Thursday 5 September 2013

उदाहरणार्थ फमु, सोनवणी इत्यादी वगैरे !


---------------------------------------------------
                             प्रा. रवींद्र तहकिक , मुख्य संपादक 
                                                         ( अ.पा. वि . मं .) 
---------------------------------------------------------------------
सासवड येथे होऊ घातलेले आखिल मराठी साहित्य संमेलन 
आणि त्या साठी निवडणुकीला उभे असलेले उमेदवार ! विशेषतः 
फ मु शिंदे आणि संजय सोनवणी ; चित्र असे आहे की ,जणू हेच दोन उमेदवार मैदानात आहेत . प्रभा गणोरकर आणि   अरुण गोडबोले 
कुणाच्या खिज गिनतीतच नाहीत . एक चित्र असेही रंगवले जात आहे की फ मु कितीच्या फरकाने जिंकणार ? म्हणजे सोनवणी नक्की पडणार ! 
निवडणुका म्हटलं किसाहित्य  आश्या अफवा -वावड्या - उठणारच ,परंतु सोनवणी तेवढ्याने विचलित झाले ; त्यांना कुणीसं म्हटलं कि ते आजून लहान आहेत ; आता नाहीतर पुन्हा कधी अध्यक्ष होऊ शकतात वगैरे ! तर गडी जाम भडकलाच की ! साहित्य संमेलनाचा अध्यक्ष कुणी म्हातार बुआच आसावा असा काही नियम आहे का ? वगैरे ! असेल तर दाखवा मला वगैरे ! असं अद्वा -तद्वा बोलले म्हणतात ( म्हणजे असें नायगावकर परवा तेंडूलकराना अरुणा ढेरेंच्या घरी म्हणाल्याचं दवणे गोडबोलेंना सांगत होते म्हणे ) असो सोनवणी एवढ्यावरच थांबले नाहीत म्हणे ! तर त्यांनी थेट ज्ञानेश्वरांचीच साक्ष काढली ; म्हणाले वयाचा विचार केला असता तर ज्ञानेश्वरांना सुध्धा लोकांनी संत पद द्यायला वेटिंग वर ठेवलं असतं ! 
                 सोनवणी लेखक कमी विचारवंत जादा आहेत ; त्यात पुन्हा 
राजकारणाच्या खोप्यातही त्यांची मुशाफिरी सुरु असते ; धंदा पाणीही बघतात ; त्यामुळे त्यांना असे काही बाही सुचणे साहजिक आहे ,परंतू 
फ मु च्या बरोबरीत बसन्या साठी ज्ञानेश्वराशी तुलना करण्याचा सोनवनि चा हटयोग बरा नाही वाटला इतकेच ! 
   आर्थात फ मु अध्यक्ष होण्यास किती लायक आहेत हा वेगळा मुद्दा आहे . म्हणजे अध्यक्ष होऊन ते काय करणार ? वगैरे ! तर इतर तरी काय करतात ? किंवा आजवर कुणी काय दिवे लावले ? म्हणून फ मु कडून 
आमुक -ढमुक टेंभे पलिते उजळण्याची अपेक्षा करायची ? आणि सोनवणी म्हणतात तसे समेलन एक उत्सव झालाय ; तर ; समजा,  सोनवणी निवडून आले तर ते या उत्सवाचे कोणत्या जलश्यात रुपांतर करणार ?
   आणि त्यांनी आसा काही जलसा करू घातलाच तर लोक तो चालू देतील का ? हा खरा प्रश्न आहे . बाकी फ मु सोनवणी आम्हास एक समान आहेत ; ते बहुजनातील आहेत आणि आपल्या लेखन विचारातून बहुजन प्रबोधन करत आलेले आहेत ; चळवळीला बळ देत आलेले आहेत म्हणून हे दोघेही आम्हास योग्य उमेदवार वाटतात ; दोघानाही उदाहरणार्थ शुभेच्छा इत्यादी वगैरे !

No comments:

Post a Comment