Tuesday 29 November 2011

बिनडोक बहुजनांचा ब्राम्हणवाद

सौजन्य : महावीर सांगलीकर


महावीर सांगलीकर हे मराठी ब्लॉग विश्वातील एक मोठे नाव. बहुजाजन समाजाला जागविण्याचे काम ते गेले वर्षभर नेटाने करीत आहेत. तथापि, बहुजन समाजाकडून त्यांना आलेला अनुभव फारच वाईट आणि निराश करणारा आहे. त्यावर महावीर भाई यांनी लिहिलेला हा लेख माझ्या वाचकांसाठी देत  आहे. 

................................................................................................

महावीर सांगलीकर लिहितात :


अलीकडील कांही घटनांवरून मी बहुजनांतील भटाळलेल्या टाळक्यांना वैतागलेलो आहे. बहुजनांचे प्रबोधन करणे ही फारच अवघड गोष्ट आहे. बहुतेक बहुजन हे स्वत:चे डोके वापरत नसल्याने त्यांचे प्रबोधन होवू शकत नाही. केवळ यामुळेच बहुजनांवर गेली हजारो वर्षे ब्राह्मणांचे धार्मिक आणि सांस्कृतिक राज्य आहे.

ब्राम्हणवाद पसरवण्यासाठी ब्राम्हणांची कांहीच गरज नाही. भटाळलेले बहुजन ते काम ब्राम्हनांपेक्षा हिरीरीने आणि इमाने-इतबारे करत आहेत, तेही फुकट. त्यांना या कामासाठी कसल्या मोबदल्याची गरज नाही. ब्राम्हण लोक ब्राम्हणवाद त्यांच्या स्वार्थासाठी आणि बहुजनांचे धार्मिक शोषण करून करत आहेत, वर त्यासाठी बहुजनांच्या खिश्यातूनच दक्षिणा घेत आहेत. भटाळलेले बहुजन मात्र हे काम धर्मकार्य म्हणून तन-मन-धनाने करत आहेत.

हे बिनडोक बहुजन शाहू महाराज, महात्मा गांधी, महिला, 'हिंदू' उर्फ ब्राम्हण धर्म सोडून इतर धर्म यांच्यावर विकृत बुद्धीने अचकट विचकट विनोद करत असतात. अर्थात हे विनोद ही त्यांचीनिर्मिती नसते (त्यांना कोठे एवढे डोके असते?), तर ते ओरिजिनल ब्राम्हणवाद्यांनी तयार करून समाजात सोडलेले असतात. बिनडोक बहुजन असे विनोद पसरवण्याचे काम करत असतात. अगदी आवडीने, कारण त्यांना असल्याच प्रकारचे विनोद कळत असतात. या भटाळलेल्या बहुजनांना राणी लक्ष्मी बाई बद्दल भरपूर माहिती असते, पण ताराराणी कोण हे देखील नीट माहीत नसते. त्यांचे आदर्श पळपुटे माफीवीर असतात, पण नाना पाटील कोण हे माहीत नसते. ब्राम्हण जो इतिहास सांगतील आणि लिहितील तोच इतिहास त्यांना खरा वाटत असतो. 

भटाळलेले बहुजन हे बहुजनातील बहुजन असल्यामुळे ब्राम्हणविरोधी अल्पसंख्य बहुजन हे ब्राम्हणवादाविरुद्धच्या लढाईत कधीच यशस्वी होवू शकणार नाही.

ब्राम्हणवादी ब्राम्हण खाजगीत म्हणत असतातच की,
असे कित्येक फुले 
आले आणि गेले
 
आमचे कांही 

वाकडे नाही झाले......

आणि ते खरेच आहे, म्हणून तर मूठभर ब्राम्हण पोतेभर बहुजनांना हजारो वर्षे मूर्ख बनवू शकतात. बहुजन केवळ बहुजन आहेत म्हणून ही लढाई जिंकू शकत नाहीत. संख्याबळाने लढाई जिंकता आली असती तर शेकडो हरणांच्या कळपाने त्यांच्यावर हल्ला करणा-या २-४ लांडग्यांचा सहज पराभव केला असता.

ब्राम्हण का जिंकतात हे त्यांना अजूनही कळलेले नाही, ज्या कांही थोड्या लोकांना कळले आहे त्यांना समाजाची साथ नाही. त्यामुळे भटाळलेल्या बहुजनांचे प्रबोधन करणे म्हणजे दगडावर डोके आपटून घेण्यासारखे आहे.  

Wednesday 23 November 2011

पोरं बहुजनांची-मराठ्यांची, दगड ठाक-यांचे आणि बदनामी शिवरायांची



महाराष्ट्र गुंडा-पुंडांचा प्रदेश आहे का?
बाळ ठाकरे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या तीन नावांनी महाराष्ट्राच्या पवित्र आणि सोज्वळ मातीला कलंक लावला आहे. उत्तर भारतात पूर्वी महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून ओळखले जायचे. संत नामदेवांनी महाराष्ट्रातील भक्तीपंथाची पताका पार पंजाबपर्यंत नेली. नामदेवांच्या अभंगांना शीखांच्या गुरुग्रंथसाहेबांत आदराने स्थान मिळाले. खरी भक्ती महाराष्ट्राच्याच मातीत आहे, हे ओळखून संत कबिरांनी आपला मुलगा लतिफ याला पंढरपूरला पाठविले होते. संत लतिफ हे परत उत्तर भारतात जाऊ शनले नाहीत. गेले नाहीत, असेही म्हणता येईल. पंढरपुरातच त्यांनी देह ठेवला. त्यांची समाधी पंढरपुरातच आहे. संत कबिराचा एक अंश अशा प्रकारे महाराष्ट्राच्या मातीशी एकरूप झालेला आहे. महाराष्ट्राची ही भक्तीरूपी ओळख पुसून टाकण्याचे महापाप ठाकरयांनी केले. मुजोरांचा आणि गुंडांचा प्रदेश असा बदनामीचा शिक्का ठाकतरयांनी महाराष्ट्राच्या कपाळावर बसवला. महाराष्ट्र खरेच गुंडा-पुंडांचा प्रदेश आहे का?

बाळ ठाकरे      उद्धव ठाकरे        राज ठाकरे     आदित्य ठाकरे  

इंदुरीकर ठाकरयांनी भक्तीरूपी
महाराष्ट्राचा "तमाशा" केला !
महाराष्ट्रातील तमाम बहुजन समाज वारकरी सांप्रदायाशी बांधलेला आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जातीत किमान एक तरी वारकरी संत आढळून येतो. महाराष्ट्राला मुजोरांचा आणि गुंडांचा प्रदेश अशी ओळख देताना ठाकरयांनी याच बहुजन समाजाची दिशाभूल केली. ही यातील सगळ्यांत वाईट गोष्ट होय. ठाकरे हे तसे महाराष्ट्राला उपरे आहेत. या त्रिकुटाचे घराणे मूळचे इंदूरचे आहेत. ठाकरयांचा मूळ पुरुष प्रबोधनकार केशव सीताराम  ठाकरे यांनीच आम्ही मूळचे इंदूरचे असल्याचे आपल्या आत्मवृत्तात लिहून ठेवले आहे. प्रबोधनकारांनी महाराष्ट्रात केलेले प्रबोधनाचे कार्यही ठाकरे विसरले.  महाराष्ट्रात इंदुरीकर महाराज  नावाचे एक  किर्तनकार सध्या फार प्रसिद्ध आहेत. ठाकरे हे इंदुरीकरच पण किर्तनकार नव्हे तमासगीर! त्यांनी अख्ख्या  महाराष्ट्राचा तमाशा केला!!एकेकाळी शिवसेनेत असलेले महाराष्ट्रातील बहुजन समाजाचे एक गणमान्य नेते छगन भुजबळ यांनी बाळ ठाकरे यांना मागे एकदा तमाशा काढण्याचा सल्ला दिला होता. आपल्या फडाचे नाव ‘टी बाळू लोकनाट्य तमाशा मंडळ' ठाव असेही भुजबळ म्हणाले होते. ठाकरे यांनी भुजबळांना "लखोबा लोखंडे" ही पदवी दिली होती, तेव्हाचा हा किस्सा आहे. भुजबळांनी ज्या संतापाच्या भरात ठाकरयांना तमाशा काढण्याचा सल्ला दिला होता, तो संताप महाराष्ट्रातील तमाम जाणकारांच्या मनात गेली कित्येक वर्षे खदखदत आहे.
महाराष्ट्र लढत होता तेव्हा ठाकरयांचे 
पूर्वज मोगलाईत मौजा करीत होते
ठाकरयांची ही मुजोरी बहुजन समाजाच्या जोरावरच सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे अराध्य दैवत. महाराजांचे नाव घेतले की, महाराष्ट्रातील तरुणांचे बाहू फुरफुरू लागतात. याचाच गैरफायदा ठाकरयांनी घेतला. +जय भवानी जय शिवाजी+ हा नारा ठाकरयांनी दिला. त्याबरोबर महाराष्ट्रातील तमाम बहुजन तरुण ठाकरयांचा बटिक झाला. महाराष्ट्रातील एकही बहुजन जात त्यातून सुटली नाही. मराठा समाजही त्यात आला. मराठा समाजाची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक असल्यामुळे साहजिकच मराठा तरुण शिवसेनेकडे मोठ्या प्रमाणात आकर्षिला गेला. महाराष्ट्रातील सर्व बहुजन जाती मुळातच लढवय्या आहेत. या जातींतील लढवय्ये तरुण आयतेच ठाकरयांच्या हाती सापडले. ठाकरयांनी या तरुणांना पोटापाण्याला लावले असते, तर महाराष्ट्राने ठाकरयांना दुवाच दिला असता. पण तसे झाले नाही. ठाकरयांनी बहुजन तरुणांच्या हातात दगड दिले. या तरुणांना एकत्र करून दंगलखोरांची एक फौज तयार केली. या फौजेच्या बळावर ठाकरयांनी महाराष्ट्रात पाच वर्षांची सत्ता उपभोगली. याच तरुणांच्या बळावर ठाकरे गेली ४० वर्षे महाराष्ट्रात दादागिरी करीत आहेत. शिवरायांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट मोगलांविरुद्ध लढत होता, तेव्हा ठाकरयांचे पूर्वज कोठे होते? ते होते इंदुरात. इंदुरचा प्रदेश तेव्हा मोगली सत्तेखाली होता. याचाच अर्थ महाराष्ट्रातील तरुण शिवरायांच्या फौजेत रक्त सांडीत असताना ठाकरयांचे पूर्वज मोगलाईमध्ये सुखैनैव आयुष्य जगत होते. 
प्रबोधनकारांचे नाव घेऊन काय दगड मारायचे ते मार
अशा प्रकारे ठाकरे आणि शिवरायांचा काडीचाही संबंध नाही. त्यामुळे ठाकरयांना जी काही  मुजोरी आणि मस्ती दाखवायची असेल ती आपला मूळ पुरुष प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या नाव घेऊन दाखवावी. त्यावर  कोणीही आक्षेप घेनार नाही. पण ही सगळी मस्ती ठाकरे महाराष्ट्राचा मूळ पुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने करीत आहेत . ही आक्षेपार्ह बाब आहे. ठाकरयांनी छत्रपतींचे नाव घेऊन उत्तर भारतीयांवर हल्ले केले. त्यात बदनामी केशव बळीराम ठाकरे यांची झाली नाही. बदनामी झाली, छत्रपती शिवाजी महाराजांची. महराजांचे नाव घेतल्यावर उत्तर भारतीयांना महाराजांचा कोणता इतिहास आठवेल? त्यांना कोणताही इतिहास आठवणार नाही. आठवेल फक्त +जय भवानी जय शिवाजी+चा नारा आणि या नारयाच्या गोंगाटात येणारे दगड!
चौथा ठाकरेही रिंगणात
थोडक्यात सांगायचे तर पोरे बहुजन आणि मराठ्यांची, दगड ठाकरयांचे आणि बदनामी शिवरायांची असे समीकरण ठाकरे त्रिकुटाने महाराष्ट्रात गेली ४० वर्षे राबविले आहे. हेच समीकरण राबविण्यासाठी आदित्य नावाचा नवा चौथा ठाकरेही आता मैदानात उतरविला आहे. 
बहुजन तरुणांनो महाराष्ट्रातील बहिणींची विनंती ऐका
बहुजनांनो, आता तरी ठाकरे त्रिकुटाचे राजकारण समजून घ्या. महाराष्ट्र आणि शिवरायांची बदनामी टाळा. ठाकर्यांचा नाद सोडा. ही महाराष्ट्राच्या तमाम बहिणींची आपल्या भावांना हात जोडून विनंती आहे.

