Showing posts with label नरेंद्र मोदी. Show all posts
Showing posts with label नरेंद्र मोदी. Show all posts

Sunday, 5 January 2014

नरेंद्र मोदी यांचा शिवरायांना मानाजा मुजरा

भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी रविवारी रायगडावर मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाजा मुजरा, त्याप्रसंगीचे छायाचित्र. नंतर मोदी यांची जाहीर सभाहीही रायगडावर झाली. 
शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी केलेले कार्य विराट, महान असताना त्यांचे रुप फक्त युद्धापुरतचं मर्यादित ठेवण्यात आल्याबद्दल भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी खंत व्यक्त केली. संभाजीराव भिडे संस्थापक असलेल्या सांगलीच्या शिवप्रतिष्ठानने काढलेल्या महानगर ते रायगड या धारातीर्थ यात्रेच्या सांगता समारंभाप्रसंगी रायगडावर उपस्थित असलेले मोदी बोलत होते. रविवारी दुपारी मोदी यांचे हेलिकॉप्टरने रायगडच्या पायथ्याशी आगमन झाले. मोदींनी प्रथम शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांना आदरांजली वाहिली.

आपल्या भाषणादरम्यान छत्रपती शिवरायांचा जयजयकार करणा-या मोदींनी शिवाजी महाराजांचा इतिहास अयोग्यपणे मांडण्यात आल्याची टीका केली. महाराजांसारख्या महान पुरूषाचे रूप हे फक्त योदध्याच्या प्रतिमेत बंदिस्त ठेवल्याची खंत व्यक्त करताना त्यांचे कार्य खूप विराट व महान असल्याचे सांगितले. सुरत शहरातील मोहिमेदरम्यान महाराजांना तेथील स्थानिकांचेही सहकार्य मिळाले. व त्यामुळेच त्यांना औरंगजेबाचा खजिना लुटता आला. मात्र, इतिहासकारांनी या घटनेचा विपर्यास करत या घटनेचे वर्णन 'सुरत लुटली' असे केले असून हा शिवरायांचा घोर अपमान आहे, असेही ते म्हणाले.


महाराष्ट्राला अनेक महान पुरूषांची परंपरा लाभली असल्याचे सांगत छत्रपती शिवाजी महाराज हे त्या महान पुरूषांपैकी एक असल्याचे ते म्हणाले. जनतेला आपल्या मुलाप्रमाणे मानणा-या महाराजांनी मुघलांच्या जाचातून मुक्त करण्यासाठी लढाई लढली. मात्र त्यांच कार्य तेवढ्यापुरतच मर्यादित नाही. त्यांचे राजकारण, समाजकारण, जनतेशी त्यांची सहिष्णू वागणूक, त्यांच्या काळातील सुशासन, शेतक-यांसाठी त्यांनी केलेलं कार्य, इंग्रजांशी त्यांनी केलेला व्यापार, यासह अनेक लौकिकास्पद कामगिरी महाराजांनी केल्या असताना त्यांच रुप फक्त युद्धापुरतचं मर्यादित ठेवण्यात आले, ही खेदाची गोष्ट असल्याचे ते म्हणाले.

हिंदुस्थानात एकही भाषा नाही, ज्यात शिवरायांची दखल घेतली गेलेली नाही, असे सांगत देशातील सर्व भाषिकांना शिवरायांचे ज्ञान आहे. ते एक महान राजा होते, असे मोदी म्हणाले. तसेच शिवरायांच्या या महान भूमीला मी नमन करतो, असे ते म्हणाले. भारत कुशासनातून मुक्त होऊन देशात सुशासन येवो, अशी शक्ती या पवित्र भूमीतून मिळो, ही प्रार्थना मी करतो, असेही ते म्हणाले. छत्रपती शिवराय, माता जिजाऊ यांना प्रणाम करत तसेच शिवप्रतिष्ठानचे संस्थापक भीडे गुरुजींचे आभार मानत मोदींनी आपल्या भाषणाची सांगता केली.

कोणतेही राजकीय भाष्य नाही 
दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोदी पंतप्रधान झाले तर देशाचा सर्वनाश होईल अशी टीका केली होती. पंतप्रधानांच्या या वक्तव्यानंतर मोदी काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष होते, मात्र रायगडावरील भाषणात मोदींनी कोणतेही राजकीय भाष्य केले नाही.


Tuesday, 6 August 2013

नरेंद्र मोदी सरकारकडून कच्छमधील शीख शेतक-यांचा छळ

गुजरात दंगलीत ३ हजार पेक्षा जास्त मुस्लिमांची कत्तल केली गेली. ही कत्तल होत होती, तेव्हा मुस्लिमेतर समाज गुजरातेत बघ्याची भूमिका घेत होता. मुस्लिमांना दहशतीखाली आणल्यानंतर आता बारी शिखांची आहे. गुजरातच्या कच्छ भागात स्थायिक झालेल्या १००० पेक्षाही जास्त शीख शेतक-यांना तेथून हाकलून लावण्यासाठी गुजरात सरकार धमकावित आहेत.

शिखांच्या मालकीच्या २० हजार एकर जमिनीवर डोळा
कच्छमधील शीख शेतक-यांचे नेते सुरेंदर सिंग भुल्लर यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, १९७३ सालच्या ‘बॉम्बे टेनन्सी अँड अ‍ॅग्रीकल्चरल लँड्स अ‍ॅक्ट' जुनाट या कायद्याचा आधार घेऊन २०१० सालापासून नरेंद्र मोदी सरकार शीख शेतक-यांचा छळ करीत आहेत. सुमारे १ हजार शीख शेतक-यांचा जमीन मालकीवरील हक्क काढून घेण्यात आला आहे. "तुम्ही गुजराती नाही आहात, त्यामुळे तुम्हाला गुजरातमध्ये जमीन मालक होण्याचा अधिकारच नाही", असे मोदी सरकारने शीख शेतक-यांना सुनावले आहे. गुजरातच्या कच्छ भागात २० हजार एकर शीख शेतक-यांच्या मालकीची आहे.  या जमिनीवर मोदी सरकार मधील माफियांचा डोळा आहे.

लाल बहादूर शास्त्री यांनी शिखांना कच्छ मध्ये आणले 
 १९६५ सालच्या भारत-पाक युद्धानंतर लाल बहादूर शास्त्री शीखांना कच्छमध्ये येण्याचे आवाहन केले होते. या भागात वसाहती निर्माण झाल्यास येथे विकास तर होईलच, पण पाकिस्तानच्या कारवायांनाही आळा बसेल, अशी मागील शास्त्रींची भूमिका होती. आपल्या मेहनतीच्या जोरावर शीख शेतक-यांनी कच्छच्या वाळवंटात नंदनवन फुलविले. त्याच शीखांना आता मोदी सरकार तेथून निघून जाण्यासाठी छळित आहे.

जंतर मंतरवर शीख समुदायाची  निदर्शने 
 गुजरातमधील या सरकार समर्थित दहशतवादाच्या विरोधात सोमवार दि. ५ ऑगस्ट रोजी शीख समुदायाच्या वतीने राजधानी दिल्लीत जंतर मंतर येथे जोरदार निदर्शने केली. मोदी यांचा पुतळाही शिखांनी जाळला. मोदींच्या विरोधातील शीख समुदायाच्या आंदोलनाची ही काही छायाचित्रे खाली दिली आहेत.

ही पहा शीख समुदायाच्या आंदोलनाची छायाचित्रे : 







संबधित लेख