Sunday 15 December 2013

शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे

 -श्रीमंत कोकाटे (शिवचरित्र अभ्यासक, संशोधक)


लाला लजपतरायांनी "सिवोजी" नावाचे उर्दूमधून शिवचरित्र लिहिले. त्यामुळे शिवचरित्र राजे पंजाब-सिंध 
(आताचे पाकिस्तान) पर्यंत गेले. . रवींद्रनाथ टागोर, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे शिवाजीराजे हे
आराध्य दैवत होते. कर्मवीर भाऊराव पाटील म्हणाले होते कि,  प्रसंगी जन्मदात्या बापाचे नाव बदलेन पण
कॉलेजला दिलेले शिवाजीराजांचचे नाव मी कधीच बदलणार नाही. ते भाऊराव पाटील जैन होते.
त्यांच्यामुळे शिवाजीराजांच्या रयतेला शिक्षण मिळाले. कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे, डॉ.पंजाबराव
देशमुख, राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसिंह नाना पाटील, संत गाडगेबाबा, प्रबोधनकार केशव सी. ठाकरे इ.
समाजसुधारकाची शिवरायांवर अनन्यनिष्ठा होती. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण भारतरत्न
डॉ.बाबासाहेब यांचा शिवचरित्राचा सखोल अभ्यास होता. त्यांनी "शुद्र कोण होते?" या ग्रंथात
शिवाजीराजांबाबत खूप सखोल माहिली लिहिलेली आहे. शिवाजीराजांच्या त्रिशताब्दी उत्सवाच्या
निमित्ताने बदलापुर येथे आयोजित केलेल्या समारंभाच्या अध्यक्षस्थानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर होते.
या प्रसंगी राजांच्या जीवनावर अभ्यासपुर्ण आणि प्रभावी भाषण केले. त्यामुळे राजांचे अपरिचित रुप
जनतेला समजले. शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाला ब्राह्मणांनी केलेल्या विरोधाचा बदला
डॉ.आंबेडकरांनी घेतला. डॉ.आंबेडकरांनी बहुजन समाजाला राजा होण्याचे स्वतंत्र दिले, तुम्ही शूद्र
आहात त्यामुळे मुख्यमंत्री होता येणार नाही. असे आज कोणीही ब्राह्मण म्हणणार नाही. हा अधिकार
सर्व बहुजन समाजाला डॉ.आंबेडकरांनी दिला. राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी शिवजयंती सुरु केली.
म्हणजे फुले, आंबेडकर या गुरु शिष्यांना शिवाजीराजांचा सार्थ अभिमान होता. त्यांचे राजांवर डोळस
प्रेम होते. आंधळे प्रेम नव्हते.

शिवाजीराजांचे भांडवल करुन फुले-आंबेडकरांनी समाजामध्ये धार्मिक व जातीय दंगे निर्माण
केले नाहीत.  किंवा शिवाजीराजांच्याव्दारे त्यांनी बहुजन समाजाचे वैदिकीकरण केले नाही. फुले-
आंबेडकरांनी शिवाजीराजांचा खरा इतिहास देशाला सांगितला. डॉ.आंबेडकर लेटरहेडवर जय शिवराजय लिहायचे. साहित्यरत्न थोर देशभक्त आणि समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांनी गणपतीला वंदन
असणारा पारंपारिक गण बदलला. गणाचा आरंभ शिवछत्रपतींना वंदन करुनच सुरु केला. अण्णाभाऊंनी
शिवरायांवर "महाराष्ट्राची परंपरा" हा पोवाडा लिहिला आण्णाभाऊ रशियात गेल्यानंतर त्याठिकाणी
शिवचरित्रावर अभ्यास करणारे रशियन संशोधक  प्रा.चेलिशिव आण्णाभाऊ यांना भेटले. आण्णाभाऊ यांनी  त्यांना शिवरायांच्याबाबत खूप दुर्मिळ माहिती सांगितली. म्हणजेच आण्णाभाऊंमुळुळेचेच रशियन जनतेलेला शिवरायांचचे कार्य माहित झाले. शिवरायांचे कार्य राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय  स्तरावर पोहचविण्यासाठी बहुजन समाजातील विचारवंतांनी मोलाचे कार्य केले आहे. 

शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे 
याउलट ब्राह्मण लेखकांनी शिवरायांना बदनाम करण्याचे पाप केले. 
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर शिवाजीराजांचे जीवन व कार्य राज्यस्तरावर व जातीस्तरावर ठेवण्यासाठी ब्राह्मण
नेत्यांनी जाणीवपुर्वक प्रयत्न केले. संयुक्त महाराष्टड्ढाच्या आंदोलनप्रसंगी प्र.के. अत्रे यांनी इतर राज्यावर
टिका करताना शिवाजीराजांचा वापर केला. "इतर राज्यांना फक्त भूगोल आहे. पण महाराष्ट्राला 
 इतिहास आहे", असे टोमणे मारत अत्र्यांनी राजांचे नाव घेतले. त्यामुळे शिवरायांच्या प्रतिमेला
मर्यादा पडल्या जातीय राजकारणात शिवरायांचा वापर सुरु झाला. राजकीय पक्षांची बांधणी शिवरायांच्या
नावाने झाली. परंतु प्रबोधनकारांचा शिवाजी जनतेला सांगितलाच नाही. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हे
थोर इतिहास संशोधक व समाजसुधारक होते. त्यांनी शिवरायांचा खरा इतिहास जनतेला सांगितला.
प्रबोधेधनकार ठाकरे म्हणत की, शिवाजीराजे ३३ कोटेटी देवेवांपपेक्षा महान आहेतेत. डोक्यातून दैवैववाद काढूनच शिवरायांचा अभ्यास करावा.

(शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? या पुस्तकातून)


प्रख्यात इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेले ‘शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?' हा ग्रंथ "अनिता पाटील विचार मंच"च्या वाचकांसाठी येथे उपलब्ध करून देत आहोत. जिज्ञासूंनी त्यावर प्रतिक्रिया जरूर द्याव्यात.

ग्रंथ प्रवेश 
भाग-१
भाग-४
  1. नेताजी पालकरांच्या धर्मांतराला विरोध, गंगाधर कुलकर्णीच्या धर्मांतराला मात्र समर्थन
  2. संभाजीराजांना मोगलांच्या ताब्यात देणारा विश्वासघातकी कवि कुलेश
  3. औरगजेबाने संभाजी राजांना मनुस्मृती संहितेप्रमाणे ठार मारले
  4. शिवशक बंद करुन मोगलांचा फसलीशक सुरु करणारे पेशवे
  5. शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला
  6. शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे

1 comment: