Saturday 31 August 2013

।। आसारामायण ।।

।...( उत्तरगांड )…।

-रवींद्र तहकिक , मुख्य संपादक अपाविमं

 ओम नमोजी गध्या । काय चालवलंय सध्या । 
करोडोंच्या आराध्या । हरामखोरा ।।१।। 
लोक म्हणती तुजला बापू । तू तर निघाला खिसे कापू । 
सत्याचा आपलापू । केलास गा ।।२।।
कथा सांगतो रामाची । चाल खेळतो रावणाची । 
गर्दी जमवतो मुर्खांची ।त्यासी म्हणे सत्संग ।।३।। 
रंगांची खेळतो होळी ।करितो टेकरे खाली ।
प्रत्येक पोरगी साली । वाटते तुला ।।४।।।। . 
अकलेचे वाजले दिवाळे । साधुत्वाला फसले काळे । 
तुझ्याहून डोम कावळे । बरे बाबा ।।५।।
पाहून लहानग्या पोरी । नजर तुझी बावरी । 
पाहिजे रोज एक कोरी । डिमांड तुझी ।।६।।
अवदसा ही अशी । म्हातारपणी सुचली कशी । 
कशी शिंकली माशी । पाऊणशीत ।।७।।
कुणी म्हणती बापू थोर ।कुणी म्हणती बापू चोर ।
कुणी म्हणी बापू मोर । चहाटऴ ।।८।।
नाचताना मोर । दिसे मन विभोर । 
मागे मात्र त्याची थोर । गांड उघडी ।।९।।
तसेच झाले तुझे । पोथ्यांचे वाहिले ओझे । 
गुरूत्व तुझे वांझोटे । नराधमा ।।१०।। 
गाढवही गेले । ब्रम्हचर्यहि गेले । 
हाती काय उरले । सांग तुझ्या ।।११।।
तेलही गेले ।तूपही गेले ।
धुपाटणे हाती आले । भोसडीच्या  ।।१२।।
खाउन केळ नारळ । माजलास जसा पोळ ।
बुढाप्यात म्हतारचळ । सुक्काळीच्या ।।१३।।
साधूवर भरवसा ।ठेवावा आता कसा ।
घसरला असा कसा । फोकलीच्या ।।१४।।
वाटले जर वेगळा ।तुझा जीवन सोहळा । 
पण तुही निघाला बगळा । भाडखाऊ ।।१५।।
सांगती  महिला मुली । तुझी कसाब करणी ।
रोज हवी नवतरुणी । माय घाल्या ।।१६।।
कधी म्हणतो ती माझी नात । कधी म्हणतो बोलते वेडात । 
कोणत्या भ्रमात । आहेस भडव्या ।।१७ ।। 
भर सभेत नाचतो ।  पोरी कवेत आवळतो । 
रासलीला सांगतो  । अवचीन्द्या ।।१८।।
नाहीते केले धंदे ।त्यानेच झाले हे वांधे ।
आता नाकाने कांदे । सोलू  नको ।।१९।। 
पापाचा भरला घडा । आता तुरुंगात सडा । 
बरे झाले मादरचोदा । सापडलास ।।२०।।


Tuesday 27 August 2013

परुळेकर नाम रख लेने से कोई नानासाहब नही बन जाता..!

-राजा मइंद, संपादक मंडळ सदस्य, अपाविमं.

रणबीर कपूरच्या नव्या सिनेमाचे प्रोमोज सध्या टिव्हीवर दिसत आहेत. त्यातील एक डायलॉग भन्नाट आहे. रणबीर म्हणतो : "चुलबुल नाम रख लेने से कोई दबंग नही बन जाता." राजू परुळेकर यांच्या ब्लॉगवरील "डॉ. नरेंद दाभोलकरांना कुणी मारले?" हा लेख वाचल्यानंतर आम्हालाही असाच एक डायलॉग सूचला आहे. "परुळेकर नाम रख लेने से कोई नानासाहब नही बन जाता.. हा… हा…"   सकाळच्या संस्थापकांचे आडनावही परुळेकर होते. त्यांना लोक आदराने नानासाहेब म्हणत. पण केवळ आडनाव परुळेकर असले म्हणून कोणीही नानासाहेब होऊ शकत नाही. राजू भायला हे कोण सांगणार? राजू भायला उगागचच आपण नानासाहेब असल्याचा भास होतो. काही तरी भव्यदिव्य करण्याचा नाद त्यांना मग लागतो आणि त्यातून ते "डॉ. नरेंद्र दाभोलकरांना कुणी मारले?" यासांरखे लेख पाडून मोकळे होतात. 

डॉ. दाभोलकरांना कोणी मारले? डॉ. दाभोलकरांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांच्या मित्रपक्षाच्या सहकारी मंत्र्यांनी ठार मारले! सुपारी देऊन त्यांना गोळ्या घातल्या!! राजू परूळेकर यांनी हा शोध वर उल्लेख केलेल्या लेखात लावला आहे. राजू भाय यांच्या बुद्धिमत्तेला अपाविमंच्या वतीने सलाम. परुळेकरांनी शोधले आहे. परुळेकर या थिअरीबद्दल जबरदस्त कॉन्फिडंट आहेत. खून कटात सहभागी असलेली व्यक्तीच इतकी कॉन्फिडंट असू शकते! मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी खरोखरच डॉ. दाभोलकरांना मारले असेल, तर या कटात राजू परूळेकर नक्की सहभागी असणार, असे त्यांच्या लेखावरून दिसते. दाभोलकरांचे मारेकरी शोधण्यासाठी पोलिसांनी १९ पथके स्थापन केली आहेत, असे आम्ही ऐकतो. ही पथके तात्काळ माघारी बोलावून पोलिसांनी राजू परुळेकर यांना ताब्यात घ्यावे. ते कटाची इत्यंभूत माहिती देतील. पोलिसांचे कष्ट वाचतील आणि दाभोलकरांचे खूनीही अनायासे हाती लागतील.  आम के आम गुठलियों के दाम!

आम्ही मुख्यमंत्र्यांच्या जोडीने राजू परुळेकर यांचे संशयित म्हणून नाव घेत आहोत, त्याला मोठी पूर्वपीठिकाही आहे. आरएसएसने सर्व क्षेत्रात आपले एजंट घुसवून ठेवले आहेत. एकेका क्षेत्रात शेकडो एजंट काम करीत असतात. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक सुपर एजंट असतो. हा सुपर एजंट म्हणजे मुकादमच असतो. सर्व एजंटांच्या कामाचा लेखा जोखा त्याने ठेवायचा असतो. सुपर मुकादमाचे एकच कॉलिफिकेशन असते. तो जातीने ब्राह्मण असला पाहिजे. बास! (काही बिगर ब्राह्मण सुपर एजंटही आरएसएसकडे आहेत. पण त्यांना जात चोरून राहावे लागते.) राजू परुळेकर हे  पत्रकारितेतील आरएसएसचे सुपर एजंट आहेत. अनेक वर्षांपासून आरएसएसची मुकादमी ते पत्रकारितेत करीत आहेत. मागे आरएसएसने त्यांना अण्णा हजारे यांच्या मागे लावून दिले होते. अण्णांना राजू भायची ही मुकादमी माहित नव्हती. त्यामुळे अण्णांनी राजू भायला थेट आपल्या वतीने ब्लॉग लिहायचे काम दिले. तेथे अण्णांचे विचार लिहायचे सोडून राजू भाय संघ-दक्ष लिहायला लागले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर अण्णा दक्ष झाले. त्यांनी राजू भायला ‘फुल्या-फुल्या'वर लाथ हाणून हाकलून दिले. तेव्हापासून मग राजू भाय स्वत:च्या नावाने थेट आरएसएसची वकिली करू लागले आहेत. 

येथे काही वाचकांना प्रश्न पडू शकतो की, हे आरएसएस काय प्रकरण आहे? राजू परुळेकर आरएसएसचे सुपर एजंट असल्याने परुळेकर आणि मुख्यमंत्र्यांची हातमिळवणी कशी काय सिद्ध होऊ शकते? थोडे थांबा, राजू भाय यांनी मांडलेल्या सिद्धांताला पुरक असा आमचा सिद्धांत ऐका. ब्राह्मणांची, ब्राह्मणांसाठी, ब्राह्मणांकडून चालविली जाणारी संघटना म्हणजे आरएसएस होय! डॉ. दाभोलकरांनी तयार केलेल्या अंधश्रद्धा विरोधी कायद्यामुळे भोंदून खाणा-या ब्राह्मणांच्या पोटावरच पाय येणार होता. आरएसएसचे मुकादम या नात्याने ब्राह्मणांचे हीत जोपासणे हे राजू भायचे कामच होते. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांशी हात मिळवणी करून डॉ. दाभोलकरांच्या वधाचे पवित्र काम केले असावे, असे आम्हाला वाटते. 

शेवटी सुपर एजंट, मुकादम राजू भाय यांच्याच भाषेत आम्ही सांगू इच्छितो की, "… सत्य ह्याहून वेगळ असू शकत किंबहुना ते असायला हव अशी आपली आशा आहे. ते वेगळ असणार नाही अशी भीतीही आहे. दुर्दैवाने नाकर्तेपणाबद्दल सत्ताधा-यांचा राजीनामा घेणे तर सोडा मागणारेहि आज अंशमात्र अस्तित्वात राहिलेले नाहीत.…"

संबंधित लेख

अंधश्रद्धा निर्मुलन करणारा नव्हे, ब्राह्मणशाही माजविणारा कायदा!



Friday 23 August 2013

अंधश्रद्धा निर्मुलन करणारा नव्हे, ब्राह्मणशाही माजविणारा कायदा!

-राजा मइंद, संपादक मंडळ सदस्य, अपाविमं.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्य सरकारने अंधश्रद्धा विरोधी कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मूळ कायद्यातील महत्त्वाची कलमे रद्द करण्यात आल्यामुळे हा कायदा अंधश्रद्धेच्या विरोधातील कायदा ठरण्याऐवजी ब्राह्मणशाही माजविणारा कायदा ठरणार आहे. देवॠषी, वैदू, छु-छावाले यांची भोंदूगिरी या कायद्याने बंद होईल. ब्राह्मणांकडून होणारी भोंदूगिरी मात्र  निर्वेधपणे सुरू राहील. इतकेच नव्हे, तर ब्राह्मणांकडून होणा-या भोंदूगिरीला कायदेशीर संरक्षणही मिळेल.

'‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंधक कायदा'' असे या या कायद्याचे मूळ नाव आहे. हा कायदा अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेच शिवसेना-भाजपा सरकारच्या काळात राज्य सरकारला सादर केला होता. तेव्हापासून तो पडून होता. 
अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे मूळ विधेयक आणि २०११ साली सरकारने विधिमंडळात सादर केलेले सुधारित विधेयक यात फरक आहे. मूळ विधेयक १३ कलमांचे होते. सुधारित विधेयकात ११ कलमे आहेत. कलम ५ आणि कलम १३ काढून टाकण्यात आले आहे. कलम ५ मध्ये धार्मिक ट्रस्टसंबंधी काही जाचक तरतुदी होत्या. तर कलम १३ मध्ये ब्राह्मणांच्या भोंदुगिरीवर थेट पाय पडेल, अशी तरतूद होती. या दोन्ही तरतुदी काढल्यानंतर हे विधेयक आता एकांगी आणि एकतर्फी झाले आहे. कनिष्ठ जातीतील प्रथा आणि परंपरा या विधेयकामुळे बेकायदेशीर ठरल्या आहेत. त्याच वेळी ब्राह्मणांच्या हस्ते पार पाडल्या प्रथा आणि परंपरा मात्र श्रद्धेच्या कक्षेत आल्या आहेत. वारक-यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ब्राह्मणी संघटनांनी केलेल्या आंदोलनाचे फळ त्यांना मिळाले आहे. 

काय होते कलम १३?
या कायद्यात अंधश्रद्धा म्हणजे काय याचा खुलासा करणारे एक स्वतंत्र कलम आहे. तसेच या अंधश्रद्धांसाठी शिक्षा सांगितल्या आहेत. ही कलमे कोणाला लागू आहेत आणि कोणाला लागू नाहीत, याचा खुलासा कलम १३ मध्ये करण्यात आला होता. कलम १३ मध्ये एक तरतूद खालील प्रमाणे होती : 
‘‘ शंका दूर करण्यासाठी याद्वारे असे घोषित करण्यात येते की, ज्यामुळे कोणत्याही व्यक्तीला शारिरिक व आर्थिक बाधा पोहचत नाही, असे कोणतेही धार्मिक विधी व धार्मिक कृत्ये अंतर्भूत असलेल्या कृतींना या अधिनियमातील कोणतीही गोष्ट लागू होणार नाही.''
ज्या विधिने नागरिकास शारिरिक किंवा आर्थिक झळ पोहोचविणारे विधि करणे या कायद्यानुसार बेकायदेशीर होते, असा वरील तरतुदीचा स्पष्ट अर्थ आहे.  ब्राह्मणांमार्फत केले जाणारे कोणतेही विधि हे दक्षिणा घेतल्याशिवाय होत नाहीत. याचाच दुसरा अर्थ असा की, ब्राह्मणांना दक्षिणा घेण्यावर या कायद्याने बंदी येणार होती. तथापि, आता १३ वे कलमच या कायद्यातून काढून टाकले गेले असल्यामुळे ब्राह्मणांना दक्षिणा घेण्याचा तसेच धर्माची, ग्रहता-यांची भिती घालून नागरिकांची लुट करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ब्राह्मणांकडून करण्यात येणा-या लुबाडणुकीला आळा घालणारी एकमेव तरतूद या कायद्यातून वगळण्यात आल्यामुळे हा कायदा आता ब्राह्मणांसाठी फायद्याचा ठरणार आहे. 

ब्राह्मणांची ती श्रद्धा बहुजनांची मात्र अंधश्रद्धा
कनिष्ठ जातीत पाळल्या जाणाèया प्रथा अंधश्रद्धा तर ब्राह्मणांच्या मार्फत पाळल्या जाणा-या प्रथा श्रद्धा असा सरळ भेद नव्या कायद्याने केला गेला आहे. हा मुद्दा आपण उदाहरणाने समजून घेऊ या. ''.. मरिआईचा प्रसाद खाल्ला नाही, तर तुझे तळपट होईल. तुझा सर्व धंदा बसेल!'' अशी भीती कोणी घातलीच तर या कायद्याने ती अंधश्रद्धा ठरून भीती घालणारास शिक्षा होईल. मात्र, ''... सत्य नारायणाचा प्रसाद खाल्ला नाही, म्हणून साधू वाण्याची नौका बुडाली. त्याचे तळपट झाले...'' हे सांगणे या कायद्यानुसार अंधश्रद्धा ठरणार नाही. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नागाची पुजा केली जाते. नागाचा कोप झाला म्हणून देवॠषांमार्फत विधी केले जातात. हे प्रकार नव्या कायद्यानुसार बेकायदेशीर ठरतील. मात्र, नाशिकला त्र्यंबकेश्वरला जाऊन ब्राह्मणांच्या हस्ते नारायण नागबळी केल्यास बेकायदेशीर ठरणार नाही. देवॠषाकडे विधी केल्यास येणारा खर्च शे-दोनशे रुपयांचा असतो. त्र्यंबकेश्वरला नारायण नागबळी करण्याचा खर्च साधारण २५ हजार असतो. नारायण नागबळी  हा विधि फक्त ब्राह्मणांच्याच हस्ते केला जातो. 

अंधश्रद्धा निर्मूलनाचा नवा कायदा बहुजन समाजातील भोंदुगिरीला बंदी घालून ब्राह्मणांच्या भोंदूगिरीला प्रोत्साहन देणार आहे, एवढाच या चर्चेचा निष्कर्ष आहे. नरेंद्र दाभोळकर यांच्या मृत्यूमुळे निर्माण झालेल्या धांदलीच्या परिस्थितीचा फायदा घेऊन ब्राह्मणांशाही माजविणारा कायदा राज्यात निर्माण होत आहे. त्यामुळे जरा सावधान.

संबंधित लेख
परुळेकर नाम रख लेने से कोई नानासाहब नही बन जाता..!

