Showing posts with label वैदिक धर्माचा पराभव. Show all posts
Showing posts with label वैदिक धर्माचा पराभव. Show all posts

Monday, 9 July 2012

वैदिक धर्म बडविण्यात बौद्ध-जैनांचे योगदान



उपनिषदे : अवैदिक परंपरेचा परिणाम 
 आज भारतात वैदिक धर्म पूर्णत: बुडाला असून, अहिंसाधिष्ठित मूलनिवासी दयाधर्म विविध रूपांत दिसून येतो. महाराष्ट्रातील भक्तिपंथ हे या अहिंसाधिष्ठित मूलनिवासी परंपरेचे एक रूप होय. ब्राह्मणी परंपरेतील उपनिषदे ही वैदिक धर्मापेक्षा मूलनिवासी दयाधर्माला जवळची आहेत. उपनिषदांना वेदान्त म्हणतात. वेदान्त म्हणजेच वेदांचा अंत. उपषिदांत हिंसा  वर्ज्य  केली आहे. वैदिक धर्माचा मुख्य आधारच हिंसा होता. 
उपनिषदांनी वेदांचा मुख्य आधार तोडून वैदिक परंपरा संपविली, म्हणून त्यांना वेदांत म्हणतात. बौद्ध आणि जैन धर्माचा भारतासह संपूर्ण आशिया खंडात प्रसार झाल्यानंतर ब्राह्मणांनी स्वत:च्या परंपरांचा त्याग करून दयाधर्मीय परंपरेचा स्वीकार केला. त्यातून उपनिषदांची निर्मिती झाली. अशा प्रकारे उपनिषदांचे कर्ते ब्राह्मण ऋषि असले तरी त्यातील विचार बिगरब्राह्मणी परंपरेतून घेण्यात आले असल्यामुळे उपनिषदांना अवैदिक दयाधर्म परंपरेत समाविष्ट करणेच अधिक श्रेयस्कर ठरेल. 

बौद्ध आणि जैन धर्माची धास्ती 
बौद्ध आणि जैन धर्मामुळे भारतातील वैदिक परंपरेचा उच्छेद झाला. पुढे कुमारिल भट्ट व आद्य शंकराचार्यांनी वैदिक परंपरा स्थापित केली, तरी तिचा ‘यज्ञसंस्कृती' हा  मूळ आत्मा हरवला होता. शंकराचार्यांनी एकप्रकारे बौद्धमताचा स्वीकार करून वैदिक धर्मात बदल केले. बौद्ध-जैन परंपरांचा हा आघात वैदिकांच्या प्रचंड जिव्हारी लागला. या परंपरांविषयी असंख्य कठोर वचने वैदिकांनी लिहून ठेवली आहेत. बौद्ध-जैन मंदिरांत वैदिकाने प्रवेश करू नये असे कडक निर्बंध घालणारे संस्कृत वचन असे :
हस्तिना ताड्यमानोऽपि न गच्छेज्जैनमंदिरम् !२
हे वाचन पाहता वैदिक आर्य ब्राह्मणांनी बौद्ध आणि जैन धर्माची धास्ती घेतली होती असे दिसून येते.

