Showing posts with label हिंदुत्ववाद नव्हे ब्राह्मणवाद. Show all posts
Showing posts with label हिंदुत्ववाद नव्हे ब्राह्मणवाद. Show all posts

Thursday, 3 November 2011

हिंदू नावाचा कोणताही धर्मच अस्तित्वात नाही!

+हिंदू नावाचा कोणताही धर्म जगात अस्तित्वात नाही. हिंदू धर्माच्या नावाखाली ब्राह्मणी धर्म अस्तित्वात आहे+ असे विधान मी काही पोस्टमध्ये केल्यानंतर हिंदूत्ववादाचा बुरखा पांघरणारया ब्राह्मणवाद्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. ब्राह्मणी विकाराने रोगग्रस्त झालेल्या काही लोकांनी माझ्यावर टीकेचा भडीमार सुरू केला. तीच तीच वाक्ये अनेकांगानी लिहून टीकेचा आकार हे लोक वाढवित आहेत. माझे विधान कसे सत्य आहे, हे मी आज सूज्ञ वाचकांस सांगणार आहे.
धर्मग्रंथात हिंदू हा शब्दच नाही 
हिंदू म्हणविणारयांच्या धर्मग्रंथांच्या यादीत ४ वेद, १८ पुराणे, ६ शास्त्रे, ६४ कला यांचा समावेश करण्याची हौस हिंदूत्ववादी लेखकांना आहे. पण यापैकी एकाही ग्रंथात हिंदू हा शब्द आढळत नाही. हिंदू हा जर धर्म असेल, तर हा शब्द कुठल्या तरी धर्मग्रंथात असायला हवा होता. पण तो नाही. इतकेच काय अगदी अलीकडील काळातील वैष्णव, शैव, चैतन्य, नाथ आदी सांप्रदायांच्या वाङ्मयातही हिंदू हा शब्द आढळत नाही. असे का? याचे उत्तर कोणाकडेही नाही. याउलट आर्य आणि ब्राह्मण यांचे उल्लेख मात्र जागोजाग सापडतात. वैष्णव, शैव, चैतन्य, नाथ आदी हे सांप्रदाय वेद प्रणीत हिंदू पंथ नाहीत. त्यांचे  नंतर हिंदुकरण झाले आहे.   
ब्राह्मणांची राक्षसी महत्वाकांक्षा
समस्त भारतवर्षात  स्वत:ला वैदिक म्हणवणारया ब्राह्मणांची संख्या दीड ते साडेतीन टक्क्यांपेक्षा जास्त नाही. +कृण्वंतो विश्वम आर्यम+ अशी प्रतिज्ञा ब्राह्मणी वाङ्मयात आहे. प्राचीन काळी +अष्टपूत्र सौभाग्यवती भव+ असा आशीर्वाद ब्राह्मणी धर्मात दिला जात असे. स्त्रीने किमान ८ मुलांना जन्म द्यायलाच हवा, असा दंडकही होता. संख्यावाढ करून संपूर्ण विश्वात आपला वंश वाढविण्याचा विचार यामागे आहे. बेडकाने कितीही पोट फुगवले तरी त्याचा घोडा होऊ शकत नाही. याच न्यायाने वैदिक ब्राह्मणांनी रात्रंदिवस घाम गाळला असता तरी त्यांची लोकसंख्या विश्वाला व्यापू शकली नसती. त्यामुळे कालांतराने वैदिकांनी आपली स्ट्रॅटेजी बदलली. लोकसंख्या वाढविण्याऐवजी ब्राह्मणी विचार पसरवून विश्वाला आर्यमय करण्याची व्यूहरचना त्यांनी केली. +आब्रह्म ब्राह्मणो ब्रह्मवर्चसि  जायताम् + असे नवे मंत्र त्यातून निर्माण केले गेले. सर्व विश्वात ब्राह्मणांचे वर्चस्व निर्माण झाले पाहिजे, अशी राक्षसी महत्त्वाकांक्षा त्यातून दिसून येते.
वैदिक धर्म समूळ नष्ट झाला
ब्राह्मणांची ही राक्षसी महत्त्वाकांक्षाही पूर्ण होऊ शकली नाही. मुळात वैदिक ब्राह्मणी विचार रानटी असल्यामुळे इथला मूळ भारतीय समाज त्याकडे आकृष्ट होऊ शकला नाही. तसेच कालांतराने भगवान श्रीकृष्ण, भगवान गौतम बौद्ध आणि भगवान महावीर यांनी आपापल्या पद्धतीने वैदिक धर्मावर हल्ले केले. भगवान श्रीकृष्णांचा वैदिक धर्मविरोध हा थोडासा सौम्य स्वरूपाचा होता. (या तिन्ही थोर पुरुषांविषयीचे माझे लेख जिज्ञासूंनी वैदिक धर्मविषयक माझ्या लेख मालेत जरूर वाचावेत.) भगवान गौतम बुद्ध आणि भगवान महावीर यांनी मात्र उघडपणे वेदप्रामाण्य नाकारले. त्यांनी पशुहत्येला पापाच्या कक्षेत नेऊन बसवले. पशुहत्या हा तर वैदिक धर्माचा मूळ पाया होता. त्यामुळे भारतभूमीतून वैदिक धर्म समूळ नष्ट झाला. या काळात ब्राह्मणांनी एक हुशारी केली. आपले वाङ्मय नष्ट होऊ दिले नाही. ते त्यांनी दडवून ठेवून टिकवले. लोकहितवादींनी वैदिकांना आपले वाङ्मय का दडवून ठेवावे लागले, याचे वर्णन अनेक ठिकाणी केले आहे. वैदिक धर्म म्हणजे हिंदू धर्म नव्हे हे वाचकांनी लक्षात घ्यावे. आज हिंदू लोक मानतात त्या रामकृष्णादी देवता वेदांत नाहीत. 
शंकराचार्याचे कुटिल कारस्थान
कालांतराने कुमारिल भट्ट, आद्य शंकराचार्य आदी ब्राह्मणवादी वैदिकांचा उदय झाला. त्यांनी छळ कपटाचा अवलंब करून बौद्ध आणि जैन विचारांतून चोरी करून आपल्या धर्माची नवी मांडणी केली. प्राचीन काळापासूनचे महादेवाचे उपासक शैव  आणि विष्णूचे उपासक वैष्णव, नाथपंथी, चैतन्यपंथी व इतर अनेक  अहिंसावादी धर्मही शंकराचार्य प्रणित धर्माने गिळले. सनातन धर्म या संज्ञेखाली त्यांना एकत्रित केले गेले. पंढरपूरचे पांडुरंग हे खरे म्हणजे लोकदैवत. पण त्याला वैदिक करून शंकराचार्यांनी संस्कृतमध्ये पांडुरंगाष्टक लिहिले. वारकरयांचे सर्व वाङ्मय प्राकृत मराठीत असताना एवढे एकच पांडुरंगाष्टक संस्कृतात आहे. आज हिंदू धर्माचे जे स्वरूप आहे, ते अशा प्रकारे वैदिकांनी केलेल्या चोरयांमारयांमधून आकाराला आले आहे. बौद्ध आणि जैनांनी ब्राह्मणांचे सर्व विशेषाधिकार काढून घेतले होते. शंकराचार्यांनी ब्राह्मणांना पुन्हा धर्माच्या सर्वोच्च स्थानी बसविले. त्यासाठी नवे ग्रंथ रचले गेले. भागवतादी पुराणांची रचना याच काळात केली गेली. 
