Sunday 25 March 2012

या पहा पु ल देशपांडेच्या अश्लील कोट्या

   
पु ल देशपांडेला लोक फारच सभ्य व सुसंकृत विनोद करणारा
लेखक मानतात परंतु हा मनुष्य स्त्रीयांच्या संदर्भात अत्यंत
हीन मनोव्रत्ती ने लेखन करीत होता हें सोदाहरण स्पष्ट
करता येयील

बाकी काही घालूच नये...?

१) "ती फुलराणी"च्या एका बाहेरगावच्या प्रयोगाच्या वेळी
भक्ती बर्वेने तिथल्या सराफा बाजारातून एक सुन्दर
नेकलेस आणला. त्याचे कौतुक करताना ती सहज
बोलून गेली " हा नेकलेस इतका सुंदर आहे की हा गळ्यात
घातलाकी बाकी काही घालूच नये असे वाटते .
यावर तिथे असलेल्या पु ल ला चोम्बडे पनाची खाज न
येयील तर नवल ? तो लगेच म्हणाला " अरे वा खरेच की काय ?"
या वर तेथील सगळे भट-नटमोगरे खिदाळून हसले. बिचाऱ्या
भक्ती बर्वेला मात्र जमीन पोटात घेयील तर बरे असे वाटले.
या प्रसंगाला " पु ल चा हजरजवाबी पणा " म्हणून गोंजारले जाते
परंतु ही एका सभ्य स्त्री ची हीन आणि विकृत कुचेष्टा आहे असे
आमचे मत आहे .

जयश्रीबाईंची पाश्वर्भूमी 

२ ) मराठीतील जेष्ठ अभिनेत्री जयश्री गडकर यांच्या संदर्भातील एक किस्सा
तर आणखीनच हीन मनोवृत्तीची पातळी गाठणारा आहे.
पुण्यातील एका समारंभात जयश्री गडकर यांचा सत्कार ठेवण्यात आला
होता आणि त्याला प्रमुख वक्ते म्हणून पु ल ना बोलावले होते
निवेदक पु ल ना भाषणाला बोलवण्या पूर्वी सहज पणे बोलून गेला की
" आता या नंतर भाई ( म्हणजे पु ल ) जयश्रीबाईंची पाश्वर्भूमी आपल्याला
उलगडून दाखवतील " यावर भाषणाला उभा राहिलेल्या पु ल ने अत्यंत निर्ल्लज्ज पणे
" जयश्रीबाईंची पाश्वर्भूमी मी देखील आपल्या प्रमाणेच दुरूनच
पाहिलेली आहे . ती चांगली आहे या पेक्षा त्या बद्दल अधिक
उलगडा करण्यास मी असमर्थ आहे " असे विधान केले.
शाब्दिक कोट्या आणि आपली हजरजवाबी प्रतिमा
टिकवण्य साठी हा "पन्नालाल "कोणत्या थराला
जात होता हेच यातून स्पष्ट होते.

मुका घेऊ का? 

३) एकदा एक नवोदित लेखिका एका कार्यक्रमात पु ल
ला भेटली आणि आपल्या मुलाला समोर करत म्हणाली
"भाई हा माझा मुका" ( तिच्या मुलाचे नाव मुकुल होते आणि
ती लाडाने त्याला "मुका" म्हणायची )
यावर हा भाई निर्ल्लज्ज पणे तोंड वेंगाडत (ही त्याची स्टाईलच होती )
म्हणाला " अरे वा गोड आहे ! मी घेतला तर चालेल ना ? "
नातीच्या वयाच्या मुलीशी या "पन्नालाल " ची ही भाषा !

वडारी समाजाच्या बायकांचा अपमान 

४) या पन्नालाल ने अगदी सीता, द्रोपदी आणि कृष्ण पत्नीनाही
सोडले नाही . कर्नाटकातील हुबळी येथे तेथील मराठी भाषिकांनी
मोठ्या हौसेने पन्नालाल (पु ल ) ला बोलावले होते. हा तेथे
कार्यक्रमाच्या आदल्या दिवशीच पोहचला. बरे पोटाला तडस
लगे पर्यंत श्रीखंड-पुऱ्या चापून झाल्यावर गुमान पालथे किंवा
उताणे पडून राहावे की नाही? पण च्छ्या ! पन्नालाल निघाला
उकिरडे फुंकायला ! बरे आला तो आला किमान जिथे खाल्ले
तिथे ओकू तरी नये ! परंतु ही सभ्यता पाळेल तो पन्नालाल
कसला दुसऱ्या दिवशी भाषणात " मला हुबळीतील वडारी
समाजाच्या बायकांचे खूप अप्रूप वाटले, त्या चोळ्या घालत
नाहीत...मी जरा जवळ जाऊन चौकशी केली तेंव्हा त्यांनी
निसंकोच पणे जि कहाणी सांगितली ( आणि याने निलाजरे पणाने
ती ऐकली) ती मनोरंजकच नाही तर आदर्श घेण्या सारखी आहे.
रामायण सीतेच्या चोळीच्या हट्टा मुळे घडले म्हणून आम्ही
चोळीच घालीत नाही असे मला त्या स्त्रीयांनी सांगितले.
खरे म्हणजे हा आदर्श तमाम स्त्री वर्गाने घ्यायला हरकत
नसावी म्हणजे रामायण तर घडणार नाहीच महाभारतही
पेटणार नाही ...दुशासन काय ओढणार ? कपाळ !
मला सांगा या किस्स्यात तुम्हाला पु ल चा नर्म विनोद
दिसतो की पान्नालालच्या दुगाण्या ?