पशु हिंसेला प्रतिबंध 
वैदिक परंपरेत कर्म हे प्रधान असून त्या काळीही जाती होत्या. वैदिक हे वेदच प्रमाण मानीत. बौद्ध परंपरेत वेद, कर्म व जाती या तिन्ही गोष्टी दयाधर्माच्या विरुद्ध जाऊ लागल्या. त्यामुळे बौद्धांनी त्यांचा नि:पात केला. या संदर्भात मोठ मोठे वादविवाद झाले. (उत्तर काळात कुमारिल भट्टाने बौद्ध पंडितांसोबत घातलेले वादविवाद प्रसिद्धच आहेत.) ‘शेवटी दयाधर्माचा जय होऊन वैदिकांस नमावे लागले. प्रमाणं परमं श्रुति: (अर्थ : श्रुती म्हणजेच वेदवचन हेच प्रमाण) इत्यादि मताभिमानाची सूत्रे जाऊन त्या जागी अस्वग्र्यं लोकविद्धिष्टं (लोकांत जे रूढ आहे ते प्रमाण मानावे.) इत्यादि वचने लोकांमध्ये चालू झाली. यज्ञात पशु मारू नये याविषयी उत्तरकालीन वेदवाङ्मयात अनेक वचने सापडतात. ती सर्व बौद्ध धर्माच्या रेट्यामुळे आलेली दिसतात. ऐतरेय आरण्यकातील हे एक वचन पाहा :
पुरूषं वै देवा: पशुमालभन्त 
अमेध्या: पशवस्तस्मादेतेषां नाश्नीयात
(द्वितीय पंचिका. आठवा खंड)
अर्थ : पशुंतून मेध्य निघून तांदुळांत आले आहे. म्हणून पशूंनी यज्ञ न करता तांदुळांनी करावे. 
तैत्तिरीय आरण्यकाच्या १२ व्या अनुवाकात असाच उपदेश आढळून येतो. 
माता रुद्राणां० मा गामनागामदितिं वधिष्ट ।।ऋग्वेद ६-७-८
या मंत्रात याज्ञिकांस असा उल्लेख उपदेश आहे की, तुम्ही गरीब गायीचा जीव घेऊ नका. गायीला माता म्हटल्याचा हा वेदवाङ्मयातील पहिला उल्लेख होय. कालांतराने गाय ही नुसतीच गोमाता न राहता तिच्यात ३३ कोटी देव घुसडविण्यात आले.  बौद्धांच्या अहिंसा तत्त्वावर कडी करण्याच्या प्रयत्नात वैदिकांनी हे उपद्व्याप केले. त्यात वैदिक धर्माचा मूळ आत्मा मात्र हरवला. एकप्रकारे वैदिक धर्मच पराभूत झाला.
देवा-धर्माच्या नावर हिंसा करणे हे माणूसपणाचे  लक्षण नव्हे. अमानवी वैदिक ब्राह्मण आर्यांना भगवान गौतम बुद्ध व भगवान महावीर यांनी माणूस बनविले.  

अनिता पाटील

गीतेतला वेदविरोध

वंशशुद्धीची कल्पना नाकारली
  
सध्या ज्याला हिंदू धर्म म्हणून संबोधले जाते त्या धर्मात श्रीकृष्णाने भर रणांगणावर अर्जुनाला सांगितलेल्या गीतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आज अस्तित्वात असलेला भारतीय धर्माचा ढाचा भक्ती सांप्रदायाच्या पायावर उभा आहे आणि भक्ती सांप्रदाय गीतेच्या पायावर उभा आहे. गुजरातपासून बंगाल-आसामपर्यंत आणि महाराष्ट्रापासून नेपाळपर्यंत भक्ती संप्रदायाचा प्रभाव आहे. हा सांप्रदाय भारतीय धर्माच्या ब्राह्मणी शाखेपेक्षा पूर्णत: भिन्न आहे. ब्राह्मणी धर्म भेदभावाच्या तत्त्वाला अनुसरतो; तर भक्ती सांप्रदाय समानतेच्या तत्त्वाला अनुसरतो. देशातील सर्वच भागांतील भक्तिपंथियांना ब्राह्मणी छळाला तोंड द्यावे लागल्याचा इतिहास आहे. भक्ती सांप्रदायाने ब्राह्मणी धर्माला सुरूंग लावला. भक्ती सांप्रदायाचे मूळ नाथपंथात आहे. ही परंपरा आदिनाथापासून सुरू होते. या परंपरेतील पहिला महापुरुष मच्छिंद्र होय. ही परंपरा मच्छिंद्र-गोरक्ष-गहिनी-निवृत्ती आणि ज्ञानेश्वर अशी महाराष्ट्रात आली. बंगालात चैतन्य सांप्रदायाच्या रूपाने ती अस्तित्वात आहे. याच परंपरेतील बाबाजी चैतन्य यांना जगद्गुरू संत तुकारामांनी आपले गुरू मानले. अशा प्रकारे वारकरी परंपरा ही नाथपंथात मिसळून गेलेली आहे. या परंपरेने ब्राह्मणी भेदभावाला विरोध करून सर्व जातींना समान तत्त्वावर धार्मिक अधिकार दिले. या समानतेचे मूळ गीतेत सापडते. वेदांना धक्का दिल्याशिवाय समानतेचे तत्त्व अस्तित्वात येऊ शकत नाही. याची कल्पना श्रीकृष्णाला होती. त्यामुळे त्याने गीतेत वेदांतील तत्त्वज्ञानालाच नव्हे, तर खुद्द वेदांनाच बाजूला उचलून फेकले. हा विचार कोणालाही धाडसी वाटेल, पण तोच सत्य आहे. याचे पुरावे इतरत्र नव्हे, तर खुद्द गीतेतच सापडतात. तथापि, ब्राह्मणी हितसंबंध जपण्यासाठी आजपर्यंत गीतेतील हे क्रांतीकारी विचार हेतूत: दाबून टाकण्यात आले. वैदिक विचारांचे सार असलेले मुद्दे काढायचे ठरल्यास पुढील प्रमाणे निघतील :  
१. वंशशुद्धी.
२. ठराविक जातींना विशेषाधिकार. 
३. विशिष्ट जातींना धर्माधिकार देण्यास नकार. 
४. वेद सर्वश्रेष्ठ. वेदांचा शब्द अंतिम.
हे सारमयी मुद्दे श्रीकृष्णाने गीतेत कसे निकाली काढले ते आता आपण टप्प्याने पाहू. पहिले तीन मुद्दे वेगवेगळे दिसत असले तरी ते एकमेकांशी संबंधित आहेत. किंबहुना एकच मुद्दा वेगवेगळ्या रूपात समोर येताना दिसतो.
तो म्हणजे वंशशुद्धी.

