Showing posts with label शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? भाग-४. Show all posts
Showing posts with label शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? भाग-४. Show all posts

Sunday, 15 December 2013

शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे

 -श्रीमंत कोकाटे (शिवचरित्र अभ्यासक, संशोधक)


लाला लजपतरायांनी "सिवोजी" नावाचे उर्दूमधून शिवचरित्र लिहिले. त्यामुळे शिवचरित्र राजे पंजाब-सिंध 
(आताचे पाकिस्तान) पर्यंत गेले. . रवींद्रनाथ टागोर, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे शिवाजीराजे हे
आराध्य दैवत होते. कर्मवीर भाऊराव पाटील म्हणाले होते कि,  प्रसंगी जन्मदात्या बापाचे नाव बदलेन पण
कॉलेजला दिलेले शिवाजीराजांचचे नाव मी कधीच बदलणार नाही. ते भाऊराव पाटील जैन होते.
त्यांच्यामुळे शिवाजीराजांच्या रयतेला शिक्षण मिळाले. कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे, डॉ.पंजाबराव
देशमुख, राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसिंह नाना पाटील, संत गाडगेबाबा, प्रबोधनकार केशव सी. ठाकरे इ.
समाजसुधारकाची शिवरायांवर अनन्यनिष्ठा होती. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण भारतरत्न
डॉ.बाबासाहेब यांचा शिवचरित्राचा सखोल अभ्यास होता. त्यांनी "शुद्र कोण होते?" या ग्रंथात
शिवाजीराजांबाबत खूप सखोल माहिली लिहिलेली आहे. शिवाजीराजांच्या त्रिशताब्दी उत्सवाच्या
निमित्ताने बदलापुर येथे आयोजित केलेल्या समारंभाच्या अध्यक्षस्थानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर होते.
या प्रसंगी राजांच्या जीवनावर अभ्यासपुर्ण आणि प्रभावी भाषण केले. त्यामुळे राजांचे अपरिचित रुप
जनतेला समजले. शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाला ब्राह्मणांनी केलेल्या विरोधाचा बदला
डॉ.आंबेडकरांनी घेतला. डॉ.आंबेडकरांनी बहुजन समाजाला राजा होण्याचे स्वतंत्र दिले, तुम्ही शूद्र
आहात त्यामुळे मुख्यमंत्री होता येणार नाही. असे आज कोणीही ब्राह्मण म्हणणार नाही. हा अधिकार
सर्व बहुजन समाजाला डॉ.आंबेडकरांनी दिला. राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी शिवजयंती सुरु केली.
म्हणजे फुले, आंबेडकर या गुरु शिष्यांना शिवाजीराजांचा सार्थ अभिमान होता. त्यांचे राजांवर डोळस
प्रेम होते. आंधळे प्रेम नव्हते.

शिवाजीराजांचे भांडवल करुन फुले-आंबेडकरांनी समाजामध्ये धार्मिक व जातीय दंगे निर्माण
केले नाहीत.  किंवा शिवाजीराजांच्याव्दारे त्यांनी बहुजन समाजाचे वैदिकीकरण केले नाही. फुले-
आंबेडकरांनी शिवाजीराजांचा खरा इतिहास देशाला सांगितला. डॉ.आंबेडकर लेटरहेडवर जय शिवराजय लिहायचे. साहित्यरत्न थोर देशभक्त आणि समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांनी गणपतीला वंदन
असणारा पारंपारिक गण बदलला. गणाचा आरंभ शिवछत्रपतींना वंदन करुनच सुरु केला. अण्णाभाऊंनी
शिवरायांवर "महाराष्ट्राची परंपरा" हा पोवाडा लिहिला आण्णाभाऊ रशियात गेल्यानंतर त्याठिकाणी
शिवचरित्रावर अभ्यास करणारे रशियन संशोधक  प्रा.चेलिशिव आण्णाभाऊ यांना भेटले. आण्णाभाऊ यांनी  त्यांना शिवरायांच्याबाबत खूप दुर्मिळ माहिती सांगितली. म्हणजेच आण्णाभाऊंमुळुळेचेच रशियन जनतेलेला शिवरायांचचे कार्य माहित झाले. शिवरायांचे कार्य राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय  स्तरावर पोहचविण्यासाठी बहुजन समाजातील विचारवंतांनी मोलाचे कार्य केले आहे. 

शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे 
याउलट ब्राह्मण लेखकांनी शिवरायांना बदनाम करण्याचे पाप केले. 
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर शिवाजीराजांचे जीवन व कार्य राज्यस्तरावर व जातीस्तरावर ठेवण्यासाठी ब्राह्मण
नेत्यांनी जाणीवपुर्वक प्रयत्न केले. संयुक्त महाराष्टड्ढाच्या आंदोलनप्रसंगी प्र.के. अत्रे यांनी इतर राज्यावर
टिका करताना शिवाजीराजांचा वापर केला. "इतर राज्यांना फक्त भूगोल आहे. पण महाराष्ट्राला 
 इतिहास आहे", असे टोमणे मारत अत्र्यांनी राजांचे नाव घेतले. त्यामुळे शिवरायांच्या प्रतिमेला
मर्यादा पडल्या जातीय राजकारणात शिवरायांचा वापर सुरु झाला. राजकीय पक्षांची बांधणी शिवरायांच्या
नावाने झाली. परंतु प्रबोधनकारांचा शिवाजी जनतेला सांगितलाच नाही. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हे
थोर इतिहास संशोधक व समाजसुधारक होते. त्यांनी शिवरायांचा खरा इतिहास जनतेला सांगितला.
प्रबोधेधनकार ठाकरे म्हणत की, शिवाजीराजे ३३ कोटेटी देवेवांपपेक्षा महान आहेतेत. डोक्यातून दैवैववाद काढूनच शिवरायांचा अभ्यास करावा.

(शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? या पुस्तकातून)


प्रख्यात इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेले ‘शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?' हा ग्रंथ "अनिता पाटील विचार मंच"च्या वाचकांसाठी येथे उपलब्ध करून देत आहोत. जिज्ञासूंनी त्यावर प्रतिक्रिया जरूर द्याव्यात.

ग्रंथ प्रवेश 
भाग-१
भाग-४
  1. नेताजी पालकरांच्या धर्मांतराला विरोध, गंगाधर कुलकर्णीच्या धर्मांतराला मात्र समर्थन
  2. संभाजीराजांना मोगलांच्या ताब्यात देणारा विश्वासघातकी कवि कुलेश
  3. औरगजेबाने संभाजी राजांना मनुस्मृती संहितेप्रमाणे ठार मारले
  4. शिवशक बंद करुन मोगलांचा फसलीशक सुरु करणारे पेशवे
  5. शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला
  6. शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे

शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला

 -श्रीमंत कोकाटे (शिवचरित्र अभ्यासक, संशोधक)


राष्ट्रपिता जोतिराव फुले उपाख्य तात्या यांना शिवरायांच्या स्वराज्याची वैदिकांनी चालवलेली विटंबना पाहवेना, म्हणून  फुले १८६९ साली रायगडावर गेले. शिवजयंती सुरु करण्यासाठी त्यांनी राजांच्या समाधीचा
तपास केला, पण त्यांना समाधी सापडेना. तीन दिवस जोतीराव फुले  यांनी वेली
तोडून घाणेरी काढली व समाधीचा शोध घेतला. तात्यारावांनी समाधी धुवून स्वच्छ केली. राजांच्या
समाधीस तात्यारावांनी भक्तीभावाने अभिवादन केले आणि समाधीवर फुले वाहिली. तात्यारावांनी
शिवरायांच्या समाधीची पुजा केल्याचे ग्रामजोशास समजले तेव्हा जोशाच्या तळपायाची आग
मस्तकाला गेली. तो समाधीजवळ आला,  समाधीवरील फुले लाथेने बाजूला सारली आणि
तात्यांना म्हणाला ‘अरे कुणबटा! त्या शूद्र शिवाजीची तू पूजा करतोस काय? तो काय राजा होता होय?'

राष्ट्रपिता फुले आणि शिवरायांना भट अर्वाच्य भाषेत बोलू लागला. तात्यांना खूप दु:ख
झाले. त्यानंतर तात्यांनी शिवरायांचा खूप चांगला पोवाडा लिहिला. तात्यांनी शिवजयंतीला सुरुवात
केली. १८७० साली पुण्यासह संपूर्ण महाराराष्ट्रात शिवजयंती मोठ्या उत्साहाने सुरु झाली.  
पेशव्यांच्या समर्थकांना याची चीड आली, पण ते शिवजयंतीला थेट विरोध करु शकत नव्हते. कारण रा.फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाने महाराराष्ट्रात  फार मोठी जागृती केली होती. शिवजयंतीला थेट विरोध करणे अशक्य असल्याने त्यांनी पर्याय दिला. तो पर्याय म्हणजे गणोत्सव!
गणपती हा पेशव्यांचा देव आहे. बहुजनसमाजाचा गणपतीशी काहीही संबंध नाही. पण पेशवे कैवारी
बाळ गंगाधर टिळकाने शिवजयंतीला रोखण्यासाठी पेशव्यांच्या खाजगी गणपतीचा सार्वजनिक उत्सव
केला. म्हणजे टिळकाने शिवजयंती संपावी यासाठी १८९३ साली गणोत्सव सुरु केला.

(शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? या पुस्तकातून)


प्रख्यात इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेले ‘शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?' हा ग्रंथ "अनिता पाटील विचार मंच"च्या वाचकांसाठी येथे उपलब्ध करून देत आहोत. जिज्ञासूंनी त्यावर प्रतिक्रिया जरूर द्याव्यात.

ग्रंथ प्रवेश 
भाग-१
भाग-४
  1. नेताजी पालकरांच्या धर्मांतराला विरोध, गंगाधर कुलकर्णीच्या धर्मांतराला मात्र समर्थन
  2. संभाजीराजांना मोगलांच्या ताब्यात देणारा विश्वासघातकी कवि कुलेश
  3. औरगजेबाने संभाजी राजांना मनुस्मृती संहितेप्रमाणे ठार मारले
  4. शिवशक बंद करुन मोगलांचा फसलीशक सुरु करणारे पेशवे
  5. शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला
  6. शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे

शिवशक बंद करुन मोगलांचा फसलीशक सुरु करणारे पेशवे

 -श्रीमंत कोकाटे (शिवचरित्र अभ्यासक, संशोधक)


विश्ववंद्य शिवरायांच्या खुनानंतर छ. संभाजीराजे, राजाराम, ताराबाई आणि शाहुराजांनी
भूमिपुत्रांच्या स्वराज्याचे संरक्षण व संवर्धन केले. १७१३ साली शाहुराजांनी कान्होजी आंग्रे मोहिमेवर
बाळाजी विश्वनाथ भट याला जाण्यास सांगितले. पण त्याने मला सर्वाधिकार दिल्याशिवाय मी
मोहिमेवर जाणार नाही असे बाळाजी भट शाहूराजांना उर्मटपणे म्हणाला. शाहूराजांना अडचणीत पकडून
बाळाजी भटाने पेशवेपद घेतले. आणि अशा प्रकारे शिवाजीमहाराजांनी कष्टाने उभारलेले गरिबांचे
स्वराज्य रक्तपिपासू, अत्याचारी, जातीयवादी, देशद्रोही आणि शिवाजीद्रोही पेशव्यांच्या हातात गेले.
पेशव्यांच्या हातात सत्ता येताच पेशव्यांनी शिवरायांनी राज्याभिषेकापासून सुरु केलेला शिवशक बंद
केला. त्याऐवजी पेशव्यांनी मोगल बादशहाचा फसलीशक सुरु केल. इतकेच नव्हे तर पेशव्यांनी  शिवाजीराजांच्या सर्व पाऊलखुणा नष्ट करण्यास आरंभ केला. शिवाजीराजांचे संपूर्ण कार्य पुसण्याचा सपाटा पेशव्यांनी सुरु केला. वर्णभेद व जातीभेदाची पेशव्यांनी पुर्नस्थापना केली. टोकाचा धर्ममार्तंडपणा
सुरु झाला. शिवशिक बंद करुन मोगल बादशहाचा फसलीशक सुरु करण्यातून शिवाजीराजांबद्दल पेशव्यांना असणारी घृणा स्पष्ट जाणवते. भारतासह सर्व जगातील मुसलमानांना खुष करण्यासाठी पेशव्यांनी
स्वराज्यावर नांगर फिरवला. जिजाऊमाँसाहेबांनी बांधलेला भव्य-दिव्य लालमहाल पाडून त्या ठिकाणी
शनिवारवाडा बांधला.

