Sunday 29 July 2012

मुस्लिमविरोधी दंगली

स्वातंत्र्योत्तर काळात मुस्लिमांच्या विरोधात अनेक दंगली झाल्या. यातील प्रत्येक दंगलीचे नेतृत्व कोणी  केले आहे? फार जुना इतिहास चाळायची गरज नाही. १९९० नंतरच्या काही दंगलींकडे नजर टाकली तरी ब्राह्मणवादी लोकच  मुस्लिमांचे खरे शत्रू असल्याचे दिसून येईल. 

१९९२ : बाबरी मशीद पाडली
भारतातील ब्राह्मणांची सर्वांत मोठी संघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) आपल्या विविध संघटनांच्या मदतीने ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील बाबरी मशीद पाडली. भाजपा, विश्व हिन्दू परिषद आणि बजरंग दल या तीन प्रमुख संघटना बाबरी मशीद पाडण्यात सहभागी होत्या. या तिन्ही संघटना आरएसएस चालविते. बाबरी पाडण्यात आली तेव्हा भाजपाचे अध्यक्ष होते डॉ. मुरली मनोहर जोशी. डॉ. जोशी जातीने ब्राह्मण आहेत. बाबरी मशीद पाडल्यानंतर देशभरात दंगली झाल्या. त्यात १२०० लोक मारले गेले. मरणा-यांमध्ये मुस्लिमांची संख्या जास्त होती.

१९९२-९३ मुंबई दगंल 
डिसेंबर १९९२ आणि जानेवारी १९९३ मुंबईत मुसलमानविरोधी दंगल झाली. त्यात ५०० मुस्लिम मारले गेले. या दंगलीची सूत्रे शिवसेनेने हलविली, असा ठपका न्या. बी. एन. श्रीकृष्ण यांच्या नेतृत्वाखालील आयोगाने ठेवला आहे. शिवसेनेचे सर्वेसर्वा असलेले बाळ ठाकरे जातीने सारस्वत ब्राह्मण आहेत. न्या. श्रीकृष्ण दंगलीची चौकशी करीत होते, तेव्हा महाराष्ट्रात शिवसेना-भाजपाचे सरकार होते. मुख्यमंत्री होते मनोहर जोशी. जोशी हेसुद्धा जातीने ब्राह्मणच आहेत. जोशी यांच्या सरकारने १९९६ मध्ये न्या. श्रीकृष्ण आयोग रद्द केला. प्रसार माध्यमांनी आरडा ओरड केल्यानंतर २८ डिसेंबर १९९६ रोजी पुन्हा आयोग कायम करण्यात आला. शिवसेना नेत्यांनी दंगल भडकावली असा ठपका आयोगाने अहवालात ठेवला. हा अहवालही ब्राह्मण जोशींनी फेटाळला. माध्यमांनी पुन्हा आरडा-ओरड केली. त्यावर हा अहवाल स्वीकारला पण त्यावर कारवाई केली नाही. ५०० मुस्लिमांना मारणाèया आरोपींना अजूनही शिक्षा झालेली नाही.

मुंबई दंगलीत हात असल्याच्या आरोपाखाली शिवसेनेचे एक ब्राह्मण नेते मधुकर सरपोतदार आणि इतर २ जणांना मुंबईच्या कोर्टाने २८ जुलै २००८ रोजी १ वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. पण त्यांना लगेच जामीन मिळाला. २० फेब्रुवारी २०१० रोजी शिक्षा न भोगताच सरपोतदार यांचे निधन झाले.

२००२ गुजरात दंगल
गुजरातमध्ये मुसलमानविरोधी दंगल भडकाविण्यात आली. सुमारे ३ हजार मुसलमान क्रूरपणे जाळून मारण्यात आले. सुमारे १ हजार मुस्लिम बेपत्ता झाले. १ लाख मुस्लिमांना घरे दारे सोडून पळून जावे लागले. या दंगलीचे नेतृत्व करणारे नरेंद्र मोदी हे आरएसएसचे कार्यकर्ते आहेत. आरएसएस ही ब्राह्मणांची सर्वांत मोठी संघटना आहे. या दंगलीची चौकशी होऊ नये, म्हणून आरएसएसचे लोक अजूनही प्रयत्नशील आहेतच.


या मालेतील इतर लेख 
1. हिंदू नावाचा कोणताही धर्म अस्तित्वात नाही!
२. मुस्लिमविरोधी दंगली
३. खरे अस्पृश्य ब्राह्मणच!
 
४. अंगप्रदर्शन करणा-या सर्व नट्या ब्राह्मणच कशा? 



No comments:

Post a Comment