मातृत्वाचा  अपमान करणारा पु. ल. 

5 ) पूर्व रंग या प्रवास वर्णनात "जपानी खानावळ नावाचे
एक प्रकरण आहे यात पन्नालाल जेव्हा एका खानावळीत
जातो तेंव्हा तेथील अगत्य पाहून भारावून (की हुरळून ?)
जातो. त्याचे वर्णन कसे केले आहे पहा " आत जाताच
तेथील वातावरण पाहून आपण स्वर्गातील एखाद्या
दालनात आल्या सारखे वाटले . तेथील गाद्या गिरद्या पाहून
थोडे हात पाय ताणून बसावे म्हटले तर तितक्यात चार पाच
ललनांनी माझा ताबा घेतला आणि माझे खांदे , हात पाय
चेपू लागल्या .एकीने माझी पाठ रगडायला घेतली ,आणि एकीने
तर चक्क टाळू माखायला सुरुवात केली. आता त्यांनी मातृत्वाचा
पुढचा टप्पा गाठला तर कसे ? म्हणून मी जरा बावरलोच.
+कृष्णाच्या अंतःपुरात कृष्ण सख्यांनी सुदाम्याचे काय हाल
केले असतील याचा प्रत्यक्ष अनुभव मला तेथे आला+
या प्रसंगात पन्नालाल ने जपानी आतिथ्य , आणि कृष्ण सख्या
या दोन्ही वरही दुगाण्या झाडल्या आहेत .

असे कितीतरी उदाहरणे आहेत; सगळेच इथे सांगण्याची आवश्यकता नाही
परंतु " शीत " किती वास मारतेय यावरून " भात'' किती विटलेला आहे
याची परीक्षा होते.

-रवींद्र तहकिक, औरंगाबाद. 



5 comments:

  1. माणसांना दुर्गुणच कसे दिसतात. गुणांची कदर करणारे खरच फारच थोडे .

    ReplyDelete
  2. अनिता पाटील विचार मंच मधील सर्वच लेख खरोखरच विचार करायला लावणारे आहेत. मागील अनेक वर्षापासून मी कवितासागर हे आंतरराष्ट्रीय नियतकालिक चालवतो, कवितासागर च्या अंकाला जगभरातून वाचकवर्ग असून कवितासागर ला अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून. पहिले व एकमेव आंतरराष्ट्रीय कविताविषयक नियतकालिक म्हणून इंडिया बुक ऑफ रेकोर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकोर्ड कडून कवितासागरचा नुकताच सन्मान करण्यात आला असून, माझ्या नियतकालिकात जोशी - देशपांडे - कुलकर्णी दाखवा आणि १० रुपये बक्षीस मिळावा असे माझे आवाहन आहे, थोडक्यात माझ्या नियतकालिकात बडव्याना प्रवेश नाही. कदाचित बडव्यांच्या सहभागा शिवाय चालविण्यात येणारे हे एकमेव नियतकालिक असेल. तात्पर्य असे की अनिता पाटील विचार मंच वरील काही किंवा सर्वच लेख आम्ही संबंधित लेखकाच्या नावासह व अनिता पाटील विचार मंच वरून साभार असा स्पष्ट उल्लेख करून पुनर्प्रकाशित करू इच्छितो तरी कृपया आपण आमची विनंती मान्य करून आम्हांस तशी परवानगी द्यावी. या विषयाला अनुसरून आपणास जर काही सुचवायचे असल्यास आपले स्वागत आहे. आपल्या सहकार्य व प्रतिसादाच्या प्रतीक्षेत.

    डॉ सुनील पाटील,
    प्रकाशक,
    कविता सागर प्रकाशन,
    सुदर्शन, प्लॉट # १६, पद्मावती सोसायटी, नांदणी नाक्याजवळ, बायपास रोड,
    जयसिंगपूर - ४१६१०१, तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर, महाराष्ट्र
    मोबाईल - ९९७५८७३५६९, ०२३२२ २२५५००
    sunildadapatil@gmail.com

    ReplyDelete
  3. तुम्ही लेख छापू शकता. 'अपाविमं'वरील लेख कॉपी राईट मुक्त आहेत.

    ReplyDelete
  4. माणसांना दुर्गुणच कसे दिसतात. गुणांची कदर करणारे खरच फारच माणसांना थोडे .

    ReplyDelete
  5. पण बहुजन समाज ब्राम्हण लोकांना नाही तर महाराष्ट्रातला क्षत्रिय समाज मराठा कुणबी यांना दोषी मानतो ....त्यांचे म्हणणे आहे कि हि लोक मूर्ख होती का ज्यांनी ब्राम्हण च्या म्हणण्या प्रमाणे बहुजनांवर अत्याचार केले ....याचे उत्तर तुम्ही ताबोडतोब द्या ......म्हणजे मला सुद्धा सत्य माहित होईल कि फक्त सत्ताधारी क्षत्रियच फक्त दोषी होता कि ब्राम्हण सुद्धा...

    ReplyDelete