Showing posts with label मराठा आरक्षण. Show all posts
Showing posts with label मराठा आरक्षण. Show all posts

Tuesday, 27 December 2016

हरि नरके यांचा खोटारडेपणा

मराठा समाजाच्या विरोधात जातीयवादाचा पुरस्कार करून घटनात्मक तरतुदी व सामाजिक न्यायाचा खून पाडण्याचा मतलबी डाव

हरि नरके हे गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाच्या विरोधात अपप्रचार करीत आहेत. ते पुणे विद्यापीठात प्राध्यापक वगैरे कोणी नसून केवळ महात्मा फुले अध्यासन केंद्राचे मानद संचालक म्हणून कार्यरत असल्याचे आम्हाला अलिकडेच समजले आहे. महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीत मराठा समाजाचे योगदान मोठे असूनही हरि नरके सातत्याने मराठा
समाजाचा द्वेष करतात. आता राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयात भक्कम पुरावे सादर केलेले आहेत. अभूतपूर्व मराठा क्रांती मोर्चे आणि राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी दाखल केलेले अडीच हजार पानांचे प्रतिज्ञापत्र यामुळे व्यापक सकारात्मक दृष्टीकोन तयार होत आहे. तसेच आज पर्यंत भिकूजी इदाते, रावसाहेब कसबे आणि हरि नरके यांनी राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून केलेला जातीयवाद व खोडसाळपणाही आता उघड होत आहे. या परिस्थितीत हरि नरके यांनी रविवारी, 25 डिसेंबर रोजी औरंगाबाद येथील एका जाहीर व्याख्यानातून मराठा आरक्षणाबाबत खोटारडेपणा केल्याच्या बातम्या स्थानिक वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यात हरि नरके यांनी अत्यंत खोटी व मतलबी विधाने करून मराठा आरक्षणाबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याबद्दलची वस्तुस्थिती समोर मांडण्यासाठी बाळासाहेब सराटे यांनी लिहिलेला एक लेख 'अपाविमं'च्या वाचकांसाठी देत आहोत.
हरि नरके यांच्या व्याख्यानासंबंधी प्रकाशित झालेल्या बातम्यातील मजकूर
अत्यंत गंभीर आहे. त्यातून रावसाहेब कसबे प्रकरणी हरि नरकेंचा तिळपापड
झालेला आहे, हे स्पष्ट होते.
"रावसाहेब कसबे प्रकरणात संघटनांचे लोक चॅनलवर येऊन खोटे बोलतात" असा
आरोप त्यांनी केला आहे. जसे काही खरे बोलण्याचा ठेका त्यांनी एकट्यानेच
घेतला असल्यागत त्यांचे हे बोलणे आहे. त्यांनी पुढे
"मुख्यमंत्र्यांविरूद्ध एका तरी ओबीसी आमदाराने हक्कभंग दाखल केला
पाहिजे" असे रंजक विधानही केलेले आहे. खरंच एखाद्या तरी ओबीसी आमदाराने
असा हक्कभंग प्रस्ताव आणून दाखवावाच ! मुख्यमंत्री मुळातच कायद्याच्या
आधारे व घटनेच्या चौकटित बोलले आहेत. रावसाहेब कसबेंनी बापट आयोगाचे
सदस्य म्हणून एक अवाक्षरही अभ्यास केलेला नाही; त्यांनी मराठा समाजाच्या
क्षेत्र पाहणीत किंवा सर्वेक्षणात सहभागही घेतला नाही आणि एका शब्दाने
लिखित अभिप्रायही दिलेला नाही. त्यामुळे त्यांना ऐनवेळी मराठा
आरक्षणाच्या विरोधात मतदान करण्याचा अधिकार पोहचतो काय? हाच खरा प्रश्न
आहे.

सप्टेंबर 2004 पासून बापट आयोगापुढे "मराठा समाजाचा इतर मागासवर्गात
समावेश करण्याचा प्रस्ताव" दाखल झालेला होता. ऑगस्ट 2007 मध्येच बापट
आयोगाची खरी मुदत संपली होती. पण तोपर्यंत बापट आयोगाने मराठा आरक्षणाचा
अंतिम अहवाल तयार केला नव्हता. म्हणून या आयोगास ऑगस्ट 2008 पर्यंत
मुदतवाढ देण्यात आली होती. ही वाढीव मुदत संपताना दि. 25 जून 2008
रोजीच्या पत्रानुसार रावसाहेब कसबेंची सदस्यपदी नियुक्ती केली गेली आणि
दि. 25 जूलै 2008 च्या बैठकीत त्यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात मतदान
केले. यातून रावसाहेब कसबेंची अनैतिकता व बेजबाबदारपणा सिद्ध होतो.
त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी न्याय्य भूमिका
मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत मांडली आहे. वास्तविक, ओबीसी प्रवर्गाच्या
विरोधात त्यात काहीही विधान केलेले नाही. तरीही हरि नरके एवढे का चिडले
आहेत? हरि नरके मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणण्याची दिवास्वप्ने
का रंगवित आहेत? या प्रश्नांच्या उत्तरातच हरि नरकेंचा खरा जातीयवादी
चेहरा दडलेला आहे.

हरि नरकेंचा खोटारडेपणा पुढील परिच्छेदातून आणखी उघड होतो. ते म्हणतात,
"ज्या दिवशी राज्य सरकार आपल्या राजपत्रामध्ये अधिसूचना प्रकाशित करेल
त्या तारखेपासून तो कायदा अंमलात येईल. हा (राज्य मागासवर्ग आयोगाचा)
कायदा 2010 पासून अंमलात आला. रावसाहेब कसबे यांची नियुक्ती 2008 मध्ये
झाली. त्यामुळे हा कायदा कसबे यांच्या नियुक्तीस लागूच नव्हता."
हरि नरके यांचे हे विधान निखालस खोटे आहे. ते स्वतः 2011 ते 2014 या
काळात राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य होते. त्यामुळे त्यांचे हे विधान
खरेच असेल असे वाटण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात दि. 14 ऑगस्ट 2006 रोजी
हा महाराष्ट्र राज्य मागासवर्ग कायदा किंवा अधिनियम महाराष्ट्र शासनाच्या
राजपत्रात प्रकाशित केलेला आहे आणि त्याच दिवसापासून तो लागूही झालेला
आहे. हा महाराष्ट्र शासनाचा 2006 चा 34 वा कायदा म्हणून ओळखला जातो.
विशेष म्हणजे ना. राणे समितीच्या अहवालात पृ. 25 वर "2006 चा महाराष्ट्र
अधिनियम क्र. 34 हा दि. 14 ऑगस्ट 2006 रोजी अधिसूचित झाला" असे स्पष्टपणे
नमूद केलेले आहे. याच अहवालात पुढे पुढे पृ. 31 वरही मंत्रीमंडळ
उपसमितीच्या दि. 22 जानेवारी 2009 च्या बैठकीच्या संदर्भात "महाराष्ट्र
राज्य मागासवर्ग आयोग अधिनियम 2005 (अधिनियम क्र. 34/ 2006)" असा स्पष्ट
उल्लेख आहे. यावरून हा कायदा 2010 पासून नव्हे तर दि. 14 ऑगस्ट 2006
पासूनच लागू झालेला आहे, हेच सिद्ध होते. तसेच हरि नरके इतक्या गंभीर
विषयातही खोटारडेपणा करतात, हेही दिसून येते.