शिवशक बंद करुन फसलीशक सुरु करण्यामागे पेशव्यांचा एक डाव होता. मुसलमानांचे राज्य संपुर्ण भारतात येईल, असे त्यांना वाटत होते. मुस्लिम राज्यकर्त्यांचा वरदहस्त आपणावर कायमचा रहावा यासाठी
पेशव्यांनी फसलीशक सुरु केला. परंतु इंग्रजांनी आघाडी मारली आणि संपूर्ण भारत इंग्रजांनी जिंकला. इंग्रजांनी पेशव्यांना देखील पराभूत केले. पेशव्यांचा फसलीशक सुरु करण्यामागचा डाव फसला.
त्यानंतर ब्राह्मणांनी इंग्रज वापरत असलेले ग्रिगेरियन कॅलेंडर (जानेवारी ते डिसेंबर) स्विकारले.  इंग्रजांची सत्ता भारतात आल्याबरोबर सर्व इंग्रजी भाषा, कॅलेंडर, शिक्षण, नोकरी व
इंग्रजांशी मैत्री ब्राह्मणांनी स्विकारली. म्हणजे धन, संपत्ती आणि सत्तेसाठी शिवाजीराजांच्या
स्वराज्याला पेशव्यांनी सुरुंग लावला. (समुद्र ओलांडणे पाप आहे, असे बिंबवणा-या ब्राह्मणांनीच
लंडन येथे जाऊन शिक्षण घेतले. बहुजनसमाजाला जगाचे ज्ञान होऊ नये यासाठीच ब्राह्मणांनीच सिंधूबंदी
सुरु केली होती. स्वेथासाठी ती त्यांनीच मोडली.

ब्राह्मणांचा इंग्रजांना खोटा विरॊध 
ब्राह्मण इंग्रजांना वरवर विरोध करीत होते. यापाठीमागे ब्राह्मणांचा स्वार्थ होता. सावरकरांचे शिक्षण लंडन येथे झाले. वासुदेव बळवंत फडके, मंगल पांडे हे देखील इंग्रजांकडे नोकरीला होते. ब्राह्मण स्वत:ची मुले इंग्रजी
शाळेत घालत; तरीही इंग्रजीला विरोध करत. बहुजनसमाज इंग्रजी भाषा शिकला तर त्यांची
मुले ब्राह्मण मुलांची स्पर्धक होतील म्हणून ब्राह्मण इंग्रजी भाषेला विरोध करत असत. आजही ते हेच करतात. ब्राह्मणांचे मराठी भाषेवरील प्रेमाचे फक्त ढोंग आहे. जगात स्पर्धेत टिकण्यासाठी इंग्रजी भाषा शिकावी. कारण इंग्रजी जगातील सर्वात सोपी भाषा आहे. इंग्रजी ही ज्ञान, संपर्क, वैश्विक भाषा आहे.

पेशव्यांनी रायगडावरील दप्तरखाना जाळला, राणीवसा पाडला, राजदरबार तोडला, समाधी
उद्धस्त केली, राजांनी मुस्लिम सैनिकांसाठी बांधलेली मशिद पाडली, पण जगदिश्वराच्या मंदिराला हात
लावला नाही. म्हणूनच आज रायगडावरील मंदिर चांगले आहे पण राजदरबार नष्ट झालेला आहे.

(शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? या पुस्तकातून)


प्रख्यात इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेले ‘शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?' हा ग्रंथ "अनिता पाटील विचार मंच"च्या वाचकांसाठी येथे उपलब्ध करून देत आहोत. जिज्ञासूंनी त्यावर प्रतिक्रिया जरूर द्याव्यात.

ग्रंथ प्रवेश 
भाग-१
भाग-४
  1. नेताजी पालकरांच्या धर्मांतराला विरोध, गंगाधर कुलकर्णीच्या धर्मांतराला मात्र समर्थन
  2. संभाजीराजांना मोगलांच्या ताब्यात देणारा विश्वासघातकी कवि कुलेश
  3. औरगजेबाने संभाजी राजांना मनुस्मृती संहितेप्रमाणे ठार मारले
  4. शिवशक बंद करुन मोगलांचा फसलीशक सुरु करणारे पेशवे
  5. शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला
  6. शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे

Friday, 13 December 2013

औरंगजेबाने संभाजी राजांना मनुस्मृतीसंहितेप्रमाणे ठार मारले

-श्रीमंत कोकाटे (शिवचरित्र अभ्यासक, संशोधक)


औरंगजेबाने संभाजीराजांप्रमाणे आजर्पंत कोणालाही ठार केले नव्हते. राजांना एका घावात ठार
मारण्याऐवजी वेगळी शिक्षा का देण्यात आली असावी? प्रथम राजांची जीभ कापण्यात आली. यावरुन
असे अनुमान निघते की संभाजीराजांनी संस्कृतवर प्रभुत्व मिळविले होते. त्यांनी चार ग्रंथ लिहिले होते
म्हणूनच प्रथम त्यांची जीभ कापण्याचा सल्ला ब्राह्मण सल्लागारांनी दिला. नंतर राजांचे क्रमश: कान,
डोळे, त्वचा काढण्यात आली. ही निर्दय शिक्षा मनुस्मृती संहितेप्रमाणे देण्यात आली. म्हणजेच
औरंगजेबाच्या माध्यमातून राजांना ही शिक्षा ब्राह्मणांनी दिली. कविकुलेशाला देखील औरंगजेबाने
जिवंत ठेवले नाही. कारण जिवापाड प्रेम करणा-या राजांसारख्या स्वाभिमानी, प्रेमळ, निर्मळ आणि
जिवलग मित्रावर उलटलेला कुलेश आपला कधी घात करील हे सांगता येणार नाही, हे औरंगजेब ओळखून होत.  म्हणूनच औरंगजेबाने कुलेशालादेखील ठार मारले.