अठरा पगड जाती फक्त ब्राह्मणांच्या सेवेसाठी 
पारंपरिक वैदिक धर्मातील वर्णाश्रम व्यवस्थेने शूद्र वगळता क्षत्रिय आणि वैश्यांना कर्तव्याच्या पाशांत बांधून काही अधिकार दिले होते. शंकराचार्यांनी तेही काढून घेतले. कलियुगात ब्राह्मण आणि शूद्र असे दोनच वर्ण आहेत, असा नवा सिद्धांत मांडला गेला. याचाच दुसरा अर्थ असा झाला की, ब्राह्मण वगळता इतर सर्व जातींना कोणताही वैध धार्मिक अधिकार राहिला नाही. ९७ टक्के समाजाने ३ टक्के ब्राह्मणांची सेवा करावी. ब्राह्मणांना दान द्यावे. ब्राह्मण भोजने घालावी. कोणताही धार्मिक विधी बाह्मणाच्या हस्तेच करावा, अशी बंधने समाजावर लादण्यात आली. ठराविक लोकांना फुकटच्या लाभाची मक्तेदारी देणारा हा जगातील एकमेव धर्म आहे. याला ब्राह्मणी धर्म म्हणू नये तर काय?  
अकबराची ब्राह्मण नवरत्ने
कालांतराने या देशात इस्लामचे आगमन झाले. एतद्देशीय क्षत्रियांच्या हातातील सत्ता मुस्लिम राज्यकरत्यांच्या हातात गेली. त्यामुळे नव्याने तयार होणारया ब्राह्मणी व्यवस्थेला विरोध करण्याच्या स्थितीत क्षत्रिय नव्हते. कोणतीही परकीय सत्ता एतद्देशियांच्या सहाय्याशिवाय राज्य चालवू शकत नाही. समाजावर हुकुमत असलेल्या एखाद्या स्थानिक गटाची मदत राज्यकर्त्यांना लागत असते. इस्लामी राज्यकत्र्यांनाही अशी मदत हवी होती. ती तत्कालीन ब्राह्मणांनी पूर्ण केली. इस्लामी राज्यकत्र्यांच्या पदरी ब्राह्मण मंत्री असत. अफजलखानाचा मंत्री कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हा सर्वांना माहीतच आहे. अकबराच्या दरबारात ९ रत्ने होती असे म्हणतात. बिरबल, तानसेन यांच्यासकट ही नऊच्या नऊ रत्ने ब्राह्मण होती. ही सगळे रत्ने कालांतराने मुसलमान झाली. तानसेनाचे मूळ नाव तन्ना मिश्रा होते. तो मुसलमान झाल्यानंतर मियाँ तानसेन नावाने ओळखला जाऊ लागला. तानसेनाने तयार केलेल्या सर्व रागांच्या आधी मियाँ लावण्याची प्रथा आजही कायम आहेत. उदा. मियाँ मल्हार. भारतीय शास्त्रीय संगीतात मुस्लिम गायक वादकांचा वरचष्मा आहे. त्याचे कारणच हे आहे. तानसेन आणि इस्लाम धर्म स्वीकारणारया इतर गायकांचे हे सगळे वंशज आहेत. या गायकीत इस्लाम नाही. सर्व चीजा भारतीय देवी देवतांचे गुणवर्णन करतात. अगदी पाकिस्तानी शास्त्रीय गायकही भारतीय देवी देवतांचे महिमा वर्णन असलेल्या चीजा गातात. या काळात ब्राह्मणांची धर्मावरील पकड आणखी मजबूत झाली. 
इंग्रजी राजवटीतही तेच
ब्राह्मणांच्या मदतीची ही परंपरा पुढे इंग्रजी राजवटीपर्यंत कायम होती. इंग्रजी राजवटीतील ९९.९९ टक्के एतद्देशीय सरकारी अधिकारी आणि कर्मचारी  ब्राह्मण होते. या संपूर्ण काळात ब्राह्मणी व्यवस्था मजबूत होण्यासाठी आवश्यक ती रसद राज्यसत्तेकडून अशा प्रकारे मिळत गेली. त्यातून या देशात ब्राह्मणी धर्म अधिकाधिक मजबूत झाला. 
हिंदू ही धार्मिक नव्हे राजकीय संज्ञा
प्राचीन काळी ग्रीक व इतर पाश्चात्य लोक सिंधूपलीकडील लोकांना हिंदू म्हणत असा एक सिद्धांत सर्वांना माहीतच आहे. पण त्यात फारसे तथ्य आहे, असे दिसत नाही. सम्राट अलेक्झांडर द ग्रेटने भारतावर स्वारी केली हे सर्र्वाना माहीतच आहे. पण अलेक्झांडरच्या आधी आणि नंतरसुद्धा मध्य आशियातून हूण, यूची, शक आदी टोळ्यांची आक्रमणे होतच राहिली. या पाश्र्वभूमीवर ग्रीक किंवा इतर पाश्चात्य वाङ्मयात कुठे ना कुठे हिंदू हा शब्द यायला हवा होता. पण ग्रीकांच्या कोणत्याही वाङ्मयात हिंदू शब्द सापडत नाही. उलट या काळात भारतात बौद्ध धर्माचा बोलबाला होता असे पुरावे सांगतात. शकांचा एक वकील मिनँडर आणि बौद्ध पंडीत नागसेन याचा संवाद प्रसिद्धच आहे. त्यातून मिनँडरने एक ग्रंथ सिद्ध केला. +मिलिंद पन्हो+ असे या ग्रंथाचे नाव.  मिलिंद हे मिनँडरचे पाली रूप आहे. या संवादाच्या स्मृतीरूपाने डॉ. आंबेडकरांनी औरंगाबादेत मिलिंद  महाविद्यालयाची स्थापना केली. या महाविद्यालयाच्या परीसराला नागसेनवन असे नाव आहे. 
हिंदू हा शब्द इस्लामची देण
 लिखित स्वरूपात हिंदू शब्द पहिल्यांदा येतो शीखांचे आद्य गुरू गुरूनानक यांच्या लिखाणात. हिंदू धर्मातील भेद आणि विशेषाधिकार दूर करण्यासाठी नानकदेवांनी स्वतंत्र धर्मच स्थापन केल्याचे सर्वविदित आहेच. गुरूनानकांचा काळ हा इस्लामी आगमनाचा काळ होय. त्यावरून हिंदू हा शब्द इस्लामी राजवटीतच रुढ झाला, असे दिसते. भारतातील हजारो जातींची नावे, लक्षात ठेवणे नव्या इस्लामी राज्यकत्र्यांना शक्यच नव्हते. त्यामुळे त्यांनी सर्र्वासाठी सरसकट एक संज्ञा रुढ केली. भारतात हजारो जाती असल्या तरी इस्लामी राज्यकत्र्यांच्या दृष्टीने मुस्लिम लोक आणि एतद्देशीय बिगर मुस्लिम भारतीय असे दोनच भेद होते. त्यामुळे त्यांनी एतद्देशियांसाठी हिंदू ही संकल्पना रूढ केली. या काळात हिंदू शब्दाचा आणि विशिष्ट धार्मिक विचारधारेचा कोणताही संबंध नव्हता. एतद्देशीय लोकांसाठी वापरली जाणारी ती समूहवाचक संज्ञा होती. हिंदू ही पूर्णत: राजकीय होती, धार्मिक नव्हे. हा मुद्दा समजून घेण्यासाठी आपण आजच्या काळाचे उदाहरण घेऊ या. आपल्या राज्यकत्र्यांनी ठराविक जाती समूहांचे गट करून एससी, एसटी, ओबीसी, ओपन अशा संज्ञा तयार केल्या आहेत. या संज्ञांना धार्मिक अधिष्ठान नाही. या सर्व संज्ञा राजकीय आहेत. तसाच हिंदू हा शब्द आहे. इस्लामी राजवटीच्या प्रारंभकाळी वापरात आला.  त्यातून धर्म नव्हे, तर राजकीय अर्थ स्पष्ट होतो. 
इंग्रजी राजवटीत हिंदू शब्दाचे धार्मिकीकरण
पुढे हजारभर वर्षे हिंदू हा शब्द हेटाळणीच्या स्वरूपातच वापरला जात होता. इंग्रजी राजवटीत इस्लाम आणि हिंदू हे समूह घटक प्रकर्षाने समोर आले. इंग्रजी राजवटीत या देशात कायद्याचे राज्य अस्तित्वात आले. त्यामुळे धर्माची अधिकृत नोंद करणे अनिवार्य ठरले. तेव्हा हिंदू हा शब्द अधिकृतरित्या धर्म म्हणून कागदोपत्री नोंद होऊ लागला. शीख, जैन धर्मांनी आपल्याला हिंदू म्हणवून घेण्यास विरोध केला. त्यामुळे त्यांचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण झाले. तसे ते आधीपासूनच होते. जगभरात पसरलेला बौद्ध धर्मही आधीपासूनच स्वतंत्र होता. परंतु त्याचे अस्तित्व लेह-लदाख, आणि इशान्यभारतापुरते मर्यादित होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांसह धर्मांतर केल्यानंतर बौद्ध धर्माचा टक्का वाढला. 
हिंदूत्ववादी धार्मिक नाहीत,
धार्मिक लोक हिंदूत्ववादी नाहीत!
आज हिंदूत्व ही संज्ञाही राजकीय संज्ञा आहे. हिंदू हा धर्म नाही, हे सिद्ध करण्यास हाही एक मुद्दा सहाय्यक ठरतो. ख्रिश्चन, इस्लाम बौद्ध, जैन qकवा जगातील इतर कोणत्याही धर्माची अशी राजकीय संज्ञा अस्तित्वात नाही. युरोपात चर्च आणि राजकारण या दोन गोष्टी भिन्न आहेत. इस्लामी देशात धर्म आणि राजसत्ता हातात हात घालून चालतात, हे खरे मात्र; राजकारणासाठी इस्लामियत असे कोणतेही तत्वज्ञान किंवा संज्ञा अस्तित्वात नाही. इस्लामच्या नावे राजकारण करणारे लोक धार्मिक दृष्ट्याही कडवट इस्लामी असतात. औरंगजेबाने इस्लामच्या आधारे राज्य केले. तो इस्लामची सर्व तत्त्वे आयुष्यभर पाळित होता. त्याने कधी दारूला स्पर्श केला नाही. वैयक्तिक उदरभरणासाठी तो टोप्या बनवून विकीत असे. मोगल साम्राज्याचा संस्थापक बाबरही दारू पित नव्हता. आज सौदी व इतर इस्लामी देशात इस्लामचा कडक अंमल आहे. हिंदूत्ववादी नेते असे कडवट हिंदू आहेत का? एकही हिंदूत्ववादी नेता, हिंदू धर्माचे कसोशीने पालन करीत नाही. प्रचलित मान्यतेनुसार हिंदूंना  मद्यमांस वर्ज्य आहे. देशातील सर्वांत मोठे हिंदूत्ववादी नेते बाळासाहेब ठाकरे यांनी एका मुलाखतीत आपण बिअर घेतो, असे सांगितले होते. हिंदूत्वाच्या संकल्पनेला जन्म देणारया सावरकरांनी इंग्लंडात असताना गोमांस खाल्ले होते. हिंदूत्वाच्या लाटेवर आरुढ होऊन पंतप्रधान झालेले अटलबिहारी वाजपेयी यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, +मी अविवाहित आहे, ब्रह्मचारी नव्हे.+ आता गंमत पाहा, अविवाहित असताना स्त्रीसंग करणे, हिंदू म्हणविणारया लोकांच्या दृष्टीने पापाचरण आहे. अशा पापाचरणास व्याभिचार असे म्हणतात. अशा व्यक्तीला पुराणांत विविध प्रकारच्या मरणोत्तर शिक्षा सांगितलेल्या आहेत. वाजपेयी रामाला आपला आदर्श मानतात आणि राम हा एकपत्नी होता. महात्मा गांधी मात्र खरया अर्थाने रूढ हिंदू तत्त्वांचे पालनकर्ते होते. पण ते हिंदूत्ववादी नव्हते. अशा वेळी येथे अगदी विपरीत परिस्थिती निर्माण होते. हिंदू म्हटल्या जाणारया लोकांत मान्य असलेली तत्वे हिंदूत्ववादी पाळीत नाहीत. उलट हिंदूत्वादी ज्यांच्यावर हिंदूविरोधी म्हणून टीका करतात ते महात्मा गांधी मात्र या तत्त्वांचे प्राणपणाने पालन करतात. हा विरोभास विचित्र आहे. 
गांधी आणि नथुराम दोघांच्याही हाती गीता! 
ख्रिश्चनांचा मुख्य धर्मग्रंथ बायबल आहे. मुस्लिमांचा कुराण, तर शिखांचा गुरूग्रंथसाहिब आहे. हिंदू हा धर्म असेल, तर त्याचा धर्मग्रंथ कोणता? काही लोक म्हणतात की, गीता हा हिंदूंचा  मुख्य धर्मग्रंथ आहे. चैतन्य, वैष्णवादी परंपरा गीतेला आपला मुख्य आधार मानतात. जसे- महाराष्ट्रातील वारकरी पंथाचा मुख्य आधार असलेली गीता ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने मराठीत आणली. गीतेला हिंदूंचा  मुख्य ग्रंथ मानल्यास आपली फसगत थांबत नाही. महात्मा गांधी यांनी आयुष्यभर गीता हाती घेऊन राजकारण, समाजकारण केले. गांधींच्या पुतळ्यांच्या हातातही गीता आहे. काव्यगत न्याय कसा असतो बघा, नथुराम गोडसे याने गीता हातात घेऊनच गांधीजींना गोळ्या घातल्या. गीतेला जर हिंदूंचा  मुख्य धर्मग्रंथ मानायचे असेल, कोणाची गीता स्वीकारायची नथुरामची की गांधींची हा मोठा प्रश्न आहे.   