हरि नरकेंनी याच कायद्यातील कलम 4 (4) बाबतीतही असाच खोटारडेपणा करून
संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते म्हणतात की,
"या कायद्याचाही मुख्यमंत्र्यांनी चुकीचा अर्थ लावला आहे. कलम चारमधील
उपकलम चार अनुसार सदस्याचे पद त्याचा पदावधी संपण्याच्या तारखेपूर्वी सहा
महिन्यात रिक्त झाले तर ते भरता येणार नाही. मात्र ही जागा अडीच
वर्षांपूर्वी रिकामी झाली. म्हणून ती भरली होती. या कलमान्वये ती भरायला
बंदी नाही. प्रत्यक्ष जागा दोन महिने आधी भरली असली तरी पद रिकामे झाले
होते ते अडीच वर्षांआधी. त्यामुळे रिक्त कधी झाली ती तारीख यात आहे. भरली
कधी ते नाही. हे मुख्यमंत्र्यांना माहित नाही का?"
एखाद्या भ्रमिष्टासारखे आणि अत्यंत बालीश असे हे विधान आहे, हे सहज सिद्ध होते.
मूलतः कलम 4 (4) मधील संबंधित वाक्य असे आहे की,
"If the vacancy of a member occurs within six months preceding the
date on which the term of the member expires, the vacancy shall not be
filled in."
याचा सरळ अर्थ असा आहे की, "आयोगातील सदस्यांच्या रिक्त झालेल्या किंवा
असलेल्या जागी सदस्याचा पदावधी संपण्याच्या शेवटच्या सहा महिन्यात
सदस्याची नेमणूक करण्यात येणार नाही." अशी जागा मुळातच भरली गेली नसेल
अथवा मध्येच केंव्हाही रिक्त झालेली असेल तरीही हा नियम लागू आहे. पण हरि
नरके यांनी मात्र वेगळाच मतलबी अर्थ लावला आहे. ते म्हणतात, "अशी जागा
सहा महिन्यांपूर्वी रिक्त झाली असेल तर त्यास हा नियम लागू होत नाही."
येथे ते पातळी सोडून अन्वयार्थ काढीत आहेत. या नियमात "जागा केंव्हा
रिक्त झाली हे महत्वाचे नसून" कोणत्याही कारणाने रिक्त झालेल्या किंवा
असलेल्या जागी "पदावधी संपण्याच्या शेवटच्या सहा महिन्यात सदस्याची
नियुक्ती केली जाणार नाही" हेच फक्त महत्वाचे आहे.
राज्य मागासवर्ग आयोगाच्या अधिनियमात हा नियम घालण्याचे पुढील दोन
प्रमुख उद्देश असावेत. एक म्हणजे पदावधी संपण्याच्या शेवटच्या सहा
महिन्यात तो सदस्य अपेक्षित योगदान देऊ शकणार नाही; आणि दुसरे म्हणजे
उर्वरित सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीत विचाराधीन विषयाच्या अभ्यासात व
संशोधनात पुरेसा सहभाग देणे शक्य होणार नाही. या प्रक्रियेत हरि नरकेंचा
खोडसाळ तर्क कुचकामी ठरतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांवर आगपाखड करून काहीही
साध्य होणार नाही.

नरकेंचा जातीयवादी दृष्टीकोन
हरि नरके यांनी इतरही काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत. ते म्हणतात की,
"ओबीसी म्हणजे आम्ही काही या देशातील भिकारी नाही. लोहार, सुतार, चांभार,
माळी हे कलाविष्काराचे निर्माते आहेत. त्यांच्यात विविध गुणवत्ता आहे.
ज्ञान आणि कौशल्याचा मिलाफ म्हणजे ओबीसी समाज आहे."
हरि नरकेंनी चांभार समाजाचाही ओबीसीत उल्लेख केला आहे, ते सर्वस्वी
चुकीचे आहे. कारण चांभार समाज पहिल्यापासूनच अनुसूचित जाती प्रवर्गात
समाविष्ट आहे. पण हरि नरके यांनी केलेले हे वर्णन ग्राह्य धरले तर "सध्या
ओबीसीत असलेल्या जाती आरक्षणास पात्र ठरत नाहीत"; कारण त्यांच्याकडे
ज्ञान व कौशल्य भरपूर आहे; या जाती शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या नाहीत
आणि अकूशलही नाहीत, असे नरकेंचे म्हणणे आहे. मंडल अहवालानुसार "केवळ
अंगमेहनतीची कामे करून उदरनिर्वाह करणारे" वर्गच सामाजिकदृष्ट्या
मागासलेले आहेत; कौशल्य व ज्ञानाच्या आधारे जगणारे लोक मागासलेले ठरत
नाहीत. तरीही हे वर्ग ओबीसी आरक्षणाचे फायदे घेत आहेत.
हरि नरके पुढे म्हणाले की, "आरक्षणासाठी खोटे पुरावे दिले जात आहेत."
राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी मुंबई उच्च न्यायालयात नुकतेच अडीच हजार
पानांचे पुरावे दाखल केले आहेत, त्या संदर्भात हरि नरकेंनी हे विधान
केलेले आहे. पण त्यातील नेमका कोणता पुरावा खोटा आहे, हे हरि नरकेंनी
"त्यांच्याकडील पुराव्यासह" सिद्ध केले पाहिजे. पण त्यांचा एवढा अभ्यास
असता तर, त्यांनी असा जातीयवाद केलाच नसता. राज्य सरकारने दाखल केलेले
पुरावे न अभ्यासता केवळ "मराठाविरोधी" भूमिकेतून हरि नरके खोटे बोलतात.
यापूर्वी प्रकाश झा यांचा 'आरक्षण' सिनेमा न बघताच त्यांनी असाच खोटा
विरोध केला होता.

हरि नरके स्वतः सवर्ण जातीत जन्मले व वाढले; तरी त्यांनी जातीचे भांडवल
करून पात्रतेपेक्षा जास्त पदे प्राप्त केलीत आणि सरकारी फायदे लाटले.
तरीही ते महात्मा फुले व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव पुढे करून
मराठा समाजाबाबत जातीयवाद करतात. त्यांनी पुढे म्हटले आहे की, "फुले -
आंबेडकर तुम्हाला चालणार नसतील तर तुम्ही आम्हाला का चालावेत?"
पण वस्तुस्थिती अशी आहे की, सध्या जेलमध्ये असलेले आणि सबळ पुराव्यांसह
न्यायालयाने ज्यांना वारंवार जामीन नाकारला आहे, अशा गुन्हेगार छगन
भुजबळांना वाचविण्यासाठी हरि नरकेंच्या जातभाईंनी नाशिकमध्ये मोर्चा
काढला; ही गोष्ट अगदी ताजी आहे. त्या मोर्चात तर सगळीकडे केवळ छगन
भुजबळांचेच फोटो झळकत होते. तेंव्हा कुठे गेले होते त्यांचे "फुले -
आंबेडकर" प्रेम?" असे गुन्हेगारांना वाचविण्यासाठी रस्त्यावर येऊन मोर्चे
काढणारे लोक "फुले - आंबेडकरांचे अनुयायी" होऊ शकत नाहीत.
महात्मा जोतीराव फुलेंनीच छत्रपती शिवाजी महाराज आमच्या पर्यंत
पोहोचवले आहेत; मराठा समाज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील दुवा
म्हणजे महात्मा जोतीराव फुले आहेत; असे मराठा समाज मानतो. तर डाॅ.
बाबासाहेब आंबेडकर आमचे राष्ट्रीय महामानव आहेत, ही मराठा समाजाची धारणा
आहे. हरि नरकेंना "फुले - आंबेडकरांचे एकमेव अनुयायी" म्हणून
आंतरराष्ट्रीय पेटेंट मिळालेले नाही, हे त्यांनी विसरू नये.
राजकीय निवडणूकीच्या संदर्भात "मराठा समाजाला भिती घालण्याचा"
प्रयत्नही हरि नरकेंनी केला आहे. मराठा समाजातील लोकांचा लोकशाही
प्रक्रियेवर विश्वास आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत माळी जातीचे जास्त
उमेद्वार निवडून आणून गुन्हेगार छगन भुजबळांना मुख्यमंत्री करण्यासाठी
हरि नरके धडपड करीत असतील, तर त्यांना आमचा अजिबात विरोध नाही. पण हरि
नरकेंकडे थोडासाही प्रामाणिकपणा शिल्लक असेल तर त्यांनी आधी "कोणत्या
अहवालाच्या आधारे तथा कोणत्या निकषांवर माळी जातीचा ओबीसीत समावेश केलेला
आहे, याबाबत आणि राज्य मागासवर्ग आयोग अधिनियमातील कलम 11 च्या
अंमलबजावणीबाबत बोलण्याचे धाडस करून दाखवावे. या कलमान्वये दर दहा
वर्षांतून किमान एकदा तरी ओबीसी प्रवर्गातील प्रत्येक जातीचे मागासलेपण व
शासकीय सेवेतील प्रतिनिधित्व तपासणे आणि त्यातील प्रगत जातींना
आरक्षणातून वगळणे बंधनकारक आहे. त्याबाबत हरि नरके काहीच बोलत नाहीत, ही
वस्तुस्थिती आहे.

