्राह्मणास अंत्यज मानावे. हा विचार अंत्यंत क्रांतीकारक आहे. ही क्रांती घडविण्यासाठी तुकोबांची वाणी विजेसारखी कडाडते. तुकोबा लिहितात -
अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड । काय त्यासी रांड प्रसवली ।। 
त्याही पुढे जाऊन तुकोबा म्हणतात की, अशा भक्तीहीन ब्राह्मणाला जन्म देणारी स्त्री नक्कीच व्याभिचारी असली पाहिजे. 
हा हल्ला इतका घणाघाती आहे की, त्या काळातील कर्मठ ब्राह्मणांना ती पचणे कठीण झाले असणार. 
धार्मिक न्यायनिवाड्याचा अधिकार
ब्राह्मणी परंपरेने धार्मिक न्याय-निवाडा करण्याचा अधिकार केवळ ब्राह्मणांना दिला आहे. ब्राह्मण कोणाला म्हणायचे आणि ब्राह्मणत्व कोणाला नाकारायचे याचे अधिकार ब्राह्मणांच्या धर्मसभेला होते. संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना ब्राह्मण्याचा हक्क पैठणच्या पंडितांनी नाकारला होता. धर्मपंडितांनी ज्ञानेश्वरादी भावंडांना पतितसावित्रिक ठरवून मौंजीचा अधिकार नाकारला होता. धर्मपंडितांचा हा अधिकार जन्माधिष्ठित जातीवर आधारित आहे. ब्राह्मणाखेरीज इतर कोणत्याही जातीतील व्यक्तीला हा अधिकार नाही. मात्र कुणव्याच्या कुळात जन्मलेल्या तुकारामांनी ब्राह्मण जातीचा हा विशेषाधिकार धुडकावून लावला. इतकेच नव्हे, तर तो स्वत:च्या हाती घेऊन ब्राह्मण कोण याचा निवाडा करणारे अभंग रचले. ते अभंग महाराष्ट्रभर लोकप्रियही झाले. त्यामुळे ब्राह्मण चवताळून उठले. तुकोबांच्या हत्येमागील हे एक प्रमुख कारण आहे. 

तुकोबांच्या गाथ्यात ब्राह्मण कोणाला म्हणायचे याचा न्यायनिवाडा करणारे असंख्य अभंग आहेत. त्यातील मोजके अभंग खाली देत आहोत. सोबत सुलभ अर्थही दिला आहे. हे अभंग देहू संस्थानाने प्रसिद्ध केलेल्या गाथ्यातून घेतले आहेत. प्रत्येक अभंगाच्या शेवटी संबंधित अभंगाचा गाथ्यातील अनुक्रमांक दिला आहे. 

ब्राह्मण तो याती अंतेज असता । मानावा तत्वता निश्चयेसी ।।१।।
रामकृष्ण नाम उच्चारी सरळे । आठवी सांवळे रूप मनी ।।ध्रु।।
शांति क्षमा दया अलंकार अंगी । अभंग प्रसंगी धैर्यवंत ।।२।।
तुका म्हणे गेल्या शडउर्मी अंगे । सांडुनिया मग ब्रह्म चि तो ।।३।।
(अभंग क्रमांक : १२३०)
अर्थ- रामकृष्ण हे साधे सोपे सरळ नाम जो उच्चारतो, तसेच सावळ्या विठ्ठलाचे रूप मनात आठवतो, तो अंत्यज जातीत जन्मला असला तरी ब्राह्मणच आहे. ज्याच्या अंगी शांती, क्षमा आणि दया हे अलंकार आहेत, जो कुठल्याही प्रसंगी अभंग राहतो, असा धैर्यवंत मनुष्य ब्राह्मणच समजावा. तुकोबा सांगतात की, षडविकार ज्याने सांडिले आहेत, तो कुठल्याही जातीत जन्मलेला असला तरी साक्षात ब्रह्मरूप आहे. 

अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड । काय त्यासी रांड प्रसवली ।।१।।
वैष्णव चांभार धन्य त्याची माता । शुद्ध उभयता कूळ याती ।।ध्रु।।
ऐसा हा निवाडा जालासे पुराणी । नव्हे माझी वाणी पदरींची ।।२।।
तुका म्हणे आगी लागो थोरपणा । दृष्टी त्या दुर्जना न पडो माझी ।।३।।
(अभंग क्रमांक : १३४४) 
अर्थ - ब्राह्मण जातीत जन्म घेऊनही जो मनुष्य भक्ती करीत नाही, त्याचे तोंड जळू दे. असा ब्राह्मण रांडेच्या पोटी जन्मला आहे का? चांभार कुळात जन्मलेला मनुष्य वृत्तीने वैष्णव असेल, तर त्याची माता खरोखरच धन्य होय. अशा मनुष्याच्या माता आणि पिता अशा दोन्हीकडची कुळे शुद्ध समजावी. हे मी माझ्या पदरचे सांगत नाही, पुराणांनीच हा नियम केला आहे. तुकोबा म्हणतात की, अभक्त असलेला माणूस कितीही मोठा असला तरी त्याच्या मोठेपणाला आग लागो, तो माझ्या दृष्टीलाही पडू नये. 

ब्राह्मण तो नव्हे ऐसी ज्याची बुद्धी । पाहा श्रुतीमधी विचारूनि ।।१।।
जयासी नावडे हरिनाम कीर्तन । आणीक नृत्य न वैष्णवांचे ।।ध्रु।।
सत्य त्याचे वेळे घडला व्याभिचार । मातेशी वेव्हार अंत्यजाचा ।।२।।
तुका म्हणे येथे मानी आनसारिखे । तात्काळ तो मुखे कुष्ट होय ।।३।।
(अभंग क्रमांक : १२२९) 
अर्थ - ज्याला हरिनाम, कीर्तन आणि वैष्णवांचे नृत्य आवडत नाही, तो ब्राह्मणच नाही. श्रुतीमध्ये म्हणजेच वेदांमध्येच हे लिहिले आहे. हरीनाम, कीर्तन न आवडणारा मनुष्य ब्राह्मण कुळात जन्मला असला तरी तो खरोखर ब्राह्मण असणे शक्य नाही. त्याच्या मातेने अंत्यजाशी व्याभिचार करूनच त्याल जन्माला घातले असले पाहिजे. तुकोबा म्हणतात की, तोंडाने हरीनाम घेणा-या अशा माणसाच्या मुख तात्काळ कुष्टाचे होईल.




Tuesday 29 July 2014

अशी झाली तुकोबांची हत्या

-राजा मइंद, कार्यकारी संपादक, अपाविमं.


"तुका सप्तशती" या ग्रंथालाच "वैकुंठ गाथा" असेही नाव आहे. या ग्रंथातच ते नमूद आहे.  ग्रंथाचा कर्ता आधूत कोळी नामक कवी आहे. आधूत हा तुकोबांवर घालण्यात आलेल्या मारेक-यांचा म्होरक्या होता. आधूत हा शब्द अवधूतचा अपभ्रंश असावा, असे दिसते. आधूतने आपली कहाणी या ग्रंथात थोडक्यात कथन केली आहे. मारेकरी तुकोबांना मारायला गेले खरे; पण समाधी अवस्थेत असलेल्या तुकोबांच्या चेह-यावरील तेज पाहून ते घाबरले. त्यांच्या हातातील तरवारी आणि पलिते गळून पडले. तुकोबांना मारण्याऐवजी त्यांना मनोभावे वंदन करून मारेकरी परतले. नंतर आधूतला तुकोबांचा अनुग्रह झाला. त्याला अचानक काव्यस्फुर्ती झाली. त्याचे फलित म्हणजे हा ग्रंथ होय. स्वत: मारेक-यांपैकीच एकाने हा ग्रंथ लिहिलेला असल्यामुळे त्याचे ऐतिहासिक मोल प्रचंड मोठे आहे. "अपाविमं"चा संशोधक संघ त्यावर काम करीत आहे. हा ग्रंथ जेवढा उपलब्ध आहे, तेवढ्या स्वरूपात लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. 

या ग्रंथाची भाषाही अद्वितीय आहे. यातील अनेक शब्द त्या काळातील बोलीभाषेतून उचलले आहेत, असे दिसते. त्यामुळे त्यांचा अर्थ लावणे हे जिकिरीचे काम आहे. मारेक-यांसाठी "वधियंते" असा शब्द त्यात वापरण्यात आला आहे. वधियंते हे अनेकवचनी रूप असून मूळ एकवचनी शब्द वधियंता असा आहे, असे दिसते. या ग्रंथात हुताशनी पौर्णिमा म्हणजेच होळीच्या दिवशीचा घटनाक्रम आठ ते दहा ओव्यांत आला आहे. हा घटनाक्रम असा : 

तुकोबांना ठार मारण्यासाठी पाच मारेक-यांना उक्ते देण्यात आले होते. आधूत कोळी हा या पाचांचा म्होरक्या होता. उक्ते देणारे लोक वधियंत्यांना म्हणजेच मारेक-यांना घेऊन तुकोबांचे वास्तव्य असलेल्या भंडारा डोंगरावर जातात. वधियंत्याच्या हातात पेटते पलिते आणि नंग्या तलवारी असतात. तुकोबांच्या जवळ आल्यानंतर वधियंत्यांचा म्होरक्या आधूत हा वधियंत्यांना इशारा करतो. वधियंते पुढे सरसावतात. पण, समाधी अवस्थेतील तुकोबांच्या चेह-यावरील प्रचंड तेज पाहून ते घाबरतात. त्यांच्या सर्वांगाला कंप सुटतो. त्यांच्या हातातील पेलिते आणि तलवारी गळून पडतात. घाबरलेले वधियंते तुकोबांना विनम्रपणे वंदन करतात. तलवारी आणि पलिते तेथेच सोडून वधियंते निघून जातात. मारेकरी घालणारे टोळके मग पुढे होते. पलिते आणि तलवारी उचलून हे लोक तुकोबांवर वार करतात. तुकोबांना ठार मारून ते पळून जातात. या मारेक-यांना ग्रंथकत्र्याने वोखटे अशी उपाधी वापरली आहे. वोखटे म्हणजे ओंगळ, अमंगळ, वाईट. 

तुकोबांची हत्या झाल्यानंतरच्या क्षणाचे भयकारी चित्र ग्रंथकत्र्याने उभे केले आहे. आधूत लिहितो की, तुकोबांची हत्या झाल्यानंतर संपूर्ण धरणी डळमळली, पृथ्वीला आपल्या मस्तकावर धारण करणारा शेष नारायणही मनात भयकंपित झाला. आकाशात अग्निकल्लोळ होऊन अनेक तारे कोसळले. अवघ्या काही क्षणांत हा सर्व प्रकार घडून आला.  

वैकुंठ गाथा या ग्रंथातील तुकोबारायांच्या हत्येशी संबंधित मूळ ओव्या पाहा (वाचकांच्या सोयीसाठी ओव्यांना क्रमांक देण्यात आले आहेत.) : 

तव तो कोलियांचा धुरी । पांचाशी इशारा करी । 
घाला म्हणे घाव झडकरी । तरवारीशी ।।१।।
पुढे जाले वधियंते । परी आंगा कांपाचे भरिते । 
हातीयेचे तरवार पलिते । गळोनि पडती ।।२।।
स्वामी समाधीशी तपोनिधी । तेज पसरले चहुविधी । 
वधियंते चरणा आधी । वंदोनी निघती ।।३।।
सावध बाघण आवटे । उचलिती तरवार दिवटे । 
घाव घालुनि वोखटे । वेगळाले पळाले ।।४।।
डळमळिली धरणी । शेष भय कंपिला मनी । 
अग्नि कल्लोळ तारांगणी । देखत खेवो ।।५।।

ओव्यांतील कठीण शब्दांचे अर्थ : 

कोलियांचा - कोळ्यांचा.
धुरी - प्रमुख, म्होरक्या. 
पांचाशी - पाच जणांना.
तरवार - तलवार  
झडकरी - लवकर. 
वधियंते - मारेकरी. ठार मारण्यासाठी आलेले लोक.
आंगा - अंगाला. 
कांपाचे भरिते - थरकापाचे भरते
हातीयेचे - हातातील.
पलिते - दिवट्या, मशाली.
चहुविधी - चहुकडे 
दिवटे - पलिते. मशाली.
देखत खेवो - देखता क्षणी

ओव्यांचा क्रमश: अर्थ : 

तेव्हा तो कोळ्यांचा म्होरक्या पाचांना इशारा करतो. तलवारीने लवकर घाव घाला असे त्यांना सांगतो. ।।१।।
मारेकरी पुढे झाले, परंतु त्यांच्या अंगाला कापरे भरले. हातातील तलवारी आणि पलिते गळून पडले. ।।२।।
तपोनिधी असलेले स्वामी (तुकोबाराय) समाधीत होते. त्यांचे तेज चहुकडे पसरले होते. मारेक-यांनी आधी चरणांना वंदन केले आणि मग ते निघून गेले. ।।३।।
तेव्हा सावध असलेले बाघण आवटे तलवारी आणि दिवट्या उचलतात. हे अमंगळ लोक तुकोबांवर घाव घालतात. मग वेगवेगळे होऊन पळून जातात. ।।४।।
(त्यानंतर) धरणी डळमळित होते. शेष मनात भयकंपित होतो. आकाशात अग्निकल्लोळ होतो. (तारे कोसळतात.) ही सर्व चिन्हे पाहता पाहता घडून येतात. ।।५।। 

अर्थ न लागलेले शब्द
या ओव्यांतील बाघण आणि आवटे या दोन शब्दांचे अर्थ नीट लागत नाहीत. बाघण हा शब्द मूळचा ब्राह्मण असावा. ग्रंथाचे हस्तलिखित प्रत तयार करताना चुकून ह्मचा घ झाला असावा. qकवा हेतूत:ही असे केले गेले असावे. बाघण या शब्दाच्या अचूक अर्थ निदानासाठी आम्ही अनेक पर्याय तपासून पाहिले. हा शब्द बावन्न असावा, अशी एक शक्यता वाटते. ती गृहीत धरल्यास मारणारे लोक एकूण ५२ जण होते, असा अर्थ काढता येतो. तिसरी एक शक्यता अशी की, बाघण हाच मूळ शब्द असावा. ते मारेकèयांपैकी कोणाचे आडनाव असावे. आवटे या शब्दाचा काहीच उलगडा होत नाही. तुकोबांना मारणारे हे लोक आवटे आडनावाचे असावेत, अशी एक शक्यता असू शकते. पण त्याबाबत ठोस काहीच सांगता येत नाही.


संबंधित लेख

तुकोबांचा खून झाला आणि ते सदेह वैकुंठगालाही गेले!
अशी झाली तुकोबांची हत्या
ब्राह्मण तुकोबांवर का चवताळले? भाग-१
ब्राह्मण तुकोबांवर का चवताळले? भाग- २

Monday 28 July 2014

तुकोबांचा खून झाला आणि ते सदेह वैकुंठगालाही गेले!

अपाविमंच्या संशोधक संघाचे अद्भूत सत्यशोधन 

-राजा मइंद, कार्यकारी संपादक, अपाविमं.


जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा खून झाला की ते सदेह वैकुंठाला गेले, या बाबत अनेक तर्कवितर्क लढविले जातात. खून झाला असे म्हणणारे तुकोबांच्या सदेह वैकुंठगमनाची कथा खोटी आहे, असे म्हणतात. तर सदेह वैकुंठ गमनाची कथा सत्य मानणारे खुनाची कथा खोटी आहे, असे म्हणतात. या वादात सत्य काही नीट हाती लागत नाही. पण थोडीशी बुद्धी लावून विचार केल्यास असे दिसून येते की, तुकोबांचा खून झाला आणि ते सदेह वैकुंठाला गेले या दोन्ही गोष्टी सत्य आहेत. 

तुकोबा हे जातीने कुणबी होते. स्वत: तुकोबांनीच हे लिहून ठेवले आहे. "बरे झाले देवा कुणबी केलो । नाही तरी दंभेची असतो मेलो ।।" असे तुकोबा एके ठिकाणी म्हणतात. दुस-या एका अभंगात ते म्हणतात, "तुका कुणबियाचा नेणे शास्त्रमत । परी हा पंढरीनाथ विसंबेना ।।".  कुणबी ही जात ब्राह्मणांच्या दृष्टीने शुद्र होती. ब्राह्मणी पोथ्यांतील आदेशांनुसार शुद्रांना धर्मविचार सांगण्याचा, प्रवचन किर्तन करण्याचा तसेच गुरू होण्याचा अधिकार नाही. वेद वाचण्याचा आणि ऐकण्याचा अधिकारही शुद्रांना नाही, हे सर्वविदीत आहेच. तुकारामांनी ब्राह्मणी पोथ्यांतील या आज्ञांना पायदळी तुडवून "वेदांचा तो अर्थ आम्हाशीच ठावा । येरांनी वाहावा भार माथा ।।" अशी घोषणा केली. हजारो लोक त्यांचे अनुयायी झाले. तुकोबांनी धर्म भ्रष्ट केला, अशी आवई उठवून ब्राह्मणांनी तुकोबांविरोधात अनेक कारवाया केल्या. गावचा पाटील, धर्मशास्त्री आणि पुण्यातील निजामाचा प्रतिनिधी दादोजी कोंडदेव यांच्याकडे तुकोबांच्या विरोधात तक्रारी करण्यात आल्या. या सर्वच ठिकाणी तुकोबांनी आपली बाजू भक्कमपणे मांडली. ब्राह्मणी नीती-नियमांच्या त्यांनी चिंधड्या उडविल्या. त्यामुळे चिडलेल्या ब्राह्मणांनी शेवटचा उपाय म्हणून तुकोबांची हत्या करण्याचा कट रचला. इतकेच नव्हे, तर तो तडीस नेला. 

