tag:blogger.com,1999:blog-8886193681734415447.post5567339634316104510..comments2023-10-07T08:31:46.210+05:30Comments on Anita Patil ||| अनिता पाटील विचार मंच: मराठा समाजाने सामुहिक धर्मांतर करावेanita patilhttp://www.blogger.com/profile/18153302001732659869noreply@blogger.comBlogger9125tag:blogger.com,1999:blog-8886193681734415447.post-25027954987396748002020-05-20T11:19:51.073+05:302020-05-20T11:19:51.073+05:30apale nete maratha navacha fayda uthvat ahet.Samuh...apale nete maratha navacha fayda uthvat ahet.Samuhik dharmanataratun tyanchi rajkiy takat kami padatemhanun te lamb palatat.apale nete mat ghetana bahujan hotat nantar lagech Hindu Kshatriya mhanun ur bhadavat firtat.yavar upay kay yatun itar bahujan samaj Hindutvwadi shakti kade sarkat ahe.Anonymoushttps://www.blogger.com/profile/11889203782890788365noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8886193681734415447.post-13432392815098351512019-09-10T22:38:54.368+05:302019-09-10T22:38:54.368+05:30हरिहर सारंगजी आपण अभ्यासपूर्ण लेख लिहिला आहे.हरिहर सारंगजी आपण अभ्यासपूर्ण लेख लिहिला आहे.misal.bharathttps://www.blogger.com/profile/07963548623031284836noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8886193681734415447.post-67112610187544768442018-09-12T22:05:47.132+05:302018-09-12T22:05:47.132+05:30मराठ्यानी नविन बिगर बामणी हिंदू धर्म निर्माण करावा...मराठ्यानी नविन बिगर बामणी हिंदू धर्म निर्माण करावा . दुसऱ्या धर्मात जाणत्या आगोदर धर्मवीर संभाजीराजे ना आठवा .मनातुन व जन्मदाखल्यावरुन जाती नष्ट कराव्याच लागतील.तरच धर्म टिकेल . त्याचप्रमाणे नवनवीन साधु,स्वामी,स्वारी,महाराज, यांच्यावर, बंदी घालावी , नविन हिंदू धर्म निर्माण करून त्यात देव फारच तीनच १)छत्रपती शिवाजी २) धर्मवीर संभाजीराजे ३)संत तुकाराम<br />Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8886193681734415447.post-57524898532467288702015-11-01T04:17:10.667+05:302015-11-01T04:17:10.667+05:30महाराष्ट्रातून त्यांच्या संस्कृतींना हद्दपार करू श...महाराष्ट्रातून त्यांच्या संस्कृतींना हद्दपार करू शकतो. आणि ब्राह्मणी धर्मालासुद्धा. त्यासाठी महाराष्ट्रात मानवतावादी राजकीय पक्ष स्थापन झाला पाहिजे. तोच पुढे हिंदुस्थानात आला पाहिजे तर मग होईल हे सर्व.Humanism - मानवतावादhttps://www.blogger.com/profile/05529025874356461956noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8886193681734415447.post-13834035686324991112014-04-03T20:26:07.639+05:302014-04-03T20:26:07.639+05:30नरेंद्र वडगावकरजी, ही लताबाईची चमचेगिरीच आहे. शब्द...नरेंद्र वडगावकरजी, ही लताबाईची चमचेगिरीच आहे. शब्द या नावाने हा जो कोणी लिहितो आहे, तो ब्राह्मणवादीच असला पाहिजे.प्रभातकुमार काळसुंदरhttps://www.blogger.com/profile/04754190322891980473noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8886193681734415447.post-12592306926761130702014-04-02T20:27:05.748+05:302014-04-02T20:27:05.748+05:30हे काय होते लतादिदिची चमचेगिरी का अजुन दुसरं काही?...हे काय होते लतादिदिची चमचेगिरी का अजुन दुसरं काही?Online Earning Tipshttps://www.blogger.com/profile/17411062260598345471noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8886193681734415447.post-297924985380150922014-04-02T20:23:21.799+05:302014-04-02T20:23:21.799+05:30हे काय होते दिदिचा गोडवा क़ि दिदिला टोमणा.. ज्या द...हे काय होते दिदिचा गोडवा क़ि दिदिला टोमणा.. ज्या दिदिने बाबासाहेबाचे एकही गाणे गायले नाही त्याचा पुळका म्हणावा कि चमचेगिरी!Online Earning Tipshttps://www.blogger.com/profile/17411062260598345471noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8886193681734415447.post-56672799283777537822014-03-23T14:59:50.496+05:302014-03-23T14:59:50.496+05:30लतादिदी, मोदी, शरद पवार आणि विलासराव...
आता हा स...लतादिदी, मोदी, शरद पवार आणि विलासराव...<br /><br /><br />आता हा सगळा विषय मंगेशकर रुग्णालयाशी संबंधित आहे. आता त्या गोष्टीला वीस वर्षे झालेली आहेत. जेव्हा दिदींना हे जाणवले की आपल्या पिताश्रींना अखेरच्या दिवसात योग्य उपचार मिळाले नाहीत म्हणून पुण्यात एक चांगले रुग्णालय बांधावे आणि त्यातून उत्तम उपचार व्हावेत, ही भावना अतिशय मोठी होती. शिवाय दिदींनी व्यक्त केलेली. त्यामुळे अनंत हस्ते दिदींना लोकांनीच आर्थिक मदत केली. त्यांच्या कार्यक्रमाला भरूभरून प्रतिसाद दिला. आणि मोठी रक्कम उभी राहिली. दिदींना आर्थिक तोशिश न लागता रुग्णालय उभे राहिले. पण ही जागा मिळवण्याकरिता त्यावेळचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी दिदींसाठी खूप खटाटोप केला. शहर नागरी कमाल मर्यादेमध्ये (लॅण्ड सिलिंग) ही जमीन होती. ती मोकळी करून एका खासगी ट्रस्टसाठी मंगेशकर कुटंबियांना द्यायची होती. पण दिदींचा पुढाकार असल्यामुळे श्री.शरद पवारांनी उलट-पलट करून48तासात ती जागा दिदींच्या ताब्यात दिली. शरद पवारांच्या कामाचा झपाटा ज्यांना माहिती आहे, त्यांना याची कल्पना येऊ शकेल. जागा ताब्यात मिळाल्यावर मंगेशकर रुग्णालयाचे काम सुरू झाले. तिथपर्यंत युतीचेसरकार आलेले होते. पवारसाहेबांनी जागा दिली तो काळ होता 1993 चा. केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून गेलेले श्री. शरद पवार महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून परत आले होते. आणि त्यांनी ही जमीन दिली. रुग्णालयाचे काम सुरू झाली आणि राज्याचे मुख्यमंत्रीपद मनोहर जोशी यांच्याकडे आले. रुग्णालयाचा पाया घातला गेला. कॉलम उभे राहायला सुरूवात झाली. आणि मग शासकीय अधिकार्यांच्या लक्षात आले की, सरकारने जागा दिली असली तरी महसूल खात्याशी जे लीज-डीड कायदेशीररित्या करावे लागते ते केलेलेच नाही. आणि त्यापूर्वी बांधकाम सुरू झाले. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. मग हृदयनाथ मंगेशकर यांची धावपळ झाली. त्यांनी मनोहर जोशींना भेटून कल्पना दिली. पण ते काम काही मार्गी लागले नाही. पुढे युतीचे सरकार गेले. आणि 1999 साली विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. तिथपर्यंत अधिकार्यांनी या बांधकामावर हरकत घेतली होती. आणि छोटा दिसणारा विषय अडचणीचा होऊ लागला होता. रुग्णालयाच्या प्रशासकीय विभागाच्या श्रीमती वेलणकर आणि डॉ. धनंजय केळकर त्यावेळचे आमदार उल्हास पवार यांना वारंवार भेटले आणि विलासरावांच्या मार्फत त्यांनी हा विषय मार्गी लावायची त्यांनी विनंती केली. या रुग्णालयाशी दिदींचे नाव जोडले गेले असल्यामुळे, ऐरवी सर्वांनाच मदत करायला नेहमीआघाडीवर असणारे उल्हास पवार नाही कसे म्हणणार? हृदयनाथ मंगेशकर, डॉ. केळकर यांनाघेऊन उल्हास पवार यांनीवर्षा बंगला गाठला. आणि विलासरावांना सगळा विषय समजावून सांगितला. विलासरावांनी संबंधित खात्याचे सचिव आणि मुख्यमंत्र्यांचे सचिव जॉनी जोसेफ यांना बोलावून घेतले आणि त्यांना एका वाक्यात सांगितले. ‘दिदींचे काम आहे;मार्गी लावून द्या. अडचण करू नका...’ हळूवार पणे विलासराव कामे करीत होते. आणि ती अडचण लगेच दूर झाली. नंतर शानदार रुग्णालय उभे राहिले. त्या रुग्णालयाचे उद्घाटन करायला त्यावेळचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना दिदींनी आणले. वाजपेयी आनंदाने आले. त्यांनी रुग्णालयाचे उद्घाटन केले. त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री म्हणून विलासराव देशमुख कार्यक्रमाला होतेच. नामफलकावरचा पडदा दूर झाला. अटलबिहारींनी पाहिलं, त्याच्यावर लिहिले होते की, देश के प्रधानमंत्री अटलबिहारी बाजपेयींजींके करकमलोद्वारा... वगैरे पण त्या फलकावर राज्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नावच नव्हते. त्याची चर्चा झाली. तेव्हा हृदयनाथ उल्हास पवारांना म्हणाले की, ‘आम्हाला असे सांगण्यात आले की प्रोटोकॉलमध्ये मुख्यमंत्र्यांचे नाव टाकणे बसत नाही.’ विलासराव म्हणाले, ‘काही हरकत नाही. तुमचे काम झाले याचा आनंद आहे.’<br />या रुग्णालयात पुणे आणि आसपासच्या परिसरातील गरीब रुग्णाला सवलतीच्या दराने उपचार होतील अशी लोकांची अपेक्षा होती. पण, तसे काही घडले नाही आणि आता हे रुग्णालय पुण्यातल्या रुबीच्या तोडीचे महागडे रुग्णालय ठरले आहे.अशी भिती वाटते की काही वर्षानंतर मंगेशकर रुग्णालयाच्या रस्त्याने जाणार्या गाड्यांना टोल द्यावा लागतो की काय! शासनाच्या मदतीने मिळालेल्या जमिनीवर उभ्या राहिलेल्या दीनानाथजींच्या स्मारकरुपाने उपचार करणार्या या रुग्णालयाचा आज गरीब रुग्णांना फायदा किती हा वेगळा प्रश्न आहे. पण, लतादिदींनी याविस्तार कक्षाचे उद्घाटन करायला मोदींना जेव्हा बोलावले त्यावेळी शरद पवारांचीही आठवण त्यांना झाली नाही. पवार साहेबांनी जागा दिली होती म्हणून भूमीपूजन त्यांच्या हस्ते झाले होते. आता वाजपेंयींच्या हस्ते मुख्य इमारतीचे उद्घाटन केल्यावर विस्तारीत कक्षाचे उद्घाटन भाजपने पंतप्रधानपदासाठी घोषित केलेल्या उमेदवाराच्या हस्ते झाले आहे. दिदींची इच्छा पुरी होते की नाही यासाठी आता सर्वांना सात महिने थांबावे लागणार आहे.<br /><br />NiTiN Khaprehttps://www.blogger.com/profile/00768302479794690523noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8886193681734415447.post-27936648222041798952013-10-05T14:11:09.122+05:302013-10-05T14:11:09.122+05:30वारकरी संप्रदायाला ब्राह्मणांनी हायजॅक केले. वारकर...