Showing posts with label विनायक दामोदर सावरकर. Show all posts
Showing posts with label विनायक दामोदर सावरकर. Show all posts

Saturday, 4 December 2021

सावरकरांनी आत्महत्या का केली?


पापाची बोच, गुन्ह्यांची भीती आणि अपयशाची टोचणी या तीन कारणांमुळे अत्यंतिक निराश व वैफल्यग्रस्त होऊन विनायक दामोदर सावरकर यांनी आत्महत्या केली. याबाबत थोडेसे विस्ताराने पाहू या.

पाप : सावरकरांच्या द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांतामुळे भारताची फाळणी झाली. फाळणीमुळे लाखो लोक मृत्यूमुखी पडले. लाखो बेघर झाले. लाखो निर्वासित झाले. फाळणीचे पाप आपल्या डोक्यावर आहे, याची बोचणी सावरकरांना छळत होती.

गुन्हा : गांधीहत्या सावरकरांच्या इशाऱ्यावर झाली. गांधी हत्येची फाईल नव्याने उघडण्यात आल्यामुळे सावरकर प्रचंड घाबरले होते. आयुष्याच्या शेवटी तुरुंगात जाण्याच्या भीतीने त्यांची झोप उडाली. फाळणीच्या काळात सावकरांनी जीनांशी हातमिळवणी करून दंगली घडवून आणल्या. त्यातही लाखो लोक मेले. हा गुन्हाही सावरकरांचा पाठलाग करीत होताच.

अपयश :
सावरकरांनी इंग्रजांविरुद्ध लढण्याचा प्रयत्न सुरुवातीला केला. पण, अंदमानात गेल्यावर त्यांचे धैर्य खचले आणि त्यांनी इंग्रजांची माफी मागून स्वत:ची सुटका करून घेतली. पुढे जीवनव्यापनासाठी त्यांना पुन्हा इंग्रजांचेच पाय धरावे लागले. इंग्रजांसाठी काम करण्याच्या अटीवर त्यांना महिना ६० रुपये पेन्शन मिळाली. हे त्यांच्या आयुष्यातील पहिले मोठे अपयश होते. त्यांचा हिंदुत्ववाद लोकांनी फेकून दिला, हे दुसरे अपयश होते. त्यांनी जो इतिहास लिहिला, त्याला मान्यता मिळू शकली नाही, हे तिसरे अपयश होते. भारताची अनेक शकले व्हावीत, यासाठी सावरकरांनी कटकारस्थाने केली. संस्थानिकांनी भारतात सहभागी होऊ नये, यासाठी आटोकाट प्रयत्न केले. पण काँग्रेसने ते हाणून पाडले. हे चौथे अपयश होते. त्यांच्या हिंदु महासभेला लोकांनी निवडणुकीत जबरदस्त आपटी दिली. हे सहावे अपयश होते. अशा एकामागून एक आलेल्या अपयशामुळे सावरकर खचले. या अपयशाची टोचणी त्यांना अगदी असह्य झाली होती.

अशा प्रकारे पापाची बोच, गुन्ह्यांची भीती आणि अपयशाची टोचणी यातून सावरकरांना अतिव नैराश्य व वैफल्यग्रस्तता आली. त्यांना जीवन नकोसे झाले. मात्र थेट गळफास लावून घेण्याचे अथवा विष प्राशन करण्यचे धाडसही या भित्र्या माणसाला झाले नाही. मग त्याने अन्नपाणी त्यागून आत्महत्या केली.

Thursday, 12 December 2019

फाळणीला सावरकरच जबाबदार

अनिता ताईंचा फाळणीविषयीचा विचार सर्वमान्य होतो तेव्हा..!

या देशाच्या फाळणीला हिंदू महासभेचे नेते विनायक दामोदर सावरकर आणि मुस्लिम लीगचे नेते बॅ. मोहंमद अली जीना हे जबाबदार असल्याचे सत्य या ब्लॉगच्या संस्थापिका आदरणीय अनिता ताई पाटील यांनी २0११ मध्ये पहिल्यांदा समोर आणले होते. प्लँचेट करण्यासाठी लोक सावरकरांच्या आत्म्याला का बोलावतात, यासंबंधीचा एक लेख अनिता ताईंनी लिहिला होता. या लेखात अनिता ताईंनी फाळणीचा सत्य इतिहास उजेडात आणला होता. गेल्या आठ वर्षांत अनिता ताईंनी दिलेला हा विचार समाजात चांगला रुजला आहे. ९ डिसेंबर २0१९ रोजी सिटिजनशीप अमेंडमेंट बिलावर लोकसभेत झालेल्या चर्चेत सहभागी होताना काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी देशाच्या फाळणीचे बीज सावरकरांच्या द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांताने रोवले होते, असे स्पष्ट वक्तव्य केले. त्यानंतर १0 ऑक्टोबर रोजी काँग्रेसचे दुसरे नेते शशि थरूर यांनी हाच मुद्दा सभागृहाबाहेर मांडला. फाळणीला सावरकर आणि जीना कारणीभूत असल्याचे थरूर यांनी म्हटले.  हाच मुद्दा अनिता ताईंनी आठ वर्षांपूर्वी मांडला होता.
अनिता ताई यांच्या लेखातील हा उतारा :

"... फाळणीचे गुन्हेगार सावरकर हेच आहेत, हे त्रिवार सत्य आहे. सावरकरांच्या मुर्खपणामुळेच या देशाची फाळणी झाली. सावरकरांनी द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला. भारतात हिंदू आणि मुसलमान असे दोन समाज राहत नसून हे दोन स्वतंत्र देशच आहेत, असा सावरकरांच्या सिद्धांताचा थोडक्यात सारांश. सावरकरांनी हा सिद्धांत मांडला. त्याचा फायदा मोहंमद आली जीना आणि त्यांच्या मुस्लिम लीगला झाला. याच सिद्धांतानुसार भारताचे भारत आणि पाकिस्तान असे दोन तुकडे झाले. भारताच्या फाळणीला सर्वांत प्रथम जर कोणी जबाबदार असेल, तर ते सावरकर होत. जीनांचा नंबर सावरकरांच्या नंतर येतो.
महात्मा गांधी आणि काँग्रेसचा
फाळणीला विरोधच होता
महात्मा गांधी आणि काँग्रेसने फाळणीला शेवटपर्यंत विरोध केला होता. महात्मा गांधींनी तर +आधी माझ्या देहाचे दोन तुकडे होतील, मगच या देशाचे दोन तुकडे होतील+ अशी टोकाची भूमिका मांडली होती. मात्र सावरकर आणि त्यांचे इतर ब्राह्मणवादी अतिरेकी सहकारी तसेच बॅ। मोहंमद अली जीनांसारखे कट्टरवादी यांनी देशातील वातावरण एवढे खराब करून टाकले की, फाळणी स्वीकारल्याशिवाय गत्यंतरच राहिले नाही. देशात दंगलींचा आगडोंब उसळला होता. फाळणी स्वीकारली नसती, तर हा देश कित्येक वर्षे जळत राहिला असता, इतके वातावरण या लोकांनी तापविले होते. शेवटी देशाचे भले लक्षात घेऊन काँग्रेसने फाळणीला मान्यता दिली. दिली म्हणण्यापेक्षा द्यावी लागली, असे म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल...."  

अनिता ताईंनी समोर आणलेला लुप्त इतिहास सर्वमान्य होत असल्याचे पाहून आम्हाला खरोखर आनंद होत आहे. अनिता ताई यांच्या लेखाची लिंक येथे देत आहोत. तसेच मनीष तिवारी यांच्या भाषणाचे एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्ताची लिंक आणि थरूर यांच्या भाषणाचे 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्ताची लिंक देत आहोत.

-राजा मइंद, कार्यकारी संपादक, अपाविमं.