Saturday, 29 October 2011

आरएसएस से ज्यादा हिन्दुवत्ववादी है आई.बी. - एस एम मुशरिफ़


पिछले कुछ वर्षों से नई पीढ़ी की राजनीतिक आकांक्षाओं के दबाव में और कुछ अपने “हिन्दुवत्व मूल” पर हिन्दू मुखौटा चढाने की वजह से आर एस एस और उसके राजनितिक संगठन बी जे पी को पिछले वर्षों के दौरान अपने मूल एजेंडे के कुछ बिन्दुवों पर समझौता करना पड़ा जिसका एक नतीजा यह हुआ कि हिन्दुवत्व वादी एजेंडे के प्रति उनका उत्साह बड़ी हद तक कमजोर पड़ गया। लेकिन आई बी में मौजूद हिन्दुवत्व वादियों का मामला ऐसा नहीं है। वे संघ परिवार के एजेंडे को बराबर दिमाग में रखते हैं। और न केवल पहले की तरह ही उस एजेंडे के प्रति वफादार और समर्पित हैं बल्कि सरकार में लगातार बढ़ते प्रभाव और प्रशासन पर अपने दबदबे की बदौलत दिन-प्रतिदिन ज्यादा से ज्यादा दुस्साहसिक कारनामे अंजाम देने का हौसला पा रहे हैं। इस तरह धीरे-धीरे आई बी ने हिन्दुवत्व वादी के असल चैम्पियन की भूमिका अपना ली है और आर एस एस की विचारधारा और नीतियों का संरक्षक बन गई हैं। अगर हिन्दुवत्व वादी मानसिकता के आई बी अफसरों की आर एस एस एजेंडे प्रति ऐसी वफादारी और निष्ठां न होती तो आर एस एस की मूल आत्मा कब की मिट चुकी होती और अपने सारे संसाधनों और मजबूत संगठन के बावजूद समाज पर ऐसी मजबूत पकड़ वह हासिल न कर पाती जैसी कि उसने कर ली है। आर एस एस और आई बी एक दूसरे से कितने जुड़े हुए हैं, निम्न उदहारण से यह अच्छी तरह समझा जा सकता है:

दिल्ली यूनिवर्सिटी के प्रोफेस्सर सैयद अब्दुर्रेह्मान गिलानी ने, जिनको दिल्ली हाई कोर्ट और सुप्रीम कोर्ट दोनों ने संसद भवन पर आतंकी हमले के आरोप से बरी कर दिया था, तहलका ( 22 नवम्बर 2008 ) में लिखा है : ‘मैंने इस इंटेलिजेंस एजेंसी को बहुत करीब से देखा है। उनके साथ बैठ कर मुझे कभी ऐसा नहीं लगा कि मै एक लोकतांत्रिक देश के किसी सरकारी दफ्तर में बैठा हूँ। बल्कि हमेशा ऐसा प्रतीत हुआ कि मै आर एस एस के मुख्यालय में बैठा हूँ।''


मै “रा” को आई बी की श्रेणी में नहीं रखना चाहता क्यूंकि दोनों की विशेषताएं अलग हैं। और उसके निम्न कारण हैं :

1. “रा” (RAW: Research & Analyasis Wing ) की स्थापना आजादी के कोई बीस साल बाद इंदिरा गाँधी के शासन काल में हुई थी, इसलिए लगातार कोशिशों के बावजूद इस संगठन का आई बी की तरह हिंदुत्वीकरण नहीं हो सका। यूँ तो रा में भी कुछ अधिकारी हिंदुत्व वादी विचारधारा के हैं, मगर ऐसा मामला एक-आध ही हो सकता है इसलिए इस संस्था में उस प्रकार की वैचारिक घुसपैठ नहीं हो सकी जिस तरह आई बी में हो गयी है।
2. इसके अलावा यह कि “रा” का कार्य क्षेत्र पाकिस्तान, बंगला देश, चीन, अफगानिस्तान, श्रीलंका और कुछ दूसरे देशों तक सीमित है और वह देश के आंतरिक मामलों पर प्रभाव नहीं डाल सकती। इसलिए आई बी की तरह उपस्तिथि महसूस नहीं हो सकती।
3. पिछले कुछ वर्षों के दौरान इन दोनों संगठनो में प्रोफेशनल मुकाबला इस हद तक पहुँच गया है कि दोनों एक दूसरे को नीचा दिखाने का एक भी अवसर हाथ से जाने नहीं देते।
इस वजह से “रा” में काफी संख्या में हिन्दुवत्व वादी अधिकारीयों की मौजूदगी के बावजूद आर एस एस और दूसरे हिन्दुवत्व वादी संगठन उसको ‘अपना’ नहीं समझते और उसपर ज्यादा भरोसा नहीं करते। यद्यपि समय-समय पर वे अपने उद्देश्यों के लिये उसका उपयोग भी करते हैं। नतीजे के तौर पर आई बी धीरे-धीरे सबसे ज्यादा शक्तिशाली संगठन बन गई है।

- एस एम मुशरिफ़

पूर्व आई जी पुलिस

महाराष्ट्र

Wednesday, 19 October 2011

स्वाध्याय परिवाराला अस्पृश्यता परत आणायची आहे का?

बाट पाळणारा मनुष्य गौरव दिन

स्वाध्याय परीवाराचे संस्थापक पांडुरंगशास्त्री आठवले यांची आज जयंती. हा दिवस त्यांचे अनुयायी मनुष्य गौरव दिन म्हणून साजरा करतात. यासंबंधी तसेच एकूणच परीवाराच्या विचारधारेसंबंधी मला काही प्रश्न पडले आहेत. आज निमित्त आहे म्हणून मी ते येथे मांडते.  