-बाळासाहेब पाटील सराटे
(संचालक, छत्रपती शिवाजी प्रबोधिनी आणि 
आरक्षणाचे अभ्यासक तथा 
सामाजिक - आर्थिक विषयाचे संशोधक)
मो. क्र. 9422208266

Monday, 30 June 2014

मराठा समाजाला 16 टक्‍के आरक्षण

मराठा समाजाला 16 टक्‍के आणि मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय  राज्य मंत्रिमंडळाने घेतला. गुरूवार दि. २६ जून २०१४ रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा आणि मुस्लिम आरक्षणाचा निर्णय घोषित केला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्य सरकारने स्वतंत्रपणे शैक्षणिक - सामाजिक मागास प्रवर्ग निर्माण केला असून, या अंतर्गत सध्याच्या 52 टक्‍के आरक्षणाला धक्‍का न लावता स्वतंत्रपणे 16 टक्‍के आरक्षण देण्यात आले आहे. या निर्णयाने राज्यातले सामाजिक आरक्षण 73 टक्‍क्‍यांपर्यंत गेले आहे. 

श्रीमंत मराठ्यांना लाभ मिळणार नाही
राज्यघटनेच्या कलम 15(4) आणि 16 (4) नुसार मराठा व मुस्लिम समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये सरळसेवा भरतीत आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठा समाजाला या आरक्षणाचा लाभ घेताना उन्नत व प्रगतचा (क्रिमिलेअर) निकष लागू राहील, असे मुख्यमंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले. याचाच अर्थ श्रीमंत मराठ्यांना या आरक्षणाचा कोणताही लाभ मिळणार नाही.  न्यायमूर्ती बापट यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मागासवर्गीय आयोगाच्या 22 व्या अहवालावर मंत्रिमंडळात चर्चा करण्यात आली. मंत्रिमंडळाने हा अहवाल अंशत: स्वीकारला; तर मराठा आरक्षण फेटाळणाऱ्या शिफारशी नाकारल्या. मराठा समाजाला ओबीसी समाजात समाविष्ट करून आरक्षण देण्याची शिफारस मंत्रिमंडळाने फेटाळली. त्याऐवजी नारायण राणे समितीने दिलेल्या अहवालाची जोड देत मराठा आरक्षणाच्या निर्णयावर शिक्‍कामोर्तब केले. 

जुन्या आरक्षणातील मुस्लिमांना लाभ नाही
अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्‍या जमाती, विशेष मागासप्रवर्ग व इतर मागास प्रवर्गातील मुस्लिम समुदायातील ज्या घटकांना यापूर्वी आरक्षणाचा लाभ देण्यात आला आहे, त्यांना पूर्वीप्रमाणे आरक्षण सुरू राहील व त्यांना विमाप्र (मुस्लिम) या 5 टक्के आरक्षणाचा फायदा मिळणार नाही. शालेय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, कृषी विद्यापीठातील व पशुवैद्यकीय शिक्षण संस्थांमधील शिक्षणाच्या प्रवेशासाठी आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये सरळसेवा भरतीसाठी हे आरक्षण लागू राहील, असे सरकारच्या प्रसिद्धिपत्रकात स्पष्ट केले आहे.

