Monday 30 December 2013

व्हिएतनाममध्ये छत्रपती शिवाजी महाराज!

प्रसिद्ध पत्रकार मुजफ्फर हुसैन यांनी छत्रपती शिवरायांवर लिहिलेला हा लेख दै. पुण्यनगरीच्या १७ डिसेंबर रोजीच्या अंकात प्रसिद्ध झाला आहे. अपाविमंच्या वाचकांसाठी तो देत आहोत.
वाचकांना आठवत असेल की व्हिएतनाम आणि अमेरिका यांच्यामध्ये सलग २0 वर्षे युद्ध सुरू होते. सुरुवातीला अमेरिकेला वाटले होते की या देशाला नष्ट करणे म्हणजे जेमतेम काही तासांचे काम! परंतु प्रत्यक्षात अमेरिकेला व्हिएतनामशी युद्ध करणे जडच गेले. त्याला अनेक कारणे आहेत. मात्र, त्यातील सर्वात महत्त्वाचे कारण असे आहे की व्हिएतनामी जनतेच्या नायकपदी विराजमान होते प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज! व्हिएतनाममधून अमेरिका बाहेर पडली आणि व्हिएतनामचा विजय झाला. त्या वेळी व्हिएतनामच्या राष्ट्रपतींना पत्रकारांनी विचारले की, अमेरिकेसारख्या बलाढय़ शक्तीला नामोहरम करण्यात तुम्ही कसे सफल झालात? त्या वेळी राष्ट्रपतींनी म्हटले होते की, अमेरिकेला हरवणे हे नि:संशयपणे आमच्या कुवतीबाहेरचे होते; परंतु आम्ही हिंमत सोडली नाही. राष्ट्रपती सांगतात, 'त्याच वेळी भारतातील एका शूरवीर राजाचे चरित्र माझ्या हाती आले. त्यावरून प्रेरणा घेऊन मी आमची युद्धनीती आखली आणि ती कसोशीने अंमलात आणली. त्याचा सुपरिणाम काहीच दिवसांत आम्हाला दिसला.' पत्रकारांनी त्या राजाचे नाव विचारताच राष्ट्रपती सहजपणे पटकन बोलून गेले. अर्थात छत्रपती शिवाजी महाराज. ते जर आमच्या भूमीवर जन्माला आले असते तर आम्ही जगावर राज्य केले असते. काही काळानंतर व्हिएतनामचे राष्ट्रपती मरण पावले. त्यांच्या मृत्युपत्रात त्यांनी लिहून ठेवले होते की, माझ्या समाधीवर एक वाक्य अवश्य लिहा - 'छत्रपती शिवाजी महाराजांचा एक सैनिक समाधिस्त झाला!' आजही त्यांच्या समाधीवर हे वाक्य वाचायला मिळते.

काही काळानंतर व्हिएतनामच्या परराष्ट्रमंत्री भारताच्या दौर्‍यावर आल्या. आपल्या राजकीय रिवाजानुसार त्यांना लाल किल्ला आणि महात्मा गांधी समाधी दाखवण्यात आली. त्यावर त्यांनी विचारले की, शिवाजी महाराजांची समाधी कुठे आहे? बरोबरचे भारत सरकारचे अधिकारी गप्पच झाले. आजपर्यंत असा प्रश्न त्यांना कोणी विचारला नव्हता. व्हिएतनामच्या परराष्ट्रमंत्र्यांबरोबर जे त्यांचे इतर अधिकारी आलेले होते त्यांनीच सांगितले की, छत्रपतींची समाधी महाराष्ट्रात रायगड येथे आहे. व्हिएतनामी परराष्ट्रमंत्री महोदया इतकं ऐकून थांबल्या नाहीत. त्यांनी छत्रपतींच्या समाधीला वंदन करण्याची इच्छा व्यक्त केली. 'ज्या व्यक्तीपासून प्रेरणा घेऊन आम्ही अमेरिकेसारख्या देशाला नमवले, त्यांना वंदन केल्याशिवाय मी स्वदेशी परत जाऊ शकत नाही!' असे म्हणून त्या रायगडला गेल्या. महाराजांच्या समाधीचे डोळे भरून दर्शन घेतले. ओल्या डोळ्यांनी त्यांनी तिथली माती उचलली. आपल्या बॅगेमध्ये ठेवली आणि कपाळाला लावली. परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी आश्‍चर्यचकित झाले होते. शिवाजी महाराजांवरील त्यांची श्रद्धा पाहून त्यांना वाटले. एखादा भक्त जणू या मंदिरात आपल्या देवतेची पूजा करण्यासाठी खास आला आहे! पत्रकारांनी त्यांना याबद्दल छेडले असता, मंत्री महोदया म्हणाल्या की, 'ही माती शूरवीरांची माती आहे. या मातीत शिवाजीसारख्या महान चारित्र्यवान, शूर लढवय्याचा जन्म झाला. ही माती मी माझ्या देशात नेऊन तिथल्या मातीत मिसळेन. म्हणजे व्हिएतनामच्या भूमीवरही छत्रपतींसारखा राजा जन्माला येईल.' बर्‍याच काळानंतर 'सशक्त भारत' नावाच्या मासिकाने नोव्हेंबर २0१३च्या अंकात वरील घटना प्रसिद्ध केली. वाचून सगळेच आश्‍चर्यात पडले आणि छत्रपतींपासून प्रेरणा घेऊन अनेक देशांनी आपला इतिहास घडवला. या गोष्टीचा प्रत्येक भारतीयाला अभिमानही वाटला.