या काळापर्यंत तुकोबा साक्षात्कारी संताच्या पदाला पोहोचले होते. साक्षात विठ्ठलाच्या साक्षात्कारामुळे त्यांच्यासाठी कोणतीही गोष्ट अशक्य नव्हती. त्यांनी सदेह वैकुंठाला जाण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी फाल्गुण वद्य द्वितीयेचा मुहूर्त त्यांनी काढला. आपल्या सर्व अनुयायांना त्याची माहिती दिली. या काळात तुकोबांचा बहुतांश काळ भंडारा डोंगरावरच जात होता. लोकांपासून दूर राहावे, यासाठी त्यांनी भंडारा डोंगराची निवड केली होती. नेमका याच काळात ब्राह्मणांनी डाव साधला. वैकुंठगमनाच्या दोन दिवस आधी फाल्गुण पौर्णिमेला म्हणजेच होळीच्या रात्री ब्राह्मणांनी भंडारा डोंगरावर तुकोबांची हत्या केली. मृतदेह तिथल्याच गुहेत दडविला. गुहेचे दार प्रचंड मोठ्या शिळेने बंद करून टाकले. काम फत्ते झाले असे समजून ब्राह्मण निघून गेले. 

पौर्णिमा ते द्वितीया असे अडीच दिवस तुकोबा बेपत्ता होते. पण, साक्षात पांडुरंगच तुकोबांसोबत असल्यामुळे त्यांचे सदेह वैकुंठगमन रोखणे ब्राह्मणांच्या हाती नव्हतेच. फाल्गुण वद्य द्वितीयेला विठोबा आपली पत्नी रखुमाईला घेऊन भंडारा डोंगरावरील त्या गुहेत प्रकट झाले. विठोबाने हळुवार हाक मारली, "तुकोबा उठ." झोपेतून जागे व्हावे त्याप्रमाणे तुकोबा उठून बसले. गुहेच्या तोंडाची शिळा माती होऊन गळून पडली. दिवस उगवायच्या आत तुकोबा देहूत आले. त्यांचे हजारो अनुयायी तेथे वाटच पाहत होते. ठरलेल्या वेळी आणि इंद्रायणीच्या काठावरील ठरलेल्या स्थळी सर्व जण एकत्र गोळा झाले. साक्षात विठ्ठल विमान घेऊन आले. तुकोबांनी सर्वांचे क्षेमकुशल घेतले. आणि विमानात बसून ते वैकुंठाला निघुन गेले. 

"तुका सप्तशती" नावाच्या जुन्या ग्रंथात वरील कथा आली आहे. हा ग्रंथ पूणं रुपाने आता उपलब्ध नाही. त्याची काही प्रकरणेच उपलब्ध आहेत. हा ग्रंथ मोडीत आहे. याची एक अत्यंत दुर्मिळ प्रत अपाविमंच्या हाती लागली आहे. ब्राह्मणांनी अनेक कारस्थाने केली. त्यात हा ग्रंथ संपविण्याच्या कारस्थानाचाही समावेश आहे. तथापि, या धर्मभूमीचे भाग्य थोर म्हणून या ग्रंथाचा काही भाग का होईना या विध्वंसातून टिकून राहिला. हा ग्रंथ आम्ही लवकरच अपाविमंवर वाचकांसाठी जशाच्या तशा टाकणार आहोत.


संबंधित लेख

तुकोबांचा खून झाला आणि ते सदेह वैकुंठगालाही गेले!
अशी झाली तुकोबांची हत्या

Thursday 24 July 2014

प्लँचेट, दाभोलकर आणि सावरकर

-राजा मइंद, कार्यकारी संपादक, अपाविमं


अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुन्यांना शोधण्यासाठी पोलिसांनी प्लँचेट केल्याच्या बातमीने सध्या महाराष्ट्रात सनसनाटी निर्माण केली आहे. प्लँचेट हे पोलिसांसाठी काही नवे नाही. दहशतवादविरोधी पथकांनी अनेकवेळा प्लँचेट करून आरोपींचा अदमास घेण्याचा प्रयत्न केला आहे. प्लँचेट खरे की खोटे हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा विषय आहे. पण अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा झाला म्हणून प्लँचेट थांबतील या भ्रमात कोणी राहू नये.

प्लँचेटसाठी भारतभर विनायक दामोदर सावरकर यांच्या आत्म्याला बोलावण्यास प्राधान्य दिले जाते. सावकर यांचा आत्मा अतृप्त आहे. त्यामुळे तो लवकर येतो, तसेच प्रश्नांची उत्तरेही तो अचूक देतो, असे प्लँचेट करणारे लोक मानतात. खरेखोटे प्लँचेट करणारे आणि सावरकरच जाणोत. डॉ. दाभोलकरांचे खुनी शोधण्यासाठी करण्यात आलेल्या प्लँचेटमधून पोलिसांच्या हाती काहीही लागले नाही. डॉ. दाभोलकरांचे खुनी शोधण्यासाठी सावरकरांच्या आत्म्याला बोलावले असते, तर कदाचित खुनी सापडलेही असते, असेही तमाम प्लँचेटकर मानत आहेत.

असो. आदरणीय अनिता ताई यांनी प्लँचेट आणि सावरकर यांच्यावर लिहिलेला एक लेख अपाविमंवर आहे. जिज्ञासूंनी तो जरूर वाचावा. या लेखाची लिन्क खाली देत आहे. 

धनगरांच्या कुंडलीतला "ड"!

धनगर समाजाला आपला हक्क मिळायलाच हवा
-राजा मइंद, कार्यकारी संपादक, अपाविमं


प्रश्न कुजवत ठेवण्याच्या बाबतीत महाराष्ट्रातील सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा हात कोणीच धरू शकणार नाही. गेल्या १५ वर्षांच्या सत्ताकाळात त्यांनी याची अनेक उदाहरणे घालून दिली आहेत. मराठा आरक्षण हे त्यातीलच एक उदाहरण. मोठा झटका बसल्यानंतर त्यांनी मराठा आरक्षण मार्गी लावले. हे करताना त्यांनी मुस्लिम आरक्षणाचे घोडे मध्ये दामटवलेच. (आता ही दोन्ही आरक्षणे कोर्टात टिकतात किंवा कसे याबाबत खात्री नाही.) मराठा आरक्षणाच्याही आधीपासून धनगर समाजाच्या प्रवर्गाचा विषय दोन्ही काँग्रेसने अधांतरी लटकावून ठेवला आहे. केंद्र सरकारच्या यादीत धनगर ही जात अनुसूचित जमातींमध्ये समाविष्ट आहे. महाराष्ट्र सरकारने मात्र धनगरांना भटक्या जमाती या स्वतंत्र प्रवर्गात टाकले आहे. भारत सरकारचा कारभार इंग्रजीत चालतो. कोणताही जीआर इंग्रजीत निघतो. नंतर त्याचे भाषांतर हिंदी  आणि इतर भाषांत होते. भारतीय भाषांतील"र" हा वर्ण इंग्रजीत जाताना "ड" होते. धनगर या शब्दाचेही तसेच झाले. "र" चा "ड" होऊन धनगरच्या जागी धनगड आला. या "र" ने मोठा घोटाळा केला आहे. महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या कुंडलाीत बसलेला हा ड समाजाला गेली कित्येक दशके छळत आहे. धनगड आणि धनगर या दोन वेगळ्या जाती आहेत, असे गृहीत धरून राज्य सरकारने धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे हक्क नकारले. मराठा आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतर या मुद्याने पुन्हा उचल खाल्ली आहे. पृथ्वीराज चव्हाण सरकारने यावर एक बैठकही घेतली. पण, मधुकर पिचड आणि वळवी यांसारख्या वजनदार नेत्यांनी हा निर्णय रोखला. आपल्या जातींच्या आरक्षणात त्यांना वाटेकरी नको आहेत.

धनगर-धनगड एकच! 
या विषयावर संजय सोनवणी हे गेली अनेक वर्षे लिहित आहेत. त्यांनी या विषयी खरोखरच सखोल अभ्यास केलेला आहे, असे त्यांच्या लिखाणावरून दिसून येते. एका लेखात सोनवणी यांनी या विषयाचे विश्लेषण करताना लिहिले आहे की,
"धनगर आरक्षणः वस्तुस्थिती व राजकारण" हा दहा जुलै रोजी प्रसिद्ध झालेला डॉ. भौमिक देशमुख व रवींद्र तळपे यांचा लेख वाचला. वास्तवाचा विपर्यास करणारा हा लेख असल्याने त्याबाबत थोडक्यात स्पष्टीकरण दिले आहे. "धनगर" छापण्याऐवजी "धनगड" छापले गेल्याने मुद्रणछपाईच्या चुकीचा मुद्दा उपस्थित केला जातो आहे हे त्यांचे म्हणनेच चूक आहे. ती मुद्रण छपाईतील चूक नसून "र" चा उच्चार अनेकदा इंग्रजीत "ड" असा होत असल्याने ती झालेली भाषिक उच्चार-चूक आहे. ही चूक केंद्रीय मागासवर्ग आयोगाने दि. ३.१२.१२ रोजी उत्तर प्रदेशातील एका तक्रारीसंदर्भात मान्य केली असून "धनगड" ऐवजी "धनगर" हा शब्द वापरण्यास यावा असे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्रातही अशीच दुरुस्ती करण्यात यावी अशी धनगर समाजाची न्याय्य मागणी आहे. तसेच मिनिस्ट्री ओफ़ ट्रायबल अफेयर्सच्या २००८-९ च्या वार्षिक अहवालात महाराष्ट्रातील अनुसुचित जमातींच्या यादीत ३६ व्या क्रमांकावर इंग्रजी आवृत्तीत "Oraon and Dhangad" असे छापले असून याच अहवालाच्या हिंदी अनुवादात "ओरान, धनगर" असे छापले आहे. याचाच अर्थ आदिवासी मंत्रालयालाही धनगड (धांगड नव्हे) व धनगर एकच असल्याचे मान्य आहे. यामुळे ही छपाईतील चुक आहे असा मुलात दावाच नसून भाषिक उच्चारपद्धतील फरकामुळे झालेला हा गोंधळ आहे. उत्तर प्रदेश उच्च न्यायालयाने २००९ साली दिलेल्या निर्णयातही "धनगर/धनगड" ही जात बिहार, उत्तर प्रदेश आणि पस्चिम बंगालमद्ध्ये अनुसुचीत जातींमद्ध्ये मोडत असून मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात अनुसुचित जमातींमद्ध्ये मोडत असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. आर. व्ही रसेल सारख्या मानववंश शास्त्रज्ञानेही Tribes and Castes of Central Provinces of India (Vol.I) या ग्रंथात धनगर ही जमात आदिवासी असल्याचे सविस्तर नमूद केले आहे. २२/१२/१९८९ रोजी सुर्यकांता पाटील यांनी संसदेत धनगरांची अनुसुचित जमातींत नोंद आहे काय असा प्रश्न विचारला असता तत्कालीन केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी "महाराष्ट्रातील धनगरांचा समावेश अनुसुचित जमातींत आधीच केला असून धनगड व धनगर एकच आहेत" असे विधान केले होते.

आरक्षणाबाबत अपाविमंची भूमिका स्पष्ट आहे. हक्कदार जाती-जमातींना न्याय्य वाटा मिळायलाच हवा. धनगर समाज अनुसूचित जमातीत येत असेल, तर त्याला तो हक्क मिळायलाच हवा. कोणी मंत्री समाजाचा हक्क नाकारू शकत नाही.

Tuesday 22 July 2014

दोन बायकांचा दादला भारतरत्न!

संपत्तीच्या वादातून समोर आले भीमसेन जोशींच्या दोन बायकांचे रहस्य

-राजा मइंद, कार्यकारी संपादक अपाविमं.

भारतरत्न या सर्वोच्च पदवीने गौरविण्यात आलेले शास्त्रीय गायक पं. भीमसेन जोशी यांना दोन बायका होत्या. पहिल्या पत्नीला मुले-बाळे झाल्यानंतर त्यांनी दुसरी बायको केली. दोघींनाही नांदवले. दोन बायकांचा दादला ही आपली ओळख जगासमोर येणार नाही, याची पुरेपूर खबरदारी त्यांनी जीवंत असताना घेतली होती. एरवी सगळ्या जगाची धुणी धुणाèया मीडियाने ही बाब दाबूनच ठेवली होती. मात्र, भीमसेन जोशी यांच्या मृत्यूनंतर दोन्ही सवतींच्या मुलांमध्ये संपत्तीवरून वाद निर्माण झाला आणि त्यातून ही माहिती हळूच जगासमोर आली. दोन बायका अन् फजिती ऐका, ही म्हण भीमसेन जोशी यांच्या बाबती मृत्यूनंतर अशा पद्धतीने खरी झाली.

भीमसेन जोशी यांनी 1944 मध्ये सुनंदा कट्टी यांच्याशी लग्न केले. सुनंदा जोशी या भीमसेन जोशी यांच्या नातेवाईकांच्या कन्या होत्या. सुनंदाकडून जोशी यांना 4 मुले झाली. यात राघवेंद्र (67), ऊषा (66) सुमनगला (63) आणि आनंद (52) अशी त्यांची नावे आहेत. 1951 मध्ये जोशी यांचा वत्सला मधोळकर यांच्याशी विवाह झाला. वत्सला या भीमसेन जोशी यांच्या कन्नड नाटक 'भाग्यश्री'मध्ये त्यांची सहनायिका होत्या. वत्सला यांच्याकडून भीमसेन जोशी यांना तीन मुले झाली. जयंत (62, पेंटर), शुभदा (56, गायिका) आणि श्रीनिवास (47, आईआईटी-दिल्लीतून इंजिनीअर झाले, आणि सध्या गायक आहेत) अशी त्यांची नावे आहेत. भीमसेन जोशी यांनी आपल्या पहिली पत्नी सुनंदा यांना घटस्फोट दिला नव्हता. ते त्यांना आर्थिक मदत करत राहिले. सुनंदा पुण्याच्या सदाशीवपेठमध्ये वेगळे राहत होत्या.

भीमसेन यांची जवळपास 10 कोटींची संपत्ती आहे, ज्यामध्ये जवळपास 20 संगीत कंपन्यांकडून मिळणार्‍या रॉयल्टीचा समावेश आहे. या संपत्तीचा हा वाद आता मुंबई हायकोर्टात पोहोचला आहे. पंडीत भीमसेन जोशी यांची दुसरी पत्नी वत्सला आणि त्यांची 3 मुले यांनी मागील वर्षाच्या सप्टेंबरमध्ये पुणे कोर्टाने दिलेल्या निकालाला मुंबई हायकोर्टात आव्हान दिले होते. पुणे कोर्टाच्या निर्णयात पंडीत जोशी यांच्या पुण्यात असलेला बंगला 'कलाश्री' आणि इतर 2 फ्लॅटमध्ये या तिघांनाही कोण्या तिसर्‍या व्यक्तीला अधिकार देण्यास मनाई करण्यात आली होती.

पंडीत जोशी यांच्या पहिल्या पत्नी सुनंदा यांचा मुलगा राघवेंद्र यांनी दाखल केलेल्या खटल्यात हा निर्णय देण्यात आला. राघवेंद्र यांनी जानेवारी 2011 मध्ये पं. भीमसेन जोशी यांच्या निधनाच्या काही दिवसानंतर 22 सप्टेंबर 2008 या तारखेला बनवण्यात आलेल्या मृत्यूपत्राला कोर्टात आव्हान दिले होते.

जोशी यांनी दुसरे लग्न केले तेव्हा हिंदू लग्न कायदा 1956 अजून बनवण्यात आला नव्हता. तसेच जोशी यांनी आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला नव्हता. याबदल्यात जोशी यांनी वत्सला आणि त्यांच्या मुलांना पुण्यातील बंगला, फ्लॅट आणि पुढील 50 वर्षांपर्यंत संगीत कंपन्यांकडून मिळणार्‍या रॉयल्टीचे हक्क दिले होते. तर पहिली पत्नी सुनंदा आणि त्यांच्या चार मुलांच्या नावावर 20 लाख रुपयांची बँकेतील रक्कम केली होती. पंडीतजी आपल्या दुसरी पत्नी वत्सला आणि त्यांच्या मुलांसोबत 'कलाश्री'मध्ये राहत होते. वत्सला स्वतःसुध्दा शास्त्रीय गायिका होत्या. त्यांचे निधन 2005 मध्ये झाले होते. त्यांच्या निधनानंतर जोशी यांनी आपला बंगला कलाश्रीचे मालकी हक्क मुलगी सुभदा आणि मुलगा जयंत याच्या पत्नीकडे सोपवले होते. त्याच बरोबर इतर दोन फ्लॅट आपला मुलगा श्रीनिवास आणि त्याच्या पत्नीच्या नावावर केले होते.

अशी आहे भीमसेन जोशी यांची संपत्ती
मृत्यूपत्रानुसार, पं. भीमसेन जोशी यांची एकूण संपत्ती 10 कोटींच्या जवळपास आहे. ज्यामध्ये संगीत कंपन्यांकडून मिळणार्‍या रॉयल्टी उत्पन्नाचाही समावेश आहे. जोशी यांच्या संपत्तीमध्ये 5 कोटी रुपयांचा बंगला आणि 4 फ्लॅटचा समावेश आहे.

Monday 30 June 2014

मराठा आरक्षण आणि मराठी वृत्तपत्रांचे ब्राह्मणवादी संपादक

मराठा समाजास १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. या निर्णयास क्रिमिलेअर मर्यादा लागू राहणार आहे. मोजक्या वृत्तपत्रांचा अपवाद वगळता मराठा आरक्षणाला महाराष्ट्रातील तमाम वृत्तपत्रांनी विरोध केला आहे. महाराष्ट्रातील माध्यमे बहुसंख्य असलेल्या मराठा समाजाच्या हिताच्या विरोधात पूर्वीपासूनच काम करीत आली आहेत. त्यामुळे आरक्षणाला त्यांच्याकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता नव्हतीच. मराठी वृत्तपत्रे नुसती मराठ्यांच्याच विरोधात काम करीत असतात असे नव्हे, संपूर्ण बहुजन समाजाच्याच विरोधात ती काम करीत असतात.

काही सन्माननीय अपवाद वगळता बहुतांश मराठी वृत्तपत्रांचे संपादक ब्राह्मण आहेत. बहुजन समाजातील काही संपादक मंडळी आहेत, पण या मंडळींवर ब्राह्मणवादी विचारांचा एवढा पगडा आहे की, बहुजनवादी भूमिका घेणे त्यांना हीनपणाचे वाटते. काही ठिकाणी ब्राह्मण लॉबीच्या दबावामुळे बहुजन संपादक रोखठोक भूमिका घेऊ शकत नाहीत. कारणे काहीही असली तरी, मराठी वृत्तपत्रे बहुजनविरोधी विचारच नित्यनेमाने प्रसवत असतात. बहुजन समाजाने यावरून योग्य तो बोध घ्यायला हवा. बहुजनांनी स्वत:च्या विचारधारा जपणारी पूर्णत: व्यावसायिक वृत्तपत्रे काढण्याची वेळ आली आहे. 

अपाविमंच्या वाचकांना माध्यमांतील बहुजन विरोधाची कल्पना यावी, यासाठी मराठा आरक्षणाविषयी सर्व मोठ्या मराठी दैनिकांत प्रसिद्ध झालेले विखारी लिखाण एकत्रितरित्या येथे देत आहोत. 

भाग १ - अग्रलेख
महाराष्ट्र टाईम्सचा अग्रलेख : संधी की, मलमपट्टी?
लोकसत्ताचा अग्रलेख : मराठा, मुसलमान मेळवावा
तरुण भारतचा अग्रलेख : रक्षणासाठी आरक्षण!
सकाळचा अग्रलेख : आरक्षणाचे राजकारण
दै. दिव्य मराठीचा अग्रलेख : आरक्षणाची नामुष्की
लोकमतचा अग्रलेख : पवार झाले ‘मेटे’करी
पुढारीचा अग्रलेख : आरक्षण नव्हे प्रोत्साहन

भाग २ - लेख

भाग 3 - "अपाविमं"चे लेख

मराठा समाजाला 16 टक्‍के आरक्षण

मराठा समाजाला 16 टक्‍के आणि मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय  राज्य मंत्रिमंडळाने घेतला. गुरूवार दि. २६ जून २०१४ रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा आणि मुस्लिम आरक्षणाचा निर्णय घोषित केला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्य सरकारने स्वतंत्रपणे शैक्षणिक - सामाजिक मागास प्रवर्ग निर्माण केला असून, या अंतर्गत सध्याच्या 52 टक्‍के आरक्षणाला धक्‍का न लावता स्वतंत्रपणे 16 टक्‍के आरक्षण देण्यात आले आहे. या निर्णयाने राज्यातले सामाजिक आरक्षण 73 टक्‍क्‍यांपर्यंत गेले आहे. 

श्रीमंत मराठ्यांना लाभ मिळणार नाही
राज्यघटनेच्या कलम 15(4) आणि 16 (4) नुसार मराठा व मुस्लिम समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये सरळसेवा भरतीत आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठा समाजाला या आरक्षणाचा लाभ घेताना उन्नत व प्रगतचा (क्रिमिलेअर) निकष लागू राहील, असे मुख्यमंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले. याचाच अर्थ श्रीमंत मराठ्यांना या आरक्षणाचा कोणताही लाभ मिळणार नाही.  न्यायमूर्ती बापट यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मागासवर्गीय आयोगाच्या 22 व्या अहवालावर मंत्रिमंडळात चर्चा करण्यात आली. मंत्रिमंडळाने हा अहवाल अंशत: स्वीकारला; तर मराठा आरक्षण फेटाळणाऱ्या शिफारशी नाकारल्या. मराठा समाजाला ओबीसी समाजात समाविष्ट करून आरक्षण देण्याची शिफारस मंत्रिमंडळाने फेटाळली. त्याऐवजी नारायण राणे समितीने दिलेल्या अहवालाची जोड देत मराठा आरक्षणाच्या निर्णयावर शिक्‍कामोर्तब केले. 

जुन्या आरक्षणातील मुस्लिमांना लाभ नाही
अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्‍या जमाती, विशेष मागासप्रवर्ग व इतर मागास प्रवर्गातील मुस्लिम समुदायातील ज्या घटकांना यापूर्वी आरक्षणाचा लाभ देण्यात आला आहे, त्यांना पूर्वीप्रमाणे आरक्षण सुरू राहील व त्यांना विमाप्र (मुस्लिम) या 5 टक्के आरक्षणाचा फायदा मिळणार नाही. शालेय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, कृषी विद्यापीठातील व पशुवैद्यकीय शिक्षण संस्थांमधील शिक्षणाच्या प्रवेशासाठी आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये सरळसेवा भरतीसाठी हे आरक्षण लागू राहील, असे सरकारच्या प्रसिद्धिपत्रकात स्पष्ट केले आहे.

2001 च्या जनगणनेनुसार राज्यातील एकूण लोकसंख्येतील मुस्लिमांचे प्रमाण 10.6 टक्के आहे. तसेच मराठा समाजाचे प्रमाण 32 टक्के आहे. सर्वसाधारणपणे लोकसंख्येच्या प्रमाणाच्या निम्मे आरक्षण दिले जाते. त्यानुसार मुस्लिमांसाठी 5 टक्के आणि मराठा समाजासाठी 16 टक्के आरक्षण देण्यात आले आहे.

असे असेल जातीनिहाय आरक्षण

अनुसूचित जाती : १३ टक्के
अनुसूचित जमाती : ७ टक्के
इतर मागासवर्गीय : १९ टक्के
भटके आणि विमुक्त जाती : ८ टक्के
इतर :  ३ टक्के
विशेष मागासवर्गीय : २ टक्के
मराठा : १६ टक्के
मुस्लिम :  ५ टक्के

एकूण : ७३ टक्के
................................

मराठा-राष्ट्रातील महादलित

दै. दिव्य मराठीत प्रसिद्ध झालेला लेख

-प्रमोद चुंचूवार, पोलिटिकल ब्युरो हेड, दिव्य मराठी

|Jun 30, 2014, 02:00AM IST

मराठा-राष्ट्रातील महादलित
तुह्या पोटात दुखत अशिन
त आरक्षण तुले घे
तुह्यी जात मले दे
अन् माहि तुले घे
पोटाले पालू बांधून  
उपाशी राहून पाह्य
दोन-चार दिवस बाबू
झोपडपट्टीत जाऊन पाह्य
आमच्यावानी डोक्श्यावर
आंबेडकर-फुले घे
तुह्यी जात मले दे
अन् माहि तुले घे

राज्य सरकारने अलीकडेच मराठा समाजाला मागास ठरवून आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर कवी आ. कि. सोनोने यांची ही कविता मोजक्या शब्दांत खूप काही सांगणारी. जागतिक कीर्तीचे राजकीय विचारवंत ख्रिस्तोफ जेफरलॉट यांनी महाराष्ट्र आता मराठा राष्ट्र होण्याच्या मार्गावर असल्याचा इशारा दिला होता.  बहुमताच्या बळावर एखादा समाज वा त्या समाजाचे नेते किती मनमानी करू शकतात, त्याचे उदाहरण मराठा आरक्षणाचा निर्णय म्हणता येईल.

सुमारे चार वर्षे सखोल अभ्यास करून व प्रत्यक्ष पाहणी दौरे करून न्या. रमेश बापट यांच्या नेतृत्वातील राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाचा समावेश इतर मागासवर्गात करता येणार नाही, असा स्पष्ट अहवाल 25 जुलै 2008 रोजी दिला. न्या. बापट आयोगाने एकूण 11  समाजशास्त्रीय निकष लावून मराठा समाजाला मागास मानण्यास नकार दिला.   

राज्य मागासवर्ग आयोगाच्या 2005 च्या कायद्यातील 9(2) या कलमानुसार या आयोगाने दिलेला सल्ला किंवा केलेली शिफारस राज्य शासनावर सामान्यत: बंधनकारक असते. मात्र तरीही राज्याच्या मंत्रिमंडळात असलेल्या मराठा नेत्यांनी ठरवून राणे समितीचा फार्स केला. या समितीवर 10 कोटी रु. खर्चून आपल्याला हवा तसा अहवाल मिळवला. गेल्या दोन वर्षांपूर्वी संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा शासकीय बंगला मराठा समाजातील महिलांनी ताब्यात घेतला.  यावरून खूप गहजब झाला. मात्र पाटील अगदी निश्चिंत होते, सारे काही ठरवून झाल्याप्रमाणे. मंत्रालयासमोर असलेला मंत्र्याचा बंगला काही नि:शस्त्र महिला येऊन ताब्यात घेऊ शकत नाहीत. एरवी मंत्रालयासमोर निदर्शने करणार्‍या गरीब, वंचित महिला-पुरुषांना  बेदम मारहाण करणार्‍या वा त्यांच्याविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करणार्‍या या सरकारने या महिलांना आर्जवे करून घरातून बाहेर काढले आणि त्या महिला आहेत असे सांगून त्यांच्याविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल केला नाही. मनुष्यवधाचा गंभीर आरोप असूनही आणि अनेक दिवस तुरुंगात घालवूनही पद्मसिंह पाटील यांना अत्यंत सन्मानाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वागवले जाते आणि हरणाची शिकार केल्याचा आरोप झालेल्या आणि हजारो वर्षे ज्यांचे पूर्वज जंगलातच राहिले त्या धर्मरावबाबा आत्रामांना मात्र वाळीत टाकले जाते. दलितांवर अत्याचार करणारे, सहकारी  बँका वा साखर कारखाने लुटणारे पांढरपेशे दरोडेखोर, गंभीर गुन्हे करणारे, शासनात भ्रष्टाचार करणारे किंवा राजकारणात सतत निष्ठा बदलणारे जर मराठा समाजाचे असतील तर त्यांच्याबाबत मात्र बोटेचेपी मवाळ भूमिका आणि या वर्गाच्या आर्थिक, राजकीय सत्तेला आव्हान देणार्‍यांविरोधात राष्ट्रद्रोहासारखे गंभीर गुन्हे इतक्या टोकाचे वर्तन सध्या सत्ताधीश मराठे करू लागल्याने हे राज्य आता मराठा राष्ट्र झाले आहे, हे म्हणण्यावाचून पर्याय नाही आणि या मराठा राष्ट्रात केवळ मूठभर मराठे घराण्यांसाठीच सत्ता राबविली जातेय.  

नोव्हेंबर 1994 ला शरद पवार हे राज्याचे मुख्यमंत्री असताना नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर गोवारी समाजाने मोर्चा काढला. आपला समावेश अनुसूचित जमातीत व्हावा, अशी त्यांची मागणी होती. या मोर्चाला सामोरे जाण्याऐवजी पवार सरकारने त्यांच्यावर लाठीचार्ज केला आणि यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत 110 गोवारी आंदोलक महिला, मुले व पुरुष मारले गेले. यानंतर पवारांनी विशेष मागास प्रवर्ग नावाचा एक नवा मागास वर्ग निर्माण केला आणि या वर्गाला 2 टक्के आरक्षण देण्यात आले. ओबीसीत असलेल्या अन्य जातींपेक्षाही ज्या जाती खूप मागास  आहेत आणि ज्यांचा समावेश लगेच एससी, वा एसटी या वर्गात करणे शक्य नाही, अशा ओबीसीतील गोवारी, साळी, पद्मशाली, कोष्टी, कोळी अशा जातींचा समावेश यात करण्यात आला. राज्यातील सत्ताधार्‍यांनी यापूर्वी वंजारा वा धनगर अशा एकेकट्या जातींना दोन टक्क्यांच्या वर आरक्षण दिली आहेत.

या दोन्ही जातींपेक्षा कितीतरी मागास असलेल्या  40 जातींना 2 टक्क्यात कोंबण्यात आले. या आरक्षणामुळे राज्यात आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांनी ओलांडली गेली. या आरक्षणाला न्यायालयात आव्हान दिले गेले आणि न्यायालयाने शैक्षणिक प्रवेशाला स्थगिती दिली. 2007 पर्यंत उच्च शिक्षण आणि 2010 पर्यंत वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील प्रवेशांना ही स्थगिती होती. त्यामुळे 1995 मध्ये विशेष मागास प्रवर्गाचे आरक्षण मिळूनही या समाजाला केवळ नोकर्‍यांमध्ये आरक्षण मिळत होते. मात्र शैक्षणिक प्रवेशावरील स्थगिती हटून अनुक्रमे सात वा चार वर्षे होऊनही अद्याप राज्य सरकारने आपल्या कागदपत्रात या आरक्षणाला न्यायालयीन स्थगिती असल्याचा उल्लेख हेतुपुरस्सरपणे ठेवून या अतिमागास जातींना आरक्षणच नाकारले. हे आरक्षण अमलात यावे यासाठी विशेष मागासवर्गीयांचे नेते सुरेश पद्मशाली हे गेल्या 15 वर्षांपासून संघर्ष करत आहेत. अनेक उपोषणे वा आंदोलने त्यांनी केली. मात्र या 40 जातींची लोकसंख्या अन्य जातींच्या तुलनेत खूप कमी आणि विखुरलेली असल्याने राज्यातील मराठा नेतृत्व त्यांना  कवडीचीही किंमत द्यायला तयार नाही.  

कैलाश गोरंट्यालसारखे जालना जिल्ह्यातील पद्मशाली समाजाचे आमदार या वर्गाच्या पाठीशी खंबीरपणे यासाठी उभे राहायला तयार नाहीत. कारण त्यांना भीती वाटते की, असे केल्यास मराठा समाज नाराज होईल. सोलापूर जिल्ह्यात हा समाज मोठ्या प्रमाणावर असला तरी आणि  नरसय्या आडाम हे स्वत: पद्मशाली असले तरी कम्युनिस्ट विचारधारेत जातीच्या आंदोलनांना आम्ही फारसे महत्त्व देत नाही, असे म्हणत त्यांनीही हात झटकले. त्यामुळे आजही ओबीसींसाठीच्या अभियांत्रिकीतील जागा उरल्या (या जागा कोणत्या महाविद्यालयांमध्ये उरत असतील याचा अंदाज आपण करू शकतो) तरच एसबीसींना  प्रवेश मिळतो. त्यामुळे ओबीसींपेक्षाही मागासलेले असून या 40 जातींना खुल्या प्रवर्गात स्पर्धा करावी लागतेय आणि शिक्षणासाठी मिळणारी शिष्यवृत्ती वा फीमाफी हे लाभही त्यांना नाकारले जात आहेत. हे लिहिण्याचा उद्देश एवढाच की, केवळ मर्यादेपेक्षा 2 टक्के आरक्षण जादा दिल्यावर ही स्थिती झाली असेल तर मराठ्यांना 16 व मुस्लिमांना 5 टक्के आरक्षण दिल्याने या समाजाला हे आरक्षण प्रत्यक्ष मिळेल, अशी शक्यता जवळपास नाहीच. ओबीसीत 346 जातींना 19 टक्के  तर अनूसूचित जाती (दलित) प्रवर्गातील 59 जातींना 13 टक्के आरक्षण आहे. राज्यात पाचशे प्रमुख जाती आहेत, त्यातील  किमान 400 जाती ओबीसी व एससीत येतात.

या दोन्हींचे एकत्रित 32 टक्के आरक्षण विचारात घेतले तर राज्यात 80 टक्के लोकसंख्या असलेल्या सुमारे  400 जातींना केवळ 0.08 टक्के आरक्षण आणि राणे समितीच्या दाव्यानुसार 32 टक्के लोकसंख्या असलेल्या एकाच जातीला तब्बल 16 टक्के आरक्षण देऊन या सरकारने राज्याची सत्ता कुणाच्या हितासाठी वापरली जातेय, हे दाखवून दिलेय. दलितांच्या 13 टक्क्यांपेक्षाही मराठ्यांना जादा आरक्षण मिळाल्याने मराठे हे दलितांपेक्षाही मागासलेले असल्याचे राज्य सरकारला वाटते, असा अर्थ काढायला हरकत नाही. त्यामुळे बिहारच्या धर्तीवर आता मराठ्यांना महादलित आणि पृथ्वीराज चव्हाणांना महाराष्ट्राचे जितनराम मांझी म्हणायलाही हरकत नसावी !
संदर्भ-
1) मराठा आरक्षण -भूमिका व वास्तव- संपादक - व्यंकटेश पाटील
2) मराठा ओबीसीकरण- संपादक - अशोक बुद्धिवंत