अर्जुन का घाबरला? 
अर्जुन रणांगणात येतो. समोर आपले नातेवाईक पाहून हतधैर्य होतो. माझ्याच नातेवाईकांना कसे मारू, असा प्रश्न त्याला पडतो. आणि तो रथातून खाली उतरतो. त्याच्या हातील गांडीव धनुष्य गळून पडते. +न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यम सुखानिच्+ असे म्हणून अर्जून युद्ध करण्याचे नाकारतो. त्यावर श्रीकृष्ण त्याला गीता सांगतो. हा गीतेचा कारणभाव आजपर्यंत आपल्याला सांगितला जातो. यात काही चूकही नाही. पण हे पूर्ण सत्य नाही. ब्राह्मणवादी आपल्याला अर्धेच सत्य सांगत आहेत. किंबहुना अर्जुनाने उपस्थित केलेला मुख्य मुद्दा जाणीवपूर्वक दुर्लक्षिला जातो. काय आहे हा मुख्य मुद्या? हा मुख्य मुद्दा आहे, वंशशुद्धीचा! अर्जुनाच्या तोंडचे गीतेच्या पहिल्या अध्यायातील पुढील श्लोक पहा :

कथं न ज्ञेयमस्माभि: पापादस्मान्निवर्तितुम ।
कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन् ।।३८।।
कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा: सनातना: ।
धर्मे नष्टे कुलं कृत्स्नमधर्मोऽभिभवत्युत ।।३९।।
अधर्माभिभवात्कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रिय: ।
स्त्रीषु दुष्टासु वारष्णेय जायते वर्णसंकर: ।।४०।।
संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च ।
पतन्ति पितरो ह्येषां लुप्त पिण्डोदकक्रिया: ।।४१।।
दोषैरेतै: कुलघ्नां वर्णसंकरकारकै: ।
उत्साद्यन्ते जातिधर्मा: कुलधर्माश्च शाश्वता: ।।४२।।
उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन ।
नरकेऽनियतं वासो भवतीत्यनुशुश्रूम ।।४३।।

हे पहिल्या अध्यायातील अंतिम टप्प्यातील श्लोक आहेत. यानंतर उपसंहाराचे तीन श्लोक येऊन पहिला अध्याय संपतो. यावरून या श्लोकांचे महत्त्व लक्षात येते. हे श्लोक अर्जुनाच्या मनातील सर्वांत मोठे प्रश्न आहेत. पण या प्रश्नांची चर्चाच आपल्याकडे कधी होत नाही. कारण त्यांची उत्तरे अत्यंत धक्कादायक आणि आपल्या मूळ धार्मिक धारणांना धक्का देणारी आहेत. 
हे सर्व समजून घेण्यासाठी आपण प्रथम या श्लोकांचा अर्थ समजून घेऊ या :

युद्ध केल्याने कुलक्षय म्हणजेच कुलांचा नाश होणार आहे. तसेच कुलक्षय करणे हे पाप आहे, हे माहीत असूनही आपण हे पाप का करावे ।।३८।।
कुलांचा नाश झाल्याने कुलांच्या सनातन परंपरा नष्ट होतात. धर्म नष्ट होऊन अधर्माचा पगडा बसतो ।।३९।।
अधर्माचे प्राबल्य होते तेव्हा कुलातील स्त्रिया प्रदुषित होतात. कुलस्त्रिया प्रदुषित झाल्याने वर्णसंकर होतो ।।४०।।
वर्णसंकरामुळे नरकमय स्थिती प्राप्त होते. पिंडदानादि क्रिया नष्ट होतात. अंतत: पितरे पतन पावतात ।।४१।।
कुलपरंपरांचा अशा प्रकारे नाश केल्यामुळे सर्व प्रकारच्या जातीव्यवस्था नष्ट होतात. जातिधर्म आणि कुलधर्म उद्ध्वस्त होतो ।।४२।।
हे रक्षणकत्र्या श्रीकृष्णा मी असे ऐकले आहे की, अशा प्रकारे कुलधर्म नष्ट करणारे लोक नेहमी नरकात राहतात ।।४३।।

या सहा श्लोकांतून असे दिसते की, अर्जुनाला युद्धाची पर्वा नाही. त्याची भीती वेगळीच आहे. त्याला वाटते की, +युद्ध केल्यानंतर वीर पुरूष मारले जातील. त्यांच्या बायका विधवा होतील. विधवा बायका प्रदुषित होतील. त्यातून वर्णसंकर होईल. जातीव्यवस्था नष्ट होईल.+ ही भीती त्याला वाटते कारण, असे केल्याने आपण नरकात जाऊ असे त्याला वैदिक परंपरेने शिकविले आहे.

अर्जुनाला चिंता जातीव्यवस्था नष्ट होण्याची 
वेदांनी घालून दिलेला वर्णाश्रम धर्म हा जातीसंस्थेपेक्षा भिन्न आहे, असा युक्तिवाद ब्राह्मणवादी करतात. +युद्धाने जातीधर्म म्हणजे जातीव्यवस्था नष्ट होईल+ अशी भीती खुद्द अर्जुनानेच व्यक्त केली आहे. त्यामुळे जातीव्यवस्था आणि वर्णव्यवस्था एकच आहेत, हे सिद्ध करण्यासाठी दुसरे कोणतेही प्रमाण देण्याची गरज नाही. जातीव्यवस्था नष्ट होणे म्हणजेच वेगवेगळ्या जातींतील पुरूष आणि स्त्रियांना एकत्र येण्याची परवानगी देणे होय. यालाच वर्णसंकर म्हणतात. वर्णसंकरातून नको असलेली मिश्र संतती निर्माण होईल, ही अर्जुनाची खरी भीती आहे. जातीव्यवस्था नष्ट होण्याच्या संभाव्य धोक्यामुळे अर्जुन एवढा घाबरला आहे की, तो कौरवांच्या हातून मरायलाही तयार होतो. तो म्हणतो :
धार्तराष्ट्रा रणे हन्युस्तन्मे क्षेमतरं भवेत् ।।४५।।
अर्थ : धृष्टराष्ट्राच्या पुत्रांनी मला ठार मारले तरी ते (जातीव्यवस्था मोडण्याचे पाप करण्यापेक्षा) क्षेमतर म्हणजे अधिक चांगले आहे.
जाती व्यवस्था नष्ट होण्याचा धोका हीच अर्जुनाची मुख्य चिंता आहे. परंतु हा मुद्दा कोणीही अधोरेखित करीत नाही. कारण आपली परंपरा झापडबंद आहे. अर्जुनाच्या +आपल्याच बांधवांना कसे मारू?+ या प्रश्नाभोवतीच ही परंपरा फिरत राहिली आहे.

कृष्णाने अर्जुनाची चिंता दुर्लक्षिली! 
जातीव्यवस्था उच्चाटनाची भीती अर्जुनाच्य दृष्टीने मुख्य असली तरी श्रीकृष्णाने या मुद्याला अजिबात महत्त्व दिलेले नाही. भगवतगीतेच्या संपूर्ण १८ अध्यायांत या प्रश्नाचे थेट उत्तरच श्रीकृष्णाने दिलेले नाही. वर्णसंकर होणार असेल, तर होऊ दे असेच श्रीकृष्णाने अर्जुनाला सूचित केले, असा याचा अर्थ होतो. आज भारतात कोणताही मानववंश शुद्ध स्वरूपात अस्तित्वात नाही. भारत देश हा मिश्रवंशीयांचा आहे. एकाच बापाच्या पोटी जन्मलेल्या दोन भावांतील एक जण फॉरेनर वाटावा एवढा गोरा आणि घा-या डोळ्यांचा असतो, तर दुसरा काळाकुट्ट असतो. अगदी ऋग्वेदी ब्राह्मणांतही हीच स्थिती आहे. भारती युद्धाचेच हे परीणाम आहेत. ते स्वीकारून श्रीकृष्णाने अर्जुनाला +युद्धस्व भारत+ असे म्हणून युद्ध करण्याचा आदेश दिला. वंशशुद्धीच्या भेदभावकारक तत्त्वाला श्रीकृष्णाने तिलांजली दिली. 

श्रीकृष्णाने वर्ण संकराला अप्रत्यक्षरित्या पाठींबाच दिल्याचे यावरून दिसते.
अनिता पाटील

Sunday, 4 December 2011

श्रीकृष्ण : वेदांना विरोध करणारा पहिला महापुरुष




वैदिक इंद्राची फटफजिती 
भारतातील पहिलचा वेदविरोधक महापुरूष कोण असा प्रश्न विचारला गेला तर त्याचे उत्तर नि:संशयपणे श्रीकृष्ण असे द्यावे लागेल. काळा श्रीकृष्ण गोऱ्या  वैदिक ब्राह्मणांचा देव झाला, यातच सर्वकाही आले. 
महाभारत आणि श्रीमद्भागवातील आणखी काही उदाहरणे देऊन मी हा मुद्दा स्पष्ट करते. वैदिकांचा मुख्य देव इंद्र आणि ब्रह्म आहेत. तर मुख्य ग्रंथ ऋग्वेद आहे. यजुर्वेद अथर्ववेद सामवेद बरेच नंतरचे आहेत, याबाबत आता विद्वानांत एकमत झालेले आहे. वेदांत ३३ प्रकारचे देव आहेत. (३३ कोटी या शब्दप्रयोगातील कोटी या शब्दाने संख्या दर्शविली जात नाही. कोटी म्हणजे वर्ग किंवा प्रकार.) ऋगवेदाचा नायक इंद्र आहे. तर खलनायक वृत्रासूर आहे. इंद्राने आपल्या वज्र नावाच्या शस्त्राने वृत्रासुराला ठार मारले. याचे वर्णन ऋगवेदात येते. इंद्राने वृत्रासुराची पुरे म्हणजेच तटबंदीयुक्त नगरे उद्ध्वस्त केली. म्हणून त्याला वेदांनी पुरंदर म्हटले आहे. वैदिक यज्ञाची मुख्य देवताही इंद्रच आहे. वेदांत इंद्राच्याच प्रार्थनांना मुख्यस्थान आहे. त्यातीलच ही एक प्रार्थना पाहा :
ॐ स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा: स्वस्ति न: पूषा विश्ववेदा: ।
स्वस्ति नस्ताक्ष्र्यो अरिष्टनेमि: स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ।।
अर्थ - ज्याची कीर्ती आम्ही वृद्ध लोकांकडून ऐकत आलो आहोत, तो इंद्र आमचे कल्याण करो. सर्वसंपन्न असा जो पूषा म्हणजेच सूर्य आमचे कल्याण करो. ज्याती गती अकुंठित आहे असा जो ताक्ष्र्ये तो आमचे कल्याण करो. बृहस्पती आमचे कल्याण वृद्धिंगत  करो.
या प्रार्थनेत पहिले नाव इंद्राचे येते. इंद्राच्या अशा असंख्य प्रार्थनांनी वेदवाङ्मय भरून राहिले आहे. त्या सर्वांत पडण्याची गरज नाही. महाभारत काळाच्या पूर्वसंध्येपर्यंत इंद्राचे महत्त्व टिकून राहिले दिसून येते. महाभारत काळात मात्र नव्या धर्ममताने इंद्र आणि इतर वैदिक देवतांचा पराभव केला.
इंद्र यज्ञावर बंदी
महाभारतकाळात श्रीकृष्णाने वैदिक परंपरेला पहिला दणका दिला. इंद्राला पर्जन्याची देवता मानले जाई. इंद्राला प्रसन्न करण्यासाठी गोकुळात इंद्रयाग करण्याची प्रथा होती. ती श्रीकृष्णाने बंद केली. त्याऐवजी गोवर्धन पर्वताची पूजा करण्याचा आदेश आपल्या अनुयायांना दिला. नंदराजाने इंद्रयज्ञाची संपूर्ण तयारी केली होती. ऐनवेळी श्रीकृष्णाने हस्तक्षेप करून ही सामग्री गोवर्धन पर्वताच्या यागासाठी वापरण्याचे आदेश दिले. श्रीकृष्ण भागवतात म्हणतो :
य इंद्रयाग संभारास्तैरयं साध्यतां मख:
(श्रीमद्भागवत. स्कंध : १० अध्याय : २४ श्लोक : २५)
अर्थ : इंद्र-याग (याग म्हणजे यज्ञ) करण्यासाठी जी सामग्री तयार करण्यात आली आहे, ती आता हा (गोवर्धन पर्वताचा) यज्ञ करण्यासाठी वापरा.
गोवर्धन पूजेची परंपरा आजही उत्तर भारतात सुरू आहे. विशेष म्हणजे क्षत्रिय राजपुतांत गोवर्धन पूजेला अत्यंतिक महत्त्व आहे. महाराष्ट्रातील परदेशी राजपूत या जमातीतही गोवर्धन पूजा केली जाते. अशा एका पूजेला मी स्वत: उपस्थित राहिले आहे. आपली पूजा बंद झाल्यामुळे इंद्र कसा चिडला त्याने पर्जन्याची अमाप वृष्टी कशी केली आणि श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून गोकूळवासियांचे संरक्षण कसे केले, याची रसाळ वर्णने कालांतराने पुराणिकांनी करून ठेवली. इंद्राने श्रीकृष्णावर हल्ला केला, पण त्यात त्याची फटफजिती झाली आणि त्याला श्रीकृष्णासमोर शरण यावे लागले, अशीही वर्णने पुराणांत आढळतात. 
इंद्र सैरावैरा पाळतो 
वेदांतील नायक असलेला इंद्र अशा प्रकारे महाभारतात पराभूत झाला. पुढे श्रीमद्भागवत आणि इतर १८ पुराणांत तर इंद्राची अवस्था फारच हीन दीन अवस्था झाली. दानवांचे संकट आले की वेदांतील महापराक्रमी इंद्र सैरावैरा पळत सुटतो. संकटाच्या प्रत्येक टप्प्यावर तो श्रीविष्णूला शरण जातो. या काळात इंद्र मागे पडून विष्णू ही मुख्य देवता म्हणून उदयास आली होती.  

अनिता पाटील, औरंगाबाद.

