मी धर्मांतराचा हा एक विचार दिला आहे. त्यावर मतभेद होऊ शकतात. पण मराठा समाजाला ब्राह्मणी वर्चस्व असलेला हिंदू धर्म एक ना एक दिवस सोडून आपली स्वतंत्र वाट चोखाळावीच लागणार आहे. हिंदू हा धर्म नसून, ब्राह्मणांनी त्यांच्या फायद्यासाठी तयार केलेली एक व्यवस्था आहे. हे समजून घ्या. मग माझ्या लेखावर योग्य दिशेने विचार होईल. आपण किती दिवस ब्राह्मणांच्या ओंजळीने पाणी पिणार आहोत. आरएसएस ही ब्राह्मणी संघटना या देशात ब्राह्मणांचे राज्य आणण्यासाठी गुप्त कारस्थाने करीत आहे. भाजपाच्या अध्यक्षपदी नितीन गडकरी या ब्राह्मणाची निवड त्यासाठीच करण्यात आली आहे.
बदनामी कशी सहन करणार?
ज्या ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करायचे नाकारले. राज्याभिषेक करण्यासाठी अब्जावधी रूपयांची लाच महाराजांकडून घेतली. ज्यांनी लेनला हाताशी धरून जिजाऊंची बदनामी केली, त्या ब्राह्मणांचा कावा मराठे कधी ओळखणार आहेत. की आंधळेपणाने त्यांच्याच मागे जाणार आहेत? ज्यांना जिजाऊंची बदनामी करणारया ब्राह्मणी धर्माबद्दल आदर वाटतो, त्यांना स्वत:ला मराठा म्हणवून घेण्याचा तरी अधिकार आहे का?
तरीही आम्ही स्वतःला मराठे म्हणवतो..
ज्यांनी महाराज आणि राजमातेची बदनामी कोली, त्यांच्या हातून आम्ही आमच्या मुला-मुलींची लग्ने लावतो. आमच्या वाडवडिलांच्या मृत्यूनतंर त्यांच्याच हातून विधि करून घेतो. त्यांच्या सांगण्यावरून आम्ही सत्यनारायण घालतो. महाराजांची बदनामी केल्याबद्दल ज्यांना लाथा घालायला पाहिजे, त्यांच्या आम्ही पाया पडतो. त्यांना दक्षिणा देतो. आणि तरीही आम्ही स्वत:ला महाराजांचे वारसदार आणि मराठे म्हणून मिरवतो. आपल्याला समाजाला खरोखरच लाज राहिलेली नाही. याबद्दल मला तीव्र वेदना होतात.
हिन्दुत्वाचे मृगजळ
ब्राह्मणवाद्यांनी या देशात हिन्दुत्वाचे मृगजळ उभे केले आहे. संभाजीनगर, हिन्दूराष्ट्र ही अशाच मृगजळाची उदाहरणे आहेत. हे संभाजीनगर म्हणतात, ते बहुजनांना भुलविण्यासाठी यांचे केंद्रात सात-आठ वर्षे सरकार होते, तेव्हा यांनी कायदेशीररित्या संभाजीनगर असे नामकरण का केले नाही? कारण यांना तसे करायचेच नव्हते. मते मिळविण्यासाठी फक्त महाराजांचे नाव वापरायचे होते.
तीन ठाकरे महाराष्ट्राला उल्लू बनवित आहेत
आरएसएस आणि ठाकरे हे ब्राह्मण आगी लावतात. मराठे आणि बहुजनांची पोरे त्यांच्या चिथावणीला बळी पडून पेटवा पेटवी करतात. आणि नंतर तुरुंगात सडत पडतात. ठाकरयांना हिन्दुत्ववाद हवा आहे की, मराठीवाद हे कोणी सांगू शकेल का? कोणीच सांगू शकत नाही. कारण त्यांना कोणताच वाद नको आहे. त्यांना "वापरवाद" करायचा आहे. बहुजनांच्या पोरांना वापरून घ्यायचे आहे. ठाकरे नावाचे तीन माणसे सगळ्या महाराष्ट्राला उल्लू बनवित आहेत. आणि बहुजन महाराष्ट्र त्याला बळी पडत आहे, हीच खरी शोकांतिका आहे...

No comments:
Post a Comment