2001 च्या जनगणनेनुसार राज्यातील एकूण लोकसंख्येतील मुस्लिमांचे प्रमाण 10.6 टक्के आहे. तसेच मराठा समाजाचे प्रमाण 32 टक्के आहे. सर्वसाधारणपणे लोकसंख्येच्या प्रमाणाच्या निम्मे आरक्षण दिले जाते. त्यानुसार मुस्लिमांसाठी 5 टक्के आणि मराठा समाजासाठी 16 टक्के आरक्षण देण्यात आले आहे.

असे असेल जातीनिहाय आरक्षण

अनुसूचित जाती : १३ टक्के
अनुसूचित जमाती : ७ टक्के
इतर मागासवर्गीय : १९ टक्के
भटके आणि विमुक्त जाती : ८ टक्के
इतर :  ३ टक्के
विशेष मागासवर्गीय : २ टक्के
मराठा : १६ टक्के
मुस्लिम :  ५ टक्के

एकूण : ७३ टक्के
................................

Friday, 16 May 2014

मराठा आरक्षण दिले असते, तर हे हाल झाले नसते

काँग्रेस-राष्ट्रवादीने आता तरी धडा घ्यावा

-राजा मइंद, कार्यकारी संपाद, अपाविमं


देशभरात भाजपाला दणदणीत विजय मिळाला. काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांचा दणकून पराभव झाला. महाराष्ट्रात तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या अंगावर मतदारांनी कपडेही ठेवले नाहीत. भाजपाला गुजरात नंतर महाराष्ट्रातच एवढा मोठा विजय मिळाला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने मराठा आरक्षणाचा जो खेळ केला त्याचा हा परिणाम आहे. मराठा समाजाला २५ टक्के आरक्षण देण्याची मागणी केली १० वर्षे राज्यात होत आहे. या मागणीला आघाडीने हवा देण्याचे काम केले. पण अंतिम टप्प्यात आरक्षण देण्याऐवजी ते घोळात कसे पडेल, यासाठी कटकारस्थाने केली. मराठा आरक्षणासाठी महसूलमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमण्याचे नाटकही आघाडी सरकारने केले. पण, तो फक्त एक खेळ होता. 
मराठा समाजास आरक्षण मिळू नये, असेच दोन्ही काँग्रेसचे धोरण आहे, असा संशय या काळात येत राहिला. लोकसभा निवडणुकीच्या मराठा आरक्षणाच्या मागणीने जोर धरला तेव्हा ब्राह्मणांनाही आर्थिक दुर्बलतेच्या निकषावर आरक्षण मिळायला हवे, असे पिल्लू राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोडले. म्हणजे लढायला मराठे आणि आरक्षण लाटायला ब्राह्मण! यावरून बराच गोंधळ उडाला. 'अपाविमं'ने या खेळीचा तीव्र निषेध केला होता. "रक्त सांडले मराठ्यांनी, आरक्षण मिळणार ब्राह्मणांना" हा लेख आम्ही ४ फेब्रुवारी २०१४ रोजी अपाविमंवर प्रसिद्ध केला होता. अपाविमंच्या या भूमिकेला मराठा समाजातून मोठा पाठिंबा मिळाला होता. 

