Saturday 3 September 2011

आरएसएसचे पुनर्वसन करण्याची सुपारी काँग्रेस नेत्यांनी घेतलीय का?



चंपारनमधील कारवाईबाबत महात्मा गांधी यांनी ‘माय एक्सपिरिमेंट्स विथ ट्रूथ' या आपल्या आत्मचरित्रात लिहिले - ‘माझ्याविरुद्ध कारवाईचा फास कमिनशनरने टाकला खरा, पण असे करून कमिशनर सरकारसाठी सापळा रचित होते.'... हा उतारा असलेले पुस्तकातील पान.


या देशाच्या डोक्यावर महात्मा गांधी यांच्या पाढèया स्वच्छ गांधी टोपी ऐवजी आरएसएसची काळी टोपी घालायची, अशी सुपारी काँग्रेसच्या काही नेत्यांनी घेतली आहे का? ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे आंदोलन ज्या पद्धतीने हाताळाले जात आहे, त्यावरून देशाची काळजी असलेल्या लोकांच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला आहे.
अण्णांकडे स्वच्छ चारित्र्याचे ब्रह्मास्त्र
कपिल सिबल, पी. चिदंबरम, अंबिका सोनी, जगदंबिका पाल, मनीष तिवारी, अभिषेक मनु सींघवी आणि काही प्रमाणात दिग्विजयqसग यांसारख्या अपरिपक्व आणि तोंडाळ नेत्यांमुळे अण्णांच्या आंदोलनाचा भडका उडाला आहे. चारित्र्याची ताकद फार मोठी असते. अण्णांचे चारित्र्य ब्रह्मास्त्रापेक्षाही मोठे आहे. याचा अंदाज काँग्रेस नेत्यांना आला नाही. तो येईल, असेही वाटत नाही. या काँग्रेस नेत्यांनी अण्णांना दुषणे दिली. आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. कपिल सिबल हे तर सतत कुत्सितपणे हसत असल्याचे टिव्हीवर दिसत होते. भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारी यांना पाठिशी घालण्यासाठी सरकारचा आटापिटा चालला आहे, असा घातक संदेश त्यातून लोकांत गेला. भ्रष्ट्राचाराने आधीच हैराण असलेल्या लोकांचा संताप त्यामुळे अनावर झाला आणि आांदोलनाचा भडका उडाला. अण्णांशी समोपचाराची भूमिका घेण्यात आली असती, सरकार भ्रष्टाचार निपटून काढण्याच्या बाबतीत गंभीर आहे, असा संदेश जाईल याची काळजी घेतली असती, तर आंदोलन एवढे भडकलेच नसते.
सोनिया गांधी असत्या तर...
नेते म्हणविणारी काँग्रेसची बडी मंडळी पक्ष चालविण्यात असमर्थ आहेत. त्यांना समर्थ हायकमांडची गरज असतेच. हे या आंदोलनाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. सोनिया गांधी आजारी आहेत. अमेरिकेत उपचार घेत आहेत. त्या जर भारतात असत्या तर हे आंदोलन चिघळले तर नसते, असे ठामपणे म्हणता येते. कदाचित अण्णांचे उपोषण सुरू होण्यापूर्वीच काही सन्माननीय तोडगाही निघाला असता.
चंपारनच्या इतिहासाची पुनरावृत्ती... पण
या आंदोलनाने मला इंग्रजी राजवटीत महात्मा गांधी यांनी चंपारनमध्ये केलेल्या आंदोलनाची आठवण झाली. चंपारनमध्ये तेव्हा निळेची शेती व्हायची. यात शेतकèयांची प्रचंड पिळवणूक सुरू होती. महात्मा गांधी अफ्रिकेतून नुकतेच भारतात आले होते. त्यांच्या कानावर ही बाब गेली, तेव्हा ते तडक चंपारनमध्ये दाखल झाले. त्यांना तेथे मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व होता. त्यामुळे इंग्रज सरकार हादरले. सरकारने सीआरपीसीचे १४४ वे कलम लावून प्रतिबंधात्मक आदेश जारी केले. गांधीजींना चंपारन सोडण्याचा आदेश देण्यात आला. गांधीजींनी हा आदेश धुडकावला. त्यावरून त्यांच्यावर सरकारने खटला भरण्यात आला. कोर्टात मात्र काही मिनिटांतच या खटल्याचे कामकाज संपले कारण गांधीजींनी सरकारने सर्व आरोप स्वीकारले. कायद्यानुसार देय असेलेली शिक्षा भोगण्यास मी तयार आहे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. दरम्यान, दुपारची सुटी झाली. दुपारी ३ वा. कोर्ट पुन्हा भरले. परंतु तोपर्यंत व्हॉईसरॉयच्या आदेशाने पाटणा येथून डेप्युटी गव्हर्नरांनी विशेष आदेश जारी करून गांधीजींवरील सर्व आरोप मागे घेतले होते. तसा आदेश मोतीहारी येथील कोर्टात येऊन धडकलाही होता. इतकेच नव्हे, तर निळ पिकविणाèया शेतकèयांवरील अन्यायाचीही इंग्रज सरकारने दखल घेतली. गांधीजींना ज्या १४४ कलमान्वये अटक झाली होती, त्याच कलमाखाली अण्णांनाही अटक करण्यात आली. मात्र त्यानंतर जो जनउद्रेक झाला, त्याला घाबरून सरकारने अण्णांवरील आरोप मागे घेतले, हा योगायोग किती भीषण आहे याची कल्पनाच न केलेली बरी. इंग्रज सरकारची संवेदनशीलता आपल्या सरकारकडे का नाही?
चंपारनमधील पोलिसी कारवाईबाबत महात्मा गांधींनी आपल्या आत्मचरित्रात असे लिहिले आहे की, माझ्याविरुद्ध कारवाईचा फास कमिनशनरने टाकला खरा, पण असे करून कमिशनर स्वत:साठीच सापळा रचित होते. (गांधीजींच्या या पुस्तकातील हा उतारा असलेल्या पानाचा फोटो मी या लेखासोबत टाकला आहे.) अण्णांवर झालेल्या कारवाईबाबतही हेच घडले. सरकारने स्वत:लाच सापळ्यात अडकवून घेतले आहे. फरक एवढाच की, चंपारन प्रकरणात इंग्रज सरकारने संवेदनशीलता दाखविली. तशी संवेदनशीलता आजचे संपुआ सरकार दाखवू शकलेले नाही. उलट आंदोलनाची खिल्ली उडविण्याचा प्रयत्न सरकारने चालविला आहे. अरुणा रॉय सारख्या उठवळ स्वयंसेवी संस्थाचालकांना सरकारने शनिवारी अण्णांच्या विरोधात रिंगणात उतरविले. हा असाच खिल्लीचा प्रकार आहे. इंग्रज सरकारने जनमताचा जो आदर चंपारन आंदोलनाच्या बाबतीत केला, तसे संपुआ सरकारने अण्णांच्या आंदोलनाच्या बाबतीत का केले नाही?
संघावाल्यांचे पुनर्वसन करू नका
अण्णा आणि त्यांच्या टीमने या आंदोलनाला राजकीय पक्षांपासून दूर ठेवले आहे. तसेच गेल्या आठवडाभरापासून संपूर्ण देशात आंदोलन सुरू असतानाही कोणत्याही प्रकारचा हींसाचार घडलेला नाही. साधा एक दगडही कोणी भिरकावलेला नाही. असे शांततापूर्ण आंदोलन गेल्या पाऊण शतकात भारतात झालेले नाही. हे अण्णा आणि त्यांच्या टीमचे यश आहे. पण लोकांच्या सहनशक्तीला शेवटी अंत असतोच. सहनशक्तीचा कडेलोट होऊन आंदोलन हींसक झालेच तर त्याची जबाबदारी कोण घेणार? अण्णांची प्रकृती बिघडल्यास आंदोलन चिघळू शकते. असे झाले तर या आंदोलनाच्या आगीत संपुआ सरकार भस्म हाईल. अण्णांच्या आंदोलनाआड लपून आरएसएसवाले टपूनच बसले आहेत. आरएसएसचा इतिहास पाहता हिंसाचाराची ठिणगी पाडायचे पाप करायलाही हे लोक कमी करणार नाहीत. आरएसएसवाल्यांचे पुनर्वसन होणार नाही, याची काळजी संपुआ सरकारमधील धुरिणांनी वेळीच घ्यावी, असा इशारा त्यांना जाता जाता द्यावासा वाटतो.

अनिता पाटील, औरंगाबाद. 
by Anita Patil on Saturday, August 20, 2011 at 7:43pm

...................................................................................................................
....................................................................................................................
 ·  · Share · Delete
    • Disha Patil खुपच अभ्यासपुर्ण लेख,
      August 20 at 7:51pm ·  ·  1 person
    • Anita Patil thanx Disha.
      August 20 at 8:05pm · 
    • Rahul Kapse R.s.s yanni mahatma gandhinchi hatya keli,tyamule aannanni ya lokanpasun savadh rahave.
      August 20 at 8:05pm · 
    • Anita Patil ‎...अण्णा आणि त्यांची टीम आरएसएसपासून सावधच आहे. एप्रिलमधील उपोषणाच्या वेळी उमा भारती यांना अण्णांच्या समर्थकांनी उपोषणस्थळावरून पिटाळून लावले होते. .
      August 20 at 8:08pm ·  ·  1 person
    • Rahul Kapse Congres aani bjp ya pakshanmadhe r.s.s chich pillaval disate.
      August 20 at 8:13pm · 
    • नियंत अग्रवाल Rahul kapse -: CPM n NCP madhye nahi ka pillaval ?
      August 20 at 8:14pm · 
    • Rahul Kapse Ha ha ha bapa baddal bolalyavar porala rag yenarach.
      August 20 at 8:17pm · 
    • Suryakant Palaskar farach chan vishleshan.
      August 20 at 8:24pm · 
    • Disha Patil आजपर्यँतचा अनुभवः आण्णांचे तत्व आहे ऐकावे जनाचे करावे मनाचे .आण्णा सर्वाँचे ऐकून स्वतः अंतिम निर्णय घेतात म्हणूनच त्यांच्या लढ्याला यश मिळतेय.आण्णा कधीच राजकीय पक्षांची साथ घेणार नाहीत
      August 20 at 8:24pm · 
    • Suryakant Palaskar Right Disha. Anita yanche vishleshan sudha asech ahe.
      August 20 at 8:28pm · 
    • Shivnath Motkar Patil Ithech bahujan chukalay aaplelaya atapariyant ya bhatji ne fasawalay pratek kshani yani aapla vishwasasghat kelay .....aani aaj he he aapla ghatch karu pahat aahe
      August 20 at 8:42pm · 
    • Shivnath Motkar Patil Anita tu mhantes yani fakt ghandiji na marle tase nahi yani chatarapati cha sudha ghat kela
      August 20 at 8:44pm ·  ·  1 person
    • Disha Patil आर.एस.एस: राष्ट्राला संपुर्ण संपवणार(R.S.S.)
      August 20 at 8:48pm · 
    • Ramdas Mali RSS SAMJUN GHA MAGH PHUDHIL VAKTAVA KARA RSSCHI AIM VEGLE AHET
      August 21 at 12:13pm · 
    • नियंत अग्रवाल kapse -: Pora aahech aamhi RSS chi pan tumchyasarakhi Paay chatanari nai
      August 21 at 1:45pm · 
    • Anita Patil jaytu, muddyache bola.