औरंगजेबाचा हा चालता बोलता इतिहासच होता.
औरंगजेबाने सख्खे भाऊ तसेच जिवलग सरदार दिलेरखान, मिर्झाराजे, जयसिंग या विश्वासू
सरदारांनाही ठार मारले होते. त्यामुळे मदत करणा-या कविकुलेशाला औरंगजेबाने जिवंत ठेवणे शक्य
नव्हते. कारण कुलेशाला त्याचा मोबदला औरंगजेबाने दिला होता.
औरंगजेबाने संभाजीराजांना धर्म व्देषाने ठार मारले नसुन राजकीय संघर्षामुळे ठार मारले.
औरंगजेबाने राजांना फक्त दोनच प्रश्न विचारले. तुमच्या खजिन्याच्या चाव्या कोठे आहेत? आणि
माझ्या सरदारांपैकी तुम्हाला कोण फितूर आहे? म्हणजे औरंगजेबाने राजांना धर्मांतराचा आग्रह धरला
नव्हता व संभाजीराजांनी धर्मांतरासाठी मुलीची मागणी केली नव्हती. राजांची हत्या झाल्यानंतर
ब्राह्मणांनी आनंदोत्सव म्हणुन गुढीपाडवा सुरु केला.


(शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? या पुस्तकातून)


प्रख्यात इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेले ‘शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?' हा ग्रंथ "अनिता पाटील विचार मंच"च्या वाचकांसाठी येथे उपलब्ध करून देत आहोत. जिज्ञासूंनी त्यावर प्रतिक्रिया जरूर द्याव्यात.

ग्रंथ प्रवेश 
भाग-१
भाग-४
  1. नेताजी पालकरांच्या धर्मांतराला विरोध, गंगाधर कुलकर्णीच्या धर्मांतराला मात्र समर्थन
  2. संभाजीराजांना मोगलांच्या ताब्यात देणारा विश्वासघातकी कवि कुलेश
  3. औरगजेबाने संभाजी राजांना मनुस्मृती संहितेप्रमाणे ठार मारले
  4. शिवशक बंद करुन मोगलांचा फसलीशक सुरु करणारे पेशवे
  5. शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला
  6. शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे

संभाजी राजांना मोगलांच्या ताब्यात देणारा विश्वासघातकी कवि कुलेश


-श्रीमंत कोकाटे (शिवचरित्र अभ्यासक, संशोधक)


शिवाजीराजे आणि संभाजीराजे या पिता पुत्रात भांडण लावण्याचा मोरोपंत, अण्णाजी दत्तो
यांनी कसोशीने प्रयत्न केला. यासाठी त्यांनी संभाजीराजांविरुद्ध खोट्या अफवा पसरवल्या. ‘शिवरायांना
संभाजीबद्दल प्रेम नाही, ते राजारामाला वारसदार करणार आहेत' अशा प्रकारच्या अफवा पसरवून
संभाजीराजांना भडकविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ब्राह्मण मंत्र्यांना यश आले नाही. दोघा पिता पुत्रांनी
ब्राह्मणांना चांगलेच ओळखले होते. दिलेरखानाची आक्रमकता रोखण्यासाठी शिवरायांनी
संभाजीराजांना मोगलांकडे पाठविले होते. पुढे हे दिलेरखानाच्या लक्षात येताच शिवरायांनी संभाजीला
सोडवून आणले. आणि संभाजीराजांना पन्हाळ्याचे सुभेदार केले. कवि कुलेश या ब्राह्मणाने संभाजीशी
मैत्री संपादन केली. संभाजीराजे आणि सर्व मराठे सरदार यांच्यात भांडण लावण्याचा कुलेशाने प्रयत्न
केला. संपत्ती आणि पदाच्या लालसेने तो राजांच्या आश्रयाला आला. स्वकर्तृत्वाने मोठे झालेले
बहुजन नेते किंवा  राजाच्या जवळ ब्राह्मण येतात. गरीबांची ते कधीच हांजी-हांजी करत नाहीत. पण नेते
आणि राजे यांच्याजवळ ते पुर्ण स्वार्थ साधण्यासाठी राहतात. पण जास्त संपत्ती दुस-या बाजूकडून
मिळताच ते आपल्या नेत्याचाही घात करतात. अगदी असाच प्रसंग संभाजीराजांच्या जीवनात घडला.
उत्तर भारतातून आलेल्या कुलेशाला राजांनी छंदोगामात्य (मुख्य प्रधान) केले,  त्याच्यावर  संपुर्ण विश्वास  टाकला. त्यानेच राजांचा विश्वासघात केला.

