Tuesday 27 August 2013

परुळेकर नाम रख लेने से कोई नानासाहब नही बन जाता..!

-राजा मइंद, संपादक मंडळ सदस्य, अपाविमं.

रणबीर कपूरच्या नव्या सिनेमाचे प्रोमोज सध्या टिव्हीवर दिसत आहेत. त्यातील एक डायलॉग भन्नाट आहे. रणबीर म्हणतो : "चुलबुल नाम रख लेने से कोई दबंग नही बन जाता." राजू परुळेकर यांच्या ब्लॉगवरील "डॉ. नरेंद दाभोलकरांना कुणी मारले?" हा लेख वाचल्यानंतर आम्हालाही असाच एक डायलॉग सूचला आहे. "परुळेकर नाम रख लेने से कोई नानासाहब नही बन जाता.. हा… हा…"   सकाळच्या संस्थापकांचे आडनावही परुळेकर होते. त्यांना लोक आदराने नानासाहेब म्हणत. पण केवळ आडनाव परुळेकर असले म्हणून कोणीही नानासाहेब होऊ शकत नाही. राजू भायला हे कोण सांगणार? राजू भायला उगागचच आपण नानासाहेब असल्याचा भास होतो. काही तरी भव्यदिव्य करण्याचा नाद त्यांना मग लागतो आणि त्यातून ते "डॉ. नरेंद्र दाभोलकरांना कुणी मारले?" यासांरखे लेख पाडून मोकळे होतात. 

डॉ. दाभोलकरांना कोणी मारले? डॉ. दाभोलकरांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांच्या मित्रपक्षाच्या सहकारी मंत्र्यांनी ठार मारले! सुपारी देऊन त्यांना गोळ्या घातल्या!! राजू परूळेकर यांनी हा शोध वर उल्लेख केलेल्या लेखात लावला आहे. राजू भाय यांच्या बुद्धिमत्तेला अपाविमंच्या वतीने सलाम. परुळेकरांनी शोधले आहे. परुळेकर या थिअरीबद्दल जबरदस्त कॉन्फिडंट आहेत. खून कटात सहभागी असलेली व्यक्तीच इतकी कॉन्फिडंट असू शकते! मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी खरोखरच डॉ. दाभोलकरांना मारले असेल, तर या कटात राजू परूळेकर नक्की सहभागी असणार, असे त्यांच्या लेखावरून दिसते. दाभोलकरांचे मारेकरी शोधण्यासाठी पोलिसांनी १९ पथके स्थापन केली आहेत, असे आम्ही ऐकतो. ही पथके तात्काळ माघारी बोलावून पोलिसांनी राजू परुळेकर यांना ताब्यात घ्यावे. ते कटाची इत्यंभूत माहिती देतील. पोलिसांचे कष्ट वाचतील आणि दाभोलकरांचे खूनीही अनायासे हाती लागतील.  आम के आम गुठलियों के दाम!

आम्ही मुख्यमंत्र्यांच्या जोडीने राजू परुळेकर यांचे संशयित म्हणून नाव घेत आहोत, त्याला मोठी पूर्वपीठिकाही आहे. आरएसएसने सर्व क्षेत्रात आपले एजंट घुसवून ठेवले आहेत. एकेका क्षेत्रात शेकडो एजंट काम करीत असतात. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक सुपर एजंट असतो. हा सुपर एजंट म्हणजे मुकादमच असतो. सर्व एजंटांच्या कामाचा लेखा जोखा त्याने ठेवायचा असतो. सुपर मुकादमाचे एकच कॉलिफिकेशन असते. तो जातीने ब्राह्मण असला पाहिजे. बास! (काही बिगर ब्राह्मण सुपर एजंटही आरएसएसकडे आहेत. पण त्यांना जात चोरून राहावे लागते.) राजू परुळेकर हे  पत्रकारितेतील आरएसएसचे सुपर एजंट आहेत. अनेक वर्षांपासून आरएसएसची मुकादमी ते पत्रकारितेत करीत आहेत. मागे आरएसएसने त्यांना अण्णा हजारे यांच्या मागे लावून दिले होते. अण्णांना राजू भायची ही मुकादमी माहित नव्हती. त्यामुळे अण्णांनी राजू भायला थेट आपल्या वतीने ब्लॉग लिहायचे काम दिले. तेथे अण्णांचे विचार लिहायचे सोडून राजू भाय संघ-दक्ष लिहायला लागले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर अण्णा दक्ष झाले. त्यांनी राजू भायला ‘फुल्या-फुल्या'वर लाथ हाणून हाकलून दिले. तेव्हापासून मग राजू भाय स्वत:च्या नावाने थेट आरएसएसची वकिली करू लागले आहेत. 

येथे काही वाचकांना प्रश्न पडू शकतो की, हे आरएसएस काय प्रकरण आहे? राजू परुळेकर आरएसएसचे सुपर एजंट असल्याने परुळेकर आणि मुख्यमंत्र्यांची हातमिळवणी कशी काय सिद्ध होऊ शकते? थोडे थांबा, राजू भाय यांनी मांडलेल्या सिद्धांताला पुरक असा आमचा सिद्धांत ऐका. ब्राह्मणांची, ब्राह्मणांसाठी, ब्राह्मणांकडून चालविली जाणारी संघटना म्हणजे आरएसएस होय! डॉ. दाभोलकरांनी तयार केलेल्या अंधश्रद्धा विरोधी कायद्यामुळे भोंदून खाणा-या ब्राह्मणांच्या पोटावरच पाय येणार होता. आरएसएसचे मुकादम या नात्याने ब्राह्मणांचे हीत जोपासणे हे राजू भायचे कामच होते. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांशी हात मिळवणी करून डॉ. दाभोलकरांच्या वधाचे पवित्र काम केले असावे, असे आम्हाला वाटते. 

शेवटी सुपर एजंट, मुकादम राजू भाय यांच्याच भाषेत आम्ही सांगू इच्छितो की, "… सत्य ह्याहून वेगळ असू शकत किंबहुना ते असायला हव अशी आपली आशा आहे. ते वेगळ असणार नाही अशी भीतीही आहे. दुर्दैवाने नाकर्तेपणाबद्दल सत्ताधा-यांचा राजीनामा घेणे तर सोडा मागणारेहि आज अंशमात्र अस्तित्वात राहिलेले नाहीत.…"

संबंधित लेख

अंधश्रद्धा निर्मुलन करणारा नव्हे, ब्राह्मणशाही माजविणारा कायदा!



5 comments:

  1. भौ, लई जोडे हाणले गड्या.

    राजू परुळेकर यांचे आडनाव खरे तर चोंबडे असे असायला हवे होते. मळमळे, कंठाळे वगैरे आडनावंही छान शोभली असती त्यांना.

    लेख एकदम फिल्मी झाला आहे. लेखाचे शीर्षक आवडले. मला पण एक शीर्षक सूचले आहे : राजू नाम रख लेने से कोई जंटलमन नही बन जाता!

    बघा आवडले तर लेखाला देऊन टाका. तुमच्या पितांबराला आमचे ठिगळ समजा हवे तर.

    ReplyDelete
  2. राजुभाय च्या लेखावर प्रतिक्रिया ....
    परुळेकर साहेब...इथे एका माणसाची हत्या झालेली आहे. व ती हत्या एका पुरोगामी चळवळी च्या सेनापती ची आहे. या प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेवून कृपया असले विनोदी लेख लिहू नका.
    दाभोलकरांची हत्या कॉंग्रेसने घडवून आणली हेतू असा कि एकी कडे आपल्या गळ्यात रुतलेला काटा काढायचा व बिल हिंदुत्ववादी संघटनांवर फाडून राजकीय फायदा उठवायचा असे मत तुम्ही या लेखात मांडले आहे.
    दाभोलकरांची हत्या हिंदुत्ववादी कट्टर लोकांपैकी कोणी तरी केली असा 'खोटा' प्रचार करून कॉंग्रेसचा नेमका कोणता राजकीय फायदा होणार हो ?
    दाभोलकरांचे विचार व कार्य यांना सहानभूती असणारे व त्यांच्या हत्येने संतापलेले असे कितीसे लोक महाराष्ट्रातील उजव्या विचारसरणी कडे झुकलेले भाजप - शिवसेने चे मतदार असतील? किंबहुना उद्या समजा असे पुराव्यानिशी सिद्ध झाले कि हा खून कोणा हिंदुत्ववादी संघटनेने घडवून आणला, तर त्यामुळे चवताळून असे कितीसे लोक उजव्या शक्तींच्या विरोधात एक गठ्ठा मतदान करून कॉंग्रेस ला निर्णायक विजय मिळवून देतील?
    उलट एका पुरोगामी कार्यकर्त्याचा असा दिवसाढवळ्या खून होणे हि सत्ताधाऱ्यांसाठी एक शरमेची बाब आहे. या खूनाचा तपास न लागणे हे तर अजूनच अडचणीचे आहे. कारण मग ह्या खुनाचा आरोप हिंदुत्ववादी संघटना वर लादता येणार नाही. निव्वळ हिंदुत्ववाद्यान भोवती संशयाचे जाळे विणून ते निवडणुकीच्या प्रचारात वापरण्यासाठी दाभोलकरांचा खून पाडणे हे कॉंग्रेस च्या राजकीय नफ्याच्या गणितात बिलकुल बसत नाही.
    दाभोलकाराना धमक्या येत होत्या त्या प्रतिगामी संघटनां कडून. ते रेटत असलेल्या कायद्याला हिंदुत्ववाद्यांचा उघड विरोध होता व आहे. अशा परिस्थितीत आपला हा लेख खालील पैकी एक किंवा अधिक कारणाने प्रेरित असू शकतो.
    १> काही तरी नवीनच conspiracy थियरी ( कट सिद्धांत )मांडून 'काय ओरिजिनल माणूस आहे' अशी दाद मिळवणे...तशी ती इथे बऱ्याच प्रतिक्रियांत उमटलेली आहे. एक कोणी सु. मा. कुलकर्णी म्हणतात "सत्याच्या कितीतरी बाजू असतात हे माझे गुरुजी नरहर कुरुंदकर नेहमी सांगायचे.हा लेख वाचताना मला त्यांची आठवण झाली". उद्या तुम्ही लिहाल कि प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी च्या गृह खात्याचे ढळढळीत अपयश सिद्ध करण्यासाठी कॉंग्रेस ने हि हत्या घडवून आणली. किंवा मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीस कलंकित होण्यासारखा प्रसंग घडवण्यासाठी राष्ट्रवादी ने हि हत्या घडवून आणली. आणि ते वाचून कट सिद्धांतास भुलणारे सु. मा. कुलकर्णी सारखे लोक म्हणतील " वा काय सुरेख लॆख आहे...वाचून कुरुंदकरांचे गुरु भालचंद्र महाराज कहालेकारांची आठवण झाली.
    २>आपण सर्वच मोठ्या व मह्त्वाच्या व्यक्तींच्या कसे अंतस्थ वर्तुळातले आहोत हे सिद्ध करण्याची उर्मी कायमच आपल्या लेखनातून उमटत असते. या लेखात देखील "डॉक्टरांच्या किंवा त्यांच्या उंचीच्या अनेकांच्या मतांशी कित्येकदा तुमचे पराकोटीचे मतभेद झालेले आहेत" हा लेखाचा मध्यवर्ती मुद्धा असावा. याचा अर्थ असा होतो कि डॉक्टर किंवा त्यांच्या उंचीची मंडळी राजू परुळेकरांना समउंची चा विचारवंत समजतात हे तुम्हाला जगाला आवर्जून सांगायचं आहे असा वाटत. या पुढे मग "डॉक्टरांची मुलगी मुक्ता आणि जावई अनिश आणि मुलगा हमीद ह्यांच्याशी स्नेहाचे सबंध" आणि "डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर, (डॉक्टर बंधू) ह्यांच्याशी असलेला स्नेहाचा धागा" ह्या गोष्टीही तुम्हाला वाचकांवर बिम्ब्वायच्या आहेत असे जाणवते. या मुख्य गोष्टी सांगून झाल्यावर मग लेख तर पूर्ण केला पाहिजे म्हणून व वाचकांना काही तरी 'वेगळे' द्यावे या जिद्दीनी तम्ही हा सिद्धांत मांडला असावा.
    ३> तिसरी व सर्वात भयानक शक्यता हि आहे कि जाणते अजाणते पणे तम्ही प्रतिगामी शक्तींचा बचाव करू पाहत आहात. तुम्ही ज्या 'जाणीवपूर्वक गोंधळात टाकू इच्छिणाऱ्या प्रचारतंत्राचा' उल्लेख मुख्यामंत्र्यांबद्दल केला आहे..तोच तुम्हाला व तुमच्या सहानुभूतीचे हक्कदार असणाऱ्या उजव्या विचारसरणीच्या लोकांना हि लागू होऊ शकतो..

    ReplyDelete
  3. राजुभाय च्या लेखावर प्रतिक्रिया
    परुळेकर साहेब…इथे एका माणसाची हत्या झालेली आहे. व ती हत्या एका पुरोगामी चळवळी च्या सेनापती ची आहे. या प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेवून कृपया असले विनोदी लेख लिहू नका.
    दाभोलकरांची हत्या कॉंग्रेसने घडवून आणली हेतू असा कि एकी कडे आपल्या गळ्यात रुतलेला काटा काढायचा व बिल हिंदुत्ववादी संघटनांवर फाडून राजकीय फायदा उठवायचा असे मत तुम्ही या लेखात मांडले आहे.
    दाभोलकरांची हत्या हिंदुत्ववादी कट्टर लोकांपैकी कोणी तरी केली असा ‘खोटा’ प्रचार करून कॉंग्रेसचा नेमका कोणता राजकीय फायदा होणार हो ?
    दाभोलकरांचे विचार व कार्य यांना सहानभूती असणारे व त्यांच्या हत्येने संतापलेले असे कितीसे लोक महाराष्ट्रातील उजव्या विचारसरणी कडे झुकलेले भाजप – शिवसेने चे मतदार असतील? किंबहुना उद्या समजा असे पुराव्यानिशी सिद्ध झाले कि हा खून कोणा हिंदुत्ववादी संघटनेने घडवून आणला, तर त्यामुळे चवताळून असे कितीसे लोक उजव्या शक्तींच्या विरोधात एक गठ्ठा मतदान करून कॉंग्रेस ला निर्णायक विजय मिळवून देतील?
    उलट एका पुरोगामी कार्यकर्त्याचा असा दिवसाढवळ्या खून होणे हि सत्ताधाऱ्यांसाठी एक शरमेची बाब आहे. या खूनाचा तपास न लागणे हे तर अजूनच अडचणीचे आहे. कारण मग ह्या खुनाचा आरोप हिंदुत्ववादी संघटना वर लादता येणार नाही. निव्वळ हिंदुत्ववाद्यान भोवती संशयाचे जाळे विणून ते निवडणुकीच्या प्रचारात वापरण्यासाठी दाभोलकरांचा खून पाडणे हे कॉंग्रेस च्या राजकीय नफ्याच्या गणितात बिलकुल बसत नाही.
    दाभोलकाराना धमक्या येत होत्या त्या प्रतिगामी संघटनां कडून. ते रेटत असलेल्या कायद्याला हिंदुत्ववाद्यांचा उघड विरोध होता व आहे. अशा परिस्थितीत आपला हा लेख खालील पैकी एक किंवा अधिक कारणाने प्रेरित असू शकतो.
    १> काही तरी नवीनच conspiracy थियरी ( कट सिद्धांत )मांडून ‘काय ओरिजिनल माणूस आहे’ अशी दाद मिळवणे…तशी ती इथे बऱ्याच प्रतिक्रियांत उमटलेली आहे. एक कोणी सु. मा. कुलकर्णी म्हणतात “सत्याच्या कितीतरी बाजू असतात हे माझे गुरुजी नरहर कुरुंदकर नेहमी सांगायचे.हा लेख वाचताना मला त्यांची आठवण झाली”. उद्या तुम्ही लिहाल कि प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी च्या गृह खात्याचे ढळढळीत अपयश सिद्ध करण्यासाठी कॉंग्रेस ने हि हत्या घडवून आणली. किंवा मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीस कलंकित होण्यासारखा प्रसंग घडवण्यासाठी राष्ट्रवादी ने हि हत्या घडवून आणली. आणि ते वाचून कट सिद्धांतास भुलणारे सु. मा. कुलकर्णी सारखे लोक म्हणतील ” वा काय सुरेख लॆख आहे…वाचून कुरुंदकरांचे गुरु भालचंद्र महाराज कहालेकारांची आठवण झाली.
    २>आपण सर्वच मोठ्या व मह्त्वाच्या व्यक्तींच्या कसे अंतस्थ वर्तुळातले आहोत हे सिद्ध करण्याची उर्मी कायमच आपल्या लेखनातून उमटत असते. या लेखात देखील “डॉक्टरांच्या किंवा त्यांच्या उंचीच्या अनेकांच्या मतांशी कित्येकदा तुमचे पराकोटीचे मतभेद झालेले आहेत” हा लेखाचा मध्यवर्ती मुद्धा असावा. याचा अर्थ असा होतो कि डॉक्टर किंवा त्यांच्या उंचीची मंडळी राजू परुळेकरांना समउंची चा विचारवंत समजतात हे तुम्हाला जगाला आवर्जून सांगायचं आहे असा वाटत. या पुढे मग “डॉक्टरांची मुलगी मुक्ता आणि जावई अनिश आणि मुलगा हमीद ह्यांच्याशी स्नेहाचे सबंध” आणि “डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर, (डॉक्टर बंधू) ह्यांच्याशी असलेला स्नेहाचा धागा” ह्या गोष्टीही तुम्हाला वाचकांवर बिम्ब्वायच्या आहेत असे जाणवते. या मुख्य गोष्टी सांगून झाल्यावर मग लेख तर पूर्ण केला पाहिजे म्हणून व वाचकांना काही तरी ‘वेगळे’ द्यावे या जिद्दीनी तम्ही हा सिद्धांत मांडला असावा.
    ३> तिसरी व सर्वात भयानक शक्यता हि आहे कि जाणते अजाणते पणे तम्ही प्रतिगामी शक्तींचा बचाव करू पाहत आहात. तुम्ही ज्या ‘जाणीवपूर्वक गोंधळात टाकू इच्छिणाऱ्या प्रचारतंत्राचा’ उल्लेख मुख्यामंत्र्यांबद्दल केला आहे..तोच तुम्हाला व तुमच्या सहानुभूतीचे हक्कदार असणाऱ्या उजव्या विचारसरणीच्या लोकांना हि लागू होऊ शकतो..

    ReplyDelete
  4. mala vatate sampadakaanaa confusion zale ahe........nanasaheb parulekar ani dabholkar doghehi jatine brahman hote he tumhala mahit nahi ka?...ki tyanchyaa vishayee garal okayala bhitee vaatate?...

    ReplyDelete
  5. bahutek sampadakanna confusion zale ahe...nanasaheb parulekar ani dabholkar doghehi jatine brahaman hote....tyanchyaa vishayee garal oknyaachi bhitee vatate ka ?....

    ReplyDelete