Saturday 5 November 2011

गोमांस भक्षक वैदिक ब्राह्मण!


प्रकरण २.
...............

वैदिकांचे पशुपालन आणि यज्ञ या दोन्ही गोष्टी परस्पर पुरक होत्या. यज्ञात पशुचा बळी दिला जाई. मारलेल्या पशुची वपा म्हणजेच चरबी काढून यज्ञात आहुती म्हणून टाकली जाई. यज्ञात मारलेल्या पशुचे मांस खाण्यासाठी तर चरबी अग्नी भडकाविण्यासाठी वापरली जाई. अग्नी भडकावण्यासाठी इतर कोणत्याही ज्वलनशील पदार्थाची माहिती वैदिकांना नव्हती, हे सिद्ध करण्यासाठी वपेच्या वापराचे उदाहरण पुरेसे ठरावे. प्रारंभकाळी यज्ञाचा एकच प्रकार होता. कालांतराने त्याचे दोन प्रकार झाले.
१ श्रौत यज्ञ
२. स्मार्त यज्ञ

स्मार्त यज्ञात पशुच्या जागी प्रतिकात्मक कणकेचे पशु आले. व वपा म्हणजेच चरबीच्या जागी तुप आले. तथापि, श्रौत यज्ञ हेच यज्ञाचे मूळ रूप असून त्यात पशुबळी अनिवार्य आहे. मनुष्याचा बळी देऊन यज्ञ करण्याची परंपराही वैदिकांत होती. अशा यज्ञास नरमेध म्हणत. (नरमेधाचा उल्लेख खुद्द ऋगवेदातच असून, या विषयी आपण या लेखमालेत पुढे पाहणार आहोत.) प्रारंभी यज्ञ हा दैनंदिन जगण्याचा भाग होता. नंतर त्यात कर्मकांड शिरले. यज्ञाला उत्सवाचे स्वरूप आले. यज्ञ हा श्रीमंतीच्या प्रदर्शनाचा एक भाग ठरला. राजसत्तेची महत्ता ठरविण्यासाठीही यज्ञाचाच वापर होऊ लागला. पण हा काळ फार नंतरचा. या विषयावर श्रीकृष्णविषयक प्रकरणात मी सविस्तर लिहिणार आहे. तूर्त आपण वेदांतील यज्ञाबाबतच बोलू या. ऋगवेद काळात अग्निहोत्र अर्थात यज्ञ करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य होते, असे दिसून येते. सार्वजनिक स्वरूपात होणारया यज्ञाचे विधि ब्राह्मणांच्या हातूनच पार पाडले जात.
यज्ञात बळी दिले जाणारे पशु
यज्ञात बळी दिल्या जाणारया पशुंत गाय हा प्रमुख पशु होता. त्याचे कारण गायींची उपलब्धता हेच होते. या शिवाय बैल, घोडे, बकरया व विविध प्रकारचे पक्षीही यज्ञात मारले जात१.  बैल मारून करण्यात येणारया यज्ञास शूलगव असे म्हटले जाई. हा यज्ञ रुद्राला प्रसन्न करण्यासाठी करावा, अशी वेदाज्ञा आहे. शूलगवासाठी वापरण्यात येणारा बैल घरच्या गायीचा गोरहा असावा. तसेच हा यज्ञ आर्द्रा नक्षत्रावर करावा, अशी शास्त्राज्ञा आहे२.  ही कर्मे गृहस्थ्याने म्हणजेच सांसारिक पुरुषाने करावयाची आहेत. राजसूय यज्ञ चक्रवर्ती सम्राट राजाने करावयाचा आहे. या यज्ञात काळे कान असलेल्या म्हणजेच श्यामकर्ण घोड्याचा बळी दिला जाई. पांडवांनी राजसूय यज्ञ केल्याची कथा महाभारतात येते. या सर्व प्राण्यांची वपा म्हणजेच चरबी काढून यज्ञात आहुती म्हणून वापरली जाई. यज्ञपशु ज्या खांबाला बांधला जाई त्याला यूप असे म्हणत व जेथे पशू कापला जाई त्या जागेला सुना असे म्हणत.
ब्राह्मणांच्या गोमांसभक्षणाचे पुरावे
वेद वाङ्मयात गायीच्या हत्येची परवानगी होती. गायीच्या मांसास वेदांत गव्य असे म्हटले जाते. परंतु त्या काळी ब्राह्मण मांसभक्षण करीत होते का, हा खरा कळीचा मुद्दा आहे. क्षत्रियांना आजही मांसभक्षणाची शास्त्रोक्त परवानगी आहे; परंतु ब्राह्मणांना नाही. सांप्रतकाळातील महाराष्ट्रातील एक गणमान्य पत्रकार कुमार केतकर यांनी काही वर्षांपूर्वी सकल ब्राह्मण अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना +ब्राह्मण पूर्वी मांसभक्षण करीत होते+ असे विधान केले होते. तेव्हा अधिवेशनातील ब्राह्मणांनी केतकरांना सभास्थानावरून हाकलून लावले होते. त्यानंतर केतकरांनी हा विषय ताणला नाही. ब्राह्मण खरेच मांसभक्षण करीत होते का, याचा