Showing posts with label ह. मो. मराठे. Show all posts
Showing posts with label ह. मो. मराठे. Show all posts

Saturday, 3 November 2012

हम्मो... हम्मो... हम्मो.. हम्मो... हम्मो! एका भटाची फटफजिती!!

 -प्रा. रवींद्र तहकिक

चिपळूणला होऊ घातलेल्या साहित्य संमेलनाचे निकाल लागले आणि मराठी साहित्यातील एक जाणकार लेखक-समीक्षक, त्या पेक्षाही मराठीचे एक उत्तम आणि विद्यार्थी प्रिय प्राध्यापक श्री. नागनाथ कोत्तापल्ले हे चिपळूण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. याचा आम्हाला फक्त ह. मो .मराठे हरला आणि कोत्तापल्ले जिंकले म्हणूनच आनंद आहे असे नव्हे. प्रा. डॉ. कोत्तापल्ले यांचे साहित्य आणि मराठी भाषेला दिलेले योगदान ह. मो. मराठेच्या तुलनेत कितीतरी पटीने दर्जेदार, उल्लेखनीय, सकारात्मक, दिशादर्शक, उर्ध्वगमनशाली आणि सर्वव्यापी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने शिक्षणाचे महत्व समजलेल्या ग्रामीण भागातून आलेल्या आणि शिकून "आम्हाला डोकं आहे ते केवळ फेटे गुंडाळण्या साठी नाही'' हे स्वतःला सरस्वतीचे पुत्र मानणाऱ्या ब्राम्हणांना दाखवून देणाऱ्या बहुजनाच्या पहिल्या पिढीतील तरुणाचे कोत्तापल्ले हे आघाडीचे शिलेदार आहेत. म्हणूनच त्यांचे संमेलनाध्यक्ष होणे आमच्या सारख्या त्यांच्या चाहत्या विद्यार्थ्यांसाठी आनंददायक घटना आहे .
     
आता थोडे ह. मो. बद्दल. मागे एका लेखात आम्ही हमोबद्दल लिहिताना हा जातीयवादी लुत भरलेला कुत्रा साहित्य संमेलनाचा अध्यक्षच काय तिथे लेखकांनी खाऊन टाकलेल्या उष्ट्या पत्रावळ्या चाटण्याच्या सुध्धा लायकीचा नाही, असे म्हटले होते. आमचे विचार योग्यच होते हे आता मतदारांनीही दाखवून दिले आहे. मुळात हा ' भिकम भट ' साहित्य संमेलनाच्या निवडणुकीला उभाच का राहिला याचे आम्हाला सखेद आश्चर्य आहे. कदाचित त्याला असा गैरसमज झाला असण्याची शक्यता आहे की बरेच मराठी लेखक, पत्रकार आणि साहित्य वर्तुळाशी संबधित लोक ( जे मतदार आहेत ) जातीने ब्राम्हण आहेत. वरतून पुन्हा साहित्य संमेलन चिपळूणला म्हणजे निमंत्रक मतदारातही भरपूर ब्राम्हण असणार. म्हणजे या वेळी आपण हळूच जानव्यात अंगठा घालून जरा कॉलरच्या वर काढून दाखवले आणि पुन्हा बेमालूमपणे आत सारले तर....आपली ही लबाडी कुणाच्या लक्षातही येणार नाही आणि ब्राम्हणाची एकगठ्ठा मते मिळून आपण चक्क साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होऊ!! गम्मत म्हणजे या मूर्ख ब्राम्हणाने आपली हे ''टॉयलेट थॉट'' आमलातही आणले. त्याने चक्क ब्राम्हणांना आवाहन करणारे एक पत्रकच काढले. त्यात आपण कसे अनेक वर्षापासून ब्राम्हणाची बाजू घेऊन सातत्याने साहित्य सेवा करीत आहोत, ब्राम्हणांनी आता कसे एक होणे गरजेचे आहे, याचा पाढा वाचला. पण कसचे काय अन कसचे काय! ह.मो.चे पत्रक त्याच्या स्वतःचा पराभवाची स्वतःच गायलेली नांदी ठरले. पुढच्या तीन अंकातही त्याचे चांगलेच तीन तेरा वाजले. वर्तमानपत्रातून, साहित्य वर्तुळातून, इतकेच काय एरव्ही साहित्य संमेलनाच्या निवडणुकीकडे दुर्लक्ष करणाऱ्या सर्वसामान्य वाचक आणि समाजातूनही ह.मो. ची चांगलीच हजामत झाली. सर्वच स्तरातून छी-थू व्हायला लागल्या नंतर ह. मो. ताळ्यावर आला. त्याने जाहीर माफी मागितली; परंतु तो पर्यंत वेळ निघून गेली होती. त्याची घाणीने भरलेली ''खुरे'' सगळ्यांना दिसली होती. त्यामुळे त्यावर कितीही रेशमी झुली घातल्या तरी ती झाकणार नव्हतीच! अखेर व्हायचे ते झालेच. ह .मो .ला फक्त १६४ भटांनी थारा दिला आणि कोत्तापल्ले सर ५८४ इतक्या दणदणीत मताधिक्याने विजयी झाले. जानव्याने दुसऱ्याचा गळा कापायला निघालेल्या या ''भिकम भटा''ला त्याच जानव्याची फाशी बसली.