१. स्वाध्यायी लोक धर्मप्रचारार्थ बाहेर पडतात, कोणाच्या घरचे अन्न घेत नाहीत. इतकेच काय पाणीसुद्धा स्वत:चे स्वत:सोबत घेऊन येतात. माझ्या घरी त्यांचे एक पथक आले होते, तेव्हा मी स्वत:च हा अनुभव घेतला.
माझा प्रश्न :  पूर्वी ब्राह्मण समाज इतर समाजाच्या हातचे काहीही खातपीत नव्हता. इतर जातींच्या हातचे काही खाल्ले-पिल्ले तर आपल्याला बाट लागेल, अशी ब्राह्मणांची तेव्हा समजूत होती. हा भेदाभेद आज संपत आला आहे. फार थोड्या प्रमाणात तो सुरू आहे.  बाटाची ही विचारधारा स्वाध्याय परीवार पुन्हा एकदा पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करीत आहे का? परिवाराला अस्पृश्यता परत आणायची आहे का?

२. पांडुरंगशास्त्र्यांच्या हयातीत स्वाध्याय परीवाराचे दैवत होते योगश्वर रूपातील श्रीकृष्ण आणि मुख्य ग्रंथ होता गीता. त्यामुळे हिंदू म्हणविणाèया सर्व लोकांना पांडुरंगशास्त्री हे काही वेगळे सांगत नसून आपलीच मूळ परंपरा पुढे नेत आहेत, असे वाटले. त्यांना मोठा अनुयायीवर्ग मिळाला.
माझा प्रश्न :  स्वाध्याय परीवाराने आता अमृतालय नावाने आपली स्वतंत्र प्रार्थनागृहे म्हणजेच मंदिरे बांधणे सुरू केले आहे. अमृतालयात योगेश्वर कृष्णाच्या मूर्तीच्या बरोबरीने पांडुरंगशास्त्र्यांची प्रतिमा ठेवणे बंधनकारक आहे. याचाच अर्थ शास्त्रीबुवांना परीवाराने देवाचे स्वरूप देऊन कृष्णाच्या बरोबरीचे स्थान दिले आहे. शास्त्रीबुवांची कृष्णाच्या बरोबरीने प्रतिष्ठापना करणे योग्य आहे का? 
३. शास्त्रीबुवांच्या हयातीत स्वाध्याय परीवार स्वत:ला हिंदूच म्हणवून घेत असे. गीता हा मूळ ग्रंथ म्हणून त्यांनी त्यासाठीच स्वीकारला होता.
माझा प्रश्न :  आता स्वाध्याय परीवाराने अमृतालय नावाने स्वत:चे स्वतंत्र मंदिर निर्माण केल्यामुळे परीवाराला आता  हिंदू म्हणावे का? स्वत: परीवाराची याबाबत काय भूमिका आहे. परीवार स्वत:ला अजूनही हिंदूच म्हणवतो का? 
४. स्वाध्याय परीवाराने अजून तरी अधिकृतरित्या हिंदू धर्मापासून फारकत घेतलेली नाही. याचा अर्थ सर्व जनता स्वाध्याय परीवाराला अजूनही हिंदूच समजते.
माझा प्रश्न : यातून दोन प्रश्न निर्माण होतात.   प्रश्न १- हिंदू धर्मात ३३ कोटी देव आहेत. शास्त्रीबुवांना योगेश्वर कृष्णाच्या बरोबरीने मंदिरात स्थान मिळाले याचाच अर्थ त्यांना देवत्व प्राप्त झाले. मग आता  हिंदू धर्माने ३३ कोटी १ इतके देव मानायचे का? प्रश्न २-  स्वाध्याय परिवाराने  हिंदू धर्मात राहून शास्त्रीबुवांच्या रूपाने आपला सवता  देव निर्माण करणे योग्य आहे का? 
५. शास्त्रीबुवांनी स्वाध्याय परीवारासाठी निवडलेल्या योगेश्वर कृष्णाच्या मूर्तीचे कॉपीराईट घेतले आहे. १९८५ साली त्यांनी मूर्तीचे कॉपीराईट घेतल्याचे सांगितले जाते. या मूर्तीसारखी दुसरी मूर्ती कोणालाही बसविता येत नाही. २००७ साली जळगाव येथील संत ज्ञानेश्वर मंदिरात योगेश्वर कृष्णाची मूर्ती बसविण्यात आली होती. स्वाध्याप परीवाराच्या वतीने तक्रार करण्यात आल्यानंतर ही मूर्ती तेव्हाच्या जळगाव पोलीस अधीक्षकांनी जप्त केली होती.
माझा प्रश्न : मूर्तीचे कॉपी राईट घेण्याचा शास्त्रीबुवांचा उद्देश काय? आपले वेगळेपण ठेवण्यासाठीच हा खटाटोप केलेला आहे, असे दिसून येते. स्वतंत्र धर्मस्थापनेची ही पूर्वतयारी होती का?

६. स्वाध्याय परीवाराच्या सर्व दैनंदिन प्रार्थना संस्कृतात आहेत. खेड्यापाड्यातील अज्ञानी लोकांच्या त्या गळी उतरविण्यात येत आहेत.
माझा प्रश्न : यातूनही दोन प्रश्न निर्माण होतात. प्रश्न १- संस्कृत मंत्रांचे अत्यंत चुकीचे उच्चार खेड्यातील लोक करतात. त्यातून अर्थाचे अनर्थ होतात. अर्थ समजत नसल्यामुळे हे त्या गोरगरीब लोकांच्या लक्षात येत नाही, एवढेच. मराठी संतांनी संस्कृताला दूर सारून लोकभाषा मराठीत ग्रंथ रचना केली. स्वाध्याय परीवार उलटी गंगा वाहवून लोकांना पुन्हा संस्कृताकडे नेऊ पाहत आहे. परीवाराला लोकभाषेचा एवढा तिटकारा का? प्रश्न १- चुकीचा मंत्र म्हटल्यास अयोग्य फळ मिळते, असे वेदांत म्हटले आहे. वृत्रासुराच्या आईला इंद्राला मारणारा मुलगा हवा होता. ब्रह्मदेवाकडे वर मागताना तिने विसर्ग चुकीच्या ठिकाणी वापरला. त्यामुळे तिला इंद्राकडून मारला जाणारा वर मिळाला. या संबंधीचा -यजमानम् हिनस्ती- हा संस्कृत श्लोक फार प्रसिद्ध आहे. अशा फलप्राप्तीला जबाबदार कोण?  
सारांश : वरील सर्व चर्चेचा सारांश काढताना मला दोन तीन गोष्टी प्रकर्षाने दिसतात. स्वाध्याय परीवाराने स्वतंत्र धर्म निर्मितीच्या दिशेने प्रयत्न चालविला आहे. त्यात काही चूक आहे, असे नाही. या देशात कोणालाही कोणताही धर्म स्वीकारण्याचा अधिकार आहे. तसेच आपले स्वतंत्र धर्ममत प्रतिपादन करण्याचा अधिकार आहे. स्वाध्याय परीवाराला स्वतंत्र धर्मस्थापना करायवयाची असल्यास कोणाचीच हरकत नाही. फक्त त्यांनी त्यातील छुपेपणाचा त्याग करावा. उघडपणे आपले मत प्रतिपादन करावे. हिंदू धर्माच्या अडून त्यांनी हे उद्योग करू नये. छुपेपणा ही संघाची कार्य पद्धती आहे. त्याच मार्गाने स्वाध्याय परिवार चालला आहे.  

अनिता पाटील, औरंगाबाद.

Tuesday, 11 October 2011

गोमांस भक्षण : इतिहासाचा गळा घोटण्याचे कारस्थान !


विदेशात खास मांसासाठी ‘कॅटल फार्मसङ्क विकसित
केले आहेत. या फार्ममध्ये केवळ मांसासाठी जनावरांचे
 पालन केले जाते. अमेरिकेतील हा एक कॅटलफार्म
.................................................................................................
गायीच्या पोटात ३३ कोटी देव असतात, अशी अंधश्रद्धा ब्राह्मणांनी या देशात पसरवली. लोकांच्या भावना भडकावण्यासाठी ब्राह्मणवादी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गोहत्याबंदीसाठी आंदोलन करून पाहिले. अजूनही त्यांच्याकडून अशा आंदोलनाचे चाळे सुरूच असतात. परंतु भारतात एकेकाळी गोमांस खाल्ले जात होते. खुद्द ब्राह्मणांचे पूर्वजही त्याकाळी गोमांस भक्षण करीत होते, असे संशोधन करणारे एक पुस्तक दिल्ली विद्यापीठाचे एक विद्वान प्राध्यापक डॉ. डी. एन. झा यांनी लिहिले आहे. हे पुस्तक प्रकाशित होऊ नये यासाठी काही ब्राह्मणवादी (हिंदुत्ववादी)  संघटना झा यांना आता धमक्या देत आहेत. या विषयी एकता या स्वयंसेवी संस्थेचे एक सदस्य राम पुनियाणी यांनी 'द हिंदू'मध्ये ‘Beef eating: strangulating history' (अर्थ- गोवंशी जनावरांचे मांस भक्षण : इतिहासाचा गळा घोटण्याचे कारस्थान) या नावाने एक लेख लिहिला आहे. १४ ऑगस्ट २०११ रोजी हा लेख हिंदूमध्ये प्रसिद्ध झाला. हा लेख तज्ज्ञ आणि विचारी वाचकांसाठी मी येथे देत आहे. या लेखाची 'द हिंदू'ची मूळ लींकही लेखासोबत जोडली आहे. लींकवर क्लिक करून आपण थेट हिंदूच्या पानावर जाऊन हा लेख वाचू शकाल.

धन्यवाद.

आपली लाडकी बहीण
अनिता पाटील, औरंगाबाद.
................................................................................................................
हिंदूमध्ये प्रसिद्ध झालेला हाच तो लेख : 

Beef eating: strangulating history

While one must respect the sentiments of those who worship cow and regard her as their mother, to take offence to the objective study of history just because the facts don't suit their political calculations is yet another sign of a society where liberal space is being strangulated by the practitioners of communal politics. [text Tag=blue-tint][/Text]PROF. D. N. JHA, a historian from Delhi University, had been experiencing the nightmares of `threats to life' from anonymous callers who were trying to prevail upon him not to go ahead with the publication of his well researched work, Holy Cow: Beef in Indian Dietary Traditions.

As per the reports it is a work of serious scholarship based on authentic sources in tune with methods of scientific research in history. The book demonstrates that contrary to the popular belief even today a large number of Indians, the indigenous people in particular and many other communities in general, consume beef unmindful of the dictates of the Hindutva forces.

It is too well known to recount that these Hindutva forces confer the status of mother to the cow. Currently 72 communities in Kerala - not all of them untouchables - prefer beef to the expensive mutton and the Hindutva forces are trying to prevail upon them to stop the same.

Not tenable

To begin with the historian breaks the myth that Muslim rulers introduced beef eating in India. Much before the advent of Islam in India beef had been associated with Indian dietary practices. Also it is not at all tenable to hold that dietary habits are a mark of community identity.

A survey of ancient Indian scriptures, especially the Vedas, shows that amongst the nomadic, pastoral Aryans who settled here, animal sacrifice was a dominant feature till the emergence of settled agriculture. Cattle were the major property during this phase and they offered the same to propitiate the gods. Wealth was equated with the ownership of the cattle.

Many gods such as Indra and Agni are described as having special preferences for different types of flesh - Indra had weakness for bull's meat and Agni for bull's and cow's. It is recorded that the Maruts and the Asvins were also offered cows. In the Vedas there is a mention of around 250 animals out of which at least 50 were supposed to be fit for sacrifice and consumption. In the Mahabharata there is a mention of a king named Rantideva who achieved great fame by distributing foodgrains and beef to Brahmins. Taittiriya Brahman categorically tells us: `Verily the cow is food' (atho annam via gauh) and Yajnavalkya's insistence on eating the tender (amsala) flesh of the cow is well known. Even later Brahminical texts provide the evidence for eating beef. Even Manusmriti did not prohibit the consumption of beef.

As a medicine

In therapeutic section of Charak Samhita (pages 86-87) the flesh of cow is prescribed as a medicine for various diseases. It is also prescribed for making soup. It is emphatically advised as a cure for irregular fever, consumption, and emaciation. The fat of the cow is recommended for debility and rheumatism.

With the rise of agricultural economy and the massive transformation occurring in society, changes were to be brought in in the practice of animal sacrifice also. At that time there were ritualistic practices like animal sacrifices, with which Brahmins were identified. Buddha attacked these practices. There were sacrifices, which involved 500 oxen, 500 male calves, 500 female calves and 500 sheep to be tied to the sacrificial pole for slaughter. Buddha pointed out that aswamedha, purusmedha, vajapeya sacrifices did not produce good results. According to a story in Digha Nikaya, when Buddha was touring Magadha, a Brahmin called Kutadanta was preparing for a sacrifice with 700 bulls, 700 goats and 700 rams. Buddha intervened and stopped him. His rejection of animal sacrifice and emphasis on non-injury to animals assumed a new significance in the context of new agriculture.

The threat from Buddhism

The emphasis on non-violence by Buddha was not blind or rigid. He did taste beef and it is well known that he died due to eating pork. Emperor Ashok after converting to Buddhism did not turn to vegetarianism. He only restricted the number of animals to be killed for the royal kitchen.

So where do matters change and how did the cow become a symbol of faith and reverence to the extent of assuming the status of `motherhood'? Over a period of time mainly after the emergence of Buddhism or rather as an accompaniment of the Brahminical attack on Buddhism, the practices started being looked on with different emphasis. The threat posed by Buddhism to the Brahminical value system was too severe. In response to low castes slipping away from the grip of Brahminism, the battle was taken up at all the levels. At philosophical level Sankara reasserted the supremacy of Brahminical values, at political level King Pushyamitra Shung ensured the physical attack on Buddhist monks, at the level of symbols King Shashank got the Bodhi tree (where Gautama the Buddha got Enlightenment) destroyed.

One of the appeals to the spread of Buddhism was the protection of cattle wealth, which was needed for the agricultural economy. In a way while Brahminism `succeeded' in banishing Buddhism from India, it had also to transform itself from the `animal sacrifice' state to the one which could be in tune with the times. It is here that this ideology took up the cow as a symbol of their ideological march. But unlike Buddha whose pronouncements were based on reason, the counteraction of Brahminical ideology took the form of a blind faith based on assertion. So while Buddha's non-violence was for the preservation of animal wealth for the social and compassionate reasons the counter was based purely on symbolism. So while the followers of Brahminical ideology accuse Buddha of `weakening' India due to his doctrine of non-violence, he was not a cow worshipper or vegetarian in the current Brahminical sense.

Despite the gradual rigidification of Brahminical `cow as mother' stance, large sections of low castes continued the practice of beef eating. The followers of Buddhism continued to eat flesh including beef. Since Brahminism is the dominant religious tradition, Babur, the first Mughal emperor, in his will to his son Humayun, in deference to these notions, advised him to respect the cow and avoid cow slaughter. With the construction of Hindutva ideology and politics, in response to the rising Indian national movement, the demand for ban on cow slaughter also came up. In post-Independence India RSS repeatedly raised this issue to build up a mass campaign but without any response to its call till the 1980s.

While one must respect the sentiments of those who worship cow and regard her as their mother, to take offence to the objective study of history just because the facts don't suit their political calculations is yet another sign of a society where liberal space is being strangulated by the practitioners of communal politics. We have seen enough such threats and offences in recent past - be it the opposition to films or the destruction of paintings, or the dictates of the communalists to the young not to celebrate Valentine's Day, etc., - and hope the democratic spirit of our Constitution holds the forte and any threat to the democratic freedom is opposed tooth and nail.

Prof. RAM PUNIYANI
A member of EKTA (Committee for Communal Amity), मुंबई
...................................................................................................................
‘द हिंदू'मधील लेखाची मूळ लींक
http://hindu.com/2001/08/14/stories/13140833.htm
........................................................................................................................

Friday, 23 September 2011

अखरे ब्राह्मण नरके-सोनवणी-रामटेके यांच्यावर उलटले!


हरी नरके आणि संजय सोनवणी मधुकर रामटेके ही मंडळी अलिकडे ब्राह्मणांची बाजू घेऊन निकराने लढत आहेत. हरी नरके तर बिनजानव्याचे ब्राह्मण म्हणूनच हल्ली मिरवित असतात. मात्र जात्यंध सनातनी ब्राह्मणांना कधीही बहुजनांविषयी आस्था नव्हती, आजही नाही. हे कडवट सत्य नरके-सोनवणी-रामटेके हे त्रिकुट विसरले. स्वत:ला ब्राह्मणांच्या कळपात समाविष्ट करून घेण्यासाठी त्रिकुटाचा आटापिटा सुरूच राहिला. ब्राह्मणांना या त्रिकुटाबद्दल अजिबात आस्था नाही. ब्राह्मण यांना भाडोत्री सैनिक यापेक्षा जास्त किंमत  द्यायला तयार नाही. 
उपकारांची परतफेड ब्राह्मणवाद्यांनी केली अपकाराने!  
हे मी उगाच बोलायचे म्हणून बोलत नाही. सध्या फेसबुकवरील ब्राह्मणांमधून फिरणारया एका 'फोटो नोट'चा पुरावा समोर ठेवून मी बोलत आहे. सारे एका माळेचे मणी असे या नोटचे नाव आहे. या नोटमध्ये अनुक्रमे संभाजी ब्रिगेडचे भैय्या पाटील, मधुकर रामटेके, मूलनिवासीचे विलास खरात, तसेच संजय सोनवणी हरी नरके यांच्या विरुद्ध विषारी फुत्कार सोडण्यात आले आहेत. या पोस्टखालील चर्चेत माझ्या (अनिता पाटील) नावाचा तसेच महावीर सांगलीकर यांचाही उद्धार करण्यात आला आहे. आमचे ठीक आहे. आम्ही उघडपणे ब्राह्मणी जातीयवादाविरुद्ध मैदानात उतरलो आहोत. तसेच आम्ही अशा टीकेला कवडीची किंमत देत नाही. पण नरके, सोनवणी, रामटेके यांचे तर तसे नाही. ही मंडळी तर सनातनी ब्राह्मणवाद्यांसाठी सध्या रक्त आटवत आहे. या उपकारांची परतफेड ब्राह्मणवाद्यांनी अपकाराने केली आहे. उपकारकत्र्यावर सापासारखे उलटणे यालाच तर ब्राह्मणत्व म्हणतात. हरी नरके हेसुद्धा परवापर्यंत ब्राह्मणवादाची हीच व्याख्या करीत होते. मात्र भांडारकरमध्ये वर्णी लागली आणि त्यांचा रंग पालटला. जानवे गळ्यात नसले म्हणून काय झाले, आपल्याला या लोकांनी ब्राह्मण करून घेतले आहे, असा भ्रम त्यांना होऊ लागला. ज्यांच्यासोबत ते एकेकाळी राहिले, वाढले, त्यांच्यावरच ते दुगाण्या झाडू लागले. भांडारकरच्या जुनाट जळमटलेल्या कागदांनी एवढी नशा चढू शकते, याचा विचार कोणी स्वप्नातही केला नसेल.
ब्राह्मणवादी विकृतीला शोभणारी भाषा! 
असो. ब्राह्मणवाद्यांत फिरणारी नोट पाहून नरके आणि त्यांच्या दोन्ही मित्रांची ही भांडारकरी नशा आता नक्कीच उतरेल. या नोटमधली भाषाही ब्राह्मणांच्या अश्लिल संस्कृतीला अगदीच शोभून दिसणारी आहे. पूर्वी ब्राह्मण धर्मग्रंथांत रासलीलादी श्रृंगारिक चाळे लिहून आपल्या मनातील विकृतीला वाट मोकळी करून देत असत. आता ती सोय राहिली नाही. त्यामुळे आता हे लेख असे चाळे करीत आहेत.
ब्राह्मण होण्याचे हरीपंतांचे स्वप्न भंगले 
मला या नोटमुळे फार धक्का बसला आहे. कारण हरीपंत नरके यांचे ब्राह्मण होण्याचे स्वप्न ब्राह्मणांनी या कानावरचे जानवे त्या कानावर घालावे एवढ्या सहजतेने उडवून लावले आहे. अरेरे, फार वाईट झाले.
वाचकांच्या माहितीसाठी ब्राह्मणवाद्यांत फिरणारी ही नोट खाली देत आहे. तिच्या दोन ठिकाणच्या पोस्ट माझ्या हाती लागल्या आहेत. त्या दोन्ही खाली टाकीत आहे. त्या जरूर वाचा.