कोणताही पुरावा तेव्हा केतकरांनी दिला नव्हता. या सर्व पाश्र्वभूमीवर हा मुद्दा खरया अर्थाने महत्त्वाचा ठरतो. केतकरांसारख्या विद्वान ब्राह्मणांस प्राचीन काळच्या ब्राह्मणांच्या मांसभक्षणाचे पुरावे माहीत नसतील, असे म्हणवत नाही. तथापि, केतकरांनी ते देण्याचे टाळले असे दिसते. केतकरांनी पुरावे दिले नसले, तरी मी ते आता देणार आहे. होय, यज्ञात मारलेल्या पशुचा खूर, हाडे आदी अखाद्य भाग वगळून उरलेला सर्व भाग खाण्यासाठीच वापरला जात असे. क्षत्रिय-वैश्य-शुद्रादि त्रैवर्णिकांसह ब्राह्मणही मांसभक्षण करीत असत. ऋगवेदाचा भाग असलेल्या आश्वलायन सूत्रात३ ब्राह्मणांच्या मांस भक्षणाचे पुरावे जागोजागी आढळतात. आश्वलायन सूत्राचे श्रौत आणि गृह्य असे दोन भाग आहेत. गृह्य म्हणजे घरगुती, पारिवारिक. आश्वलायन गृह्य सूत्रातून ऋग्वेदी ब्राह्मणांनी करावयाची दैनंदिन व नैमित्तिक कर्मे सांगितली आहेत. यातील सर्व नियम हे ऋग्वेदी ब्राह्मणांसाठीच आहेत. त्यामुळे हे गृह्य सूत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याकाळी ऋग्वेदी ब्राह्मणांची सर्व कर्तव्य कर्मे आश्वलायन गृह्य सूत्रांनी बांधलेली होती, त्यामुळे ऋगवेदी ब्राह्मणांना अश्वलायन ब्राह्मण असेही म्हटले जाते.
आश्वलायन गृह्य सूत्राच्या २३ व्या खंडात ब्राह्मणांनी यज्ञाचे पौरोहित्य करताना पाळावयाच्या नियमांचा उल्लेख येतो. त्यातील एक सूत्र असे :
न मांसश्नीयुर्न स्त्रियमुपेयुरा क्रतोरपवर्गात ।।सूत्र : २१।।
अर्थ : यज्ञाचे पौरोहित्य करणारया ब्राह्मणाने यज्ञाचे आमंत्रण स्वीकारल्यापासून यज्ञ समाप्त होईपर्यंत मांस भक्षण करू नये. तसेच स्त्रीसोबत संभोग करू नये.
यज्ञ समाप्तीपर्यंत मांसभक्षण करू नये, असा आदेश या सूत्रात देण्यात आला आहे, याचाच अर्थ त्याकाळात ब्राह्मण मांसभक्षण करीत होते. ब्राह्मण मांस खात नसते तर, अश्वलायनाने असा आदेश दिलाच नसता. यज्ञाचे आमंत्रण स्वीकारल्यापासून यज्ञ समाप्तीपर्यंत मांस भक्षण करू नये, हा नियम फक्त पौरोहित्य करणारया ब्राह्मणांसाठी आहे. इतर ब्राह्मणांसाठी नाही. पौरोहित्य न करणारे ब्राह्मण यज्ञकाळातही मांस खाण्यास मोकळे आहेत, असा त्याचा दुसरा अर्थ होतो.
आपस्तंभ सूत्र काय म्हणते? 
आश्वलायन सूत्रातीला मांसभक्षणाचा हा  उल्लेख असला तरी गायीच्या मांसाचा स्पष्ट उल्लेख नाही. हे मांस गायीचेच असेल, असे ठामपणे म्हणता येत नाही. ते कोणत्याही प्राण्याचे असू शकते. यातून ब्राह्मण मांस खात होते, हे सिद्ध होत असले तरी ते गायीचे मांस खात होते, हे काही सिद्ध होत नाही. त्यासाठी वेदवाङ्मयाचाच भाग असलेल्या आपस्तंभ सूत्राकडे आपण वळू या. आपस्तंभ सूत्रात गायीच्या मांसाचा स्पष्ट उल्लेख येतो. हे सूत्र असे :
धेनवनडुहोर्भक्ष्यम (प्रश्न १, पटल ५ सूत्र ३०) 
अर्थ : गोमांस भक्ष्य आहे. (सोप्या मराठीत अर्थ : गायीचे मांस खाण्यासाठी योग्य समजावे.)
मनुस्मृतीतील पुरावे
ब्राह्मण हे गायीचे मांस खात होते, याचे इतके पुरावे वेदवाङ्मयात आहेत की, त्यांचे संकलन केल्यास अनेक खंड होतील. या सर्व पुराव्यांत न पडता ब्राह्मणांना परमवंद्य असलेल्या मनुस्मृतीतले उल्लेख पाहून हा विषय संपवू या. ब्राह्मण ज्याचा महर्षि असा उल्लेख करतात, त्या मनुने  + सर्व प्राणी हे खाण्यासाठीच असतात. देवाने प्राणी हे भोजन प्रित्यर्थेच तयार केले आहेत+ असा स्पष्ट निर्वाळा दिला आहे. मनु म्हणतो :
प्राणस्यान्नमिदं सर्वं प्रजापतिरकल्पयत ।
स्थावरं जंगमं चैव सर्वं प्राणस्य भोजनम् ।। 

(मनुस्मृती अध्याय : ५ श्लोक २८)
याही पुढे जाऊन मनू म्हणतो की, मांस खाल्याने, मद्य प्राशनाने तसेच मैथुन केल्याने दोष लागत नाही. मनूचा हा श्लोकार्ध असा :
न मांसभक्षणे दोषो न मद्ये न च मैथुने ।
(मनुस्मृती : अध्याय ५. श्लोक ५६.)
असाच निर्वाळा याज्ञवल्क्यही५ देतो. याज्ञवल्क्याच्या व्यवहाराध्यात म्हटले पुढील श्लोक आढळतो :
प्राणात्यये तथा श्राद्धे प्रोक्षितं द्विजकाम्यया ।।
देवान् पितृन् समभ्यच्र्य खादन्मांसं न दोषभाक् ।।

अर्थ : श्राद्धात, यज्ञात आणि खाण्यासाठी पशु मारावेत. त्याने पाप लागत नाही.
प्राणिहत्येला वैध ठरविण्यासाठी वैदिक शास्त्राने अनके श्लोकांची रचना केली आहे. त्यापैकी एका श्लोकात तर असे म्हटले आहे की, वेदांच्या आज्ञेनुसार प्राणी मारण्यात आले तर या कृत्यास हत्या समजली जाऊ नये. हा श्लोक असा :
या वेदविहिता 
हिंसा   न सा हिंसा  प्रकीत्र्तिता ।।
अर्थ : वेदांच्या आज्ञेनुसार करण्यात आलेल्या पशु हत्येला qहसा समजण्यात येऊ नये४.
लोकहितवादी दाखविली सत्य सांगण्याची हिम्मत
बौद्ध धर्माच्या रेट्यामुळे ब्राह्मणांनी स्वत:च्या वाङ्मयात गुपचूप बदल करून. जुने ग्रंथांतील उल्लेख दडवून ठेवले. जुने ग्रंथ बाहेर काढून त्यांचा खरा अर्थ जगासमोर आणण्याची 
हिम्मत ब्राह्मणांनी दाखविली नाही. दयानंद सरस्वतीसारख्या दुराभिमान्यांनी तर्कवितर्क करून नवीनच अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. वेदांत हिंसा लिहिलीच नाही, असा दावा करताना दयानंदानी वेदांचे काव्यात्म आणि सांकेतिक अर्थ लावले. त्यांचा हा उपदव्याप निंद्य आणि बहुजनांची दिशाभूल करणारा आहे. या उलट लोकहितवादी यांनी +वेदकाळी ब्राह्मण गायींसह इतर सर्व प्राण्यांचे मांस खात असत+ हे सांगण्याचे धाडस दाखविले आहे. लोकहितवादी म्हणतात : +श्रौत यागात (याग म्हणजे यज्ञ) हिंसेवाचून बोलणेच नाही. गृह्यकर्मात (गृह्यकर्म म्हणजे नवरा बायकोने मिळून करावयाचे कर्म) अश्वलायनांनी हिंसा लिहिली आहे. यावरून गाय, बैल, बकरी, पक्षी इ. प्राणी यज्ञशेषद्वाराने (यज्ञशेष म्हणजे यज्ञ केल्यानंतर उरलेले) भक्षणार्ह झाली होती व त्याविषयीचा कोणत्याही प्रकारचा निषेध किंवा शंका सूत्रकत्र्याच्या मनात आली असेल, असे म्हणवत नाही. ... आता हे सूत्र वेदास अगदी सन्निध आहे इतकेच नव्हे, तर वेदतुल्य आहे असे सर्व ब्राह्मण समजतात४.+ इतरही अनेक विद्वानांनी ब्राह्मणांच्या गोमांस भक्षणाविषयी लिहिले आहे. तथापि, मी येथे लोकहितवादी यांच्या लेखनातील पुरावा दिला आहे. कारण लोकहितवादी स्वत: ब्राह्मण होते. तसेच एक मोठे समाजसुधारक या नात्याने त्यांनी रोखठोक लिखाण केलेले आहे. या पाश्र्वभूमीवर विधानाला आपसुकच विशेष महत्त्व प्राप्त होते.