वारकरी संप्रदायाला ब्राह्मणांनी हायजॅक केले. वारकरी संप्रदायाचे आजचे बहुतांश नेते ब्राह्मण आहेत, हा या हायजॅकिंगचाच परिणाम आहे . ब्राह्मण महानुभाव संप्रदायाला हायजॅक करु शकले नाहीत.मग त्यांनी या पंथाचा द्वेष व बदनामी करण्यास सुरुवात केली. हा द्वेष तरी किती करावा? तर या द्वेषाचा व बदनामीचा एक इतिहास बनला.<br />मला वाटते, चक्रधरस्वामींनी मनुस्मृतीप्रणीत ‘ब्राह्मणश्रेष्ठत्व’ या तत्त्वाचा नि:संदिग्धरित्या विरोध केला. तसेच त्यांनी वेदाची अपूर्णता घोषित करून देवताजानित कर्मकांडांची निरर्थकता स्पष्ट केल्यामुळे ब्राह्मणी अर्थव्यवस्थेवर संकट आणून ठेवले.<br />ब्राह्मणी परंपरा काहीही सहन करू शकेल. तुम्ही कोणतेही तत्त्वज्ञान मांडा, कोणत्याही देवतांची आराधना करा. त्याविषयी या परंपरेला कोणताही आक्षेप नसतो. तथापि हे सर्व ब्राह्मणश्रेष्ठत्व, वेदप्रामाण्य, वर्णाश्रम धर्म, देवताजनित कर्मकांड या बाबी मान्य करून, त्यांचे आचरण करून, किमान ही चौकट मान्य करून त्या चौकटीत करा, असा या परंपरेचा आग्रह असतो.<br />मनुस्मृतिप्रणीत धर्मशास्त्राच्या या गाभ्यालाच स्वामींनी स्पष्टपणे विरोध केला. असा विरोध करताना त्यांनी कोणत्याही तडजोडी केल्या नाहीत किंवा तथाकथित समन्वयाचीही भूमिका घेतली नाही. त्यासाठी त्यांनी तत्कालीन धर्मसत्तेच्या प्रचंड विरोधाला तोंड दिले.<br />संतांनीही देवताभक्ती आणि देवताजानित कर्मकांड यांचा खणखणीत विरोध केला. परंतु संत या बाबतीत फार आग्रही राहू शकले नाहीत. संतांच्या समन्वयवादी दृष्टिकोनाची ही निष्पत्ती होती.<br />त्यामुळेच ब्राह्मण वारकरी पंथाला सहजपणे हायजॅक करू शकले व त्यांनी या पंथाला सनातनी धर्माचा एक भाग करून टाकले.<br />महानुभाव संप्रदायाला हायजॅक करता आले नाही. मग परंपरेने या पंथाची पद्धतशीरपणे बदनामी करून त्याचे यशस्वीपणे खच्चीकरण केले. तडजोड करा, नाही तर उद्ध्वस्त व्हा, हे परंपरेचे धोरण आहे.<br />प्रसिद्ध विचारवंत प्रभाकर वैद्य यांचा ‘संतांनीसुद्धा वाळीत टाकलेला संतश्रेष्ठ चक्रधर’ हा ग्रंथ या विषयावर चांगलाच प्रकाश टाकतो.<br />चक्रधर स्वामींचे विचार –<br />रज काळात स्त्रियांचा विटाळ मानणे अत्यंत हास्यास्पद ठरविले आणि आपल्या अनुयायांना तसे करू दिले नाही.<br />गाय पवित्र आणि कुत्रे अपवित्र अशा कल्पना हास्यास्पद ठरविल्या .<br />मातंग आणि ब्राह्मण हे दोघेही मनुष्य देहधारीच असल्याने त्यांच्यांमधील श्रेष्ठ कनिष्ठत्व ही कल्पना निरर्थक ठरविली. आणि हे प्रत्यक्षात आणले.<br />स्त्री-पुरुष यांच्यातील चैतन्य एकाच प्रकारचे असल्याने त्यांच्यात भेद मानणे निरर्थक आहे, असे मानले.<br />कर्मकांड , व्रतवैकल्ये यांचा विरोध केला. देवताभक्ती अनुपयोगी असल्याचे सांगितले.<br />शेवटी—<br />देव धातूचा नव्हे<br />देव पाषाणाचा नव्हे<br />देव काष्ठाचा नव्हे<br />देव मातीचा नव्हे<br />देवा पटीचा(वस्त्राचा ) नव्हे<br />देव चित्रीचा नव्हे<br /> धातूचा तो झिजेल<br /> पाषाणाचा तो फुटेल<br /> काष्ठाचा तो मोडेल<br /> मातीचा तो विरेल<br /> पटीचा तो फाटेल<br /> चित्रीचा तो पुसेल<br /> देव तो अच्छेदू अभेदू की.<br /><br /> इति चक्रधर .HARIHAR SARANGhttps://www.blogger.com/profile/09015523785999162431noreply@blogger.com