हीच ती विषारी नोट 
नोट क्र. १ 


एकाच माळेचे मणी कुणीही सरळ नाही
१) भैय्या पाटील :- नावातच भैय्या मग नेमका कुणाचा सैय्या ?
२) मधुकर रामटेके :- नावात मधु पण आहे मात्र कडू आणि परत अण्णाव म्हणजे श्री रामांच्या टेकूवर
३) विलास खराटे :- विलासी माणूस आणि खेड्याचा भोगदास मूर्ख निवासी मल मूत्र वासी
४) संजय सोनवणी :- दोन्ही पक्षातील एकमेव प्राणी
आणि या सगळ्यांचा मेरू मणी
५) हरी नरके :- नावात हरी पण विचार नरकातल्या माणसांचे तोंडावर भोळा सांब पण आतून पाताळयंत्री
खेडेकरावर केस करून याने खेड्याला प्रसिद्धी मिळवून दिली काय शट वाकडे झाले खेड्याचे
केस करून नुसता मोठेपणा मिळवला भामट्याने पुण्याच्या भांडारकर निवडणुकीत केलेले
राजकारण तर सर्वश्रुत आहेच
 ·  · Share · September 16

  • Renukadas Muley and 10 others like this.
  • View 1 share

    • Nitin Pant Aaychya gaavaat ani Baaraachya bhaavaat!
      September 16 at 11:46am ·  ·  3 people

    • बन्सीधर देशपांडे या नरक्याला नरकात घाला दुतोंडी साप आहे हा
      September 16 at 6:52pm ·  ·  3 people

    • बन्सीधर देशपांडे याचे ऐकून दुतोंडी सापाला पण लाज वाटते आणि तो भांडारकर मधील सदस्यांसारखा मान खाली करून बसतो 
      भांडार कर मधील सगळे सभासद याचे चाटे आहेत

      September 16 at 7:06pm ·  ·  1 person

    • बन्सीधर देशपांडे विलास खरात याचा मुल निवासी चाटया आहे
      September 16 at 7:07pm ·  ·  1 person

    • Dhananjay Dixit vilas kharat palun gela group madhun
      September 16 at 7:09pm ·  ·  3 people

    • चाव्कुरा पोपट palputyaa
      September 16 at 7:12pm · 

    • चाव्कुरा पोपट pan he maaleche mani aahet ka...maaleche dhonde aahet
      September 16 at 7:13pm ·  ·  1 person

    • Vikrant Phadke 
      माफ करा बन्सिजी पूर्ण घटना घडेपर्यंत असा समज करून घेऊ नये .......
      वरचे दोन आहेतच हरामी 
      पण प्रा. मधुकरजी , संजयजी आणि नरके साहेबांनी केस घातली आहे 
      आत्ता भारतीय कायदा सबळ नाही त्याला ते तरी काय करणार हो ? 
      खेड्या सुटेलच ना? कायदा बदलाने गरज...See More

      September 16 at 7:16pm ·  ·  4 people

    • Prasad Raut gote??? sadhe nahit narmadetle gote aahet..........tyanchyavarun changlya vicharancha kitihi pani gela tari kahi farak nahi tyana
      September 16 at 7:17pm ·  ·  2 people

    • Dhananjay Dixit pls follow brigedi athttps://www.facebook.com/groups/162182097180497/

      September 16 at 7:17pm · 

    • Kumar Dewlalkar मला दिलीट केलं वरील ग्रुप मधून..
      September 16 at 7:19pm ·  ·  2 people

    • Dhananjay Dixit so report dis
      September 16 at 7:22pm · 

    • Vikrant Phadke Questions And Answers ha BAI cha group ahe na?
      September 16 at 7:34pm · 

    • Nitin Pant Ho
      September 16 at 7:47pm · 

    • चाव्कुरा पोपट BAI ne malaa pan delete kela
      September 16 at 8:51pm · 

    • बन्सीधर देशपांडे हे बाई काय आहे
      Monday at 9:08am · 

    • Renukadas Muley बन्सीधरजी ,... रामटेके सोडून बाकीचे चौघे विषारी साप आहेत. त्यातील तो तोतया भय्या पाटील तर माझ्या समोरून गांडीला पाय लावून पाळलाय. आणखी दोन नवे आपण सोडलीत. एक म्हणजे अनिता पाटील उर्फ शिखंडी ( फेक अकौंट ) आणि या सर्वांचा शिरोमणी महावीर ( महामूर्ख ) सांगलीकर हे दोन महाभाग असून अन्य बरीच मोठी पिलावळ वळ-वळ करणारी आहे.
      Tuesday at 11:55am ·  ·  2 people

    • बन्सीधर देशपांडे Renukadas Muley dada रामटेके सोडून ???? patat nahi tyache vichar wacha
      Yesterday at 12:57am · 

.........................................................................................................
तृतीयरत्न रेणुकादास मुळे याच्या वाल वर सापडलेली हि आणखी एक  नोट
नोट क्र. २  
................................................................................................................

Renukadas Muley shared बन्सीधर देशपांडे's photo.


एकाच माळेचे मणी कुणीही सरळ नाही 
१) भैय्या पाटील :- नावातच भैय्या मग नेमका कुणाचा सैय्या ?
२) मधुकर रामटेके :- नावात मधु पण आहे मात्र कडू आणि परत अण्णाव म्हणजे श्री रामांच्या टेकूवर 
३) विलास खराटे :- विलासी माणूस आणि खेड्याचा भोगदास मूर्ख निवासी मल मूत्र वासी 
४) संजय सोनवणी :- दोन्ही पक्षातील एकमेव प्राणी 
आणि या सगळ्यांचा मेरू मणी 
५) हरी नरके :- नावात हरी पण विचार नरकातल्या माणसांचे तोंडावर भोळा सांब पण आतून पाताळयंत्री 
खेडेकरावर केस करून याने खेड्याला प्रसिद्धी मिळवून दिली काय शट वाकडे झाले खेड्याचे 
केस करून नुसता मोठेपणा मिळवला भामट्याने पुण्याच्या भांडारकर निवडणुकीत केलेले 
राजकारण तर सर्वश्रुत आहेच


 ·  ·  · Tuesday at 11:56am · Privacy: