Monday 30 April 2012

पुण्याचे नामकरण ‘संभाजीनगर' करा

वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा.

पुणे जिल्ह्याला मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती राजे संभाजी महाराज यांचे नाव देण्यात यायला हवे. मालोजी राजे भोसले यांनी पुण्याची पायाभरणी केली. मालोजी महाराजांचे पणतु छत्रपती संभाजी महाराजांनी पुण्याच्या भूमीला आपल्या रक्ताचा अभिषेक केला. मराठ्यांच्या लढावू इतिहासाला सर्वोच्च स्थानी नेले. भोसल्यांच्या पावन स्मृतींना अभिवादन करण्यासाठी पुणे जिल्ह्याचे नाव ‘संभाजीनगर'  असे ठेवण्यात यावे. येत्या १४ मे रोजी संभाजी महाराजांची जयंती आहे. त्याचे औचित्य साधून राज्यातील लोकशाही आघाडी सरकारने हा निर्णय घ्यावा. सरकार हा निर्णय घेणार नसेल, तर  पुरोगामी विचारांच्या  संघटनांनी त्यासाठी आंदोलन करावे, असे मी या निमित्ताने सुचवू इच्छिते.


पुण्याचे संभाजीनगर असे नामांतर करणे कसे संयुक्तिक आहे, हे पाहण्यासाठी पुण्याचा धावता इतिहास पाहणे आवश्यक आहे. पुण्याला इ.स.च्या ९ व्या शतकापर्यंतचा जुना इतिहास आहे. इ.स. नवव्या शतकाच्या मध्य काळातील काही ताम्रपटांत पुन्नक या नावाचे उल्लेख असलेली छोटी वसाहत म्हणजे आजचे पुणे होय, असे इतिहासकार मानतात. ९ व्या शतकाच्या अखेरीस पुणे देवगिरीच्या यादवांनी ताब्यात घेतले. यादवांचे राज्य बुडाल्यानंतर महाराष्ट्रात मुस्लिम राज्यकत्र्यांचा अंमल सुरू झाला. या काळात पुणे वेगवेगळ्या मुस्लिम राजवटींच्या ताब्यात राहिले. या संपूर्ण काळात पुण्याचा इतिहास फार देदिप्यमान असा नव्हता. पुण्याला ऐतिहासिक झळाळी मिळवून देण्याचे काम केले ते वेरुळच्या भोसल्यांनी. आज पुण्याचे जे काही स्थान, ते केवळ आणि केवळ भोसल्यांमुळे. १५९५ मध्ये पुणे आणि सुपे ही गावे मालोजी राजे भोसल्यांना जहागिर म्हणून मिळाली. मालोजी राजांच्या ताब्यात येताच पुण्याचा उत्कर्ष सुरू झाला. हीच जहागिर वंश पुढे शहाजी राजांकडे आली. शहाजी राजांनी पुण्याचा संपूर्ण कायापालटच केला, हे सर्वज्ञात आहे.

पुणे आणि छत्रपती संभाजी राजे 

पुण्याचा आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा संबंधांबाबत येथे लिहिण्याची गरज नाही. कारण हा इतिहास जवळपास सर्वांना माहिती आहे. पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला. शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात येतो. पुण्याच्या लाल महालात शिवाजी राजांचे बालपण गेले. तसेच स्वराज्यातील अनेक महत्वाचे किल्ले पुणे जिल्ह्यातच आहेत. मराठा साम्राज्याचे द्वितीय चक्रवर्ती सम्राट आणि शिवरायांचे ज्येष्ठ चिरंजीव छत्रपती संभाजी महाराज यांचा आणि पुण्याचा संबंध लोकांना फारसा माहीत नाही. संभाजी राजांचा जन्मही पुणे जिल्ह्यातच झाला. पुण्यापासून अवघ्या २० किमी अंतरावर असलेल्या पुरंदर किल्ल्यात संभाजी महाराजांचा जन्म झाला. तो दिवस होता १४ मे १६५७. पुरंदर हा पुणे जिल्ह्यातला एक तालुकाही आहे. शिवरायांप्रमाणेच संभाजी महाराजांचे बहुतांश बालपणही पुणे परिसरातच गेले. महाराज २ वर्षांचे असतानाच त्यांच्या मातोश्री महाराणी सईबाई यांचे अकाली निधन झाले. जिजाऊ माँसाहेबांनी राजांचे संगोपन केले. शिवरायांप्रमाणेच त्यांच्या छाव्यालाही जिजाऊ माँसाहेबांकडून राजकारणाचे सर्व शिक्षण मिळाल्यामुळे संभाजी महाराज प्रतिशिवाजी म्हणून कर्तृत्व गाजवू शकले. संभाजी महाराज १७ वर्षांचे असताना शिवरायांचा राज्याभिषेक झाला आणि संभाजी महाराज युवराज बनले.

थोरल्या महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज छत्रपती झाले. मराठ्यांचे राज्य बुडविण्यासाठी दिल्लीचा सम्राट औरंगजेब ५ लक्ष फौज घेऊन महाराष्ट्रावर चाल करून आला. त्याच्या फौजेत ४ लाखांपेक्षाही जास्त हत्ती, घोडे आणि इतर जनावरे होती. छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या छोट्याशा सैन्यानिशी औरंगजेबाशी सात वर्षे कडवी झुंज दिली.  औरंगजेब महाराष्ट्रभर किल्ले जिंकित  फिरला, परंतु त्याला ते कायम स्वरूपी कधीच ताब्यात ठेवता आले नाही. शेवटी औरंगजेबाने फंदफितुरीचा मार्ग अवलंबून १ फेब्रुवारी १६८९ रोजी कोकणातील संगमेश्वर येथे संभाजी महाराजांना कैद केले. नियतीची योजना फार कठोर असते. ज्या पुणे परिसरात महाराजांचा जन्म झाला त्याच परीसरात नियतीने त्यांचा मृत्यू लिहिला होता. तसे नसते तर कोकणात पकडले असताना महाराजांना ठार मारण्यासाठी औरंगजेबाने त्यांना घाटावर आणले नसते. संभाजी महाराजांना ताब्यात घेतल्यानंतर औरंगजेबाला मराठा सैन्याकडून असलेला धोका वाढला होता. हे जाणून औरंगजेब लगोलग घाट चढून तुळापूरला आला. तुळापूर हे गाव पुण्यापासून अवघ्या ४० किमींवर आहे. पुणे जिल्ह्यातच हे गाव येते. तुळापुरात महाराजांना ठार मारण्यात आले. आणि त्यांच्या देहाचे तुकडे करून परीसरात दूरवर फेकून देण्यात आले. जवळच असलेल्या वढू बुद्रूक गावातील शूर मावळ्यांनी महाराजांच्या देहाचे तुकडे गोळा करून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. तुळापुरात महाजांना ज्या ठिकाणी मारण्यात आले, त्या ठिकाणी कमान उभारण्यात आलेली आहे. तसेच वढू बुद्रुक गावात महाजांची समाधी आहे. ही दोन्ही स्थळे संभाजी महाराजांच्या शौर्याच्या जिवंत खुणा आहेत.
तुळापुरातील ज्या जागेवर छत्रपती संभाजी महाराजांना मारण्यात
आले त्या जागेवर बांधण्यात आलेली स्मृती कमान.

छत्रपती संभाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाला ब्राह्मण इतिहासकारांनी दाबून ठेवले होते. महाराजांना बदफैली ठरविण्यात आले होते. तुळापूर, वढू बुद्रुक ही खरे तर महाराष्ट्रासाठी तीर्थस्थळे व्हायला हवी होती. कारण येथे मराठ्यांचा राजा धारातीर्थी पडला होता. मात्र, ब्राह्मणी कारस्थानाचा महिमा असा की, ही स्थळे दुर्लक्षित राहिली. अलीकडे   पुरोगामी विचारांच्या  संघटनांनी ती नव्याने प्रकाशात आणली. संभाजी राजांना पकडून देण्यामागे तसेच त्यांना हाल हाल करून मारण्यामागे ब्राह्मणांचा ब्रेन होता, हे आता इतिहासकारांनी शोधून काढले आहे. येथे प्रश्न असा निर्माण होतो की, मराठ्यांनी त्या काळीच आपला योग्य तो इतिहास का लिहिला नाही. तेव्हा मराठयांनी  इतिहास लिहून ठेवला असता, तर आता जुनी कागदपत्रे धुंडाळणयचे काम पडले नसते. याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे, छत्रपती संभाजी महाजाराजांच्या मृत्यूनंतर मराठा सैन्य नुसते लढतच राहिले. इतर कामे करण्यास त्यांना कुठे वेळ होता. पुढची संपूर्ण २१ वर्षे मराठे लढत होते. मराठ्यांनी आपले साम्राज्य औरंगजेबाच्या हाती जाऊ दिले नाही. हतबल औरंगजेबाला महाराष्ट्रातच देह ठेवावा लागला. या संपूर्ण काळात मराठ्यांना इतिहास लिहायला किंवा आपली पूज्यस्थाने जपायला वेळ नव्हता. इतिहास लिहिण्याची जबाबदारी समाजातील विद्वान वर्गाची असते. महाराष्ट्रात ही जबाबदारी ब्राह्मणांकडे होती. ब्राह्मणांनी आपली जबाबदारी नीट पार तर पाडली नाहीच, उलट छत्रपती संभाजी राजांचा चुकीचा इतिहास प्रसृत केला. मराठे लढत होते, तेव्हा ब्राह्मण खोट्या बखरी लिहिण्यात गुंतले होते. ब्राह्मणांनी महाराष्ट्रद्रोह केला. अजूनही तो सुरूच आहे.

उपसंहार

छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातला. त्यांचे बालपण पुणे जिल्ह्यात गेले. जिजाऊ माँसाहेबांनी त्यांनी राजकारणाचे बाळकडू याच जिल्ह्यात दिले. याच जिल्ह्याच्या मातीने त्यांचा मृत्यू पाहिला. महाराजांचा देह याच मातीत विलीन झाला. पुणे जिल्ह्याची माती संभाजी महाराजांनी पुण्याच्या मातीला आपल्या रक्ताने पावन केले आहे. या पाश्र्वभूमीवर पुणे जिल्ह्याला संभाजीनगर हे नाव देणे हे एक ऐतिहासिक पाऊल ठरेल. हीच लोकभावना आहे. राज्यातील लोकशाही आघाडी सरकारने लोकभावनेचा आदर करून पुणे जिल्ह्याच्या नामांतराचा ठराव लवकरात लवकर आणावा. महाराजांचे नाव दिल्याने पुणे जिल्हा खèया अर्थाने पुण्यवंत
होणार आहे. हे पुण्यकर्म सरकारने करावेच. महाराष्ट्रात संभाजी महाराजांच्या नावाने कोणतेही शहर नाही. ही उणीव भरून काढली जायला हवी.

3 comments:

  1. tai mamta kulkarni cha lekh punha prakashit kara

    ReplyDelete
  2. mamta kulkarni cha lekh punha parashit kara

    ReplyDelete
  3. औरंगाबादचं नाव बदलण्याला विरोध करायलाच हा डाव

    ReplyDelete