Monday 23 July 2012

लोकसत्ता-लोकप्रभेची विनाशाची वाट


गेस्ट रायटर- समीर पाटील बोरखेडकर

लोकसत्ता आणि लोकप्रभाही ही दोन्ही पत्रे आता महाराष्ट्रातील बामनांची मुखपत्रे बनली आहेत. ‘ब्राह्मण जातींच्या हितासाठी लेखणी चालविणारे महाराष्ट्रातील एकमेव पत्र' अशा टॅगलाईनचीच काय ती उणीव राहिली आहे. दोन्ही पत्रांच्या संपादकांनी आपल्या अखत्यारीत निर्णय घेऊन ही टॅगलाईन मास्ट हेडच्या वर टाकून द्यावी, म्हणजे औपचारिकता पूर्ण होऊन जाईल.

लोकप्रभेतील बामनी जातीयवादाची मुहूर्तमेढ ह.मो. मराठे यांनी रोवली. मराठे हे थोडेच दिवस लोकप्रभेचे संपादक होते. एवढ्या काळात त्यांनी संधी साधली आणि लोकप्रभेत बामनी सेटअप उभा करून दिला. हा सेटअप आता पूर्ण रूपाने काम करू लागला आहे, असे दिसते. 

लोकसत्तेतील ब्राह्मणवाद श्री. कुमार केतकर हे संपादक असताना रुजवला गेला. सुरूवातीच्या काळात ब्राह्मणवाद पोसताना केतकरांनी बèयापैकी खबरदारी घेतली होती. खायचे वेगळे आणि दाखवायचे वेगळे, असे त्यांच्या धोरणाचे स्वरूप होते. वरकरणी ते आरएसएस आणि त्याचे पिल्लू असलेल्या भाजपाला विरोध करीत. तथापि, त्यांची खरी साथ असे ती याच लोकांना. या देशात ब्राह्मणांची सर्वंकश सत्ता आणण्याचा एककलमी कार्यक्रम आरएसएस राबवित आहे. त्यांचे अनेक मुखवटे अनेक क्षेत्रांत वागत असतान. हे मुखवटे धर्मनिरपेक्षतेची घोंगडी पांघरून बामनी जातीयवादाला खतपाणी देत असतात. पत्रकारितेतील सर्वांत मोठा घोंगडीधारी आहेत कुमार केतकर. हे महायश वरवर धर्मनिरपेक्षतेचा आव आणित असले तरी आतून ते बामनी जातीयवाद पोसत असतात. केतकर आता लोकसत्तेत नसून, अन्यत्र लाह्या भाजित आहेत. मात्र, लोकसत्तेत असताना त्यांनी बामनी जातीयवादाची छान मशागतीने पेरणी करून ठेवलेली आहे. त्याची विषारी फळे आता बटबटीतपणे जगासमोर येत आहेत.

आरएसएसची सगळी माणसे (अर्थात मुखवटे) कसे एका दोरीत काम करीत असतात. अटलबिहारी वाजपेयी हे आरएसएसचा राजकारणातील मुखवटा म्हणून काम करीत होते. वाजपेयी पंतप्रधान झाल्यानंतर पत्रकारितेतील मुखवटा असलेल्या केतकरांचा खरा उत्कर्ष झाला. वाजपेयी सरकारनेच केतकरांना पद्म पुरस्कार देऊन गौरविले. हे साटेलोटे लक्षात घेतले की संघाच्या बामनी राजकारणाचे गुपित उलगडलायला लागते.

महाराष्ट्र सरकारने अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक बांधण्याचा निर्णय घेतला तेव्हा केतकरांना आपल्या मनातील खदखद लपविता आली नाही. स्मारकाला जाहीर विरोध करणारा अत्यंत विषारी लेख त्यांनी लोकसत्तेतून लिहिला. त्यावेळी केतकरांचा विकृत बामनी चेहरा समोर आला. केतकर गेले तरी केतकरांनी दिलेला बामनी चेहरा लोकसत्तेने प्राणपणाने जपला आहे.

केवळ बामनांचा उदोउदो करणारे हे धोरण एक दिवस लोकसत्ता आणि लोकप्रभेच्या अंगलट येईल. ही पत्रे विनाशाची वाट चालत आहेत. बहुजन वाचक आता जागा झाला आहे, हे या दैनिकांच्या व्यवस्थापनाने लक्षात घ्यायला हवे.
...............................................................................................................
समीर पाटील बोरखेडकर यांच्या sarvsamaj |सर्वसमाज या ब्लॉगवरून साभार 

1 comment:

  1. Girish Kuber is much more better than Kumar Ketkar. He have good economical and financial knowledge and yes his views are not communal like earlier.
    There are many good things about loksatta editorials now.
    p.s. I am a bahujan so please dont consider me as a supporter of any cast.

    ReplyDelete