Showing posts with label सैराट. Show all posts
Showing posts with label सैराट. Show all posts

Friday, 20 November 2020

चोरटा नागराज अण्णा!


बहुचर्चित ‘झुंड’वरील बंदीस सर्वोच्च न्यायालयाची मान्यता

‘सैराट’ आणि ‘फँड्री’ फेम नागराज मंजुळे यांनी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना घेऊन काढलेला बहुचर्चित ‘झुंड’ हा चित्रपट वाङमय चौर्याच्या आरोपामुळे प्रदर्शनापूर्वीच वादात सापडला आहे. आधी तेलंगना उच्च न्यायालयाने या चित्रपटावर बंदी घातली होती. अन् आता थेट सर्वोच्च न्यायालयानेच चित्रपटावर बंदी घातली आहे. नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ चित्रपटावरही कथा चोरीचा आरोप झाला होता. सततच्या कथा चोरीच्या आरोपांमुळे नागराज मंजुळे यांच्या ‘फँड्री’च्या चित्रपटाच्या कथेवरही संशय व्यक्त होत आहे. ही कथाही मंजुळे यांनी चोरलेली नाही ना, असा प्रश्न विचारला जात आहे.

नंदी चिन्नी कुमार नामक एका व्यक्तीनं या चित्रपटावर कॉपी राईट्सचा दावा ठोकला होता. या व्यक्तीच्या मते ‘झुंड’ चित्रपटाची कथा त्यांच्या कथेची नक्कल आहे. हा दावा ‘झुंड’च्या निर्मात्यांनी फेटाळून लावला होता. नंदी चिन्नी कुमार यांनी तेलंगना उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. न्यायालयाने दावा मान्य करून ‘झुंड’च्या प्रदर्शनावर बंदी घातली होती.

या बंदी विरोधात निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्या. शरद बोबडे, न्या. के. एस. बोपन्ना आणि व्ही. रामा सुब्रमण्यम यांच्या निरिक्षणाखाली हे प्रकरण कोर्टात सुरु होते. या तीन सदस्यीय न्यायपीठाने ‘झुंड’ चित्रपटाला दिलासा देण्यास नकार दिला आहे. त्यांनी देखील तेलंगना उच्च न्यायालयाच्या बंदीस मान्यता दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने बंदी कायम ठेवल्यामुळे ‘झुंड’चे प्रदर्शन आणखी काही काळ लांबणार आहे. या वादावादीमुळे चित्रपटाची प्रसिद्धी मात्र फुकटात होत आहे. याचा फायदा अर्थातच कथा चोर अण्णालाच होणार आहे.

सैराटची कथेवरही झाला होता चोरीचा आरोप
नागराज मंजुळे यांनी ‘सैराट’ चित्रपटाची कथा नाथ माने यांच्या 'बोभाटा' या  कादंबरीवरुन चाेरली होती. २०१६ मध्ये नाथ माने यांनी पनवेल कोर्टात मंजुळेंविरुद्ध खटला दाखल केला होता. फसवणूक आणि कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी निर्मात्यांसह सात जणांवर गुन्हा नोंदवण्याची विनंती नाथ मानेंनी न्यायालयास केली होती. तथापि, हे प्रकरण न्यायालयात तसेच पडून राहिले. वरच्या कोर्टात जाण्यासाठी लागणारा अमाप पैसा नाथ माने यांच्याकडे नव्हता. त्यामुळे माने यांच्यावरचा अन्याय तेव्हा दडपला गेला.

माने हे तेव्हा कामोठे परिसरात राहत होते. ते मूळचे साताऱ्यातील माण तालुक्यातल्या धकटवाडीचे आहेत. २०१० मध्ये त्यांनी 'बोभाटा' कादंबरी लिहिली होती. सुप्रसिद्ध लेखक द. मा. मिरासदार यांनी या कादंबरीला प्रस्तावना लिहिली आहे. एका खेडेगावातील आंतरजातीय प्रेमसंबंधांची कथा या कादंबरीत चितारण्यात आली आहे.
नाथ माने यांना आपल्या कादंबरीवर चित्रपट काढायचा होता. झी टॉकिज आणि एस्सेल ग्रुपच्या काही अधिकाऱ्यांची त्यांनी भेट घेतली होती. त्यांनी माने यांची कथाच ढापून घेतली. ‘सैराट’ प्रदर्शित झाल्यानंतर माने यांना धक्का बसला. ‘सैराट’ फ्रेम-टू-फ्रेम ‘बोभाटा’ कादंबरीवर बेतल्याचे त्यांच्या लक्षात आले. कादंबरीतील बहुतांश संवादही चित्रपटात जशास तसे उचलण्यात आले आहेत.

‘सैराट’ पाहिल्यानंतर नाथ माने झी आणि एस्सेल समूहाच्या अधिकाऱ्यांशी वारंवार इमेलद्वारे संपर्क साधला. तथापि, त्यांना कोणताच प्रतिसाद न दिल्याने त्यांनी कोर्टाचं दार ठोठावले. पण, त्यांचे दुर्दैव तेथेही त्यांच्या आड आले. त्यांना न्यायालयाकडून न्याय मिळाला नाही.

नाथ माने यांना योग्य साथ मिळाली असती, तर नागराज मंजुळे यांच्या वाङमय चौर्याच्या कारवायांचा तेव्हाच भंडाफोड झाला असता. तथापि, मंजुळे यांचे दैव तेव्हा बलवत्तर होते. न्यायालयाने नाथ माने यांच्या तक्रारीची योग्य प्रकारे दखल न घेतल्यामुळे मंजुळे यांचे तेव्हा फावले. यावेळी मात्र मंजुळे यांना बरोबर वस्ताद भेटला आहे. या प्रकरणातून मान सोडवून घेणे मंजुळे अण्णास सोपे नाही. यानिमित्ताने भारतीय न्याय व्यवस्था मोठ्यांसाठीच कशी काम करते, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. गरिबांना न्याय देण्यास आपली यंत्रणा खरोखर हलेल तो सुदीन.

Sunday, 29 May 2016

नागराज मंजुळे यु टू?

नागराज तुझा सैराट पहिला . अन धक्का बसला . तुला नेमकं काय सांगायचंय ? कलाकृती म्हणून सिनेमा झिंगाट झालाय . ७० कोटीची कमाई केलीस . चांगली गोष्ट आहे . पुण्या मुंबईतल्या निर्माता दिद्दर्शकांच्या गांडी खाली इस्तू ठेवलास याचा आनंद आहे आणि आभिमान सुद्धा . पण एक गोष्ट खटकली लंका.

तू नाय म्हणशील . आसलं काय डोक्यात नवत म्हणशील . पण मेसेज काय जाऊ लागला ते पन म्हतवाचं आस्तय लंका . तू चळवळीतला माणूस हायेस . तुला हे सांगायची गरज नाय . पन लंका गडबड झालीय बरका . आसं त नाय ना का तू मुद्दामच गडबड केली ?

आढेवेढे कशाला सरळच विचारतो , त्या नरेंद्र जाधवा वानी तू बी भाजपा आन चड्डी वाल्यांच्या नादी त नाही लागला न बापा ? आता कसा ? सांगतो. मला सांग नागराज डॉक्टर बाबासाहेब आम्बेडकरांनी , महात्मा फुलेंनी , राजर्षी शाहु महाराजांनी दलित-बहुजनाच्या शोषणाला कोण जबाबदार असल्याचे सांगितले ?  ब्राम्हण. बरोबर ना? म्हणजे ब्राम्हणांनी रचलेला मनुवादी सनातनी चातुर्वर्ण्य धर्म . श्रेष्ठ कोण ? तर फक्त ब्राम्हण . बाकी सगळे शुद्र . मराठे सुद्धा! घामाचा एक थेंब न गाळता उच्च दर्जाचे जीवनमान जगण्याचा आणि रक्ताचा एक थेंब न सांडता सुरक्षेचा अधिकार ब्राम्हणांनी मिळवला तो सर्व ब्राम्हणेतराना देवाची धर्माची पाप पुण्याची भीती दाखउन. ब्राम्हण म्हणील ती पूर्व दिशा . त्याचा शब्द म्हणजे ब्रम्ह वाक्य . म्हणून आम्हीही डोळे झाकून, अक्कल गहाण ठेवून अवमान अपमान अन्याय सहन केले. फक्त दलित किंवा बाराबलुतेदार आणि अन्य भटक्या जातीनाच नव्हे तर जांच्या जोरावर ब्राम्हणाचे हे वर्ण वर्चस्व पोसले जात होते त्या क्षत्रिय मराठा जातीना देखील ब्राम्हण शूद्रच मानत होते. हे खरे आहे की ब्राम्हणी वर्चस्व आबाधित ठेवण्या साठी ब्राम्हणांनी मराठयांचा वापर केला . म्हणजे सांगणारे सुचवणारे ब्राम्हण आणि अंमलबजावणी करणारे मराठे. पण येथे हे लक्षात घ्यावे लागेल कि मराठे हे सगळे ब्राम्हणांनी घातलेल्या देव धर्म आणि पाप पुण्याच्या भीतीने करत होते . एका अर्थाने मराठे देखील पिडीतच होते.

१६०० व्या शतका पासून १८००व्या शतका पर्यंत मराठा जातीला महाराष्ट्रा पुरते राजकर्ते पण मिळाले. कुनब्यांचे पाटील झाले देशमुख झाले . राजे ,सरदार, इनामदार , वतनदार , जहागीरदार झाले . मध्यंतरी इंग्रज काळात हा हि रुबाब गेला . स्वातंत्र्या नंतर पुन्हा मराठ्यांना राजकर्ते पण मिळाले . हरितक्रांती , सहकार , सिंचन , राज्य तसेच स्थानिक स्वराज्य संस्था मधील सत्ता या मुळे मराठ्यांना बरे दिवस आले . पण मला सांग नागराज एवढी अमर्याद सत्ता असूनही तुरळक अपवाद वगळता मराठ्यांनी समाजावर अन्याय अत्याचार केले का ? कोणावर सूड उगवला का ? सहज म्हणून कल्पना कर ब्राम्हणाच्या हाती अशी सत्ता मिळाली असती तर त्यांनी काय केले असते ? ब्राम्हणाच्या सोड , दलितांच्या हाती सत्ता आली तर ते सुद्धा सुडाने वागतील . मराठ्यांनी मात्र कधीच आपली दानत ,नियत आणि उदारमतवाद सोडला नाही . महाराष्ट्रा पुरता विचार केला तरी मराठे ब्राम्हणा सहित सर्व दलित ,बहुजन बाराबलुतेदार आणि भटक्या जाती जमातींचे पोशिंदे आणि रक्षणकर्ते राहिलेले आहेत आंबेडकराना याची जाणीव होती . म्हणून त्यांनी कधीच शोषणा साठी मराठ्यांना जबाबदार धरले नाही

नागराज तू मात्र मोदी ,भाजपा . आणि चड्डीवाल्यांची सुपारी घेतल्या सारखा सर्व बहुजनाचा ब्राम्हणावरचा राग डायव्होट्र करून मराठ्यांना टार्गेट करतो आहेस. फ्यांड्रीत तुझा हेतू कळून आला नाही. पण सैराट मध्ये तू प्यानटीच्या आतून हाप चड्डी घातलेली स्पष्ट दिसत आहे. उगाच नाही तुज्या सिनेमाला प्रदर्शनाच्या आधी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला . फडणवीसने वर्षावर बोलावून तुझा सत्कार केला. मातोश्रीवरही जाऊन आलास . नागपूरची रेशीमबाग तेवढी राहिली. दुबईत गेलास तिथे कोण आहेत तुझ्या सोबत ? संघोटेच ना . आता हे संघोटे तुला घेवून जगभर फिरतील. तिथे स्थाईक झालेल्या भारतीयांना मराठे किती वाईट आहेत हे सांगण्या साठी . नागराज तुज्या सारख्या चळवळीतल्या माणसा कडून हि अपेक्षा नव्हती . स्वतःला आसा विकू नकोस.
-रविन्द्र तहकीक, संपादक, अनिता पाटील विचार मंच.