Sunday, 12 January 2014

जिजाऊ स्वराज्याच्या खर्‍या संस्थापिका

प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी जिवंत केली शिवशाही 

औरंगाबादेतील देवगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणातजिजाऊ
 जन्मोत्सवानिमित्त 'शिवचरित्र व शिवरायांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन'
या विषयावर व्याखान देताना प्रा. बानगुडे पाटील.
 
स्वराज्याच्या खर्‍या संस्थापिका जिजाऊ होत्या. सामान्य माणूस जगला पाहिजे, या दृष्टीने त्यांनी शिवबांना स्वराज्याची संकल्पना शिकवली. माणसाला संरक्षण, पोरीबाळींना सन्मान मिळवून देणारे राज्य निर्माण करण्याचा सल्लाही त्यांनीच शिवबांना दिला. राष्ट्र मोठे झाले, तर माणसे मोठी होतात, हा आदर्श जिजाऊनेच घालून दिला. शिवचरित्राच्या अनुकरणावर आपण जग जिंकू शकतो, असे मत शिवचरित्राचे अभ्यासक प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी व्यक्त केले. औरंगाबादेतील देवगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात गुरुवार दि. ९ जानेवारी रोजी जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त प्रा. बानगुडे पाटील यांचे 'शिवचरित्र व शिवरायांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन' या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला हजारोंची उपस्थिती होती. 

प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी म्हटले कि,  केवळ शिवचरित्राचा अभ्यास महत्त्वाचा आहे. अमेरिकेत 'शिवाजी द मॅनेजमेंट गुरू' हा धडा अभ्यासक्रमात आहे; परंतु आपल्या पाठय़पुस्तकात शिवरायांना कितपत स्थान आहे, हे सारेच जाणतात. शिवचरित्रामध्ये कर्तव्य आणि जबाबदारी कशी पार पाडावी याबाबत मार्गदर्शक घटनांचा उल्लेख आहे. स्वराज्याने आपल्याला मतदानाचा हक्क दिला आहे. ज्या दिवशी शंभर टक्के मतदान होईल त्या दिवशी स्वराज्यात एकही चूक होणार नाही. फक्त गरज आहे हक्क आणि कर्तव्य निभावण्याची. यासाठी राजकारण हे दंडाच्या बळावर न लढता ते बुद्धीच्या बळावर लढायला हवे, 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विनोद पाटील होते. आमदार सतीश चव्हाण, नगरसेवक अभिजित देशमुख, डॉ. राजेश करपे, धनंजय मिसाळ, अमोल कर्डिले यांची प्रमुख उपस्थिती होती. 

पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देणार

पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यास विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने आज मान्यता दिली. अधिसभेने यासंबंधीच्या प्रस्तावास आधीच मान्यता दिल्याने आता नामविस्तारासाठी केवळ राज्य सरकारच्या मान्यतेची गरज उरली आहे. त्यानंतर विद्यापीठाचा उल्लेख "सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ' असा करण्यात येणार आहे. 

महिलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी ऐतिहासिक कार्य केले होते. भिडे वाड्यात त्यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली होती. त्यांचे नाव विद्यापीठाला देण्यात यावे, अशी मागणी काही वर्षांपासून केली जात होती. 26 ऑक्‍टोबर रोजी झालेल्या अधिसभेत या ठरावाला मान्यता मिळाली. आज झालेल्या विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत डॉ. दत्तात्रेय बाळसराफ यांनी नामविस्ताराचा ठराव मांडला. अधिसभेत "ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ' असा नामविस्तार करण्याचा निर्णय झाला होता; परंतु नाव मोठे होत असल्याने यातील ज्ञानज्योती शब्द वगळून नामविस्तार करण्यास परिषदेने मान्यता दिली. 

कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे म्हणाले, ""परिषदेच्या बैठकीत नामविस्तार आणि नाशिकमधील एका शिक्षण संस्थेच्या तक्रारीसंदर्भात दीर्घकाळ चर्चा झाली. त्यामुळे दोन विषयांवर निर्णय घेऊन बैठक तहकूब करण्यात आली. विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यास परिषदेने एकमुखी मान्यता दिली आहे. आता राज्य सरकारला नामविस्तारासाठी शिफारस केली जाईल. सरकारने यासंबंधी निर्णय घेतल्यानंतर नामविस्ताराबाबत अंतिम निर्णय होईल.'' 

डॉ. बाळसराफ म्हणाले, ""हा ऐतिहासिक निर्णय आहे. फुले दांपत्याने मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली केली. त्यामुळे सर्वच क्षेत्रांत महिला समर्थपणे काम करीत आहेत. त्यामुळे सावित्रीबाईंच्या कार्याचा हा गौरव आहे.'' नाशिकमधील व्ही. एन. नाईक कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील शिक्षकांना 1999 पासून वेतन बंद करण्यात आले होते. ही चूक महाविद्यालयाने मान्य करीत नऊ शिक्षकांना उच्च आदेशानुसार पुन्हा सेवेत घेण्याचे मान्य केले. अन्य प्रश्‍न सोडविण्याचे संस्थाचालकांनी मान्य केले. 

सिनेट सदस्य डॉ. गजानन एकबोटे म्हणाले, ""विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्याचा परिषदेचा ठराव स्वागतार्ह आहे. हा नामविस्तार म्हणजे महिलांच्या शिक्षणासाठी त्या वेळच्या समाजाचा विरोध स्वीकारून धीरोदात्तपणे उभ्या राहणाऱ्या सावित्रीच्या प्रती समाजाने दाखविलेली कृतज्ञता आहे. या नामविस्तारात पुणे विद्यापीठ हे दोन शब्द कायम ठेवले याचेही स्वागत आहे. कारण हेच नाव विद्यापीठाची आंतरराष्ट्रीय ओळख आहे. या नावामागे सावित्रीबाईंचे नाव जोडल्याने विद्यापीठाची वेगळी ओळख निर्माण होईल.''

संबधित लेख 
आमची सावित्री ज्ञानाई !

Friday, 10 January 2014

अपविमंचे टोले : घराणेशाही

राहुलचा मुलगाच काँग्रेसचा पुढचा पक्षाध्यक्ष

एखाद्या नेत्याच्या मुलाला निवडणुकीचं तिकीट देणं म्हणजे घराणेशाही होत नाही, तर एकाच घराण्याला पक्षाचे सर्वाधिकार देणं ही खरी घराणेशाही आहे. ती फक्त काँग्रेसमध्ये चालते.  भविष्यात राहुल गांधींना मुलगा झाला तर तोच काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष होईल.
-अमीत शहा, उत्तर प्रदेश भाजपचे प्रभारी 

ब्राह्मणाचा मुलगाच आरएसएसचा पुढचा अध्यक्ष

घराणेशाहीची ही व्याख्या आम्हाला बिलकूल मान्य आहे. पण ही व्याख्या फक्त एका व्यक्तीला न लागता संपूर्ण समाजालाच लावायला हवी. कोणत्याही एका घराण्याकडे कोणत्याही संघटनेचे अध्यक्षपद असायला नको, त्याच प्रमाणे कोणत्याही एका जातीकडेही संघटनेचे अध्यक्षपद असायला नको. आरएसएसचा प्रमुख ब्राह्मणच कशाला हवा. अमीत शहा यांचा आदेश मान्य मानून मोहन भागवत यांनी पहिल्यांदा आरएसएसच्या प्रमुखपदाचा राजीनामा द्यायला हवा. आरएसएसमधील इतरही सर्वच पदांवर ब्राह्मणच आहेत. त्यांनीही पदे रिकामी करायला हवी. पण हे होणार नाही. आरएसएसचा पुढचा अध्यक्ष ब्राह्मणच असेल. 

- टोलेवाले पाटील, अपाविमंचे राजकीय प्रभारी. 




Thursday, 9 January 2014

माधुरी दीक्षितच्या बगलेत कोणाचे हात?


मुलायमसिंग  यादव यांचे जन्मगाव असलेल्या सैफेई (जि. इटावा, उत्तर प्रदेश) येथे समाजवादी पार्टीच्या वतीने बुधवार दि. ९ जानेवारी २०१४ रोजी "सैफेई महोत्सव" साजरा केला. त्यात माधुरी दिक्षित हिने असे अश्लिल नृत्य सादर केले. अशा प्रकारे कोणालाही आपल्या बगलेत हात घालू देणे, हे कोणत्या संस्कृतीत बसते? सहकलाकारांना बगलेत हात घालू देण्यासाठी माधुरीने किती पैसे घेतले आहेत? उठसुठ संस्कृतीच्या नावाने बोंब मारणा-या संघटनांना माधुरी दीक्षित हिचे असे अश्लिल चाळे कसे काय चालतात?  असे अनेक प्रश्न आम्हाला पडले आहेत. तुम्हाला नाही पडत असे प्रश्न?


संबधित लेख

मंगेशकर नावाची लोभाची मांजरे
माधुरी दीक्षितच्या बगलेत कोणाचे हात?
सनी लिओनला भारतरत्न का नाही?
माधुरी दीक्षितच्या बगलेत कोणाचे हात?




Sunday, 5 January 2014

नरेंद्र मोदी यांचा शिवरायांना मानाजा मुजरा

भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी रविवारी रायगडावर मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाजा मुजरा, त्याप्रसंगीचे छायाचित्र. नंतर मोदी यांची जाहीर सभाहीही रायगडावर झाली. 
शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी केलेले कार्य विराट, महान असताना त्यांचे रुप फक्त युद्धापुरतचं मर्यादित ठेवण्यात आल्याबद्दल भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी खंत व्यक्त केली. संभाजीराव भिडे संस्थापक असलेल्या सांगलीच्या शिवप्रतिष्ठानने काढलेल्या महानगर ते रायगड या धारातीर्थ यात्रेच्या सांगता समारंभाप्रसंगी रायगडावर उपस्थित असलेले मोदी बोलत होते. रविवारी दुपारी मोदी यांचे हेलिकॉप्टरने रायगडच्या पायथ्याशी आगमन झाले. मोदींनी प्रथम शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांना आदरांजली वाहिली.

आपल्या भाषणादरम्यान छत्रपती शिवरायांचा जयजयकार करणा-या मोदींनी शिवाजी महाराजांचा इतिहास अयोग्यपणे मांडण्यात आल्याची टीका केली. महाराजांसारख्या महान पुरूषाचे रूप हे फक्त योदध्याच्या प्रतिमेत बंदिस्त ठेवल्याची खंत व्यक्त करताना त्यांचे कार्य खूप विराट व महान असल्याचे सांगितले. सुरत शहरातील मोहिमेदरम्यान महाराजांना तेथील स्थानिकांचेही सहकार्य मिळाले. व त्यामुळेच त्यांना औरंगजेबाचा खजिना लुटता आला. मात्र, इतिहासकारांनी या घटनेचा विपर्यास करत या घटनेचे वर्णन 'सुरत लुटली' असे केले असून हा शिवरायांचा घोर अपमान आहे, असेही ते म्हणाले.