सगळीकडून आरडाओरड झाल्यानंतर राष्ट्रवादीने ब्राह्मण आरक्षणाचे पिल्लू हळूच बाहेर काढून घेतले. मात्र, राष्ट्रवादीच्या निवडणूक जाहीरनाम्यात मराठ्यांसोबतच मुसलमानांनाही आरक्षण देणार अशी नवी घोषणा करण्यात आली. मुसलमानांनी आरक्षण मागितले नाही, तरी राष्ट्रवादी त्यांना आरक्षण देण्याच्या बाता करीत होती. त्यांना कोणालाच आरक्षण द्यायचे नाही, केवळ मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, यासाठी मधून मधून अशी पिलं सोडून द्यायची, असा संदेश यातून गेला. त्यामुळे संपूर्ण मराठा समाज बिथरला होता. 'अपाविमं'ने यावर लिहावे, अशी विनंती आम्हाला अनेक पातळ्यांवरून झाली. तथापि, आम्ही गप्प राहणे पसंत केले. मराठ्यांना आरक्षण हवे असेल, तर लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीला धडा शिकवतील, असे आम्हाला वाटत होते. अखरे मराठा समाजाने आपला रोष दाखवून दिला आहे. 

आता विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षणाची घोषणा सरकारने करावी. अन्यथा जे हाल लोकसभा निवडणुकीत झाले, तेच हाल विधानसभा निवडणुकीतही होतील, हे लक्षात ठेवावे. मराठा समाजाला आरक्षण देताना उगाच इतर समाजाच्या आरक्षणाचा विषय मध्ये आणून गोंधळ माजविण्याचा प्रयत्न सरकारने करू नये. कोणाला आरक्षण द्यायचेच असेल, तर द्या; पण त्याची सांगड मराठा आरक्षणाशी घालू नका. मराठा समाजाला निर्विवाद आरक्षण द्या, अशी आमची स्पष्ट मागणी आहे.  "… मराठा समाजाला देताना तुमचे हात थरथरत असतील, तर तुम्हाला मतदान करताना समाजाचेही हात उद्या थरथरतील", असा इशारा आम्ही "रक्त सांडले मराठ्यांनी, आरक्षण मिळणार ब्राह्मणांना" या लेखाच्या शेवटी दिला होता. तोच पुन्हा एकदा देऊन ठेवतो. 

आणखी वाचा
रक्त सांडले मराठ्यांनी, आरक्षण मिळणार ब्राह्मणांना

Tuesday, 4 February 2014

रक्त सांडले मराठ्यांनी, आरक्षण मिळणार ब्राह्मणांना

भटजीबुवांना 'रिझर्व्हेशन'ची दक्षिणा देण्याचा सरकारचा घाट

राजा मइंद, कार्यकारी संपादक, अपाविमं.


सरकारी नोक-या आणि शिक्षणात आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाज गेल्या दशकभरापासून लढत आहे. मराठा संघटनांनी विविध पातळ्यांवर आंदोलन चालविले आहे. या आंदोलनांतून शेकडो मराठा तरुणांनी रक्त सांडले. हजारो तरुणांवर गुन्हे दाखल झाले. ही मुले न्यायालयांच्या खेट्या मारीत आहेत. या आंदोलनाची दखल तर राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकारने घेतली आहे. मात्र, मराठा समाजाच्या आरक्षणात ब्राह्मणांना फुकटचा वाटेकरी करण्याचे पाप हे सरकार करीत असल्याच्या बातम्या येत आहेत. रक्त सांडले मराठ्यांनी आरक्षण मात्र मिळत आहे ब्राह्मणांना, तेही न मागता. या उलट्या न्यायाला काय म्हणावे? आंदोलन करणा-या मराठा समाजातील तरुणांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार करीत आहे. 

