Showing posts with label राजकारण. Show all posts
Showing posts with label राजकारण. Show all posts

Monday, 1 October 2012

आता लोकांना ठरवू द्या !!

प्रा. रवींद्र तहकिक
खरे तर आम्ही अजित दादा पवार आणि त्यांचा राजीनामा या  विषयावर 
आमचे जे मत मांडले ते केवळ महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्वाची
घटना म्हणून ; अनिता पाटील विचारमंचचा  अजित पवार आणि त्यांचे राजकीय
अस्तित्व किंवा भवितव्य याच्याशी कुठलाही भूमिकात्मक अथवा धोरणात्मक
संबंध नाही.
       परंतु बऱ्याच वाचकांनी आमच्या ' असे धाडस फक्त पवारच करू शकतात "
या लेखावर फेसबुक आणि ब्लोग वर शंकास्पद प्रतिक्रिया दिल्या आहेत. म्हणूनच
या विषयावर आम्हाला पुन्हा एकदा लिहिणे आवश्यक आहे .
       अजित पवार यांनी सिंचन प्रकल्पात किंवा त्या आधीच्या विविध खात्यात
मंत्री म्हणून काम करताना तसेच अर्थ आणि नियोजन मंत्री व उपमुख्यमंत्री म्हणून
काम करताना अमर्याद भ्रष्टाचार केला असे आपण गृहीत धरू ! त्याची एखाद्या समिती द्वारे
सीबीआय द्वारे किंवा आणखी कुठल्या कायदेशीर प्रक्रीये द्वारे चौकशी व्हावी; श्वेतपात्रिका
काढावी; दोषी ठरल्यास वाटेल ती सजा भोगण्यास मी तयार आहे ! असे खुद्द अजित पवार म्हणत
आहेत. आणि हे काम निष्पक्षपाती पणे व्हावे म्हणूनच आपण मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे
असेही त्यांनी स्पष्ट सांगितले आहे.
         आम्ही फक्त त्यांच्या या धाडसी निर्णयाचे स्वागत केले. आम्ही असेही म्हटले की
असे धाडस खुद्द मोठे पवार ( शरद पवार देखील कधी करू शकले नाहीत ) आम्ही आमच्या
लेखात अजित पवार निष्कलंकच  आहेत असे कुठेही म्हटलेले नाही. कदाचित ते दोषी असुशकतात
किंवा असतीलही परंतु ते निश्चित करण्याची जबाबदारी आता या बाबत आरोप करणाऱ्या
मंडळींची आहे. त्यांना त्यांचे काम विना अटकाव करता यावे म्हणून अजित पवार यांनी आपला
अडथळा स्वतःहून दूर केला; त्यांचा हा निर्णय अतिशय योग्य आहे, भ्रष्टाचाराचे आरोप
होणार्या अन्य मंत्र्या साठी अनुकरणीय आहे ; म्हणूनच स्वागतार्ह आहे. एवढेच आमचे म्हणणे आहे .या निमित्ताने त्यांनी एक चांगला पायंडा पाडला आहे. आणि आम्ही त्यांच्या या धाडसी
निर्णयाचे या मुद्या पुरते स्वागत केले आहे; समर्थन नव्हे !!
        अनेक मंत्री हातात बेड्या पडे पर्यंत सत्तेच्या वळचणीला राहून आपला बचाव करण्या साठी
वाटा पळवाटा शोधण्याचा प्रयत्न करतात आणि पक्षाने हकालपट्टी करे  पर्यंत खुर्चीला चिकटून
राहतात. अजित पवार यांनी मात्र थेट मैदानात उतरून दोनहात करण्याचा निर्णय घेतला आहे .
अजित पवार खरोखर दोषी असतील तर त्यांच्यावरचे आरोप सिद्ध करण्याची आणि त्यांना रॉबीन हूड ठरू न देण्याची जबाबदारी आता अर्थातच आरोप करणाऱ्यांची आहे.
          यात कोण यशस्वी ठरतो हे आता कालच ठरवेल


Saturday, 29 September 2012

असे धाडस फक्त पवारच दाखवू शकतात

                                                                                             

प्रा. रवींद्र तहकिक
हा लेख म्हणजे राष्ट्रवादी कोन्ग्रेस किंवा पवार फैमिलीचे समर्थन अथवा शरणता नव्हे !
अनिता पाटील विचारमंच स्वतःच्या तत्वांशी आणि परिवर्तनशील पुरोगामी बहुजन प्रबोधनाशी
बांधील आहे; या बाबतीत आम्ही कशीही ,कधीही, केव्हाही ,कोणत्याही स्थितीत आणि कोणत्याही
कारणांनी तडजोड करणार नाही. उद्या एखाद्या बहुजनातील व्यक्तीने आमच्या विचार भूमिकेला
आव्हान दिले तर उदिष्टा आड येणारे आप्त स्वकीयच नव्हे तर पोटची पोरेही कापून काढावी
लागतात या न्यायाने वेळ पडल्यास आम्ही कुणाचीही गय करणार नाही हे निश्चित !!
             परंतु हा ब्लोग फक्त दोषारोपण करतो किंवा टीकेचाच सूर लावतो असे नाही तर
समाजात काही चागले घडत असेल, काही नवे चागले पायंडे पडत असतील तर त्या बद्दल
संबधितांना त्याचे श्रेय देण्याचे औदार्य दाखवणे हे आम्ही आमचे कर्तव्य मानतो.
           महाराष्ट्रातील आघाडी सरकारचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  सिंचन घोटाळ्यासंदर्भात
झालेले आरोप आणि श्वेतपत्रिका या मुद्यावरून आपल्या मंत्रीपदाचा थेट राजीनामा दिल्या  नंतर
राजकीय वर्तुळात आणि मीडियात एकच खळबळ उडाली. या घटनेचे अनेकांनी अनेक अन्वयार्थ
काढले. कुणी राजकीय भूकंपाचे भाकीत केले. तर कुणी पवार x पवार बिटवीन प्रफुल्ल पटेल
व्हाया सुप्रिया सुळे अशी थेअरी मांडली.
          परंतु शिंके तुटण्याची वाट पाहणाऱ्या कुणाही बोक्याचे फावणार नाही एवढी समज -उमज आणि
राजकीय कुशलता पवार कुटुंबियांना नक्कीच आहे .मुळात अजित पवार यांनी त्यांचे काका खुद्द शरद पवार
यांना कधी जे धाडस दाखवता आले नाही ते धाडस दाखवून काका पेक्षा एक पाउल पुढे टाकले
आहे .राजकारणातील लोक अगदी न्यायालयाने तुरुंगात  रवानगी करे पर्यंत खुर्चीला चिटकून
बसतात. हा सार्वत्रिक अनुभव आहे. त्याला कुठलाही पक्ष अपवाद नाही, स्वतः शरद पवार यांच्या
वर अनेकदा अनेक प्रकारचे आरोप झाले परंतु त्यांनी हि कधी सत्तापद सोडण्याचे धाडस दाखवले
नव्हते. उलट काही वर्तमान पत्रावर आणि खैरनार सारख्या अधिकार्यावर त्याने अब्रूनुकसानीचे
खटले दाखल केले होते. यथावकाश शरद पवार सर्व आरोपातून निष्कलंक ( किंवा लीलया म्हणा
हवे तर ) सुटले ; परंतु अजित पवारांनी सत्तेतून बाहेर पडून आता वाटेल तशी निष्पक्ष चौकशी करा
असे खुले आव्हान देऊन जो नवा पायंडा पाडला आहे तो सर्वच राजकारण्यासाठी आदर्श आणि
अनुकरणीय आहे .
        हे स्पष्ट आहे कि अजित पवार जनतेत जाऊन आपले सत्तास्थान आणखी बळकट करणार .
त्यांच्या एका निर्णयाने आज राष्ट्रवादीतील सर्व दिग्गज नेत्यांना त्यांनी चार कोस पिछाडीवर
टाकले आहे . सहकारी कोन्ग्रेस पक्षावरही त्यांची जरब वाढली आहे. एवढेच नव्हे  तर स्वतःचे
काका शरद पवार यानाही त्यांनी या निम्मित्ताने योग्य तो मेसेज दिला आहे.
       राष्ट्रवादीतील होऊ घातलेली गटबाजी आता थांबेल. आणि कार्यकर्ता वर्ग अजित पवार यांच्या
मागे एकवटेल हि यातील अजित पवार यांच्या दृष्टीने आणखी एक जमेची बाजू      

Tuesday, 8 May 2012

शेफारलेले बाळे आणि बाळ्या

सचिन, माधुरी, आणि मंगेशकरांचा महाराष्ट्रद्रोह

महाराष्ट्रात काही शेफारलेली बाळे आणि बाळ्या आहेत. सचिन तेंडुलकर, माधुरी दिक्षित, आणि मंगेशकर कुटुंबातील स्त्री-पुरुष यांचा त्यात प्रामुख्याने समावेश करावा लागेल. यांना शेफारून ठेवण्याचे पाप महाराष्ट्रातील प्रसार माध्यमांनी केले आहे. हे लोक महाराष्ट्राची शान आहेत, असा प्रचार माध्यमे गेली अनेक दशके करीत आहेत. एखाद्या खोट्या गोष्टीचा प्रसार सतत करीत राहिले की, ती शेवटी लोकांना खरी वाटू लागते, असे हिटलरचा माहिती आणि प्रसारणमंत्री डॉ. पॉल जोसेफ गोबेल्स म्हणत असे. ही बाळे आणि बाळ्यांच्या बाबतीत नेमके हेच झाले आहे. अत्यंत स्वार्थी आणि आपल्याच कोशात जगणाèया या बाळे-बाळ्यांवर मीडियातून सातत्याने हितसंबंधी प्रशंसेचा वर्षाव होत राहिला. त्यामुळे या बाळे-बाळ्यांना असे वाटायला लागले की आपल्यामुळेच महाराष्ट्राला किम्मत आहे. अतएव आपण सर्व कायदे आणि नियमांच्या वर आहोत. नियम हे सर्वसामान्यांसाठी आहेत. आपल्यासाठी नाहीतच. ही बाळे आणि बाळ्या आता सरकारलाही जुमानीशी झाली आहेत. 

या सर्वांत एक समान दुवा आहे. तो म्हणजे हे लोक पैशांच्या बाबतीत अत्यंत हावरट आहेत. 

१.