भारत सरकार या अत्यंत गौरवशाली घटनेवर पोस्टाचे तिकीट प्रकाशित करू शकणार नाही का? महाराष्ट्रासह सर्व भारतातील शिवाजीभक्तांनी जर मागणी केली तर आपण निश्‍चितच आपले हे राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करू शकू. व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षांच्या समाधीचे आणि त्यावरील वाक्याचे तिकीट पोस्ट खात्यातर्फे प्रकाशित झाले तर नक्कीच आपल्या मातृभूमीची मान अभिमानाने उंचावेल.

व्हिएतनामसारख्या अगदी छोट्या-नगण्य देशाने अमेरिकेला धूळ चारावी, हा खरोखरच एक चमत्कारच आहे. दक्षिण-पूर्व आशियातील हा लहानसा देश आपल्या स्वतंत्र अस्तित्वासाठी वर्षानुवर्षे लढत राहिला. अमेरिका अण्वस्त्रधारी देश. अक्षरश: काही मिनिटांत व्हिएतनामला भस्मीभूत करणे अमेरिकेच्या डाव्या हातचा खेळ होता; परंतु असे घडले नाही. पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धातील विजयी देश व्हिएतनामसमोर टिकू शकला नाही. अमेरिकेच्या शक्तिसंपन्न राष्ट्रपतींना व्हिएतनामसमोर गुडघे टेकावे लागले. अमेरिकेने हल्ला करताच व्हिएतनामी गोरिल्ला सैनिक नक्की कुठे लपून बसतात हे शोधून काढणे अमेरिकेच्या सैन्याला जमले नाही. व्हिएलनामी गोरिल्लांना शोधून काढण्यासाठी अमेरिकेजवळ अत्यंत प्रभावी यंत्रसामग्री होती; पण या अत्यंत संवेदनशील यंत्रांनाही व्हिएतनामी गोरिल्लांनी भीक घातली नाही. व्हिएतनाम युद्धावर अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यातून मूठभर व्हिएतनामींनी बलाढय़ अमेरिकेच्या नाकात कसा दम आणला याच्या कथा वाचायला मिळतात. अखेर व्हिएतनामचे विभाजन करणे अमेरिकेला अशक्यच झाले. या छोट्याशा देशापुढे नमते घ्यावे लागले. व्हिएतनामींची स्वातंत्र्याची ऊर्मी अणुबॉम्बही नष्ट करू शकत नाही, हे अमेरिकेला कळून चुकले. यातील योगायोगाची गोष्ट अशी की, छत्रपती शिवाजी महाराज मोगलांना ज्या पद्धतीने सतत फसवत आले तेच धोरण व्हिएतनामी सैनिकांनी अवलंबले होते. त्याबद्दलची काही उदाहरणे तर अत्यंत रोमहर्षक आहेत. अमेरिकेची सर्वात मोठी डोकेदुखी ही होती की, व्हिएतनामी गोरिल्ला जंगलात कुठे लपून बसले आहेत, हेच त्यांना समजत नसे. त्यांची यंत्रसामग्रीही उपयोगी ठरत नव्हती. अखेर अमेरिकेच्या सीआयएने आपल्या शास्त्रज्ञांना असे एखादे जबरदस्त यंत्र बनवण्याचे आवाहन केले ज्यामुळे व्हिएतनामी सैनिकांचा पत्ता लागेल. अमेरिकेच्या लष्कराशी संबंधित शास्त्रज्ञांनी विचार करायला सुरुवात केली. त्यांच्या मनात विचार आला की, सैनिक भलेही कुठेही लपून बसू देत; परंतु मल-मूत्र उत्सर्जनाची भावना प्रत्येक माणसाला असतेच. म्हणून त्यांनी मूत्रामधील रासायनिक तत्त्वांवर आधारित असे सिग्नल तयार केले. ज्यामुळे मूत्रविसर्जनाची जागा सापडेल. त्या क्षेत्रात दिवे उजळल्याबरोबर अमेरिकन सैनिक तेथे पोहोचत आणि बॉम्ब टाकून हल्ला करत. अशा पद्धतीने अनेक गोरिल्लांना ठार करण्यात अमेरिकेला यश आले. काही काळातच गोरिल्लांना ही गोष्ट लक्षात आली. या प्रकारच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी व्हिएतनामी सैनिकांनी नामी युक्ती शोधून काढली. साधीच पण प्रभावी. आता हे सैनिक एका मातीच्या मोठय़ा हंड्यात मूत्र विसर्जन करायला लागले आणि तो हंडा झाडावर टांगून ठेवू लागले. त्याचा परिणाम म्हणजे अमेरिकन सैनिकांना अनेक ठिकाणांहून एकाच वेळी सततच सिग्नल यायला लागले. अमेरिका अक्षरश: भांबावून गेली आणि काही दिवसांतच ही कारवाई बंद पडली.

व्हिएतनामींना खेळवण्यासाठी अमेरिका सतत काही ना काही युक्त्या करत असे. वरील प्रकारानंतर अमेरिकेने गोरिल्लांना पकडण्यासाठी चक्क ढेकणांचा उपयोग केला. असे म्हणतात की भुकेला ढेकूण नेहमी माणसांच्या वासाच्या दिशेने जात असतो. व्हिएतनामी गोरिल्ला जिथे असावेत, असा अमेरिकेचा अंदाज होता तेथे त्यांनी भुकेलेले असे लाखो-करोडो ढेकूण सोडले; पण या ढेकणांची फौज बघताच व्हिएतनामी सैनिकांनी तत्काळ त्यांच्यावर विषारी वायू सोडून त्यांचा पूर्ण बंदोबस्त केला. अखेर अमेरिकेला हार मानण्यावाचून गत्यंतर राहिले नाही. शेपूट घालून अमेरिका व्हिएतनाममधून चालती झाली. अशाच प्रकारच्या अनेक रोमांचक कथा स्व. पत्रकार मिलिंद गाडगीळ यांनी आपल्या पुस्तकात दिल्या आहेत. त्या काळात मिलिंद गाडगीळ व्हिएतनाम युद्धावर नियमितपणे लिहीत असत.