ब्राह्मणांना ५ हजार वर्षांपासून आरक्षण मिळतेच आहे!
गेल्या किमान ५ हजार वर्षांपासून ब्राह्मणांना फुकट लाभ मिळत आले आहेत. धर्मक्षेत्रात फुकटचे आरक्षण हा समाज उपभोगित आला आहे. भारतातील सर्व मंदिरे ब्राह्मणांच्या ताब्यात आहेत. भारत सरकारच्या अर्थसंकल्पापेक्षाही मंदिरांची मिळकत जास्त आहे. मंदिरांकडे जमा होणारा हा सर्व पैसा ब्राह्मणांच्या खिशात जातो. ख्रिश्चन मिशन-यांकडे येणा-या पैशांतून शाळा, रुग्णालये असे समाजसेवी उपक्रम राबविले जातात. मंदिरांच्या पैशांतून असे काही होत नाही. दान-दक्षिणांचा फुकटचा लाभ उपटणा-या ब्राह्मणांना सरकार आरक्षणाचीही फुकटची दक्षिणा द्यायला निघाले आहे.

६० टक्के आहे मराठा समाजाची लोकसंख्या 
कोणी काहीही म्हणत असले तरी, राज्यातील मराठा समाजाची लोकसंख्या सुमारे ६० टक्के आहे. उरलेल्या ४० टक्क्यांत सर्व जाती आहेत. असे असले तरी मराठा समाजाने काही ६० टक्के आरक्षण मागितलेले नाही. २५ टक्केच मागितले आहे. ते देतानाही सरकार नफ्या-तोट्याचा विचार करून इतर जातींना मराठा आरक्षणात घुसडण्याचा प्रयत्न करीत आहे. वृत्त वाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, २५ टक्के आरक्षणातून ५.५ टक्के वाटा ब्राह्मण समाजाला देण्याचा घाट काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने घातला आहे. याशिवाय मुस्लिमांनाही १० टक्क्यांच्या आसपास आरक्षण देण्याचे घाटत आहे. अशा प्रकारे नव्या आरक्षणातून १५ टक्क्यांपेक्षाही जास्त वाटा सरकारने बाजूला काढला आहे. खाली उरतो जेमतेम साडेनऊ ते दहा टक्के वाटा. तेवढ्यावर मराठा समाजाची बोळवण होणार असे दिसते.


दीड टक्के ब्राह्मणांना ५.५ टक्के वाटा;

६० टक्के मराठ्यांना मात्र अवघे ९.५ टक्के
दीड टक्का लोकसंख्या असलेल्या ब्राह्मण समाजाला ५.५ टक्के आरक्षण आणि ६० टक्के लोकसंख्या असलेल्या मराठा समाजास साडेनऊ ते दहा टक्के आरक्षण, हा कुठला न्याय? ५.५ टक्के आरक्षण मिळाल्यानंतर नोकरीसाठी अर्ज करणा-या प्रत्येक ब्राह्मण तरुणाला हमखास नोकरी मिळेल. कारण त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या जवळपास ४०० टक्के आरक्षण मिळणार आहे. मराठा तरुणांना मात्र इतके कमी आरक्षण मिळेल की, त्याचा कोणताच लाभ समाजाला होणार नाही.

मराठा समाजाच्या हिश्शातून इतरांना आरक्षण कशासाठी?
इतर जातींना आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. सर्वांनाच आरक्षण द्यायचे असेल, तर खुशाल द्या. पण ते मराठा समाजाच्या हिश्शातून देऊ नका. इतर जातींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देणार असाल तर मराठा समाजालाही ते लोकसंख्येच्या प्रमाणातच द्या.

...तर मतदान करताना मराठा समाजाचेही हात थरथरतील
मराठा समाजासाठी काही करण्याची वेळ येते तेव्हा, सरकारचे हात का थरथरतात? मराठा समाजाला काही देण्याची वेळ येते तेव्हा सरकारला लकवा का भरतो? या निमित्ताने आम्ही एकच सांगू इच्छितो की, राज्यातील सरकार मराठा समाजाच्या मतांवरच हे सरकार टिकून आहे, हे कोणीही विसरू नये. तसेच मराठा समाजाच्या मताशिवाय कोणाचेही सरकार राज्यात बनू शकणार नाही, हेही लक्षात ठेवावे.  मराठा समाजाला देताना तुमचे हात थरथरत असतील, तर तुम्हाला मतदान करताना समाजाचेही हात उद्या थरथरतील.