Tuesday 8 November 2011

अनुस्तरणीकर्म : गाय कापून अंत्यसंस्कार !


प्रकरण -४   


वैदिकांच्या ब्राह्मणी ग्रंथांत जन्मापासून मृत्यूपर्यंत सोळा संस्कार लिहिले आहेत. यांतील बहुतेक संस्कारांचे वेळी गाय किंवा  बैल मारण्याची प्रथा वैदिक धर्मात होती. आर्यलोकांना शेतीचे विशेष ज्ञान नव्हते. ते पशुपालक होते. त्यामुळे मांस हेच त्यांचे मुख्य अन्न होते. जे माणसाचे मुख्य अन्न असते, तेच त्याच्या धार्मिक विधित महत्त्वाचा भाग ठरते. हे नैसर्गिक न्यायाला धरूनच आहे. त्यामुळेच वैदिक धर्मात अंत्यसंस्काराचे वेळी गाय मारण्याची प्रथा दिसून येते. सोळावा म्हणजेच शेवटचा संस्कार म्हणजेच अंत्यसंस्कार होय. यात गाय मारून ती प्रेतासोबत जाळली जात असे. प्रेतासोबत जाळल्या जाणारया गायीला वेदसाहित्यात अनुस्तरणी असे म्हणतात. व गाय मारून जाळण्याच्या विधिस अनुस्तरणीकर्म म्हणतात.  प्रेतासोबत गाय कापण्यामागे मोठी अंधश्रद्धा दिसून येते. अग्निमध्ये जे हवन केले जाते, ते आपल्या पितरांना मिळते, अशी वैदिकांची मान्यता होती. मृत्यू पावलेल्या माणसाला स्वर्गाच्या प्रवासात खायला मिळावे म्हणून गाय मारून आणि जाळून त्याच्यासोबत दिली जात असे. 
अनुस्तरणीकर्माचा विधि ऋग्वेदात, शुक्लयजुर्वेदाच्या ३५ व्या अध्यायात, तैत्तिरीय आरण्यकात असेच इतर अनेक सूत्र ग्रंथांत आहे१. गाय मारून तिच्या मांसाचा पिंड देण्यात यावा. मारलेल्या गायीची वपा म्हणजेच चरबी काढून तिने प्रेताच्या मुखास तसेच सर्व शरीरास आच्छादून टाकावे नंतर प्रेतास अग्नि द्यावा, असे या ग्रंथांतील उल्लेख सांगतात. गाय उपलब्ध होणे शक्य नसेल तर बकरीचा कल्प खुद्द ऋगवेवादातच सांगितला आहे२. कल्प म्हणजे पर्याय. ऋगवेदातील या ऋचेचा आद्य (आद्य म्हणजे सुरुवात.) असा  : 
अग्नेर्वर्भ परि गोभिव्र्ययस्व० - ऋगवेद. ७.६.२१.
ऋगवेदातील हाच मंत्र तैत्तिरीयारण्यकात (६ प्रपाठक, १ ला अनुवाक) प्रतिपादिला आहे. याशिवाय कलिवर्जप्रकरणसंबंधात +अग्निहोत्रं गवालंभम्+ असे एक वाक्य प्रसिद्ध आहे. +गवालंभम+ या शब्दाची फोड गव म्हणजेच गाय आणि आलंभम् म्हणजेच आलंभन अर्थात गाय मारून उपयोगात आणणे अशी आहे. याचाच अर्थ वैदिक धर्माच्या अगदी प्रारंभकाळापासून अनुस्तरणीकर्म प्रचलित होते. 
गाय स्मशानात नेण्याची पद्धती 
प्रेत स्मशानात नेतानाच अनुस्तरणी गाय नेली जावी. अनुस्तरणी गायीच्या गळ्यात किंवा पायात एक दोरी अडकवून ती प्रेताच्या दंडास बांधावी व ती अशा प्रकारे प्रेतासोबत न्यावी. स्मशानात ती कापावी. तिची चरबी काढून प्रेताच्या चेहèयासह सर्वांगावर पोतारावी. गायीचे अवयव मृतदेहाच्या अवयांवर जसे० पायावर पाय हृदयावर हृदय इ. ठेवावे. नंतर प्रेतास अग्नी द्यावा, असा सर्व प्रमुख ब्राह्मणी ग्रंथांचा आदेश आहे.  
मी येथे ऋग्वेद,  तैत्तिरीयारण्यक किंवा  इतर ब्राह्मणी ग्रंथांतील तरतुदींपेक्षा आश्वलायनाचार्यांनी लिहिलेल्या गृह्यसूत्रातील तरतुदींचेच विवेचन करणार आहे. ऋगवेदातील तरतुदी या तत्कालीन सर्व वर्णांसाठी होत्या. किमान त्रैवर्णिकांसाठी तर होत्याच होत्या. परंतु आश्वलायनाचार्याच्या गृह्यसूत्रातील तरतुदी या केवळ आणि केवळ ऋगवेदी ब्राह्मणांसाठीच आहेत. स्वातंत्र्यानंतर ब्राह्मणवाद्यांनी हिंदुत्ववादाचा बुरखा पांघरून गोहत्याबंदीसाठी थयथयाट चालविला आहे. मुस्लिम, ख्रिश्चन हे धर्म तसेच आदिवासी जमाती यांना टार्गेट करण्यासाठी ब्राह्मणवाद्यांचा हा खटाटोप चालू आहे. हे उपदव्याप कसे निरर्थक आहेत, हे सिद्ध करण्यासाठी ब्राह्मणांचे पूर्वजच गायी कापून खात होते, इतकेच नव्हे तर त्यांचे अंत्यसंस्कारांसारखे विधिही गायीच्या मांसाशिवाय पूर्ण होऊ शकत नव्हते, हे दाखवून देणे आवश्यक आहे. त्यासाठीच आश्वलायन गृह्यसूत्राचा आधार पुढील विवेचनासाठी मी घेतला आहे.
या पहा ग्रंथांतील अघोरी  तरतुदी 
आश्वलायनाचार्याने आपल्या गृह्यसूत्रात गाय मारण्याचा आणि जाळण्याचा विधि फार विस्ताराने लिहिला आहे. चौथ्या अध्यायात खंड १, २ आणि ३ मध्ये अनुस्तरणीकर्मविधि आला आहे.  आश्वलायनाने म्हटले आहे. यासंबंधीची सूत्रे आणि त्यांचा अर्थ पुढे देत आहे.
खंड २
सूत्र : अनुस्तरणीम् ।।४।।
अर्थ : ज्या मादी पशूने प्रेताचे आच्छादन करितात ती अनुस्तरणी करावी. (अनुस्तरणी करावी म्हणजे प्रेताबरोबर मारून जाळावी)
सूत्र : गाम् ।।५।। अजां वैकवर्णार्मं ।।६।।
अर्थ : गाय किंवा एक रंगी शेळी अनुस्तरणी करावी.
सूत्र : कृष्णामेके ।।७।।
अर्थ : काळी शेळीही अनुस्तरणी करता येऊ शकेल, असे काही ऋषींचे म्हणणे आहे.
सूत्र : सव्ये बाहौ बद्ध्वाऽनुसंकालयन्ति ।।८।।
अर्थ : पशुचा पुढला डावा पाय बांधून त्यास प्रेताचे मागे न्यावे.
सूत्र : अन्वंचोऽमात्या अघोनिवीता: प्रवृत्तशिखा ज्येष्ठप्रथमा: कनिष्ठजघन्या: ।।९।।
अर्थ : आणि त्या पशूचे मागून प्रेताच्या बांधवादिकांनी माळेसारखे जानवे करून व शेंड्या मोकळ्या सोडून ज्येष्ठ पुढे व धाकटे मागे या क्रमाने चालावे.
खंड ३
गाय मारल्यानंतर चे विधि पुढील प्रमाणे : 
सूत्र : अनुस्तरण्या वपामुत्खिद्य शिरो मुखं प्रच्छादयेदग्नेर्वर्म परि गोभिव्र्ययस्वेति ।।१९।।
अर्थ : अनुस्तरणीची म्हणजेच मारलेल्या गायीची वपा म्हणजे चरबी काढून त्या चरबीने प्रेताचे शिर मुखसुद्धा झाकावे. हे कर्म करताना +अग्ने०+ (ऋ. ७।६।२१) हा मंत्र म्हणावा (पुर्ण मंत्रासाठी पाहा संदर्भ).
सूत्र : वृक्का ऊद्धृत्य पाण्योरादध्यादति द्रव सारमेयौ श्वानाविती दक्षिणे दक्षिणं सव्ये सव्यम् ।।२०।।
अर्थ : वृक्क म्हणजे गायीच्या कुशीतील मांसाचे गोळे काढावे. प्रेताच्या उजव्या हातावर उजवा वृक्क व डाव्या हातावर डावा वृक्क ठेवावा. हा विधि करीत असताना +अति द्रव०+ (ऋ. ७।६।१५) ही ऋचा म्हणावी. (पुर्ण मंत्रासाठी पाहा संदर्भ)
सूत्र : हृदये हृदयम ।।२१।।
अर्थ : प्रेताच्या हृदयावर कापलेल्या गायीचे हृदय ठेवावे.
सूत्र : सर्वां यथांग विनिक्षिप्य चर्मणा प्रच्छाद्येममग्ने चमसं मा वि जिव्हर इति प्रणीताप्रणयनमनुमंत्रयते ।।२४।।
अर्थ : अनुस्तरणीचा म्हणजेच कापलेल्या गायीचा जो जो अवयव असेल तो तो प्रेताच्या त्या त्या अवयवावर ठेवावा. गायीचे कातडे प्रेतावर पांघरून प्रेत पूर्ण झाकून टाकावे. हा विधि करीत असताना +इममग्ने०+ (ऋ. ७।६।२१) हा मंत्र म्हणावा. (पुर्ण मंत्रासाठी पाहा संदर्भ)
या पूढील खंडांत प्रेतास अग्नी देण्याचे विधि, अस्थिंची विल्हेवाट व सुतकादि प्रथांचे पालन या विषयी लिहिण्यात आलेले आहेत. 
दयानंद सरस्वती यांच्या +वेदांकडे चला+ या हाकेचे पालन करावयाचे झाल्यास आपल्याला अंत्यसंस्कारांसाठी गायी कापाव्या लागतील. हे आजच्या ब्राह्मणवाद्यांना चालणार आहे का? दयानंद सरस्वती प्रणित आर्यसमाज वेदांतील अनुस्तरणीविधीचे पालन करून अंत्य संस्कारांत गाय कापतो का? या प्रश्नांची उत्तरे हिंदूत्चाचा बुरखा पांघरलेल्या ब्राह्मणवाद्यांनी द्यायला हवीत.

या  लेखमालेतील  इतर  लेख पुढील लिंकवर वाचा  


अनिता पाटील, औरंगाबाद. 

................................................................

संदर्भ :
 


१. लोकहितवादी : समग्र वाङ्मय. खंड दुसरा. संपादक : गोवर्धन पारीख, इंदुमती पारीख. प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ. आवृत्ती : पहिली १९९०. पान क्र. ४७. 
२. लोकहितवादी : समग्र वाङ्मय. खंड दुसरा. संपादक : गोवर्धन पारीख, इंदुमती पारीख. प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ. आवृत्ती : पहिली १९९०. पान क्र. ४७. 

या लेखात आलेले ऋगवेदातील मंत्र पुढील प्रमाणे आहेत :

१. अग्नेर्वर्म परि गोभिव्र्यस्व सं प्रोर्णुध्व पीवसा मेदसा च ।।
नेत्त्वा धृष्णुर्हरसा जर्हृषाणो दधृग्विधक्ष्यन्पर्यंखयाते ।। ७।६।२१

२. अति द्रव सारमेयौ श्वानौ चतुरक्षौ शबलौ साधुना पथा ।।
अथा पितृन्त्सुविदत्राँ उपेहि यमेन ये सधमादं मदंति ।। ७।६।१५

३. इमामग्ने चमसं मा वि जिङ्घर: प्रियो देवानामुत सोम्यानाम् ।।
एष यश्चमसो देवपानस्तस्मिन्देवा अमृता मादयंते ।। ७।६।२१  
...............................................................

1 comment:

  1. मॅडम अापणच म्हणता की " वैदिक आर्य प्रगत नव्हे, तर मानवी प्रगतीच्या दुसरया टप्प्यावर जगत होते."
    अाणी त्यानंतर
    . "स्वातंत्र्यानंतर ब्राह्मणवाद्यांनी हिंदुत्ववादाचा बुरखा पांघरून गोहत्याबंदीसाठी थयथयाट चालविला आहे. मुस्लिम, ख्रिश्चन हे धर्म तसेच आदिवासी जमाती यांना टार्गेट करण्यासाठी ब्राह्मणवाद्यांचा हा खटाटोप चालू आहे. हे उपदव्याप कसे निरर्थक आहेत, हे सिद्ध करण्यासाठी ब्राह्मणांचे पूर्वजच गायी कापून खात होते, इतकेच नव्हे तर त्यांचे अंत्यसंस्कारांसारखे विधिही गायीच्या मांसाशिवाय पूर्ण होऊ शकत नव्हते, हे दाखवून देणे आवश्यक आहे."
    म्हणजे मूसलमान व ख्रिछ्चन हे अजूनही मानवी प्रगतीच्या दुसर्या टप्प्यावर अाहेत का ?

    ReplyDelete