रायगडावर हल्ला करण्याची औरंगजेबाची मोहीम होती. पण त्यासाठी औरंगजेबाला रायगड
माहित नसल्यामुळे गडाची प्रतिकृती (मॉडेल) हवी होती. ही प्रतिकृती तयार करण्याची जोखीम कुलेशाने
घेतली. त्या बदल्यात औरंगजेबाने कुलेशाला खूप पैसा दिला. कुलेशाने हे काम त्याच्या मुलाकडे
सोपविले. म्हणजे कुलेश संभाजीसोबत राहून औरंगजेबाला मदत करीत होता. राजांच्या निर्मळ आणि
प्रेमळ मनाचा कुलेशाने गैरफायदा घेतला. म्हणजे कवि कुलेश हा औरंगजेबाचा हितचिंतक होता आणि
राजांचा शत्रू होता. राजांना पकडून देण्याची जबाबदारी कवि कुलेशानेच स्विकारली. औरंगजेबाने कवि
कुलेशाला खूप पैसा दिला. राजे रायगडावर जाण्यासाठ निघाले, वाटेत संगमेशर येथे थांबले. तेव्हा राजे
कवि कुलेशाला म्हणाले, ‘आपण लवकर रायगडाकडे जाऊ. या ठिकाणी धोका होण्याची शक्यता आहे.' तेव्हा कुलेश म्हणाला, ‘‘येथे कोणीही येणार नाही." कविकुलेश अनुष्ठानास बसला. तेव्हा राजांनी
कविकुलेशाला लवकर निघण्याचा आग्रह केला परंतू कविकुलेशानेच अनुष्ठानात जाणीवपुर्वक वाढ केली.
संभाजीराजांना कविकुलेशाने संगमेशर येथे रोखून धरल्याची खात्रीलायक बातमी औरंगजेबाला
समजली. आणि लगेच औरंगजेबाने मुकर्रबखान आणि इखलासखानाला कोल्हापुरावरुन संगमेशरला
पाठविले. त्यांनी तातडीने येऊन संभाजीराजे व कुलेशाला पकडले. पण या प्रसंगी राजे घोड्यावर निसटले
होते पण कुलेश ओरडला ‘महाराज मै गिर गया'! निसटलेले राजे कवि कुलेशाला वाचवण्यासाठी परत
फिरले आणि लगेच त्यांना पकडण्यात आले (संदर्भ- निकोलाओ मनुची लिखीत "असे होते मोगल" पृ.
२८८) जेव्हा राजांना पकडण्यात आले तेव्हा ते पुर्ण सावध होते. राजे कोणत्याही विधीत मग्न नव्हते.
या उलट राजे लवकर निघण्याचा आग्रह कुलेशाला करत होते. म्हणजे राजांना दुरदृष्टी होती. पण
कुलेशाने अनुष्ठानाचे निमित्त करुन राजांना औरंगजेबाचे सैन्य येईपर्यंत अडवून धरले होते.
संभाजीराजांसारख्या सरळ मनाच्या राजाचा अशा प्रकारे कविकुलेशाने काटा काढला व बदनाम केले 
राजांच्या गणोजी शिर्के व नागोजी शिर्के या मेहुण्यांना. कुलेशाला निर्दोश सोडण्यासाठी ब्राह्मणी
इतिहासकारांनी राजांना गणोजी आणि नागोजी शिर्के यांनी पकडून दिले असे धादांत खोटे लिहिले.
राजकारणात कितीही स्वार्थ असला तरीही आपल्या बहिणीचे कुंकू पुसावे असे कोणत्याही भावाला
वाटत नसते. गणोजी-नागोजी हे येसुबाईचे भाऊ होते. त्यांनीच राजांना पकडून दिले असा अपप्रचार
ब्राह्मणी लेखकांनी केला. म्हणजे कु्रर, स्वार्थी, लबाड कविकुलेशाला निर्दोष सोडण्यासाठी नागोजी-
गणोजीला बदनाम करुन बहिण-भावाचे पवित्र नात्याला देखील अनेक पक्षपाती लेखकांनी
कलंक लावला आहे. (कविकुलेश याच्या फितुरीमुळेच संभाजीराजांना औरंगेबाने पकडले असा स्पष्ट
उल्लेख ईश्वरदास नागर, रॉबर्ट आर्म, निकालाओ मनुची या परकीय लेखकांनी केलेला आहे. संदर्भ- छ.
संभाजी स्मारक ग्रंथ.  पृ. १७०, १९४, १९५, १७१)

(शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? या पुस्तकातून)


प्रख्यात इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेले ‘शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?' हा ग्रंथ "अनिता पाटील विचार मंच"च्या वाचकांसाठी येथे उपलब्ध करून देत आहोत. जिज्ञासूंनी त्यावर प्रतिक्रिया जरूर द्याव्यात.

ग्रंथ प्रवेश 
भाग-१
भाग-४
  1. नेताजी पालकरांच्या धर्मांतराला विरोध, गंगाधर कुलकर्णीच्या धर्मांतराला मात्र समर्थन
  2. संभाजीराजांना मोगलांच्या ताब्यात देणारा विश्वासघातकी कवि कुलेश
  3. औरगजेबाने संभाजी राजांना मनुस्मृती संहितेप्रमाणे ठार मारले
  4. शिवशक बंद करुन मोगलांचा फसलीशक सुरु करणारे पेशवे
  5. शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला
  6. शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे

नेताजी पालकरांच्या धर्म प्रवेशास विरोध, गंगाधर कुलकर्णीच्या धर्म प्रवेशास मात्र समर्थन

-श्रीमंत कोकाटे (शिवचरित्र अभ्यासक, संशोधक)


नेताजी पालकर हे शिवाजीराजे निष्ठावं सेनापती होते. पण त्यांचे सक्तीने धर्मांतर करण्यात आले.
ते महंमदकुलीखान झाले. औरंगजेबाचे नेताजींना अफगाणिस्तानात पाठविले. नेताजींचे नाव बदलले
पण मन बदलले नव्हते. धर्म बदलला पण राजांवरील निष्ठा अभंग होती. राजांकडे यावे यासाठी
नेताजींनी अनेक वेळा पळून येण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना पाठ फुटेपर्यंत मारले, पण एके दिवशी
नेताजी पालकर राजांकडे आले आणि प्रेमाने ते राजांना कडाडून भेटले. त्यांनी स्वधर्मात येण्याची इच्छा
व्यक्त केली. केली हे ब्राह्मणांस समजले तेव्हा त्यांनी नेजाजींना स्वधर्मात येण्यास कडाडून विरोध केला.
तेव्हा राजे भटांना म्हणाले,  "निराश्रीतांना जवळ घेणेणे हाच धर्म आहे. आणि त्यांना दूरूर लोटणे हा अधर्म
आहे. नेताजींना मी धमार्त घेणार. धमाच्या नावाखाली विरोधेध केलेला तरी तुम्ही आणि तुमचा धर्म
गुंडाळून ठेवा. " राजांनी धर्ममार्तंड पुरोहितांची हांजी-हांजी केली नाही. 
संस्कृतीच्या नावाखाली केली जाणारी पिळवणूक थांबविण्यासाठी राजांनी वैदिकांचा विरोध
झुगारुन दिला व नेताजी पालकरांना स्वधर्मात घेतले.

आता दुसरी अत्यंत महत्वाची घटना म्हणजे संभाजीराजांच्या काळात औरंगाबाद प्रांतातील
कसबे हरसुल येथील गंगाधर रंगनाथ कुलकर्णी याने धर्मांतर केले होते. त्याने स्वखुशीने मुसलमान धर्म
स्विकारला होता. सक्तीने त्याचे धर्मांतर झाले नव्हते. पण पुढे गंगाधर कुलकर्णीला परत धर्मांत येण्याची
इच्छा झाली. गंगाधरभाई कुलकर्णी संभाजीराजांकडे आला व त्याने राजांजवळ स्वधर्मात येण्याची इच्छा
व्यक्त केली. (संदर्भ: छ.संभाजी स्मारक ग्रंथ. पृ.१८३) पण नेताजी पालकरांना स्वधर्मात घेताना जसा
विरोध केला होता तसा गंगाधर कुलकर्णीला ब्राह्मणांनी विरोध केला नाही. या प्रसंगी सर्व भट-पुरोहित
मूग गिळून गप्प बसले. नेताजींचे सक्तीने धर्मांतर केले होते तसे गंगाधरचे सक्तीचे धर्मांतर नव्हते. तरी
नेताजी पालकर व राजांना ब्राह्मणांनी वैदिक धर्मातील अनेक कारणे सांगून प्रखर विरोध केला. मग
गंगाधर कुलकर्णीच्या वेळेस कुठे गेला धर्म आणि संस्कृती?

नेताजी पालकरांच्या धर्मांतराला वैदिक धर्म ग्रंथातील प्रमाणाव्दारे कडाडून विरोध केला
यापाठीमागे नेताजी पालकरांकडून धर्मांतर विधीसाठी धन-संपत्ती मिळविण्याच्या ब्राह्मणांचा हेतू असावा.
म्हणूनच नेताजी पालकरांच्या धर्मांतरास सर्व ब्राह्मणांनी विरोध केला. म्हणजे ग्रंथांचा आधार घेऊन
विरोध करण्यामागे धर्म, संस्कृती आणि तत्वज्ञान याबाबत ब्राह्मणांना श्रद्धा तर फक्त पैसा-संपत्ती
मिळावी आणि वर्णव्यवस्थेव्दारे ब्राह्मणांचे वर्चस्व सर्व जातींवर रहावे यासाठीच ते धर्मग्रंथांचा  वापर
करतात. याचा अर्थ धर्मग्रंथांचे दोन भाग पडतात. ब्राह्मणांचे धर्मग्रंथ व बहुजनांचे धर्मग्रंथ. यावरुन सिद्ध
होते की, ब्राह्मणांना व्रतवैकल्ये व ग्रंथांचा  प्रामाण्य मान्य नाही. पण त्यांनी बहुजनांना मात्र पाप-पुण्याची
भिती दाखवून अर्थसत्ता प्रस्थापित केली आहे. धर्मांतर प्रसंगी नेताजी पालकरांच्या पैशावर ब्राह्मणांचा
डोळा होता पण गंगाधर कुलकर्णीच्या कडून ब्राह्मणांनी पैशाची का अपेक्षा ठेवली नाही? याचा अर्थ
ब्राह्मणांचा आणि बहुजनसमाजाचा धर्म एक नाही. तसेच ब्राह्मण हे देव, धर्म आणि संस्कृतीला मानत
नाहीत. ब्राह्मण हे स्वत: देव मानत नाहीत फक्त देव मानण्याचे नाटक करता. सुसंस्कृतपणाचे
नाटक करतात. म्हणजे बहुजनसमाज देवाधर्माच्या नादी लागावा हा त्यांचा हेतू असतो. देव हा
ब्राह्मणांनी बहुजन समाजाला गाडण्यासाठीच निर्माण केला आहे. त्यामुळे ब्राह्मण देवाच्या दरबारात
उर्मटपणे पैसा उकळतात, खोटे बोलतात, भक्तांना दमदाटी करतात, देवाला अर्पण केलेल्या सर्व वस्तु
आणि पैसा स्वत: घेतात, मग या ठिकाणी देव मूग गिळून का गप्प बसतो? याच अर्थ ब्राह्मण दैववादी
नाहीत. भारतीय संस्कृतीचे ते पालन करीत नाहीत. पण बहुजनसमाजाने करावे यासाठी ते बहुजनांना
देवा-धर्मांची भिती घालतात. म्हणून नेताजी पालकरांच्या धर्मांतरास ब्राह्मणांनी विरोध केला पण
गंगाधर कुलकर्णीला त्यांनी विरोध केला नाही.

(शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? या पुस्तकातून)


प्रख्यात इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेले ‘शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?' हा ग्रंथ "अनिता पाटील विचार मंच"च्या वाचकांसाठी येथे उपलब्ध करून देत आहोत. जिज्ञासूंनी त्यावर प्रतिक्रिया जरूर द्याव्यात.

ग्रंथ प्रवेश 
भाग-१
भाग-४
  1. नेताजी पालकरांच्या धर्मांतराला विरोध, गंगाधर कुलकर्णीच्या धर्मांतराला मात्र समर्थन
  2. संभाजीराजांना मोगलांच्या ताब्यात देणारा विश्वासघातकी कवि कुलेश
  3. औरगजेबाने संभाजी राजांना मनुस्मृती संहितेप्रमाणे ठार मारले
  4. शिवशक बंद करुन मोगलांचा फसलीशक सुरु करणारे पेशवे
  5. शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला
  6. शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे