Thursday 1 September 2011

परशुरामाची ब्राह्मणी भाकडकथा (भाग-१)


क्षत्रिय परशुरामाला पुरून उरले !



फेसबुकवरील माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो,
मी तुम्हाला काही लेख देण्याचे वचन मी याच आठवड्याच्या सुरूवातीला दिले होते. या लेख मालेतील पहिला लेख आज देत आहे. पुढील लेखही आपणास लवकरच वाचायला मिळतील.
...........................................
ब्राह्मणी धर्मात १० अवतार मानले जातात. अलिकडे मात्र ब्राह्मणांनी ९ अवतारांना घटस्फोट देऊन केवळ सहावा अवतार मानल्या जाणाèया परशुरामालाच आपला देव मानले आहे. ‘जय परशुराम' हा ब्राह्मणांचा परवलीचा शब्द झाला आहे. परशुराम क्षत्रियांचा द्वेष्टा होता. तसेच ब्राह्मण सोडून इतर जातींबद्दल त्याच्या मनात द्वेष भरलेला होता, म्हणून ब्राह्मणांना परशुरामाच्या प्रेमाचे भरते आले आहे. महाभारत, हरीवंश, भागवत पुराण आणि रामायण आदी अनेक पौराणिक ग्रंथांत परशुरामाची कथा आली आहे. ही कथा इतक्या विसंगतींनी आणि थोतांडांनी भरलेली आहे की, कोणाही सूज्ञ माणसाला हसू येईल. या कथेतील हा पाहा काही बोगसपणा :
१. परशुरामाने पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय केली, असे पुराणे सांगतात. नि:क्षत्रिय करणे म्हणजे क्षत्रियांचा पूर्ण निर्वंश करणे. सर्व क्षत्रियांना ठार मारणे. आता कोणत्याही व्यक्तीला qकवा व्यक्ती समूहाला एकदाच ठार मारता येईल. २१ वेळा कसे काय मारता येईल?
२. पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय केल्यानंतरही पृथ्वीवर क्षत्रिय शिल्लक होतेच. परशुमानंतरचे दोन अवतार राम आणि श्रीकृष्ण हेही क्षत्रियच होते. महाभारतातील युद्धात १८ आक्षौहिणी क्षत्रिय लढले. परशुरामाने क्षत्रिय शिल्लकच ठेवले नव्हते, तर हे सासरे क्षत्रिय आले कोठून?
२. अलीकडच्या काळात राजपूतांत क्षत्रियांचा इतिहास सापडतो. आजही स्वत:ला क्षत्रिय म्हणविणारे अनेक जातीसमूह भारतात आहेत.
३. याचा साधा अर्थ असा की, परशुरामाच्या पराक्रमाच्या कथा खोट्या आहेत. २१ वेळाचे राहू द्या, परशुरामाला एका वेळीही पृथ्वी नि:क्षत्रिय करता आली नाही. अतएव, ही कथा म्हणजे थोतांड ठरते. त्याचे पराक्रमही बोगस ठरतात.
३. परशुराम हा विष्णूचा सहावा अवतार समजला जातो. त्या नतंरच्या राम आणि कृष्ण या दोन्ही अवतारांत तो पुन्हा उगवतो. तीन-तीन अवतारांत प्रकटणारा हा परशुराम जगला तरी किती वर्षे? फारच कमी धरले, तरी त्याचे आयुष्य हजार-दोन हजार वर्षे भरेल. एवढे आयुष्य डायनासोरांनाच लाभू शकते. ‘जीवेत शरद: शतम' या श्लोकार्धात मानवाचे आयुष्य १०० वर्षे सांगितले आहे.
४. परशुरामाच्या बोगस पराक्रमाच्या कथांचा पर्दाफाश रामायणातही होतो. सीता स्वयंवरात राम त्याचे शिवधनुष्य मोडतो. म्हणून संतप्त परशुराम आपली कुरहाड घेऊन रामावर हल्ला करतो. क्षत्रिय राम त्याचा पराभव करतो. अपमानित झालेला परशुराम मग महेंद्र पर्वतावर जाऊन तपश्चर्या करीत बसतो.
३. श्रीकृष्ण अवतारात परशुराम पुन्हा अवतरतो. ब्राह्मण वेशातील कर्णाला तो ब्रह्मास्त्र वगैरे देतो. पण कर्ण ब्राह्मण नाही, हे समजल्यावर त्याला शाप देतो. यातून परशुराम द्वेषाचा मूर्तीमंत पुतळा होता हेच सिद्ध होते. 

4,. असे व्यक्तिमत्व कोणत्याही सुसंस्कृत समाजाने आपले प्र्रतिक म्हणून स्वीकारावे का?
......................................................................................................................
विशेष सूचना
महात्मा फुले यांनी परशुरामावर अत्यंत घणाघाती टीका केलेली आहे. परशुराम हा इराणी होता. असे संशोधन फुल्यांनी केले आहे. जिज्ञासूंनी ते अवश्य वाचावे. समग्र फुले वाङ्मयात हे लिखाण आहे.


- अनिता पाटील, औरंगाबाद.

1 comment:


  1. जय जिजाऊ मॉम तुम्ही परत फेसबुक वर यावे ....

    ReplyDelete