Saturday 27 April 2013

लोकसत्तेचे यंटम संपादक

राजा मइंद, संपादक मंडळ सदस्य, अपाविमं.


लोकसत्तेचे संपादक यंटम झाले आहेत का? उपराकार लक्ष्मण माने यांच्यावरील बलात्काराच्या आरोपानंतर लोकसत्तेत प्रसिद्ध झालेला +साडेतीन टक्क्यांचा पद्मश्री उपरा+ हा अग्रलेख वाचल्यानंतर आमच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला होता. या अग्रलेखावरून ओरड झाल्यानंतर लोकसत्तेच्या वेबसाईटवर तो ब्लॉक करण्यात आला. हे ब्लॉकिन्ग प्रकरण पाहून आमच्या मनातील प्रश्न खात्रीत परावर्तीत झाला. लोकसत्तेचे संपादक खरोखरच यंटम झाले असावेत, असे दिसते. हा अग्रलेख ब्लॉक करून आपली चुकच लोकसत्तेने कबूल केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून अशा चुका लोकसत्ताकार करीत आहेत. टीका करण्याचा अधिकार वृत्तपत्रांना आहे. मात्र, टीकेतून वैयक्तिक आकस दिसता कामा नये. तसेच आपले वैयक्तिक हितसंबंधही डोकावता कामा नये, अशी अपेक्षा असते. माने यांच्या प्रकरणात लोकसत्तेने नेमके याच्या विरुद्ध वर्तन केले आहे. माने यांच्यावरील आरोपांचे भांडवल करून महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीला बदनाम करणारा तसेच जातीयवादी ब्राह्मणवाद्यांची तळी उचलणारा अग्रलेख लोकसत्तेच्या संपादकांनी खरडला.

१ एप्रिल २०१३ च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या या अग्रलेखाचा +साडेतीन टक्क्यांचा पद्मश्री उपरा!+ हा मथळा लोकसत्ताकारांचा ब्राह्मणी अजेंडा स्पष्ट करतो. म्हणूनच तो आक्षेपार्ह आहे. या अग्रलेखातील प्रत्येक शब्द आणि प्रत्येक वाक्य बहुजन समाजावर विष ओकते आणि जातीय ब्राह्मणवाद्यांची तळी उचलते. लोकसत्ता हे दैनिक जातीयवादी ब्राह्मणांचे मुखपत्र बनले आहे, हे अलिकडील लोकसत्तेमधील लिखाणातून वारंवार सिद्ध होत आहे. उपराकार लक्ष्मण माने यांच्यावरील बलात्काराच्या आरोपाप्रकरणी लोकसत्तेने घेतलेल्या भूमिकेतून त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. लोकसत्तेच्या ब्राह्मणीकरणाची प्रक्रिया फार पूर्वीच सुरू झाली होती. गिरीष कुबेर यांनी व्यवस्थापकीय संपादक पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ती पूर्णत्वास गेली, असे म्हणावे लागते.


माने हे काही आमचे मामा नव्हेत. त्यांनी पाप केले असेल, तर त्यांना कायदा शिक्षा करील. पण मानेंच्या आडून महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीला बदनाम करण्याचे पाप लोकसत्तेने करू नये.  
लोकसत्तेच्या वेबसाईटवर +साडेतीन टक्क्यांचा पद्मश्री उपरा+ हा अग्रलेख ब्लॉक केल्यामुळे उघडत नाही. उघडण्याचा प्रयत्न केल्यास असा संदेश संगणकावर उमटतो. या अग्रलेखाच्या वरचा आणि खालचा असे दोन्ही अग्रलेख मात्र उघडतात.
..................................................................................
बहुजन समाजातील नेत्यांची आणि महापुरुषांची बदनामी करायची. बहुजनांच्या श्रद्धास्थानांची विटंबणा करायची, असे उद्योग हे वृत्तपत्र गेली काही वर्षे करीत आहे. अनिता पाटील विचार मंचाविषयी विषारी प्रचार करणारा एक लेख +वाचावे नेटके+ या सदरातून लोकसत्तेने गेल्यावर्षी लिहिला होता. त्यानंतर महात्मा फुले यांची बदनामी करणारा एक लेख लोकसत्तेने प्रसिद्ध केला. अनिता पाटील विचार मंचाचे मुख्य संपादक प्रा. रविन्द्र तहकीक यांनी त्याचा परखड समाचार ब्लॉगवर घेतला होता. सगळीकडून बोंबाबोंब झाल्यानंतर लोकसत्तेने माफी मागून हे प्रकरण मिटविले होते.

Wednesday 17 April 2013

पांडुरंग आठवले यांनी चोर-लुटारू कोणाला म्हटले?

म्हणे, एकादशीच्या दिवशी सर्वांनी एकत्र जमून आक्रोश केला तरी प्रभू तो ऐकत नाही!

-राजा मइंद, (संपादक मंडळ सदस्य, अपाविमं)

समताधिष्ठित वारकरी सांप्रदायाला संपवून ब्राह्मण वर्चस्ववादी धर्माची स्थापना करण्यासाठी स्वाध्याय परिवाराचा जन्म झाला आहे, याचे सुतोवाच आम्ही मागच्या लेखात केले होते. त्याबाबत आज जरा विस्ताराने पाहू या.  पांडुरंग बुवा आठवले यांच्या प्रवचनांतील उतारेच्या उतारे वैष्णवधर्मीय वारक-यांच्या श्रद्धांची टिंगल-टवाळी करतात. वारक-यांवर थेट हल्ला करण्याचे मात्र आठवले टाळतात. थेट हल्ला केल्याने वारक-यांकडून आक्रमक प्रतिहल्ला होईल, हे न ओळखण्याएवढे आठवले अडाणी नव्हते. त्यामुळे वारक-यांविरुद्ध छुपी विष पेरणी करण्याचे तंत्र आठवल्यांनी वापरले. वारक-यांचा उल्लेख टाळून त्यांच्या श्रद्धांना ते टार्गेट करतात. 