सावरकरांचा आत्मा अशांत का?
Savarkar Laid Foundation For Two-Nation Theory: Congress's Manish Tewari
Was not paying attention in history classes: Shashi Tharoor's dig at Amit Shah over partition remark

Monday, 15 September 2014

पोलिसांनी नीट तपास न केल्यामुळे सावरकर हे महात्मा गांधी खून खटल्यातून सुटले

जीवनलाल कपूर आयोगाने सावरकरांवर ठेवला होता कटाचा ठपका


- राजा मइंद, कार्यकारी संपादक, अपाविमं.


महात्मा गांधी यांची हत्या करण्याच्या कटात विनायक दामोदर सावरकर हेही एक आरोपी होते. तथापि, न्यायालयाने त्यांची पुराव्यांअभावी मुक्तता केली. न्यायालयाने सावरकरांना सोडले तरी ते खरोखरच निर्दोष होते का?  सावरकर सुटण्यास दोन प्रमुख कारणे होती. 
१. हल्लेखोर अतिरेकी नथुराम गोडसे याने गांधी हत्येच्या कटाची आखणी आणि अंमलबजावणी याची संपूर्ण जबाबदारी स्वतः स्वीकारली. 
२. योग्य रितीने झाला नाही. पोलिस केवळ माफीच्या साक्षीदारावर अवलंबून राहिले. 
वरीलपैकी दुसरया कारणांचा या लेखात आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. माफीचा साक्षीदार बनलेला दिगंबर बडगे याच्या निवेदनावरच गांधी हत्येचा संपूर्ण खटला उभा होता. बडगेने पोलिसांना सांगितले की, "महात्मा गांधी यांना मारण्यापूर्वी नथुराम गोडसे सावरकरांना मुंबईत जाऊन भेटला होता. सावरकरांनी गोडसेला 'यशस्वी होऊन या' असा आशीर्वादही दिला होता." बडगेने दिलेल्या या जबाबातील तथ्ये तपासण्यासाठी कोणताही प्रयत्न पोलिसांनी केला नाही; त्यामुळेच सावरकर या खटल्यातून मुक्त होऊ शकले, असे कपूर कमिशनच्या अहवालातून समोर आलेल्या पुराव्यांवरून दिसते. 

महात्मा गांधी यांची हत्या होऊन जवळपास १७ वर्षे उलटल्यानंतर १९६५ साली केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती जीवनलाल कपूर यांच्या नेतृत्वाखाली आयोगाची स्थापना केली होती. आयोगाने या प्रकरणाचा बारकाईने तपास केला आणि त्याचा अहवाल केंद्र सरकारला सादर केला. या अहवालातील तथ्ये खळबळजनक आहेत. 

गांधी खून खटल्यातील माफीचा साक्षीदार दिगंबर बडगे याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, १७ जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसे सावरकरांना मुंबईतील त्यांच्या घरी भेटायला गेला. त्याच्या सोबत दिगंबर बडगे, नारायण आपटे आणि शंकर किस्तैया हेही होते. बडगे आणि किस्तैया हे सावरकरांच्या घराबाहेरच थांबले. नथुराम गोडसे आणि नारायण आपटे आत गेले. सावरकरांना भेटून बाहेर आल्यानंतर नारायण आपटे याने बडगेला सांगितले की, सावरकरांनी आम्हाला ‘यशस्वी होऊन या' असा आशीर्वाद दिला आहे. 

बडगेने दिलेली ही माहिती अत्यंत महत्त्वाची होती. तथापि, न्यायालयाने ती पूर्णतः ग्राह्य धरण्यास नकार दिला. पोलिसांनी अन्य कोणत्याही पुराव्यांच्या अथवा साक्षींच्या माध्यमांतून बडगेच्या या साक्षीची खातरजमा केली नाही, असा ठपका न्यायालयाने ठेवला. त्यामुळे सावरकर खटल्यातून सुटले. 

या खटल्यातील सावरकरांची सुटका तांत्रिक होती. तसेच बडगेने दिलेली माहिती खोटी नसून पूर्णतः खरी होती, हे नंतर कपूर आयोगाच्या चौैकशीतून स्पष्ट झाले. 

जीवनलाल कपूर आयोगाने या प्रकरणाची चौैकशी करताना दिगंबर बडगे याने सावरकरांच्या विरोधात दिलेल्या साक्षीला विशेष महत्त्व दिले. बडगेच्या साक्षीतील तथ्यांश शोधण्यासाठी आयोगाने इतर स्रोत तपासले. सावरकरांचा अंगरक्षक अप्पा रामचंद्र कासार आणि सचिव गजानन विष्णू दामले यांच्या साक्षी आयोगाने नोंदविल्या. या दोघांनीही बडगेची माहिती खरी असल्याचे आयोगाला सांगितले. कासार याने सांगितले की, ‘‘नथुराम गोडसे आणि नारायण आपटे हे दोघे २३-२४ जानेवारीच्या दरम्यान सावरकरांना भेटले." दामलेने सांगितले की, "जानेवारीच्या मध्यात केव्हा तरी गोडसे आणि आपटे सावरकरांना येऊन भेटले. सावरकरांच्या घराच्या आवारात असलेल्या बागेत ते दोघे त्यांच्यासोबत बसले होते."

रामचंद्र कासार आणि गजानन विष्णू दामले यांच्या साक्षीला कपूर आयोगाने महत्त्व दिले. आयोगाने आपला निष्कर्ष नोंदविताना म्हटले की, ‘‘सावरकर आणि त्यांच्या गटाने कट रचल्याचे या तथ्यांमधून स्पष्टपणे समोर येथे."

यातून एकच वास्तव समोर येते. ते असे की, विनायक दामोदर सावरकर हे भारतीय पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे गांधी हत्येच्या खटल्यातून मुक्त होऊ शकले. पोलिसांनी योग्य रितीने तपास केला असता, तर कटात सहभागी असल्याबद्दल सावरकरांना हमखास शिक्षा झाली असती. 

कपूर आयोगाच्या तपासावर भारतीय प्रसार माध्यमांतून मोठ्या प्रमाणात विचार मंथन झाले आहे. अलिकडेच "द हिंदू" या आघाडीच्या इंग्रजी दैनिकाने या संबंधीचा एक लेख प्रसिद्ध केला होता. जिज्ञासू वाचकांना हा लेख खालील लिंकवर वाचता येईल. How Savarkar escaped the gallows शीर्षकाचा हा लेख प्रसिद्ध अभ्यासक ए. जी. नुरानी यांनी लिहिला आहे.

How Savarkar escaped the gallows

Thursday, 24 July 2014

प्लँचेट, दाभोलकर आणि सावरकर

-राजा मइंद, कार्यकारी संपादक, अपाविमं


अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुन्यांना शोधण्यासाठी पोलिसांनी प्लँचेट केल्याच्या बातमीने सध्या महाराष्ट्रात सनसनाटी निर्माण केली आहे. प्लँचेट हे पोलिसांसाठी काही नवे नाही. दहशतवादविरोधी पथकांनी अनेकवेळा प्लँचेट करून आरोपींचा अदमास घेण्याचा प्रयत्न केला आहे. प्लँचेट खरे की खोटे हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा विषय आहे. पण अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा झाला म्हणून प्लँचेट थांबतील या भ्रमात कोणी राहू नये.

प्लँचेटसाठी भारतभर विनायक दामोदर सावरकर यांच्या आत्म्याला बोलावण्यास प्राधान्य दिले जाते. सावकर यांचा आत्मा अतृप्त आहे. त्यामुळे तो लवकर येतो, तसेच प्रश्नांची उत्तरेही तो अचूक देतो, असे प्लँचेट करणारे लोक मानतात. खरेखोटे प्लँचेट करणारे आणि सावरकरच जाणोत. डॉ. दाभोलकरांचे खुनी शोधण्यासाठी करण्यात आलेल्या प्लँचेटमधून पोलिसांच्या हाती काहीही लागले नाही. डॉ. दाभोलकरांचे खुनी शोधण्यासाठी सावरकरांच्या आत्म्याला बोलावले असते, तर कदाचित खुनी सापडलेही असते, असेही तमाम प्लँचेटकर मानत आहेत.

असो. आदरणीय अनिता ताई यांनी प्लँचेट आणि सावरकर यांच्यावर लिहिलेला एक लेख अपाविमंवर आहे. जिज्ञासूंनी तो जरूर वाचावा. या लेखाची लिन्क खाली देत आहे. 

Saturday, 24 March 2012

सावरकराकडून संत एकनाथ चरित्राचा गैरवापर


सावरकर शाळेत असतानाची ही गोष्ट आहे म्हणे. शाळेचे शिक्षक विद्याथ्र्यांना संत एकनाथांची गोष्ट सांगतात. एक मुसलमान एकनाथांच्या अंगावर १०८ वेळा थुंकतो. तरीही शांतीब्रह्म संत एकनाथांचा तोल अजिबात ढळत नाही. ते गोदावरीत १०८ वेळा अंघोळ करतात. ही गोष्ट सांगितल्यानंतर शिक्षक मुलांना आपण काय शिकलो हे विचारतात. मुले सांगतात- कितीही संकटे आली तरी आपण शांती कायम ठेवावी. एक मुलगा उठून उभा राहतो. तो बाणेदारपणे म्हणतो - एकनाथ हे संत होते. त्यांनी शांती कायम ठेवली. ते योग्यच झाले. पण त्यावेळचा आपला समाज तर संत नव्हता. समाजाने जागे व्हायला हवे होते. त्या मुसलमानाचा जागेवरच शिरच्छेद करायला हवा होता!

या मुलाचे हे बाणेदार उत्तर ऐकून शिक्षक अचंबित होतात. त्याला विचारतात- बाळ तुझे नाव काय?
मुलगा म्हणतो - विनायक दामोदर सावरकर!

एकनाथांच्या चरित्रातील इतर घटनाही पहा 

आता नाथांच्या आणखी दोन गोष्टी पहा :
१. तळपत्या उन्हात गोदेच्या वाळवंटात हरवलेल्या एका  दलिताच्या मुलास नाथांनी कडेवर उचलून घेतले. तसेच त्याला महारवाड्यात नेऊन पोहचवले.
२. एकांथांनी  नाथांच्या वडिलांचे श्राद्ध होते. पितरांना जेवण घालण्यासाठी नाथांच्या घरी छान स्वयंपाक करण्यात आला. ब्राह्मणांना निमंत्रणे देण्यात आली. एकनाथांच्या घरी जेवण आहे हे पैठणमधील दलितांना कळले. नाथांचा दयाळू स्वभाव त्यांना माहीत होता. त्यामुळे काही लोक जेवण मिळेल या आशेने नाथांच्या वाड्यावर आले. नाथांनी त्यांना वाड्यात घेतले आणि आधी त्यांना भरपेट जेऊ घातले.

या घटना नंतर पैठणमध्ये काय घडले.  या घटना मुळे पैठणमधील ब्राह्मण चवताळून उठले. dalitanna घरी बोलावले म्हणून ब्राह्मणांनी एकनाथांच्या घरचे  पितराचे जेवण नाकारले. इतकेच नव्हे, तर धर्मसभा बोलावून नाथांना धर्मभ्रष्ट ठरविले. जाती बाहेर टाकले. नाथ शांत राहिले. त्यांनी आपले काम सुरूच ठेवले. ते आयुष्यभर ब्राह्मण जातीच्या बाहेरच राहिले. बहुजन समाजाच्या हितासाठी ते झटत राहिले.

जो न्याय मुसलमानाला, तोच ब्राह्मणांना 
लावा, अन उडवा मुंडकी !

सावरकरांच्या विनायकाला जो प्रश्न पडला तोच मला येथे पडला. पैठणमधील जातीयवादी ब्राह्मणांनी नाथांना जातीबाहेर टाकले तेव्हा एकनाथ शांतच राहिले कारण ते संत होते. पण त्या काळचा समाज तर संत नव्हता. समाजाने जातीयवादी ब्राह्मणांना शासन का केले नाही? एक दोन ब्राह्मणांचा शिरच्छेद केला असता, तर पुन्हा अशी जातीयवादी भूमिका घेण्याचे धाडस ब्राह्मणांना झाले नसते. पुढच्या काळातील वारकरी संतांचा जो छळ झाला तो झाला नसता.


संतांचा गैरवापर करू नका 

नाथांचा ब्राह्मणांनी केलेला छळ विनायकाचा मास्तर शाळेत सांगत नाही. त्याऐवजी तो मुसमान थुंकल्याची कहाणी सांगतो. यावरून हा शिक्षक ब्राह्मण असावा, हे स्पष्टच आहे. जातीयवादाने बरबटलेले ब्राह्मणवादी प्राणी हे किती धोकेबाज आणि धूर्त असतात याचे  हे एक  उदाहरण झाले. नाथांचे संपूर्ण आयुष्य पैठणच्या ब्राह्मणांशी लढण्यात गेले. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंग जातीयवादी ब्राह्मणांविरोधात लढण्याने भरलेला आहे. या लढ्याच्या गोष्टी सांगितल्या तर मुसलमानांऐवजी ब्राह्मण जातच खलनायक ठरते. त्यामुळे सावरकरवादी या गोष्टींचे नावही काढीत नाहीत. या ऐवजी ते मुसलमान नाथांच्या अंगावर थुंकल्याची गोष्ट उच्चरवाने सांगतात. आहे कि नाही गम्मत. संत चरित्राचा असा गैरवापर ब्रामान्वादीच  करू शकतात. 

अनिता पाटील, औरंगाबाद.


Thursday, 22 December 2011

सावरकरांचा आत्मा अशांत का?


प्लँचेटसाठी सावरकरांनाच आवाहन का?  
प्लँचेट नावाचा शकून पाहण्याची एक पाश्चात्य पद्धती आहे. जादूटोण्यासारखा हा प्रकार असून तो मध्यरात्री केला जातो. प्लँचेटसाठी एका अशांत आत्म्याची गरज असते. या अशांत आत्म्याला आवाहन करून बोलावले जाते. त्याच्या मार्फत होय/नाही अशा दोन पर्यायांत प्रश्नांची उत्तरे मिळविली जातात. प्लँचेटसाठी संपूर्ण भारतात सावरकरांच्याच आत्म्याला आवाहन केले जाते. सावरकरांचा आत्मा येतो, असे प्लँचेट करणारे छातीठोकपणे सांगतात. त्यांचे म्हणणे खरे असेल, तर सावरकरांचा आत्मा अशांत आहे, हे स्पष्ट होते. येथे प्रश्न असा पडतो की, सावरकरांचा आत्मा अशांत का?
सावरकर : फाळणीचे गुन्हेगार
या प्रश्नाचे उत्तर शोधताना थोडेसे इतिहासात डोकवावे लागेल. भारताची फाळणीचे पाप सावरकरांच्या डोक्यावर आहे. तसेच फाळणीमुळे मृत्यूमुखी पडलेले हजारो लोक आणि बेघर झालेले, निर्वासित झालेले काही कोटी लोक यांचे तळतळाट सावकरांना लागले आहेत. हे पाप सावरकरांच्या आत्म्याला छळत आहे. त्यामुळे त्याला मुक्ती मिळू शकलेली नाही. हिंदूत्वाच्या नावाने आपण एक खोटा सिद्धांत बनविला. त्या आधारे बहुजनांची पिळवणूक करण्याचा परवाना ब्राह्मणांना मिळवून दिला, याची बोचही सावरकरांच्या मनात खोलवर कुठे तरी असावी. पापांची जाणीव माणसाला मृत्यूसमयी होते, असे म्हणतात. या सर्व पापांची जाणीव सावरकरांना मृत्यूसमयी झाली. त्यामुळे त्यांच्या आत्मा अंतराळात भटकत आहे, असे प्लँचेट करणारे लोक मानतात.
द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांतामुळे
झाली देशाची फाळणी
आत्मा, शांती, मुक्ती या गोष्टी ख-या आहेत की, खोट्या याची शहानिशा कोण आणि कशी करणार? प्लँचेटवाले जे सांगतात ते कदाचित खरे असेल, कदाचित खोटेही असेल.  पण फाळणीचे गुन्हेगार सावरकर हेच आहेत, हे त्रिवार सत्य आहे. सावरकरांच्या मुर्खपणामुळेच या देशाची फाळणी झाली. सावरकरांनी द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला. भारतात हिंदू आणि मुसलमान असे दोन समाज राहत नसून हे दोन स्वतंत्र देशच आहेत, असा सावरकरांच्या सिद्धांताचा थोडक्यात सारांश. सावरकरांनी हा सिद्धांत मांडला. त्याचा फायदा मोहंमद आली जीना आणि त्यांच्या मुस्लिम लीगला झाला. याच सिद्धांतानुसार भारताचे भारत आणि पाकिस्तान असे दोन तुकडे झाले. भारताच्या फाळणीला सर्वांत प्रथम जर कोणी जबाबदार असेल, तर ते सावरकर होत. जीनांचा नंबर सावरकरांच्या नंतर येतो.

महात्मा गांधी आणि काँग्रेसचा
फाळणीला विरोधच होता
महात्मा गांधी आणि काँग्रेसने फाळणीला शेवटपर्यंत विरोध केला होता. महात्मा गांधींनी तर +आधी माझ्या देहाचे दोन तुकडे होतील, मगच या देशाचे दोन तुकडे होतील+ अशी टोकाची भूमिका मांडली होती. मात्र सावरकर आणि त्यांचे इतर ब्राह्मणवादी अतिरेकी सहकारी तसेच बॅ। मोहंमद अली जीनांसारखे कट्टरवादी यांनी देशातील वातावरण एवढे खराब करून टाकले की, फाळणी स्वीकारल्याशिवाय गत्यंतरच राहिले नाही. देशात दंगलींचा आगडोंब उसळला होता. फाळणी स्वीकारली नसती, तर हा देश कित्येक वर्षे जळत राहिला असता, इतके वातावरण या लोकांनी तापविले होते. शेवटी देशाचे भले लक्षात घेऊन काँग्रेसने फाळणीला मान्यता दिली. दिली म्हणण्यापेक्षा द्यावी लागली, असे म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल. 
सावरकरांच्या डोक्यावर 
कोट्यवधी लोकांचे तळतळाट
फाळणी झाल्यानंतरही सावरकर आणि ब्राह्मणवाद्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी वातावरण तापविणे सुरूच ठेवले. देशात दंगलींचा वणवा आणखी भडकला. ब्राह्मणवादी दंगली भडकावित होते, तेव्हा महात्मा गांधी आणि काँग्रेस दंगली शांत करण्यासाठी झटत होते. महात्मा गांधींनी उपोषण केले. पंडीत नेहरू रस्त्यावर उतरले. तेव्हा कुठे दंगली शांत झाल्या. मात्र तोपर्यंत या दंगलीत काही लाख लोक मारले गेले होते. पाकिस्तान आणि भारत अशा दोन्ही देशांत दंगली झाल्या. त्यात हिंदू, शीख, मुसलमान आणि इतर सर्वच जाती धर्मांचे लोक मारले गेले. केवळ हिंदू मारले गेले किंवा  मुसलमान मारले गेले असे नव्हे. काही कोटी लोक बेघर झाले, निर्वासित झाले. हा सर्व रक्तपात केवळ फाळणीमुळे झाला. आणि फाळणी सावरकरांच्या द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांतामुळे झाली. अशा प्रकारे कोट्यवधी लोकांना देशोधडीला लावण्याचे महाभयंकर पाप सावकर नावाच्या एका भेकड माणसाने केले आहे. 
प्लँचेटवाले जे सांगतात त्यावर माझा काही विश्वास नाही. पण सावरकरानी काही कोटी लोकांचे तळतळाट घेतले आहेत, यावर माझा ठाम विश्वास आहे. 
अनिता पाटील, औरंगाबाद