Monday 9 April 2012

सदाशिव भाऊंचा मृत्यू कसा झाला?


सदाशिवराव भाऊ


पानिपतावरील सदाशिवराव भाऊंच्या मृत्यूबाबत अनेक आख्यायिका आहेत. भाऊ मेलेच नाही, असे मानणाराही एक गट आहे. हरियाणात भाऊंचे एक मंदिर आहे. तेथे भाऊंनी आपले शेवटचे दिवस काढल्याची आख्यायिका आहे. स्वत:ला सदाशिवराव भाऊ म्हणविणारा एक व्यक्ती पुण्यातही त्याकाळी आला होता. विशेष म्हणजे भाऊंच्या पत्नीनेही हेच भाऊ आहेत, असे म्हटले होते. तथापि, नानासाहेब पेशव्यांनी ते मान्य केले नाही. या व्यक्तीला घाशिराम कोतवालाच्या हस्ते देहदंड ठोठावण्यात आला. भाऊंचे काय झाले, हा प्रश्न इतिहासकारांना अजूनही छळतोच आहे. पानिपतच्या लढाईला १४ जानेवारी २०१२ मध्ये दीडशे वर्षे झाली. त्यानिमित्त झालेल्या सोहळ्याच्या वेळी मी हरियाणात गेले होते. तेथे मी भाऊंचे काय झाले, याबाबत लोकांत काय आख्यायिका आहेत, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. एक वेगळीच आख्यायिका तेव्हा माझ्या हाती आली. या विषयी लिहिण्याचा किती तरी दिवसांचा मानस होता. परंतु, या ना त्या कारणाने शक्य होत नव्हते. शेवटी विशेष वेळ काढून हा लेख आज लिहिला. तो ब्लॉगच्या वाचकांसाठी देत आहे. 

आधी भाऊ आणि पानिपत युद्धाची थोडीशी पाश्र्वभूमी पाहू या. सदाशिवराव भाऊ यांचा जन्म पुण्याजवळील सासवड येथे झाला. पहिला बाजीरावाचा भाऊ चिमाजी अप्पा हे भाऊंचे वडील. त्यांच्या आईचे नाव रखमाबाई होते. रखमाबाईचा बाळंतपणातील आजाराने मृत्यू झाला. तसेच भाऊ सुमारे १० वर्षांचे असताना चिमाजी अप्पांचाही मृत्यू झाला. आजी राधाबाई यांनी भाऊंचा पुढे सांभाळ केला. भाऊ प्रारंभी नागपूरच्या भोसल्यांच्या सेवेत होते. नंतर ते नानासाहेब पेशव्यांचे दिवाण बनले. पानिपतावर मराठा सैन्याचे नेतृत्व करण्यास भाऊ असमर्थ होते, असे अनेक इतिहासकार मानतात. तथापि, मला हे पटत नाही. भाऊंनी मराठा साम्राज्याची उत्तम सेवा केली. १७४६ मध्ये भाऊंनी कर्नाटकात मुलुखगिरी केली. त्यांनी उदगीर घेऊन निजामाची कंबर तोडली. अलाऊद्दीन खिलजीने दौलताबादचा देवगिरी किल्ला घेतल्यानंतर मराठ्यांना तो कधीच परत घेता आला नव्हता. सदाशिव भाऊने देवगिरी जिंकून  इतिहास घडविला. तेच भाऊ पानपतावर यश मिळवू शकले नाही. त्याला अनेक कारणे होती. 

तिस-या पानिपत युद्धाची पाश्र्वभूमी

अहमदशाह अब्दाली
अहमदशाह अब्दाली दिल्लीवर चालून आला तेव्हा दिल्लीचे संरक्षण करण्याची जबाबदारी मराठ्यांवर होती. मराठ्यांनी मोगलांशी अहमदिया करार केलेला होता. या करारानुसार दिल्लीला संरक्षणाची जबाबदारी मराठ्यांनी घेतली होती. या काळात मराठा साम्राज्य यशाच्या शिखरावर होते. दिल्ली परीसरातील काही भाग वगळता बहुतांश भारतावर मराठ्यांचा ताबा होता. मराठ्यांच्या नजरा आता वायव्येकडे वळल्या होत्या. मराठ्यांना वेळीच रोखले पाहिजे हे ओळखून अफगाणिस्तानचा शाह अहमदशाह दुर्राणी (यालाच अब्दाली म्हणतात) दिल्लीवर चालून आला. त्याने पंजाब घेतले. दत्ताजी qशदे तेव्हा उत्तरेत होते. यमुनेच्या बुरारी घाटावर झालेल्या लढाईत दत्ताजी शिन्दे मारले गेले. या दोन्ही बातम्या महाराष्ट्रात पोहोचल्या. अब्दालीचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी सदाशिव भाऊंवर सोपविण्यात आली. त्यासाठी भाऊंना उदगीरच्या लढाईतून परत बोलावून घेण्यात आले. मोठा लवाजमा घेऊन भाऊंनी दिल्लीला कूच केली. 

उत्तरेतील हिंदू  म्हणविणारे राजे अब्दालीला मिळाले

अब्दाली मुत्सद्देगिरीच्या बाबतीत मराठ्यांच्या पुढे होता. त्याने उत्तरेतील सर्व नवाब आणि राजांना आपल्या बाजूने वळविण्यात यश मिळविले. काही जण अलिप्त राहिले, तर काही जण थेट अब्दालीच्या बाजूने लढले. जोधपूरचा राणा बिजय qसग आणि अंबरचा कछवाह राजा माधोqसग हे अलिप्त राहिले. रोहिल्यांचा प्रमुख नजीबुद्दौला आधीचाच अब्दालीसोबत होता. अवधचा नवाब शुजाऊद्दौला इस्लामच्या नावावर त्यांना जाऊन मिळाला. भरतपूरचा जाट राजा सुरजमल जाट, राजपूत आणि शीखांची मदत मिळावी म्हणून सदाशिव भाऊंनी प्रयत्न केले. तथापि, त्यात त्यांना यश आले नाही. उत्तरेतील राजपूत, जाट, शीख यापैकी कोणालाच मराठ्यांचा वाढता प्रभाव नको होता. अकबराच्या काळापासून दिल्लीच्या सत्तेत महत्त्वाची भूमिका बजावणारे राजपूत दुय्यम स्थानावर फेकले गेले होते. त्यांची जागा मराठ्यांनी घेतली होती. मराठे राजपुतान्यात उतरून राजपुतांकडूनही खंडण्या वसूल करीत असत. त्यामुळे राजपुतांनी अब्दालीला मदत केली. हीच स्थिती जाट आणि शीखांचीही होती. मराठे आपल्यावर हल्ला करून आपली राज्ये ताब्यात घेतील, अशी भीती त्यांना वाटे. मल्हारराव होळकरांची मदतही भाऊंना वेळेत मिळू शकली नाही. 

भाऊंच्या चुका

उत्तरेतून मदत मिळाली नाही, तरी मराठे पानिपताची लढाई सहज qजकले असते. परंत तसे झाले नाही. भाऊंच्या काही चुका त्याला कारणीभूत होत्या. या लढाईत भाऊंनी मराठ्यांचे प्रसिद्ध गनिमी कावा हे युद्धतंत्र बाजूला ठेवले. तसेच भाऊंनी बिगरसैनिक लवाजमा सोबत घेतला होता. कुटुंब कबिलाही होताच. मराठा सैन्याबद्दल त्याकाळी महाराष्ट्रात इतका विश्वास होता की, मराठे हरतील असा विचारसुद्धा कोणी करीत नसे. त्यामुळे लोक बिनधास्तपणे सैन्यासोबत जात. उत्तरेत जाऊन तीर्थ यात्रा करीत. मुलुख पाहत qहडत. भाऊंच्या सैन्यासोबतही असे लोक होते. त्यांची संख्या प्रचंड होती. न. र. फाटक यांनी या लव्याजम्याला बाजारबुणगे म्हटले आहे. मराठा सैन्याची अध्र्यापेक्षा जास्त रसद या बाजारबुणग्यांनीच फस्त केली. भाऊंच्या सैन्याला पानपतावर उपासमारीचा सामना करावा लागला. महाराष्ट्र खूप दूर होता. उपासमारीने मरणे qकवा लढणे हे दोनच पर्याय भाऊंसमोर होते. त्यांनी लढण्याचा पर्याय निवडला. त्या आधी बाजारबुणग्यांना महाराष्ट्रात सुरक्षित परत पाठविण्यासाठी मराठा सैन्याची बरीच शक्ती खर्च झाली. 

असे लढले मराठे 

भाऊंच्यासोबत जनकोजी शिन्दे आणि इब्राहीम खान गारदी होते. १४ जानेवारी १७६१ रोजी लढाईला तोंड फुटले. दुपारपर्यंत मराठे वरचढ होते. अब्दालीची ४५ हजारांची फौज पाठीला पाय लावून पळाली. दुपार ढळल्यानंतर सूर्य मराठ्यांच्या तोंडावर आला. तसेच अब्दालीने स्वत:च्या संरक्षणासाठी राखीव ठेवलेले सैन्य अचानक मैदान उतरविले. अब्दालीने हा शेवटचा डाव खेळला होता. तो फसला असता तर त्याचा मृत्यू अटळ होता. परंतु, त्याचे नशीब चांगले होते. यश मिळत आहे, असे पाहून मराठे जल्लोषाच्या तयारीत असतानाच अब्दालीच्या ५०० वेगवान घोडेस्वारांनी विद्यूत वेगाने हल्ला चढविला. मराठ्यांची दाणादाण उडाली. 



जानव्या चा फास देऊन भाऊंना मारले 

पानिपतावरील भाऊंच्या मृत्यूबाबत अनेक आख्यायिका आहेत. भाऊ युद्धात मेलेच नाही, असे मानणारे लोक हरियाणात आहेत. हरियाणातच भाऊंचे एक मंदिर आहे. तेथे भाऊंनी आपले शेवटचे दिवस काढल्याची आख्यायिका आहे. पानिपतच्या लढाईला १४ जानेवारी २०१२ मध्ये दीडशे वर्षे झाली. हरियाणाच्या दौèयात मी अशा आख्यायिकांच्या शोधात होते. योगायोग पाहा एक वेगळीच आख्यायिका माझ्या हाती आली. ही आख्यायिका अशी : अचानक उडलेल्या या हलकल्लोळात भाऊ गडबडले. त्यांनी स्वत:ला युद्धाच्या गर्दीत झोकून दिले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अब्दालीच्या एका घोडेस्वार तुकडीने भाऊंना अलगद उचलले. भाऊंना घेऊन ही तुकडी युद्धाच्या गर्दीपासून बाजूला झाली. मराठ्यांचा सेनापती पकडला म्हणून आपणास इनाम मिळेल, असे या तुकडीला वाटले. अशी बक्षिसी देण्याची त्याकाळी रीत होती. युद्ध संपल्यानंतर सायंकाळी भाऊंना अब्दालीच्या राहुटीत नेण्यात आले. अब्दालीसमोर भाऊंचे वर्तन सेनापतीला साजेसेच होते. दत्ताजी qशदे यांनी ज्या बाणेदारपणाने ‘बचेंगे तो और भी लडेंगेङ्क असे उद्गार काढले, तोच बाणा भाऊंनीही दाखविला. मला मुजरा केल्यास तुला जीवदान देतो, असे अब्दालीने भाऊंना सांगितले. त्यावर भाऊ उद्गारले : ‘तू मला मुजरा केल्यास, आमच्या छत्रपतींच्या दरबारात मी तुझा सन्मान घडवून आणतो.ङ्क भाऊंच्या उदगाराने अब्दाली संतापला. त्याचे शीर कलम करण्याचा आदेश त्याने सैनिकांना दिला. यावेळी भाऊंनी झटापट केली. त्यात त्यांच्या गळ्यातील जानवे खाली पडले. ते घेण्यासाठी भाऊ धडपडू लागले. तेव्हा अब्दालीने विचारले : ‘ हा धागा कशाचा आहे.ङ्क त्यावर भाऊ म्हणाले : ‘ही माझ्या धर्माची निशाणी आहे.ङ्क अब्दाली हसला. त्याने जमिनीवर लोळणारे जानवे उचलले. याच धाग्याने याचा मृत्यू होऊ दे, असा आदेश त्याने सैनिकांना दिला. सैनिकांनी भाऊंचे जानवे भाऊंच्या गळ्याभोवती आवळले आणि त्यांचा जीव घेतला. 

भाऊंची धीन्ड

अब्दालीचे बहुतांश सैन्य खलास झाले होते. अगदी थोडेसे लोक उरले होते. युद्ध qजकूनही त्याला काहीच उपयोग नव्हता. कारण ज्या सैन्याच्या बळावर त्याने अफगाण साम्राज्य उभे केले होते. ते सर्व नामशेष झाले होते. त्यामुळे तो प्रचंड निराश झाला. संतापला. त्याने मेलेल्या भाऊंचे शिर कलम करून धीन्ड काढण्याचे आदेश दिले. भाऊंचे शीर कापण्यात आले. ज्या जानव्याने त्यांचा गळा आवळण्यात आला होता, त्यालाच त्यांचे शिर बांधून एका भाल्याला लटकावण्यात आले. सर्व शिबिरभर फिरवून नंतर ते मृतदेहांच्या ढिगाèयांत फेकून देण्यात आले. तिसèया दिवशी भाऊंचा बिनमुंडक्याचा मृतदेह देहांच्या ढिगाèयात सापडला. चौथ्या दिवशी मुंडके सापडले. 

अफगाणी साम्राज्याचा खातमा

पानितपत युद्धाने नुसती अब्दालीचीच नव्हे, तर अफगाणी साम्राज्याची कंबर मोडली. अब्दालीचे साम्राज्य हे अफगाणचे शेवटचे साम्राज्य ठरले. पानिपतचे युद्ध qजकल्यानंतर अब्दाली दिल्लीवर चालून येण्याऐवजी परत निघून गेला. कारण त्याच्याजवळ पुढे लढायला सैन्यच उरले नव्हते. पानिपत युद्धाची मध्यपूर्वेतील आक्रमक टोळ्यांनी प्रचंड धसका घेतला. त्यानंतर वायव्येच्या बाजूने भारतावर एकही आक्रमण झाले नाही. सुमारे पावणे दोनशे वर्षांनतर इंग्रजांनी व्यापाराच्या नावाखाली भारत ताब्यात घेतला. 

अनिता पाटील 


4 comments:

  1. 250 वर्ष झालीत पानिपताला

    ReplyDelete
  2. सुंदर व अभ्यासपुर्ण लेख

    ReplyDelete