Showing posts with label आपण सगळे ब्राह्मण. Show all posts
Showing posts with label आपण सगळे ब्राह्मण. Show all posts

Thursday, 14 February 2013

ब्राह्मण तरुण ड्रग्जच्या आहारी गेले आहेत काय?

‘आपण सगळे ब्राह्मण'वर ‘गर्द'भरी कहाणी!

--राजा मइंद

आदरणीय अनिता ताई यांनी फेसबुकवरील +आपण सगळे ब्राह्मण+ या गोपनीय ग्रुपमध्ये काय कारवाया चालतात याचा पर्दाफाश केला होता. त्याला आता सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ उलटून गेला आहे. या ग्रुपवाल्यांनी अनिता तार्इंच्या नावाचा एवढा धसका घेतलेला आहे की, +अनिता पाटील+ यांच्या विषयी कोणतीही पोस्ट टाकू नये, अशी लेखी सूचना ग्रुपच्या नियमावलीत टाकण्यात आलेली आहे. तार्इंनी ग्रुपचा पर्दाफाश केला होता, त्यानंतर काही काळ ही सूचना गायब झाली होती. ती आता पुन्हा अवतरली आहे. अनिता तार्इंच्या लेखांनंतर या ग्रुपच्या अ‍ॅडमीनची नावे गायब झाली होती. तीही आता अवतरली आहेत. 

पूर्वी ब्राह्मण पोथ्या बिथ्या वाचायचे आता
गर्दुल्याच्या कहाण्या वाचत आहेत

अनिता ताई करीत असलेल्या समाज प्रबोधनावर लेखी बंदी घालणा-या या ग्रुपवर काय चर्चा चालते, हे पाहण्यासाठी आम्ही येथे एक गुप्त फेरफटका मारला. त्यातून हाती आलेली माहिती विस्मयकारी आहे. या ग्रुपवर सध्या एका ड्रग अ‍ॅडिक्टची लेखमाला सुरू आहे. आपण कसे ड्रग घेत होतो. त्यासाठी कशा चो-या-चपाट्या करीत होतो, याचा कहाण्या रंगवून सांगत आहे. अरेबियन नाईट्समधील सुरस आणि चमत्कारिक कहाण्याही या गर्दुल्याच्या कहाण्यांपुढे फिक्या पडतील. गेल्या अनेक महिन्यांपासून या  ‘गर्द'भ-या कहाण्यांचा रतिब येथे सुरू आहे. +आपण सगळे+वाले या कहाण्या चवीन वाचित आहेत. या इसमाचे वडील आजारी असतानाही तो ड्रगचे व्यसन सोडत नव्हता, इतकी ही कहाणी गर्दभरी आहे. पूर्वी ब्राह्मण पोथ्या बिथ्या वाचायचे आता गर्दुल्याच्या कहाण्या वाचत आहेत. घोर कलियुग म्हणतात ते हेच.

'गर्द'भरी कहाणी प्रसिद्ध करण्यामागील हेतू काय?
ब्राह्मणांनी काय वाचावे अथवा काय वाचू नये, हे सांगण्याचा आमचा हेतू नाही. आम्हाला प्रश्न एवढाच पडला आहे की, गर्दुल्याची ही गर्दभरी कहाणी +आपण सगळे ब्राह्मण+वर का प्रसिद्ध होत आहे? ब्राह्मण तरुण गर्दच्या आहारी गेले आहेत आणि त्यांना त्यातून सोडविण्यासाठी अशा कहाण्या देणे आवश्यक आहे, असे ग्रुपच्या अ‍ॅडमीनला वाटते की काय? की गर्द ओढण्यासाठी किती कष्ट उपसावे लागतात, किती निलाजरेपणा करावा लागतो, याचे प्रशिक्षण ब्राह्मण तरुणांना मिळावे, असा अ‍ॅडमीनचा हेतू आहे? 

अनिता पाटील विचार मंचाच्या वाचकांसाठी या 'गर्द'भ-या 
कहाण्यामधील काही अंश आम्ही येथे घेऊन आलो आहोत :


नोकरी ..व्यवसाय ..व्यसन !
( भाग ९४ वा )

आयुर्वेदिक हॉस्पिटल मध्ये वडील सुमारे २ महिने होते ..मात्र फारसा फरक पडला नाही त्यांच्या तब्येतीत ..दरम्यान आईची फार दगदग होई ..माझ्या पुतण्या लहान असल्याने वहिनीना घरकामात जास्त वेळ देणे कठीण होते . शिवाय त्यांनी गाण्याचे क्लास घेण्यास सुरवात केलेली होती .रोज सायंकाळी चार ते आठ त्या गाण्याचे क्लास घेत असत ..काही दिवस मी देखील कौतुकाने वाहिनीकडे पेटी शिकलो ..फक्त ' सावन आया आज सुहावन ..सखिया मंगल गावत गाना ' इतकीच प्रगती केली ...आईला घरातली कामे आटोपून दिवसा दवाखान्यात काही वेळ बसावे लागे ..भाऊ वेळ मिळेल तसा दिवसा किवा रात्री दवाखान्यात येतच होता .. मी रिकामा होतो मात्र ..व्यसने पुन्हा सुरु आल्याने सगळ्यात जास्त ' बिझी ' झालो होतो ...म्हणजे दिवसभर पैसे कोठून मिळतील ? ..काय लोचा करायचा ? ..कसे जमवायचे ?या विचारात व्यस्त राहू लागलो होतो ...रात्री काही नाही तर निदान गांजा पिण्याची सोय करतच होतो .हॉस्पिटल मध्ये माझा ट्रान्झीस्टर नेला होता .. मग रात्री झोप येईपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी लागलेली विरहगीते ऐकत बसे ..शेवटी वडिलांना घरी आणण्याचे ठरले ..घरीच औषधे घेऊन ..फिजीयोथेरपी करत रहावी असे ठरले .

वडील घरी आल्यावर ..एका परिचितांच्या ओळखीने मला ' नवदुर्गा इंडस्ट्रीज ' , अंबड येथे पर्चेस विभागात नोकरी मिळाली ..कंपनी ला लागणारे साहित्य नाशिक मधूनच खरेदी करायचे काम माझ्याकडे होते ..कंपनीने ऐक स्कुटर देखील दिली होती मला फिरायला ..सुरतीला काही दिवस मी नोकरी नीट केली .. व्यसने अगदी रोज नाही तरी संधी मिळेल तेव्हा सुरूच होती ..एकदा मी कंपनीचे महत्वाचे काम असतांना स्कुटर घेऊन दिवसभर गायब राहिलो ..आणि मालकाचे डोके फिरले ..त्याने मला नोकरी वरून काढून टाकले ..घरी मात्र मी खरी परिस्थिती न सांगता ..काहीतरी समर्थने देऊन वेळ निभावून नेली ..मग आमच्या वाहिनीच्या वडिलांचे स्नेही श्री . वसंतराव नातू यांच्या ' मायबोली ' या वाचनालयात मला वाहिनीच्या वडिलांनी शब्द टाकला म्हणून नोकरी मिळाली ..अशोक स्तंभ येथून रविवार कारंजा कडे येणाऱ्या रस्त्यावर वाहिनीच्या वडिलांच्या मालकीचे ऐक छोटेसे दुकान होते ..ते वसंतराव नातू यांनी भाड्याने घेतले होते ..व तेथे त्यांनी त्यांच्या ' लायब्ररी ' ची ऐक शाखा सुरु केली होती ..मला ही छोटीशी लायब्ररी सांभाळण्याचे काम मिळाले .. .. सकाळी ९ ते रात्री साधारण साडेआठ पर्यंत मी तेथे थांबत असे ..नवीन सभासद करून घेणे ..त्यांना पुस्तके बदलून देणे ..अश्या स्वरूपाचे काम होते .. वसंतराव नातू हे परिवहन मंडळातून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी हा वाचनालयाचा व्यवसाय सुरु केला होता ..त्यानाही वाचनाची खूप आवड होती व पाहता पाहता त्यांनी हा खाजगी वाचनालयाचा व्यवसाय खूप वाढवला होता ..त्या वेळी त्यांच्याकडे अंदाजे सुमारे दोन हजार सभासद असावेत..वसंतरावाना तीन मुली होत्या तिघींचे लग्न झालेले होते .. नाशिक शहरातील परशुराम सायखेडकर नाट्यगृहाच्या शेजारी असलेले ' सार्वजनिक वाचनालय 'आणि हे दुसरे खाजगी ' मायबोली ' वाचनालय प्रसिद्ध होते . खरेतर मला देखील वाचनाची आवड असल्याने ही नोकरी अगदी चांगलीच होती पण .. माझ्या मनातील व्यसनाचे आकर्षण काही कमी होत नव्हते ..!

अकोल्याला अनघाला पत्र पाठविताना मी सलील च्या नावावर पाकिटात पत्र पाठवीत होतो ..मलाही ती सलीलच्याच नावाने पत्र पाठवीत असे ..त्या काळी मोबाईल ही भानगड अस्तित्वातच नव्हती तसेच सर्वत्र टेलिफोन पण नव्हते त्यामूळे आमचा संपर्क महिन्यातून फार तर दोन वेळा आणि तो देखील पत्राद्वारे होऊ लागला .. ' लायब्ररी ' चे काम अजून वाढावे म्हणून नातू काकांनी मला नवीन कल्पना सुचविली ..त्यांनी पेपर मध्ये घरपोच लायब्ररी च जाहिरात दिली आणि जे लोक संपर्क करतील त्यांच्या कडून महिना थोडे जास्त पैसे वर्गणी म्हणून आकारून त्यांना घरपोच पुस्तक बदलून देण्याचे काम मला सोपवले ..तसेच मी देखील वेगवेगळ्या वसाहतीत सायकलने फिरून घरोघरी जाऊन घरपोच वाचनालयाची माहिती देवून सभासद बनविणे सुरु केले .सोबत मी दोन मोठ्या पिशव्यात दिवाळी अंक , कादंबऱ्या ..धार्मिक ..आत्मचरित्रे अशी वेगवेगळ्या प्रकारची मिळून चाळीस ऐक पुस्तके नेत होतो ..अनेकदा मी पावती न बनवता सभासद बनवून त्यांचे वर्गणीचे पैसे हडप करू लागलो ..तुलनेत हे पैसे हडपण्याचे प्रमाण कमी असल्याने नातुकाकांच्या लक्षात येत नव्हते . काही दिवसांनी रविवार कारंजावरचे भाड्याचे दुकान बंद करून ' मायबोली ' वाचनालय एम .जी रोडवर नव्याने झालेल्या ' अभ्यंकर प्लाझा ' या ठिकाणी मालकीच्या जागेत गेले तेथे सकाळी व संध्याकाळी पुस्तक वगैरे बदलून देण्यासाठी दोन मुली होत्या ..त्या वेळात मी घरपोच लायब्ररी चे काम करत असे व दुपारच्या वेळात वाचनालयात थांबत असे ..नातू काका खूप उत्साही होते ..त्यांना माझ्या पूर्वीच्या जीवनाबद्दल माहिती असूनही माझ्यावर विश्वास ठेवत होते ..ते मला व्यवसायाच्या नवीन नवीन कल्पना सांगत असत ..दुपारच्या वेळी वाचनालयात जास्त गर्दी नसते म्हणून त्यांनी मला दुपारी पार्ट टाईम तेथे वाचनालयाच्या बाजूलाच असलेल्या ' साहिल ' वॉच क. या घडयाळे व त्यांचे स्पेअर पार्टस असलेल्या दुकानात श्री . खरे यांच्या कडे काम करण्यास सुचविले ..त्यानुसार मी ' साहिल ' वॉच मध्ये देखील काम करू लागलो .. माझी लवकरात लवकर भरभराट करावी ही नातुकाकांची इच्छा होतील ..परंतु स्वतच्या भल्याची मला समज यायची असल्याने ..मिळणारे सर्व पैसे मी व्यसनात उडवत होतो ..कष्टदेखील भरपूर करत होतो पण शेवटी ' देणाऱ्याचे हात हजारो ..दुबळी माझी झोळी ' असे झाले होते .. साहिल वॉच कंपनी चे मालक खरे देखील खूप कल्पक होते ..रक्षाबंधनाच्या वेळी त्यांनी मुंबईहून घाऊक भावाने राख्या मागवल्या होत्या त्या विकण्यासाठी देखील मी रक्षा बंधनाच्या चार दिवस आधीपासून समोरच्या फुटपाथ वर स्टुल घेऊन बसलो ..रक्षा बंधनाच्या आदल्या दिवशी बऱ्याच राख्या उरल्या .. सगळ्या खपाव्यात म्हणून मेनरोड ला देखील हातगाडी वर राख्या मांडून विकल्या .. या विक्रीत माझे वेगळे कमिशन असे ..सगळे पैसे शेवटी गांजाच्या ..दारूच्या ..ब्राऊन शुगरच्या वर खर्च होत .

राखीचा सिझन संपल्यावर नातुकाकानी नवीन कल्पना मांडली ' तुषार उद्योग ' नावाने व्यवसाय सुरु करण्याची ..माझ्या नावाने हा व्यवसाय असणार होता ..काही खाण्याचे पदार्थ आणि इतर वस्तू ' मायबोली ' वाचनालयाच्या जागेतच विक्रीला ठेवायचे आणि ते काम मी सांभाळायचे अशी त्यांची कल्पना होती ..जर मी नीट लक्ष घालून व्यवसाय वाढविला असता तर मग वेगळी जागा व जास्तीचे भांडवल देण्यासाठी देखील ते मदत करणार होते . मी देखील उत्साहाने एके दिवशी स्वतच्या हाताने ऐक पत्र्याचा बोर्ड बनवून त्यावर पेंट ने ' तुषार उद्योग ' हे नाव रंगविले ..अर्थात त्या दिवशी मस्त डोस झाला होता ब्राऊन शुगरचा म्हणून हा अतिरिक्त उत्साह होता .. तो बोर्ड वाचनालयाच्या बाहेर लावला ..काकांनी सांगली , कोल्हापूर वगैरे ठिकाणी प्रसिध्द असलेले ' भडंग ' मागवले होते ते विक्रीस ठेवले ..तसेच बिस्किटाचे पुडे .. वेफर्स असे पदार्थ विक्रीस ठेवले ..नंतर दोन दिवसात त्यांनी पाठ वगैरे शेकण्यासाठी मिळणारी इलेक्ट्रिकची पिशवी देखील मला विक्रीसाठी आणून दिली .. या निमित्ताने माझ्या खिश्यात जसे जास्त पैसे येऊ लागले तसे व्यसन वाढू लागले ..इतके सगळे पैसे व्यसनात उडवून देखील कधी कधी घरी देखील पैसे मागत होतो ..वडील पूर्वी माझ्या बाबतीत ऐक वाक्य नेहमी म्हणायचे की हा ' कुबेराला देखील भीक मागायला लावेल ' ते खरेच होते ... शेवटी तब्येतीवर सगळ्याचा परिणाम दिसू लागला मी पुन्हा खंगत चाललो होतो ..भावाच्या लक्षात सगळे आलेले होते फक्त जो पर्यंत घरी जास्त त्रास देत नाही तो पर्यंत तो कटकटी नकोत म्हणून बोलला नव्हता ..अधून मधून आमचे खटके उडत असत पण आई पटकन मध्यस्ती करत होती .. तब्येतीवर परिणाम होत असल्याने मग मी कामावर दांड्या मारू लागलो ..हळू हळू नातुकाका माझ्याबाबत निराश होऊ लागले !



Saturday, 30 June 2012

ही पाहा ब्राह्मणांची गुप्त कारस्थाने

फेसबुकवरील ब्राह्मणांचे जातीयवादी गुप्त ग्रुप बहुजन समाजाविरुद्ध कारस्थाने करीत आहेत. याचा हा पाहा पुरावा. अनिता पाटील यांचा ब्लॉग बंद पाडण्यासाठी आता हे लोक कारस्थाने करीत आहेत. त्यासाठी आपण सगळे ब्राह्मण आणि अखिल भारतीय पेशवा संघटना या गुप्त ग्रुपवरन अ‍ॅब्युज रिपोर्टचे आवाहन सध्या केले जात आहे. अनिता पाटील या नावाची ब्राह्मणांनी किती दहशत घेतली आहे, हे यावरून स्पष्ट होते. ज्यांच्या मनात पाप आहे, ज्यांची बाजू असत्य आहे, जे विचारांचा सामना करू शकत नाही, असेच लोक अशा प्रकारची गुप्त कारस्थाने करीत असतात.


हे लोक स्वतःभोवती तिरस्कारांचे डोंगर उभे करीत आहेत

बहुजन समाज आणि बहुजन समाजातील व्यक्ती, महापुरूष यांच्या विरोधात कारस्थाने करीत राहिल्याने ब्राह्मणांबद्दलचा समाजात वाढतच जाईल, हे या लोकांना कळत नाही. हे लोक स्वतःभोवती तिरस्कारांचे डोंगर उभे करीत आहेत. ब्लॉग बंद झाल्याने काही बिघडणार नाही. जातीयवादी ब्राह्मणांनी जगदगुरू संत तुकारामांच्या वह्या बुडविल्या म्हणून तुकारामांचे अर्भग बुडाले नाही. उलट तुकारामांची लोकप्रियता वाढली. माझा ब्लॉग बंद केला म्हणून काही फरक पडणार नाही. हा ब्लॉग आता पुस्तक रूपाने येत आहे.

ब्राहणांच्या कपटकारस्थांचा पुढे दिलेला पुरावा मला 
अखिल पेशवा संघटना या ग्रुपवर मिळाला आहे :

.......................................
अनिता पाटील चा ब्लोग बंद पाडा..हिंदूमध्ये जाती-पातीच्या आधारावर फूट पडण्याचा हा प्रयत्न हाणून पाडा भावांनो.
खाली लिंक दिली आहे तेथे जाऊन ब्लोग बंद करण्यासाठी रिपोर्ट करा..
रिपोर्ट कशी करावी..:-
लिंक वर क्लिक करा..वरती Report Abuse लिहलेले दिसेन त्यावर क्लिक करा..
मग Hate or violence वर क्लिक करा.. सगळ्यात शेवटी continue वर क्लिक करा..
http://anita-patil.blogspot.in/2012/06/blog-post_20.html

 ·  ·  ·  · Yesterday at 2:46pm

Wednesday, 27 June 2012

'आपण सगळे ब्राह्मण' की 'आपण सगळे घाबरट'!

आपण सगळे ब्राह्मण या ग्रुपचा लोगो.
हाच लोगो ब्राह्मण महासभेनेही स्वीकारला आहे.
.......................................................................................................................................
ब्राह्मणांतर्फे अत्यंत गुप्त पद्धतीने चालविण्यात येत असलेल्या +आपण सगळे ब्राह्मण+ या फेसबुक ग्रुपवरील लोकांनी अनिता पाटील या नावाचा धसका घेतला आहे. या ग्रुपवर अनिता पाटील यांच्या विषयी कोणतीही पोस्ट टाकायची नाही, असा नियमच या लोकांनी करून ठेवला आहे. या नियमाचे उल्लंघन करणारावर अ‍ॅडमीनकडून हकालपट्टीची कारवाई केली जाते. +आपण सगळे ब्राह्मण+ या ग्रुपविषयीची माहिती +अबाऊट+ या सदराखाली देण्यात आली आहे. ग्रुपची माहिती १) ग्रुप कशासाठी? आणि २) कशासाठी नाही? अशा दोन पोटमथळ्यांत समाविष्ट करण्यात आली आहे. +कशासाठी नाही+ या पहिल्याच मुद्यात अनिता पाटील यांनी लिहिलेल्या कोणत्याही लेखावर प्रतिक्रिया देऊ नये असे सदस्यांना बजावण्यात आले आहे. 

यांना पाण्यातही अनिता पाटील दिसते का?
अनिता पाटील यांचा 'अ' सुद्धा उच्चारायचा नाही, असा फतवा काढल्यानंतरही या ग्रुपमधील सदस्य अनिता पाटील ब्लॉगवरील लेखांवर टीका टिप्पणी करणयाचे सोडायला तयार नव्हते. त्यानंतर ग्रुपच्या अ‍ॅडमीनने सक्त ताकिद देणारे दुसरे कलम या सदरात घातले. +अनेक वेळा विनंती करूनही सभासद लव्ह जिहाद, अनिता पाटील, संभाजी ब्रिगेड ... (इ. अनेक विषयांची यादी येथे आहे) वर प्रतिक्रिया टाकीतच आहेत. त्यामुळे आता या विषयावर सक्त बंदी घालण्यात आली आहे.+ अशा आशयाची सक्त सूचना या कलमात टाकण्यात आली आहे. औरंगजेबाच्या सैनिकांनी संताजी आणि धनाजी यांचा एवढा धसका घेतला होता, की त्यांच्या घोड्यांनाही पाण्यात संताजी-धनाजी दिसत असत. आपण सगळे ब्राह्मण या ग्रुपवरील ब्राह्मणांची अवस्था अगदी अशीच झाली आहे. त्यांना सकाळी संध्येनंतर आचमन करायला घेतलेल्या पाण्यातही बहुधा अनिता पाटील हा ब्लॉग दिसत असावा. अनिता पाटील असे शब्द कानी पडताच ब्राह्मणवाद्यांच्या पोटात भीतीचा गोळा उठतो. याचे कारण अगदी साधे आहे. अनिता पाटील ब्लॉगवर जे सत्य मांडण्यात आले आहे, त्याचा प्रतिवाद होऊ शकत नाही. कारण ब्लॉगवरील प्रत्येक वाक्याला ब्राह्मणी ग्रंथांतील भक्कम पुरावा जोडण्यात आला आहे. त्यामुळे त्यांची भीतीने गाळण उडाली आहे. ग्रुपवर मात्र हे लोक शूरवीरतेचा आव आणत असतात. या परिस्थितीत एवढेच सांगावेसे वाटते की, +आपण सगळे ब्राह्मण+ हे नाव या ग्रुपला अजिबात शोभत नाही. +आपण सगळे घाबरट+ असे नाव ग्रुपला द्यायला हवे. ते अधिक शोभून दिसेल. 

+आपण सगळे ब्राह्मण+ या फेसबुक ग्रुपवर अ‍ॅडमीनने टाकलेले सर्व नियम खाली जसेच्या तसे :  


मित्र हो, बऱ्याच वेळेस हे विचारले गेले कि ह्या ग्रुप कश्यासाठी सुरु केला आहे, उद्दिष्ट आहे काय? नक्की काय करणार?
ह्याचे स्पष्टीकरण अनेक वेळा दिले गेले होते पण ति माहिती विखुरलेल्या स्वरूपात होती. म्हणून एकाच ठिकाणी सलग्न अशी देण्याचा प्रयत्न करतो आहोत. सूचना, दुरुस्ती व मार्गदर्शन ह्याचे स्वागतच असेल.
सुरुवातीला एक कबुली देणे गरजेचे आहे. मराठी टाईप करताना चूक झाली कि "आपण सगळे ब्राह्मण" ऐवजी " आपण सगळे ब्राम्हण" झाले. हे टाईप करताना काही मर्यादा होत्या, नजरेतून हि गोष्ट निसटली व नंतर 200 पेक्षा ज्यास्त सभासद झाल्याने ति चूक दुरुस्त करणे अशक्य झाले. त्याबाबत असंख्य वेळेस क्षमायाचना ही करून झाले. तरी सर्व सभासदांना नम्र विनंती कि झालेल्या ह्या चूकीची परत परत ग्रुप मध्ये चर्चा करू नये.
ग्रुप कशासाठी?
१) जे आपले बांधव व्यवसाय करतात त्यांना एकमेकांची मदत होवून व्यवसाय ही वाढेल व प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष आपल्याच बांधवांचा फायदा होईल. म्हणजे आपल्याला काही गोष्टींची, सेवेची आवशक्यता असेल, तर सर्व प्रथम आपल्यातलेच ही गरज भागवू शकणारे शोधणे. त्यासाठी सभासद आपल्या व्यवसायाची माहिती, जाहिरात करू शकतात. ज्यांना एखादी सेवा, खरेदी व मार्ग दर्शन हवे असेल तर ते इथे विनंती करू शकतात. जे सभासद ह्यातले जाणकार आहेत ते मदत करतील. जी मदत विनामूल्य करणे शक्य आहे ति केली जाईल. व जी मोबदला शिवाय करता येणार नाही ते सेवा देणारे व घेणारे मग एकमेकांच्या संपर्क व संवादाने ठरवतील. नवीन जे व्यवसायात प्रयत्न करू इच्छित असतील त्यांना नव्या नव्या संधीची माहिती मिळेल.


२) दुसरी गोष्ट म्हणजे नोकरीच्या संधी व त्यांची माहिती. आपले बरेच बांधव शासकीय, निमशासकीय, सहकारी, खाजगी व बड्या उद्योग समुहात निर्णय घेण्याचे अधिकार असलेल्या जागी काम करतात. त्यांनी त्यांना माहित असेलेल्या उपलब्ध संधींची माहिती इथे देणे म्हणजे आपल्यातील सभासदांना त्याचा फायदा होईल. बेरोजगार किंवा नोकरी बदलण्यासाठी जे प्रयत्न करतात त्यांना मदत होईल. नोकरी शोधणारे ही आपली माहिती देवू शकतील.

३) संवादातून विचारांचे आदान-प्रदान होईल, कलाकार, होशी कलाकार, वेगळ्या छंद जोपासणारे, काही हटके केलेले, काही आपल्या वेगळीच कला जोपासणारे ह्यांची माहिती सर्वांना होईल, त्याना व्यासपीठ मिळेल, कौतुकही होईल व एकादी चांगली संधी हे उपलब्ध होईल.

४) आपल्या समाजातील गरजवंत आहेत त्यांना शक्य असेल तेवढी मदत करणे. बऱ्याच भागात विशेष करून ग्रामीण भागात मुलींच्या शिक्षणा विषयी अनास्था दाखवली जाते. मग आर्थिक परस्थिती नाजूक असल्याचे कारण असते, मग कसेतरी करून लग्न करून दिले म्हणजे पालकांची जबाबदारी संपली. दुसरा हाही समज असा कि शिकून काय करणार, चूल व मुल ही सांभाळणे आहे. तसेच काही मुलांच्याही बाबतीत होते. शिक्षणात विशेष प्रगती नसेल कि लागलीच शिक्षण बंद केले जाते मग मिळेल त्या कामाला लावले जाते. शिक्षण नसल्याने मिळणारे काम हे अश्या तश्याच स्वरूपाचे असते. मग सोबत हे तशीच. हळू हळू व्यसने, बेफिकीरपणा, नको त्या मार्गाला जातात. मग पुढचे सगळेच बारगळते. म्हणतात कि घरातला एक जण शिकला कि पूर्ण घर सुधारते. हेच इथे होत नाही. अश्या गरजवंत विद्यार्थी शोधणे व त्यांना योग्य ति मदत करणे.

५) आता सर्वात महत्वाचा मुद्दा हा कि आर्थिक मदत कशी उभा करायची? त्यासाठी काही जेष्ठ व सन्मानीय सदस्यांशी चर्चा चालू आहे. एकादी एनजिओ सारखी संस्था स्थापन करणे, ज्यामुळे दानशूर व्यक्तीकडून देणगी स्विकारू शकू व योग्य त्या प्रकारे वापरता येईल. त्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेत एक खाते उघडावे म्हणजे इच्छुक तिथे आपली मदत जमा करतील. जशी जशी प्रगती होत जाईल, त्याची सविस्तर माहिती प्रसारित केली जाईलच.
सध्या तरी कार्यक्षेत्र मर्यादितच ठेवणे. नंतर अनेक गोष्टी करणे आहे पण सगळ्याच गोष्टी एकच वेळेस करण्याचा विचार केला कि मग एकही काम पूर्ण समर्कतेने करणे शक्य आहोत नाही.

कश्यासाठी नाही?
१) सध्या बऱ्याच ठिकाणी आपल्या समाजाविषयी, आपल्या पूर्वजाविषयी चुकीचा प्रचार केला जातो. ज्यांना झोपेचे सोंग घेवून असे प्रकार करावयाचे आहेत ते खुशाल करोत. त्याना आपण त्यांच्या पातळीवर जावून उत्तरे देवू शकत नाही कारण आपण आपली पातळी सोडणे म्हणजे एक प्रकारे त्यांच्या प्रयत्नांना यशस्वी करण्यात हातभार लावण्या सारखे आहे, आता राहिला अनिता पाटील चा विषय, इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते कि ति हे सगळे का करत असावी? तिला आपल्याला दुखवायचे आहे व आपण दुखावले गेलो किंवा तिच्या पातळीवर जावून बोलत राहिलो तर तिला अपेक्षित अशीच प्रतिक्रिया देण्यासारखे नाही का? कुत्रा आपल्याला चावला म्हणून आपण कुत्र्याला चावतो का? म्हणून अश्या पोस्ट मग त्या A ते Z ह्यातल्या कोणत्याही ग्रेड च्या लोकांनी केलेल्या असो वा त्याला प्रतिक्रिया देणे असो ह्या पैकी कोणताच प्रकार इथे होणार नाही.

२) अनेक वेळा विनंती करून ही सभासद वारंवार लव्ह जिहाद, अनिता पाटील, मांसाहार, दारू, ब्राह्मणाच्या मुलींचा आंतरजातीय विवाह, संभाजी ब्रिगेड, आपल्याच मुली कश्या चुकतात?, खरे ब्राह्मण असला तर असे कराल, तसे कराल ह्या सगळ्याना मनाई आहे सद्या, पूर्वी नव्हती पण अतिरेक झाला ह्या सगळ्या गोष्टींचा म्हणून आता बंदी आहे. कृपया इथे लक्षात घेणे असे आहे कि नाण्याला दुसरी बाजू असते. एकांगी विचार व पोस्ट स्वीकारल्या जाणार नाहीत. ह्या वर बरेच सभासद विचारतात हे खरे नाही का? आपण आपल्या मुलीना सावध करू नये का? मला वाटते आजकाल इतरही मार्गाने त्यांना त्याची माहिती असते व त्याबाबत आपण काही सार्वजनिक रित्या बोलणे म्हणजे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळा ढवळ करणे आहे ज्याचा आपल्याला काही एक अधिकार नाही.

३) ग्रुपवर निखळ विनोद, कविता, सुविचार, शायरी व छोटे छोटे संदेश जे बहुतेक मोबाईल वरून पोस्ट केले जातात. त्याना मनाई नाही पण त्याचेच गर्दी ज्यास्त होते व मग महत्वाच्या पोस्ट पडद्यामागे जातात किवा मागे पडतात. ह्याबाबत अडमीन वेळोवेळी व योग्य ती भूमिका घेतीलच, त्याबाबत चर्चा किवा वाद होणे नाही, त्यात अडमीन ह्यांचा निर्णय अंतिम असेल.


४) कोणतेही पोस्ट, लेखन, उतारे व छायाचित्रे ग्रुपवर टाकताना एक लक्षात घेणे कि इथे सर्व वयाची, पुरुष व महिला सभासद आहेत. त्यांच्या भावना दुखावल्या जावू नयेत वा वेगळा अर्थ अभिप्रेत होईल अश्या पोस्ट स्वीकारल्या जाणार नाहीत. कोणी पोस्ट केल्यातर लागलीच काढून टाकण्यात येतील. त्याबाबतही अड्मीन ह्यांचा निर्णय हा अंतिम राहिला.


अनिता पाटील

Wednesday, 20 June 2012

या ब्राह्मणांवर कायदेशीर कारवाई व्हावी

इतिहास काळी ब्राह्मणांनी चुका केल्या असतीलही, पण त्याची शिक्षा आताच्या ब्राह्मण समाजाला का देता? असा प्रश्न ब्राह्मणच नव्हे तर अनेक बहुजनही उपस्थित करीत असतात. हा युक्तिवाद अत्यंत लंगडा आणि दिशाभूल करणारा आहे. भूत-भविष्य-वर्तमान अशा कोणत्याही काळातील ब्राह्मण माणू आणि ब्राह्मण समाज हा एकाच जातीय विचाराने काम करीत असतो. इतिहास काळापेक्षाही सध्याचा ब्राह्मण समाज मनाने किडलेला आणि नासलेला आहे. आपल्या जातीचा अभिमान आणि इतर जातींविषयी पराकोटीचा द्वेष असे एकमेव सूत्र घेऊन हा समाज जगत आला आहे, आजही जगत आहे. फेसबुकसारख्या आधुनिक माध्यमाचा वापरही ही जमात याच सूत्राच्या आधारे करीत आहे.


महाराष्ट्रातील ब्राह्मण फेसबुकवर आपण सगळे ब्राह्मण  या नावाने एक क्लोज्ड ग्रुप चालवतात.  या ग्रुपवर केवळ ब्राह्मणांनाच सदस्य करून घेतले जाते. महाराष्ट्रातील अत्यंत नावाजलेले विचारवंत, पत्रकार, लेखक मंडळी या ग्रुपचे सदस्य आहेत. जुन २०१२ च्या मध्यापर्यंत या ग्रुपची सदस्य संख्या १२,८०० च्या वर पोहोचलेली आहे. हा ग्रुप इतर जातींच्या विरोधात सातत्याने कटकारस्थाने करीत आहे. ही कारस्थाने गुन्हेगारी स्वरूपाची आहेत. ब्राह्मणेतर जातीतील महापुरुषांबद्दल अत्यंत गलिच्छ प्रचार येथे केला जातो. 

या ग्रुपवरील कारवाया अशा आहेत की, ब्राह्मण ही जात जगातील सर्वाधिक जात्यंध जात आहे, हे याची खात्री पटल्यावाचून राहत नाही. ६ महिन्यांपेक्षाही जास्त काळापासून मी या ग्रुपच्या कारवायांवर लक्ष ठेऊन आहे. त्यांच्या सर्व कारवायांवर लिहायचे म्हटले तर हजारो पाने लिहावे लागतील. केवळ एकच आणि ताजे उदाहरण येथे देते. केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडीचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून प्रणव मुखर्जी यांच्या नावाची घोषणा कालच झाली. त्यावर साधक बाधक राजकीय चर्चा देशभर होत आहे. ती साहजिकच आहे. ‘आपण सगळे ब्राह्मण' गूपवर मात्र राजकीय चर्चा न होता, मुखर्जी यांच्या जातीची चर्चा केली जात आहे. मुखर्जी जातीने ब्राह्मण असल्यामुळे त्यांचे राष्ट्रपती होणे ग्रुपवरच्या ब्राह्मणांना महत्त्वाचे वाटते! आदिवासी नेते पी. ए. संगमा यांनी अपक्ष लढण्याची तयारी चालविली आहे. त्यामुळे हा ग्रुप संगमांवर खार खात आहे. काही ब्राह्मणांना वेगळ्याच प्रश्नाने घेरले आहे. 'मुखर्जी हे ब्राह्मण आहेत, म्हणून त्यांचे स्वागत करायचे की ते काँग्रेसचे उमेदवार आहेत, म्हणून विरोध करायचा?' असा पेच त्यांच्यासमोर पडला आहे.

बहुजनांविरोधात गुन्हेगारी कारवाया
एक स्पष्टिकरण देते. क्लोज्ड ग्रुप चालविणे गुन्हा नाही. परंतु, अशा ग्रुपवरून विखारी जातीयवादाचा प्रसार करणे नक्कीच गुन्हा आहे. बहुजन समाजातील नेत्यांचे, महापुरुषांचे चारित्र्यहनन करणे, फेसबुकवरील महापुरुषांच्या नावे उघडण्यात आलेले पेजेस बंद पाडण्यासाठी त्यांच्या विरुद्ध सामुहिक ‘अब्यूज रिपोर्ट' मोहीम  राबविणे, बहुजन समाजाच्या हितासाठी लिखाण करणा-या लोकांची फेसबुक खाती बंद पाडण्यासाठी सामुहित ‘अब्यूज रिपोर्ट' मोहीम राबविणे, यांसारख्या अनेक प्रकारच्या गुन्हेगारी कारवाया हा ग्रुप करीत आहे. अनेक लोकांची फेसबुक खाती यांनी बंद पाडली आहेत. माझे स्वत:चे फेसबुक खातेही या लोकांनी बंद पाडले होते. मला ते पोलिसांत जाऊन सुरू करून घ्यावे लागले. खेडेकर साहेबांच्या विरुद्ध येथे सतत गरळ ओकली जात आहे.

‘आपण सगळे ब्राह्मण' हा ग्रुप आठ जणांचा अ‍ॅडमीन ग्रुप चालवतो. या लोकांवर कायदेशीर कारवाई व्हायला हवी. तुर्तास एवढेच. पुढील लेखांत या ग्रुपच्या आणखी काही कारवायांवर प्रकाश टाकेन. 

....................................................
‘आपण सगळे ब्राह्मण' या ग्रुपवरील
काही प्रातिनिधिक पोस्ट अशा : 
...............................................................1


प्रणव दा यांची राष्ट्रपतीपदी नियुक्ती होण्याचे जवळ जवळ नक्की झाले आहे , आता कदाचित एखादे आश्चर्यकारक घटनाच हि गोष्ट होण्यापासून रोखू शकते
मग आता प्रश्न हा पडतो कि एक ब्राम्हण म्हणून प्रणव मुखर्जी यांचे कौतुक करायचे त्यांचा उदो उदो करायचे कि भारतीय राजकारणातील एक गालीच्च्छ राजकारणाद्वारे ( त्यांच्या निवडीसाठी जे काही केले जात आहे ते गलिच्छ राजकारण ) त्यांची निवड होईल म्हणून त्याचा विरोध करायचा ??
 ·  ·  · 3 hours ago

  • 2 people like this.

    • Ajinkya Waghmare Rajkaran te rajkaran tyat galich vaigere kay ???
      pratibha patil ya congi umedvarala shiv sena ne support kela hota nahi tar tyanchyaveli hech chitra disla asta ...
      2 hours ago via mobile ·  · 1

    • Dhiraj Kirpekar ब्राह्मण म्हूणून प्रणवदा काही आपल्या हिताचे निर्णय घेणार आहेत का ! राजकारणी माणसे शेवटी कोणत्याही पदाचा वापर गलिच्छ राजकार साठीच करणार आपल्याला कलामान सारखा दूरदृष्टीचा राष्ट्रपती हवा आहे .उद्या जर अफजल गुरु किवा कसाब ची फाशी कायम झाली तर त्याचे श्रेय घ्यायला कॉग्रेस कमी करणार नाही
      2 hours ago · 

    • Ajinkya Waghmare Uttar bhartamadhe congress brahman party aahe ani te brahmanala support kartat !
      2 hours ago via mobile · 

  • ...............................................................2



  • शतकातील जोक - पी . ए . संगमा राष्ट्रपती पदाची निवडणूक लढविणार आहेत म्हणे !

    पटनाईक यांनी केलेली मस्करी संगमा यांनी भलतीच मनावर घेतलेली दिसतेय ! देशाला ' जोकर ' नको तर राष्ट्रपती हवा आहे हे त्यांना सांगायला हवे !
     ·  ·  · 2 hours ago

    • 2 people like this.

      • Rohit Sathe माणसे मुर्ख असतात हे माहित होते पण इतकी मुर्ख असतात हे संगमांच्या वरून कळले
        58 minutes ago · 

      • Virochan Prabhu पवावारी जो जो विसंबला
        त्याचा कार्यभाग संपला

        23 minutes ago · 
...............................................................3



--अनिता पाटील