छत्रपती आपल्या शत्रूला चकवण्यात अत्यंत हुशार होते. त्यामुळे मोगलांचे त्यांच्यापुढे काही चालले नाही. छत्रपतींसारखेच धोरण व्हिएतनामींनीही अवलंबले. त्यांनी अमेरिकेसारख्या समृद्ध, सबळ देशाशी अशीच आंधळी कोशिंबीर खेळत, मोगलांप्रमाणेच अमेरिकेला उखडून फेकले. व्हिएतनामींची हुशारी, त्यांची छत्रपतींवरील भक्तीने प्रभावित होणार्‍या आपण भारतीयांनी भारताच्या या सुपुत्राला वंदन करूया!

-मुझफ्फर हुसेन 
(शब्दांकन : अवंती महाजन)

Tuesday 24 December 2013

आज सावरकर हयात असते तर पुन्हा तुरुंगात गेले असते!

राहुल पगारे

परवा भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अभूत पूर्व पुन्हा एकदा निर्णय दिला. या पुढे समलिंगी संबध ठेवता येणार नाहीत, ठेवलेच  तर जन्मठेपेची शिक्षा  मिळेल. आता आधुनिक स्वतंत्र आणि त्या बद्दल वयक्तिक मत जरी माझे भिन्न असले तरी काल मला बातमी वाचल्या वाचल्या चटकन लक्षात आले कि अरे " नशीब" त्या तात्याचे कि येथेही ते सलामत सुटले ! हा निकाल सर्वोच्च न्यायालाने सावरकर हयात असताना दिला असता तर त्या नशीबवान ब्रम्हपुत्राला पुन्हा जन्मठेप झाली असती. आमच्या बऱ्याच विद्वानांनी पुराव्या सहित हे सिद्द केले आहे कि सावरकर तात्याचे गोडसे सोबत गोड संबध होते … गणपतीची कृपा कि बरे त्या काळी म्हणजे सावरकर असताना ह्या केस ची सुनावणी झाली नाही किंव्हा सावरकर आज जिवंत नाहीत. नाही तर संजय दत्तच्या बाजूला येरवड्या मध्ये बसले असते काथ्या कुटत .

बिचाऱ्या त्या जेल भूमीला सावरकर यांचा चरणः स्पर्शाचा अलभ्य लाभ होऊ शकला नाही …तो अलभ्य लाभ होऊ शकला नाही म्हणून तेही बरे झाले नाही तर कुणास कसे ठाऊक त्या कटा मध्ये हि मुसलमान असल्याचे पुरावे त्यांनी "निर्माण" केले असते, माफ करा त्यांनी शोधून काढले असते.


सावकर हे समलिंगी होते, याचा उल्लेख फ्रिडम अ‍ॅट मीडनाईट या पुस्तकात आहे. भारतीय स्वातंत्र्यावर आधारित असलेले हे पुस्तक  जे. बॉयर बेल आणि आयर्विंग लुईस हॉरोविट्झ या दोन लेखकांनी लिहिले आहे.

सावरकरांच्या समलिंगीपणाविषयीची चर्चा विकिपीडियावरील सावरकरांच्या लेखासोबत जोडलेली आहे. भारतीय विकीपीडियावर ब्राह्मणवाद्यांनी कब्जा केला आहे. त्यामुळे मुख्य लेखात ही चर्चा नाही. जिज्ञासूंसाठी या चर्चेची लिंक खाली देत आहोत.



Thursday 19 December 2013

शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?


प्रख्यात इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेला ‘शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?' हा ग्रंथ प्रचंड गाजतो आहे. जातीयवादी इतिहासकारांनी प्रचलित केलेला शिवरायांविषयीचा खोटा इतिहास श्री. कोकाटे यांनी पुराव्यानिशी खोडून काढला आहे. श्री. कोकाटे यांचा ग्रंथ "अनिता पाटील विचार मंच"च्या वाचकांसाठी येथे उपलब्ध करून देत आहोत. जिज्ञासूंनी त्यावर प्रतिक्रिया जरूर द्याव्यात.