महाराष्ट्राला अनेक महान पुरूषांची परंपरा लाभली असल्याचे सांगत छत्रपती शिवाजी महाराज हे त्या महान पुरूषांपैकी एक असल्याचे ते म्हणाले. जनतेला आपल्या मुलाप्रमाणे मानणा-या महाराजांनी मुघलांच्या जाचातून मुक्त करण्यासाठी लढाई लढली. मात्र त्यांच कार्य तेवढ्यापुरतच मर्यादित नाही. त्यांचे राजकारण, समाजकारण, जनतेशी त्यांची सहिष्णू वागणूक, त्यांच्या काळातील सुशासन, शेतक-यांसाठी त्यांनी केलेलं कार्य, इंग्रजांशी त्यांनी केलेला व्यापार, यासह अनेक लौकिकास्पद कामगिरी महाराजांनी केल्या असताना त्यांच रुप फक्त युद्धापुरतचं मर्यादित ठेवण्यात आले, ही खेदाची गोष्ट असल्याचे ते म्हणाले.

हिंदुस्थानात एकही भाषा नाही, ज्यात शिवरायांची दखल घेतली गेलेली नाही, असे सांगत देशातील सर्व भाषिकांना शिवरायांचे ज्ञान आहे. ते एक महान राजा होते, असे मोदी म्हणाले. तसेच शिवरायांच्या या महान भूमीला मी नमन करतो, असे ते म्हणाले. भारत कुशासनातून मुक्त होऊन देशात सुशासन येवो, अशी शक्ती या पवित्र भूमीतून मिळो, ही प्रार्थना मी करतो, असेही ते म्हणाले. छत्रपती शिवराय, माता जिजाऊ यांना प्रणाम करत तसेच शिवप्रतिष्ठानचे संस्थापक भीडे गुरुजींचे आभार मानत मोदींनी आपल्या भाषणाची सांगता केली.

कोणतेही राजकीय भाष्य नाही 
दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोदी पंतप्रधान झाले तर देशाचा सर्वनाश होईल अशी टीका केली होती. पंतप्रधानांच्या या वक्तव्यानंतर मोदी काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष होते, मात्र रायगडावरील भाषणात मोदींनी कोणतेही राजकीय भाष्य केले नाही.


Friday, 3 January 2014

आमची सावित्री ज्ञानाई !

सावित्री जोतीराव फुले 

राहुल पगारे


सावित्री जोतीराव फुले यांच्या विषयी थोडक्यात : 

  • जन्म :  (नायगाव,ता . खंडाला जिल्हा . सातारा ) : ३ जानेवारी १८३१
  • वडिलांचे नाव : खंडोजी नेवसे , आईचे नाव : लक्ष्मी 
  • विवाह : १८४०
  • शिक्षण घेण्यास सुरुवात : १८४१
  • पहिली शाळा : १८४७ ( भारतातील पहिली महिला शाळा )
  • सावात्री आई देशाच्या पहिल्या महिल्या मुख्काध्यापिका : १ जानेवारी १८४७
  • सर्वोत्तम शिक्षिका पुरस्कार : १६ नोव्हेंबर १८५२.
  • पहिला काव्य संग्रह : काव्य फुले १८५४.
  • निर्वाण : प्लेगची साथ पसरली असता रुग्णाची सेवा सेवा करता आजार बळावून १० मार्च १८९७ रोजी  निर्वाण. 

भाटोड्याकडून झालेले अनंत कष्ट आणि यातना ( बामनाकडून) आम्हा बहुजनांसाठी सहन करून जिने स्वतःचे जीवन त्यागले त्या आमच्या प्राण प्रिय आईस विनम्र अभिवादन! आपल्या सुखी संसाराची आस न धरता नवरयाच्या खांद्याला खांदा लावून जी बहुजन उद्धारा साठी झटली आणि बहुजनाना अंधारातून प्रकाश कडे घेऊन आली त्या महामाउलीस कोटी कोटी प्रणाम. आमच्या आईने केलेल्या त्यागाची आज आम्ही आयते फळ चाखत आहोत.

