Sunday 25 November 2012

ब्राह्मणवादी इतिहासकारांच्या तोंडावर थुंकण्यासाठी कोणी बक्षिस लावले नाही!

जातीयवाद्यांनो बहुजन समाजाच्या सुसंस्कृतपणाला सलाम करा

बहुजन समाज अजूनही सुसंस्कृत आहे, म्हणून हा देश टिकलेला आहे. ज्या दिवशी बहुजन समाज सुसंस्कृतपणा सोडील त्या दिवशी हा देश कोलमडून पडेल. खासदार राम जेठमलानी यांनी रामाला ‘वाईट पतीङ्क म्हटल्यावर ब्राह्मणवादी गुरू आणि महंतांनी जो थयथयाट केला. त्याच्या बातम्या इंटरनेटवर वाचल्या तेव्हा माझ्या मनात बहुजन समाजाबद्दल अभिमान दाटून आला. जातीयदवादी ब्राह्मण दोन हजार पेक्षाही जास्त वर्षांपासून बहुजन समाजाची बदनामी करीत आहेत. पण असा थयथयाट बहुजन समाजातील कोणी अजून केला नाही.

सीतेचा कोणताही दोष नसताना रामाने सीतेचा त्याग केला. तिला सगळे आयुष्यच वनवासात काढावे लागले. आधी रामासोबतचा वनवास आणि नंतर रामानेच दिलेला वनवास. हा संदर्भ देऊन राम जेठमलानी यांनी रामाला वाईट पती म्हटले होते. आपल्या सिंधूताई सपकाळ यांनी सुद्धा रामाला देव मानण्यास नकार दिला आहे. अनेक भाषणांतून सिंधूताई आपली ही भावना व्यक्त करतात. जेठमलानी यांनी हीच भावना व्यक्त केली होती. पण ती ब्राह्मणवादी बाबांना पटली नाही. मध्यप्रदेशच्या जबलपूर येथील एका आश्रमाचा महंत महामंडलेश्वर स्वामी श्यामदास महाराज याने जेठमलानी यांच्या तोंडावर  थुंकणा-यास ५ लाखांचे बक्षिस जाहीर केले. त्या आधी एका ब्राह्मणवादी गटाने जेठमलानी यांची जीभ कापणा-यास ११ लाखांचे बक्षिस जाहीर केले होते. विशेष म्हणजे या लोकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई पोलिसांनी केलेली नाही.

ब्राह्मणवाद्यांची वरील बक्षिसे वाचून माझी खूप करमणूक झाली. माझ्या मनात प्रश्न आला, ब्राह्मणवाद्यांप्रमाणे बहुजन समाजानेही आपल्या महापुरुषांच्या बदनामीच्या विरोधात अशीच बक्षिसे ठेवली तर काय होईल? मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी महाराष्ट्रात शे-दोनशे वर्षांपासून सुरू आहे. ही बदनामी करणारे झाडून सारे इतिहासकार ब्राह्मण आहेत. पण त्यांची जीभ कापण्यासाठी किंवा  त्यांच्या तोंडावर थुंकण्यासाठी कोणी असे बक्षिस अजून ठेवले नाही. बाबासाहेब पुरंदरे यांनी आयुष्यभर शिवाजी महाराजांचे बदनामी केली. अरुण शौरी यांनी ‘वर्शिपिंग फाल्स गॉड' या पुस्तकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची बदनामी केली. पण बहुजन समाजातील कोणाही पैसेवाल्या व्यकतीने पुरंदरे किंवा शौरी यांची जिभ कापण्यासाठी किंवा तोंडावर थुंकण्यासाठी पाच-दहा लाखांचे बक्षिस ठेवले नाही. बाबासाहेब पुरंदरे हे तर आजही महाराष्ट्रात शिवरायांचा बदनामीकारक इतिहास घेऊन सुखाने फिरत आहेत. शिवचरित्राचा वापर करून कोटीने पैसे कमावित आहेत.

याचा अर्थ असा नव्हे की, बाबासाहेब पुरंदरे किंवा अन्य इतिहासकारांच्या विरोधात बक्षिसे जाहीर करण्यासाठी बहुजन समाजातील लोकांकडे पैसे नाहीत. पैसे आहेत. पण बहुजन समाजातील लोकांकडे  पैशाबरोबर सुसंस्कृतपणाही आहे. त्यामुळे तोंडावर थुंकण्यासाठी किंवा जीभ कापण्यासाठी कोणी बक्षिसे जाहीर करीत नाहीत. हा सुसंस्कृतपणा संस्कारातून आला आहे. तो असाच कायम राहील, याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नाही.

पण जाता जाता एकच सांगावेसे वाटते की, बहुजन समाजाच्या महापुरुषांची बदनामी आता ब्राह्मणवादी इतिहासकारांनी थांबवावी. कारण सुसंस्कृतपणा, सभ्यपणा आणि सोशिकता यालाही शेवटी अंत असतोच. ही बदनामी पाहून एखाद्या, बहुजनाच्या संयमाचा कडेलोट झालाच आणि त्यातून कोणी असे बक्षिस जाहीर केलेच तर त्याचा दोष बदनामीचा इतिहास लिहिणा-या पुरंदरेंसारख्या इतिहासकारांकडेच जाईल.

--अनिता पाटील 
..........................................................
जेठमलानी यांच्या विरोधात ब्राह्मणवाद्यांनी जाहीर केलेल्या बक्षिसाची बातमी वाचण्यासाठी पुढील मथळ्यावर क्लिक करा : राम जेठमलानी यांच्यावर थुंकण्यासाठी ५ लाखांचे बक्षिस

Thursday 22 November 2012

...तर ठाकरेंच्या आत्म्याला शांती मिळणार नाही

कोहिनूर मिलमध्ये उभारा ठाकरेंचे स्मारक

नव्या पिढीतील प्रसिद्ध विचारवंत, लेखक श्री. डॉ. बालाजी जाधव यांचा
हा लेख ‘अनिता पाटील विचार मंच'च्या वाचकांसाठी देत आहोत. 

जो जन्माला येतो तो मरतो हा निसर्ग नियमच आहे . परंतु बर्याच जणांना काही व्यक्तींपुरता तरी हा नियम अपवाद ठरावा असे मनोमन वाटत असते. बाळ ठाकरेंच्या संदर्भात सुद्धा कित्येकांना असेच वाटले. बाळासाहेब आपल्याला सोडून गेले ही खबरच नव्हे तर त्यांची प्रकृती अत्यवस्थ आहे असे सांगणार्या वृत्त वाहिनीची ओ बी व्ह्यान फोडण्यापर्यंत बाल ठाकरेंच्या चाहत्यांची मजल गेली. मरण हे देवालाही चुकत नाही असे कितीही म्हटले तरी एखादी व्यक्ती जेव्हा आपल्यासाठी देवापेक्षाही मोठी वाटायला लागते तेव्हा मात्र त्या व्यक्तीने निसर्गाचे सारे नियम झुगारून केवळ आपल्यासाठी जगतच राहावे असे वाटणे स्वाभाविक आहे. म्हणूनच जेव्हा ठाकरेंची प्रकृती चिंताजनक म्हणण्या एवढी गंभीर झाली तेव्हा प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकूनही प्रत्येकाने बाळासाहेब बरे व्हावेत म्हणून देव पाण्यात घालून ठेवले. पण म्हणतात ना की "वास्तव हे विस्तव पेक्षा जास्त तापदायक असते " या नियमाप्रमाणे बाळासाहेब आज आपल्यात नाहीत. या वास्तवाची जाणीव ही निश्चितच विस्तवाच्या चटक्यांपेक्षा पेक्षाही जास्त चटका लावणारी आहे. म्हणूनच बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेला जनतेचा महासागर लोटला. वैचारिक मतभेद हे जिवंत माणसांचे लक्षण आहे. म्हणूनच आपल्या कुटुंबात कितीही मतभेद झाले तरी आपण आपला संसार नेटाने शेवटास नेतो . बाळासाहेब हे प्रबोधनकार ठाकरेंचे चिरंजीव म्हणून त्यांना जन्मताच सत्यशोधक विचारांचा वारसा लाभला आणि याच वारशाच्या जोरावर बाळासाहेबांनी  'शिवसेना' नावाची प्रथम सामाजिक आणि नंतर राजकीय संघटना उभा केली. असे असले तरीही बाळासाहेबांनी आज जे लाखो चाहते निर्माण केले त्याचे श्रेय मात्र बाळासाहेबांनाच द्यावे लागेल. 

 'भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर' यांच्या
अंत्ययात्रेशी तुलना होऊच  शकत नाही 
असो. बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेला जो महापूर जमला या मुळे विरोधकांना सुधा बाळासाहेबांच्या नावाची ताकत लक्षात आली. परंतु त्यांच्या अंत्ययात्रेला जमलेल्या गर्दीने बेभान झालेल्या दीड शहाण्या ब्राहमणी मेडिया ने जे अवास्तव कवित्व सुरु केले आहे ते पाहून दस्तूर खुद्द बाळ ठाकरेंनी सुधा या दीड शहान्यांना आपल्या 'मार्मिक' शब्दात फटकारले असते आणि या नालायक लोकांना सुधा निमुटपणे बाळासाहेबांच्या फटकार्यांचा "सामना" करावा लागला असता. काही वाहिन्यांनी दिवाळीचा दिपोस्ताव संपल्या संपल्या बाळ ठाकरेंच्या अंत्ययात्रेबद्दल आपल्या नसलेल्या अकलेचे दिवे पाजळत या अंत्ययात्रेची तुलना 'भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर' यांच्या अंत्ययात्रेशी करायला सुरुवात केली. मुळात कोनत्याही व्यक्तीची तुलना दुसर्या व्यक्तीशी करणे योग्य नाही आणि त्यातल्या त्यात महामानवांची एक दुसर्याशी तुलना करणे तर अजिबात योग्य नाही. या पेक्षाही अत्यंत संतापजनक बाब म्हणजे या तुलनेद्वारे आपण नकळत (की जाणीवपूर्वक ?) बाबासाहेबांना कमी लेखत आहोत हे या ब्राह्मणांच्या लक्षात येत नसेल काय ? बर प्रदीप इंगोले म्हणतात तसे -"अंत्ययात्रेत सामील झालेल्या लोकांच्या केवळ संख्येवरून त्या व्यक्तीचे मोठेपण ठरवले तर मग त्या व्यक्तीच्या विचार आणि कार्याचे काय? आणि जर संख्येवरूनच मोठेपना ठरवायचा असेल तर मग कार्ल मार्क्स ह्या महामानवाच्या अंत्ययात्रेला त्याला खांदा देणारे ४ जनच उपस्थित होते. मग कार्ल मार्क्सचे मोठेपण काय हवेत मिळाले का ? आज जगाच्या पाठीवर असा एकही देश नाही की जिथे कार्ल मार्क्सचे विचार पोहोचले नाहीत." आणखी उदाहरणच द्यावयाचे झाल्यास अन्ना भाऊ साठेंचेही देता येईल. त्यांच्या अंत्ययात्रेला तर केवळ १७ जनच हजर होते. मग अन्नाभाऊंचे मोठेपण नाकारायचे काय? हेही जाऊद्या खुद्द शिवरायांच्या अंत्ययात्रेलाही मोजकीच मानसे हजर होती. मग उद्या बाल ठाकरेंना शिवरायांपेक्षा मोठे ठरवायचे काय? बाळासाहेबांना जरूर मोठे करा पण त्यासाठी आमच्या महामानवांचा अवमान कशासाठी ?

ठाकरे यांना शिवरायांच्या जागेवर बसवणार का?
बाळासाहेबांच्या पित्याने शिवरायांचे नाव घेऊन समाजप्रबोधन केले तर बाळ ठाकरेंनी शिवरायांचे नाव घेऊन सोयीचे राजकारण केले. गर्दीचा महापूर पाहून बेभान झालेले काही उपटसुंभ तर बाळ ठाकरेंची तुलना छ. शिवाजी महाराजांशी करत आहेत.याचेच एक उदाहरण द्यायचे झाल्यास बाळासाहेबांना स्वरांजली अर्पण करताना फेणाणी या गायिकेने रामदासाने लाळघोटेपणे शिवरायान्बद्दल जो "निश्चयाचा महामेरू..." हा श्लोक लिहिला तोच श्लोक बाळ ठाकरे बद्दल वापरला.एका न्यूज च्यानेल ने तर बाळ ठाकरेंचा आदरार्थी उल्लेख करत याच वाक्याच्या खाली "शिवाजीच्या पुतळ्या शेजारीच स्मारक (बाळासाहेबांचे ) व्हावे " असे वाक्य टाकून शिवरायांना अरे- तुरे करून शिवरायांची बदनामी केली. पण बाळासाहेबांच्या जाण्याने सक्ख्खा बाप गमावल्याप्रमाणे आकंठ दुखत बुडालेल्या शिवसैनिकांना याच्याशी काहीही देणेघेणे दिसत नाहीये. स्वत बाळ ठाकरेही शिवरायांचे विरोधकच होते.आता काही जणांना ही बाळासाहेबंवरील अनाहूत टीका वाटेल परंतु वास्तव काय सांगते? काही वर्ष झाले शिवसेनेच्या ब्याणर वरून शिवराय हद्दपार झाले आहेत आणि तेही बाल ठाकरे जिवंत असताना हे घडले आहे. मग शिवप्रेमी बाळासाहेबांनी आपल्या पदाधिकार्यांना या गैर प्रकार बद्दल कानपिचक्या का बरे दिल्या नाहीत? शिवसेनेत तर बाळासाहेबांच्या आदेशा शिवाय कोणतीही गोष्ट होत नसते. मग याचा अर्थ शिवरायांना ब्याणर वरून हटविण्याचे आदेशाही बाळ ठाकरेंनीच दिले असल्याचे सिद्ध होते. बर जेव्हा शिवरायांच्या पितृत्व विषयी घाणेरडा विनोद बनवून जीजाऊच्या मातृत्वालाही कलंकीत केले गेले तेव्हा बाळ ठाकरेंनी या प्रकाराचा साधा निषेधही केला नाही. उलट उपलब्ध पुराव्यानुसार बाळासाहेबांनी या गैर प्रकाराचे समर्थनच केले होते.(अधिक माहितीसाठी वाचा डॉ बालाजी जाधव लिखित जेम्स लेन प्रकरणातील ब्रह्मराक्षस हा ग्रंथ.) 

शिवस्मारकास विरोध करणारे ठाकरे
परवा परवा राज्यातील सत्ता रूढ पक्षाने शिवरायांचे अरबी समुद्रात भव्य स्मारक उभे करण्याचे जाहीर केले तेव्हा त्यालाही बाळ ठाकरेंनी विरोधच केला. असे असताना बाळ ठाकरेंची तुलना शिवरायांशी करण्याची खाज का? ज्या भावनेतून बाळ ठाकरेंनी शिवरायांच्या अरबी समुद्रात होणार्या स्मारकाला विरोध केला त्याच भावनेचा आदर करत महागाईने त्रस्त असणार्या राज्यातील जनतेने आणि शिवसैनिकांनी सुधा शिवाजी पार्क वरील बाळ ठाकरेंच्या पुतळ्याला विरोध केला पाहिजे आणि तोही प्राणपणाने.

मनोहर जोशींनी ठाकरेंच्या स्मारकाला जागा द्यावी
जे बाळासाहेब स्वताचे आत्मचरित्र कधीच लिहिणार नाही असे छाती ठोकपने जाहीर सभातून सांगायचे त्याच बाळासाहेबांचे पुतळे उभे करणे बाळासाहेबांना सुधा खचितच आवडले नसते. असे असतानाही बाळासाहेबांच्या मुळ विचारांना छेद देऊन त्यांच्या आत्म्याला शांती लाभेल का? वरून काही लोक खवचटपने इंदू मिलच्या जागेत बाळासाहेबांचे स्मारक व्हावे अशी मागणी करत आहेत. ज्या बाळासाहेबांनी इंदू मिलची जागा बाबासाहेबांच्या स्मारकाला द्यायला मरेपर्यंत विरोध केला त्यांचेच स्मारक इंदू मिलच्या जागेत करा असे म्हणणे समस्त भिमसैनिकांच्या आणि बाबासाहेबप्रेमींच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार होय. उलट बाळ ठाकरेंच्या स्मारकासाठी शिवाजी पार्क आणि इंदू मिलपेक्षाही योग्य जागा "कोहिनूर मिल" आहे. जे जोशी वारावर शिकत होते त्यांना चक्क मुख्यमंत्री पदापर्यंत बाळ ठाकरेंनी पोचवले. त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी जोशी काकांनीच बाळासाहेबांच्या जागेचा वाद मिटवत कोहिनूर मिल येथे साहेबांचे भव्य स्मारक बांधून घ्यावे अशी राज्यातील समस्त शिव सैनिकांची इच्छा आहे. शिवसेनेच्या नेतृत्वाने शिवसैनिकांच्या या भावनेचा मान राखावा. 

या देशात फक्त ब्राह्मणांनाच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का ?
सरतेशेवटी थोडे अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्द्ल बोलूया. बाल ठाकरेंच्या मृत्यू नंतर मुंबईतच नव्हे तर राज्यभर बंद पाळला गेला. हा बंद काही ठिकाणी उत्स्फूर्त पने पाळला गेला तर काही ठिकाणी शिवसैनिकांनीआपल्या गुंडगिरीचे प्रदर्शन करत बंद पाळण्यास भाग पाडले.या बंदमुळे विस्कळीत झालेल्या जनजीवनामुळे 'शाहीन धाडा ' या युवतीने फेसबुकवर बंदच्या निषेधार्थ काही मजकूर लिहिला आणि रेणू श्रीनिवासन हिने त्याला लायिक केले. यामुळे संतप्त होऊन शिवसैनिकांनी त्या तरुणीच्या काकांच, श्रीयुत अब्दुल धाडा यांचे रुग्णालय फोडून टाकले.माथेफिरू शिवसैनिकांच्या भावना समजून घेता येऊ शकतात परंतु याप्रकारामुळे पोलिसांनी त्या दोन तरुणींना तत्काळ अटक केली आणि ''चोर सोडून संन्यासाला फाशी" या म्हणीचा प्रत्यय आणून दिला. खरे तर अशा प्रकारची जलद कारवाई दरोडा, खून, बलात्कार या सारख्या गंभीर गुन्ह्यात होत असते. काहीवेळा आरोपी बेपत्ता होण्याची शक्यता गृहीत धरून किंवा वारंवार गुन्हे करणारे गुन्हेगार यांनाही अश्या प्रकारे अटक केल्या जाऊ शकते. परंतु सदर तरुणींनी असा किंवा अशाप्रकारचा कोणताही गुन्हा केलेला नसताना त्यांना अटक झालीच कशी? कुठे गेले अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळे काढणारे स्वातंत्र्यवीर? की या देशात फक्त ब्राह्मणांनाच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे? या अटकेमुळे पोलिसांनी घटनेचे कलम १९ चे उल्लंघन केले.

पुण्यातील १४ ब्राह्मण आजही मोकाट कसे? 
बाळ ठाकरेंच्या मृत्यू मुळे पाळण्यात आलेल्या बंदचा निषेध करणाऱ्या तरुण्णींना जर एवढ्या लवकर अटक होत असेल तर मग जीजाऊच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविणारे पुण्यातील १४ ब्राह्मण आजही मोकाट कसे? फेसबुक चेच उदाहरण द्यायचे झाल्यास शेकडो ब्राह्मण खोट्या नावाने राजरोसपणे बहुजन महामानवांची निंदा नालस्ती करत असतात त्यांचे काय करायचे? की शाहीन धाडा ही मुस्लीम होती म्हणून आधी शिवसेनेच्या गुंडांनी आणि नंतर पोलिसांनी तिच्यावर ही कारवाई केली? अरे बाळ ठाकरे जेव्हा शेवटच्या घटका मोजत होते तेव्हा त्यांचा जीव वाचविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे दोन डॉक्टर हे मुस्लीम समाजातील होते. मग हा मुस्लीम द्वेष कशासाठी? हे सगळे जर असेच चालत राहिले आणि बाळ ठाकरेंच्या विचारांविरोधात जाऊन त्यांचे देशात एकही स्मारक उभारले तर नक्कीच बाळ ठाकरेंच्या आत्म्याला शांती मिळणार नाही.

बाल ठाकरेंचे स्मारक होईल तेव्हा होओ. आता सर्व मराठ्यांनी अरबी समुद्रातील शिव स्मारकाच्या संदर्भात आंदोलन केले पाहिजे.

(डॉ. बालाजी जाधव यांच्या पंचफुला प्रकाशन या ब्लॉगवरून साभार)

Tuesday 20 November 2012

ब्राह्मणहत्या हे सर्वांत मोठे पाप नव्हे!

जमदग्नी ब्राह्मण म्हणतो : लाखांचा पोशिंदा 
असलेल्या राजाला मारणे हेच सर्वांत मोठे पाप!!
ब्राह्मणाची हत्या करणे हे सर्वांत मोठे पाप कसे ठरले आणि कोणी ठरविले?  ब्राह्मणाला ठार मारणे हे सर्वांत मोठे पाप आहे हे कोणत्या ग्रंथात लिहिले आहे? मी अनेक धर्मग्रंथ धुंडाळले मात्र मला तरी असा कोणताही उल्लेख कोणत्याही मान्यता प्राप्त ग्रंथात आढळून येत नाही. उलट राजाला ठार मारणे, हे सर्वांत मोठे पाप आहे, असे उल्लेख अनेक ग्रंथात आढळून येतात. ब्राह्मणहत्या हे सर्वांत मोठे पाप आहे, हा प्रचार खोटा आहे. 

या संदर्भाने भागवत पुराणात काय उल्लेख आहेत, याची चर्चा मी येथे करणार आहे. भागवत पुराणाची निवड दोन कारणांसाठी केली आहे. एक म्हणजे, आज हिंदू म्हणविला जाणार धर्म भागवत पुराणातील संकल्पनांवर आधारित आहे. अवतार कल्पना भागवत पुराणानेच आणली असून, ती हिंदू म्हणविल्या जाणाऱ्या  धर्माचा मुख्य आधार ठरली आहे. दुसरे कारण असे की, ज्या परशुरामाला आजचे ब्राह्मण आपला आदर्श ठरवित आहेत, त्याच्याच कथेत ब्राह्मण हत्या हे सर्वांत मोठे पाप नसल्याचा उल्लेख आलेला आहे. 

जमदग्नी ब्राह्मणाने काय म्हटले?
क्षत्रियांच्या हैहय कुळातील राजा सहस्त्रार्जुन आणि परशुराम यांचे भयंकर शत्रुत्व होते. एक दिवस परशुराम सहस्त्रार्जुनाला ठार मारतो. ही गोष्ट जेव्हा परशुरामाचा पिता जमदग्नी याला कळते, तेव्हा तो दु:खी होतो. तो परशुरामाचा धिक्कार करतो. 'भवान् पापमकारषीत्' म्हणजेच तू सर्वांत मोठे पाप केले आहे, असे जमदग्नी ब्राह्मण परशुरामाला सांगतो. इतकेच नव्हे तर, 'राज्ञो मूर्धाभिषिक्तस्य वधो ब्रह्मवधाद् गुरु:' म्हणजेच ‘राजाची हत्या करणे हे ब्राह्मणाची हत्या करण्यापेक्षाही मोठे पाप आहे', असे शास्त्रवचन जमदग्नी ब्राह्मण परशुरामाला सांगतो. 

जमदग्नी ब्राह्मणाने परशुरामाला उद्देशून केलेला हा उपदेश भागवत पुराणाच्या ९ व्या स्कंधातील १५ अध्यायात जमदग्नी ब्राह्मणाचा हा उपदेश आलेला आहे. जमदग्नीच्या तोंडचे मूळ श्लोक असे :

राम राम महाबाहो भवान् पापमकारषीत्
अवधीन्नरदेवं यत सर्वदेवमयं वृथा ।।३८।।
अर्थ : हाय हाय परशुरामा! तू घोर पाप केले आहे. राम राम! तू मोठा वीर आहेस; पण ज्याला सर्वदेवमय आणि नरदेव असे म्हटले जाते, त्या राजाचा तू व्यर्थ वध केला आहे. 

वयं हि ब्राह्मणास्ताम क्षमयार्हणतां गता ।
यया लोकगुरुर्देव: पारमेष्ठ्यमंगात् पदम ।।३९।।
अर्थ : बेटा, आपण ब्राह्मण आहोत. आपण क्षमा धारण केली आहे, म्हणून आपण या लोकी गुरू या पदाला पात्र झालो आहोत. आपले परम पिता ब्रह्मदेव हे केवळ क्षमा धारण केल्यामुळेच ब्रह्मपदाला पोहोचले आहेत. 

राज्ञो मूर्धाभिषिक्तस्य वधो ब्रह्मवधाद् गुरु: ।
तीर्थसंसेवया चांहो जद्यङ्गच्युतचेतन: ।।४।।
अर्थ : बेटा, सार्वभौम राजाचा वध करणे हे ब्राह्मणाचा वध करण्यापेक्षाही मोठे पाप आहे.  तुझ्या हातून असे सर्वांत मोठे पाप घडले आहे. आता भगवंताचे स्मरण करीत करीत तीर्थयात्रा कर आणि केलेले पाप धुवून काढ.

सारांश, ब्राह्मणाची हत्या करणे हे सर्वांत मोठे पाप आहे, असा जो प्रचार कित्येक शतके केला जात होता, तो खोटा आहे. धर्मग्रंथांनी ब्राह्मण हत्येपेक्षा राजहत्या हे सर्वांत मोठे पाप ठरविले आहे. मधल्या कालखंडात ब्राह्मणांशिवाय इतर कोणी धर्मग्रंथ वाचितच नव्हते. त्यामुळे ब्राह्मण काहीही खोट्या गोष्टी प्रसृत करीत असत. ब्राह्मण हत्येविषयीच्या कल्पना अशाच प्रसृत केल्या गेल्या. ग्रंथांतील सत्य बाहेर येऊ नये, म्हणून ब्राह्मणांनी इतरांना ग्रंथ वाचनाचा अधिकारच नाकारला. 

-अनिता पाटील

Tuesday 13 November 2012

मा. गो. वैद्य अस्वस्थ का झाले?

मा. गो. वैद्य
दिवाळीसाठी सुटी घेतली आहे. थोडासा निवांत वेळ आहे. म्हणून नेटवर भारतीय राजकारणाच्या बातम्या चाळत बसलीये. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या शरसंधानांनी लक्ष वेधून घेतले. वैद्यबुवा नागपूर तरुण भारतमध्ये +भाष्य+ नावाचा कॉलम लिहित असत. काही वर्षांपूर्वी त्यांचे तरुण भारतशी वाजले. अलीकडे वैद्यबुवांनी नेटावर ब्लॉग लेखन सुरू केले आहे. वैद्यबुवांनी मोदी आणि जेठमलानी यांच्यावर जे काही नथीतून तीर सोडले आहेत, ते याच ब्लॉगवरून. वृत्तपत्रांतून आलेल्या बातम्यांत वैद्यबुवांच्या एकाच लेखाचा उल्लेख आला आहे. वस्तुत: वैद्यांच्या ब्लॉगवर याच विषयावरचे तीन लेख आहेत. तिन्ही लेखांचा सूर आणि ताल एकच आहे. भाजपाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांचा भ्रष्टाचार उघडकीस आल्यामुळे संघातील ब्राह्मण लॉबी विद्ध झाली आहे. या जखमांचे हुंकार म्हणजेच वैद्यबुवांचे हे लेख होत.
वैद्यबुवांच्या ब्लॉगवरील लेख कोणते ते आधी पाहू -
१. नीतीन गडकरी, रॉबर्ट वढेरा आणि भारत सरकार (२८ ऑक्टोबर २०१२),
२. माहितीचा अधिकार आणि सरकारची लटपट (४ नोव्हेंबर २०१२)
३. भाजपाची अ-स्वस्थता (११ नोव्हेंबर २०१२) 

+भाजपाची अस्वस्थता+ हे सर्वांत ताज्या लेखाचे शीर्षक चुकीचे आहे. ते +रा. स्व. संघाची अस्वस्थता+ असे असायला हवे होते. किंबहुना हे तिन्ही लेख याच एका शीर्षकाखाली टाकले असते, तरी चालले असते. भाजपाध्यक्ष नितीन गडकरी यांचा भ्रष्टाचार उघडकीस आल्यामुळे रा. स्व. संघ अस्वस्थ आहे. संघाची ही अस्वस्थता वैद्यबुवांच्या तिन्ही लेखांतून व्यक्त झालेली दिसून येते. नितीन गडकरी यांचा कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार दडवताना वैद्यबुवांची भयंकर त्रेधातिरपीट झालेली आहे. त्यासाठी ‘संघोट्यां'चे सर्व हातखंडे वैद्यबुवांनी वापरले आहेत. पण अडचण अशी आहे की, कितीही झाकण्याचा प्रयत्न केला, तरी गडकरींचा भ्रष्टाचार झाकलाच जात नाहीय. मग त्यातून कमालीची अस्वस्थता येते. तगमग होते. काही अंशी जळफळाटही होतो. शेवटी होते असे की, आपण काय युक्तिवाद करीत आहोत, याचे भानही वैद्यबुवांना राहत नाही. काँग्रेसच्या नेत्यांवर जे काही आरोप झाले ते म्हणजे भ्रष्टाचार, पण गडकरींवरील आरोप म्हणजे भ्रष्टाचार नव्हेत, असा विचित्र निष्कर्ष वैद्यबुवा काढून मोकळे होतात. हा युक्तिवाद संघोट्यांना साजेसाच आहे. गडकरींचा भ्रष्टाचार झाकण्यासाठी वैद्यबुवा रॉबर्ट वधेरा यांच्यावरील आरोप पुढे करतात. वैद्यबुवांचे सर्वांत गमतीशीर वाक्य पाहा : + वढेरांचा मामला, तसे म्हटले तर कॉंग्रेसचाही मामला नाही. एका खाजगी व्यक्तीचा मामला आहे. त्यांच्यासाठी कॉंग्रेस प्रवक्ते मनीष तिवारी व राजीव शुक्ला यांनी स्पष्टीकरणे देण्याचे कारण काय? गडकरींचा पूर्ती उद्योग काय सरकारी उद्योग आहे? की भाजपाचा तो उद्योग आहे? की त्या उद्योगांचे जे भागधारक आहेत, त्यांनी सरकारकडे तक्रार करून चौकशीची मागणी केली आहे? +

गडकरी यांना सात भ्रष्टाचार माफ आहेत का?
रॉबर्ट वधेरांच्या कथित गैरव्यवहारांबाबत काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी स्पष्टिकरण देण्याचे कारण काय, असा प्रश्न वैद्यबुवा येथे उपस्थित करीत आहेत. माझ्याही मनात असाच प्रश्न निर्माण झाला आहे. नितीन गडकरी यांच्या भ्रष्टाचाराबाबत मा. गो वैद्य यांनी स्पष्टिकरणे देण्याचे कारण काय? वैद्यबुवांचा पुढचे प्रश्न पूर्ती उद्योगाच्या चौकशीला विरोध दर्शविणारे आहेत. गडकरींचा पूर्ती उद्योग हा सरकारी उद्योग नाही, त्यामुळे त्याची चौकशी करता येणार नाही, अशी अजब भूमिका वैद्यबुवांनी घेतली आहे. कोळसा घोटाळ्यातल्या सर्व कंपन्या खाजगीच होत्या. त्यांचीही चौकशी केली जात आहे. मग नितीन गडकरी यांच्या कंपनीची चौकशी का नको? हॉलीवूडच्या जेम्स बॉन्डला सात खून माफ आहेत, तसे गडकरी यांना सात भ्रष्टाचार माफ आहेत का? या प्रश्नांची उत्तरे नितीन गडकरी देऊ शकणार नाहीतच, पण त्यांचे वकीलपत्र घेऊन लढणारे मा. गो. वैद्यही देऊ शकणार नाहीत. 

भ्रष्टाचाराची पाळेमुळे थेट रेशिम बागेपर्यंत!
नितीन गडकरी यांचा भ्रष्टाचार उघडकीस आल्यामुळे मा. गो. वैद्य आणि रा. स्व. संघ यांना अस्वस्थ होण्याचे कारण काय? कारण असे की, गडकरी यांच्या भ्रष्टाचाराची पाळेमुळे थेट रेशिम बागेपर्यंत रुतलेली आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी याचा पर्दाफाश केला आहे. संघाचे मुख्यालय बांधायला गडकरी यांनी पैसा पुरविला आहे, असे माणिकरावांनी जाहीररित्या सांगितले आहे. त्यातून ही अस्वस्थता आली असणार, हे उघडच दिसते. 

संघाचा गेम प्लॅन फसला म्हणून तडफडात 
रा. स्व. संघ ही महाराष्ट्रातील ब्राह्मणांमार्फत ब्राह्मणांसाठी चालविली जाणारी संघटना आहे. तिचे भाजपावर नियंत्रण असते, हे सर्वश्रूत आहेच. भाजपावर ब्राह्मणांचे पूर्ण नियंत्रण कसे राहील, याबाबत संघ नेहमीच दक्ष असतो. त्यासाठी संघाने नितीन गडकरी यांना राजकारणात डेप्युटेशनवर पाठविलेले आहे. २०१४ च्या निवडणुकीनंतर देशात पुन्हा भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार आलेच तर पंतप्रधान ब्राह्मणच असावा, असा संघाचा मूळ गेमप्लन आहे. नितीन गडकरी यांनाच पंतप्रधान करण्याचा संघाचा अंतस्थ हेतू आहे. पण गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी या प्लॅनला सुरुंग लावला आहे. मोदींना स्वत:च पंतप्रधान व्हायचे आहे. मोदी हे संघाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार कधीच नव्हते. कारण मोदी ब्राह्मण नाहीत. मोदी यांना संघ कधीही पंतप्रधान करणार नाही, असे विश्लेषण मी या आधी एका लेखात केले होते. ते आता जवळपास खरे ठरले आहे. संघाच्या लेखी मोदींचे महत्त्व बुद्धिबळाच्या पटावरील प्याद्याएवढेच आहे. गुजरातेत मुस्लिमविरोधी दंगल घडवून मोदींचा संघाकडून वापर करून घेण्यात आला आहे. पण मोदी हे चलाख आहेत. संघाचा गेमप्लॅन हाणून पाडण्यासाठी त्यांनी संघाच्या माणसांचा गेम सुरू केला. आधी त्यांनी संजय जोशी यांना खड्यासारखे दूर सारले. आता गडकरींना आणि त्यांच्या बरोबर संघाला भ्रष्टाचाराच्या गाळात रुतवले आहे. एका बदमाशाने दुसऱ्या बदमाशावर केलेली ही कडी आहे. मोदीविरुद्ध संघ या झगड्याबाबत मा. गो. वैद्य यांनी काही गोष्टी उघडपणे लेखात लिहिल्या आहेत. वैद्यबुवा लिहितात : +नरेंद्र मोदींना हे वाटत असावे की गडकरी पक्षाध्यक्ष असतील, तर आपली प्रधान मंत्री बनण्याची महत्त्वाकांक्षा पूर्ण होऊ शकणार नाही. त्यांना हेही दाखवायचे असू शकते की, संजय जोशी प्रकरणात जसे आपण गडकरींना वाकवू शकलो, त्याचप्रमाणे याही बाबतीत आपण त्यांना हतप्रभ करू शकतो. त्यासाठीच ते जेठमलानींचा उपयोग करून घेत असतील.+ 

असो. नरेंद्र मोदी यांनी संघाच्या तंगड्या सध्या संघाच्याच गळ्यात घातल्या आहेत. मोदी हे संघाला छळणार असे स्पष्टपणे दिसून येत आहे. 

-अनिता पाटील


दिवाळीनंतर वाचा -    भाजपात ब्राह्मणविरुद्ध बहुजन संघर्ष

Monday 12 November 2012

भारतातील ब्राह्मण हे ठोंबे बैल आहेत का?

दिवाळी धमाका : गुगलवर brahman या नावाने 
सर्च दिल्यास येतात ''ठोंब्या बैलां''चे फोटो !


गुगल इमेजेसवर इमेजेससाठी दिलेल्या सर्चनंतर माझ्या मनात हा प्रश्न निर्माण झाला. दि. १२ नोव्हेंबर २०१२ रोजी सायंकाळी ७.१५ वा. मी गुगलवर इमेजेसमध्ये जाऊन इंग्रजीत brahman हे शब्द टाकून सर्च दिला. ०.३२ सेकंदात १८ लाख ४० हजार फोटो गुगलने हजर केले. मात्र हे फोटो बैलांचे होते.

दि. १२ नोव्हेंबर २०१२ रोजी सायंकाळी ७.१५ वा. गुगलवर इमेजेसमध्ये
 brahman हे शब्द टाकून सर्च दिला असता अशा बैलांच्या लाखो प्रतिमा मिळाल्या. 

गुगलच्या सर्चमध्ये समोर येणारे बैलाचे फोटो शेतात काम करणा-या बैलांचे नाहीत. देवाला सोडलेल्या ठोंब्या बैलांचे आहेत. हे बैल नुसतेच हिंडून-फिरून खात असतात. भारतातील ब्राह्मण आणि ठोंबे बैल हे दोघेही ऐतखाऊ आहेत, हे साम्य बहुधा गुगलच्या संचालकांना कळले असावे! त्यामुळेच ब्राह्मणांच्या जागी ठोंब्या बैलाची छायाचित्रे सर्चमध्ये येत असावीत.!!

गुगलचे संचालन भारतातून होत नाही. सातासमुद्रा पार असलेल्या अमेरिकेतून ही संस्था काम करते. याचाच अर्थ ब्राह्मणांच्या निरूपयोगीपणाची कीर्ती जगभर पसरलेली आहे, असे दिसते. तसे नसते तर गुगलच्या सर्चमध्ये ब्राह्मणांऐवजी बैलांची छायाचित्रे येती ना. 

असो. भारतातील ब्राह्मणांची अचूक पारख केल्याबद्दल गुगलचे अभिनंदन करायला हवे.

विशेष सूचना :    तुम्हीही brahman या नावाने सर्च देऊन खात्री करून घ्या. हे फोटो फार दिवस दिसणार नाहीत. माझ्या ब्लॉगवर हे सत्य जगजाहीर झाल्यानंतर ब्राह्मण = ठोंब्या बैल हे सेटिंग रद्द करून घेण्यासाठी जगभरातील ब्राह्मण गुगलकडे तक्रारी नोंदवतील. हे सेटिंग काढले जाईल. त्यामुळे  गुगल इमेजेसवर आताच्या आता सर्च द्या  


-अनिता पाटील







Saturday 3 November 2012

हम्मो... हम्मो... हम्मो.. हम्मो... हम्मो! एका भटाची फटफजिती!!

 -प्रा. रवींद्र तहकिक

चिपळूणला होऊ घातलेल्या साहित्य संमेलनाचे निकाल लागले आणि मराठी साहित्यातील एक जाणकार लेखक-समीक्षक, त्या पेक्षाही मराठीचे एक उत्तम आणि विद्यार्थी प्रिय प्राध्यापक श्री. नागनाथ कोत्तापल्ले हे चिपळूण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. याचा आम्हाला फक्त ह. मो .मराठे हरला आणि कोत्तापल्ले जिंकले म्हणूनच आनंद आहे असे नव्हे. प्रा. डॉ. कोत्तापल्ले यांचे साहित्य आणि मराठी भाषेला दिलेले योगदान ह. मो. मराठेच्या तुलनेत कितीतरी पटीने दर्जेदार, उल्लेखनीय, सकारात्मक, दिशादर्शक, उर्ध्वगमनशाली आणि सर्वव्यापी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने शिक्षणाचे महत्व समजलेल्या ग्रामीण भागातून आलेल्या आणि शिकून "आम्हाला डोकं आहे ते केवळ फेटे गुंडाळण्या साठी नाही'' हे स्वतःला सरस्वतीचे पुत्र मानणाऱ्या ब्राम्हणांना दाखवून देणाऱ्या बहुजनाच्या पहिल्या पिढीतील तरुणाचे कोत्तापल्ले हे आघाडीचे शिलेदार आहेत. म्हणूनच त्यांचे संमेलनाध्यक्ष होणे आमच्या सारख्या त्यांच्या चाहत्या विद्यार्थ्यांसाठी आनंददायक घटना आहे .
     
आता थोडे ह. मो. बद्दल. मागे एका लेखात आम्ही हमोबद्दल लिहिताना हा जातीयवादी लुत भरलेला कुत्रा साहित्य संमेलनाचा अध्यक्षच काय तिथे लेखकांनी खाऊन टाकलेल्या उष्ट्या पत्रावळ्या चाटण्याच्या सुध्धा लायकीचा नाही, असे म्हटले होते. आमचे विचार योग्यच होते हे आता मतदारांनीही दाखवून दिले आहे. मुळात हा ' भिकम भट ' साहित्य संमेलनाच्या निवडणुकीला उभाच का राहिला याचे आम्हाला सखेद आश्चर्य आहे. कदाचित त्याला असा गैरसमज झाला असण्याची शक्यता आहे की बरेच मराठी लेखक, पत्रकार आणि साहित्य वर्तुळाशी संबधित लोक ( जे मतदार आहेत ) जातीने ब्राम्हण आहेत. वरतून पुन्हा साहित्य संमेलन चिपळूणला म्हणजे निमंत्रक मतदारातही भरपूर ब्राम्हण असणार. म्हणजे या वेळी आपण हळूच जानव्यात अंगठा घालून जरा कॉलरच्या वर काढून दाखवले आणि पुन्हा बेमालूमपणे आत सारले तर....आपली ही लबाडी कुणाच्या लक्षातही येणार नाही आणि ब्राम्हणाची एकगठ्ठा मते मिळून आपण चक्क साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होऊ!! गम्मत म्हणजे या मूर्ख ब्राम्हणाने आपली हे ''टॉयलेट थॉट'' आमलातही आणले. त्याने चक्क ब्राम्हणांना आवाहन करणारे एक पत्रकच काढले. त्यात आपण कसे अनेक वर्षापासून ब्राम्हणाची बाजू घेऊन सातत्याने साहित्य सेवा करीत आहोत, ब्राम्हणांनी आता कसे एक होणे गरजेचे आहे, याचा पाढा वाचला. पण कसचे काय अन कसचे काय! ह.मो.चे पत्रक त्याच्या स्वतःचा पराभवाची स्वतःच गायलेली नांदी ठरले. पुढच्या तीन अंकातही त्याचे चांगलेच तीन तेरा वाजले. वर्तमानपत्रातून, साहित्य वर्तुळातून, इतकेच काय एरव्ही साहित्य संमेलनाच्या निवडणुकीकडे दुर्लक्ष करणाऱ्या सर्वसामान्य वाचक आणि समाजातूनही ह.मो. ची चांगलीच हजामत झाली. सर्वच स्तरातून छी-थू व्हायला लागल्या नंतर ह. मो. ताळ्यावर आला. त्याने जाहीर माफी मागितली; परंतु तो पर्यंत वेळ निघून गेली होती. त्याची घाणीने भरलेली ''खुरे'' सगळ्यांना दिसली होती. त्यामुळे त्यावर कितीही रेशमी झुली घातल्या तरी ती झाकणार नव्हतीच! अखेर व्हायचे ते झालेच. ह .मो .ला फक्त १६४ भटांनी थारा दिला आणि कोत्तापल्ले सर ५८४ इतक्या दणदणीत मताधिक्याने विजयी झाले. जानव्याने दुसऱ्याचा गळा कापायला निघालेल्या या ''भिकम भटा''ला त्याच जानव्याची फाशी बसली.