ग्रंथ प्रवेश 


भाग-१

भाग-४

लेखकाचे मनोगत


शिवाजीराजे हे विश्ववंद्य राजे आहेत. राजांचे कर्तृत्व हे सुवर्णाक्षरांनी घराघरात कोरुन ठेवावे
असे आहे. राजांनी फक्त ५० वर्षाच्या आयुष्यात अशक्य कार्य शक्य करुन दाखविले. समाजव्यवस्थेत
आमुलाग्र परिवर्तन करण्यासाठी राजांनी निर्भिडपणे झुंज दिली. यासाठी राजांना हातात शस्त्र धरावे
लागले. पण राजांनी शस्त्राचे युद्ध कमीतकमी केले. चातुर्याचा वापर करुन राजांनी परचक्र निर्दाळले.
याप्रसंगी त्यांना खुप विरोध झाला. ज्यांना विरोध होत नाही ते परिवर्तन करु शकत नसतात. प्रसंगी
राजांवर प्राणघातक हल्ले झाले, नाउमेद करण्याचा प्रयत्न झाला. पण राजांनी या सर्व संकटावर मात
केली. अफजलखान, शाहिस्तेखान, सिद्धीजौहर, दिलेरखान, औरंगजेब या शत्रूंना शिवरायांनी पराभूत
केले. कारण ते उघड शत्रू होते.  उघड शत्रूविरुद्ध लढणे फार सोपे असते. त्यांच्याविरुद्ध डावपेच आखता
येतात. पण गुप्तशत्रूविरुद्ध डावपेच आखता येत नाहीत. त्यामुळे उघड शत्रूपेक्षा गुप्त शत्रू फार
खतरनाक असतो. औरंगजेब ते अफजलखान हे राजांचे उघड शत्रू होते. ते राजांचे कट्टर विरोधक होते.
याबाबत दुमत नाही. पण राजांच्या आश्रयाला राहणारे मित्रत्वाचे सोंग करणारे आणि संकटसमयी
शिवरायांना ठार मारण्यासाठी उघड शत्रुंच्या कळपात सहभागी होणारे राजांचे खरे शत्रू आहेत. पण
पक्षपाती इतिहास लेखकांनी या शत्रूचा जाणीवपूर्वक उल्लेख टाळलेला आहे. समकालीन कागदपत्र,
वस्तुनिष्ठ पुरावे असतानादेखील राजांच्या शत्रूंचे उदात्तीकरण करण्याचे पातक काही शिवशाहिरांनी आणि
कादंबरीकारांनी केलेली आहे. परंतू इतिहासात कविकल्पना, रंजकता, व्यक्तिगतमत, लालित्य, व्देष,
पुर्वग्रहदूषितवृत्ती या बाबींना अजिबात स्थान नसते.

शिवाजी राजांच्या इतिहासाचे तटस्थपणे आणि पारदर्शक वृत्तीने लेखन केले तर शिवाजी
राजांचे खरे शत्रू दादोजी कोंडदेव, कृष्णाजी कुलकर्णी, रायबाघीण देशमुख, मुरगुडनांदगांव येथील जोशी,
मोरोपंत पिंगळे, आण्णाजी दत्तो, उमाजी पंडित, राहुजी सोमनाथ, गागाभट्ट, हणूमंते, रामदास इ. आहेत.
वरील सर्वांनी राजांना कसा व किती त्रास दिला. स्वराज्यनिर्मितीच्या कामात कसे अडथळे आणले.
प्रसंगी राजांच्या अंगावर वार केले. अखेर शिवरायांचा खून देखील राहुजी सोमनाथाने कसा केला. हे
आपणाला प्रस्तुत पुस्तकात वाचण्यास मिळेलच परंतु आपणाला काही बाबी अप्रिय वाटतील आणि
खटकतीलसुद्धा. पण मित्रहो एक खोटे हजारो वेळा सांगितलं की खरे वाटत असते, आणि एक खरे
सुरुवातीला सांगितले की खटकत असते. पण हे खरे सांगण्याचे धाडस आणि आणि ऐकून, वाचून,
समजून घेण्याचे धाडस आत्ता आपण करावे, ही नम्र विनंती करतो. काही बाबी खटकल्या तर विचार
नावाची खूप मोठी शक्ती आपल्या पाठीशी आहे. किमान आपण विचार तरी करावा. प्रस्तुत पुस्तकातील
एकही शब्द निराधार लिहिलेला नाही, प्रत्येक ठिकाणी संदंर्भ दिलेला आहेच. तसेच पाठीमागे संदर्भ
सूची देखील दिलेली आहे. घडलेल्या घटनेमागे तार्किक, मानसशास्त्रीय, तात्विक आधार आहे.
राजांचे शत्रू त्यांच्या खुनाबरोबर संपले नाहीत, त्यांची संख्या पुढे झपाट्याने वाढली.

भुमिपूत्रांचे स्वराज्य गिळंकृत करणा-या पेशव्यांनी राजांनी स्वकर्तृत्वावर सुरु केलेला शिवशक बंद केला.
टिळकांनी शिवजयंती बंद पाडण्यासाठी गणेशोत्सव सुरु केला. अत्रे, सावरकर, पुरंदरे, बेडेकर,
फडके यांनी शिवरायांना बदनाम केले. या उलट  विश्वभुषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी
शिवाजीराजांचे चिकित्सक लेखन केले. राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी शिवजयंती सुरु केली. कर्मवीर
भाऊराव पाटील यांनी आजन्म महाराजांचा जयजयकार करत भूमिपुत्रांना शिक्षण दिले. साहित्यरत्न थोर
समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांच्यामुळेच शिवाजीमहाराज रशियाला समजले. डॉ.पंजाबराव
देशमुख, प्रबोधनकार केशव ठाकरे, कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग
हे शिवाजी राजांचे निस्सीम भक्त होते.  यासाठी अनेक वस्तुनिष्ठ संदर्भ प्रस्तुत पुस्तकात आहेत. या
लेखनामागे जातीयव्देष किंवा व्यक्तीदोष नसून फक्त सत्यसंशोधन आहे. सत्यलेखन, सत्यभाषा म्हणजे लेखन होय. लेखन, म्हणजे शिव्या नव्हेत.

