Wednesday 3 October 2012

टिळकांच्या आवाजाचे 'भाग भांडवल'!

पोथ्या पुराणे पुरेनात आता इतिहासाची तोतयेगिरी !!

- प्रा.रवींद्र तहकिक
संपादक, अनिता पाटील विचार मंच

जवळपास पंधरवडा उलटला असेल.  महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धामधूम सुरु होण्यास थोडा अवकाश होता अशा वातावरणात अचानक एके दिवशी एका दूरदर्शन चॅनलवर '' ऐका बाळ गंगाधर टिळकांचा अस्सल आवाज'' अशी जाहिरात सुरु झाली. आम्हीहि उस्तुकतेपोटी संबधित चॅनलने प्रसारित केलेला तो भाग पहिला. त्यात टिळकांचा म्हणून ऐकविण्यात आलेला तो आवाज , त्यातील टिळकांचे वक्तव्य आणि २२ सप्टेंबर १९१५ रोजी झालेल्या संगीत मैफिलीचा संदर्भ हे सर्वच संशयास्पद होते. दुसरया दिवशी काही वर्तमानपत्रातूनही या संबंधात बातम्या छापून आल्या. मायबोली नावाच्या एका वेबसाईटवरही यासंबंधी माहिती आणि पुरावे सादर करण्यात आले (या लेखाची लिन्क अशी आहे : http://www.maayboli.com/node/38013) हे सर्व पहिल्या वाचल्यानंतर आमच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले. 

१) टिळकांचे म्हणून जे ७२ सेकंदांचे वक्तव्य ऐकविण्यात आले तो आवाज टिळकांचाच आहे याला पुरावा  काय?

२) संबधित वक्तव्य एकल्या-वाचल्यानंतर हे स्पष्ट होते कि या वक्तव्याला कोणताही राजकीय किंवा सामाजिक संदर्भ नाही .कुण्या एका गाण्याच्या मैफलीत श्रोते गडबड करतात आणि तेथील कुणी एक व्यक्ती या लोकांना शांत राहण्यासाठी समज देतो हि घटना अतिशय सामन्यातील सामान्य असताना काहीतरी मोठा ऐतिहासिक ठेवा हाती लागल्या प्रमाणे या किरकोळ ध्वनिफितीचा एवढा गवगवा कशासाठी ? 

३) २२ सप्टेंबर १९१५ रोजी गायकवाड वाड्यात हा आवाज टेप झाला, असा दावा ब्राह्मण करीत आहेत. ब्राह्मण यासाठी म्हणायचे की, हा दावा करणारे आणि त्याला प्रसिद्धी देऊन डमके वाजविणारे सगळे ब्राह्मणच आहेत. हा आवाज १९१५ खरोखरच असेल, तर त्याला ९७ वर्षे झाली आहेत, असे म्हणावे लागते. सोपा प्रश्न असा आहे की, या संपूर्ण ९७ वर्षांच्या काळात एकदाही कधी टिळकांच्या कथित आवाजाबाबत कोणीही काहीच बोलले नाही. मग आता अचानक हा आवाज टिळकांचा आहे, याचा साक्षात्कार कसा झाला? हा आवाज टिळकांचाच आहे, यावर लोकांनी विश्वास तरी कसा ठेवायचा?

४) २२ सप्टेंबर १९१५ रोजी गायकवाड वाड्यात भास्करबुवा बखले यांचे गायन झाले होते. त्यावेळी टिळकांचा हा आवाज कराचीहून आलेल्या एका माणसाने टेप केला असा दावा संबंधित लोक करीत आहेत. कराचीसारख्या इतक्या दूरवरून केवळ टिळकांचा आवाज टेप करण्यासाठी कोणी येईल हे म्हणणेच मुर्खपणाचे नाही का? बरे संबंधित टेपवर काहीही उल्लेख नाही. तरीही हा आवाज टिळकांचाच आहे, असे हे लोक म्हणतात. याला काय म्हणावे? 

५) राजद्रोहाची शिक्षा भोगून टिळक १७ जून १९१४ गायकवाड वाड्यात आले. शिक्षा झाली तेव्हा टिळक ५२ वर्षांचे होते. मंडालेला ते ६ वर्षे राहिले. मंडालेहून परत आल्यानंतर एक वर्षाने गायकवाड वाड्यात हा कार्यक्रम झाला, असे हे लोक म्हणताहेत. म्हणजेच तेव्हा त्यांचे वय ५९ ते ६० वर्षांचे असणार. मंडालेमध्ये टिळकांची तब्येत ढासळली होती. त्यांची पत्नी वारली होती. ते आजारी होते. इंग्रज सरकारने अनके अटी घालून टिळकांची मुदतीआधी सुटका केलेली होती. त्यामुळे सार्वजनिक जीवनात जवळपास नव्हतेच. खरे म्हणजे त्यांच्यात तेवढे त्राणही नव्हते. मग त्यांनी हा कार्यक्रम कसा ठरविला?

६) सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, ही ध्वनी फित २२ सप्टेंबर १९९५ चीच आहे, हे ठरवायचे कशाच्या आधारे. कशालाच काही आधार नसताना, हा टिळकांचा आवाज आहे, असे हे लोक खोटेच सांगत आहेत. हा आवाज टिळकांचा नसून एका तोतयाचा आहे. टिळकांच्या नावे फसवणूक करणा-यांवर खरे तर कारवाई करायला हवी, पण आपला मीडिया त्यांचा उदो उदो करीत आहे. 

एक डाव भटाचा 
मुळात टिळकांच्या तथाकथित आवाजाच्या ध्वनिफितीचे हे कारस्थान मुकेश नारंग ( ज्याने हि ध्वनिफीत मुद्रित केली असा दावा करण्यात आला आहे त्या तत्कालीन काराचीस्थित सेठ लाखिमचंद इसरदास नारंगचा नातू ) माधव गोरे ( पुण्यातील एक संगणकीय ध्वनिमुद्रण क्षेत्रातील सोफ्टवेअर तज्ञ ) मंदार वैद्य ( दुर्मिळ ध्वनिमुद्रिकांचा विक्रेता/ व्हेंडर ) , शैला दातार ( भास्कर बुआ बखालेची नातसून ) या सर्वांनी मिळून केले आहे. 

उंदराला मांजर साक्ष 
या सर्वांनी आपापली भूमिका योग्य प्रकारे बजावत संबंधित बनावट ध्वनिमुद्रिका खरी असल्याचा आभास निर्माण केला आहे . यातील प्रत्येकाने 'उंदराला मांजर साक्ष' या न्यायाने कराचीचा व्यापारी नारंग ; त्याची श्रीमंती ; त्याचे संगीतप्रेम ; २२ सप्टेंबरची मैफिल ; टिळकांची हजेरी ; बाखालेबुआंचे गायन आणि टिळकांनी श्रोत्यांना दिलेली तंबी या सर्व गोष्टींचा बादरायण संबंध जोडत ध्वनिफितीचा खरेपणा पटविण्याचा प्रयत्न केला आहे.  ही  ध्वनिफित म्हणजे चार भटांच्या चांडाळ चोकाडीने गोपाळ विनायक भोंडे नावाच्या एका नकलाकार तोतयाच्या टिळकाच्या आवाजातील साधर्म्याचा फायदा घेत केलेली सायबर गुन्हेगारी आहे. अर्थात हा गुन्हा फक्त पायरसी किंवा सायबर गुन्हेगारी पुरताच मर्यादित नसून खोटे एतेहासिक दस्तऐवज तयार करणे, त्याला ते खरे असल्याचे भासवून प्रसिध्धी देणे आणि त्या पासून आर्थिक किंवा तत्सम लाभ मिळवणे अशी त्याची व्याप्ती आहे.  हा गुन्हा दखलपात्र आहे. 

हे सर्व कशा साठी ?
शेवटी या मंडळीनी हा सर्व उपद्व्याप का आणि कशासाठी केला, हा प्रश्न उरतोच! त्याचे सरळ उत्तर असे कि अलीकडे पुण्यात आणि अगदी देश-विदेशातही सर्वाना असे वाटू लागले आहे की,  पुण्यातील गणेशोत्सवाची सुरुवात श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांनी केली !!! नव्या पिढीतील लहान मुलांना तर गणेशोत्सवाचे उद्गाते टिळक होते हे सांगूनही आणि पुस्तकात वाचूनही खरे वाटेनासे झाले आहे. पूर्वी किमान पुण्यात का होयीना गणेश मंडळे टिळकांचे निदान नाव तरी घेत. आता कलमाडी हेच पुण्याचे टिळक असल्या सारखे वावरतात ( हा कलमाडी देखील पुण्यातल्या भटानीच मोठा केला ) हे असे चित्र पाहून पुण्यातल्या भटांची तंतरली आणि मग काहीतरी धमाकेदार करून टिळकांचे नाव आणि त्यांचा गणेशोत्सवाशी असलेला संबंध पुन्हा अधोरेखित करण्याच्या नादात या मंडळीनी हि आवाजाची तोतयेगिरी केली .

No comments:

Post a Comment