Thursday 22 August 2013

जप अनुष्ठाने स्त्रिया मुले होती


महात्मा फुले यांचे अखंड

जप अनुष्ठाने स्त्रिया मुले होती । दुजा का करिसी । मुलांसाठी ।।१।।
भट ब्राह्मणांत बहु स्त्रिया वांझ । अनुष्ठानी बीज । नाही का रे ।।२।।
अनुष्ठानावीण विध्वा मुले देती । मारूनी टाकिती सांदी कोनी ।।३।।
ज्याची जशी कर्मे तशी फळा येती । शिक्षा ती भोगिती । जोती म्हणे ।।४।।

भावार्थ :
जप आणि अनुष्ठान केल्याने मुले होतात, असा प्रचार ब्राह्मण करतात. जपानुष्ठाने मुले झाली असती, तर मग मुले होण्यासाठी इतर कोणताही उद्योग करण्याची गरजच राहिली नसती. मुले होण्यासाठी भट-ब्राह्मण बहुजन समाजाला जपानुष्ठाने करायला सांगतात, मात्र खुद्द ब्राह्मणांच्याच अनेक स्त्रिया वांझ आहेत. ब्राह्मण स्त्रियांना अनुष्ठानातून बीज का नाही मिळत. कोणत्याही प्रकारची अनुष्ठाने न करता ब्राह्मणांच्या विधवा स्त्रियांना मुले होतात. मग त्या स्त्रिया अशा मुलांना गुपचूप मारून टाकतात. ज्याची जशी कर्मे आहेत, तशी फळे त्याला मिळतात. वाईट कामांची शिक्षा भोगावी लागते, असे जोती म्हणतात.

कठीण शब्दांचे अर्थ :
बहु : फार
बीज : बी, वीर्य
विध्वा : विधवा.
सांदी : घरातील अंधारी जागा.
कोनी : कोनाड्यात.

भट करिताती द्रव्य लूट

महात्मा फुले यांचे अखंड

प्राणीमात्रा सोई सुख करण्यास । निर्मी पर्जन्यास । नद्यांसह ।।१।।
त्यांचे सर्व पाणी वेगाने वाहती । आर्ये कुरापती । तीर्थे केली ।।२।।
दाढी डोई वेण्या मुढ भादरिती । भट करिताती । द्रव्य लूट ।।३।।
आर्यांनी कल्पिली थोतांडे ही सारी । दगे सर्वोपरी । जोती म्हणे ।।४।।

भावार्थ :
सर्व प्राणिमात्रांस सुखी करण्याच्या उद्देशाने इश्वराने पाऊस आणि नद्यांची निर्मिती केली आहे. नद्यांचे पाणी वेगाने वाहत असते. त्यात आर्यांनी म्हणजेच ब्राह्मणांनी कुरापती काढून (नदीकाठांवर) तीर्थे निर्माण केली. या तीर्थांवर मुर्ख लोक दाढ्या, डोकी, वेण्या भादरतात आणि त्याच्या माध्यमातून भट ब्राह्मण पैशांनी लुबाडणूक करतात. आर्यांनी म्हणजेच ब्राह्मणांनी ही सर्व थोतांडे निर्माण केली आहेत. ही सर्व धोकेबाजी आहे, से जोती म्हणतात.

कठीण शब्दांचे अर्थ :
पर्जन्य : पाऊस.
डोई : डोके
मुढ : मुर्ख
भारदरणे : केस कापणे
दगे : दगा या शब्दाचे अनेक वचन. दगा म्हणजे धोका.

सर्वांचा निर्मिक आहे एक धनी


महात्मा फुले यांचे अखंड

सर्वांचा निर्मिक आहे एक धनी । त्यांचे भय मनी । धरा सर्व ।।१।।
न्यायाने वस्तूंचा उपभोग घ्यावा । आंनद करावा । भांडू नये ।।२।।
धर्मराज्य भेद मानवा नसावे । सत्याने वर्तावे । इशासाठी ।।३।।
सर्व सुखी व्हावे भिक्षा मी मागतो । आर्यांस सांगतो । जोती म्हणे ।।४।।

भावार्थ :
सर्वांचा निर्माण करता मालक एकच आहे. त्याचे भय सर्वांनी मनात धरावे. न्यायाने वस्तूंचा उपभोग घ्यावा. आनंदाने राहावे. भांडण करू नये. धर्माच्या नावाखाली माणसांत भेदभाव नसावा. इश्वरासाठी सत्याने वर्तन करावे. सर्वांनी सुखी व्हावे यासाठी मी भिक्षा मागतो. हा सर्व उपदेश आर्यांसाठी म्हणजेच ब्राह्मणांसाठी आहे, असे जोती म्हणतात. 

कठीण शब्दांचे अर्थ :
धनी : मालक
इश : इश्वर
आर्य : ब्राह्मण

Monday 19 August 2013

धोंडो केशव कर्वे यांचा जातीय अहंगंड

कर्वे यांच्या आश्रमात होत्या फक्त ब्राह्मण मुली

-राजा मइंद, संपादक मंडळ सदस्य, अपाविमं.

महाराष्ट्रातील स्त्रिशिक्षणाची मूहुर्तमेढ महात्मा फुले यांनी रोवली. फुल्यांचे हे कार्य धोंडो केशव कर्वे यांनी पुढे नेले. १९५८ साली धोंडो केशव कर्वे यांना भारत सरकारने भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले. असे असले तरी महात्मा फुले आणि कर्वे यांच्या कामात मूलभूत फरक होता. फुल्यांचे कार्य जातीनिरपेक्ष होते, तर कर्वे यांचे कार्य जातीधिष्ठित होते. कर्वे हे जातीने ब्राह्मण होते. त्यांनी आपल्या आश्रमात केवळ ब्राह्मणांच्या विधवा आणि परित्यक्ता मुलींना शिक्षण दिले. महर्षि विठ्ठल रामजी शिंदे  यांना धोंडो केशव कर्वे यांच्या ब्राह्मणी  जातीयवादाचा कडू अनुभव आला होता. आपल्या आत्मचरित्रात महर्षि शिंदे यांनी या कडू आठवणी लिहून ठेवल्या आहेत.

सासर तुटलेली आपली बहीण जनाक्का हिला शिक्षण मिळावे यासाठी महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांना त्या काळी प्रचंड यातायात करावी लागली. पंडिता रमाबाई यांनी जनाक्काला आपल्या शारदा सदनात प्रवेश नाकारल्यानंतर महर्षि शिंदे यांनी अन्यत्र कोठे व्यवस्था होऊ शकते का, याचा तपास सुरू केला. १८९५ साली महर्षि शिंदे पुण्यात आले होते. त्याच्या पुढच्याच वर्षी १८९६ साली धोंडो केशव कर्वे यांनी पुण्याजवळ हिंगणे या गावात बालिका आश्रम स्थापन केला होता. विधवा आणि परित्यक्ता मुलींना आश्रय आणि शिक्षण देणे, असा कर्वे यांच्या बालिका आश्रमाचा उद्देश होता. कर्वे यांना पुण्यातच आश्रम सुरू करावयाचा होता. तथापि, पुण्यातील सनातनी ब्राह्मणांनी त्यांच्या कार्यात खोडे घातले. स्त्रियांना शिक्षण देणे हे मनुस्मृतींच्या विरोधात असल्याचे सांगून ब्राह्मण कर्वे यांच्या कार्याला विरोध करीत होते.

ब्राह्मणतेरांच्या मुलींना घेण्याचा हा काळ नाही!
कर्वे यांच्या  आश्रमाची माहिती महर्षि शिंदे यांना कळाली. महर्षि शिंदे हे सुधारकी बाण्याचे होते. कर्वे यांच्या कामाबाबत महर्षि शिंदे यांना आस्था वाटली. जनाक्काला कर्वे यांच्या आश्रमात टाकावे आणि झालेच तर आश्रमासाठी काही कामही करावे, असा दुहेरी हेतू मनात ठेवून महर्षि शिंदे हिंगण्याला गेले. कर्वे यांचा आश्रम नुकताच कुठे सुरू झालेला होता. कर्वे यांना आण्णासाहेब म्हटले जाई. त्यांच्या भेटीचा वृत्तांत महर्षि शिंदे यांनी तपशिलाने लिहिला आहे. महर्षि शिंदे लिहितात :
‘‘...शेणामातीने सारवलेल्या कुडाच्या भिंतीच्या एका खोपटात प्रो. आण्णासाहेब जमिनीवर बसले होते. त्यांच्या आश्रमात ब्राह्मण जातीच्या १०-१५ विधवा मुली होत्या. माझ्या बहिणीस आपल्या आश्रमात घेता का, ह्या माझ्या प्रश्नाला ‘ब्राह्मणतेरांच्या मुलींना घेण्याचा हा काळ नाही' असे प्रो. आण्णासाहेबांनी सांगितले व माझ्या बहिणीस आश्रमात घेण्याचे साफ नाकारले. त्यामुळे माझी फारच निराशा झाली. तत्कालिन महाराष्ट्रात एक सुधारणा करताना दुस-या सुधारणेला कसा अडथळा येई ह्याचे हे उदाहरणच आहे...''