भारतीय समाजावर हजारो वर्षापासून कथा, कादंबरी, चित्रपटांचा प्रभाव असल्यामुळे
ख-या इतिहासापासून समाज वंचित राहिला.
वास्तव इतिहास संशोधनास व लेखनात आलिकडे महाराष्ट्रात मोठी क्रांती झालेली आहे.
इतिहासाचार्य प्रा. मा. म. देशमुख हे ख-या इतिहासाचे जनक आहेत. गतवर्षी "विश्ववंद्य राजा शिवाजी"
या माझ्या पुस्तक प्रकाशनाने मला अधिक लेखनासाठी महाराष्ट्रातील वाचकांनी प्रेरित केले. महाराष्ट्रातून
प्रतिक्रियात्मक हजारो पत्रे मला मिळाली. त्या पुस्तकानंतर "शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?" हे
पुस्तक आपल्या हाती देताना आनंद होत आहे. माझे मित्र प्रवीण गायकवाड व शांताराम कुंजीर
यांच्यामुळे हे पुस्तक वाचकांच्या हाती देता आले. प्रस्तुत पुस्तक हे अभिरुचिपेक्षा देशाच्या
आवश्यकतेसेसेसाठी आहे. कारण खरा इतिहास समजल्याशिवाय खरा इतिहास घडत नसतो. देशातील
दंगली, जातीयता, अंधश्रद्धा संपावी यासाठीच हे पुस्तक आपल्या हाती देत आहे. या पुस्तकाचे आपण
एकाग्रतेने वाचन करावे व इतरांना वाचण्यास प्रवृत्त करावे ही विनंती. आपल्या अभिप्रायाची प्रतिक्षा!


श्रीमंत कोकाटे

(शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? या पुस्तकातून)


प्रख्यात इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेले ‘शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?' हा ग्रंथ "अनिता पाटील विचार मंच"च्या वाचकांसाठी येथे उपलब्ध करून देत आहोत. जिज्ञासूंनी त्यावर प्रतिक्रिया जरूर द्याव्यात.

ग्रंथ प्रवेश 

भाग-१
भाग-४
  1. नेताजी पालकरांच्या धर्मांतराला विरोध, गंगाधर कुलकर्णीच्या धर्मांतराला मात्र समर्थन
  2. संभाजीराजांना मोगलांच्या ताब्यात देणारा विश्वासघातकी कवि कुलेश
  3. औरगजेबाने संभाजी राजांना मनुस्मृती संहितेप्रमाणे ठार मारले
  4. शिवशक बंद करुन मोगलांचा फसलीशक सुरु करणारे पेशवे
  5. शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला
  6. शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे

प्रस्तावना

छत्रपती शिवाजी महाराज हे जागतिक किर्तीचे, आणि कर्तुत्वाचे राजे आहेत. भूमिपुत्रांच्या
सहकार्याने राजांनी स्वराज्य निर्माण केले. पण राजांचे निर्विवाद चरित्र उपलब्ध नाही हे कटूसत्य आहे.
कल्पितकथा, रंजकता हे शिवचरित्रातील अडथळे आहेत. शिवचरित्र हे पुस्तकात न मावणारे जीवनकार्य
आहे. शिवचरित्रावर अनेक अंगानी लिहिणे गरजेचे आहे. शिवचरित्र हे केवळ डोक्यावर घेऊन
मिरवण्याचा विषय नाही, तर डोक्यात घालण्याचा विषय आहे. शिवचरित्रावर मालिका, नाटके, चित्रपट,
महानाट्य निर्माण करणे आणि व्याख्याने देणे हा अनेकांनी धंदा केला आहे. अशा काळात कटुतेचा
विचार न करता श्रीमंत कोकाटे यांनी अत्यंत संशोधनपूर्ण असे ‘‘शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?" हे
राजांच्या जीवनातील अपरिचित बाबींवर प्रकाश टाकणारे पुस्तक लिहिले आहे. राजांना जातीय-
धार्मिक चौकटीत अडकवणे, रायरेशराच्या मंदिरात शपथ घेतली की नाही, महाराणी पुतळाबाईचे सती
जाणे, भवानी तलवार, बहुजनप्रतिपालक म्हणण्याऐवजी गा ब्राह्मणप्रतिपालक म्हणणे यापाठीमागचे
षडयंत्र, जिजाऊमॉसाहेबांचे निधन कसे झाले? राजांचा खून कशा प्रकारे करण्यात आला? मनुवादी
शिवजयंतीच्या तारखेला विरोध का करतात? याबाबत श्रीमंतचे संशोधन नाविन्यपुर्ण आहे. यासाठी
श्रीमंत कोकाटे यांनी बरेच श्रम घेतले आहेत.

राजांनी सर्व जातीधर्माच्या भूमिपुत्रांना सोबत घेऊन स्वराज्य निर्मिती केली. त्यामध्ये बाजी
पासलकर, कान्होजी जेधे, शिवाजी काशिद, जिवा महाला, बहिर्जी नाईक, हिरोजी फर्जंद, नुरखाण बेग,
काझी हैदर, लाय पाटील, येसाजी कंक, फिरंगोजी, प्रतापराव, कोंडाजी फर्जंद, सुर्यराव काकडे, नेताजी
पालकर, सिद्धि हिलाल, सिद्धि इब्राहिम, फकिराचा खापर पणजोबा, मुरारजी व बाजीप्रभू, हे प्रभू इ.
सर्व जाती धर्माचे सहकारी राजांसाठी प्राणपणाने लढले.
या प्रसंगी दादोजी कोंडदेव, कृष्णाजी कुलकर्णी, रामदास, मोरोपंत इ. अनेक भटजी आडवे
आले. आडवे आलेल्यांना राजांनी पराभूत केले. अफजलखान भेटीच्या प्रसंगी राजांवर वार करणा-या
कृष्णाजी भास्कर कुलकर्णीला राजांनी  ठार मारले. राजांना आजन्म त्रास देणा-या शत्रूची माहिती तर
श्रीमंतने प्रस्तुत पुस्तकात दिलीच, पण आजच्या तारखेपर्यंत शिवचरित्र, शिवसूत्र आणि शिवनीतीला
जाणीवपूर्वक बदनाम करणा-या टिळक, सावरकर, पुरंदरे, बेडेकर आणि य.दि. फडकेंचा देखील पर्दाफाश
केला आहे.

महाराजांना जिवंतपणी त्रास देणारे जसे शत्रू आहेत, तसेच त्यांचा बदनामीकारक इतिहास
लिहिणारे फडके, माटे, इ. कंटक देखील शत्रू आहेत. त्यांनी राजांचा व मराठा स्त्रियांचा
बदनामीकारक इतिहास पहिल्या खंडात लिहिला. श्रीमंतने या बाबतीत लिहिले आहे. पण प्रतिक्रिया
देण्यात शक्ती खर्च करण्योक्षा नवनिर्मितीची गरज आहे. भावनिक पातळीवर लेखन कालबाह्य ठरते.
यासाठी शत्रूंचा उल्लेख करुन त्यांना मोठे करण्यापेक्षा शिवाजीराजांच्या मित्रांवर देखील लिहावे.
शिवचरित्रातील अनेक बाबी अनभिज्ञच आहेत. त्यांचा शोध घ्यावा.

श्रीमंत हा सृजनशिल अभ्यासू आणि परखड विचारांचा प्रभावी वक्ता आहे. त्यामुळे विनंतीवजा
सूचना आहे की, संभाजीराजांवर देखील लिहावे.

पुरुषोत्तम खेडेकर
(राष्ट्रीय अध्यक्ष, मराठा सेवा संघ)

(शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? या पुस्तकातून)


प्रख्यात इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेले ‘शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?' हा ग्रंथ "अनिता पाटील विचार मंच"च्या वाचकांसाठी येथे उपलब्ध करून देत आहोत. जिज्ञासूंनी त्यावर प्रतिक्रिया जरूर द्याव्यात.

ग्रंथ प्रवेश 
भाग-१
भाग-४
  1. नेताजी पालकरांच्या धर्मांतराला विरोध, गंगाधर कुलकर्णीच्या धर्मांतराला मात्र समर्थन
  2. संभाजीराजांना मोगलांच्या ताब्यात देणारा विश्वासघातकी कवि कुलेश
  3. औरगजेबाने संभाजी राजांना मनुस्मृती संहितेप्रमाणे ठार मारले
  4. शिवशक बंद करुन मोगलांचा फसलीशक सुरु करणारे पेशवे
  5. शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला
  6. शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे

Sunday 15 December 2013

शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?


प्रख्यात इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेला ‘शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?' हा ग्रंथ प्रचंड गाजतो आहे. जातीयवादी इतिहासकारांनी प्रचलित केलेला शिवरायांविषयीचा खोटा इतिहास श्री. कोकाटे यांनी पुराव्यानिशी खोडून काढला आहे. श्री. कोकाटे यांचा ग्रंथ अनिता पाटील विचार मंच]च्या वाचकांसाठी येथे उपलब्ध करून देत आहोत. जिज्ञासूंनी त्यावर प्रतिक्रिया जरूर द्याव्यात.

लेखकाचे मनोगत
प्रस्तावना

भाग-१
रामदास संत नव्हे; तर स्वराज्यातील जंत होता
आदिलशहाचा मोकाशी दादू कोंडदेव कुलकर्णी

भाग-४
नेताजी पालकरांच्या धर्मांतराला विरोध, गंगाधर कुलकर्णीच्या धर्मांतराला मात्र समर्थन
संभाजीराजांना मोगलांच्या ताब्यात देणारा विश्वासघातकी कवि कुलेश
औरगजेबाने संभाजीराजांना मनुस्मृती संहितेप्रमाणे ठार मारले
शिवशक बंद करुन मोगलांचा फसलीशक सुरु करणारे पेशवे
शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे

शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे

 -श्रीमंत कोकाटे (शिवचरित्र अभ्यासक, संशोधक)


लाला लजपतरायांनी "सिवोजी" नावाचे उर्दूमधून शिवचरित्र लिहिले. त्यामुळे शिवचरित्र राजे पंजाब-सिंध 
(आताचे पाकिस्तान) पर्यंत गेले. . रवींद्रनाथ टागोर, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे शिवाजीराजे हे
आराध्य दैवत होते. कर्मवीर भाऊराव पाटील म्हणाले होते कि,  प्रसंगी जन्मदात्या बापाचे नाव बदलेन पण
कॉलेजला दिलेले शिवाजीराजांचचे नाव मी कधीच बदलणार नाही. ते भाऊराव पाटील जैन होते.
त्यांच्यामुळे शिवाजीराजांच्या रयतेला शिक्षण मिळाले. कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे, डॉ.पंजाबराव
देशमुख, राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसिंह नाना पाटील, संत गाडगेबाबा, प्रबोधनकार केशव सी. ठाकरे इ.
समाजसुधारकाची शिवरायांवर अनन्यनिष्ठा होती. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण भारतरत्न
डॉ.बाबासाहेब यांचा शिवचरित्राचा सखोल अभ्यास होता. त्यांनी "शुद्र कोण होते?" या ग्रंथात
शिवाजीराजांबाबत खूप सखोल माहिली लिहिलेली आहे. शिवाजीराजांच्या त्रिशताब्दी उत्सवाच्या
निमित्ताने बदलापुर येथे आयोजित केलेल्या समारंभाच्या अध्यक्षस्थानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर होते.
या प्रसंगी राजांच्या जीवनावर अभ्यासपुर्ण आणि प्रभावी भाषण केले. त्यामुळे राजांचे अपरिचित रुप
जनतेला समजले. शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाला ब्राह्मणांनी केलेल्या विरोधाचा बदला
डॉ.आंबेडकरांनी घेतला. डॉ.आंबेडकरांनी बहुजन समाजाला राजा होण्याचे स्वतंत्र दिले, तुम्ही शूद्र
आहात त्यामुळे मुख्यमंत्री होता येणार नाही. असे आज कोणीही ब्राह्मण म्हणणार नाही. हा अधिकार
सर्व बहुजन समाजाला डॉ.आंबेडकरांनी दिला. राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी शिवजयंती सुरु केली.
म्हणजे फुले, आंबेडकर या गुरु शिष्यांना शिवाजीराजांचा सार्थ अभिमान होता. त्यांचे राजांवर डोळस
प्रेम होते. आंधळे प्रेम नव्हते.