ब्रह्मदेवाची फटफजिती



महाभारत काळात वैदिकांचा पराभव 
वेदांचे शेवटचे परंतु मुख्य अंग समजल्या जाणाèया उपनिषदांमध्ये ब्रह्म हीच मुख्य देवता म्हणून समोर येते. आद्य शंकराचार्यांनी प्रमुख १० उपनिषदांवर भाष्ये लिहिली. या सर्व भाष्यांचे सार त्यांनी एका ओळीत सांगितले आहे. +ब्रह्म सत्य जगन्मिथ्या+. म्हणजे ब्रह्म हेच सत्य असून जग हे मिथ्या आहे.
वेदांचाच भाग असलेल्या ब्राह्मण ग्रंथांत सृष्टीचा रचयिता म्हणून ब्रह्मदेवाचे वर्णन येते. पुरुष सुक्तात ब्रह्मदेवाने मानवजातीची निर्माण केल्याचे वर्णन आहे. असा हा ब्रह्मदेवही महाभारतकाळात दुय्यम अवस्थेत गेलेला दिसतो. ब्रह्मदेवाला श्रीविष्णूने आपल्या नाभिकमळापासून निर्माण केल्याचे वर्णन पुराणांत येते. जे बलशाली असतात, त्यांच्याच देवता समाजमान्य होतात, हा अत्यंत साधा सिद्धांत आहे. याचाच अर्थ महाभारतकाळापर्यंत वैदिकांचा पूर्ण पराभव झाला होता. त्यामुळे वैदिक देवता हळूहळू दुय्यम स्थानी जात नाहिशा झाल्या. श्रीकृष्ण चरित्रात इंद्राच्या फजितीचे जसे वर्णन येते तसेच ब्रम्हदेवाच्या फजितीचेही वर्णन येते. 
गोपाल-गोहरण  
श्रीकृष्ण गोकुळात असताना इतर गोपाळांबरोबर गायी घेऊन रानात जात. एक दिवस ब्रह्मदेवाने सर्व गायी आणि गोपाळांचे हरण केले. त्यांनतर श्रीकृष्णाने स्वत:च गायी आणि गोपाळाचे रूप धारण केले. भागवतातील यासंबंधीचा श्लोक असा :
स्वयमात्माऽऽत्मगोवत्सान् प्रतिवार्यात्मवत्सपै: ।
क्रीडन्नात्मविहारैश्च सर्वात्मा प्राविशद् व्रजम ।।
(श्रीमद्भावगत स्कंध : १० अध्याय : १३ श्लोक : २०)
अशा प्रकारे वर्षभर श्रीकृष्ण गायी-गोपाळांच्या रूपात वावरला. शेवटी ब्रह्मदेव वृंदावनात आला तेव्हा ही सर्व लीला पाहून भ्रमित झाला. श्रीकृष्णाच्या पायी लोटांगण घेत राहिला. भागवतात म्हटलेय की :
उत्थायोत्थाय कृष्णस्य चिरस्य पादयो: पतन्।
(श्रीमद्भावगत स्कंध : १० अध्याय : १३ श्लोक : ६३)
अर्थ : श्रीकृष्णाला शरण आलेला ब्रह्मदेव श्रीकृष्णाच्या पायावर पडायचा, उठायचा आणि पुन्हा पायावर पडायचा.
ब्रह्मदेवाने श्रीकृष्णावर माया चालविण्याचा प्रयत्न करून पाहिला पण तो फसला. याचे वर्णन करताना ब्रह्मदेव क्षुद्र ठरविला गेला आहे. हा पाहा तो श्लोक :
तम्यां तमोवन्नैहारं खद्योतार्चिरिवाहनि ।
महतीतरमायैश्यं निहन्त्यात्मनि युंजत: 
(श्रीमद्भावगत स्कंध : १० अध्याय : १३ श्लोक : ४५)
अर्थ : ज्या प्रमाणे रात्रीच्या घोर अंध:कारात वनातील दèयाखोèयांतील अंध:कार दिसत नाही, ज्या प्रमाणे दिवसाच्या प्रकाशात काजव्यांचा प्रकाश दिसत नाही, त्याप्रमाणे जेव्हा क्षुद्र पुरुष महापुरुषांच्या मायाजालाचा महापुरुषांवर कोणताही परीणाम होत नाही. उलट हे क्षुद्र पुरुष आपल्या मायाजालाचा प्रभावच हरवून बसतात.
ब्रह्माच्या शोधासाठी वैदिक ऋषि आपली बुद्धि काही हजार वर्षे पणाला लावत होते. पण त्यांना ब्रह्मघोटाळा काही सुटला नाही. ब्रह्मदेवाला एक क्षुद्र पुरूष बनवून हा ब्रह्मघोटाळा कायमचा सोडवून टाकला.  

अनिता पाटील, औरंगाबाद. 
.........................................................................