अनिता पाटील, औरंगाबाद. 

Tuesday 22 November 2011

दादाहरी यांच्या पत्राला उत्तर

श्री. दादाहरी,

तुम्ही मेसेज केलेले पत्र मिळाले. वाचून आनंद झाला आणि दु:खही. आनंद यासाठी की, तुम्ही ब्लॉग वाचला. दु:ख यासाठी की, त्याकडे तुम्ही पूर्वग्रहाने पाहिले.  
मला काहीही साध्य करायचे नाही
इतिहास, पुराणातील कथा मराठा तरुणांना सांगून काय साध्य करणार असा प्रश्न आपण खूप दिवसांपासून करीत आहात. मला काहीही साध्य करायचे नाही. मी कोणाचे प्रबोधन करू शकत नाही. माझी तेवढी शक्ती नाही. मला थोड्याफार अभ्यासातून जे जाणवले ते मी निर्भिडपणे लिहिले, एवढेच. घटनेनेच मला लिहिण्याचा अधिकार दिला आहे. मी कोणाविरुद्धही लिहित नाही. तुम्ही म्हणता तसा मी कोणत्याही पुराणकथेचा नवा अर्थ लावलेला नाही. अर्थ जुनेच आहेत. या कथा संस्कृतात होत्या. बहुजनांना संस्कृत येत नाही. मी ते शिकले. काही पुस्तके वाचली. आणि जशाच्या तशा कथा लोकांसमोर ठेवल्या. त्यात एवढे बिघडले कुठे? सर्व ब्राह्मणेतर समाजाला शूद्र ठरवून या वाङ्मयापासून आजपर्यंत लपवून ठेवण्यात आले होते. कारण या वाङ्मयात बहुजनांविरोधातील कपट कारस्थाने ठासून भरलेली होती. या कथा समोर ठेवल्यामुळे ही कपट कारस्थाने समोर आली. त्यात माझा काय दोष? सत्य सांगणे हा काही दोष होऊ शकत नाही. 
ब्राह्मणांना ब्राह्मण म्हटल्यास राग का यावा?
माझ्या लेखात ब्राह्मणांचे उल्लेख वारंवार येतात. ही गोष्ट खरी आहे. आता मूळ कथांत ब्राह्मण आहेत तर त्याला मी काय करणार. ब्राह्मणांच्या जागी दुसरया कोणाची नावे घालून मी या कथा लोकांना सांगाव्या असे तुमचे म्हणणे आहे का? यात मला एक गोष्ट अजिबात कळली नाही की, ब्राह्मणांना ब्राह्मण म्हटल्यास तुम्हाला राग का यावा. बरे मी ब्राह्मणांवर कुठेही टीका केलेली नाही. फक्त त्यांच्याशी संबंधित मजकूर मराठीत भाषांतरीत केला. त्यामुळे त्यांचा कावेबाजपणा आपोआप जगासमोर आला. यात माझ्या पदरचे काहीच नाही. जे आहे, ते ब्राह्मणांनीच लिहिलेल्या ग्रंथांतीलच आहे. यालाही तुम्ही आक्षेप घेता. ही म्हणजे फारच कमाल झाली.
ब्राह्मणी वाङ्मय विश्लेषणाच्या कक्षेबाहेर ठेवण्याचा अट्टाहास कशासाठी?
जातीय विद्वेष निर्माण करू नका, असा शहाजोग सल्ला तुम्ही मला देत आहात. हा सल्ला वाचूनच मला धक्का बसला. ब्राह्मणांच्या चुकांबद्दल लिहू नये, बोलू नये, असा एक काही कायदा या देशात आहे का? ब्राह्मणी वाङ्मय विश्लेषणाच्या कक्षेबाहेर ठेवण्याचा हा अट्टाहास का? याचे उत्तर तुम्ही देऊ शकाल का?
आरएसएस, शिवसेना, बजरंग दल यांना सल्ला द्या
जातीय विद्वेष पसरवू नका, हा सल्ला तुम्ही खरे तर आरएसएस, शिवसेना, बजरंग दल वगैरे संघटनांना द्यायला हवा. गुजरातेत इशरत जहाँ नावाच्या निष्पाप तरुणीची अतिरेकी ठरवून हत्या झाल्याचा निर्णय कालच न्यायालयाने दिला आहे. त्याच्या बातम्या आजच्या सर्व वर्तमानपत्रात पहिल्या पानावर आहे. या जातीयवादामागे ब्राह्मणी शक्ती आहेत, म्हणून त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करीत आहात का?
लेनची तळी उचलणारयांना सल्ला द्या
जेम्स लेनला मदत करून शिवाजी महाराज आणि जिजाऊंचा अपमान करणाèया ब्राह्मणांना आणि त्यांची तळी उचलरया ब्राह्मणांनाही तुम्ही काही सल्ला द्याल का? 
मराठा संघटनांबद्दल द्वेष का?
मी कोणत्याही संघटनेची सदस्य नाही. मला कोणाबद्दल प्रेम नाही, आणि कोणाबद्दल द्वेषही नाही. परंतु तुम्ही मराठा संघटनांबद्दल जे शब्द वापरले त्यावरून या संघटनांबद्दल तुमच्या मनात खोल अढी असल्याचे जाणवते. लेखकाने कोणाबद्दल असा द्वेष बाळगावा का? असा प्रश्न मला पडल्यावाचून राहत नाही. ब्राह्मणांच्याही गुप्त संघटना आहेत. फेसबुकवरही आहेत. तेथील जातीयवादाबाबत तुम्हाला प्रेम का बरे वाटावे? हाही प्रश्न आहेच. 
मी कोणाला कोणती शिवी दिली?
आपण माझ्यावर चक्क खोटे आरोप करीत आहात. तुम्ही मला उद्देशून म्हणता शिव्या देऊन काही साध्य होणार नाही. शिव्या म्हणजे काय? मी माझ्या ब्लॉगमध्ये कोणाची आय-माय काढली आहे का? मी कोणत्या लेखात कोणाला कोणती आई-मायीवरून शिवी दिली, हे कृपया आपण मला सांगाल का? मी अत्यंत सभ्य आणि संयत भाषेत लिखाण करते. सामनातून ज्या भाषेचा वापर होतो त्याबद्दल तुम्ही काही लिहीत नाही. हा पक्षपातीपणा अजब आहे. 
दादाहरी   साहेब तुमचा गोंधळ उडालाय 
एकूणच तुमचा सगळा गोंधळ उडालेला दिसतोय. तुमचे हे वाक्य पाहा : + परंपरा आणि आमच्या अज्ञानाचा फायदा घेवून पोटे भरली असतील किवा आजही तुम्ही म्हणता तसा त्यांचा पोटभरू बामणी कावा चालू असेलही, पण तो हाणून पाडण्यासाठी पुराणआणि इतिहासाचे दाखले देवून आणि त्यांना शिव्या देवून आमची प्रगती कशी होणार ?+  ...ब्राह्मणांचा  कावेबाजपणा आजही  चालू आहे, असे तुम्ही एकीकडे म्हणता आणि त्याला विरोध करणाèया लेखनाला आक्षेप घेता.
दलितांबद्दलचे तुमचे अज्ञान घातक आहे
दलितांच्या बाबतीत तुम्ही जे काही लिहिले आहे, ते तुमच्या अज्ञानाचे प्र्रतिक आहे. आंबेडकरांनी धर्मांतर केले म्हणून आजचे प्रश्न निर्माण झाले, असा तुमचा रोख दिसतो. समजा आंबेडकरांनी धर्मांतर केले नसते, तर तुम्ही म्हणता तसे जे काही कोणते वाडे शहरांत तयार झाले नसते का? काही तरी बोलू नका, बोलताना थोडा विचार करा. तुम्ही जे शब्द यासंदर्भात वापरले ते शब्द वापरणे मी पाप समजते. म्हणून मी त्यातला जातीवाचक भाग काढून फक्त वाडे एवढाच उल्लेख ठेवला.

तुम्ही माझा ब्लॉग वाचलात. वाचून त्याचे विश्लेषण केलेत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. 
कळावे. लोभ असावा. 

आपली बहीण
अनिता पाटील, औरंगाबाद.

Monday 21 November 2011

ज्यांना लाथा घालायला हव्यात, त्यांच्या आम्ही पाया पडतो



मी धर्मांतराचा हा एक विचार दिला आहे. त्यावर मतभेद होऊ शकतात. पण मराठा समाजाला ब्राह्मणी वर्चस्व असलेला हिंदू  धर्म एक ना एक दिवस सोडून आपली स्वतंत्र वाट चोखाळावीच लागणार आहे. हिंदू  हा धर्म नसून, ब्राह्मणांनी त्यांच्या फायद्यासाठी तयार केलेली एक व्यवस्था आहे. हे समजून घ्या. मग माझ्या लेखावर योग्य दिशेने विचार होईल. आपण किती दिवस ब्राह्मणांच्या ओंजळीने पाणी पिणार आहोत. आरएसएस ही ब्राह्मणी संघटना या देशात ब्राह्मणांचे राज्य आणण्यासाठी गुप्त कारस्थाने करीत आहे. भाजपाच्या अध्यक्षपदी नितीन गडकरी या ब्राह्मणाची निवड त्यासाठीच करण्यात आली आहे. 
बदनामी कशी सहन करणार? 
ज्या ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करायचे नाकारले. राज्याभिषेक करण्यासाठी अब्जावधी रूपयांची लाच महाराजांकडून घेतली. ज्यांनी लेनला हाताशी धरून जिजाऊंची बदनामी केली, त्या ब्राह्मणांचा कावा मराठे कधी ओळखणार आहेत. की आंधळेपणाने त्यांच्याच मागे जाणार आहेत? ज्यांना जिजाऊंची बदनामी करणारया ब्राह्मणी धर्माबद्दल आदर वाटतो, त्यांना स्वत:ला मराठा म्हणवून घेण्याचा तरी अधिकार आहे का?
तरीही आम्ही स्वतःला मराठे म्हणवतो..
ज्यांनी महाराज आणि राजमातेची बदनामी कोली, त्यांच्या हातून आम्ही आमच्या मुला-मुलींची लग्ने लावतो. आमच्या वाडवडिलांच्या मृत्यूनतंर त्यांच्याच हातून विधि करून घेतो. त्यांच्या सांगण्यावरून आम्ही सत्यनारायण घालतो. महाराजांची बदनामी केल्याबद्दल ज्यांना लाथा घालायला पाहिजे, त्यांच्या आम्ही पाया पडतो. त्यांना दक्षिणा देतो. आणि तरीही आम्ही स्वत:ला महाराजांचे वारसदार आणि मराठे म्हणून मिरवतो. आपल्याला समाजाला खरोखरच लाज राहिलेली नाही. याबद्दल मला तीव्र वेदना होतात.
हिन्दुत्वाचे मृगजळ
ब्राह्मणवाद्यांनी या देशात हिन्दुत्वाचे मृगजळ उभे केले आहे. संभाजीनगर, हिन्दूराष्ट्र ही अशाच मृगजळाची उदाहरणे आहेत. हे संभाजीनगर म्हणतात, ते बहुजनांना भुलविण्यासाठी यांचे केंद्रात सात-आठ वर्षे सरकार होते, तेव्हा यांनी कायदेशीररित्या संभाजीनगर असे नामकरण का केले नाही?  कारण यांना तसे करायचेच नव्हते. मते मिळविण्यासाठी फक्त महाराजांचे नाव वापरायचे होते.
तीन ठाकरे महाराष्ट्राला उल्लू बनवित आहेत
आरएसएस आणि ठाकरे हे ब्राह्मण आगी लावतात. मराठे आणि बहुजनांची पोरे त्यांच्या चिथावणीला बळी पडून पेटवा पेटवी करतात. आणि नंतर तुरुंगात सडत पडतात. ठाकरयांना हिन्दुत्ववाद हवा आहे की, मराठीवाद हे कोणी सांगू शकेल का? कोणीच सांगू शकत नाही. कारण  त्यांना कोणताच वाद नको आहे. त्यांना "वापरवाद" करायचा आहे. बहुजनांच्या पोरांना वापरून घ्यायचे आहे. ठाकरे नावाचे तीन माणसे सगळ्या महाराष्ट्राला उल्लू बनवित आहेत. आणि बहुजन महाराष्ट्र त्याला बळी पडत आहे, हीच खरी शोकांतिका आहे...

