Wednesday 10 April 2013

‘ऐसी अक्षरे'वरील ‘भयंकर एक लेख'!


‘अपाविमं'ला ब्राह्मणवादी एवढे का घाबरतात? कारण ‘अपाविमं'वर ब्राह्मणी ग्रंथातील पापे पुराव्यासह जगजाहीर केली गेली आहेत. ‘मिसळपाव' या ब्राह्मणी संकेत स्थळावरील 'अपाविमं'विरोधातील गरळ मागच्या लेखात दिली होती. आता ‘ऐसी अक्षरे' या दुस-या ब्राह्मणी संकेत स्थळावरील मळमळ वाचकांच्या निदर्शनास आणून देत आहोत. सप्टेंबर २०१२ मध्ये ‘ऐसी अक्षरे'वर सुप्रिया जोशी नामक बाईंनी अपाविमं विरोधात एक लेख लिहिला. त्याचे शीर्षक आहे - मी वाचलेला भयंकर एक ब्लॉग! 

ऋग्वेदी ब्राह्मण हे मूळचे कसे गोमांस भक्षक आहेत, याचा पर्दाफाश आदरणीय अनिताताईंनी एका लेखमालेत केला होता. आश्वलायन गृह्य सूत्रातील पुरावे ताईंनी त्यासाठी दिले आहेत. हा लेख वाचून ‘ऐसी अक्षरे'वरील ब्राह्मणवाद्यांना भोवळच आली. त्यातून सुप्रिया बाईंचा वरील लेख आला आहे. अपाविमंच्या वाचकांनी हा लेख वाचावा. तसेच मूळ संकेत स्थळवर जाऊन लेखावरील प्रतिक्रियाही वाचाव्यात. आश्वलायनाचे गृह्य सूत्र काय आहे, याची प्राथमिक माहितीही ‘ऐसी अक्षरे'वरील विद्वानांना नाही, हे या प्रतिक्रियांवरून दिसून येते.
-संपादक मंडळ, अपाविमं.


मी वाचलेला भयंकर एक ब्लॉग

लेखक/लेखिका: सुप्रिया जोशी (गुरुवार, 06/09/2012 - 07:47)
अनिता पाटील नावाच्या एक महिलेचा ब्लॉग मी वाचला. ब्लॉग अभ्यासपूर्ण वाटला. म्हणजे किमान लेखन अभ्यासपूर्ण आहे, हे दिसेल याची खबरदारी लेखिकेने घेतलेली दिसली. या ब्लॉगवरील मजकूर धक्कादायक आहे. गोमांस भक्षक ब्राह्मण या विषयावरीलच लेख तर भयंकरच आहेत. या विषयावर एकूण चार-पाच लेख ब्लॉगवर आहेत. हे लेख वाचून मला भोवळच आली. प्राचीन काळी ब्राह्मण गोमांस खात असत, असे ह्याच्यातील प्रत्येक लेखात वारंवार सांगितले गेले आहे. तसा दावा करण्यात आला, असे म्हणणे अधिक योग्य राहील. प्राचीन काळातील ब्राह्मणांचे गोमांस भक्षण सिद्ध करण्यासाठी पाटील बार्इंनी संस्कृत भाषेतील असंख्य श्लोक लेखात दिले आहेत. हे श्लोक खरे आहेत का, याबाबत मला तरी संशयच वाटतो. कारण मी असे या पूर्वी कधीही ऐकलेले नाही. कुठे वाचलेले सुद्धा नाही.

अनिता पाटील यांनी गोमांसा विषयाच्या लेखानमध्ये अश्वलायन गृह्य सूत्र या नावाच्या ग्रंथाचा आधार घेतला आहे. या ग्रंथातील अनेक श्लोक लेखासाठी मोठ्या प्रमाणात घेण्यात आल्याचे दिसून येत होते. असा काही ग्रंथ आहे, हे माझ्या वाचनात आलेले नाही. तज्ज्ञांनी यावर प्रकाश टाकायला हवा. असा ग्रंथ नसेल, तर तसे स्पष्टपणे समोर यायला हवे. आणखीन, असेल तर या ग्रंथात नेमके काय म्हटले आहे, हे तपासून पाहायला पाहिजे आहे. असा ग्रंथ कोणाला माहिती आहे का? असल्यास कृपया सांगावे.

आणखीन एक गोष्ट अशी की, अनिता बाइंच्या लेखांत मनुस्मृतीमधील काही श्लोक सुद्धा मला दिसले. इतकेच काय ऋगवेदातले श्लोक सुद्धा आहेत. माझा यापैकी कोणत्याच ग्रंथाचा अभ्यास नाही. जाणकार लोकांनी या ब्लॉगला भेट देऊन सत्यता तपासून पाहायला पाहिजे हवी. मनुस्मृती आणखीन ऋगवेदातील श्लोकांचा खरा अर्थ लोकांच्या पुढे यायला पाहिजे आहे, असे माझे स्वत:चे मत आहे.

माझ्या अल्पमती प्रमाणे मी माझे मत या येथे उकलून मांडले आहे. गोड मानून घ्यावे, ही सर्वांना नम्रतेची हात जोडून विनंती तसेच हा माझा पहिलाच लेख आहे. हे सुद्धा मी नमूद करून ठेवते.

मी नवीनच ब्लॉग काढला आहे, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.

...........................................................................
नवा जोड
..........................................................................

प्रश्नांची उत्तरे मिळायला पाहिजे आहे
या विषयावर दोन दिवस चर्चा झाली. पण मी ज्या हेतूसाठी हा लेख लिहिला होता, तो आणखीन साध्य झालाच नाही. कारण मी जे काही प्रश्न येथे विचारून ठेवले होते, त्यांची नेमकी उत्तरे मिळालेली नाहीत.
माझे प्र्श्न असे आहे -


१. अनिता पाटील यांनी अश्वलायन गृह्यसूत्र नावाच्या कोणत्या तरी ग्रंथाचा आधार घेऊन गोमांस
भक्षणाचे लेख लिहिले आहेत. असा खरेच काही ग्रंथ आहे का?
२.असलाच आहे, तर तो कोठे उपलब्ध होईल?
यांची उत्तरे मला मिळायला पाहिजे आहे.
.......................
अनिता पाटील यांच्या लेखात आलेल्या पुस्तकांच्या नावाची खात्री करून घेता यावी म्हणून त्यांच्या ब्लॉगचा धागा खाली देऊन ठेवते आहे :
खलील प्रमाने सुद्द्दा हा ब्लोग उघड्तो.







या लेख मालेतील इतर लेख :

‘मिसळपाव'वर अनिता पाटील यांच्यावर आगपाखड

No comments:

Post a Comment