      August 21 at 5:31pm · 
    • Shivnath Motkar Patil Mundke kapnari jat aahe amchi
      August 21 at 5:36pm · 
    • Kailas Ratnaparkhi KALI ASO KI PANDHARI TOPI TOPICH ASTE.BINDOK DOKECH TYAT GHUSTET.
      August 21 at 10:24pm · 
    • Shivnath Motkar Patil Khare many karnarch nahi ...
      August 21 at 10:53pm · 
    • Amol Rahinj my dear frieds personaly i want to say RSS is the BEST and done well forever for our nation, jay hind
      August 21 at 11:18pm · 
    • Shivnath Motkar Patil Jay hind tak theek hai
      August 21 at 11:20pm · 
    • Amol Rahinj patil sir i have experienced , RSS stands for each and everyone there is no cast
      August 21 at 11:34pm · 
    • Milind Mirkar super like...!!!best...better...perfect..!!!
      August 22 at 9:06am · 
    • Anita Patil thamx milind.
      August 22 at 1:09pm · 
    • Anita Patil 
      ‎@आरएएसएसची तरफदारी करणाèयांसाठी खास संदेश :

      १.आरएसएस बेस्ट आहे. असा दावा येथे करण्यात आला. त्यांचे म्हणणे अगदी खरे आहे. आरएसएस बेस्टच आहे.
      २. आरएसएस बेस्ट आहे दंगली घडवून माणसे मारण्यात. उदा. गुजरातची मुस्लिमविरोधी दंगल.
      ३. आरएसएस बेस्...See More
      August 22 at 1:23pm ·  ·  2 people
    • Ramdas Mali rss kadhihi dangli gadvat nahi. arop chukicha ahe.
      August 22 at 2:26pm ·  ·  1 person
    • Anita Patil mag mi var dilelya yditil dangli koni ghdvilya? babari mashid koni padli.
      August 22 at 2:41pm ·  ·  1 person
    • Anita Patil amhi Ghetlay na shodh. mhanun tar he lihile.
      August 22 at 3:15pm · 
    • Ramdas Mali shodh ghetla tar puravede ki cid branchala
      August 22 at 3:17pm · 
    • Anita Patil Ramdas Mali तुला बोंबलायला कुठे तरी जागा पाहिजे ना. म्हणून मी तिकडे जात नाही. ती जागा तुझ्यासाठी ठेवली आहे. ..... अहो माळी, काय बोलताय तुम्हाला कळते का? मी मांडलेल्या मुद्यावर बोला. उगाच आकांडतांडव केल्याने काय होणार?
      August 22 at 3:23pm · 
    • Ramdas Mali are tu vaicharik vishayavar bolana ha vihsay far juna zala.
      August 22 at 3:27pm · 
    • Ramdas Mali don char lokacha drushta pravutine deshat dangli gadat astat . kontyahui sagtnecha dangli karnacha hetu nasto sangatna ya samjacha parablaya aste.
      August 22 at 3:30pm · 
    • Anita Patil ‎....शाबास अण्णाच्या उपोषणाला तू जुना विषय म्हणतोस? धन्य आहे तुझी. तुला नमस्कारच केला पाहिजे.
      August 22 at 3:31pm · 
    • Ramdas Mali tymule maza bolalyacha tumala rag yene sahjik ahe.
      August 22 at 3:31pm · 
    • Ramdas Mali annacha uposhanachababatit me kahi boloch nahi..
      August 22 at 3:33pm · 
    • Anita Patil mala konachahi rag yet nahi. charch zalich pahije, ase maze mat ahe.
      August 22 at 3:33pm · 
    • Ramdas Mali karan pretek vyaktiche vichar vegle astat.
      August 22 at 3:34pm · 
    • Ramdas Mali mat vegle aste ani to mandnyacha pretekala adhikar ahe.
      August 22 at 3:35pm · 
    • Anita Patil ‎...हसावे की रडावे हेच मला कळेनासे झाले आहे, रामदासभाऊ. अहो माझा लेख अण्णांच्या उपोषणावर आहे. तुम्ही त्यावर प्रतिक्रिया देता. आणि वर म्हणता, मी अण्णांविषयी काही बोललोच नाही. तुमचा फारच गोंधळ उडालेला दिसतोय. तुम्ही जरा शांततापूर्वक विचार करा. आणि मग काय ते बोला. मी आता थोड्या वेळासाठी थांबते. ओके.
      August 22 at 3:40pm · 
    • Anita Patil Ramdas Mali जाता जाता एक सूचना. मी परशुरामाविषयी आणखी एक लेख आज पोस्ट केला आहे. तोही वाचा. तो वाचून तर तुम्हाला माझा अधिकच राग येईाल.
      August 22 at 3:40pm · 
    • नियंत अग्रवाल Anita Patil -: i think tumhla as watatay ki Ayodhya madhye Babri Mashid ch bhari disate.... BAR ASUDE tumhla 1ch prashn aahe ki TUMACH GOHATYEBADDAL KAI MAT AAHE ???
      August 22 at 6:13pm · 
    • Anita Patil 
      ‎@ जयतु हिंदुराष्ट्रम् .... स्वत:चे नावाऐवजी जयतु हींदूराष्ट्रम अशी अक्षरे लावता आणि वर विचारताय की, तुमचे गोहत्येबद्दल काय मत आहे. qहुदत्वाद्यांचे आद्य मेरुमणी संडासवीर विनायक दामोदर सावरकर एकदा वाचून काढा. सावरकरांनी गायीला उपयुक्त पशू ...See More
      August 22 at 7:19pm ·  ·  1 person
    • Ganpat Tidke Very Nice Anita ......Tujhe vichar khup changale ahet...
      August 23 at 1:34pm · 
    • Ganpat Tidke And bakichya baddal sangayech manhatal tar ...Jantantra ahe murkh lokananna chanagl kahi kartana virodh te karnarach
      August 23 at 1:35pm · 
    • Sudhir Khadke Anitaji pratyek goshti cha samandh tumhi bramhan aani rss shi ka lavta? Khare tar yat aapli kahich chuk nahi ,tumhi bramhan samaja baddal tirskaracha kala chashma lavla aahe tyamule sarv samaj tumhala waeetach disto aahe.Tilak,agarkar,gokhaleyancya baddal sudha kahi changle aasel tar liha.(jar tumhala changlyachi alerji nasel tar,aagrah nahi.)
      August 23 at 3:35pm · 
    • Renukadas Muley VANDE MATRAM !!!
      August 23 at 4:19pm · 
    • नियंत अग्रवाल Anita Patil -: RSS baddal dnyan nastatna jast bolu naye......
      August 24 at 3:22pm · 
    • नियंत अग्रवाल वंदे मातरम !!
      जयतु हिंदुराष्ट्रम् !!!!!!!!!
      August 24 at 3:25pm · 
    • Sudhir Khadke 
      Nathuram Godse ha RSS cha karyakarta hota he satya aahe.Pan tya mule RSS hi mulapasun waeet aahe aase nahi,swatantrya sathi RSS chya anek karyakartyani balidan kelele aahe,congrss swatanrya nantar fakta paise khanari sanghtna rahili,pan RSS...See More
      August 24 at 6:34pm · 
    • Janmejay Kadamb सोनिया गांधी या कुठलेही ऑपरेशन करुन घेण्यासाठी गेल्या नसून जबाबदारी टाळण्यासाठी काढलेली पळवाट आहे..चांगल्याचे श्रेय स्वतः घ्यायचे आणि वाईट झाले कि मनमोहन सिंगांना मध्ये आणायचे हे न कळण्याएवढे लोक अडाणी नाहित..
      August 28 at 9:37pm · 

No comments:

Post a Comment