धोंडो केशव कर्वे यांच्या आश्रमात ज्या काही १०-१५ मुली होत्या त्या सर्व ब्राह्मणांच्याच होत्या. इतर जातीतील मुलींना कर्वे आपल्या आश्रमात प्रवेश देत नसत, हे कडू वास्तव महर्षि शिंदे यांना अनुभवायला आले. सुधारकांनाही जातीची बंधने तोडणे योग्य वाटत नव्हते. हा सारा प्रकार पाहून महर्षि शिंदे कमालीचे व्यथित झाले.

ख्रिस्ती शाळेने दिला जनाक्काला प्रवेश
आधी पंडिता रमाबाई आणि नंतर धोंडो केशव कर्वे यांनी जनाक्काला आपल्या आश्रमात ठेवून घेण्यास नकार दिला. पण महर्षि शिंदे  हरणा-यांपैकी नव्हते. जनाक्काला शिकवायचेच, असा निश्चय त्यांनी केला होता. पुढे त्यांनी जनाक्काला पुण्यातील प्रसिद्ध हुजूरपागेतील मुलींच्या हायस्कुलात घातले. ही शाळा ख्रिस्ती होती. मिस हरफर्ड नावाची एक युरोपियन बाई शाळेची हेडामास्तरीण होती. ख्रिस्ती शाळांत कोणताही जातीभेद पाळला जात नसे. येथे जनाक्काला सहजपणे प्रवेश मिळाला. जनाक्काची शाळा सुरू झाली, पण फीसचा प्रश्न निर्माण झाला. या शाळेत मिस मेरी भोर नावाची एक हुशार ख्रिस्ती बाई शिक्षकीण होती. त्यांनी हेडमास्तरीण बार्इंना सांगून स्कॉलरशिपसाठी प्रयत्न केले. जनाक्काला संस्थान मुधोळच्या राजेसाहेबांकडून दरमहा १० रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर झाली.

आणि अशा प्रकारे जनाक्काच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला.

संदर्भ :
माझ्या आठवणी व अनुभव
लेखक : महर्षि विठ्ठल रामजी शिंदे
प्रकरण : इंटरमिजिएटचे वर्ष







Sunday 18 August 2013

जनाक्काच्या शिक्षणासाठी महर्षि शिंदे यांची धडपड

-राजा मइंद, संपादक मंडळ सदस्य, अपाविमं.

गोष्ट आहे १८९५-९६च्या आसपासची. महर्षि विठ्ठल रामजी शिंदे पुण्यात सदाशिव पेठेत राहत होते. नागनाथाच्या पाराजवळ एका जुन्या वाड्यात त्यांच्या कुटुंबाचे बि-हाड होते. मातोश्री, बहीण जनाक्का आणि स्वत: महर्षि असे तिघांचे हे कुटुंब. सासरच्या जाचामुळे जनाक्का कायमची माहेरी आली होती. त्या काळी अल्पवयात लग्ने होत. जनाक्काचे वय शिकण्याचे होते. महर्षि शिंदे यांनी जनाक्काला शाळेत घालण्याचा निर्णय घेतला. सदाशिव पेठेत चिमण्या गणपतीजवळ एका ख्रिस्ती मिशन-यांच्या शाळेत त्यांनी तिला पहिल्यांदा घातले. सांगले नावाच्या हेडमास्तरीण बाई होत्या. त्यांनी शिंदे यांना सहकार्य केले.

राजवट इंग्रजांची होती. फुकट शिक्षण मिळत नसे. फीस भरणे परवडणारे नव्हते. महर्षि शिंदे यांनी कुठे सोय होते का याचा शोध चालविला. पंडिता रमाबाई यांच्या शारदा सदन या संस्थेचे नाव त्यांच्या समोर आल्या. पंडिता रमाबाई या मूळच्या चित्पावन ब्राह्मण होत्या. त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारून धर्मप्रसाराचे काम पुण्यात नेटाने सुरू केले होते. धर्मप्रसाराला समाज सेवेचा बुरखा पांघरलेला होता, इतकेच. महर्षि शिंदे पंडिता रमाबाई यांना भेटायला गेले. महर्षि शिंदे खेड्यातून आलेले. त्यांचा बावळा वेष पाहून बाईंनी अटींचा पाश आवळला. मुलीला आश्रमात ठेवते पण पाच वर्षे तुम्हाला तिला भेटता येणार नाही, अशी एक कडक अट त्यात होती. तुम्ही तिच्या शिक्षणात अडथळा आणाल म्हणून ही अट असल्याचे बाई म्हणाल्या. महर्षि शिंदे वस्ताद होते. ते म्हणाले, अहो बाई, मीच तिला शिक्षणासाठी तुमच्याकडे घेऊन आलो आहे. तिच्या शिक्षणात अडथळे आणायचे असते, तर तिला तुमच्याकडे घेऊन आलोच असतो कशाला? तिचे धर्मांतर करण्यात माझा अडथळा नको, म्हणून तुम्ही ही अट घातली हे उघड आहे.

बावळ्या दिसणा-या २०-२२ वर्षांच्या तरुणाच्या तोंडून अशी हुशारीची वाक्ये ऐकून बाई चमकल्या. त्यांनी अधिक चौकशी केली. हा मुलगा फर्ग्युसन कॉलेजात शिकलेला आहे, हे ऐकल्यानंतर बाई बदलल्या. फर्ग्युसन कॉलेजातील  प्रोफेसर मंडळी नास्तिक आहेत, असा शेरा मारून बार्इंनी जनाक्काला शारदा सदनमध्ये प्रवेश नाकारला.


संबधित लेख :
आगरकर यांचा मराठा द्वेष
महर्षि शिंदे यांचा नि:पक्षपातीपणा



Tuesday 13 August 2013

वेदातील लैंगिक अंधश्रद्धा

हा धर्म आहे की अधर्म!

-राजा मइंद, संपादक मंडळ सदस्य, अपाविमं.


प्राचीन काळी यज्ञ केले जात. त्यात विविध प्राण्यांचा बळी दिला जाई. अश्वमेध यज्ञात घोड्याचा बळी दिला जात असे. हा यज्ञ केल्याने वीर्यवान संतती निर्माण होते, अशी आर्याची समजूत होती. अश्वमेध यज्ञाच्या प्रसंगी केल्या जाणा-या विधीवरून असे लक्षात येते की, आर्यांमध्ये अनेक लैंगिक अंधश्रद्धा होत्या. मृत घोड्याच्या लिन्गाला वेगळे काढूनही काही विधी अश्वमेध यज्ञात केले जात. हा साराच प्रकार बीभत्स वाटेल, अशा पातळीवरचा आहे. वि. का. राजवाडे यांच्या ‘भारतीय विवाह संस्थेचा इतिहास' या पुस्तकात अश्वमेध यज्ञातील घोड्याच्या लिन्गाच्या विधीचे वर्णन आले आहे. या पुस्तकातील चौथ्या प्रकरणात हे वर्णन आहे. ‘अग्नी व यज्ञ' असे या प्रकरणाचे शीर्षक आहे. यजुर्वेदातील मंत्रांच्या आधारे राजवाडे यांनी आपले संपूर्ण विवेचन केले आहे.

यजुर्वेदाच्या दोन संहिता आहेत. १. कृष्ण यजुर्वेद २. शुक्ल यजुर्वेद. या दोन्ही संहितात अश्वमेध यज्ञविधी प्रसंगी करावयाच्या नाटकाचे वर्णन आहे. या पैकी कृष्ण यजुर्वेदातील पाठ आपण येथे पाहू या. वि. का. राजवाडे लिहितात (कंसात अपरिचित संस्कृत शब्दांचे अर्थ आम्ही दिले आहेत.) :
".... साम्राज्य, राष्ट्र, संपत्ती व वीर्यशाली प्रजा प्राप्त व्हावी एतदर्थ अश्वमेध यज्ञ करण्याचा प्रघात असे. यज्ञात स्त्रीपुरूष असा सर्व प्रकारचा समाज जमे. अध्वर्यु, उद्गातृ, होता असे ॠत्विज पुरूष असत. व महिषी, यजमान-पत्नी इत्यादि स्त्रिया असत. पैकी वीर्यशाली प्रजा उत्पन्न व्हावी या कामनेच्या सिद्धयर्थ खालील नाटक केले जात असे. अश्वमेधातील घोडा मृत होऊन पडल्यावर तेथे राजपत्न्यांना बोलावून आणीत. राजपत्न्यांपैकी मुख्य जी पट्टराणी ती आपल्या आईला किंवा सपत्न्यांना (सवतींना) उद्देशून म्हणे की, बायांनो, हा मेला घोडाच माझ्याशी निजेल; कारण, मला अभिगमनार्थ (संभोगाकरिता) दुसरा कोणीच की गे नेत नाही. 
पट्टराणीची ही तक्रार ऐकून, घोडा खडखडून जागा होतो व पट्टराणीला म्हणतो, ये येथे हे क्षौमवस्त्र म्हणजे सोवळ्याचे वस्त्र अंगावर घेऊन आपण निजू. त्याला रूकार (होकार) देऊन पट्टराणी म्हणते, मी तुजपाशी गर्भधारणार्थ आले, तूही मजकडे गर्भ पेरण्यास ये, आपण पाय पसरून निजू. 
घोडा आणि पट्टराणी ही एकमेकांशेजारी पडल्यावर प्रतिप्रस्थाता म्हणतो की, हा घोडा रेत:सिंचन करो व तुझी योनी रेतोधारण करो. असा मंत्र म्हणून, ॠत्विज घोड्याचे qलग राणीच्या योनीजवळ आणी, आणि म्हणे की, मांडीवर मांडी ठेव, आणि qलग योनीत घाल. स्त्रियांना qलग जीव की प्राण आहे. लिंग  भोकाला झवते, ते स्त्रियांना प्रिय असते; कारण ते योनी कुटते, आणि स्त्रियांच्या काळ्या भोकातील दाण्याला हाणते. 
हे नाटक झाल्यावर राणी म्हणते, बायांनो, मला कोणीच झवत नाही, सबब हा घोडा मजपाशी निजतो. त्यावर इतर स्त्रिया म्हणतात, रानात फाट्यांचा भारा उचलताना ढुंगण जसे पुढे करतात तशी तू आपली योनी पुढे उचल व तिचा मधला भाग वाढव.
हे सर्व पट्टराणीने केले, तेव्हा घोडा निजला. मग राणी इतर बायांना पुन्हा म्हणाली, बायांनो, मला कोणीच झवत नाही. सबब मी घोड्याजवळ निजत्ये. त्यावर एका बाईने खालील टीका केली : हरणी रोजचे रानातले गवत टाकून शेतातले चोरून जव खाते, परंतु त्याने तिचे पोट भरलेले तिला वाटत नाही. शूद्र स्त्री वैश्याशी रमते, परंतु त्या रमण्याने तिचे समाधान होत नाही.
 ह्या टीकेला राणी उत्तर देते की, घोडा माझ्याशी संग करतो, त्याचे कारण एवढे की, दुसरे कोणीच मला झवत नाही. त्यावर दुसरी एक स्त्री टीका करते की, तुझी ही योनी एखाद्या पाखरिणीसारखी हुळहुळून हलते आहे. तिच्यात रेत पडले आहे व ती गुलगुल वाजत आहे. मग तक्रारीला जागा कोठे राहिली? 
ह्याही टीकेला राणी उत्तर करते की, तक्रार करू नको तर काय करू? मला कोणीच पुरूष झवत नाही. सबब मी घोड्यापाशी जात्ये. 
यावर तिसरी एक म्हणते, तुला घोडा सापडला हे नशीबच समज. तुझ्या आईला तोही लाभला नाही. तुझी आई व तुझा बाप झाडावर चढत आणि नंतर तुझा बाप, योनी सोलून काढितो म्हणून, तुझ्या आईच्या योनीत आपल्या हाताची मूठच ठाशी. त्याहून घोडा बरा नव्हे?
तैत्तिरीय संहितेतील मंत्राचा तपशील हा असा आहे......." 
वि. का. राजवाडे यांनी वर जे काही लिहिले आहे, ते वाचल्यानंतर वेद काळात धर्माच्या नावाखाली काय सुरू होते याची स्पष्ट कल्पना येते. आज काही लोक वेदांकडे चला अशी हाक देताना दिसतात. वेदांमधील मूळ धर्म पुन्हा प्रस्थापित करण्याची भाषा केली जाते. हा धर्म पुन्हा स्थापन झाल्यास काय होऊ शकते, याची नुसती कल्पनाच करून पाहा.

वि. का. राजवाडे यांच्या पुस्तकातील  वरील उता-याची फोटो कॉपी खाली देत आहे :



वि. का. राजवाडे यांच्या या पुस्तकात इतरही अनेक भयंकर गोष्टींचे वर्णन आहे. जिज्ञासू वाचकांनी हे पुस्तक अवश्य वाचायला हवे. हे पुस्तक नेटवर उपलब्ध आहे.

भारतीय विवाह संस्थेचा इतिहास हे पुस्तक येथे क्लिक केल्यास वाचता येईल.


संबंधित इतर लेख



  • वेदांची चिकित्सा का होऊ शकली नाही?
  • वैदिक लोक : अग्नीचा शोध लागलेले आदिमानव
  • गोमांस भक्षक वैदिक ब्राह्मण!
  • मधुपर्क म्हणजे गोमांसाचे सूप
  • अनुस्तरणीकर्म : गाय कापून अंत्यसंस्कार !


  • श्रीकृष्ण : वेदांना विरोध करणारा पहिला महापुरुष
  • ब्रह्मदेवाची फटफजिती
  • गीतेतला वेदविरोध
  • वैदिक धर्म बडविण्यात बौद्ध-जैनांचे योगदान


  • Sunday 11 August 2013

    संजय सोनवणीच का निवडून यायला हवेत?

    ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निवडणुकीसाठी सोनवणी यांना 'अपाविमं'चा पाठींबा


    -राजा मइंद, संपादक मंडळ सदस्य, अपाविमं.

    ज्येष्ठ साहित्यिक आणि ब्लॉगर श्री. संजय सोनवणी यांनी सासवड येथे भरणा-या ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अनिता पाटील विचार मंचच्या वतीने आम्ही त्यांना पाठींबा देत आहोत. श्री. सोनवणी यांच्याशी ‘अपाविमं'चे अनेक मुद्यांवर मतभेद आहेत. मात्र, त्याचबरोबर अनेक मुद्यांवर सहमतीही ओह. सहमतीच्या याच मुद्यांच्या आधारे आम्ही त्यांना जाहीर पाठींबा देत आहोत. नुसताच पाठींबा देत नसून, संजय सोनवणी हेच या निवडणुकीत विजयी व्हायला हवेत, अशी आमची ठाम भूमिका आहे. अपाविमंच्या हजारो वाचकांच्या वतीने संजय सोनवणी यांना विजयी होण्यासाठी लाख लाख शुभेच्छा.

    ही निवडणूक श्री. सोनवणी यांनीच का जिंकायला हवी, याची काही ठोस कारणे आहेत. अशी एकूण १० कारणे आम्हाला दिसतात. अपाविमंच्या वाचकांसाठी ती खाली देत आहोत.

    १. श्री. सोनवणी हे ‘बहुजन' हा विचार घेऊन लिहिणारे आणि लढणारे असे एकमेव साहित्यिक आहेत.

    २. वैयक्ति स्वार्थासाठी बहुजन हा विचार त्यांनी कधी लपविला नाही. हा विचार त्यांनी ठोस भूमिका घेऊन जाहीरपणे मांडला. अशी भूमिका घेणारे ते एकमेव साहित्यिक आहेत.

    ३. श्री. सोनवणी यांनी बहुजन विचार सोडून ब्राह्मणवादाला पुरक भूमिका घेतली असती, तर आज मराठी साहित्य क्षेत्रातील सर्वांत थोर साहित्यिक म्हणून ब्राह्मणी मीडियाने त्यांचा उदोउदो केला असता. त्यांना मखरातच बसविले असते. पण असल्या कोत्या स्वार्थासाठी त्यांनी आपली मूळ भूमिका सोडली नाही. भूमिकांच्या बाबतीतला हा ठामपणा आजच्या स्वार्थलोलूप जगात लाख मोलाचा आहे, असे अपाविमंला वाटते.

    ४. श्री. संजय सोनवणी बहुजनवादी आहेत, म्हणून त्यांना या निवडणुकीत विजय मिळाला पाहिजे, असे नव्हे. असे कोणी म्हणत असेल, तर त्याला श्री. सोनवणी यांच्या विषयी कोणतीही माहिती नाही, असे आम्ही मानू. बहुजनवादी असण्याच्या आधी सोनवणी हे थोर लेखक आणि संशोधक आहेत.  त्यांनी ललित साहित्याचे कथा, कविता, कादंबरी असे सर्व प्रकार हातळले आहेत. त्यांच्या अनेक कादंब-यांनी खपाचे विक्रम केले आहेत. थोर-थोर म्हटल्या जाणा-या बहुतांश लेखकांच्या पुस्तकांना कुत्रे विचारत नसताना सोनवणी यांची पुस्तके आवृत्त्यांमागून आवृत्या काढीत आहेत.

    ५. श्री. संजय सोनवणी यांनी इतिहासाच्या क्षेत्रात अत्यंत मूलगामी लिखाण केले आहे. प्रत्येक ऐतिहासिक महापुरूषाच्या पाठीशी ब्राह्मण गुरूचे झेंगट लावून देणा-या बोगस इतिहास लेखकांचा त्यांनी पर्दाफाश केला. आपला हा विचार त्यांनी निर्भयपणे मांडला.

    ६. भाषाशास्त्राच्या क्षेत्रातही श्री. सोनवणी यांचे काम अद्वितीय आहे. मराठी आणि संस्कृत या दोन स्वतंत्र भाषा आहेत, हा विचार श्री. सोनवणी यांनी पहिल्यांदा दिला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची जी प्रक्रिया सध्या सुरू आहे, तिच्या मुळाशी हाच विचार आहे. यावरू श्री. सोनवणी यांच्या विचाराचे मोल लक्षात यावे.

    ७. श्री. संजय सोनवणी यांचा तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास आहे. त्यांनी तत्त्वचिंतनपर विपूल लेखन केले आहे.


    ८. आजपर्यंत ८६ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने झाली आहेत. यातील अगदी मोजके अपवाद वगळता सर्व संमेलनांचे अध्यक्ष हे या ना त्या कारणाने ब्राह्मणवादाला पूरक भूमिका घेऊन लेखन करत होते. ब्राह्मणवाद पूर्णत: नाकारण्याचे धाडस कोणीही केलेले नव्हते. श्री. सोनवणी निवडून आल्यास ब्राह्मणवादाला संपूर्ण नकार देणारा पहिलाच संमेलनाध्यक्ष मराठीला मिळेल.


    ९. श्री. सोनवणी हे सर्वार्थाने २१ व्या शतकातील लेखक आहेत. ऑनलाईन मराठी लेखनातील त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांचा ब्लॉग विशेष वाचकप्रिय आहे. श्री. सोनवणी विजयी झाल्यास पूर्ण वेळ ब्लॉगर असलेला पहिला संमेलनाध्यक्ष मराठीला मिळेल.

    १०. महाराष्ट्राच्या सर्व विभागातील तसेच बृहन्महाराष्ट्रातील साहित्य परिषदा ताब्यात ठेवणा-या लोकांशी श्री. सोनवणी यांचे कोणतेही लागेबांधे नाहीत. त्यामुळेच सोनवणी यांचा विजय पहिला नि:पक्ष विजय ठरेल.

    श्री. संजय सोनवणी यांना निवडणुकीसाठी पुन:श्च शुभेच्छा.

    Friday 9 August 2013

    आरएसएसवाल्यांचा मुस्लिम टोपीशी दोस्ताना!


    सत्ता मिळविण्यासाठी हिन्दू आणि मुसलमान यांच्यात तेढ निर्माण करणारे आरएसएस आणि भाजपाचे नेते प्रत्यक्षात कसे ढोंगी आहेत, हे वारंवार सिद्ध होत आले आहे. मध्यप्रदेशात मुस्लिम मदरशांत गीतेचा अभ्यास सक्तीचा करणारे तेथील मुख्यमंत्री शिवराजसिन्ग चौहान यांनी इद-उल फित्रच्या दिवशी चक्क मुस्लिमांची स्कल कॅप घालून स्वत:ला मुस्लिमांमध्ये मिरवून घेतले. मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथे शुक्रवार दि. ९ ऑगस्ट २०१३ रोजी हे छायाचित्र टिपले आहे. चौहान ज्या भाजपाचे नेते आहेत, त्याच भाजपाने १९९३ साली अयोध्येतील बाबरी मशिद पाडून देशात धार्मिक दंगली घडवून आणल्या होत्या. याच पक्षाचे पंतप्रधान पदाचे संभाव्य उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्ये ३ हजारपेक्षा जास्त मुस्लिमांची कत्तल घडविण्यात आली होती. तुम्ही आपसात लढा आम्ही मस्त सत्ता भोगतो, असेच आरएसएस आणि भाजपाचे धोरण आहे, हेच यावरून सिद्ध होते.

    जातीबाहेर लग्न करणे २ हजार वर्षांपूर्वी झाले बंद

    अमेरिकेचे हॉर्वर्ड विद्यापीठ आणि हैदराबादेतील सेंटर फॉर सेल्यूलर अँड मॉलेक्यूलर बायलॉजी यांनी एका संयुक्त प्रकल्पाद्वारे भारतातील ७३ जाती समूहांचा वांशिक अभ्यास केला. या अभ्यासाचे निष्कर्ष ‘अमेरिकन जर्नल ऑफ ह्युमन जेनेटिक्स' या नियतकालिकाच्या ८ ऑगस्ट २०१३ च्या अंकात प्रसिद्ध झाले आहेत. हे निष्कर्ष भारतातील जातीव्यवस्था आणि वर्णसंस्था यांविषयीच्या परंपरागत धारणांना धक्क देणारे आहेत. 
    या अभ्यासाचा थोडक्यात गोषवारा असा :

    १. चार हजार वर्षांपूर्वीच्या आधी पर्यंत भारतात दोन स्वतंत्र वांशिक समूह अस्तित्वात होते. 
    • उत्तर भारतात राहणा-या लोकांचा समूह.
    • दक्षिण भारतात राहणाया लोकांचा समूह.
    २. आज पासून चार हजार वर्षांपूर्वी पर्यंत या दोन्ही समूहात अजिबात संकर नव्हता. त्यानंतर म्हणजेच सुमारे ४ हजार वर्षांपूर्वी या दोन्ही लोक समूहात संकर सुरू झाला. पुढे सुमारे २ हजार वर्षे हा संकर सुरू होता. या संकरातून अनेक लोकसमूह तयार झाले. 


    ३. आजपासून सुमारे १९०० वर्षांपूर्वी पर्यंत हे लोकसमूह तयार होण्याची प्रक्रिया सुरू होती. म्हणजेच या लोकसमूहात परस्पर बेटी व्यवहार होता. 

    ४. १९०० वर्षांपूर्वी म्हणजेच साधारणत: इसवी सनाच्या पहिल्या शतकात या लोकसमूहांनी आपल्या समूहाबाहेर विवाह करण्याचे बंद केले. आज जे लोकसमूह अथवा जातीसमूह भारतात दिसतात, ते लोकसमूह २ हजार वर्षांपूर्वी बंदिस्त झालेल्या समूहांचे वंशज आहेत. 

    हा अभ्यास तंतोतंत खरा मानला तर आजची भारतीय जाती संस्था सुमारे १९०० वर्षांपूर्वी अस्तित्वात आली, असे म्हणता येते. 


    या अभ्यासावर आधारित एक बातमी टाईम्स इंडियाने दिली आहे. या बातमीचा तपशील असा : 

    genetic study finds : Caste bar on marriages became entrenched 2000 years ago

    Courtesy : Times of India

    NEW DELHI: In a fascinating study of how different types of populations mixed in India, scientists have found that there were three stages of intermixing.

    In ancient times, over 4000 years ago, there were two separate populations based in north and south India with no mixing. Then, in the second stage between 4000 years ago and 1900 years ago, comes a phase of widespread intermingling of populations, which penetrated to even the most isolated groups. Finally, from around 1900 years onwards, several subgroups of the already mixed population stopped marrying outside their group, and thus became frozen.

    Scientists from Harvard Medical School, US, and the Centre for Cellular and Molecular Biology in Hyderabad provide evidence for this sequence of development through analysis of genetic material from 73 Indian population groups. The findings were published on August 8 in the American Journal of Human Genetics.

    "Only a few thousand years ago, the Indian population structure was vastly different from today," said co-senior author David Reich, professor of genetics at Harvard Medical School (HMS) in a statement issued by the HMS. "The caste system has been around for a long time, but not forever."

    Prohibition to marrying outside a defined community is called endogamy. It is one of the cornerstones of India's caste system. The decline of intermarriage between different communities as found by these scientists is due to the spread of the caste. This transformed India from a country where mixture between different populations was rampant to one where endogamy became the norm.