मंगेशकरं

मंगेशकरं हे महाराष्ट्रातील सर्वाधिक शेफारलेले लोक आहेत. लता मंगेशकर, आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर आणि त्यांची इतर भावंड मुंबईतील पेडर रोडवर राहतात. कृष्णकुंज असे त्यांच्या घराचे नाव. मंगेशकर राहत असल्यामुळे कृष्णकुंजला सर्व नियमांतून बाजूला काढण्यात यावे, असे त्यांना वाटते. पेडर रोड हा मुंबईतील सर्वाधिक वर्दळीचा मार्ग आहे. या रोडवर वाहतुकीची सातत्याने कोंडी होते. सर्वसामान्यांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन सरकारने येथे उड्डाण पूल बांधण्याचे ठरवले. कृष्णकुंज समोर उड्डाण पूल? किती घोर पाप? स्वत: लताबाई आणि मंत्रालयात गेल्या. संपूर्ण दशकभर त्यांनी हा पूल रोखून धरला. सामान्य लोकांच्या प्रश्नांसाठी लताबाई कधी अशा बाहेर पडल्या नाहीत. उड्डाण पूल झाला तर आम्ही दुबईला जाऊन राहू, अशी धमकी खुद्द लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी दिली होती. याचाच अर्थ असा की, यांना देशाबद्दल अजिबात प्रेम नाही. मला तर वाटते, हे दुबईला कधी जातात याची वाट सरकारने पाहूच नये. एका बोटीत बसवून त्यांना दुबईच्या दिशेने तोंड करून अरबी समुद्रात सोडून द्यायला हवे. दुबईत जाऊन नवे प्रभूकुंज बांधा म्हणा.  हा उड्डाण पूल करायचाच असा निर्णय आता सरकारने घेतला आहे. ही चांगली गोष्ट झाली.

 सर्व मंगेशकरांनी मिळून महाकपटी विनायक दामोदर सावरकरांनी लिहिलेली ‘सागरा प्राण तळमळला' वगैरे रडगाणी गायिली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसाठी असे एखादे गाणे मंगेशकरांनी गायलेय का? किन्वा छत्रपती शाहू महाराज, महात्मा  फुले यांच्यासाठी एखादे गाणे गायलेय का? येथे प्रश्न असा पडतो की, मंगेशकरांनी सावरकरांसाठीच का बरे एकत्र येऊ गळे काढले? हृदयनाथ मंगेशकरांनी तर अलिडके अत्यंत जात्यंध उपक्रम हाती घेतला आहे. वारकरी संतांमधून ज्ञानेश्वरांना वेगळे काढून केवळ त्यांचेच अभंग मंगेशकर गात फिरत फिरत आहे. इतक्या जात्यंध लोकांना मीडिया कित्येक दशके महाराष्ट्राची शान म्हणत आहे. 


२.

सचिन रमेश तेंडुलकर

क्रिकेटचा देव वगैरे अत्यंत फालतू विशेषणांनी मराठी मीडियाने सचिनला शेफारून ठेवले आहे. याला भारतरत्न द्या, अशी मागणी करण्यात राजकीय पक्षांत मध्यंतरी शर्यतच लागली होती. मुळात प्रश्न असा आहे की, खेळाच्या क्षेत्रात शिखरावर असलेला हा एकच माणूस भारतात आहे का? महाराष्ट्रातून क्रीडा क्षेत्रातून भारतरत्न द्यायचे झाले, तर सर्वांत प्रथम महान कुस्तीपटू खाशाबा जाधव यांना द्यावे लागेल. कुठल्याही सरकारी सुविधा न घेता, केवळ स्वत:च्या सामथ्र्यावर त्यांनी भारताला ऑलिम्पिक मधले पहिले पदक मिळवून दिले आहे. पण मीडिया खाशाबांचे नाव घेत नाही. मंबईतील वांद्रे (पश्चिम) येथील पेरीक्रॉस रोडवर सचिनने आलिशान चार मजली बंगला बांधला आहे. त्याची किंमत शंभर कोटी आहे की, दोनशे कोटी यात आपल्याला जाण्याचे कारण नाही. तो त्याचा खाजगी प्रश्न आहे. परंतु या घरात प्रवेश करण्याआधी ऑक्युपेशन सर्टिफिकेट (भोगवटा प्रमाणपत्र) घेणे कायद्यानुसार आवश्यक होते. ते न घेताच सचिन नव्या घरात गेला. मीडियातून ओरड झाल्यानंतर मुंबई महापालिकेने त्याला ४ लाख ३५ हजारांचा दंड ठोठावला. हा दंड माफ करण्यात यावा यासाठी राजकारण्यांनी महापालिकेकडे नुसता तगादा लावला होता. वर्षाला अडीचशे तीनशे कोटी रुपये कमावणाèया सचिनला ४.३५ लाखांचा दंड का माफ केला जावा? माफ करायचा असेल, तर सर्वांनाच माफ करून टाका. सचिनने हा दंड भरला की नाही हे अजूनही गुलदस्त्यात आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी यासंबंधीची माहिती मिळावी यासाठी महापालिकेत अर्ज केला होता. ही माहिती देऊ नये, असा पवित्रा सचिनने घेतला. त्यामुळे आता पालिकेने ही माहिती देण्यास नकार दिला आहे. कर नाही त्याला डर कशाला? यात नक्कीच काही तरी काळे बेरे असणार म्हणून तर सचिनने ही माहिती रोखली आहे. फावड्याने पैसे ओढणारा सचिनला चार-सव्वाचार लाखांच्या सरकारी कराची नादारी हवी आहे. यातून त्याची कंजुषी तर समोर येतेच, पण त्याचा स्वार्थही दिसून येतो. 


३.

माधुरी दीक्षित 

माधुरीला +धक धक गर्ल+ हा मानाचा किताब दिला गेला आहे. तीसुद्धा हा किताब मिरवत असते. अनिल कपूरसोबतच्या चित्रपटात तिने आपली वक्षस्थळे आणि पाश्र्वभाग (पाश्र्वभाग हा संस्कृत शब्द आहे. मराठीत त्याला qटगर असे म्हणतात.) गाण्याच्या तालावर हलविली म्हणून तिला हा किताब मिळाला आहे. तिच्या गाण्याला qकवा गाण्यातील शारिरिक हालचालींना आमचा अजिबात विरोध नाही. तिला पैसे कमावण्याचा अधिकार घटनेनेच दिला आहे. पण पैसे कमावण्याच्या उद्योगाला कोणी महाराष्ट्राची शान म्हणू नये. घोळ नेमका इथेच आहे. पैशांसाठी काहीही हलवायला तयार असलेल्या दीक्षितांच्या या माधुरी मीडियाने महाराष्ट्राची शान असा किताब स्वत:च्या अखत्यारित देऊन टाकलेला आहे. माधुरीने श्रीराम नेणे नावाच्या एका अनिवासी भारतीय डॉक्टरशी विवाह केला, तेव्हा मीडियाचा उर भरून आला होता. स्वत:चीच मुलगी अमेरिकेत चालली असा आनंद मराठी वृत्तपत्रांच्या संपादकांना झाला होता. हिला वृत्तपत्रांनी इतके डोक्यावर बसवून घेतले की, ही बया आता महाराष्ट्राचाच अपमान करीत आहे. महाराष्ट्र सरकारने तिला नुकताच एक पुरस्कार देऊ केला होता. तो घ्यायला ती फिरकलीही नाही. महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाची ब्रँड अ‍ॅम्बॅसिडर हो, अशी गळ राज्य सरकारने तिला घातली. तेव्हा तिने इतके पैसे मागितले की, सरकारचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली. माधुरीच्या ठुमक्यांचे आंबट शौकिन असलेले लोक आता असे म्हणू लागले आहे की, मेहनतीने पैसे कमावणाèया माधुरीने सरकारसाठी फुकट काम का करावे? हा कृतघ्नपणा आहे. महाराष्ट्र सरकारकडून फुकट सवलती उकळताना लाज वाटली नाही. महाराष्ट्राच्या ११ कोटी लोकांनी प्रेम दिले म्हणून तुम्ही सुपर स्टार झालात. पैसे कमावले. लोकांनी पैसे मोजून तुमचे चित्रपट पाहिले. या ॠणातून थोडेसे उतराई होण्याची वेळ आली, तर तुम्हाला पैसे हवे आहेत. आपल्या आईला वृद्धाश्रमात पाठविणारी अवलादच असे बोलू शकते. केंद्र सरकारची  अतुल्य भारत ही जाहिरात मालिका आमिर खानने एक पैसाही न घेता केली. अमिताभ बच्चन यांनी एक पैसा न घेता उत्तर प्रेदशचे ब्रँड अंबॅसिडर म्हणून काम केले. हे खरे महान कलाकार आहेत. 

अनिता पाटील


संबधित लेख 
मंगेशकर नावाची लोभाची मांजरे
सनी लिओनला भारतरत्न का नाही?
माधुरी दीक्षितच्या बगलेत कोणाचे हात?

Wednesday, 18 April 2012

सेना-मनसेचे मराठी प्रेम


डोळ्यात केर - कानात फुंकर !  ( भाग १ )

आज महाराष्ट्रात  सत्ताधारी काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीला प्रभावी विरोध करु
शकेल असा विरोधी पक्षच अस्तित्वात नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार
सलग तीनवेळा सत्तेत आले. याचा अर्थ ते खूप लोकप्रिय आहे किंवा जनहिताची
कामे करत आहे असे समजण्याचे आजीबात कारण नाही. उलट सलग तीनवेळा
सत्ता हाती आल्याने आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्या मध्ये
सत्तेची गुर्मी, उध्दटपणा आणि बेमुरवतपणा स्पष्ट दिसत आहे. भ्रष्टाचाराच्या
गोमेलाही असंख्य पाय फुटले आहेत. पण तरीही महाराष्ट्रातील जनता
(विशेषतः  ग्रामीण भागातील ) पुन्हा पुन्हा आघाडी वरच विश्वास टाकताना
दिसते. याचा अर्थ ती मूर्ख बेअक्कल बावळट आणि मुकी बहिरी आंधळी
आहे असे आजीबात नाही. परंतु मग आपले आणि महाराष्ट्राचे भवितव्य
कुणाच्या हातात सोपवायचे ? शिवसेना...भा,ज.पा. किंवा म न से च्या ?
म्हणजे एखाद्या जनावरा समोर दावणीला मरायचे की खाटकाच्या खोडावर ?
असा पर्याय ठेवला  तर तो जो निर्णय घेयील तोच निर्णय या बाबतीत
महाराष्ट्रातील जनता घेत आहे. दगडा पेक्षा वीट मऊ या न्यायाने  शहाण्याचे चाकर
होणे परवडले परंतु मूर्खाचे धनी होणे महागात पडेल हें सत्य महाराष्ट्रातील
जनता चांगल्या प्रकारे जाणते

संधी दिली होती

महाराष्ट्रातील जनतेला जेव्हा काँग्रेस सरकार गृहीत धरून
राज्य करु लागली तेंव्हा (१९९५ ) महाराष्ट्रातील जनतेने
सेना-भाजप च्या हाती सत्ता सोपवली होती. बाळासाहेब ठाकरे यांची
प्रभावी भाषणे,वाजपेयी यांची प्रतिमा (?) आणि जनतेच्या मनातील
बदलाची इच्छा या मुळे सेना भाजपा युती ची सत्ता आली. परंतु
लवकरच जनतेचा भ्रमनिरास झाला. सेना भाजप चे मंत्री -मुख्यमंत्री 
जनतेचे प्रश्न सोडवण्या पेक्षा  बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन
या दोन रिमोट कंट्रोल च्या तालावर नाचण्या पलीकडे काहीही करु
शकले नाही. मुळात या मंडळीना मुंबई बाहेर देखील महाराष्ट्र आहे .
त्या जनतेच्या आधारावरच सत्ता मिळते आणि टिकते याची जाण
आणि जाणीवच नव्हती. शिवाय आजवर जे मुंबई महापालिकेत
प्रत्येक कामाच्या टेंडरचे विशिष्ट कमिशन मातोश्रीवर पोहचवण्याची
जी सिष्टीम होती ती जशीच्या तशी मंत्रालयात आली. परिणामी
भ्रष्टाचाराला अतिशय बाजारू स्वरूप आले.
जो एनरोन  प्रकल्प शिवसेनेच्या "ढाण्या वाघाने अरबी समुद्रात बुडवला 
तोच प्रकल्प पुन्हा मातोश्रीच्या मागच्या दाराने आत आला आणि
ढाण्या वाघाने त्याची मलई मांजरी सारखी चाटली हें ही मराठी जनतेने
उघड्या डोळ्याने पहिले. खोपकर सारखा सच्चा कार्यकर्ता गैंगष्टर सारखा
भररस्त्यात मारला जातो..वरतून पुन्हा गद्दारांचा खोपकर करु अशी
भाषा केली जाते. रमेश किणी सारखा सामान्य चाकरमानी एका फ्ल्याट
च्या व्यवहारा साठी जीवानिशी मारला जातो हें सुद्धा महाराष्ट्रातील
जनतेने पहिले. जी शिवसेना ८० % समाज कारण आणि २० % राजकारणाची
भाषा करीत होती त्याच शिवसेनेच्या हातात सत्ता सोपवल्या नंतर
सुरेश जैन- धूत सारखे व्यापारी गोळा झाले हें ही जनतेने पहिले.
काँग्रेस निदान लोण्याचा गोळा काढून घेवून ताक तरी जनतेच्या हाती
देतात, हें बोके मात्र लोणी मटकाऊन ताकाने आंघोळ करतात.
म्हणून  जनता या प्रकाराला वैतागली आणि जनतेने सेना-भाजप
युतीला झिडकारले.  आता विरोधी पक्ष म्हणूनही सत्ताधारी सरकारवर
अंकुश ठेवण्यात युतीचे पक्ष आणि नेते अयशस्वी ठरत आहेत,
आणि या अवनितीला केवळ बाळासाहेब ठाकरे यांचे पोकळ
मराठी प्रेमाचे नाटकी राजकारण जबाबदार आहे.

-रवींद्र तहकीक

Monday, 16 April 2012

गडकरींचा ‘कोळसे'वाला

झारखंडमध्ये १ हजार कोटींचा कोळसा खाणारे अजय संचेती आणि नितीन गडकरी.
एका कार्यक्रमात संचेती यांचा गडकरींच्या हस्ते सत्कार करण्यात
आला होता, तेव्हाचे हे छायाचित्र आहे. नवभारत टाईम्सने ते नुकतेच प्रसिद्ध केले आहे.


आरएसएसच्या शाखेत नितीन गडकरी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसने आपले मोहरे म्हणून ज्यांना ज्यांना राजकारणात पुढे केले आहे, त्या सगळ्यांचा संबंध एनकेन प्रकारे भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचाराशी कसा काय येतो? आरएसएसचा आशीर्वाद असल्याशिवाय भाजपात कोणीही सत्तेच्या पदापर्यंत पोहोचू शकत नाही. आरएसएसची मर्जी ज्याच्यावर खप्पा होते, त्याचा लालकृष्ण अडवाणी होतो. भाजपाशासित राज्यांतील बहुतांश मुख्यमंत्री आरएसएसचा आशीर्वाद घेऊनच पदावर चढले आहेत. आरएसएसचे सत्तेतील मोहरे म्हणून हे लोक वावरतात. आरएसएसचे सत्तेतील हे मोहरे भ्रष्टाचाराच्या आरोपांनी सतत का घेरलेले असतात, हा या देशातील सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे. भ्रष्टाचाराच्या मार्गांनी पैसा उभा करू शकणाèयांना किन्वा किमान भ्रष्टाचाèयांना अभय देऊ शकणाèयांना आपला मोहरा म्हणून राजकारणात पाठवायचे, असे काहीसे आरएसएसचे धोरण दिसते. 

नागपूरकरांच्या प्रश्नाला उत्तर द्या

आरएसएसचा आणखी एक मोठा मोहरा म्हणजे भाजपाध्यक्ष नितीन गडकरी.  परीट घडीचे पांढरे स्वच्छ कपडे घालून गडकरी मिस्टर क्लिन म्हणून राजकारणात मिरवत असतात. तथापि, त्यांच्या कपड्यांनाही झारखंडमधील कोळशाचा काळा रंग लागला आहे. गडकरी यांचे मित्र अजय संचेती यांनी झारखंडमध्ये १ हजार कोटींपेक्षाही जास्त रुपयांचा घोटाळा घडवून आणला आहे. कॅगच्या अहवालातच ही माहिती समोर आली आहे. आरएसएसचा आणखी एक मोहरा आणि झारखंडचे मुख्यमंत्री रमण qसग यांच्यावरही कॅगच्या रिपोर्टची गाज कोसळली आहे. रमनसिंग सरकारनेच झारखंडमधला कोळसा घोटाळ्याचे नेतृत्व केले, असा स्पष्ट ठपका कॅगने ठेवला आहे. सोमरवार दि. ९ एप्रिल २०१२ रोजी कॅगचा हा अहवाल सभागृहात ठेवण्यात आला. गडकरीच्या मित्राने १ हजार कोटींचा कोळसा खाल्ला. या कोळशाने गडकरींचेही हात काळे झाले आहेत का? महाराष्ट्रातील विशेषत: नागपूरच्या लोकांच्या मनातला हा प्रश्न आहे. गडकरी नागपूरचे आहेत. आरएसएसचे मुख्यालयही नागपुरातच आहे. दोघांपैकी कोणी तरी लोकांच्या मनातील संभ्रम दूर करायला हवा.
आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांच्यासह नितीन गडकरी

येडुरप्पा आणि मोदी

कर्नाटकात बी. एस. येडुरप्पा हे संघाचा मोहरा म्हणून वावरतात. त्यांच्या एवढे भ्रष्टाचाराचे आरोप संपूर्ण भरतखंडात कोणावरही झालेले नाहीत. कर्नाटकातील लोखंडाच्या खाणीतून रेड्डी बंधूंनी अब्जावधी रुपये बेकायदेशीररित्या काढले. रेड्डी बंधूंना येडुरप्पा मुख्यमंत्री असतानाच मुक्तहस्त मिळाला. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे आरएसएसचा सर्वांत मोठा मोहरा आहेत. आरएसएसचे मुखपत्र पांचजन्यने त्यांना भाजपाचा पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषित करून टाकले आहे. मोदी सरकारवर कॅगने गंभीर स्वरूपाचे ताशेरे आपल्या ताज्या अहवालात ओढले आहेत. गुजरातमधील ३ हजार पेक्षा जास्त मुस्लिमांच्या कत्तीचे पाप मोदी सरकारच्या माथ्यावर आहे ते वेगळेच. ‘राजधर्माचे पालन कराङ्क असा इशारा तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी मोदींना दिला होता. याचा विसर पांचजन्यला पडला आहे. 

मीडिया संघाला धार्जिण

या प्रकरणी सर्वाधिक आश्चर्यकारक भूमिका देशातील मीडियाने घेतल्याचे दिसून आले. १ हजार कोटींचा कोळसा खाणारे अजय संचेती आणि त्यांचे घनिष्ठ मित्र नागपूरकर गडकरी यांच्याबाबत मीडिया चकार शब्द काढायला तयार नाही. भारतीय वृत्तपत्रे आणि न्यूज चॅनल चालविणारा वर्ग आरएसएससाठी काम करतो, हे सिद्ध करायला दुसरा पुरावा कोणता हवा. 
अजय संचेती यांनी १ हजार कोटींचा कोळसा खाल्ला, त्यासंबंधी दैनिक भास्करच्या वेबसाईटवरील बातमीची ही लिन्क - 
http://daily.bhaskar.com/article/NAT-TOP-coal-scam-cag-reports-involvement-of-gadkaris-close-aide-3091587.html


गडकरींना आरएसएसने का निवडले याचे विश्लेषण आऊटलूक साप्ताहिकाने केले आहे. त्याची लिन्क -
http://www.outlookindia.com/article.aspx?277753

अनिता पाटील

Sunday, 4 September 2011

बायकांचे कपडे आणि तुरुंगाचा हट्ट!


अण्णांच्या आंदोलनामागील राजकीय रंग-१

सरकार कोणासाठी काम करते? या प्रश्नाचे उत्तर आहे : सरकारसाठीच! जगातील कोणत्याही सरकारची हीच एकमेव पॉलिसी असते. ही बाब आपण एकदा स्पष्टपणे समजून घेतली की, अण्णा हजारे यांचे जनलोकपालसाठीचे उपोषण इतके दिवस का लांबले, याचे उत्तर शोधणे सोपे जाते.
अण्णांचे उपोषण एका दिवसात ठरलेले नव्हते. ५ ते ९ एप्रिल २०११ या दरम्यान अण्णांनी राजधीत पहिले उपोषण केले. जनलोकपाल पारीत झाले नाही, तर १६ ऑगस्टपासून आपण रामलीला मैदानावर उपोषण करू, अशी घोषणा अण्णांनी पहिले उपोषण सोडतानाच केली होती. अण्णांचे पहिले उपोषण ४ दिवस चालले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्याला घाबरून सरकारने लगेच शरणागताची भूमिका घेऊन अण्णांच्या मागण्या मान्य करून टाकल्या. अण्णांच्या उपोषणासमोर सरकार झुकल्याचे पाहून राजकारणात उतरण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून असलेले बाबा रामदेव यांनी मध्येच रिंगणात उडी घेतली. अण्णांच्या नियोजित उपोषणाच्या आधीच बाबांनी रामलीला मैदानावर उपोषणाचा बाज मांडला. मात्र यावेळी सरकारने राजकीय खेळ्या केल्या. त्यात बाबा अडकले. पोलिसांच्या भीतीने बाबांना बायकांचे कपडे घालून पळून जावे लागले. बाबा पळून गेले. हरीद्वारला जाऊन जाहीरपणे रडले. या सर्व नाट्याचा कोणताही परीणाम जनमानसावर झाला नाही. एक प्रकारे जनमानसाने बाबांकडे पाठच फिरविली.
नैतिकता नियमांपेक्षा श्रेष्ठ
आंदोलन चिरडण्याचा हा यशस्वी अनुभव गाठीशी असल्यामुळे मनमोहनqसग सरकारचे मनोबल उंचावले होते. अण्णांच्या आंदोलनाच्याा सुरूवातीच्या काळात मनुष्यबळ विकासमंत्री ज्या पद्धतीने कुत्सितपणे हसत होते, त्यावरून सरकारच्या निर्धास्ततेची कल्पना येत होती. अण्णांच्या उपोषणाला कायदे आणि नियमांच्या फासात आवळण्याचा प्रयत्न केला आणि येथेच सरकारचे चुकले. नैतिकता  ही नियमांपेक्षा नेहमीच श्रेष्ठ असते. हे सरकार विसरले. अण्णांकडे निष्कलंक चारित्र्याचे ब्रह्मास्त्र आहे, हे मी मागच्या लेखात म्हटले होते. हे ब्रह्मास्त्र सरकारला जाळू लागले, सरकारची काय अवस्था झाली हे आपण सर्वांनी टिव्हीवर पाहिलेच आहे. बाबांसारखे अण्णांचे आंदोलन सहज चिरडून टाकता येईल, या आत्मविश्वासाने सरकारने अण्णांना १६ ऑगस्ट २०११ रोजी च्या सकाळीच अटक केली; मात्र झाले भलतेच. हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले. पोलिसांनी अण्णांना पोलिस लाईन कँटीनमार्गे अनेक ठिकाणी फिरवून संध्याकाळी ४ वा. तिहार तुरुंगात नेले. लोक हजारोंच्या संख्येने पोलिसांच्या मागे होते. संध्याकाळपर्यंत तिहार तुरुंगाबाहेर ५ हजारांपेक्षा जास्त लोकांचा जमाव जमला. आता सरकार हादरले. संध्याकाळी अण्णांच्या सुटकेचा आदेश काढला. 
कमरेत वाकलेले सरकार!
आता कंट्रोल अण्णांच्या हातात होता. अण्णांनी बाहेर पडण्यास नकार दिला. पोलिसांच्या भीतीने रामदेव बाबा बायकांचे कपडे घालून पळून गेले, तर अण्णा तुरुंगात राहण्यासाठी अडून बसले. हा दोन्ही आंदोलनातील फरक आहे. अण्णांच्या आंदोलनाला देशभरातून पाqठबा का मिळाला. याचे उत्तर येथे मिळते. सरकारने सुटका केल्यानंतरही अण्णा १६ ते २० ऑगस्ट या काळात बेकायदेशीररित्या तिहारमध्येच राहिले. त्यांना बाहेर काढण्याची qहमत सरकारमध्ये झाली नाही. या संपूर्ण ५ दिवसांच्या काळात तिहारबाहेर किमान ५ हजारांचा जनसमुदाय ठिय्या देऊन होता. स्वातंत्र्योत्तर काळात एखाद्या नेत्यासाठी तुरुंगाबाहेर एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमच लोक थांबले. १६ ऑगस्टच्या संध्याकाळी अण्णांच्या सुटकेचा आदेश काढला तेव्हा सरकार पहिल्यांदा झुकले. नंतर संपूर्ण आंदोलनाच्या काळात ते झुकतच राहिले. 

-अनिता पाटील, औरंगाबाद.

काँग्रेस पक्ष भाजपाच्या खेळीत अडकला का?



अण्णांच्या आंदोलनामागील राजकीय रंग-२

सरकारने टीम अण्णाशीही राजकीय खेळ्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रत्येक खेळीत टीम अण्णा सरकारच्या एक पाऊल पुढे होती. सरकार संध्याकाळी वचने द्यायचे आणि दिवस उजाडताच मोडायचे. सोनिया गांधी नसल्यामुळे काँग्रेस अंतर्गत राजकारणाला उधान आले होते. सुरूवातीला सरकारची बाजू कपिल सिबल, प्रणव मुखर्जी, अभिषेक मनु qसघवी, मनीष तिवारी ही मंडळी हाताळीत होती. तोडगा काढण्याऐवजी आंदोलन चिरडण्यावर त्यांचा भर होता. त्यामुळे लोक आणखी खवळले. समाजातील एकही घटक या आंदोलनापासून दूर राहिला नाही. मुंबईतल्या डबेवाल्यांनी आपल्या सव्वाशे वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा संप केला. सिबल गटाच्या खेळ्या अंगाशी आल्यानंतर प्रणव मुखर्जी आणि सलमान खुर्शिद यांना मैदानात उतरविण्यात आले. खा. दीक्षितही पडद्यामागून काम करीत होते. अण्णा टीम आणि मुखर्जी-खुर्शिद यांच्यात उपोषणाच्या आठव्या रात्री समझोता झाला होता. मात्र चिदंबरम-सिबल गटाच्या दबावामुळे हा फॉम्र्युला बारगळला. नवव्या दिवशी तर उपोषण मूळपदावर आले. सरकारने सर्व मागण्या फेटाळून लावल्या. ५ एप्रिलला अण्णांनी उपोषण सुरू केले होते, त्या पातळीवर हा विषय गेला. अण्णाचे उपोषण हा तुमचा प्रश्न आहे, तुम्ही पाहून घ्या, असे उद्गार मुखर्जींसारख्या संयमी नेत्याने काढले.
राजकीय गणितज्ज्ञ फसले!
असे का घडले? अण्णांची एकही मागणी मान्य न करता उपोषण वाèयावर सोडायला सरकार का तयार झाले? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपणास या लेखाच्या प्रारंभी विचारलेल्या प्रश्नाकडे जावे लागेल. सरकार कोणासाठी काम करते? सरकार कोणताही निर्णय घेताना राजकीय फायद्या तोट्याचा विचार करते. राजकीय फायद्यासाठी सरकार जनहितविरोधी निर्णय घ्यायला कमी करीत नाही. या उलट राजकीय गैरसोय होणार असेल, तर जनहिताचे निर्णय घ्यायलाही सरकार नाखूष असते. याचाच अर्थ सरकार लोकांसाठी नव्हे; तर  स्वत:साठी काम करीत असते. अण्णांच्या आंदोलनाच्या काळात सरकारमधील गणिती भास्कराचार्य हीच फायद्या तोट्याची त्रैराशिके मांडित होते. विरोधी पक्षांच्या काय हालचाली आहेत, यावर सरकारचे बारीक लक्ष होते. छोट्या-मोठ्या ९ पक्षांनी अण्णांच्या आंदोलनाला पाqठबा दिला होता. मात्र भाजपाप्रणित रालोआची भूमिका गोलमाल होती. अण्णांच्या मागण्यांना भाजपाचा पाqठबा नव्हता. भाजपाचा पाqठबा नसल्यामुळे मनमोहनqसग सरकार तसे निर्धास्त होते. कारण सरकारने अण्णांना झिडकारले तरी भाजपाला काहीच लाभ होणार नव्हता. भाजपाला लाभ नाही म्हणजे काँग्रेसला तोटा नाही. दरम्यानच्या काळात सरकारने सर्व पक्षीय बैठक घेऊन चाचपणी केलेली होती. या बैठकीतही भाजपा सरकारसोबत होती!
टर्निंग पॉर्इंट ठरलेला फोन
आंदोलन लांबणे वा चिघळणे हे सरकारच्या हिताचे नव्हते; मात्र भाजपाच्या हिताचे होते!  सरकारविरुद्ध जेवढा जनक्षोभ वाढेल, तेवढा भाजपाच्या फायद्याचाच होता. काँग्रेसला अडकविण्यासाठी भाजपाने मुद्दामच अण्णांच्या मागण्यांबाबत ठोस भूमिका न घेता आंदोलन लांबण्याची व्यवस्था केली होती का? ही शक्यता अजिबात नाकारता येत नाही. शेवटी प्रश्न उतरतो की, भाजपाची ही खेळी काँग्रेसच्या लक्षात आली नाही का? अण्णांच्या उपोषणाचे काय करायचे ते तुमचे तुम्ही पाहून घ्या, असे जेव्हा मुखर्जी आणि खुर्शिद यांनी टीम अण्णाला सुनावले. तेव्हा टीम अण्णाने आपली खेळी बदलली. बैठकीतून बाहेर पडताच कीरण बेदी, अरqवद केजरीवाल आणि शांती भूषण यांनी पहिले काम केले, ते मंत्र्यांचे बोल मीडियाला जशास तसे ऐकवण्याचे! येथे सरकारमधील ढुड्ढाचार्यांना पहिला झटका बसला. त्यानंतर कीरण बेदी यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना थेट फोन केला. भाजपा योग्य संधीची वाट पाहत होता. आता देशभरातील वातावरण टोकाचे तापलेले होते. लाभ उठविण्यासाठी योग्य वेळ आलेली होती. ‘लोहा गरम है, मार दो हथौडाङ्क या न्यायाने भाजपाने अण्णांना संपूर्ण पाqठबा देण्याचा निर्णय घेतला. अडवाणी यांनी तसे आश्वासनच कीरण बेदींना दिले. ‘बेटी दो दिन रूको हम सब ठीक कर देंगेङ्क असे अडवाणी बेदींना म्हणाले. रजत शर्मा यांच्या ‘आप की अदालतङ्कमध्ये स्वत: बेदी यांनीच अडवाणींचे हे वाक्य परवा ऐकवले. दोघांत आणखी काय बोलणे झाले हे दोघांनाच माहीत. पण हा फोन टर्निंग पॉर्इंट ठरला.
सरकार जशी टीम अण्णाच्या मागावर होती, तशीच विरोधी पक्षांच्याही मागावर होती. भाजपा अण्णांना संपूर्ण पाqठबा देणार असल्याची कुणकुण लागली, तेव्हा सरकारच्या पायाखालची वाळू सरकली. आधीच खूप बदनामी झालेली होती. जनतेत टोकाचा रोष होता. अशात भाजपाने अण्णांना सक्रिय पाqठबा दिला तर... या नुसत्या विचारानेच सरकारला कापरे भरले. आणि अण्णांच्या उपोषण समाप्तीचा मार्ग मोकळा झाला. अंतिम उपाय म्हणून अण्णांशी सख्य असलेल्या विलासराव देशमुखांना सक्रिय करण्यात आले. आधीपासूनच कार्यरत असलेले भैय्यू महाराज आणि श्री श्री रविशंकर यांचीही सेवा घेण्यात आली. आणि शेवटी २१ ऑगस्ट रोजी सकाळी १०.०० वा. अण्णांच्या उपोषणाची सांगता झाली.
आधी जीत हुअी है, पुरी जीत अभी बाकी है, अशी घोषणा करून अण्णांनी पुढच्या आंदोलनाचा बिगूल वाजवून हे आंदोलन तूर्त स्थगित केले.

-अनिता पाटील, औरंगाबाद.