१५ दिवसांनी येणा-या एकादशीला दिवसभर उपवास करणे आणि रात्री संतांच्या भजनाचा जागर करणे, हा वारकरी धर्म आणि अन्य वैष्णव पंथीयांच्या धर्मश्रद्धेचा पाया आहे. पायावर घाव घातला की इमारत आपोआप कोसळेल, असा अंदाज बांधून पांडुरंग बुवा आठवले यांनी एकादशीच्या उपवासाला आणि संतांच्या भजनाला थोतांड ठरविण्याचा प्रयत्न केला आहे. ‘एकादशीच्या दिवशी सर्वांनी मिळून आक्रोश केला तरी प्रभू तो ऐकत नाही' असे आठवले म्हणतात. येथे वारकरी हा शब्द वापरण्याचे आठवले टाळतात. हे कपटनाट्य आहे. याला नथीतून तीर मारणे म्हणतात. पण आठवले यांच्या विवेचनात एकादशी आणि भजनाचा (ज्याला आठवले आक्रोश म्हणतात) उल्लेख असल्यामुळे हा हल्ला वैष्णव आणि वारक-यांवरच आहे, हे स्पष्टच आहे. या पुढे जाऊन आठवलेबुवा एकादशीला संतांची भजने म्हणणा-यांना (म्हणजेच वारक-यांना) आळशी, निष्क्रिय अशी विशेषणे लावतात. इतकेच नव्हे तर या भोळ्या भक्तांची चोर-लुटारू अशी संभावना करण्याचा नतद्रष्टपणाही करतात. वारक-यांची अशी  अवहेलना आठवले अनेक ठिकाणी करतात. 

'दशावतार' या पुस्तकातील पान क्र. ११ वरील हा उतारा पाहा : 

‘...दर एकादशीच्या दिवशी आळशी आणि निष्क्रिय लोक एकत्र होतात व ओरडून सांगतात : ‘प्रभो! ह्या जगात फार घाण साचली आहे. तू ये आणि ती सगळी काढून टाक.' पण अशा ओरडण्याने भगवंत येणार नाही, हा शास्त्रीय सिद्धांत आहे.... गीतेच्या भाषेत सांगायचे झाले तर परित्राणाय साधूनाम' असेल, सज्जन ईश्वरकार्य करीत असतील तर त्यांच्या संरक्षणासाठी भगवान येतो. चोरांनी लुटलेल्या मालाची वाटणी करीत असताना होणारी भांडणे मिटविण्यासाठी तो येत नाही...'१

वारक-यांची अशी मानहाणी करण्यासाठी पांडुरंगबुवा आठवले वेदांची साक्ष काढतात. ‘दशावतार' या पुस्तकात पान क्र. १४ वर आठवले काय म्हणतात ते पाहा : 

‘...कारणाशिवाय अवतार होत नाही. ‘न ऋतश श्रांतस्य सख्याय देवा:' हा वैदिक सिद्धांत आहे. एकादशीच्या दिवशी सर्वांनी एकत्र जमून आक्रोश केला तरी प्रभू तो ऐकत नाही. ‘हा दगडाचा देव आहे', अशा आक्रोशाने तो पाझरणार नाही...'२

एकादशीचा नेम करणा-या वैष्णवांचे संतभजन पांडुरंगबुवांच्या दृष्टीने आक्रोश असून वैष्णवांचा देव दगड आहे. या बडबडीला आठवले वैदिक सिद्धांत म्हणतात. बहुजन समाजाची थट्टा करणारे हे विवेचन वैदिक सिद्धांत असूच शकत नाही. हा असुरी सिद्धांत आहे. मानवतेची हेटाळणी करणा-या पांडुरंगबुवांच्या या सिद्धांताला ‘दादासुराचा सिद्धांत' म्हणणेच अधिक योग्य ठरेल.

संदर्भ 
१. दशावतार, दुसरी आवृत्ती, ऑगस्ट १९८९, पान क्र. ११ 
प्रकाशक : सद्विचार दर्शन ट्रस्ट, मुंबई.

२. दशावतार, दुसरी आवृत्ती, ऑगस्ट १९८९, पान क्र. १४ 
प्रकाशक : सद्विचार दर्शन ट्रस्ट, मुंबई.


या विषयावरील इतर लेख

म्हणे, ब्राह्मणांसाठीच ईश्वर अवतार घेतो

पांडुरंगबुवा आठवले यांचा आणखी एक बोगस सिद्धांत

-राजा मइंद, (संपादक मंडळ सदस्य, अपाविमं)

स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगबुवा आठवले हे आपल्या नावापुढे शास्त्री ही पदवी लावतात. शास्त्र शिकवतो तो शास्त्री! पांडुरंगबुवा आठवले कोणते शास्त्र शिकवितात? पांडुरंगबुवा हे ब्राह्मणी वर्चस्वाचे शास्त्र शिकवितात. पण,  जातीभेद करणे हे शास्त्र कसे काय असू शकते? पांडुरंगबुवांची शिकवण हे शास्त्र नसून बहुजन समाजाला गुलामगिरीत ढकलण्यासाठी वापरले गेलेले शस्त्र आहे.

एकादशीला उपवास करून संतांची भजने म्हणणा-या वारकरी व अन्य वैष्णवांसाठी ईश्वर अवतार घेत नाही, असा दावा पांडुरंग बुवा आठवले यांनी केल्यानंतर लोकांच्या मनात सहज प्रश्न निर्माण होतो की, मग ईश्वर पृथ्वीवर अवतार कोणासाठी घेतो. यावर आठवलेबुवा अत्यंत खुबी उत्तर देतात : ईश्वर हा केवळ ब्राह्मणांसाठीच अवतार घेतो!