आरक्षणाची नामुष्की

दै. दिव्य मराठीत प्रसिद्ध झालेला अग्रलेख

दिव्य मराठी|Jun 27, 2014, 00:54AM IST

ज्या मराठा जातीचे प्रतिनिधित्व करणार्‍या नेत्यांच्या हातात महाराष्ट्राची सूत्रे वर्षानुवर्षे आहेत, त्या जातीचाही विकास वर्षानुवर्षे होऊ शकलेला नाही. याचा अर्थ केवळ राजकारणाने सर्वांचा तर सोडाच, पण त्या जातीतील सर्वसामान्य माणसाचाही विकास होत नाही, हे अखेरीस सिद्ध झाले. मराठा समाजाला 16 टक्के आणि मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारला निवडणुकीच्या तोंडावर जाहीर करावा लागला आहे. हा निर्णय केवळ राजकीय असून त्याचा आणि मराठा समाजाच्या विकासाचा काही संबंध प्रस्थापित होईल, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. शिक्षण व शासकीय नोकर्‍यांतील सरळ सेवा भरतीमध्ये मराठा आणि मुस्लिम उमेदवारांना आरक्षण असेल, मात्र क्रीमिलेअर म्हणजे आर्थिकदृष्ट्या उन्नत गटाला आणि राजकीय क्षेत्रालाही ते लागू नसेल, असा हा निर्णय आहे. मूळ प्रश्न आहे तो भेदभावरहित सर्वांना संधी मिळण्याचा. मग ती शिक्षणातील असो की नोकरीतील. कारण त्या मूलभूत गरजा आहेत. अशा संधीच्या शोधात लाखो तरुण आज उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत, तसेच त्यांना नोकर्‍याही मिळेनाशा झाल्या आहेत. म्हणूनच जेथे फार मोठे शिक्षण आणि कौशल्यही लागत नाहीत अशा पोलिस खात्यात भरती होण्यासाठी ऊर फुटेपर्यंत पळण्याची आणि चेंगराचेंगरीत मरण पत्करण्याची त्यांची तयारी आहे. ते कोणत्या जातीत जन्माला आले, हे तेथे महत्त्वाचे ठरत नाही. अशा लाखो तरुणांना संधी हवी आहे आणि ती मिळेनाशी झाली आहे. त्यामुळे बेरोजगारी वाढत चालली असून त्याचा परिणाम म्हणून सर्वच जातींमध्ये अस्वस्थ तरुणांची संख्या वाढत चालली आहे. मराठा समाजाचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण तर 32 टक्के आहे. त्यामुळे साहजिकच मराठा समाजात बेरोजगार तरुणांचे प्रमाण सर्वाधिक आहे, हे अनेक पाहण्यांतून स्पष्ट झाले आहे. या तरुणांना कसे सामोरे जायचे, असा पेच सत्ताधारी मराठा नेत्यांसमोर निर्माण झाला तेव्हा मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी पुढे आली. या मागणीवर विचार सुरू झाला यालाही आता 10 वर्षे उलटून गेली आहेत. याचा अर्थ असा होतो की, नोकर्‍या पुरेशा प्रमाणात निर्माणच होत नाहीत, याला किमान दोन दशके उलटली असून रोजगाराच्या संधीच्या शोधात दोन पिढ्या गारद झाल्या आहेत. म्हणजे समाजात जी अस्वस्थता आहे ती कळण्यास 10 वर्षे आणि त्यासंदर्भात काही करण्यास 10 वर्षे असा हा क्रूर राजकीय प्रतिसाद आहे.  

 घटनेतील तरतुदीनुसार 50  टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. मराठा-मुस्लिम आरक्षणाने हे प्रमाण 73 टक्के झाल्याने न्यायालयात हे आरक्षण टिकणार काय, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. सर्व कायदेशीर बाबींचा अभ्यास करूनच हा निर्णय सरकारने घेतला असून कोणी आव्हान दिले तरी त्याचा प्रतिवाद करण्याची तयारी सरकारने केली आहे, असे मुख्यमंत्री म्हणतात. कायद्याच्या लढाईत हे आरक्षण मराठा आणि मुस्लिम तरुणांच्या पदरात केव्हा पडेल माहीत नाही. मात्र, जात-धर्म  हाच जगण्याचा आधार मानणार्‍या तरुणांना आपल्या समाजालाही आरक्षण मिळाले, याचे तोकडे भावनिक समाधान निश्चितच मिळाले आहे. सामाजिक-आर्थिक मागासलेपणा व अपुरे प्रतिनिधित्व या प्रमुख निकषांवर आरक्षण दिले जाते. आंध्रातील वायएसआर रेड्डी सरकारने मुस्लिमांना आरक्षण दिले होते, ते नंतर उच्च व सर्वोच्च न्यायालयाने याच निकषाने रद्द केले होते. त्यामुळे आरक्षण देतानाच सर्वच जातींतील तरुणांना उच्च शिक्षण कसे घेता येईल आणि त्यांना रोजगार संधी कशा उपलब्ध होतील, असे सरकार म्हणून आम्ही पाहू, असे मुख्यमंत्री म्हणाले असते तर केवळ राजकारणासाठी हा निर्णय घेतलेला नाही, असे म्हणता आले असते; पण मूळ प्रश्नांचा सरकारला एक तर विसर पडला आहे किंवा त्यांना सामोरे जाण्याचे धैर्य त्यांच्यात राहिलेले नाही. 

राष्ट्रवादी काँग्रेसने मराठा, तर काँग्रेसने मुस्लिम समाजाला सोबत ठेवून नेहमीच राजकारण केले आहे आणि आता इतक्या वर्षांनी या समाजांना आरक्षण देण्याची नामुष्की येते आहे. याचा अर्थ आपले काही चुकते आहे, याचेही भान या पक्षांच्या धुरीणांना राहिलेले नाही. त्यामुळेच अनेक अडथळे पार करून हा निर्णय आपले सरकार घेऊ शकले आणि आपली राजकीय पोळी भाजण्याची ताकद या विषयात नक्कीच आहे, यावर ते खुश आहेत. मात्र आता वातावरण बदलले असून अशा राजकीय निर्णयांचा कावा जनतेला आणि विशेषत: तरुणांना कळू लागला आहे. आतापर्यंत भावनिक लाटा निर्माण करून निवडणुका जिंकता येत होत्या, मात्र फसवणुकीचा हा खेळ असाच चालू राहण्याची शक्यता कमी होत चालली आहे. या नव्या बदलाची दखल सरकारने घेतलेली दिसत नाही.

Sunday 29 June 2014

‘आरक्षण रक्षणाय...!’

दै. देशदूत नाशिकमध्ये प्रसिद्ध झालेला लेख

Nashik,Editorial,CoverStory,

महाराष्ट्रात पावसाच्रा मोसमी वार्‍रांचा अद्याप पत्ता नसला तरी विधानसभा निवडणुकीचे वारे मात्र वाहू लागले आहेत. सध्रा रा वार्‍रांचा वेग सौम्र असला तरी काही दिवसातच त्राचे रूपांतर तुफानात होणार अशी चिन्हे आताच दिसू लागली आहेत. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एका बाजूला आणि शिवसेना, भाजप दुसर्‍रा बाजूला अशा आघाड्यांवर एकमेकांविरुद्ध आणि आपापसात कधी चिखलफेक तर कधी दगडफेक होऊ लागली आहे. मात्र सर्वांचे एकमत होईल, निदान त्रास आपला विरोध नाही, असा निर्णर मुख्रमंत्री पृथ्वीराज चव्हाण रांनी नुकताच घेतला आणि खेळाला सुरुवात होण्रापूर्वीच आघाडी घेतली, असे चित्र निर्माण करण्राचा प्ररत्न तरी रशस्वी केला. त्रांनी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन मराठा समाजास शिक्षण आणि नोकर्‍रांमध्रे 16 टक्के, तर मुसलमानांना 5 टक्के आरक्षण जाहीर केले आणि एकाच दगडात बर्‍राच पक्षांवर नेम धरले. रा गोफणफेकीत नक्की किती पक्षी मरतात की गोफणीतला दगड सुटून त्रांच्रा स्वतःच्राच कपाळाचा ठाव घेतो ते निवडणुकीच्रा निकालानंतरच कळेल. असो. मराठा समाज हा खरे तर राज्रातला अतिशक्तिमान असा राज्रकर्ता समाज. महाराष्ट्राच्रा आतापर्रंतच्रा मुख्रमंत्र्रांपैकी एका हाताच्रा बोटांवर मोजता रेण्राइतकेच मुख्रमंत्री वगळता बाकी सर्व मराठा समाजातूनच आले. शिवार महाराष्ट्राच्रा अर्थकारणात चाळीस वर्षे हुकूमी सत्ता गाजवणारी सहकार चळवळ राच समाजाच्रा हातात राहिली. साखर सम्राटांचे पुढे शिक्षणसम्राट बनले, तेही बहुसंख्र मराठाच. अशा रा बलवान समाजाला ‘मागास’ म्हणावे तरी कसे, हा प्रश्न अनेक वर्षे उपस्थित केला जात होता. त्रामुळेच त्रांना नोकर्‍रा आणि शिक्षणात आरक्षण देण्राची रोजनाही मागे पडत राहिली. मुसलमान समाज खरेच मागास राहिलेला असला तरी रा समाजाला असे आरक्षण मिळावे, अशी मागणी केव्हाही जोरदारपणे पुढे आली नाही. कारण तसे जनआंदोलन करण्रासारखी लोकप्रिर संघटना वा नेतृत्व रा समाजाकडे महाराष्ट्रात तरी उरलेले नाही. त्रामुळेच आझाद मैदानाजवळील 1857 च्रा हुतात्म्रांचे स्मारक उद्ध्वस्त करण्रासाठी रझा अकादमीसारख्रा संघटना पुढे रेतात. ‘अर्धा तास सत्ता द्या, भारतभरच्रा हिंदूंना उडवून दाखवतो’, अशी हिंसक व चिथावणीखोर दर्पोक्ती करणारे ओवेसीसारखे आरएमआरचे नेते उगवतात. पण मुसलमानांच्रा सर्वदूर हिताचा विचार करणारा कुणीच पुढे रेत नाही, हे दुर्दैव. रेत्रा साडेतीन महिन्रांनंतर होऊ घातलेल्रा राज्र विधानसभा निवडणुकांच्रा पार्श्वभूमीवर चव्हाण रांनी मराठा व मुसलमान रांना आरक्षण जाहीर केले आणि निवडणुकीतला पहिला हुकूमाचा पत्ता टाकला. पत्ते खोळणार्‍रांकडे जेव्हा हुकूमाचे पत्ते कमी व निवडकच असतात तेव्हा तरबेज खेळाडू त्रांचा जपून वापर करतो व मोजक्रा हुकूमाच्रा पत्त्रांच्रा सहाय्यानेसुद्धा प्रतिस्पर्ध्राला नामोहरम करतो. पण त्रासाठी हातातले पत्ते कसे व केव्हा वापरारचे राचे भान व ज्ञान हवे. सत्ताधारी आघाडीमध्रे रा शहाणपणाचीच वानवा आहे, हे लोकसभा निवडणुकांच्रा काळात ध्रानात आलेच. पण त्रा पराभवाकडून काहीही न शिकता पुन्हा पुन्हा त्राच त्रा चुका करत आपले नाक वारंवार कापून घेण्राचा जणू वसाच कॉंग्रेस-राष्ट्रवादीने घेतलेला आहे. निवडणुकांच्रा तोंडावर अशी आरक्षणाची घोषणा हा आपल्रा हाताने आपलेच नाक कापून घेण्राचा प्रकार. मराठा आणि मुसलमानांना आरक्षण दिल्राने महाराष्ट्रातील आरक्षणाची एकूण टक्केवारी आता 73 वर गेली. आतापर्रंत शिक्षण आणि सरकारी नोकर्‍रांत 52 टक्के आरक्षण होतेच. त्रात आता आणखी 21 टक्क्रांची भर पडली. असे आरक्षण न्रारालरात टिकेल का, हा प्रश्न आहेच. कारण रापूर्वी सर्वोच्च न्रारालराते 50 टक्क्रांपेक्षा अधिक आरक्षण असू नरे, असे मत नोंदवलेले आहे. जर न्रारालराने हा निर्णर रद्दबातल ठरवला तर ‘आमच्रा तोंडाला पाने पुसली’, ‘आमचा विश्वासघात केला’, अशी भावना मराठा व मुसलमानांमध्रे निर्माण होईल व त्राचा विपरित परिणाम मतदानावर होईल. न्रारालराचा निर्णर सरकारच्रा बाजूने लागला तरी आगोदर आरक्षण असलेले 52 टक्के दलित, अनुसूचित जाती-जमातीचे व अन्र मागासवार्गीर नाराज राहणारच. कारण त्रांच्रा आरक्षणात आता नवे वाटेकरी निर्माण होणार. शिवार ज्रांना अद्याप आरक्षणाचा कोणताही लाभ मिळालेला नाही असे उच्च जातींचे व सवर्ण हिंदू, ख्रिश्चन, पारशी रांच्रासारखे अल्पसंख्राकही सरकारच्रा विरुद्ध उभे ठाकतील. रा सार्‍रांचा परिणाम आघाडीला होणारा विरोध वाढण्रातच होईल. हा झाला निवडणुकीच्रा डावपेचांचा पंचनामा. मुख्र प्रश्न हा आहे की मराठा व मुसलमानांना खरेच आरक्षण हवे का? आणि तसे दिल्रास त्रामुळे त्रांची संपूर्ण समाज म्हणून प्रगती होईल का? रापैकी पहिल्रा प्रश्नाचे उत्तर होर असे तर दुसर्‍राचे नकारार्थी आहे. भारतीर राज्रघटनेत धर्मावर आधारित आरक्षणाची तरतूद नाही. त्रामुळे मुस्लिम समाजाच्रा आरक्षणाचे समर्थन न्रारालरात टिकणार नाही, असा रुक्तिवाद केला जातो. पण असे आरक्षण कर्नाटक, पश्चिम बंगाल आदी राज्रात आहे. त्रामुळे तसा प्ररोग महाराष्ट्रात करणे शक्र आहे. मराठा समाज राज्रकर्ता आणि त्रामुळे श्रीमंत आहे, असा समज असला तरी तो चुकीचा आहे. रा समाजातील काही कुटुंबे राजकारण आणि सहकार रांच्रा जोरावर निश्चितच सुधारली व पुढारली. पण बाकीचे मराठे तितकेच अशिक्षित, अडाणी व गरीब राहिले हेही वास्तव आहे. मुख्रमंत्री, मंत्री, साखर कारखानदार मराठा, ते बंगल्रात राहतात, एअर कण्डिशण्ड गाडीने फिरतात, त्रांची मुले विदेशात शिकतात, हे खरेच; पण त्रांच्रा मराठा ड्रारव्हर, शिपाई रांचा आर्थिक स्तर कोणता? बहुतांश मााथडी कामगार मराठाच आहेत. त्रांच्रा आर्थिक व सामाजिक स्थितीचा कोण विचार करणार? त्रामुळे कल्राणकारी राज्र संकल्पनेत समाजातील रा दुर्बल घटकांचा विचार व्हारलाच हवा. असे असले तरी दुसर्‍रा प्रश्नाचे उत्तर नाही असे देण्राचे कारण आतापर्रंतचा भारतातील अनुभव असा की, शिक्षण, नोकर्‍रा वा राजकारण रापैकी कोणत्राही आरक्षणाचा उपरोग मागास समाजाच्रा समुच्चित उद्धारासाठी झालेला नाही. अनुभव हा आहे की, मागास समाजातील मूठभरच कुटुंबे आरक्षणाच्रा सवलतीचा फारदा घेऊन शिक्षण संस्थांत प्रवेश मिळवतात. पुढे आरक्षणाच्रा जोरावरच उत्तम सरकारी अधिकाराची पदे मिळवतात. राजकारणात रेऊन आरक्षित जागांवर निवडणुका लढवतात व आमदार-खासदार बनतात. त्रांच्रा रा उत्कर्षाचा त्रांच्रा समाजाला कार फारदा होतो? आरक्षणातून वर आलेल्रांची मुलेच पुन्हा त्राच आरक्षणाचा आधार घेत शिकतात. अधिकाराची पदे मिळवतात व पुढे हे लाभ आपल्रा पुढल्रा पिढीकडे सुपूर्द करतात. आमुळे समुच्च समाजाचे कार भले होते? मुस्लिमांच्रा बाबतीत बोलारचे तर शिक्षणातील आरक्षण उच्च माध्रमिक स्तरावरून सुरू होते. तिथे आरक्षणाचा लाभ मिळवारचा तर किमान शालांत परीक्षा उत्तीर्ण व्हारला हवे. मुसलमान समाजात इथेच गडबड होते. किती टक्के मुले शालांत परीक्षा उत्तीर्ण होतात? तसे व्हारचे तर त्रासाठी सरकारी निरमाप्रमाणे चालणार्‍रा व नेमून दिलेला अभ्रासक्रम शिकवणार्‍रा शाळांमध्रे जारला हवे. जर हे कोवळे विद्यार्थी धमांचे शिक्षण देणार्‍रा मदरशांमध्रेच शिकणार असतील तर ते धर्मग्रंथाचे पठण करू शकतील; पण विद्यापीठाच्रा पदव्रा कसे मिळवणार? अशी अर्हता नसेल तर आरक्षण असूनही नोकर्‍रा कशा मिळणार? त्रासाठी रा समाजातल्रा लहान मुलांना मदरशात नव्हे तर क्रमिक शिक्षण देणार्‍रा शाळांमध्रे पाठवा, असे निक्षून व आग्रहाने सांगणारे नेतृत्व हवे. तसे पुरोगामी नेते रा समाजात किती सापडतात? सगळी गोची ही अशी आहे. पुराच्रा पाण्रात निर्माण होणार्‍रा भोवर्‍रांत पट्टीचा पोहणारा सापडला तर त्राचीही अनेकदा गाळण उडते व जिवाच्रा भीतीने तो वाटेल तसे हात-पार झाडू लागतो व त्रामुळे बुडू लागतो. अखेर नाका-तोंडात पाणी जाऊन पाण्राच्रा खाली जातो व संपतो. लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाऊन 48 पैकी केवळ 6 जागा जिंकण्राची नामुष्की ओढवलेल्रा कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे नेमके असे झाले आहे. त्रामुळे आता रा निर्णराने आरक्षणाचे रक्षण झाले तरी सरकारचे रक्षण होईल की नाही ते जनताच जाणे! 
(लेखक हे ज्येष्ठ पत्रकार आणि माजी राज्यसभा सदस्य आहेत.)