असो. आता सर्वात मनाला जहाल आणि बोचणारी गोष्ठ हि की, तिच्या त्यागाची आम्ही किती मोल जपतो? शिकलेला सवरलेला असो कि अज्ञानी असो मात्र त्या बामणाच्या नटीबाज देखणी सुंदरी सरस्वती ( जी स्वतःच्या बापाच्या म्हणजे ब्रम्हदेवाच्या वासनेला बळी पडली होती ) हिलाच ज्ञान उदगाती समजतो. साऱ्या विश्वात ज्ञान ज्योत सरस्वती हिच्या मूळेच पेटलेली आहे, असे समजतो. ( हि गोष्ट वेगळी कि बापाला लैगिक वासनेत गुंडाळून अज्ञानी ठेवले ). तिने ज्ञाना साठी काय केले के ज्याने पोथी पुराणाच्या भाकड कथा लिहून ठेवले त्याला हि धड माहित नाही परंतु बहुजन मूर्खा सारखे वागून तिलाच ज्ञानाची देवी म्हणून पुजतो. 

मी म्हणतो बामन जर सरस्वतीला पुजत असतील तर ठीक आहे. बामणांनी तिला पूजावे कारण त्यांच्या जातीत महान पूजनीय व्यक्तिमत्व जन्माला येत नाही त्यामुळे त्यांना त्यांच्या मनो धैर्याला आधार म्हणून काल्पनिक व्यक्तीरेषा बनवाव्या लागतात. उगाच नाही ३३ कोटी जन्माला आले. परंतु बहुजानाचे तसे नाही, त्याच्या वंशात इतके महान व्यक्तिमत्व जन्म घेते कि त्याच्या पुढे देव /ईश्वर (जर असतील तर ) तेही शरमेने खाली मान घालतील. म्हणून बहुजानानो आपल्या आदर्शांना प्रमाण माना त्यातच आपले हित आहे. बामनाची माधुरी ,ऐश्वर्या,दीपिका तुमच्या आमच्या कर्मांना पुरणार नाहीत . बामन ललना ह्या अधोगतीचा मार्ग आहे. आमच्या स्रिया या प्रगतीचा मार्ग आहे. म्हणून तर आम्ही महामाया, येशोधारा, जिजाऊ, सावित्री, अहिल्या, रमाई असे किती तरी नावें घेऊ शकतो पण बामानात एक हि स्री उद्धारक सापडत नाही. 

असो. आम्हाला आणि आमच्या आई बहिणींना ज्ञान प्रकाशाचे मार्ग दाखविणाऱ्या त्या ज्ञान ज्योतीला कोटी कोटी अभिवादन

'अपाविमं'ची ४ लाख वाचने पूर्ण


दि. ३ जानेवारी २०१४ रोजी
 दुपारी ३.०० वाजता
 अपाविमंची वाचनसंख्या
४ लाख ३ हजार ५१५ होती.
 हे दर्शविणारा हा
ब्लॉगवरील वाचनालेख.
'अनिता पाटील विचार मंच'ला (अपाविमं) सुजाण वाचकांकडून मिळत असलेला पाठिंबा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. २०१३ हे वर्ष संपत असताना अपाविमंच्या हिट्सची संख्या ४ लाखांवर पोहोचली. या उदंड प्रतिसादाबद्दल आम्ही वाचकांचे ॠणी आहोत. हा पाठिंबा यापुढेही सुरूच राहील, अशी आम्हाला खात्री आहे. 

अपाविमंने समाज परिवर्तनाचा वसा  घेतलेला आहे. नवनव्या विषयांचा शोध घेऊन ते वाचकांसमोर आणण्याचा अविरत प्रयत्न आमचा संपादकीय संघ करीत आला आहे. वाचकांकडून असा भरघोस पाठिंबा मिळाल्यानंतर या प्रयत्नांचे चीज झाल्याचे समाधान होते. विचार प्रवर्तक आणि परिवर्तनाला चालना देणा-या लेखनाची परंपरा 'अपाविमं'चे संपादक मंडळ खंडीत होऊ देणार नाही, असे वचन आम्ही या निमित्ताने वाचकांना देत आहोत.

जय जिजाऊ, जय शिवराय

-राजा मइंद, 
कार्यकारी संपादक, अपाविमं.