Wednesday 27 June 2012

'आपण सगळे ब्राह्मण' की 'आपण सगळे घाबरट'!

आपण सगळे ब्राह्मण या ग्रुपचा लोगो.
हाच लोगो ब्राह्मण महासभेनेही स्वीकारला आहे.
.......................................................................................................................................
ब्राह्मणांतर्फे अत्यंत गुप्त पद्धतीने चालविण्यात येत असलेल्या +आपण सगळे ब्राह्मण+ या फेसबुक ग्रुपवरील लोकांनी अनिता पाटील या नावाचा धसका घेतला आहे. या ग्रुपवर अनिता पाटील यांच्या विषयी कोणतीही पोस्ट टाकायची नाही, असा नियमच या लोकांनी करून ठेवला आहे. या नियमाचे उल्लंघन करणारावर अ‍ॅडमीनकडून हकालपट्टीची कारवाई केली जाते. +आपण सगळे ब्राह्मण+ या ग्रुपविषयीची माहिती +अबाऊट+ या सदराखाली देण्यात आली आहे. ग्रुपची माहिती १) ग्रुप कशासाठी? आणि २) कशासाठी नाही? अशा दोन पोटमथळ्यांत समाविष्ट करण्यात आली आहे. +कशासाठी नाही+ या पहिल्याच मुद्यात अनिता पाटील यांनी लिहिलेल्या कोणत्याही लेखावर प्रतिक्रिया देऊ नये असे सदस्यांना बजावण्यात आले आहे. 

यांना पाण्यातही अनिता पाटील दिसते का?
अनिता पाटील यांचा 'अ' सुद्धा उच्चारायचा नाही, असा फतवा काढल्यानंतरही या ग्रुपमधील सदस्य अनिता पाटील ब्लॉगवरील लेखांवर टीका टिप्पणी करणयाचे सोडायला तयार नव्हते. त्यानंतर ग्रुपच्या अ‍ॅडमीनने सक्त ताकिद देणारे दुसरे कलम या सदरात घातले. +अनेक वेळा विनंती करूनही सभासद लव्ह जिहाद, अनिता पाटील, संभाजी ब्रिगेड ... (इ. अनेक विषयांची यादी येथे आहे) वर प्रतिक्रिया टाकीतच आहेत. त्यामुळे आता या विषयावर सक्त बंदी घालण्यात आली आहे.+ अशा आशयाची सक्त सूचना या कलमात टाकण्यात आली आहे. औरंगजेबाच्या सैनिकांनी संताजी आणि धनाजी यांचा एवढा धसका घेतला होता, की त्यांच्या घोड्यांनाही पाण्यात संताजी-धनाजी दिसत असत. आपण सगळे ब्राह्मण या ग्रुपवरील ब्राह्मणांची अवस्था अगदी अशीच झाली आहे. त्यांना सकाळी संध्येनंतर आचमन करायला घेतलेल्या पाण्यातही बहुधा अनिता पाटील हा ब्लॉग दिसत असावा. अनिता पाटील असे शब्द कानी पडताच ब्राह्मणवाद्यांच्या पोटात भीतीचा गोळा उठतो. याचे कारण अगदी साधे आहे. अनिता पाटील ब्लॉगवर जे सत्य मांडण्यात आले आहे, त्याचा प्रतिवाद होऊ शकत नाही. कारण ब्लॉगवरील प्रत्येक वाक्याला ब्राह्मणी ग्रंथांतील भक्कम पुरावा जोडण्यात आला आहे. त्यामुळे त्यांची भीतीने गाळण उडाली आहे. ग्रुपवर मात्र हे लोक शूरवीरतेचा आव आणत असतात. या परिस्थितीत एवढेच सांगावेसे वाटते की, +आपण सगळे ब्राह्मण+ हे नाव या ग्रुपला अजिबात शोभत नाही. +आपण सगळे घाबरट+ असे नाव ग्रुपला द्यायला हवे. ते अधिक शोभून दिसेल. 

+आपण सगळे ब्राह्मण+ या फेसबुक ग्रुपवर अ‍ॅडमीनने टाकलेले सर्व नियम खाली जसेच्या तसे :  


मित्र हो, बऱ्याच वेळेस हे विचारले गेले कि ह्या ग्रुप कश्यासाठी सुरु केला आहे, उद्दिष्ट आहे काय? नक्की काय करणार?
ह्याचे स्पष्टीकरण अनेक वेळा दिले गेले होते पण ति माहिती विखुरलेल्या स्वरूपात होती. म्हणून एकाच ठिकाणी सलग्न अशी देण्याचा प्रयत्न करतो आहोत. सूचना, दुरुस्ती व मार्गदर्शन ह्याचे स्वागतच असेल.
सुरुवातीला एक कबुली देणे गरजेचे आहे. मराठी टाईप करताना चूक झाली कि "आपण सगळे ब्राह्मण" ऐवजी " आपण सगळे ब्राम्हण" झाले. हे टाईप करताना काही मर्यादा होत्या, नजरेतून हि गोष्ट निसटली व नंतर 200 पेक्षा ज्यास्त सभासद झाल्याने ति चूक दुरुस्त करणे अशक्य झाले. त्याबाबत असंख्य वेळेस क्षमायाचना ही करून झाले. तरी सर्व सभासदांना नम्र विनंती कि झालेल्या ह्या चूकीची परत परत ग्रुप मध्ये चर्चा करू नये.
ग्रुप कशासाठी?
१) जे आपले बांधव व्यवसाय करतात त्यांना एकमेकांची मदत होवून व्यवसाय ही वाढेल व प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष आपल्याच बांधवांचा फायदा होईल. म्हणजे आपल्याला काही गोष्टींची, सेवेची आवशक्यता असेल, तर सर्व प्रथम आपल्यातलेच ही गरज भागवू शकणारे शोधणे. त्यासाठी सभासद आपल्या व्यवसायाची माहिती, जाहिरात करू शकतात. ज्यांना एखादी सेवा, खरेदी व मार्ग दर्शन हवे असेल तर ते इथे विनंती करू शकतात. जे सभासद ह्यातले जाणकार आहेत ते मदत करतील. जी मदत विनामूल्य करणे शक्य आहे ति केली जाईल. व जी मोबदला शिवाय करता येणार नाही ते सेवा देणारे व घेणारे मग एकमेकांच्या संपर्क व संवादाने ठरवतील. नवीन जे व्यवसायात प्रयत्न करू इच्छित असतील त्यांना नव्या नव्या संधीची माहिती मिळेल.


२) दुसरी गोष्ट म्हणजे नोकरीच्या संधी व त्यांची माहिती. आपले बरेच बांधव शासकीय, निमशासकीय, सहकारी, खाजगी व बड्या उद्योग समुहात निर्णय घेण्याचे अधिकार असलेल्या जागी काम करतात. त्यांनी त्यांना माहित असेलेल्या उपलब्ध संधींची माहिती इथे देणे म्हणजे आपल्यातील सभासदांना त्याचा फायदा होईल. बेरोजगार किंवा नोकरी बदलण्यासाठी जे प्रयत्न करतात त्यांना मदत होईल. नोकरी शोधणारे ही आपली माहिती देवू शकतील.

३) संवादातून विचारांचे आदान-प्रदान होईल, कलाकार, होशी कलाकार, वेगळ्या छंद जोपासणारे, काही हटके केलेले, काही आपल्या वेगळीच कला जोपासणारे ह्यांची माहिती सर्वांना होईल, त्याना व्यासपीठ मिळेल, कौतुकही होईल व एकादी चांगली संधी हे उपलब्ध होईल.

४) आपल्या समाजातील गरजवंत आहेत त्यांना शक्य असेल तेवढी मदत करणे. बऱ्याच भागात विशेष करून ग्रामीण भागात मुलींच्या शिक्षणा विषयी अनास्था दाखवली जाते. मग आर्थिक परस्थिती नाजूक असल्याचे कारण असते, मग कसेतरी करून लग्न करून दिले म्हणजे पालकांची जबाबदारी संपली. दुसरा हाही समज असा कि शिकून काय करणार, चूल व मुल ही सांभाळणे आहे. तसेच काही मुलांच्याही बाबतीत होते. शिक्षणात विशेष प्रगती नसेल कि लागलीच शिक्षण बंद केले जाते मग मिळेल त्या कामाला लावले जाते. शिक्षण नसल्याने मिळणारे काम हे अश्या तश्याच स्वरूपाचे असते. मग सोबत हे तशीच. हळू हळू व्यसने, बेफिकीरपणा, नको त्या मार्गाला जातात. मग पुढचे सगळेच बारगळते. म्हणतात कि घरातला एक जण शिकला कि पूर्ण घर सुधारते. हेच इथे होत नाही. अश्या गरजवंत विद्यार्थी शोधणे व त्यांना योग्य ति मदत करणे.

५) आता सर्वात महत्वाचा मुद्दा हा कि आर्थिक मदत कशी उभा करायची? त्यासाठी काही जेष्ठ व सन्मानीय सदस्यांशी चर्चा चालू आहे. एकादी एनजिओ सारखी संस्था स्थापन करणे, ज्यामुळे दानशूर व्यक्तीकडून देणगी स्विकारू शकू व योग्य त्या प्रकारे वापरता येईल. त्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेत एक खाते उघडावे म्हणजे इच्छुक तिथे आपली मदत जमा करतील. जशी जशी प्रगती होत जाईल, त्याची सविस्तर माहिती प्रसारित केली जाईलच.
सध्या तरी कार्यक्षेत्र मर्यादितच ठेवणे. नंतर अनेक गोष्टी करणे आहे पण सगळ्याच गोष्टी एकच वेळेस करण्याचा विचार केला कि मग एकही काम पूर्ण समर्कतेने करणे शक्य आहोत नाही.

कश्यासाठी नाही?
१) सध्या बऱ्याच ठिकाणी आपल्या समाजाविषयी, आपल्या पूर्वजाविषयी चुकीचा प्रचार केला जातो. ज्यांना झोपेचे सोंग घेवून असे प्रकार करावयाचे आहेत ते खुशाल करोत. त्याना आपण त्यांच्या पातळीवर जावून उत्तरे देवू शकत नाही कारण आपण आपली पातळी सोडणे म्हणजे एक प्रकारे त्यांच्या प्रयत्नांना यशस्वी करण्यात हातभार लावण्या सारखे आहे, आता राहिला अनिता पाटील चा विषय, इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते कि ति हे सगळे का करत असावी? तिला आपल्याला दुखवायचे आहे व आपण दुखावले गेलो किंवा तिच्या पातळीवर जावून बोलत राहिलो तर तिला अपेक्षित अशीच प्रतिक्रिया देण्यासारखे नाही का? कुत्रा आपल्याला चावला म्हणून आपण कुत्र्याला चावतो का? म्हणून अश्या पोस्ट मग त्या A ते Z ह्यातल्या कोणत्याही ग्रेड च्या लोकांनी केलेल्या असो वा त्याला प्रतिक्रिया देणे असो ह्या पैकी कोणताच प्रकार इथे होणार नाही.

२) अनेक वेळा विनंती करून ही सभासद वारंवार लव्ह जिहाद, अनिता पाटील, मांसाहार, दारू, ब्राह्मणाच्या मुलींचा आंतरजातीय विवाह, संभाजी ब्रिगेड, आपल्याच मुली कश्या चुकतात?, खरे ब्राह्मण असला तर असे कराल, तसे कराल ह्या सगळ्याना मनाई आहे सद्या, पूर्वी नव्हती पण अतिरेक झाला ह्या सगळ्या गोष्टींचा म्हणून आता बंदी आहे. कृपया इथे लक्षात घेणे असे आहे कि नाण्याला दुसरी बाजू असते. एकांगी विचार व पोस्ट स्वीकारल्या जाणार नाहीत. ह्या वर बरेच सभासद विचारतात हे खरे नाही का? आपण आपल्या मुलीना सावध करू नये का? मला वाटते आजकाल इतरही मार्गाने त्यांना त्याची माहिती असते व त्याबाबत आपण काही सार्वजनिक रित्या बोलणे म्हणजे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळा ढवळ करणे आहे ज्याचा आपल्याला काही एक अधिकार नाही.

३) ग्रुपवर निखळ विनोद, कविता, सुविचार, शायरी व छोटे छोटे संदेश जे बहुतेक मोबाईल वरून पोस्ट केले जातात. त्याना मनाई नाही पण त्याचेच गर्दी ज्यास्त होते व मग महत्वाच्या पोस्ट पडद्यामागे जातात किवा मागे पडतात. ह्याबाबत अडमीन वेळोवेळी व योग्य ती भूमिका घेतीलच, त्याबाबत चर्चा किवा वाद होणे नाही, त्यात अडमीन ह्यांचा निर्णय अंतिम असेल.


४) कोणतेही पोस्ट, लेखन, उतारे व छायाचित्रे ग्रुपवर टाकताना एक लक्षात घेणे कि इथे सर्व वयाची, पुरुष व महिला सभासद आहेत. त्यांच्या भावना दुखावल्या जावू नयेत वा वेगळा अर्थ अभिप्रेत होईल अश्या पोस्ट स्वीकारल्या जाणार नाहीत. कोणी पोस्ट केल्यातर लागलीच काढून टाकण्यात येतील. त्याबाबतही अड्मीन ह्यांचा निर्णय हा अंतिम राहिला.


अनिता पाटील

No comments:

Post a Comment