Wednesday, 12 September 2012

ह. मो. मराठे याचे विषारी निवेदन जसेच्या तसे


ह. मो. मराठे यांनी काढलेल्या निवदेनाबद्दल वाचकांच्या मनात उत्सुकता आहे. या महाभागाने नेमकी कोणते विषारी फुत्कार सोडले, हे आम्हला कळू द्या, अशी मागणी वाचकांकडून होत होती. त्या पाश्र्वभूमीवर मराठे यांनी जारी केलेले निवेदन पुढे देत आहे.
प्रा. रविन्द्र तहकीक,
संपादक, अनिता पाटील ब्लॉग

........................................................
ह. मो. मराठे लिहितो :  

माझी भूमिका अगदी थोडक्यात अशी-

‘ब्राह्मणांना आणखी किती झोडपणार?' हा माझा प्रदीर्घ लेख ‘किस्त्रीम'च्या २००४च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला. ब्राह्मणांविषयीच्या अपप्रचाराला नवे उधाण येत असल्याचे मला जाणवत होतेच. पण, ५ जानेवारी २००४ रोजी पुणे येथील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर ‘संभाजी ब्रिगेड'ने हल्ला केला. त्यानंतर हा प्रचार हिंसक वळण घेणार असे भय मला वाटू लागले. 

जेम्स लेन नामक तथाकथित इतिहासकाराने आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच्या पुस्तकात म्हटले की, ‘‘दादोजी कोंडदेव हा महाराजांचा जन्मदाता पिता होता असा ज्योक महाराष्टड्ढात सांगण्यात येतो. भांडारकर संस्थेतील ब्राह्मण संशोधकांनीच वरील प्रमाणे लिहायला लेनला सांगितले असा समज करून घेऊन संभाजी ब्रिगेडच्या कार्यकत्र्यांनी वरील हल्ला केला होता. दुस-या दिवशी महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील हे पुण्यात पत्रकार परिषदेत म्हणाले की, समस्त ब्राह्मण समाजाला नजरेसमोर ठेवून ब्राह्मणेतर सर्व जातीतील उच्चशिक्षित तरुणांनी हा हल्ला केला. पुढे जेम्स लेनचे पुस्तक व तो स्वतः यांची भारताच्या सुप्रीम कोर्टाने निर्दोष मुक्तता केली. त्याच किंवा त्याच्या दुस-या दिवशी एका चॅनेलवरील चर्चेत भाग घेताना संभाजी ब्रिगेडचे वरिष्ठ पदाधिकारी प्रवीण गायकवाड म्हणाले की, २००४ सालच्या महाराराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सोनियांच्या काँग्रेसपेक्षा  राष्ट्र वादी कॉंग्रेसला जास्त जागा मिळवायच्या होत्या, म्हणून आमचा वापर करून घेण्यात आला आणि नंतर आम्हाला वा-यावर सोडण्यात आले. 

ब्राह्मण समाजाविषयी किंवा कोणत्याही धर्म-जातीविषयी या प्रकारे हिंसक वातावरण तयार करून त्यावर राजकीय स्वार्थाची पोळी भाजून घेणे ही अनिष्ट प्रवृत्ती आहे. गेल्या दीडशे वर्षांपासून महाराष्ट्रात ब्राह्मणद्वेषाचे वातावरण पद्धतशीरपणे तयार करण्यात येत असून, सध्या त्याचा कळस गाठण्यात येत आहे. पुरुषोत्तम खेडेकर यांनी त्यांच्या ‘शिवरायांच्या बदनामीची केंद्रे' या छापील पुस्तिकेत ब्राह्मणांच्या सर्रास कत्तली केल्या पाहिजेत आणि त्या कामी मराठा तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे, अशी चिथावणी अगदी उघडपणे दिली आहे. 

हिंसक वातावरण तयार करण्याच्या या प्रयत्नांविरुद्ध ब्राह्मण समाजाने संघटित होऊन आवाज उठवला पाहिजे, हा माझ्या भूमिकेचा एक भाग आहे. ब्राह्मणांना भारतीय समाजाचे एक नंबरचे शत्रू ठरविण्याचे प्रयत्न विविध लेखांतून व पुस्तकांतून करण्यात येत आहेत. त्याचा एक भाग म्हणून संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज यांचे खून ब्राह्मणांनीच केले असे सांगितले जाऊ लागले आहे. या द्वेषमूलक अपप्रचाराला साधार आणि तर्कशुद्ध उत्तरे देणे आवश्यकच झाले आहे. ब्राह्मणांनी भारतीय समाजाची जडणघडण, सामाजिक सुधारणा, अस्पृश्यता निवारण, स्वातंत्र्यलढा इत्यादी क्षेत्रात केलेले कार्यही बहुजन समाजातील नवशिक्षित तरुण पिढीसमोर आणण्याची गरज निर्माण झाली आहे. 