शिवाजीराजांचे भांडवल करुन फुले-आंबेडकरांनी समाजामध्ये धार्मिक व जातीय दंगे निर्माण
केले नाहीत.  किंवा शिवाजीराजांच्याव्दारे त्यांनी बहुजन समाजाचे वैदिकीकरण केले नाही. फुले-
आंबेडकरांनी शिवाजीराजांचा खरा इतिहास देशाला सांगितला. डॉ.आंबेडकर लेटरहेडवर जय शिवराजय लिहायचे. साहित्यरत्न थोर देशभक्त आणि समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांनी गणपतीला वंदन
असणारा पारंपारिक गण बदलला. गणाचा आरंभ शिवछत्रपतींना वंदन करुनच सुरु केला. अण्णाभाऊंनी
शिवरायांवर "महाराष्ट्राची परंपरा" हा पोवाडा लिहिला आण्णाभाऊ रशियात गेल्यानंतर त्याठिकाणी
शिवचरित्रावर अभ्यास करणारे रशियन संशोधक  प्रा.चेलिशिव आण्णाभाऊ यांना भेटले. आण्णाभाऊ यांनी  त्यांना शिवरायांच्याबाबत खूप दुर्मिळ माहिती सांगितली. म्हणजेच आण्णाभाऊंमुळुळेचेच रशियन जनतेलेला शिवरायांचचे कार्य माहित झाले. शिवरायांचे कार्य राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय  स्तरावर पोहचविण्यासाठी बहुजन समाजातील विचारवंतांनी मोलाचे कार्य केले आहे. 

शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे 
याउलट ब्राह्मण लेखकांनी शिवरायांना बदनाम करण्याचे पाप केले. 
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर शिवाजीराजांचे जीवन व कार्य राज्यस्तरावर व जातीस्तरावर ठेवण्यासाठी ब्राह्मण
नेत्यांनी जाणीवपुर्वक प्रयत्न केले. संयुक्त महाराष्टड्ढाच्या आंदोलनप्रसंगी प्र.के. अत्रे यांनी इतर राज्यावर
टिका करताना शिवाजीराजांचा वापर केला. "इतर राज्यांना फक्त भूगोल आहे. पण महाराष्ट्राला 
 इतिहास आहे", असे टोमणे मारत अत्र्यांनी राजांचे नाव घेतले. त्यामुळे शिवरायांच्या प्रतिमेला
मर्यादा पडल्या जातीय राजकारणात शिवरायांचा वापर सुरु झाला. राजकीय पक्षांची बांधणी शिवरायांच्या
नावाने झाली. परंतु प्रबोधनकारांचा शिवाजी जनतेला सांगितलाच नाही. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हे
थोर इतिहास संशोधक व समाजसुधारक होते. त्यांनी शिवरायांचा खरा इतिहास जनतेला सांगितला.
प्रबोधेधनकार ठाकरे म्हणत की, शिवाजीराजे ३३ कोटेटी देवेवांपपेक्षा महान आहेतेत. डोक्यातून दैवैववाद काढूनच शिवरायांचा अभ्यास करावा.

(शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? या पुस्तकातून)


प्रख्यात इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेले ‘शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?' हा ग्रंथ "अनिता पाटील विचार मंच"च्या वाचकांसाठी येथे उपलब्ध करून देत आहोत. जिज्ञासूंनी त्यावर प्रतिक्रिया जरूर द्याव्यात.

ग्रंथ प्रवेश 
भाग-१
भाग-४
  1. नेताजी पालकरांच्या धर्मांतराला विरोध, गंगाधर कुलकर्णीच्या धर्मांतराला मात्र समर्थन
  2. संभाजीराजांना मोगलांच्या ताब्यात देणारा विश्वासघातकी कवि कुलेश
  3. औरगजेबाने संभाजी राजांना मनुस्मृती संहितेप्रमाणे ठार मारले
  4. शिवशक बंद करुन मोगलांचा फसलीशक सुरु करणारे पेशवे
  5. शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला
  6. शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे

शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला

 -श्रीमंत कोकाटे (शिवचरित्र अभ्यासक, संशोधक)


राष्ट्रपिता जोतिराव फुले उपाख्य तात्या यांना शिवरायांच्या स्वराज्याची वैदिकांनी चालवलेली विटंबना पाहवेना, म्हणून  फुले १८६९ साली रायगडावर गेले. शिवजयंती सुरु करण्यासाठी त्यांनी राजांच्या समाधीचा
तपास केला, पण त्यांना समाधी सापडेना. तीन दिवस जोतीराव फुले  यांनी वेली
तोडून घाणेरी काढली व समाधीचा शोध घेतला. तात्यारावांनी समाधी धुवून स्वच्छ केली. राजांच्या
समाधीस तात्यारावांनी भक्तीभावाने अभिवादन केले आणि समाधीवर फुले वाहिली. तात्यारावांनी
शिवरायांच्या समाधीची पुजा केल्याचे ग्रामजोशास समजले तेव्हा जोशाच्या तळपायाची आग
मस्तकाला गेली. तो समाधीजवळ आला,  समाधीवरील फुले लाथेने बाजूला सारली आणि
तात्यांना म्हणाला ‘अरे कुणबटा! त्या शूद्र शिवाजीची तू पूजा करतोस काय? तो काय राजा होता होय?'

