मित्रहो, आज आपण रामदास स्वामी यांनी बोहल्यावरून पलायन केल्यानंतर त्यांच्या वधूचे काय झाले, याची माहिती घेणार आहोत. अनंत गोपाल कुडाळकर-वाकेणीस यांनी लिहिलेल्या ‘वाकेनिशी’त रामदासांच्या न झालेल्या लग्नाची कहाणी आली आहे. तीच मी आज तुम्हाला येथे सांगणार आहे. रामदासांचे मूळ नाव नारायण सूर्याजी ठोसर. जांब (तालुका-अंबड ,जि. जालना) हे त्यांचे गाव. नारायण हा मुळात एक उनाड, आडदांड होता . महिना-महिना तो घरातून-गावातून गायब राहत असे. रात्री बेरात्री भटकत असे. त्याची ही लक्षणे पाहूनच त्याच्या आईने त्याचे लग्न करायचे ठरवले. लग्न झाल्यानंतर हा सुधारेल असे त्याच्या आईला वाटले. परंतु हा लग्नाला तयारच नव्हता. तरीही त्यांच्या आई ने हट्टाने त्याचे लग्न ठरवले. आपल्या भावाची म्हणजेच नारायणाच्या मामाची मुलगी त्यासाठी पक्की केली. या मुलीचे नाव काशीबाई. ती नागुजी बदनापुरकर यांची मुलगी होती. नागुजी हा नारायणाचा सख्खा मामा होय. विवाह ठरला.
कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पुजनाचे ||| महाराष्ट्रातील समतावादी चळवळीचे नेतृत्व करणारा ब्लॉग ||| संपादक : प्रा. रविन्द्र तहकीक
Showing posts with label रामदास. Show all posts
Showing posts with label रामदास. Show all posts
Thursday, 29 March 2012
रामदासांच्या वधूचे पुढे काय झाले?
मित्रहो, आज आपण रामदास स्वामी यांनी बोहल्यावरून पलायन केल्यानंतर त्यांच्या वधूचे काय झाले, याची माहिती घेणार आहोत. अनंत गोपाल कुडाळकर-वाकेणीस यांनी लिहिलेल्या ‘वाकेनिशी’त रामदासांच्या न झालेल्या लग्नाची कहाणी आली आहे. तीच मी आज तुम्हाला येथे सांगणार आहे. रामदासांचे मूळ नाव नारायण सूर्याजी ठोसर. जांब (तालुका-अंबड ,जि. जालना) हे त्यांचे गाव. नारायण हा मुळात एक उनाड, आडदांड होता . महिना-महिना तो घरातून-गावातून गायब राहत असे. रात्री बेरात्री भटकत असे. त्याची ही लक्षणे पाहूनच त्याच्या आईने त्याचे लग्न करायचे ठरवले. लग्न झाल्यानंतर हा सुधारेल असे त्याच्या आईला वाटले. परंतु हा लग्नाला तयारच नव्हता. तरीही त्यांच्या आई ने हट्टाने त्याचे लग्न ठरवले. आपल्या भावाची म्हणजेच नारायणाच्या मामाची मुलगी त्यासाठी पक्की केली. या मुलीचे नाव काशीबाई. ती नागुजी बदनापुरकर यांची मुलगी होती. नागुजी हा नारायणाचा सख्खा मामा होय. विवाह ठरला.
मृतदेह सापडला अंबड येथील बारवेत
अरेरे आता सगळे कसे मंगल कुशल झाले, असे वाटत असतानाच धर्ममार्तंडांनी पुन्हा एकदा बिब्बा घातला. साखाजी-काशीबाईचा विवाह होऊ नये, यासाठी पंचक्रोशीतील धर्ममार्तंड आधीपासूनच प्रयत्न करीत होते. ब्राह्मण सोडून इतर जातीतील पुरुषाशी विवाह करणे हे पाप आहे, असे काशीबाईच्या मनात भरविणयाचे महापाप धर्ममार्तंड मंडळी करीत होती. पापभिरू काशीबाई गांगरून गेली. साखाजी याच्यासोबत सुखाचा संसार सुरू असतानाच एके दिवशी काशीबाईने आत्महत्या केली. तिचा मृतदेह अंबड येथील एका बारवेत सापडला. अंबड येथे ही बारव आजही आहे. +सती काशीची बारव+ म्हणून ही बारव ओळखली जाते.
Subscribe to:
Posts (Atom)