'दशावतार' या पुस्तकात आलेले या विषयावरील विवेचन भयंकर विषारी आहे. भारतीय समाजात ब्राह्मणांचे वर्चस्व राहिले पाहिजे. इतर सर्व जातींनी ब्राह्मणांच्या आज्ञेत राहिले पाहिजे अशाच आशयाची शिकवण पांडुरंगबुवांनी या विवेचनात दिली आहे. या पुस्तकात छापलेले परशुरामाच्या अवतारावरील पांडुरंगबुवांचे प्रवचन इतके जातीयवादी आहे की, त्याची तुलना कोणाशीच करता येऊ शकत नाही. या प्रवचनात ‘विदुषक ब्राह्मण' या विषयी काही विवेचन आले आहे. ते पाहिले की याची प्रचीती येते.

आठवले म्हणतात : ‘..तुम्ही जुनी नाटके वाचा. त्यात एक ब्राह्मण असतो. त्याला विदुषक म्हणून दाखविले जाते. आजही अधिकांश ब्राह्मण विदुषकाप्रमाणेच बनत चालले आहेत. कित्येक वेळा ब्राह्मणांची अशी अवस्था झाली आहे. आणि वारंवार भगवंताला अवतार घ्यावा लागला आहे...ज्यांच्यावर वैदिक संस्कृती, भारतीय गौरव, भारतीय सभ्यता व मानव सभ्यता ह्यांची फार मोठी जबाबदारी आहे अशा ब्राह्मणांना ज्यावेळी लोक सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर हास्यपात्र समजू लागतात, तेव्हा एखादी महान शक्ती येऊन योग्य उपाय योजना करते. त्यात आश्चर्य वाटण्याचे काही कारण नाही...'१

आठवलेबुवांचे प्रवचन खरे मानले तर ज्या काळी वर उल्लेखिलेली नाटके आली, तेव्हाच देवाने अवतार घ्यायला हवा होता. पण अजून तरी तो अवतरलेला नाही. ब्राह्मणांना विदुषक बनवूनही देव आलेला नाही, याचाच अर्थ आठवल्यांचा कथित वैदिक सिद्धांत खोटा ठरला आहे. 

बहुजन समाजाचा विदुषक झाल्यावर देव काय करतो?
भारतीय समाज-संस्कृतीचीच नव्हे, तर संपूर्ण मानवी सभ्यतेची जबाबदारी केवळ आणि केवळ ब्राह्मणांवर आहे, असा भ्रम येथे आठवलेबुवा निर्माण करतात. पण, संस्कृतीचा हा मक्ता ब्राह्मणांना कोणी दिला? ब्राह्मणांचा विदुषक झाल्यावर देव अवतार घेत असेल तर बहुजन समाजाची अवस्था विदुषकासारखी झाल्यावर देव काय करतो. सर्कशीतील विदुषकाची लोक जशी गंमत पाहतात, तशी देव बहुजनांची गंमत पाहतो का? बहुजन समाज देवाच्या पोटाखाली आलेला आहे, असे आठवल्यांना वाटत होते की काय कोण जाणे? ब्राह्मणांना देवाने निर्माण केले आणि बहुजनांना  सैतानाने निर्माण केले, असे काही आहे का? 

आठवलेबुवांच्या या विवेचनात एक मोठी मेख आहे. ‘ब्राह्मणांना ज्या वेळी लोक सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर हास्यपात्र समजू लागतात, तेव्हा एखादी महान शक्ती येऊन योग्य उपाय योजना करते', असे जेव्हा आठवलेबुवा म्हणता, तेव्हा त्यांना बहुजनांना धाक घालायचा असतो. खबरदार, ब्राह्मणांच्या विरोधात काही बोलाल तर देव तुमचा बंदोबस्त करील, अशी ताकीद आठवले देऊ इच्छितात. धर्माची भीती घालून ब्राह्मणांनी हजारो वर्षे पोटे भरली. तोच उद्योग येथे आठवलेही करून जातात.

ब्राह्मणांना देवाने जन्मत:च जानवे घालून का पाठवले नाही?
आम्ही सांगतो, ब्राह्मणांचीच काय कोणाचीच अवस्था विदुषकासारखी होता कामा नये. सर्वांना सन्मानाची वागणूक मिळायला हवी. तरच हा समाज टिकेल. ब्राह्मण हे देवाचे आवडते आहेत आणि बहुजन नावडते आहेत, असे जर आठवले आणि त्यांच्या स्वाध्याय परिवाराला वाटत असेल, ते मुर्खाच्या नंदनवनात आहेत असे म्हणावे लागते. फक्त ब्राह्मणच देवाचे लाडके असते, तर देवाने ब्राह्मणांना मातेच्या पोटात असतानाच जानवे घातले असते आणि ब्राह्मणाचे मूल हे जानवे गुंडाळूनच जन्माला आले असते. पण वस्तुस्थिती तशी नाही. बहुजनांची मुले जशी नाळ गुंडाळून जन्माला येतात तशीच ब्राह्मणांची मुलेही नाळ गुंडाळूनच जन्माला येतात. हाच खरा सिद्धांत आहे. या सिद्धांताला तुम्ही वैदिक म्हणा नाही तर अवैदिक, पण तोच सत्य आहे.

संदर्भ
१. दशावतार, दुसरी आवृत्ती, ऑगस्ट १९८९, पान क्र. ८४,८५ 
प्रकाशक : सद्विचार दर्शन ट्रस्ट, मुंबई. 


वरील विवेचनाचा पुरावा म्हणून पांडुरंग आठवले यांच्या दशावतार या पुस्तकातील एका पानाची फोटो कॉपी खाली देत आहे. जिज्ञासू वाचकांनी ती अवश्य पाहावी. 


Saturday 13 April 2013

या लोकसत्ताच्या तर मायला ….

 - प्रा. रवींद्र तहकिक


राहुल गांधीला ह भ प ही उपाधी लाऊन लोकसत्तातील संघोट्यानि महाराष्ट्रातील वारकरी
संप्रदायाचा अवमान केला आहे , मुळात राहुल गांधी हरीभक्त नाहीत, त्यात पारायण असण्याचाही
काही संबंध नाही, बरे त्यांनी काही बाष्कळ किंवा अर्थहीन बडबड केली असेल तर त्यावरून ते कोणत्या अर्थाने ह भ प ठरतात हे तरी लोकसत्तात बसलेल्या बेअक्कल अग्रलेखकांनी आम्हाला 
सांगावे, आम्हाला जी माहिती आहे त्या प्रमाणे महाराष्ट्रातील कोणीही ह भ प उपाधी असणारे
कीर्तनकार कोणतीही बाष्कळ व अर्थहिन बडबड करीत नाहीत, करतात ते बहुजनांच्या भाषेत
बहुजनांचे प्रबोधनच,     बाष्कळ अर्थहिन आणि फालतू बकबक करत असतील तर ते ब्राम्हणी पद्धतीने पोथ्या  पुराणांचे प्रवचन करणारे पोटभरू पुराणिक आणि स्वतःला पंडित म्हणवणारे शास्री, सात्यानारायानाच्या पोथ्या सांगताना नाकात चिंच खुपसल्या सारखा किन्नरा आवाज काढत
आणि ढुंगण हलवत पादत राव तूप साखर तेल डाळी चा किराणा भरणारे भट भिक्षुक आणि
सर्व सामान्य बहुजानाचे प्रबोधन करणाऱ्या ह भ प मध्ये काही फरक आहे याची लोकसत्तातल्या
संघोट्याना माहिती नाही असे नाही, हे सत्य त्यांना चांगले माहिती आहे. परंतु एखादी रंडी आपल्या
उठवळ वागण्याचे समर्थन करण्या साठी पतिव्रता तरी आमच्या पेक्षा वेगळे काय करतात ?
आम्ही फक्त पुरुष बदलतो असे म्हणू लागल्या तर त्यावर शहाण्याने काय बोलावे ?

         लोकसत्तातील संघोट्याचा कांगावा अगदी याच प्रकारातला आहे. पोटभरू किराणा भरू
गाव जोशी भट भिक्षुक आणि ह भ प यांच्यात काही फरक नाही हे दर्शवण्या साठी त्या महामूर्ख
संपादकाने राहुल गांधीना ह भ प असे मुद्दाम म्हटले आहे , आश्या अभक्त अभद्र बोलणार्या
ब्राम्हणाला नक्कीच एखाद्या रांडेने प्रसवले असले पाहिजे.     

हा अग्रलेख वाचून आम्हाला शाहीर दादा कोंडके यांची आठवण झाली. दादा कोंडके यांनी हा अग्रलेख वाचला असता तर ते नक्कीच म्हणाले असते : या लोकसत्ताच्या तर मायला ….

Thursday 11 April 2013

लोकसत्तेचा पुन्हा खोडसाळपणा : वारकरी उपाधीचा मुद्दाम केला अवमान!

ब्राह्मणवादी लोकसत्तेचा त्रिवार निषेध 

दैनिक "लोकसत्ता"कडून बहुजन समाजाच्या श्रद्धा स्थानांवर सातत्याने हल्ले होत अहेत. मागे महात्मा फुले यांचा अवमान करणारा एक लेख लोकसत्तेत छाचापून आला होता. या लेखावर सर्वप्रथम याच ब्लॉगवरून आवाज उठविण्यात आला होता. सगळी कडून बोबबोंब झाल्यानंतर लोकसत्तेने माफी मागून हे प्रकरण मिटविले होते. आता लोकसत्तेने वारकरी संप्रदायाचा अवमान केला आहे. शुक्रवार दि. ५ एप्रिल रोजीच्या अग्रलेखात लोकसत्तेने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना "ह.भ.प." ही उपाधी लावली आहे. अग्रलेखाचा मथळाच "ह.भ.प. राहुलबाबा" असा आहे. राहुल गांधी यांचे भाषण हे निरर्थक प्रवचन आहे, अशी टीका करण्यासाठी लोकसत्तेने या उपाधीचा आधार घेतला आहे. 

वारकरी परंपरेवर ब्राह्मणांचा राग

"ह.भ.प." ही वारकरी कीर्तनकार व प्रवचनकार यांना लावली जाणारी पवित्र उपाधी आहे. तसेच वारकरी कीर्तन-प्रवचनांत निरर्थक बडबड नसते. समतेची शिकवण कीर्तन-प्रवचनकार देत असतात. ब्राह्मणी व्यवस्थेला धक्के देण्याचे काम वारकरी परंपरेने केले आहे. त्यामुळे ब्राह्मणांचा वारकरी परंपरेवर विशेष राग आहे. लोकसत्ता हे वृत्तपत्र अलीकडे ब्राह्मणांचे मुखपत्र बनले आहे. त्यातून बहुजनांच्या श्रद्धास्थानांवर असे हिणकस हल्ले हे वृत्तपत्र करीत आहे. 

दिवाळखोर संपादक 

राहुल गांधी यांना ह.भ.प. संबोधण्यामागे लोकसत्तेची हीच ब्राह्मणी हिणकस वृत्ती दिसून येते. लोकसत्तेचे संपादक राहुल गांधींना "शास्त्रीबुवा" अशी पदवी का देअत नहित. "शास्त्रीबुवा" ही पदवी ब्राह्मण लवतात. मग तिचा अवमान लोकसत्तेचे ब्राह्मण कसे करतील? वारकरी शिकवण ज्यांना निरर्थक बडबड वाटते त्या संपादकाच्या बुद्धीचे दिवाळे वाजले आहे, असे म्हणावे लगते. 

वारकरी उपाधीचा अवमान केल्याबद्दल आम्ही लोकसत्तेचा जाहीर निषेध करीत आहोत.

लोकसत्तेचा मूळ अग्रलेख असा :

ह.भ.प. राहुलबाबा

मुंबई
Published: Friday, April 5, 2013

माझ्यावर विश्वास ठेवा, या पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या विधानावर हायसे मानावे तर दुसऱ्याच दिवशी राहुल गांधी जाहीर करतात त्यांच्याकडून काही होणार नाही. हे वास्तव अधिकच गोंधळात टाकणारे आहे..
एखाद्या विषयात आपण कच्चे आहोत याचे प्रांजळ भान आले म्हणजे त्या विषयात प्रगती होते असे नाही. राहुल गांधी यांच्या उद्योग महासंघाच्या मेळाव्यात गुरुवारी केलेल्या भाषणाकडे या नजरेने पाहावयास हवे. राहुल गांधी पहिल्यांदाच अशा स्वरूपाच्या उद्योजकांच्या मेळाव्यास सामोरे गेले. त्यामुळे त्यांच्या या भाषणाकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. केवळ चांगले 

भाषण इतक्याच अर्थाने पाहिल्यास त्या अपेक्षा पूर्ण झाल्या असे म्हणावयास हवे. परंतु ज्याच्या हाती सत्तेची दोरी आहे त्याचे मूल्यमापन केवळ चांगल्या भाषणावर करून चालत नाही. त्या भाषणातील विचारास साजेशी त्याची कृती आहे का, हेही पाहावे लागते. तो विचार केल्यास राहुल गांधी यांचे मूल्यमापन भाषणाच्या पलीकडे जाऊन करावे लागेल. मध्यंतरी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी सत्ता हे विष आहे असे चमकदार विधान करू न सर्वानाच धक्का दिला होता. पुढे जाऊन त्या विषाचे सेवन आपण वा आपला पक्ष करणार की नाही, याबाबत त्यांनी अर्थातच मौन पाळले. खेरीज, या विषापासून वाचण्यासाठी काय करायला हवे याचेही मार्गदर्शन त्यांनी स्वपक्षीयांना केले नाही. ज्या घराण्याने स्वातंत्र्योत्तर काळात भारताची सत्ता दोनतृतीयांशपेक्षा अधिक वर्षे भोगली आहे त्या घराण्याच्या वारशाने सत्तेस विष ठरवल्यास त्यातून बातमीसाठी चांगला मथळा मिळतो. अधिक काही होत नाही. राहुल गांधी यांच्या कालच्या उद्योगपतींसमोरच्या भाषणाबाबतही अशीच प्रतिक्रिया निर्माण झाल्यास नवल म्हणता येणार नाही. 

देशातील राजकीय व्यवस्था तुंबलेली आहे आणि ती सामान्यांची दखल घेत नाही, असे राहुल गांधी म्हणाले. ते खरेच आहे. पण या वास्तवाच्या कबुलीमुळे एक प्रश्न निर्माण होतो. तो असा की जे कुटुंब राजकीय सत्ताधिकाराच्या केंद्रस्थानी आहे त्या घराण्याने ही तुंबलेली राजकीय व्यवस्था साफ करण्यासाठी काय केले? सध्या हे घराणे थेट सत्तास्थानी नसेल. पण सत्तेच्या दोऱ्या आणि चाव्या याच घराण्याच्या हाती आहेत. तेव्हा पंतप्रधान मनमोहन सिंग यांना सांगून वा ज्या राज्यात आपली सरकारे आहेत तेथील मुख्यमंत्र्यांना सांगून हा सत्तेचा प्रवाह पुन्हा वाहू लागेल यासाठी राहुल गांधी यांनी कोणते उपाय योजले. ही व्यवस्था सुधारण्याची मागणी राहुल गांधी यांनी पहिल्यांदा केली, त्यालाही बराच काळ लोटला. भावी पक्षनेतृत्वाच्या मताची दखल घेऊन याबाबत काँग्रेसने काही केले असेही झालेले नाही. आणि दुसरे असे की राजकीय व्यवस्था तुंबलेली आहे, हे सत्य जनसामान्यांना माहीत नव्हते असेही नाही. तेव्हा यात बदल करण्याचा कोणताही मार्ग न दाखवता वा उपाय न सुचवता पुन्हा तोच मुद्दा मांडण्यात काय हशील? कोणताही राजकीय निरीक्षक असो वा कार्यकर्ता वा सामान्य नागरिक. त्याचेही हेच मत आहे. तेव्हा ते मांडण्यासाठी राहुल गांधी असण्याची गरजच काय?
सत्ता व्यक्तिकेंद्रित राहून काही होणार नाही, देशभरातील नागरिकांना सत्तेत सहभागी करून घेतले पाहिजे हे टाळ्याखाऊ वाक्य राहुल गांधी यांनी गुरुवारीही उच्चारले. परंतु म्हणजे काय करायचे? प्रत्येक प्रश्नावर, प्रशासकीय निर्णयावर तो निर्णय घेणाऱ्या यंत्रणेने जनमत घ्यावयाचे काय? हाच जर समजा मार्ग असेल तर तो भारताचा आकार लक्षात घेता एकदम केंद्रीय पातळीवर राबवणे शक्य नाही, हे समजण्यासारखे आहे. परंतु मग राहुल गांधी यांनी ज्या राज्यांत आपली सत्ता आहे त्या राज्यात अशा प्रकारची सुरुवात करून उदाहरण का नाही घालून दिले? त्यासाठी त्यांना कोणी मनाई केली होती काय? याबाबतही ढळढळीत विरोधाभास असा की जी मते राहुल गांधी मांडतात त्याच्या बरोबर उलट सरकारचे वागणे आहे. तेव्हा जनतेने काय समजावयाचे? सामान्यांस सक्षम केले पाहिजे असे राहुल गांधी सांगतात. परंतु सरकार मात्र वेगवेगळय़ा अनुदान योजना आखून जनतेस खिरापत वाटण्यात धन्यता मानते, हे कसे? काल जे उपदेशामृत राहुल गांधी यांनी उद्योग जगताला पाजले ते आपल्याच पक्षाच्या सरकारला पाजणे अधिक सोपे असे त्यांना वाटत नाही काय? याच उद्योग जगतासमोर बुधवारी बोलताना पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी धोरणलकव्याने त्रस्त झालेल्या उद्योजकांना सल्ला दिला, माझ्यावर विश्वास ठेवा. गुरुवारी राहुल गांधी यांनी बरोबर त्याच्या उलट विधान केले. मनमोहन सिंग यांच्या एकटय़ाकडे अधिकार देऊनही ते काही करू शकणार नाहीत, असे राहुल गांधी यांनी काल ठणकावून सांगितले. त्यामुळे तर अर्थविश्वाची अधिकच गोची झाली असणार. माझ्यावर विश्वास ठेवा, या पंतप्रधानांच्या विधानावर हायसे मानावे तर दुसऱ्याच दिवशी राहुल गांधी जाहीर करतात त्यांच्याकडून काही होणार नाही. हे वास्तव अधिकच गोंधळात टाकणारे. असे सांगताना नरेंद्र मोदी यांचा पुळका असलेल्या उद्योग क्षेत्रालाही त्यांनी सुनावले. घोडय़ावरून येणारा कोणी एखादा आपल्या सर्व समस्या सोडवेल असा तुमचा ग्रह असेल तर तसे होणारे नाही, असे या ज्यु. गांधी यांना वाटते. मत म्हणून त्याचा आदर करण्यास कोणाचाच प्रत्यवाय असणार नाही. परंतु मुद्दा असा की काय केल्याने काय होणार नाही याचे पुरेसे भान आता अनेकांना आलेले आहे. प्रश्न आहे तो काय केल्याने काय होईल आणि ते कसे करता येईल हे उपाय सांगण्याचा. तो उपाय मात्र काही त्यांनी या वेळी सांगितला नाही. विकास सर्वसमावेशक, सर्वाना बरोबर घेऊन जाणारा हवा असाही सल्ला राहुल गांधी यांनी उपस्थितांना दिला. हे कसे करायचे याचेही दोनचार पर्याय त्यांनी सुचवले असते तर अधिक चांगले झाले असते. कारण आकाशातील दूरसंचार लहरी असो वा पाताळातील कोळसा. कोणत्याच क्षेत्राबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नसल्याने विकासाचा गाडा आपल्याकडे बराच काळ अडलेला आहे. अशा वेळी सर्वसमावेशक विकास कसा करायचा याच्या मार्गदर्शनाचीही नितांत गरज होती. वेगवेगळय़ा समस्यांवरील उपायांसाठी सर्वाशी चर्चा करायला हवी, असेही मत त्यांनी मांडले. योग्यच आहे ते. परंतु सत्तेत असलेल्या त्यांच्या पक्षाने या संदर्भात विरोधकांना किती वेळा आणि कोणत्या प्रश्नावर चर्चेचे निमंत्रण दिले हेही कळावयास हवे. आर्थिक क्षेत्राबाबत भारत हा हत्ती नाही तर मधमाश्यांचे पोळे आहे, असा दृष्टान्त राहुल गांधी यांनी दिला. ते मान्य केले तर हे मधाचे पोळे कशाला चिकटलेले आहे आणि त्याच्या केंद्रस्थानी काय आहे हे समजून घेण्याचीही आवश्यकता आहे. आणि पुन्हा या पोळय़ाची राणीमाशी कोण, हा प्रश्नदेखील उरतोच. तो अर्थातच राहुल गांधी यांनी आपल्यावर सोडला आहे. 
वास्तविक उद्योग जगत असो वा देश. आज गरज आहे ती समस्या काय आहेत येथपर्यंतच मर्यादित न राहता त्यावर मार्ग काय हे सांगणाऱ्यांची. राहुल गांधी यांच्याकडून अपेक्षा होत्या त्या याबाबत. परंतु आतापर्यंत सातत्याने राहुल गांधी त्याबाबत कमी पडताना दिसतात. देशाला पुढे न्यायची त्यांची खरोखरच इच्छा असेल तर त्यांनी स्वत: अथवा पक्षाकडून ठोस काही कृती करून दाखवावी. अन्यथा हे ह.भ.प. राहुलबाबा यांचे आणखी एक प्रवचन ठरेल.


लोकसत्तेच्या बहुजन विरोधी कारवाया येथे वाचा :

लोकसत्तेने केला महात्मा फुले यांचा अपमान
वाचावे नेट-के : तिरस्काराच्या पलीकडे...

Wednesday 10 April 2013

‘ऐसी अक्षरे'वरील ‘भयंकर एक लेख'!


‘अपाविमं'ला ब्राह्मणवादी एवढे का घाबरतात? कारण ‘अपाविमं'वर ब्राह्मणी ग्रंथातील पापे पुराव्यासह जगजाहीर केली गेली आहेत. ‘मिसळपाव' या ब्राह्मणी संकेत स्थळावरील 'अपाविमं'विरोधातील गरळ मागच्या लेखात दिली होती. आता ‘ऐसी अक्षरे' या दुस-या ब्राह्मणी संकेत स्थळावरील मळमळ वाचकांच्या निदर्शनास आणून देत आहोत. सप्टेंबर २०१२ मध्ये ‘ऐसी अक्षरे'वर सुप्रिया जोशी नामक बाईंनी अपाविमं विरोधात एक लेख लिहिला. त्याचे शीर्षक आहे - मी वाचलेला भयंकर एक ब्लॉग! 

ऋग्वेदी ब्राह्मण हे मूळचे कसे गोमांस भक्षक आहेत, याचा पर्दाफाश आदरणीय अनिताताईंनी एका लेखमालेत केला होता. आश्वलायन गृह्य सूत्रातील पुरावे ताईंनी त्यासाठी दिले आहेत. हा लेख वाचून ‘ऐसी अक्षरे'वरील ब्राह्मणवाद्यांना भोवळच आली. त्यातून सुप्रिया बाईंचा वरील लेख आला आहे. अपाविमंच्या वाचकांनी हा लेख वाचावा. तसेच मूळ संकेत स्थळवर जाऊन लेखावरील प्रतिक्रियाही वाचाव्यात. आश्वलायनाचे गृह्य सूत्र काय आहे, याची प्राथमिक माहितीही ‘ऐसी अक्षरे'वरील विद्वानांना नाही, हे या प्रतिक्रियांवरून दिसून येते.
-संपादक मंडळ, अपाविमं.


मी वाचलेला भयंकर एक ब्लॉग

लेखक/लेखिका: सुप्रिया जोशी (गुरुवार, 06/09/2012 - 07:47)
अनिता पाटील नावाच्या एक महिलेचा ब्लॉग मी वाचला. ब्लॉग अभ्यासपूर्ण वाटला. म्हणजे किमान लेखन अभ्यासपूर्ण आहे, हे दिसेल याची खबरदारी लेखिकेने घेतलेली दिसली. या ब्लॉगवरील मजकूर धक्कादायक आहे. गोमांस भक्षक ब्राह्मण या विषयावरीलच लेख तर भयंकरच आहेत. या विषयावर एकूण चार-पाच लेख ब्लॉगवर आहेत. हे लेख वाचून मला भोवळच आली. प्राचीन काळी ब्राह्मण गोमांस खात असत, असे ह्याच्यातील प्रत्येक लेखात वारंवार सांगितले गेले आहे. तसा दावा करण्यात आला, असे म्हणणे अधिक योग्य राहील. प्राचीन काळातील ब्राह्मणांचे गोमांस भक्षण सिद्ध करण्यासाठी पाटील बार्इंनी संस्कृत भाषेतील असंख्य श्लोक लेखात दिले आहेत. हे श्लोक खरे आहेत का, याबाबत मला तरी संशयच वाटतो. कारण मी असे या पूर्वी कधीही ऐकलेले नाही. कुठे वाचलेले सुद्धा नाही.

अनिता पाटील यांनी गोमांसा विषयाच्या लेखानमध्ये अश्वलायन गृह्य सूत्र या नावाच्या ग्रंथाचा आधार घेतला आहे. या ग्रंथातील अनेक श्लोक लेखासाठी मोठ्या प्रमाणात घेण्यात आल्याचे दिसून येत होते. असा काही ग्रंथ आहे, हे माझ्या वाचनात आलेले नाही. तज्ज्ञांनी यावर प्रकाश टाकायला हवा. असा ग्रंथ नसेल, तर तसे स्पष्टपणे समोर यायला हवे. आणखीन, असेल तर या ग्रंथात नेमके काय म्हटले आहे, हे तपासून पाहायला पाहिजे आहे. असा ग्रंथ कोणाला माहिती आहे का? असल्यास कृपया सांगावे.

आणखीन एक गोष्ट अशी की, अनिता बाइंच्या लेखांत मनुस्मृतीमधील काही श्लोक सुद्धा मला दिसले. इतकेच काय ऋगवेदातले श्लोक सुद्धा आहेत. माझा यापैकी कोणत्याच ग्रंथाचा अभ्यास नाही. जाणकार लोकांनी या ब्लॉगला भेट देऊन सत्यता तपासून पाहायला पाहिजे हवी. मनुस्मृती आणखीन ऋगवेदातील श्लोकांचा खरा अर्थ लोकांच्या पुढे यायला पाहिजे आहे, असे माझे स्वत:चे मत आहे.

माझ्या अल्पमती प्रमाणे मी माझे मत या येथे उकलून मांडले आहे. गोड मानून घ्यावे, ही सर्वांना नम्रतेची हात जोडून विनंती तसेच हा माझा पहिलाच लेख आहे. हे सुद्धा मी नमूद करून ठेवते.

मी नवीनच ब्लॉग काढला आहे, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.

...........................................................................
नवा जोड
..........................................................................

प्रश्नांची उत्तरे मिळायला पाहिजे आहे
या विषयावर दोन दिवस चर्चा झाली. पण मी ज्या हेतूसाठी हा लेख लिहिला होता, तो आणखीन साध्य झालाच नाही. कारण मी जे काही प्रश्न येथे विचारून ठेवले होते, त्यांची नेमकी उत्तरे मिळालेली नाहीत.
माझे प्र्श्न असे आहे -


१. अनिता पाटील यांनी अश्वलायन गृह्यसूत्र नावाच्या कोणत्या तरी ग्रंथाचा आधार घेऊन गोमांस
भक्षणाचे लेख लिहिले आहेत. असा खरेच काही ग्रंथ आहे का?
२.असलाच आहे, तर तो कोठे उपलब्ध होईल?
यांची उत्तरे मला मिळायला पाहिजे आहे.
.......................
अनिता पाटील यांच्या लेखात आलेल्या पुस्तकांच्या नावाची खात्री करून घेता यावी म्हणून त्यांच्या ब्लॉगचा धागा खाली देऊन ठेवते आहे :
खलील प्रमाने सुद्द्दा हा ब्लोग उघड्तो.







या लेख मालेतील इतर लेख :

‘मिसळपाव'वर अनिता पाटील यांच्यावर आगपाखड

Thursday 4 April 2013

‘मिसळपाव'वर अनिता पाटील यांच्यावर आगपाखड


आदरणीय अनिता तार्इंनी २०११ मध्ये हा ब्लॉग सुरू केला. ब्लॉगवरील अभ्यासपूर्ण लेखांनी जातीयवाद्यांच्या तंबूत घबराट पसरली. ब्लॉगच्या विरोधात मोठ्या प्रमाणात लिखाण होऊ लागले. काही ब्लॉग तर केवळ अनिता ताई यांना विरोध एवढ्या एकाच उद्देशाने काढले गेले. लोकशाहीत विरोध नोंदविण्याचा हक्क सर्वांनाच आहे. ‘अनिता पाटील विचार मंच'चे (अपाविम) संपादक मंडळ विरोधकांचा तिरस्कार करीत नाही. उलट विरोधकांची दखल घेण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. आमच्या ब्लॉगच्या विरोधातील लिखाण या पुढे टप्प्याने वाचकांना उपलब्ध करून दिले जाईल. ‘आमचे विरोधक' या सदरात हे लेख प्रसिद्ध होतील. ‘मिसळ पाव' या संकेत स्थळावरील लेखाने या सदराची सुरुवात करीत आहोत. ब्राह्मणांनी ब्राह्मणांसाठी चालविलेले संकेत स्थळ अशी ‘मिसळ पाव'ची ओळख आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. ‘मिसळ पाव'वर प्रसिद्ध झालेल्या लेखावरील प्रतिक्रिया वाचकांनी अवश्य वाचाव्यात.

-संपादक मंडळ, अपाविम.

Published on मिसळपाव (http://www.misalpav.com)

Tuesday 2 April 2013

पांडुरंगशास्त्री आठवल्यांकडून तुकोबांविषयी खोटारडा प्रचार

...म्हणे तुकाराम महाराजांपासून इश्वर दूरच राहिला

राजा मइंद


पांडुरंगशास्त्री आठवल्यांनी दशावतारावर अनेक प्रवचने दिली. त्याचे संकलन ‘दशावतार' या नावाच्या पुस्तकात स्वाध्याय परिवारातर्फे करण्यात आले आहे. माझ्याकडे या पुस्तकाची ऑगस्ट १९८९ मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली दुसरी आवृत्ती आहे. स्वाध्याय परिवारातर्फे चालविल्या जाणा-या सद्विचार दर्शन ट्रस्टतर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. या पुस्तकातील प्रत्येक पान जातीय ब्राह्मणवादी विचारांनी भरलेले आहे. या पुस्तकात जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची कुत्सित शब्दांत हेटाळणी करण्यात आली आहे. ही हेटाळणी कुटाळकीच्या पातळीवरची आहे.  तुकोबांनी आठ-आठ जन्म घेऊनही ईश्वर त्यांच्यापासून दूरच राहिला, असा खोटा प्रचार आठवले करतात.

पुस्तकातील ‘अवतार मीमांसा' नावाच्या पहिल्याच प्रकरणात हा प्रकार आठवल्यांनी केला आहे.  या विवेचनातील आठवल्यांचे शब्द पुढील प्रमाणे आहेत : 

...ट्रान्समायझेशन म्हणजे म्हणजे उत्क्रांतीवादाच्या पद्धतीने विकास करीत दिव्यमानव बनून मनुष्याने वर येणे. उदाहरणार्थ, तुकाराम महाराज आठ आठ जन्म घेऊन स्वत:चा विकास करीत राहिले, परंतु ईश-चैतन्य मात्र स्वत: दूरच उभे राहिले.१

किती ही थापेबाजी? तुकोबांना इश्वराचे दर्शनच झाले नाही, असे विवेचन करून आठवले तुकोबांचा घोर अपमानच करतात. तुकोबांना इश्वराचा साक्षात्कार झाला होता. त्या विषयीचे शेकडो अभंग त्यांच्या गाथ्यात आहेत. ‘अणुरणीया थोकडा तुका आकाशा एवढा' अशी तुकोबांची अवस्था झाली होती. पण, त्याकडे आठवलेबुवा सोयीस्कर दुर्लक्ष करतात. 

वारकरी धर्माविरोधात ‘स्वाध्याया'चे कारस्थान
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या विषयी, असा अवमानकारक अपप्रचार करून पांडुरंगबुवांना आठवल्यांना काय साध्य करायचे होते? वारकरी सांप्रदायाने महाराष्ट्रात वैदिक धर्मातील विषमते विरुद्ध बंड पुकारले. धार्मिक क्षेत्रात समतेचा झेंडा रोवला. आज वारकरी सांप्रदाय महाराष्ट्राचा मुख्य धर्म आहे. वारकरी धर्माचा थेट फटका ब्राह्मणांना बसला. धर्मक्षेत्रातील ब्राह्मणांच्या एकाधिकारच वारकरी संतांनी प्रहार केले. त्यामुळे विषमतावादी ब्राह्मणी विचारांचा पुरस्कार करणा-यांचा वारकरी सांप्रदायावर विशेष राग आहे. वारकरी धर्मातील प्रत्येक संताला ब्राह्मणांनी छळले. ज्ञानेश्वरापासून तुकोबापर्यंत सर्वच संतांना ब्राह्मणांच्या या छळाला तोंड द्यावे लागले. वारकरी संत मात्र ब्राह्मणांपुढे झुकले नाही. वारक-यांचा समतेचा विचार मारला जाऊ शकला नाही. त्यामुळेच वारकरी धर्म हा महाराष्ट्राचा मुख्य धर्म बनू शकला. 

थेट विरोध करून वारक-यांचा विचार संपविला जाऊ शकत नाही, हे लक्षात आल्यानंतर विषमतावादी ब्राह्मणी विचारांच्या पुरस्कत्र्यांनी आता छुप्या पद्धतीचा अवलंब सुरू केला आहे. पांडुरंग शास्त्री आठवले यांनी उभा केलेला स्वाध्याय परीवार याच मार्गाने चालला आहे. महाराष्ट्रातील समतावादी वारकरी विचार संपवून विषमतावादी जातीय विचार रुजविणे हेच स्वाध्याय परिवाराचे मुख्य लक्ष्य आहे. पांडुरंगशास्त्री आठवल्यांच्या पुस्तकातील उतारे पाहिले की, स्वाध्याय परिवाराचा छुपा अजेंडा लक्षात येतो. 


संदर्भ : 
१. दशावतार, दुसरी आवृत्ती, ऑगस्ट १९८९, पान क्र. ६ 
प्रकाशक : सद्विचार दर्शन ट्रस्ट, मुंबई.