Sunday 20 November 2011

विकास गोडसे यांचे झणझणीत अंजन


सत्य लिहिले की, बी-ग्रेडींचे म्हणजेच ब्राह्मण गे्रडवाल्यांचे पित्त खवळते. विचारांचा विरोध करण्याऐवजी बाष्कळ बडबड हे लोक करतात. पूर्वी ब्राह्मण यात आघाडीवर होते. आता त्यांची बडबड कमी झाली आहे. परंतु बिगर जानव्यांच्या ब्राह्मणांची एक फौज अजून या देशात आहे. ब्राह्मणवादाने डोके फिरविलेले हे बहुजन फार विचित्र वागतात. विचित्र लिहितात. त्याला कोणत्याही मुद्यांना कशाचाही आधार नसतो. मी अशा पोस्टवर कॉमेंट देण्याचे टाळते.

अशा या प्रतिकूल वातावरणात मी लिखाण करीत असते. मात्र काही वेळा सुखद अनुभवही येतो. काही विचारी लोक संयमीपणे आपले म्हणणे मांडतात. काही समर्थकांच्या प्रतिक्रिया सुखद असतात. विकास गोडसे यांची प्रतिक्रिया अशीच सुखद होती. त्यांनी मला पाठींबा  तर दिलाच. शिवाय असंबद्ध बडबड करणारांचे कानही उपटले. कान उपटताना त्यांनी संयम मात्र ढळू दिला नाही.
विकास भैय्याची प्रतिक्रिया ब्लॉगच्या तमाम वाचकांसाठी देत येथे आहे :

" ... ब्लॉग वर कृपया विषयाला अनुसरून प्रतिक्रिया मांडाव्यात. आमच्या सारखे वाचक संभ्रमात पडतात. अशा प्रतिक्रिया फेसबुक किंवा ऑर्कुट वर बघायला मिळतात. येथे विषय श्यामच्या आईचा आहे. मी तो वाचला. अनिता पाटील ह्यांच्या विचारांशी मी १०० % सहमत आहे. श्यामची आई ही फक्त ब्राम्हण असल्यामुळे तिचा उदो उदो केला जातोय. जे शिळे अन्न आपण खात नाही ते कोणत्याही मनुष्य प्राण्यास देऊ नये. शिळे अन्न देणे काय किंवा मोळी विकत  घेणे काय शुद्ध व्यवहारीपणा दिसतो. सध्या आपले "top १०" लेख वाचतोय. पहिल्या लेखातच अनिता पाटील ह्यांचे अभ्यासपूर्ण विश्लेषण पूर्वग्रह दुषित नसल्याचे जाणवले. त्यांच्या निर्भीडपणाला आणि आत्मविश्वासाला सलाम. 


....ब्राम्हणांनी भीक मागून स्वतःचा उत्कर्ष केला आहे. तरीही समाज ह्या भिकाऱ्यांना भीक का घालतो हे कळत नाही. ब्राम्हणांच्या विचारांना खतपाणी घालणे बंद केले पाहिजे. ..."

विकास गोडसे यांच्या प्रमाणेच विरोधकही संयमीपणा दाखवितात. अशा विरोधकांबद्दल मला नेहमीच आदर वाटत आला आहे. या लोकांनी खरोखरच काही तरी वाचलेले असते. त्या बळावर ते युक्तिवाद करीत असतात. त्यांची मते मला पटली पाहिजेत असा काही नियम नाही. पण त्यांच्या मतांचा मी आदर करते. कारण मला माझी मते मांडण्याचा जसा अधिकार आहे, तसाच त्यांनाही तो आहे.

विकास भैय्या थँक्स. तुमच्या मनाच्या मोठेपणाला सलाम. 


अनिता पाटील, औरंगाबाद.

Saturday 19 November 2011

मराठा समाजाने सामुहिक धर्मांतर करावे



ब्राह्मणी धर्मातील जातीय विखारामुळे व्यथित होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ साली नागपुरात धर्मांतर केले. हिंदू धर्माचा त्याग करून आपल्या लक्षावधी अनुयायांसह बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला. माझ्या मते हिंदूनावाचा धर्मच अस्तित्वात नाही. हिंदू ही एक राजकीय व्याख्या आहे. दिल्ली मस्लिम राज्यकत्र्यांच्या ताब्यात गेल्यानंतर सर्व एतद्देशीयांसाठी हिंदू ही संज्ञा वापरली गेली. वस्तुत: सर्व एतद्दीयांच्या धार्मिक श्रद्धा आणि रीतीरिवाज यात खूप फरक होते, आजही आहेत. या विषयी एक लेख मी यापूर्वीच लिहिला आहे. तो याच ब्लॉगवर उपलब्ध आहे. मी हिंदू धर्माला ब्राह्मणी धर्म (या पुढे या लेखात हिंदू धर्माचा उल्लेख ब्राह्मणी धर्म असाच येईल.) म्हणते. आणि तेच अधिक योग्य आहे, असे माझे ठाम मत आहे. बाबासाहेबांनी ब्राह्मणी धर्म सोडला.  

डॉ. आंबेडकरांचे धर्मांतर : २० व्या शतकातील सर्वांत मोठी घटना
असो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मांतर ही २० व्या शतकातली या देशातील सर्वांत मोठी घटना होती. त्याचे सामाजिक आणि धार्मिक परीमाण तर झालेच, परंतु राजकीय परीणामही झाले. उत्तर प्रदेशातील आज अस्तित्वात असलेले मायावती यांचे सरकार हे  बाबासाहेबांनी उभ्या केलेल्या क्रांतीचे फलित होय.  बाबासाहेबांनी महाराष्ट्राच्या भूमीत क्रांतीचे रणशिंग फुंकले त्याची परीपक्व राजकीय फळे उत्तर प्रदेशात पाहायला मिळाली. मायावती यांच्या नेतृत्वाचा वाटा या फळात नक्कीच आहे. तथापि,  बाबासाहेबांच्या धर्मांतराचे सर्वंकश परीणाम अजून फलित व्हावयाचे आहेत. बाबासाहेबांचे धर्मांतर होऊन ५० वर्षे उलटून गेल्यानंतरही त्याचे सर्वंकश परीणाम का दिसून येत नाहीत, याची कारणे अनेक आहेत. ब्राह्मणी धर्म हा एक घुय्या (रंग बदलणारा सरडा इंग्रजीत घुय्याला शॅमिलिऑन म्हणतात.) आहे. तो वातावरणाचा परीवेश पाहून रंग बदलतो. हे एक प्रमुख कारण त्यामागे आहे. वैदिक धर्माच्या चिकित्सेत मी ब्राह्मणी धर्माच्या रंगबदलूपणाचा हिशेब मांडला आहे. तो वाचकांनी जरूर पाहावा. ब्राह्मणी धर्म आपल्या छद्मावरणासह टिकवून ठेवण्यात सर्वांत मोठा वाटा ब्राह्मणी धर्माच्या छायेखाली वावरणा जातीसमूहांचा आहे. वस्तूत: हे जातीसमूह ब्राह्मणी जातीसमूहापासून अगदी भिन्न आहेत. त्यांच्या चालीरीती, देवदेवस्की, रोटी-बेटी व्यवहार सगळे काही भिन्न आहे. उदा. जाट, खत्री हे जातीसमूह स्वत:ला हिंदू मानण्यास फार पूर्वीपासून कां कू करीत आले आहेत. महान धर्मसंस्थापक गुरुनानकांच्या नेतृत्वाखाली जाट-खत्री समाज एकवटला. उत्तरेतील इतर काही जातीसमूहांची साथ घेऊन गुरुनानकांनी नवीन धर्माचा प्रकाश जगाला दिला. 

वारकरी चळवळ 
गुरुनानकांनी उत्तरेत धर्मचळवळ सुरू केली, त्याच्या आधीपासून महाराष्ट्रात पंढरपूरच्या विठ्ठल नामक लोकदैवताला मानणारया लोकांची  मोठी लोकचळवळ सुरू होती. त्या काळातील सर्व बिगर ब्राह्मणी धार्मिक चळवळींपेक्षा ही चळवळ जास्त शिस्तबद्ध आणि संघटित होती. परंतु या चळवळीतून शीखांसारखा नवा धर्म अस्तित्वात येऊ शकला नाही. याची कारणेही अनेक आहेत. या लोकचळवळीला आद्य शंकराचार्यासारख्या धूर्त ब्राह्मणाने वेदांशी जोडले. पांडुरंगाष्टकम लिहून चळवळीचे सांस्कृतिकरण केले. त्यातून या चळवळीचे लोकपण संपले. त्याबरोबरच नवा धर्म अस्तित्वात येण्याची शक्यताही संपली. 

महानुभाव चळवळ 
महात्मा चक्रधर स्वामी प्रणित महानुभव धर्माने वेदांचे प्रामाण्य उघडपणे नाकारले. आपली स्वतंत्र अवतार व्यवस्था निर्माण केली. पूजापद्धती, संस्कार पद्धती, दीक्षापद्धती आदी सर्व ब्राह्मणी धर्मापासून वेगळे केले. ब्राह्मणी धर्मात स्त्रियांना संन्यास घेण्याची मुभा नव्हती. चक्रधरांनी ती दिली. श्रीचक्रधरांचा प्रभाव एवढा होता की, देवगिरीच्या यादवराजाची महाराणीही श्रीचक्रधरांची शिष्या बनली. श्रीचक्रधरांचे  नवे धर्ममत अशाप्रकारे महाराष्ट्राच्या राजवाड्यात, राणीवशात पोहोचले. तरीही नवा धर्म अस्तित्वात आलाच नाही. ब्राह्मणी धर्माचा एक पंथ अशी महानुभवांची ओळख निर्माण झाली. 

बिगर ब्राह्मणी चळवलींच्या खांद्यावर ब्राह्मणी धर्माचा झेंडा  
वारकरी आणि महानुभाव या दोन्ही चळवळी समतेच्या पायाभवर उभ्या आहेत. श्रीचक्रधरांनी तर गावकुसाबाहेरील वस्तीत भिक्षा मागण्याचे आदेश आपल्या भिक्षूंना दिले, तर नामदेवांनी पंढरपूरच्या वाळवंटात चोखा मेळा यांना छातीशी कवटाळले. या दोन्ही चवळवळी उत्तरेत पंजाबपर्यंत पोहोचल्या. नामदेवांच्या वचनांना शिखांच्या गुरुग्रंथसाहेबात आदराने जागा मिळाली. महानुभाव पंथाचे मठ आजही पंजाबात आहेत. एवढा प्रभाव असतानाही या चळवळी +ब्राह्मणी जोखड झुगारण्याच्या+ आपल्या मूळ उद्देशापासून भरकटल्या. वारकरी चळवळीचे तर मातेरे झाले. ज्यांना वेद वाचण्याचा, ऐकण्याचा आणि पाहण्याचा अधिकार नव्हता, अशा जाती वारकरी चळवळीच्या रूपाने आपल्या खांद्यावर वेदप्रणित ब्राह्मणी धर्माचा भार वाहताना पुढे दिसू लागल्या. 


चळवळी अपयशी का ठरल्या?
या दोन्ही चळवळी संपूर्ण क्रांती आणण्यात अपयशी का ठरल्या, याची काही ठळक कारणे आहेत. या चळवळीच्या आधी किमान ३०० ते ४०० वर्षे महाराष्ट्रात मजबूत राज्यव्यवस्था होत्या. यादवकाळात या दोन्ही चळवळी ऐनबहरात आल्या. काही तरी नवे घडेल, असे वाटत असतानाच परचक्राचा फेरा आला. अल्लाऊद्दीन खिलजीच्या रूपाने नवे संकट महाराष्ट्रावर आले. त्यामुळे या चळवळींच्या विकासाला पायबंद बसला. नवा विचार मांडण्याचे दिवस संपले. आपले जे काही अर्धे-कच्चे आहे, ते टिकविण्यातच महाराष्ट्राची सर्व शक्ती खर्ची पडली. शिवाजी महाराजांचा उदय होईपर्यंत ही स्थिती कायम होती. तोपर्यंत ब्राह्मणी धर्म सावरला होता. वारकरी आणि महानुभाव या दोन्ही चळवळी ब्राह्मणी धर्माने नेस्तनाबूत केल्या होत्या. ब्राह्मणी धर्माच्या विरुद्ध फळी निर्माण करून जन्माला आलेल्या या चळवळींच्या खांद्यावरच ब्राह्मणी धर्माची पताका आली होती. महाराजांना दीर्घायुष्य लाभते तर कदाचित खरया महाराष्ट्र धर्माचा उदय होऊही शकला असता. कारण आपला राज्याभिषेक महाराजांनी ब्राह्मणी वैदिक पद्धतीने करवून घेतल्यानंतर निश्चलपुरी या गोसावी समाजातील एका संन्याशाच्या हातून पुन्हा एकदा करवून घेतला होता. यावरून महाराजांच्या दृष्टीचा आवाका लक्षात येतो. महाराजांचा मृत्यू नैसर्गिक नव्हता. त्यांना घातपात झाला, असे मत नवीन संशोधक मांडित आहेत. महाराजांकडून ब्राह्मणी धर्मव्यवस्थेला धक्का बसू शकतो, असा संशय तत्कालीन ब्राह्मणांना आला होता का? त्यातून त्यांनी महाराजांना घातपात केला का? यावर सखोल संशोधन होण्याची गरज आहे. 

ब्राह्मणी व्यवस्था उखडून टाकण्याची संधी पुन्हा आली आहे! 
असो. अशा प्रकारे वारकरी आणि महानुभाव या दोन धर्मचळवळींच्या रूपाने नवधर्मस्थापनेची संधी महाराष्ट्राने अकारव्या-बाराव्या शतकात गमावली. या पैकी कोणतीही एक चळवळ यशस्वी झाली असती, तरी महाराष्ट्र धर्माच्या खांद्यावरील ब्राह्मणी जोखड उतरले गेले असते. पण तसे व्हायचे नव्हते. जे तेव्हा होऊ शकले नाही, ते आता एक हजार वर्षांनी २१ व्या शतकात तरी होईल का? महाराष्ट्रावरील ब्राह्मणी धर्माचे जोखड उतरेल का?... मला असे वाटते की, अकराव्या-बाराव्या शतकात हुकलेली संधी पुन्हा एकदा चालून आलेली आहे. महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशात राजकीय स्थिरता आहे. महाराष्ट्राच्या मातीत परीवर्तनाचे वारेही वाहत आहे. आता योग्य वेळ आली आहे. विषमतेचा विखार प्रसवणारी ब्राह्मणी धर्मव्यवस्था पूर्णत: उखडून टाकण्याची हीच योग्य वेळ आहे. 

धर्मांतराशिवाय दुसरा उपाय नाही   
विषमतेचा विखार निर्माण करणारी व्यवस्था उखडून फेकण्यासाठी उपाय काय आहे? उपाय एकच आहे. धर्मांतर. होय धर्मांतरच. या देशाच्या घटनेने प्रत्येक नागरिकाला हवा तो धर्म स्वीकारण्याचा अधिकार दिला आहे. माझे असे मत आहे की, महाराष्ट्राने या अधिकाराचा वापर करून धर्मांतर करायला हवे. विशेषत: संपूर्ण मराठा समाजाने धर्मांतर करायला हवे. मराठा समाज महाराष्ट्रात संख्येने जास्त आहे. मराठा समाजाने घाऊक पातळीवर धर्मांतर केल्यास महाराष्ट्रात मोठे धर्मचक्रप्रवर्तन होईल. इतर जातींनाही प्रेरणा मिळेल आणि एक हजार वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी पाहिलेले समानतेचे स्वप्न साकार होईल.

या मालिकेतील पुढच्या लेखात वाचा
 "मराठा समाजासमोरील धर्मांतराचे पर्याय!"


अनिता पाटील, औरंगाबाद. 

Monday 14 November 2011

एका ब्राह्मणवाद्याच्या पत्राला अनिता पाटील यांचे खरमरीत उत्तर



+अस्पृश्यता पाळणारी 'श्यामची आई' आदर्श कशी?+  या  लेखाचे निमित्त करून एका ब्राह्मणवाद्याने अनिता पाटील यांना पत्र लिहून बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला. या ब्राह्मणवाद्यास अनिता पाटील यांनी खरमरीत पत्र लिहिले. श्यामची आई वर काहीही न लिहिता हा ब्राह्मणवादी विषयांतर करून नुसताच वाद घालत होता. दोन वेळा उत्तरे दिल्या नंतरही त्याचे हे उद्योग सुरूच होते. शेवटी या ब्राह्मनिस्टास अनिता पाटील यांनी खडसावून त्याचे ढोंग उघड केले. अनिता पाटील यांचे  हे पत्र वाचकांसाठी देत आहे.       
...................................................................................................
anita patil said...


Mr. MW,


Alas! one more false story.


I am not writing against any cast or community. I am writing against falshood wich is dominating the truth. In this very article on which u are arguing has nothing against brahmin community. It dealt with Brahmism of a protagonist of a particular Novel. This protagonist can not be Icon of our society. U want nobody should question integrity of this protagonist i.e. +Shyamchi Aai+ Marley b,coz she is Brahmin. This is the problem. 


when anybody writing or talking about past of brahmins u people Cries Loudly, +Dont talk about past. see towards future!+ Oh what a wonder! At the same time u people want to evict Muslims from this country b,coz of there past. U people demolished +Babari Mousque+ to set the past right. U peole Created +James Lain+ on the name of history. and still u r preaching that +one should not talk about past or history. u only want not speak about Bramins Past. It is realy amazing. 


where were u, When babari was being demolished, James Lain was provided false information? It is called nothing but hypocrisy. Come out of it. U want special treatment to Brahmanic Icons. Why? Is this not the Castism? 


I didn't ask ur cast. why r u telling me that I am not Brahmin? U r only trynig to show that +See i am not Brahmin and still talking in the support of brahmins. Brahmins r being Suppressed badly!+ This is again a hypocrisy. 
Pls understand u people r now unveiled and exposed. U can't cheat anymore. No body come into ur tricks. 


At the end i would like u to speak on the subject of my article. pls don't get off the Line. 


Anita Patil, Aurangabad.

1


M W said... 
Ms. Anita Patil,
You need psychiatric help! Instead of living in the present and looking at what future holds for you, you are trying to go as far in the past as possible and try to keep breeding caste-related contempt in the CURRENT society based on some 100 yr old HISTORICAL event. 
No one has denied that certain communities had demeaning behavior towards some other communities. But this has happened all over the world in the history -- take examples of Nazis towards Jews, White skinned people towards Blacks, etc. You won't see people writing blogs about this in those countries RIGHT NOW, and that is why they are so far ahead of India! They dumped the bitter past and started moving ahead!
Because, this is exactly what Indian corrupt politicians want us to do -- DIVIDE and CONQUER -- they want us to ignore the real issues like corruption, inadequate infrastructure in the country, and instead keep fighting about caste-related issues, that too those which might have happened 100 years ago!
Is any brahmin considering you "untouchable" RIGHT NOW? If yes, you can report him/her in the Police!
What you are doing is like cursing the PRESENT general people of UK because up until about 75 years ago few hundred British ruled India!
While cursing a particular community -- in this case brahmins -- based on a FICTITIOUS character in a 100 year old story, you are also turning a blind eye towards many other good things done for under-privileged people by some REAL LIFE people from the same community. 
And that is why I call it a cheap publicity! You need to grow up and have broader vision to see where the country is headed. 
If you have decided to remain in this limited custody of breeding contempt for certain castes through such blogs, may God help you realize what you are doing!!
Peace!
13 November 2011 22:22 

..........................................................
M W said...
Also, if you think Shyamachi Aai was not the ideal fictitious woman and they should not tell her stories in school to the present children, make that appeal to the Govt of Maharashtra and get that story or book removed from the syllabus than just blindly tagging an entire community to be bad and breeding this caste-hatred in the current society. 
By the way, I am not brahmin! But I have had a variety of friends -- Hindu (brahmin as well as non-brahmins), Christians, and Muslims as well -- and all of them have always helped me in various ways, irrespective of their own casts or irrespective of my caste. 
So if you have never experienced that goodness of humanity in life, you need some new friends who will get you out of this limited thinking style.

Tuesday 8 November 2011

अनुस्तरणीकर्म : गाय कापून अंत्यसंस्कार !


प्रकरण -४   


वैदिकांच्या ब्राह्मणी ग्रंथांत जन्मापासून मृत्यूपर्यंत सोळा संस्कार लिहिले आहेत. यांतील बहुतेक संस्कारांचे वेळी गाय किंवा  बैल मारण्याची प्रथा वैदिक धर्मात होती. आर्यलोकांना शेतीचे विशेष ज्ञान नव्हते. ते पशुपालक होते. त्यामुळे मांस हेच त्यांचे मुख्य अन्न होते. जे माणसाचे मुख्य अन्न असते, तेच त्याच्या धार्मिक विधित महत्त्वाचा भाग ठरते. हे नैसर्गिक न्यायाला धरूनच आहे. त्यामुळेच वैदिक धर्मात अंत्यसंस्काराचे वेळी गाय मारण्याची प्रथा दिसून येते. सोळावा म्हणजेच शेवटचा संस्कार म्हणजेच अंत्यसंस्कार होय. यात गाय मारून ती प्रेतासोबत जाळली जात असे. प्रेतासोबत जाळल्या जाणारया गायीला वेदसाहित्यात अनुस्तरणी असे म्हणतात. व गाय मारून जाळण्याच्या विधिस अनुस्तरणीकर्म म्हणतात.  प्रेतासोबत गाय कापण्यामागे मोठी अंधश्रद्धा दिसून येते. अग्निमध्ये जे हवन केले जाते, ते आपल्या पितरांना मिळते, अशी वैदिकांची मान्यता होती. मृत्यू पावलेल्या माणसाला स्वर्गाच्या प्रवासात खायला मिळावे म्हणून गाय मारून आणि जाळून त्याच्यासोबत दिली जात असे. 
अनुस्तरणीकर्माचा विधि ऋग्वेदात, शुक्लयजुर्वेदाच्या ३५ व्या अध्यायात, तैत्तिरीय आरण्यकात असेच इतर अनेक सूत्र ग्रंथांत आहे१. गाय मारून तिच्या मांसाचा पिंड देण्यात यावा. मारलेल्या गायीची वपा म्हणजेच चरबी काढून तिने प्रेताच्या मुखास तसेच सर्व शरीरास आच्छादून टाकावे नंतर प्रेतास अग्नि द्यावा, असे या ग्रंथांतील उल्लेख सांगतात. गाय उपलब्ध होणे शक्य नसेल तर बकरीचा कल्प खुद्द ऋगवेवादातच सांगितला आहे२. कल्प म्हणजे पर्याय. ऋगवेदातील या ऋचेचा आद्य (आद्य म्हणजे सुरुवात.) असा  : 
अग्नेर्वर्भ परि गोभिव्र्ययस्व० - ऋगवेद. ७.६.२१.
ऋगवेदातील हाच मंत्र तैत्तिरीयारण्यकात (६ प्रपाठक, १ ला अनुवाक) प्रतिपादिला आहे. याशिवाय कलिवर्जप्रकरणसंबंधात +अग्निहोत्रं गवालंभम्+ असे एक वाक्य प्रसिद्ध आहे. +गवालंभम+ या शब्दाची फोड गव म्हणजेच गाय आणि आलंभम् म्हणजेच आलंभन अर्थात गाय मारून उपयोगात आणणे अशी आहे. याचाच अर्थ वैदिक धर्माच्या अगदी प्रारंभकाळापासून अनुस्तरणीकर्म प्रचलित होते. 
गाय स्मशानात नेण्याची पद्धती 
प्रेत स्मशानात नेतानाच अनुस्तरणी गाय नेली जावी. अनुस्तरणी गायीच्या गळ्यात किंवा पायात एक दोरी अडकवून ती प्रेताच्या दंडास बांधावी व ती अशा प्रकारे प्रेतासोबत न्यावी. स्मशानात ती कापावी. तिची चरबी काढून प्रेताच्या चेहèयासह सर्वांगावर पोतारावी. गायीचे अवयव मृतदेहाच्या अवयांवर जसे० पायावर पाय हृदयावर हृदय इ. ठेवावे. नंतर प्रेतास अग्नी द्यावा, असा सर्व प्रमुख ब्राह्मणी ग्रंथांचा आदेश आहे.  
मी येथे ऋग्वेद,  तैत्तिरीयारण्यक किंवा  इतर ब्राह्मणी ग्रंथांतील तरतुदींपेक्षा आश्वलायनाचार्यांनी लिहिलेल्या गृह्यसूत्रातील तरतुदींचेच विवेचन करणार आहे. ऋगवेदातील तरतुदी या तत्कालीन सर्व वर्णांसाठी होत्या. किमान त्रैवर्णिकांसाठी तर होत्याच होत्या. परंतु आश्वलायनाचार्याच्या गृह्यसूत्रातील तरतुदी या केवळ आणि केवळ ऋगवेदी ब्राह्मणांसाठीच आहेत. स्वातंत्र्यानंतर ब्राह्मणवाद्यांनी हिंदुत्ववादाचा बुरखा पांघरून गोहत्याबंदीसाठी थयथयाट चालविला आहे. मुस्लिम, ख्रिश्चन हे धर्म तसेच आदिवासी जमाती यांना टार्गेट करण्यासाठी ब्राह्मणवाद्यांचा हा खटाटोप चालू आहे. हे उपदव्याप कसे निरर्थक आहेत, हे सिद्ध करण्यासाठी ब्राह्मणांचे पूर्वजच गायी कापून खात होते, इतकेच नव्हे तर त्यांचे अंत्यसंस्कारांसारखे विधिही गायीच्या मांसाशिवाय पूर्ण होऊ शकत नव्हते, हे दाखवून देणे आवश्यक आहे. त्यासाठीच आश्वलायन गृह्यसूत्राचा आधार पुढील विवेचनासाठी मी घेतला आहे.
या पहा ग्रंथांतील अघोरी  तरतुदी 
आश्वलायनाचार्याने आपल्या गृह्यसूत्रात गाय मारण्याचा आणि जाळण्याचा विधि फार विस्ताराने लिहिला आहे. चौथ्या अध्यायात खंड १, २ आणि ३ मध्ये अनुस्तरणीकर्मविधि आला आहे.  आश्वलायनाने म्हटले आहे. यासंबंधीची सूत्रे आणि त्यांचा अर्थ पुढे देत आहे.
खंड २
सूत्र : अनुस्तरणीम् ।।४।।
अर्थ : ज्या मादी पशूने प्रेताचे आच्छादन करितात ती अनुस्तरणी करावी. (अनुस्तरणी करावी म्हणजे प्रेताबरोबर मारून जाळावी)
सूत्र : गाम् ।।५।। अजां वैकवर्णार्मं ।।६।।
अर्थ : गाय किंवा एक रंगी शेळी अनुस्तरणी करावी.
सूत्र : कृष्णामेके ।।७।।
अर्थ : काळी शेळीही अनुस्तरणी करता येऊ शकेल, असे काही ऋषींचे म्हणणे आहे.
सूत्र : सव्ये बाहौ बद्ध्वाऽनुसंकालयन्ति ।।८।।
अर्थ : पशुचा पुढला डावा पाय बांधून त्यास प्रेताचे मागे न्यावे.
सूत्र : अन्वंचोऽमात्या अघोनिवीता: प्रवृत्तशिखा ज्येष्ठप्रथमा: कनिष्ठजघन्या: ।।९।।
अर्थ : आणि त्या पशूचे मागून प्रेताच्या बांधवादिकांनी माळेसारखे जानवे करून व शेंड्या मोकळ्या सोडून ज्येष्ठ पुढे व धाकटे मागे या क्रमाने चालावे.
खंड ३
गाय मारल्यानंतर चे विधि पुढील प्रमाणे : 
सूत्र : अनुस्तरण्या वपामुत्खिद्य शिरो मुखं प्रच्छादयेदग्नेर्वर्म परि गोभिव्र्ययस्वेति ।।१९।।
अर्थ : अनुस्तरणीची म्हणजेच मारलेल्या गायीची वपा म्हणजे चरबी काढून त्या चरबीने प्रेताचे शिर मुखसुद्धा झाकावे. हे कर्म करताना +अग्ने०+ (ऋ. ७।६।२१) हा मंत्र म्हणावा (पुर्ण मंत्रासाठी पाहा संदर्भ).
सूत्र : वृक्का ऊद्धृत्य पाण्योरादध्यादति द्रव सारमेयौ श्वानाविती दक्षिणे दक्षिणं सव्ये सव्यम् ।।२०।।
अर्थ : वृक्क म्हणजे गायीच्या कुशीतील मांसाचे गोळे काढावे. प्रेताच्या उजव्या हातावर उजवा वृक्क व डाव्या हातावर डावा वृक्क ठेवावा. हा विधि करीत असताना +अति द्रव०+ (ऋ. ७।६।१५) ही ऋचा म्हणावी. (पुर्ण मंत्रासाठी पाहा संदर्भ)
सूत्र : हृदये हृदयम ।।२१।।
अर्थ : प्रेताच्या हृदयावर कापलेल्या गायीचे हृदय ठेवावे.
सूत्र : सर्वां यथांग विनिक्षिप्य चर्मणा प्रच्छाद्येममग्ने चमसं मा वि जिव्हर इति प्रणीताप्रणयनमनुमंत्रयते ।।२४।।
अर्थ : अनुस्तरणीचा म्हणजेच कापलेल्या गायीचा जो जो अवयव असेल तो तो प्रेताच्या त्या त्या अवयवावर ठेवावा. गायीचे कातडे प्रेतावर पांघरून प्रेत पूर्ण झाकून टाकावे. हा विधि करीत असताना +इममग्ने०+ (ऋ. ७।६।२१) हा मंत्र म्हणावा. (पुर्ण मंत्रासाठी पाहा संदर्भ)
या पूढील खंडांत प्रेतास अग्नी देण्याचे विधि, अस्थिंची विल्हेवाट व सुतकादि प्रथांचे पालन या विषयी लिहिण्यात आलेले आहेत. 
दयानंद सरस्वती यांच्या +वेदांकडे चला+ या हाकेचे पालन करावयाचे झाल्यास आपल्याला अंत्यसंस्कारांसाठी गायी कापाव्या लागतील. हे आजच्या ब्राह्मणवाद्यांना चालणार आहे का? दयानंद सरस्वती प्रणित आर्यसमाज वेदांतील अनुस्तरणीविधीचे पालन करून अंत्य संस्कारांत गाय कापतो का? या प्रश्नांची उत्तरे हिंदूत्चाचा बुरखा पांघरलेल्या ब्राह्मणवाद्यांनी द्यायला हवीत.

या  लेखमालेतील  इतर  लेख पुढील लिंकवर वाचा  


अनिता पाटील, औरंगाबाद. 

................................................................

संदर्भ :
 


१. लोकहितवादी : समग्र वाङ्मय. खंड दुसरा. संपादक : गोवर्धन पारीख, इंदुमती पारीख. प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ. आवृत्ती : पहिली १९९०. पान क्र. ४७. 
२. लोकहितवादी : समग्र वाङ्मय. खंड दुसरा. संपादक : गोवर्धन पारीख, इंदुमती पारीख. प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ. आवृत्ती : पहिली १९९०. पान क्र. ४७. 

या लेखात आलेले ऋगवेदातील मंत्र पुढील प्रमाणे आहेत :

१. अग्नेर्वर्म परि गोभिव्र्यस्व सं प्रोर्णुध्व पीवसा मेदसा च ।।
नेत्त्वा धृष्णुर्हरसा जर्हृषाणो दधृग्विधक्ष्यन्पर्यंखयाते ।। ७।६।२१

२. अति द्रव सारमेयौ श्वानौ चतुरक्षौ शबलौ साधुना पथा ।।
अथा पितृन्त्सुविदत्राँ उपेहि यमेन ये सधमादं मदंति ।। ७।६।१५

३. इमामग्ने चमसं मा वि जिङ्घर: प्रियो देवानामुत सोम्यानाम् ।।
एष यश्चमसो देवपानस्तस्मिन्देवा अमृता मादयंते ।। ७।६।२१  
...............................................................

मधुपर्क म्हणजे गोमांसाचे सूप!


प्रकरण -३

मधुपर्क हा वैदिक संस्कृतीचा अविभाज्य भाग होय. मधुपर्क म्हणजे आदरातिथ्य. आपले नातेवाईक, श्रेष्ठी जण, आदरणीय व्यक्ती इ. कोणीही घरी आले तरी आपण आजही आदरातिथ्य करतो. वैदिक आर्य संस्कृतीत आदरातिथ्य विधिपूर्वक करण्याची प्रथा होती. त्याचे विशिष्ट नियम आश्वलायनाचार्याने सांगितले आहेत. प्राचीन काळचा हा मधुपर्क आता मूळ रूपात दिसून येत नाही. तथापि, त्याचे अवशेष वैदिक वाङ्मयात तसेच अलिकडेपर्यंत रूढ असलेल्या चालिरितीत दिसून येते. लग्नकार्य आणि इतर विवाह प्रसंगी मधुपर्क केला जात असे. आजही मंगलाष्टकांत +मधुपर्क पूजन+ अशी एक ओळ भटजी म्हणतो. 
मधुपर्क म्हणजे मध आणि दूध यांचे मिश्रण अशी दिशाभूल करणारी माहिती ब्राह्मणवादी देत असतात. वस्तुस्थिती अशी आहे की, मांसाशिवाय मधुपर्क होतच नाही. हे मांसही गायीचेच असले पाहिजे, असा स्पष्ट आदेश आश्वलायनाने दिला आहे. अश्वलायनाच्या गृह्यसूत्रात मधुपर्कावर एक स्वतंत्र प्रकरणच आहे. गृह्यसूत्राच्या पहिल्या अध्यात, २४ व्या खंडात हा सर्व भाग येतो. या खंडातले २, ३ आणि ४ क्रमांकाची सूत्रे सांगतात : 
सूत्र : स्नातकायोपस्थिताय ।।२।।
सूत्र : राज्ञेच ।।३।।
सूत्र : आचार्यश्वशुरपितृव्यमातुलानां च ।।४।।
अर्थ : घरी आलेला स्नातक म्हणजेच विद्याध्यन करणारा विद्यार्थी, राजा, आचार्य म्हणजेच गुरू, सासरा, चुलता qकवा मामा यांना मधुपर्क पूजा द्यावी.
गाय मारल्याशिवाय मधुपर्क पूर्ण होत नाही असा आदेश देणारी आश्वलायनाची ही पाहा काही सूत्रे :
सूत्र : आचांतोदकाय गां वेदयंते ।।२३।।
अर्थ : आचमन केलेल्याला गाय निवेदन करावी.
सूत्र : हतो मे पाप्मा पाप्मा मे इत इति जपित्वोमकुरूतेति कारयिष्यन् ।।२४।।
अर्थ : प्रतिग्रहकरत्याच्या मनात गाय मारण्याची इच्छा असेल तर +हतो मे पाप्मा पाप्मा मे हत: + हा मंत्र जपावा. +ओमकुरुत+ म्हणून गाय मारण्याची आज्ञा द्यावी.
सूत्र : नामांसो मधुपर्को भवति भवति ।।२६।।
अर्थ : मांसाखेरीज मधुपर्क होत नाही 
या सूत्रातील शेवटचे २६ क्रमांकाचे सूत्र अत्यंत स्पष्ट आणि महत्त्वाचे आहे. मांसाखेरीज मधुपर्क म्हणजेच पाहुणचार नाही, असा स्पष्ट शास्त्रादेश ब्राह्मणांसाठी देण्यात आला आहे. त्या आधीच्या २५ व्या सूत्रात गाय मारण्याची इच्छा नसल्यास उत्सर्ग करण्याची आज्ञा आहे. उत्सर्ग म्हणजे गाय महाजनांच्या खर्चाने चालणारया पांजरपोळात नेऊन सोडणे. एका अर्थाने तिला जीवदान देणे. २५ वे सूत्र म्हणते की, माता रुद्राणां दुहिता वसुनामिति जपित्वोमुत्सृजतेत्युत्स्त्रक्ष्यन् ।। याचा अर्थ असा की, गायीचा उत्सर्ग करण्याची इच्छा असल्यास +माता रुद्राणाम दुहिता+ या मंत्राचा जप करून ओमउत्सृजत असे म्हणून उत्सर्ग करण्यास सांगावे. २५ व्या सूत्रावरून आपला असा समज होतो की, गायीला सोडले म्हणजे वैदिक सभ्यतेत दयाधर्म यास स्थान आहे. पण तसे होत नाही. पुढचाच श्लोक सांगतो की, +नामांसो मधुपर्को भवति भवति+ या सूत्रावरील भाष्यकार सांगतात की, गाय पांजरपोळात सोडल्यानंतर दुसरे जनावर मारून त्याच्या मांसाने मधुपर्क करावा. 
वैदिक धर्मात दयेला कोणताही थारा नाही. आज हिंदू म्हणवल्या जाणारया धर्मात जी काही भूतदया आहे, ती बौद्ध व जैनांच्या रेट्यामुळे आली आहे. शास्त्राच्या दृष्टीने सर्वाधिक मान्यताप्राप्त असलेल्या याज्ञवल्क्याच्या१  व्यहाराध्यायात पुढील श्लोक आहे :
प्राणात्यये तथा श्राद्धे प्रोक्षितं द्विजकाम्यया ।।
देवान पितृन् समभ्यच्र्य खादन्मांसं न दोषभाक् ।।
त्या काळी म्हातारी जनावरे सांभाळणे अवघड होते. त्यामुळे त्यांचा प्रोक्षणविधि करून या जनावरांची तीन प्रकारे विल्हेवाट लावावी असे हा श्लोक सांगतो. हे तीन प्रकार असे १) ही जनावरे अनुस्तरणी करिता म्हणजे माणसाच्या अंत्यविधीसाठी, अगर श्राद्धासाठी वापरावी २) राजगवी म्हणजेच राजाच्या हवाली करावी. ३) खाण्यासाठी ठार मारावी. खाण्यासाठी प्राणी मारल्यास दोष लागत नाही. मांस भक्षण मद्यपान आणि स्त्रीशी संभोग केल्याने दोष लागत नाही, असे मनुने सांगितल्याचे आपण +गोमांस भक्षक वैदिक ब्राह्मण!+ या प्रकरणात पहिलेच आहे२. याशिवाय वेदाने सांगितलेल्या कर्मासाठी प्राणी मारल्यास त्याला हत्या समजू नये, असा शास्त्रादेश असल्याचेही आपण याच प्रकरणात पाहिले आहे३ .
बौद्ध आणि जैन धर्मातील अहिंसेच्या रेट्यानंतर वैदिकांनी आपल्यात थोडेसे बदल करून हिंसा कमी करण्याचा प्रयत्न केला. तथापि, हिंसा पूर्णपणे संपविली नाही. यासंबंधी मनुस्मृती म्हटले आहे की : 
मधुपर्के च यज्ञेच पितृदैवतकर्मणि ।
अत्रैव पशवो हिंस्या नान्यत्रेत्यब्रवीन्मनु: 
अर्थ : मधुपर्क म्हणजे पाहुणचार, यज्ञ व श्राद्ध या विqधमध्येच पशु मारावेत. अन्यत्र ते मारू नयेत. 
याचाच अर्थ मधुपर्क म्हणजे मध आणि दूध यांचे सात्विक मिश्रण, असे जे सांगताना ब्राह्मण खोटे बोलत असतात. आश्वलायनाच्या गृह्यसूत्रातील हे सर्व नियम ऋग्वेदी ब्राह्मणांसाठीच आहेत. त्यामुळे ब्राह्मणांच्या लग्नसमारंभादि विधित पूर्वी गाय मारली जात होती, हे सिद्ध होते. गोमांसापासून बनविलेला मधुपर्काचा सोपा अर्थ म्हणजे गोमांसेचे सूप होय. हे ब्राह्मणांकडून श्रद्धापूर्वक प्राशन केले जात असे. मधुपर्काचे तीन भाग करून ते पिऊन घ्यावेत, असे आश्लायन सांगतो.
आश्लायनाचे यासंबंधीचे सूत्र असे :
विरोजो दोहोऽसीति प्रथमं प्राश्नीयात् । विराजो दोहमशीयेति द्वितीयम् । मयि दोह: पद्यायै विराज इति तृतियम् ।। खंड २४. सूत्र १६
अर्थ : +विराजो दोहोसि+ हा मंत्र म्हणून पहिला भाग प्यावा. +विराजो दोहमशीय+ हा मंत्र म्हणून दुसरा भाग प्यावा. +मयि दोह: पद्यायै विराज:+ हा मंत्र म्हणून मधुपर्काचा तिसरा भाग प्यावा. 
गायीच्या मांसापासून बनविलेले हे  सूप वैदिक ब्राह्मणांना अमृतासमान प्रिय होते. आश्वलायनाच्या पुढच्या सूत्रावरून हे स्पष्ट होते. 
अथाचमनीयेनान्वाचामति अमृताऽपिधानमसीति ।। खंड २४. सूत्र २०
अर्थ : नंतर +अमृततापिधानमसि+ हा मंत्र म्हणून शेवटचे आचमन करावे.
अहिंसावादी धर्माचा रेटा वाढल्यानंतर कालांतराने मधुपर्कामधून गाय बाद झाली. गायीच्या जागी बकरयाचा कल्प सांगितला गेला. म्हणजेच गायी ऐवजी बकरा कापून मधुपर्क गेला जाऊ लागला. संस्कारकौस्तुभ या ब्राह्मणी ग्रंथात +गोप्रतिनिधित्वेन छाग आलभ्यते+४  असे म्हटले आहे. याचाच अर्थ गायीचे प्रयोजन जाऊन बकरयाची योजना येथे केलेली दिसते. अहिंसावादाचा आणखी रेटा वाढल्यानंतर बकरा कापण्याची प्रथाही बंद झाली. आता ब्राह्मणांच्या लग्नात विहिणीस +भेट बकरा+ म्हणून एक रूपया दिला जातो. गायीचे प्रयोजन मात्र अजूनही प्रतिकात्मक स्वरूपात सुरूच आहे. विवाह प्रसंगी कणकेची गाय करून ती कापली जाते. 
या सर्व विवेचनावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, मूळचा वैदिक धर्म हा गायीचे मांस खाणारया रानटी लोकांचा धर्म होता. बौद्ध आणि जैन धर्मातील अहिंसेमुळे लोक या धर्मांकडे आकर्षित होऊ लागले तेव्हा वैदिकांनी आपल्या धर्मातील ही हिंसा बंद केली. म्हणजे मूळ वैदिक धर्म संपला स्वत:ला वैदिक म्हणवणारे वस्तुत: बौद्ध आणि जैन धर्माचेच पालन करीत असतात.  



या  लेखमालेतील  इतर  लेख पुढील लिंकवर वाचा  



अनिता पाटील, औरंगाबाद.
......................................................................

संदर्भ :

१. याज्ञवल्क्य  स्मृतीचे ३ भाग असून त्याचा एक भाग व्यवहाराध्याय या नावाने ओळखला जातो. 
2. न मांसभक्षणे दोषो न मद्ये न च मैथुने ।
(मनुस्मृती : अध्याय ५. श्लोक ५६.)

3. या वेदविहिता हिंसा  न सा हिंसा प्रकीरति ता ।।
अर्थ : वेदांच्या आज्ञेनुसार करण्यात आलेल्या पशु हत्येला हिंसा  समजण्यात येऊ नये.

4. लोकहितवादी : समग्र वाङ्मय. खंड दुसरा. संपादक : गोवर्धन पारीख, इंदुमती पारीख. प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ. आवृत्ती : पहिली १९९०. पान क्र. ४७. 
....................................................................

Saturday 5 November 2011

वेदांची चिकित्सा का होऊ शकली नाही?

प्रस्तावना

अतिप्राचीन काळापासून भारत देशात दोन धार्मिक परंपरा आहेत.
१. युरोप आणि आशिया यांच्या सीमावर्ती भागातून आलेल्या आर्यांची ब्राह्मणी परंपरा
२. भारतातील मूलनिवासी लोकांची मूळ भारतीय परंपरा.
या पैकी ब्राह्मणी परंपरा ही आदिमानवाच्या अवस्थेतील हिंसाचाराधिष्ठित धारा असून मूळ भारतीय परंपरा ही मानवाने आदिम अवस्था पार केल्यानंतरची दयाधर्मावर आधारित श्रेष्ठ परंपरा आहे. वैदिक धर्म, सनातन धर्म या धर्मपरंपरा ही ब्राह्मणी धर्माचे अपत्य असून, बौद्ध, जैन, आणि अलिकडील वैष्णव, शैवादी भक्ति सांप्रदाय या एतद्देशीय धार्मिक विचारांतून निर्माण झालेल्या धर्मपरंपरा होत. मूळ भारतीय परंपरांना ढोबळमानाने दयाधर्म असे म्हणता येते.  महाराष्ट्रातील एक मान्यताप्राप्त समाजसुधारक गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी यांनीही मूळ धार्मिक परंपरेला दयाधर्म असेच म्हटले आहे१.  वैदिक धर्मीय स्वत:स आर्य म्हणवतात. संपूर्ण वैदिक धर्माची बांधणी यज्ञादी कर्माभोवती करण्यात आली आहे. यावरून वैदिक आर्य लोक हे अग्निपूजक होते. ते पशुपालक होते. त्यांना शेतीचे ज्ञान नव्हते. त्यांचे मुख्य अन्न मांस हेच होते. त्यांच्यात अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा होत्या. एका अर्थाने वैदिक धर्म हा रानटी लोकांचा अर्थात आदिमानवाचा धर्म  होता, हे वैदिक वाङ्मयातील पुराव्यांवरूनच म्हणता येते. या उलट मूळ भारतीय परंपरेत मानवतेला आणि दयाधर्माला अत्यंत महत्त्व आहे.  धार्मिक कारणांसाठी पशुहिंसा  वर्ज्य  मानण्यात येते. प्राणी हक्कांसाठी अलिकडे पेटासारख्या संस्था काम करतात. हे काम मूळ दयाधर्माधिष्ठित मूळ भारतीय धर्मांनी प्राचीन काळीच सुरू केले होते. बौद्ध, जैन, भक्तिसांप्रदाय, शैव या मूळ भारतीय धर्मांत ते दिसून येते. भक्ती सांप्रदाय आणि शैवांना आज हिंदू मानले जाते. परंतु ते चूक आहे. हे मूळचे स्वतंत्र धर्म होते. श्रीकृष्ण आणि महादेव अर्थात शंकर या देवताच वेदांत नाहीत. उत्तर काळात वैदिक ब्राह्मणांनी या मूळ धर्मांत शिरकाव करून हे धर्मच हायजॅक केले. विष्णू या  नव्या देवतेला जन्म देऊन हे धर्म त्यात सामावून घेतले. इतकेच काय बौद्धालाही विष्णूचा अवतार दाखविले गेले. हे वैदिकांचे बहुजनांविरोधातील कपटकारस्थान आहे.
उपयुक्तता हाच वैदिक धर्माचा पाया
युरोपात लंगडा घोडा सांभाळला जात नाही. त्याला गोळी मारून ठार केले जाते. कारण त्याचा मालकाला काहीही उपयोग नसतो. आजकालच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांतही उपयुक्ततेचा हाच निकष आज लावला जातो. +हायर अँड फायर+ हे उपयुक्ततेचे तंत्र त्यातून विकसित झाले. उपयुक्ततेचे हे तत्त्व अमानूष आणि अत्यंत क्रूर आहे. तथापि, वैदिक धर्माचा  पायाच उपुयक्ततेच्या या तत्त्वावर घालण्यात आला आहे. वैदिक धर्मातील कर्मकांडे, नीतिनियम आणि समाजव्यवस्थापन असे सर्व काही उपयुक्ततेच्या याच तत्त्वावर बेतले आहे. उपयुक्त नसलेल्या कोणत्याही गोष्टीला वैदिक धर्मात स्थान नाही. लंगडा घोडा सांभाळायला ही संस्कृती तयार नाही. त्याच्या नशीबी या संस्कृतीने मृत्यूच लिहिला आहे. म्हणूनच वैदिकांच्या दृष्टीने गाय हा पिण्यास दूध आणि खाण्यास मांस देणारा उपयुक्त पशू ठरतो. अलिकडील काळात ब्राह्मणवादाचे फेरबीजारोपण करणारे विनायक दामोदर सावरकर हे गायीला उपयुक्त पशूपेक्षा जास्त महत्त्व देत नाहीत. सावरकर असे का लिहितात याचे उत्तर वैदिक धर्मपरंपरेत सापडते. सावरकरांनी इंग्लंडात असताना गोमांस खाल्ले होते. ते असे का वागले याचे इंगितही इथेच सापडते.
म्हातारया आई-वडिलांच्या नशीबी वनवास
उपयुक्ततेचा हा मुद्दा वैदिक सभ्येतत (सभ्यता म्हणजे समाजव्यवस्था. इंग्रजीतील सिव्हिलायझेशन या शब्दासाठी हा शब्द वापरला जातो.) अत्यंत क्रूर पद्धतीने आमलात आणते. त्यात दयामाया काहीही नाही. माणसांचे महत्त्वसुद्धा याच तत्त्वानुसार ठरते. येथे माणुसकीला शून्य किंमत आहे. याच उपयुक्ततेतून चार वर्ण आणि चार आश्रम तयार झाले. उपयुक्ततेनुसार माणसांची किंमत ठरविली गेली. हलकी कामे करणारया शूद्रांना हीन लेखण्यात येते ते त्यामुळेच. जन्म देणारया आईवडिलांनाही वैदिक धर्म याच उपयुक्ततेच्या तराजूत मोजतो. आयुष्याच्या चौथ्या टप्प्यात आलेल्या वृद्धांना वैदिक समाजात कोणतेही स्थान राहत नाही. त्यांच्यासाठी वानप्रस्थाश्रमाची व्यवस्था करण्यात आली आहे. आज भारतात वृद्धाश्रम उभे राहत आहेत. त्याकडे आपण आधुनिक चंगळवादाचे क्रूर अपत्य म्हणून पाहतो. परंतु महानतेचा डांगोरा पिटणारया वैदिक सभ्यतेने यापेक्षाही क्रूर व्यवस्था म्हातारया माणसांसाठी निर्माण केली होती.  या व्यवस्थेनुसार, जराजर्जर झालेल्या माता-पित्यांना मरण्यासाठी वनात सोडले जाई. महाभारतातील विदूर, धृतराष्ट्र, गांधारी आदींचा मृत्यू जंगलात कसा झाला याची वर्णने जिज्ञासू वाचकांनी अवश्य वाचावीत.
ब्राह्मण हे लाभाचे पद
उपयुक्ततेच्या क्रूर पायावर वैदिक सभ्यता उभी असली, तरी तत्कालिन समाजाच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारे उपुयक्त नसलेल्या ब्राह्मणांसाठी उपयुक्ततेचा हा नियम लावला जात नाही. यात आश्चर्यकारक असे मात्र काहीही नाही. ब्राह्मणांना उपयुक्ततेचा निकष लावला जात नाही, कारण या व्यवस्थेचे निर्माते स्वत: ब्राह्मणच होते. स्वत:ला समाजाच्या सर्वोच्च स्थानी स्थापून काहीही काम न करता खाता येईल, अशी व्यवस्था ब्राह्मणांनी आपल्यासाठी निर्माण करून घेतली. या व्यवस्थेत क्षत्रिय सर्व समाज आणि राज्याचे प्राणांची बाजी लावून संरक्षण करतात. वैश्य व्यापार-उदिम वाढवून संपत्ती निर्माण करतात. शूद्र सेवा देतात. ब्राह्मण काय करतात? या तिन्ही वर्णांकडून स्वत:ची सेवा करून घेतात! +ब्राह्मणो अदंडणीय:+ असे म्हणत ब्राह्मण अदंडणीय आहेत म्हणजेच त्यांना शिक्षा केली जाऊ शकत नाही, अशी घोषणा वेदांनी केली. चातुर्वर्ण्य  व्यवस्थेचा हाच खरा अर्थ आहे. काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारमधील लाभाच्या पदांवरून (लाभाच्या पदाला इंग्रजीत +ऑफीस ऑफ प्रॉफिट+ म्हणतात.) वाद निर्माण झाला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या रेट्यानंतर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह अनेक जणांना आर्थिक लाभ देणारया पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. ब्राह्मण हे वैदिक सभ्यतेतील असेच लाभाचे पद आहे. ब्राह्मणांना लाभाच्या पदावरून घालवणारे कोणतेही न्यायालय अजून या देशात निर्माण होऊ शकले नाही.
वैदिक धर्माची चिकित्सा 
होऊ नये याची धर्मातच तरतूद 
आपल्याकडे वैदिक धर्माची योग्य चिकित्सा आजपर्यंत झालेलीच नाही. वैदिक धर्माची चिकित्सा होऊ  नये, अशी व्यवस्था या धर्मातच करून ठेवण्यात आली आहे. वैदिक धर्माची बांधणी किती काळजीपूर्वक करण्यात आली, हे यावरून लक्षात येते. चिकित्सेसाठी विद्वत्तेची शिक्षणाची गरज असते. शिकणे आणि शिकविण्याची व्यवस्था ब्राह्मणांनी आपल्या हाती ठेवली होती. वैदिक सभ्यतेच्या प्रारंभ काळात क्षत्रिय व वैश्यांना शिक्षणाचा हक्क होता, असा युक्तिवाद केला जातो. परंतु तो अत्यंत फसवा आहे. या दोन वर्णांना त्यांच्या व्यवसायांना उपयुक्त असेच शिक्षण दिले जात असे. रामायण-महाभारतकाळ हा वैदिक सभ्यतेचा परमोच्च काळ होय. त्याकाळातली दोन उदाहरणे पाहू या. कौरव आणि पांडवांचे गुरू द्रोणाचार्य होत. द्रोणाचार्यांनी त्यांना वेद शिकविले का? अजिबात  नाही. त्यांना सैनिकी शिक्षण द्रोणाचार्यांनी दिले. श्रीराम आणि लक्ष्मणाचे गुरू विश्वामित्र. त्यांनीही राम-लक्ष्मणास सैनिकी शिक्षणच दिले. क्षत्रिय आणि वैश्यांनी वेदशास्त्रात पारंगत होण्याची गरज मानली जात नव्हती. वेदशास्त्रात पारंगत होणे हे ब्राह्मणाचे कर्तव्य मानले जाई. वैदिकाभिमानी आजही हेच मानतात. शूद्रांना तर वेदांचा अधिकारच नव्हता. शूद्राच्या कानावर चुकून जरी वेदांची वाक्ये पडली, तरी त्याच्या कानात शिशाचा गरम रस ओतावा, अशा अमानवी, क्रूर आणि संतापजनक तरतुदी मनुस्मृतीसारख्या ग्रंथात आहेत. अशा प्रकारे वैदिक धर्माची चिकित्साच होऊ नये, अशी व्यवस्था या सभ्यतेच्या एकूण व्यवस्थेचा एक भाग आहे. या सारया विवेचनाचा एका वाक्यातील अर्थ असा : ब्राह्मणांचे सर्वोच्च स्थान सुरक्षित राहावे यासाठी केलेले हे कारस्थान आहे!  
वेदोत्तर काळात तरी का झाली नाही चिकित्सा?
मी वर जी व्यवस्था सांगितली, ती वैदिक कालखंडातली आहे. वैदिक धर्माचा अंत झाल्यानंतरच्या काळात तसेच अलिकडील म्हणजेच आधुनिक काळात तरी वैदिक सभ्यतेची चिकित्सा का झाली नाही? या प्रश्नाचे उत्तरासाठीही आपणास पुन्हा याच व्यवस्थेकडे जावे लागेल. वैदिक धर्म नष्ट झाला. वैष्णव, शैवादि नवे धर्म अस्तित्वात आले, तरी समाज व्यवस्थेची मूळ चौकट तीच राहिली.  कारण ग्रंथरचनेचे पेटंट अजूनही ब्राह्मणांकडेच होते. त्यामुळे उत्तर कालीन १८ पुराणे, सूत्रे शास्त्रे वगैरे सर्व ग्रंथात ब्राह्मण हेच समाजव्यवस्थेच्या सर्वोच्च स्थानी कायम होते. उलट या काळात ब्राह्मणांचे स्थान अधिक बळकट झालेले दिसते. स्मृती ग्रंथांची रचना याच काळात झाली.  ज्यांना आज आपण बहुजन समाज म्हणतो. त्या जातींवर अधिकाधिक बंधने लादली गेली. परवापर्यंत म्हणजेच पेशवाईपर्यंत ही दाबादाबी सुरू होती. दलितांच्या गळ्यात गाडगे आणि पाठीला झाडू बांधण्यापर्यंत नीच पातळी पेशवाईत या सभ्यतेने गाठली. या संपूर्ण काळात बहुजन समाज अशिक्षिततेच्या गर्तेत होता. तो वेदवाङ्मयाची खरी चिकित्सा करण्यास असमर्थ होता. वेद आणि वेदांना प्रामाण्य मानणारया धर्मातील तरतुदी बहुजन समाजाच्या विरोधात होत्या. या समाजाकडून वेदवाङ्मयाची चिकित्सा होण्याचा सर्वाधिक धोका होता. म्हणून बहुजनांना वेदाधिकारच नाकारण्यात आला. ना रहेगा बास न बजेगी बांसुरी, ही आजची म्हण येथे चपखलपणे लागू होते. बहुजन समाजाला वैदिक वाङ्मयापासून दूर ठेवण्याच्या तरतुदी वैदिक वाङ्मयात करून ठेवण्यात आल्या त्यामागे असे व्यापक षडयंत्र आहे. वेदिक सभ्यतेची आणि वाङ्मयाची चिकित्सा करण्याची क्षमता या संपूर्ण कालावधीत केवळ ब्राह्मणांतच होती. तथापि, ब्राह्मणांनी वैदिक धर्माची खरी चिकित्सा केली नाही. या धर्मात ब्राह्मणांसाठी +लाभाचे पद+ होते. वेदांची खरी चिकित्सा करून ब्राह्मण स्वत:ला नुकसानीत कशाला टाकतील?
बौद्ध काळात ब्राह्मण वाङ्मय भूमिगत
वैदिक काळ आणि पुराण काळ यांच्या मध्ये बौद्ध आणि जैन काळ भारतात येऊन गेला. बौद्ध-जैन काळानंतर पुन्हा ब्राह्मणी चौकट जशीच्या तशी लागू झाली. यावरून ब्राह्मणवादी पंडित दिशाभूल करणारा युक्तिवाद करतात की, बौद्ध धर्म या देशाचा धर्म कधीच होऊ शकला नाही. हा युक्तिवाद करणारया या विद्वानांना लावण्यासाठी पाखंडी, ढोंगी, कारस्थानी या प्रकारातील सर्व उपमा आणि अलंकार थिटे पडतील. बौद्ध काळात वैदिकांची पूर्ण वाताहत झाली होती. या काळात ब्राह्मणांनी एक हुशारी केली. आपले धर्मग्रंथ भूमिगत केले. वेदार्थ गुप्त केला२. अनेक ब्राह्मणी ग्रंथ तर हजारो वर्षे भूमिगत होते. दयानंद सरस्वती यांना वेदांच्या शुद्ध संहिता युरोपातून मॅक्समूल्लरसारख्या पंडिताकडून आणाव्या लागल्या त्या याचमुळे. बौद्ध काळात वेदविद्या गुप्त होती, असा उल्लेख गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी  यांनीही केला आहे. लोकहितवादी म्हणतात : वेदविद्या गुप्त ठेवण्याची रीति, म्हणजे ज्या काळी बौद्ध मार्गातील व इतर साधू हे धडधडीत वेदांतील प्रतिपादनाची निंदा  करू लागले व तेणेकरून वेदांविषयी सर्वत्र असन्मान उत्पन्न होऊ लागला. तेव्हा वेदार्थ न जाणता केवळ तो पाठ करून कायम ठेवण्याविषयीची रीति, वैदिकधर्मानुयायींनी ठरविली असावी३.
वैदिकांनी बौद्ध आणि जैन धर्माचा एवढा धसका घेतला होता की, बौद्ध आणि जैन मंदिरात जाऊ नये असे शास्त्रादेश ब्राह्मणी ग्रंथांत लिहिण्यात आले. त्यापैकी एक शास्त्रादेश असा :
हस्तिना ताड्यमानोऽपि न गच्छेज्जैनमंदिरम ।।
या आदेशावर लोकहितवादी लिहितात की, ... त्याप्रमाणे अद्यापि जैनमंदिरात किंवा त्यांच्या विहारांत, चैत्यात जाण्याविषयी लोक धजत नाहीत४. लोकहितवादींच्या या म्हणण्यात खूप तथ्य आहे. बौद्ध धर्म भारतभूमीतून नामशेष झाल्यानंतर भारतातील बहुतेक बौद्ध आणि जैन लेण्या, चैत्य विहार ओस पडले. सांचीचा स्तूप तर मातीने झाकूनच टाकण्यात आला होता. इंग्रज आल्यानंतर या वास्तूंना प्रकाशात आणले गेले. अजिंठ्याची बौद्ध लेणी रॉबर्ट नावाच्या इंग्रज अधिकारयाने जगासमोर आणली. ती स्थानिक लोकांना माहीत होती. परंतु तिच्यात जाणे लोक पाप समजत.
बहुजनांवर इंग्रजांचे उपकार
ब्राह्मणांनी गुप्त केलेले, कटकारस्थानांनी भरलेले वेदवाङ्मय इंग्रजी राजवटीत जगासमोर आले. या दृष्टीने पाहता इंग्रजी राजवट ही या देशातील बहुजनांसाठी उपकारकच ठरली.  इंग्रज अधिकारयांनी सर्व प्रकारच्या भारतीय वाङ्मयाचा धांडोळा घेतला. ब्राह्मणांना खास तैनात करून अर्थ नीट लावून घेतले. तेव्हा त्यातील रानटी तरतुदी समोर आल्या. तसेच ब्राह्मणांच्या धूर्तपणाचा, कारस्थानांचा आणि कपटांचाही पर्दाफाश झाला. तरीही ब्राह्मणी कपट-कारस्थाने बहुजन समाज समजून घेऊ शकला नाही. कारण बहुजन समाज अजूनही अशिक्षितच होता. स्वातंत्र्योत्तर काळात बहुजन समाज शिकून बराचसा जाणता झाला आहे. ब्राह्मणी संस्कृत ग्रंथ तसेच इंग्रजांनी केलेली या ग्रंथांची समीक्षाही तो आता वाचू, समजू लागला आहे. आता ब्राह्मणी धर्माचे पितळ उघडे पडत आहे. तथापि, ब्राह्मणी कारस्थाने अजूनही पूर्णपणे जगासमोर येऊ शकलेली नाहीत. याचे कारण आहे मीडिया. भारतातील मीडिया अजूनही ब्राह्मणी वर्चस्वाखाली असल्यामुळे ब्राह्मणी वाङ्मयाची समीक्षेला प्रसिद्धी दिली जात नाही. असो मीडियाचा विषय आपण केव्हा तरी हाताळू.
वेदांकडे चला नको, वेदांपासून दूर व्हा!
इंग्रजांनी वेदवाङ्मयाचा अभ्यास सुरू केला, तेव्हा घाबरलेल्या काही ब्राह्मणांनी वैदिक धर्म परंपरा कशी श्रेष्ठ तसेच वेदांकडे परत जाण्यात समाजाचे कसे भले आहे, असे सांगून भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दयानंद सरस्वती, विवेकानंद हे लोक असा भ्रम पसरविण्यात आघाडीवर होते. दयानंद सरस्वतींनी आर्यसमाजाची स्थापना केली, तर विवेकानंदांनी रामकृष्ण मठ स्थापन केला. +वेदांकडे चला+ अशी हाक दयानंदांनी दिली होती. या उपद्व्यापातून फार काही साध्य झाले नाही. आर्यसमाजाचे महत्त्व प्रेमविवाह लावून देण्यापुरते राहिले. गेल्याच महिन्यात खुद्द न्यायालयानेच आर्यसमाजाच्या या विकृत चाळ्यांना चाप लावला आहे. रामकृष्ण मठ वैदिक पुस्तकांचे दुकान होऊन बसला आहे. त्यापलीकडे हा मठ कोणतेही विधायक कार्य करू शकला नाही. आपल्या पंथाला हिंदू धर्मात गृहीत धरले जाऊ नये, यासाठी रामकृष्ण मठाने काही वर्षांपूर्वी न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. यावरून वेदाभिमान्यांची निराशा लक्षात येते. वेदांकडे चला ही हाक बंद करून आता वेदांपासून दूर चला अशी नवी हाक देण्याची वेळ आली आहे.
आर्य समाज, ब्राह्मो समाज, प्रार्थना समाजांचे पाप
इंग्रजांनी कायदे करून सतीची चाल बंद करण्यासारख्या काही सुधारणा केल्या. त्याबरोबरच ख्रिश्चन धर्माला राजकीय पाठबळ मिळाले. बहुजन समाज ख्रिस्ती होण्याचा धोका या काळात होता. ब्राह्मणी धर्म व्यवस्थापकांनी हे बरोबर हेरले. ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज असे अनेकविध समाज स्थापन करून बहुजनांना वैदिक व्यवस्थेतच गुरफटून ठेवण्याचे नवे कारस्थान खेळले गेले. इंग्रजांना राज्य आणि व्यापारातून पैसे कमावण्यात जास्त रस होता. तो मिळवून देण्यासाठी स्थानिक हस्तक म्हणून ब्राह्मणांची त्यांना मदत झाली. न्या. महादेवशास्त्री रानडे, राजा राममाहन रॉय वगैरेंसारखे या समाजांचे प्रमुख इंग्रजांच्या प्रशासकीय व्यवस्थेचे भाग होते. त्यामुळे इंग्रजांनी अशा कथित सुधारक समाजांना काही प्रमाणात प्रतिष्ठा मिळू दिली. या काळात जे काही बहुजन शिकून विद्वान झाले. ते वैदिक चौकटीची समीक्षा करण्याऐवजी या बोगस समाजांच्या नादी लागले. बहुजन समाजातील मोठे समाजसुधारक विठ्ठल रामजी शिंदे यांचे एकच उदाहरण यासाठी पुरेसे आहे. अशा प्रकारे इंग्रजी राजवटीत वैदिक सभ्यतेची बहुजनांकडून चिकित्सा होण्याची निर्माण झालेली शक्यता धुळीस मिळाली. बहुजनांचा उद्धार होण्याचा दरवाजा किलकिला होत असताना तो अशा प्रकारे पुन्हा घट्ट बंद झाला. ब्राह्मणांनी त्या काळी निर्माण केलेल्या विविध समाजांचे हे पाप आहे. इंग्रज गेल्यानंतर हे कथित समाज रहस्यमयरित्या गायब झाले. त्यांचे अस्तित्व कायमचे संपले. कारण त्यांचा कार्यभाग साधला गेला होता.
समीक्षेच हा छोटा प्रयत्न  
असो. कथित श्रेष्ठ आणि महान वैदिक धर्माची न झालेली चिकित्सा करण्याचा प्रयत्न मी या लेखमालेत करणार आहे. तो किती यशस्वी होतो, हे वाचकांनीच ठरवायचे आहे. माझा शब्द अंतिम आहे, असा माझा दावा नाही. याच्या विरुद्ध मत कोणाला मांडायचे असल्यास जरूर मांडावे. मी त्याचे स्वागतच करीन. एकमेकांच्या मतांचा आदर करणे हाच लोकशाहीने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खरा अर्थ आहे. एका अर्थान हाच लोकशाहीचा खरा दागिना आहे. फक्त असे करताना खोट्या पुराव्यांचा आधार घेतला जाऊ नये, एवढी एक छोटीशी अपेक्षा व्यक्त करून ही लांबलेली प्रस्तावना संपविते.

या लेख मालेतील इतर लेख पुढील लिंक वर वाचा 




अनिता पाटील, औरंगाबाद. 

...................................................................................................................
संदर्भ :
१. लोकहितवादी : समग्र वाङ्मय. खंड दुसरा. संपादक : गोवर्धन पारीख, इंदुमती पारीख. प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ. आवृत्ती : पहिली १९९०. पान क्र. ४४.
२. लोकहितवादी : समग्र वाङ्मय. खंड दुसरा. संपादक : गोवर्धन पारीख, इंदुमती पारीख. प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ. आवृत्ती : पहिली १९९०. पान क्र. ५६.
३. लोकहितवादी : समग्र वाङ्मय. खंड दुसरा. संपादक : गोवर्धन पारीख, इंदुमती पारीख. प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ. आवृत्ती : पहिली १९९०. पान क्र. ५५.
४. लोकहितवादी : समग्र वाङ्मय. खंड दुसरा. संपादक : गोवर्धन पारीख, इंदुमती पारीख. प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ. आवृत्ती : पहिली १९९०. पान क्र. ५०.  
...................................................................................................................