या  लेखमालेतील  इतर  लेख पुढील लिंकवर वाचा  






अनिता पाटील, औरंगाबाद.


...........................................................................................................................
Foot Notes 

लेखातील पुस्तकांचे  संदर्भ :
 १. लोकहितवादी : समग्र वाङ्मय. खंड दुसरा. संपादक : गोवर्धन पारीख, इंदुमती पारीख. प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ. आवृत्ती : पहिली १९९०. पान क्र. ४४.

२. लोकहितवादी : समग्र वाङ्मय. खंड दुसरा. संपादक : गोवर्धन पारीख, इंदुमती पारीख. प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ. आवृत्ती : पहिली १९९०. पान क्र. ४८.

३. आश्वलायनसूत्र हे शालिवाहन शकाच्या सुमारे ६०० वर्षे आधी लिहिले गेले असे मानले जाते. हे सूत्र ऋगवेदाचा भाग आहे. या सूत्राचे दोन भाग आहेत : १) श्रौतसूत्र. २) गृह्यसूत्र qकवा स्मार्त सूत्र. आश्वलायनाचार्य याने हे सूत्र लिहिले म्हणून त्याला आश्वलायन सूत्र म्हणतात. आश्वलायनाचार्य हा शौनक ऋqषचा शिष्य होता. आश्वलायन सूत्राचे त्याचे एकूण सोळा अध्याय असून सर्वांना मिळून कल्पसूत्रही म्हणतात. आश्वलायन गृह्य सूत्रात ऋग्वेदी ब्राह्मणांनी करावयाच्या दैनंदिन क्रियाकर्माचे प्रयोग ठरवून दिलेले आहेत. या सूत्रावर नारायणवृत्ती नावाचा टीकाग्रंथ प्रसिद्ध आहे. याशिवाय जयंत व देवत्रात नावाच्या कोणा अज्ञात जाणकारांनी लिहिलेली दोन भाष्ये उपलब्ध आहेत. आश्वलायन सूत्रावर कुमारिल भट्टांनी कारिका लिहिल्या आहेत. कारिका म्हणजे फुटकळ वाक्ये एकत्र करून तयार केलेले श्लोक.


४. लोकहितवादी : समग्र वाङ्मय. खंड दुसरा. संपादक : गोवर्धन पारीख, इंदुमती पारीख. प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ. आवृत्ती : पहिली १९९०. पान क्र. ५६.

५. लोकहितवादी : समग्र वाङ्मय. खंड दुसरा. संपादक : गोवर्धन पारीख, इंदुमती पारीख. प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ. आवृत्ती : पहिली १९९०. पान क्र. ४४.

...........................................................................................................................


इतर संदर्भ : 
ऐतरेय ब्राह्मण.
तैत्तरेय आरण्यक.
ऋग्वेद संहिता.
सामवेद संहिता.
मंत्रब्राह्मण.
...........................................................................................................................

7 comments:

  1. पाटील मॅडम सलाम तुम्हाला ह्यांची खरी लायकी दाखविल्या बद्दल. हे लोक कर्मकांडात बळी देऊन त्यांचे मांस भक्षण करायचे.

    ReplyDelete
  2. खात असतील पूर्वी च्या काळी गोमांस

    ब्राम्हणाच् का सगळेच खात असतील तेंव्हा गोमांस

    तुम्ही बोलताय तेंव्हा शेतीचा शोध लागला नव्हता
    मग लोकांनी पशुपालन चालु सुद्धा चालु केल नसनार

    अग्नि चा शोध लागला तेंव्हा कोणताही मानव हां प्रगत नसनार

    मग तेंव्हा जात असण्याचा काहीच संबंध नाही

    ReplyDelete
  3. Myth of Holy Cow and Beef in Hinduism
    https://www.youtube.com/watch?v=ecCPLt5rE58

    ReplyDelete
  4. मग खरे पूरोगामी कोण ? ज्यांनी हींसा अाणी मांसभक्षण सोडले ते , की हे पूरावे बघून हींसेच समर्थन करतात ते ?

    ReplyDelete
  5. धन्यवाद ताई लायकी जगासमोर आणल्याबद्दल

    ReplyDelete
  6. ताई हा ब्लॉग बंद का केला ?

    ReplyDelete
  7. ताई हा ब्लॉग बंद का केला ?

    ReplyDelete