    Earlier, in 2009, Reich and colleagues had analyzed 25 different Indian population groups and found that all populations in India show evidence of a genetic mixture of two ancestral groups: Ancestral North Indians (ANI), who are related to Central Asians, Middle Easterners, Caucasians, and Europeans; and Ancestral South Indians (ASI), who are primarily from the subcontinent. However, this analysis could not clearly define the timeline. So, the researchers analysed genetic material from almost triple the number and came up with a much clearer idea of the changes in India.

    How do genetic scientists get to know so much about the past of different populations? The genomes - strands of DNA - of Indian people are a mixture of segments of ANI and ASI descent. Originally when the ANI and ASI populations mixed, these segments would have been extremely long. However, after mixture these segments would have got broken up and reshuffled as genetic material from the father and mother combined.

    By measuring the lengths of the segments of ANI and ASI ancestry in Indian genomes, the scientists are able to obtain precise estimates of the age of population mixture. They found that mixing and shuffling of genetic strands continued between 4200 years to about 1900, depending on the population group analyzed.

    "The fact that every population in India evolved from randomly mixed populations suggests that social classifications like the caste system are not likely to have existed in the same way before the mixture," co-senior author Lalji Singh, currently of Banaras Hindu University, and formerly of the Centre for Cellular and Molecular Biology said in the HMS statement. "Thus, the present-day structure of the caste system came into being only relatively recently in Indian history."

    But once established, the caste system became genetically effective, the researchers observed. Mixture across groups became very rare. This has led to another consequence - the preservation of certain types of diseases within endogamous groups.

    "An important consequence of these results is that the high incidence of genetic and population-specific diseases that is characteristic of present-day India is likely to have increased only in the last few thousand years when groups in India started following strict endogamous marriage," said co-first author Kumarasamy Thangaraj, of the Centre for Cellular and Molecular Biology in the HMS statement.




    Tuesday 6 August 2013

    नरेंद्र मोदी सरकारकडून कच्छमधील शीख शेतक-यांचा छळ

    गुजरात दंगलीत ३ हजार पेक्षा जास्त मुस्लिमांची कत्तल केली गेली. ही कत्तल होत होती, तेव्हा मुस्लिमेतर समाज गुजरातेत बघ्याची भूमिका घेत होता. मुस्लिमांना दहशतीखाली आणल्यानंतर आता बारी शिखांची आहे. गुजरातच्या कच्छ भागात स्थायिक झालेल्या १००० पेक्षाही जास्त शीख शेतक-यांना तेथून हाकलून लावण्यासाठी गुजरात सरकार धमकावित आहेत.

    शिखांच्या मालकीच्या २० हजार एकर जमिनीवर डोळा
    कच्छमधील शीख शेतक-यांचे नेते सुरेंदर सिंग भुल्लर यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, १९७३ सालच्या ‘बॉम्बे टेनन्सी अँड अ‍ॅग्रीकल्चरल लँड्स अ‍ॅक्ट' जुनाट या कायद्याचा आधार घेऊन २०१० सालापासून नरेंद्र मोदी सरकार शीख शेतक-यांचा छळ करीत आहेत. सुमारे १ हजार शीख शेतक-यांचा जमीन मालकीवरील हक्क काढून घेण्यात आला आहे. "तुम्ही गुजराती नाही आहात, त्यामुळे तुम्हाला गुजरातमध्ये जमीन मालक होण्याचा अधिकारच नाही", असे मोदी सरकारने शीख शेतक-यांना सुनावले आहे. गुजरातच्या कच्छ भागात २० हजार एकर शीख शेतक-यांच्या मालकीची आहे.  या जमिनीवर मोदी सरकार मधील माफियांचा डोळा आहे.

    लाल बहादूर शास्त्री यांनी शिखांना कच्छ मध्ये आणले 
     १९६५ सालच्या भारत-पाक युद्धानंतर लाल बहादूर शास्त्री शीखांना कच्छमध्ये येण्याचे आवाहन केले होते. या भागात वसाहती निर्माण झाल्यास येथे विकास तर होईलच, पण पाकिस्तानच्या कारवायांनाही आळा बसेल, अशी मागील शास्त्रींची भूमिका होती. आपल्या मेहनतीच्या जोरावर शीख शेतक-यांनी कच्छच्या वाळवंटात नंदनवन फुलविले. त्याच शीखांना आता मोदी सरकार तेथून निघून जाण्यासाठी छळित आहे.

    जंतर मंतरवर शीख समुदायाची  निदर्शने 
     गुजरातमधील या सरकार समर्थित दहशतवादाच्या विरोधात सोमवार दि. ५ ऑगस्ट रोजी शीख समुदायाच्या वतीने राजधानी दिल्लीत जंतर मंतर येथे जोरदार निदर्शने केली. मोदी यांचा पुतळाही शिखांनी जाळला. मोदींच्या विरोधातील शीख समुदायाच्या आंदोलनाची ही काही छायाचित्रे खाली दिली आहेत.

    ही पहा शीख समुदायाच्या आंदोलनाची छायाचित्रे : 







    संबधित लेख





    Sunday 4 August 2013

    आगरकर यांचा मराठा द्वेष

    -राजा मइंद, संपादक मंडळ सदस्य, अपाविमं.   

    महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांच्या आत्मचरित्रात त्या काळातील पुण्याचे आणि पुण्यातील माणसांचे त्यांच्या वृत्ती प्रवृत्तीसह वर्णन आले आहे. पुण्याचा सामाजिक इतिहासच हे आत्मचरित्र सांगते. इतिहासांच्या पानावर मोठी असलेली अनेक माणसे प्रत्यक्षात कशी जातीय डबक्यातली बेडकं होती, हे महर्षि शिंदे यांच्या आत्मचरित्रातील निर्मळ वर्णनातून कळते. यापैकीच एक पात्र आहे गोपाळ गणेश आगरकर. महान समाजसुधारक म्हणून आगरकरांचे त्यांच्या हयातीतच नाव झाले होते. पण प्रत्यक्षात जीवनात ते कट्टर चित्पावन ब्राह्मण होते. मराठा समाजाविषयी त्यांच्या मनात द्वेष ठासून भरलेला होता. 

    महर्षि शिंदे हे १८९३ ते १९९८ या ६ वर्षांच्या काळात पुण्यात फग्र्युसन कॉलेजात शिकायला होते. फर्ग्युसन कॉलेजची महिन्याची फीस १० रुपये होती. एका वेळी ३ महिन्यांची फी भरावी लागे. त्याकाळी पुण्यात डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन नावाची एक संस्था होती. ही संस्था मराठा समाज आणि इतर बहुजन समाजातील मुलांना शिक्षणासाठी मदत करीत असे. गंगाराम भाऊ म्हस्के आणि राजन्ना लिंगो यांनी मिळून ही संस्था काढली होती. श्री. म्हस्के साहेब संस्थेचे संस्थापक सेक्रेटरी होते. महर्षि शिंदे यांनी पुण्यात आल्या आल्या म्हस्के साहेबांची भेट घेतली. म्हस्के साहेबांनी त्यांना दरमहा १० रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर केली. त्यानंतर राहण्या-खाण्याच्या खर्चाचा प्रश्न निर्माण झाला. गरीब मुलांना नादारी देऊन फी माफ करण्याची योजना तेव्हा फर्ग्युसन कॉलेजात होती. नादारी देण्याचे अधिकार कॉलेजच्या प्राचार्यांना होते. फर्ग्युसनचे प्राचार्य वामन शिवराम आपटे (संस्कृत कोशकार) निवृत्त झाले होते. गोपाळ गणेश आगरकर हे नवे प्राचार्य म्हणून रुजू झाले होते. महर्षि शिंदे यांनी नादारीचा अर्ज घेऊन आगरकरांची भेट घेतली. "मला मराठा एज्युकेशन असोसिएशनची १० रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे.", असे महर्षि यांनी आगरकरांना प्रामाणिकपणे सांगून टाकले. झाले. ‘मराठा असोशिएशन'चे नाव ऐकताच आगरकरांच्या भुवया ताठ झाल्या. इतर एकही शब्द न ऐकता आगरकरांनी नादारी मिळणार नाही, असे सांगून टाकले. 

