Showing posts with label पाकिस्तान. Show all posts
Showing posts with label पाकिस्तान. Show all posts

Thursday, 12 December 2019

फाळणीला सावरकरच जबाबदार

अनिता ताईंचा फाळणीविषयीचा विचार सर्वमान्य होतो तेव्हा..!

या देशाच्या फाळणीला हिंदू महासभेचे नेते विनायक दामोदर सावरकर आणि मुस्लिम लीगचे नेते बॅ. मोहंमद अली जीना हे जबाबदार असल्याचे सत्य या ब्लॉगच्या संस्थापिका आदरणीय अनिता ताई पाटील यांनी २0११ मध्ये पहिल्यांदा समोर आणले होते. प्लँचेट करण्यासाठी लोक सावरकरांच्या आत्म्याला का बोलावतात, यासंबंधीचा एक लेख अनिता ताईंनी लिहिला होता. या लेखात अनिता ताईंनी फाळणीचा सत्य इतिहास उजेडात आणला होता. गेल्या आठ वर्षांत अनिता ताईंनी दिलेला हा विचार समाजात चांगला रुजला आहे. ९ डिसेंबर २0१९ रोजी सिटिजनशीप अमेंडमेंट बिलावर लोकसभेत झालेल्या चर्चेत सहभागी होताना काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी देशाच्या फाळणीचे बीज सावरकरांच्या द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांताने रोवले होते, असे स्पष्ट वक्तव्य केले. त्यानंतर १0 ऑक्टोबर रोजी काँग्रेसचे दुसरे नेते शशि थरूर यांनी हाच मुद्दा सभागृहाबाहेर मांडला. फाळणीला सावरकर आणि जीना कारणीभूत असल्याचे थरूर यांनी म्हटले.  हाच मुद्दा अनिता ताईंनी आठ वर्षांपूर्वी मांडला होता.
अनिता ताई यांच्या लेखातील हा उतारा :

"... फाळणीचे गुन्हेगार सावरकर हेच आहेत, हे त्रिवार सत्य आहे. सावरकरांच्या मुर्खपणामुळेच या देशाची फाळणी झाली. सावरकरांनी द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला. भारतात हिंदू आणि मुसलमान असे दोन समाज राहत नसून हे दोन स्वतंत्र देशच आहेत, असा सावरकरांच्या सिद्धांताचा थोडक्यात सारांश. सावरकरांनी हा सिद्धांत मांडला. त्याचा फायदा मोहंमद आली जीना आणि त्यांच्या मुस्लिम लीगला झाला. याच सिद्धांतानुसार भारताचे भारत आणि पाकिस्तान असे दोन तुकडे झाले. भारताच्या फाळणीला सर्वांत प्रथम जर कोणी जबाबदार असेल, तर ते सावरकर होत. जीनांचा नंबर सावरकरांच्या नंतर येतो.
महात्मा गांधी आणि काँग्रेसचा
फाळणीला विरोधच होता
महात्मा गांधी आणि काँग्रेसने फाळणीला शेवटपर्यंत विरोध केला होता. महात्मा गांधींनी तर +आधी माझ्या देहाचे दोन तुकडे होतील, मगच या देशाचे दोन तुकडे होतील+ अशी टोकाची भूमिका मांडली होती. मात्र सावरकर आणि त्यांचे इतर ब्राह्मणवादी अतिरेकी सहकारी तसेच बॅ। मोहंमद अली जीनांसारखे कट्टरवादी यांनी देशातील वातावरण एवढे खराब करून टाकले की, फाळणी स्वीकारल्याशिवाय गत्यंतरच राहिले नाही. देशात दंगलींचा आगडोंब उसळला होता. फाळणी स्वीकारली नसती, तर हा देश कित्येक वर्षे जळत राहिला असता, इतके वातावरण या लोकांनी तापविले होते. शेवटी देशाचे भले लक्षात घेऊन काँग्रेसने फाळणीला मान्यता दिली. दिली म्हणण्यापेक्षा द्यावी लागली, असे म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल...."  

अनिता ताईंनी समोर आणलेला लुप्त इतिहास सर्वमान्य होत असल्याचे पाहून आम्हाला खरोखर आनंद होत आहे. अनिता ताई यांच्या लेखाची लिंक येथे देत आहोत. तसेच मनीष तिवारी यांच्या भाषणाचे एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्ताची लिंक आणि थरूर यांच्या भाषणाचे 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्ताची लिंक देत आहोत.

-राजा मइंद, कार्यकारी संपादक, अपाविमं.

सावरकरांचा आत्मा अशांत का?
Savarkar Laid Foundation For Two-Nation Theory: Congress's Manish Tewari
Was not paying attention in history classes: Shashi Tharoor's dig at Amit Shah over partition remark