माझी एकूण भूमिका ब्राह्मण श्रेष्ठत्वाची किंवा चातुर्वण्र्याची तरफदारी करण्याची नाहीच नाही, इतर जातींच्या विरोधातही नाही. हजारो जाती, धर्म, पंथ, भाषा, सांस्कृतिक परंपरा असलेल्या संमिश्र भारतीय समाजात जातीजातीत निर्वैर सामंजस्य नांदले पाहिजे, तरच भारतीय समाज एकसंध राहू शकेल अशी माझी भूमिका आहे.

ह. मो. मराठे
..................................................................

हे लेख अवश्य वाचा :

ब्लॉगच्या संपादकांचा खणखणीत लेख वाचा : मराठ्याचे ब्राम्हणकांड 

मराठ्याचे ब्राम्हणकांड

ह मो मराठ्यांनी  आपल्या निवडणूक प्रचार पत्रकातील मजकुराबद्दल दिलगिरी अखेर व्यक्त केली. परंतु तो पर्यंत पुलाखालून ( आणि वरूनही ) बरेच पाणी वाहून गेले होते .
ह. मो. नी हे पत्रक कोणत्या हेतूने काढले होते हे जगजाहीर आहे. त्यांना चिपळूण
साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होण्यासाठी ब्राम्हण साहित्यिकांची मते हवी होती.
हा   ग्रहस्थ केवळ साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होण्यासाठी पहिल्यांदा असे करतोय असे नाही
तर गेल्या अनेक वर्षापासून ब्राम्हणाची बाजू मांडण्याच्या नावाखाली याने पुन्हा नव्याने
ब्राम्हण- ब्राम्हणेतर वाद उकरून काढला आहे त्याने खरडलेल्या काही कंचुकी-पुस्तिकाची
नुसती नावे जरी वाचली तरी हा 'कावळा' कोणत्या 'निष्पर्ण झाडाच्या शेंड्यावर' बसून
कुठे 'काकस्पर्श' करीत आहे हे लक्षात येते. या कावळ्याने वेळोवेळी टाकलेल्या 'शीटा' ची
ही नावे पहा १) ब्राम्हण मानस २)ब्राम्हण निंदेची नवी लाट ३)विद्रोही ब्राम्हण ४) ब्राम्हण चळवळ
कशासाठी ? ५) गंध,शेंडी,जानवे आणि ब्राम्हण चळवळ ६) ब्राम्हणांना आणखी किती झोडपणार ?
७) आधी रोखल्या बंदुका आता उगारल्या तलवारी ( आर्थात ब्राम्हनावर ) ८) ब्राम्हण,शिवधर्म आणि स्वदेश ई ई ई
वाचलीत ही पुस्तकांची नावे ?  या पुस्तकांचा मसुदा काय असेल याचा अंदाज केवळ नावे वाचली
तरी लक्षात येतो. या  प्रत्येक पुस्तकात केवळ ब्राम्हणाचा पुळका नाही तर ब्राम्हणेतरा बद्दल
तुच्छता आणि वर्णविद्वेषी गरळ आहे. मराठा, दलित, साळी,माळी, कोळी अशा ब्राम्हणेतर बहुजन समाजातील अठरापगड जाती बद्दल त्यांचा निर्मिती आणि रचने बद्दल 
अतिशय हीन भूमिका ठेवून शंका उपस्थित केल्या   आहेत.
       'ब्राम्हण समाज सुधारक ', ' ब्राम्हणाचे पुरोगामित्व '  ' ब्राम्हणाचे शोर्य ' असे चमत्कारिक शब्द प्रयोग करताना मराठ्यांना चक्क पळपुटे ; व्यभिचारी आणि धोकेबाज व 
फितूर गुणसूत्रांची जमात ठरवण्याचे धाडस याने केले आहे . व्यक्तीची शुद्धता .पावित्र्य ,प्रामाणिकता ,
निष्ठा ,आणि देशप्रेम देखील त्याच्या ब्राम्हण असण्या नसण्यावर अवलंबून असण्याचा संकेत देणारे लेखन 
या पुस्तकांच्या पानोपानी आहे . 
         असा जात्यंध कावळा मराठीसारस्वताच्या सर्वोच्य स्थानी  बसला तरी वर कावकाव आणि खाली घाणच 
करणार ! म्हणूनच त्यावर केवळ पोलिसात केस दाखल करणे पुरेसे नाही तर कुठल्या स्थितीत त्याला 
साहित्य संमेलनाचा अध्यक्ष न होऊ देणे आणि  जातीय  समीकरणे जुळून झालाच   तर त्याला अध्यक्ष पदाच्या 
खुर्चीवरून खाली खेचून त्याची जागा दाखून देणे गरजेचे आहे .
……………………

हे लेख अवश्य वाचा :