    हा सगळा किस्सा महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांच्या आत्मचरित्रात आला आहे. महर्षि यांनी भेट घेतली तेव्हा आगरकर हे पुण्यात राहत नसत. पुण्याबाहेर एका विस्तीर्ण जागेवर झोपडी बांधून ते राहत. याच झोपडीच्या जागेवर नंतर फर्ग्युसन कॉलेजच्या इमारती बांधण्यात आल्या. महर्षि हे १८९२ साली जमखंडी येथे काही काळ शिक्षक होते. तेथे आगरकरांची कथित कीर्ति महर्षि यांच्या कानावर गेली होती. महर्षि लिहितात : "इ.स. १८९२ साली मी जमखंडी शाळेत शिक्षक असताना त्यांचे सुधारक पत्रातले लेख माझ्या वाचण्यात येऊन माझी मते झपाट्याने सुधारणेच्या बाजूची बनत चालली होती. पण आगरकरांना प्रथम पाहिल्यावर त्या देखाव्याचा ह्या कल्पनेशी नीट मेळ जमेना." 

    शिंदे-आगरकर भेट
    महर्षि विठ्ठल रामजी शिन्दे यांनी लिहिले : "माझ्या भेटीची वेळ सकाळी ९ वाजण्याच्या सुमाराची होती. दिवस हिवाळ्याचे होते. आगरकर कायमचेच देमकरी होते. ते झोपडीच्या बाहेर अंगणात उभे होते. लोकरीचा जवळ जवळ फाटलेला काळा मळकट कोट, चित्पावनी थाटाचे नेसलेले धोतर, लहानशा शेंडीचे थोडेसे विखुरलेले केस. पायात आगरकरी सुधारणेचा जोडा- म्हणजे ब्राह्मणी जोडाच; पण त्याचे टाचेवरचे कातडे टाचेच्या मागे वर उभे केलेले. मुद्रा बरीच त्रासलेली, भिवयांचे केस दाट व डोळे qकचित खोल व भेदक असे हे दर्शन घडले. माझा अर्ज पाहून मला डेक्कन मराठा असोसिएशनची स्कॉलरशीप मिळत आहे हे ऐकल्याबरोबर स्वारीने मला फी माफ व्हायची नाही हे निर्भिडपणे सांगितले. आधीच त्यांचा एकंदर पोषाख व मुद्रा पाहून, त्यांच्या सुधारकी कीर्तिमुळे मी जी भलतीच कल्पना करून घेतली होती ती ढासळली होती आणि त्यावर हा नकाराचा बॉम्ब मजवर आदळल्यामुळे आगरकरांविषयी माझा ग्रह अनुकूल झाला नाही. हा गृह कॉलेजच्या इतर प्रोफेसरांशी माझा पुढे जो अत्यल्प पत्यक्ष संबंध आला त्यामुळे म्हणण्यासारखा दुरुस्त झाला नाही.…. "

    कॉलेजात असतानाही पक्षपातीपणाचा अनुभव महर्षि शिन्दे यांना वरचेवर येत गेला. पुढील वर्णनात शिन्दे यांनी लिहिले की : "… विशेष पेच हा की, त्या आगरकर महाशयांनी मला नादारी दिली नाही, त्यांच्या सुधारकातील लेख वाचून माझी त्या हरीवरील श्रद्धा बरीच कमी होत आली होती." 

    हे सारे लिहित असताना महर्षि शिन्दे यांनी पिढीजात घरंदाजपणा आणि मनाचा मोठेपणा सोडला नाही. आगरकर आणि कॉलेज बद्दल ते अपशब्द वापरीत नाहीत. उलट आपल्याला आपल्या मनात जो काही कटु विचार आला त्याला आपला अजाणपणा कारणीभूत होता, असे म्हणून ते सारा दोष स्वत:कडेच घेतात. महर्षि लिहितात : "..खरोखर पाहता ह्याच आगरकरांचा इतर प्रोफेसरांचा qकवा कॉलेजच्या इतर परिस्थितीचा काहीच दोष नव्हता. केवळ ह्या निराशेला माझा अजाणपणा व अननुभवीपणा कारण होय." महर्षि शिन्दे यांच्या व्यक्तिमत्त्वातील ही संतवृत्ती खरोखरच अद्भूत होय. कुठे चित्पावनी ब्राह्मणवाद जोपासणारे आगरकर आणि कुठे या जातीयवादाला माफ करून दोष स्वत:च्या माथी घेणारे महर्षि विठ्ठल रामजी शिन्दे. 

    महर्षि यांच्या मोठेपणास त्रिवार मानाचा मुजरा. 



    महर्षि शिंदे यांचा नि:पक्षपातीपणा

    -राजा मइंद, संपादक मंडळ सदस्य, अपाविमं.   

    महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांची भूमिका नेहमीच नि:पक्षपातीपणाची राहिली आहे. आपल्या लेखनात कोणताही जातीय अभिनिवेश त्यांनी ठेवला नाही. आगरकरांचा चित्पावनी अवतारातील जातीयवाद त्यांनी ज्या प्रमाणे मांडला, त्याच प्रमाणे त्याकाळी मराठा समाजातील शिक्षितांचा आडमुठ्ठेपणाही मांडला. फर्ग्युसन कॉलेजमध्ये पहिल्या वर्षाला असतानाच परीक्षेची फी भरण्याची वेळ आली तेव्हाचा महर्षि शिन्दे यांनी सांगितलेला एक किस्सा त्यांच्या नि:पक्षपातीपणाची साक्ष देतो. 

    मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या प्रीव्हिएस परीक्षेला बसायचे तेव्हा पुन्हा पैशांची अडचण निर्माण झाली. परीक्षेची फी २० रुपये होती. म्हस्के साहेबांकडे पुन्हा पैसे मागण्यासाठी जाणे शिंदे यांना प्रशस्त वाटेना कारण त्यांनी आधीच दरमहा १० रुपयांची व्यवस्था करून दिलेली होती. शिंदे जेथे राहत त्या तापडपत्रीकरांच्या वाड्यात नरहरपंत नावाचा एक गरीब ब्राह्मण भटकीसाठी येत असे. नरहरपंताला शिंदे यांचे विशेष कौतुक वाटे. मराठा असूनही हा मुलगा इतके शिकला ही धारणा या कौतुकामागे होती. नरहरपंताने महर्षि शिंदे यांना पुण्यातील अनेक मान्यवरांचे पत्ते मिळवून दिले. या भटकंतीतून महर्षि शिंदे यांच्याकडे १४ रुपये जमले. आणखी ६ रुपयांची गरज होती. शुक्रवार पेठेत म्युनिसिपालिटीचा दवाखाना होता. तेथे डॉ. शेळके नावाचे एक डॉक्टर होते. त्यांचा पत्ता नरहरपंताने महर्षि शिन्दे यांना दिला. महर्षि शिन्दे हे डॉ. शेळके यांना भेटायला गेले. डॉ. शेळके यांनी पैसे तर दिले नाहीच. उलट जिव्हारी लागेल, असा उपदेश मात्र केला. डॉ. शेळके म्हणाले, "मराठ्यांच्या कुळात जन्मून असे भिक्षापात्र मिरविण्याची तुला लाज वाटत नाही? जवळ पैसे नसल्यास गुरे राखवीत. कशास शिकावे?"


    संबधित लेख :

    आगरकर यांचा मराठा द्वेष
    महर्षि शिंदे यांचा नि:पक्षपातीपणा

    Thursday 1 August 2013

    टिळकांचा खरा चेहरा


    बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने महाराष्ट्रातील तमाम वृत्तपत्रांनी अजीर्ण होईल इतपत लेखांचा भडिमार आज केला. कोणी टिळकांना तेल्या-तांबोळ्याचे पुढारी म्हटले. कोणी भारतीय असंतोषाचे जनक म्हटले. आणखी कोणी काय काय म्हटले. टिळकांना लावलेल्या या सा-या उपाध्या तद्दन झूठ आहेत. मराठी वृत्तपत्रे खोट्या गोष्टी चढवून बढवून सांगण्यात एकापेक्षा एक वरचढ आहेत, हेच यातून सिद्ध होते. बहुजनांची मोठी वृत्तपत्रे निर्माण होत नाही, तोपर्यंत हा खोटेपणा सुरूच राहील. 

    टिळक हे कधीच बहुजनांचे नेते नव्हते. टिळकांचा खरा चेहरा कट्टर ब्राह्मणवादाचाच होता. टिळकांची खरी ओळख पटविणाèया काही लेखांच्या लिन्का खाली देत आहोत. चोखंदळ वाचकांनी हे लेख वाचून आपला आपण निर्णय करावा.