राष्ट्रपिता फुले आणि शिवरायांना भट अर्वाच्य भाषेत बोलू लागला. तात्यांना खूप दु:ख
झाले. त्यानंतर तात्यांनी शिवरायांचा खूप चांगला पोवाडा लिहिला. तात्यांनी शिवजयंतीला सुरुवात
केली. १८७० साली पुण्यासह संपूर्ण महाराराष्ट्रात शिवजयंती मोठ्या उत्साहाने सुरु झाली.  
पेशव्यांच्या समर्थकांना याची चीड आली, पण ते शिवजयंतीला थेट विरोध करु शकत नव्हते. कारण रा.फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाने महाराराष्ट्रात  फार मोठी जागृती केली होती. शिवजयंतीला थेट विरोध करणे अशक्य असल्याने त्यांनी पर्याय दिला. तो पर्याय म्हणजे गणोत्सव!
गणपती हा पेशव्यांचा देव आहे. बहुजनसमाजाचा गणपतीशी काहीही संबंध नाही. पण पेशवे कैवारी
बाळ गंगाधर टिळकाने शिवजयंतीला रोखण्यासाठी पेशव्यांच्या खाजगी गणपतीचा सार्वजनिक उत्सव
केला. म्हणजे टिळकाने शिवजयंती संपावी यासाठी १८९३ साली गणोत्सव सुरु केला.

(शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? या पुस्तकातून)


प्रख्यात इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेले ‘शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?' हा ग्रंथ "अनिता पाटील विचार मंच"च्या वाचकांसाठी येथे उपलब्ध करून देत आहोत. जिज्ञासूंनी त्यावर प्रतिक्रिया जरूर द्याव्यात.

ग्रंथ प्रवेश 
भाग-१
भाग-४
  1. नेताजी पालकरांच्या धर्मांतराला विरोध, गंगाधर कुलकर्णीच्या धर्मांतराला मात्र समर्थन
  2. संभाजीराजांना मोगलांच्या ताब्यात देणारा विश्वासघातकी कवि कुलेश
  3. औरगजेबाने संभाजी राजांना मनुस्मृती संहितेप्रमाणे ठार मारले
  4. शिवशक बंद करुन मोगलांचा फसलीशक सुरु करणारे पेशवे
  5. शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला
  6. शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे

शिवशक बंद करुन मोगलांचा फसलीशक सुरु करणारे पेशवे

 -श्रीमंत कोकाटे (शिवचरित्र अभ्यासक, संशोधक)


विश्ववंद्य शिवरायांच्या खुनानंतर छ. संभाजीराजे, राजाराम, ताराबाई आणि शाहुराजांनी
भूमिपुत्रांच्या स्वराज्याचे संरक्षण व संवर्धन केले. १७१३ साली शाहुराजांनी कान्होजी आंग्रे मोहिमेवर
बाळाजी विश्वनाथ भट याला जाण्यास सांगितले. पण त्याने मला सर्वाधिकार दिल्याशिवाय मी
मोहिमेवर जाणार नाही असे बाळाजी भट शाहूराजांना उर्मटपणे म्हणाला. शाहूराजांना अडचणीत पकडून
बाळाजी भटाने पेशवेपद घेतले. आणि अशा प्रकारे शिवाजीमहाराजांनी कष्टाने उभारलेले गरिबांचे
स्वराज्य रक्तपिपासू, अत्याचारी, जातीयवादी, देशद्रोही आणि शिवाजीद्रोही पेशव्यांच्या हातात गेले.
पेशव्यांच्या हातात सत्ता येताच पेशव्यांनी शिवरायांनी राज्याभिषेकापासून सुरु केलेला शिवशक बंद
केला. त्याऐवजी पेशव्यांनी मोगल बादशहाचा फसलीशक सुरु केल. इतकेच नव्हे तर पेशव्यांनी  शिवाजीराजांच्या सर्व पाऊलखुणा नष्ट करण्यास आरंभ केला. शिवाजीराजांचे संपूर्ण कार्य पुसण्याचा सपाटा पेशव्यांनी सुरु केला. वर्णभेद व जातीभेदाची पेशव्यांनी पुर्नस्थापना केली. टोकाचा धर्ममार्तंडपणा
सुरु झाला. शिवशिक बंद करुन मोगल बादशहाचा फसलीशक सुरु करण्यातून शिवाजीराजांबद्दल पेशव्यांना असणारी घृणा स्पष्ट जाणवते. भारतासह सर्व जगातील मुसलमानांना खुष करण्यासाठी पेशव्यांनी
स्वराज्यावर नांगर फिरवला. जिजाऊमाँसाहेबांनी बांधलेला भव्य-दिव्य लालमहाल पाडून त्या ठिकाणी
शनिवारवाडा बांधला.

शिवशक बंद करुन फसलीशक सुरु करण्यामागे पेशव्यांचा एक डाव होता. मुसलमानांचे राज्य संपुर्ण भारतात येईल, असे त्यांना वाटत होते. मुस्लिम राज्यकर्त्यांचा वरदहस्त आपणावर कायमचा रहावा यासाठी
पेशव्यांनी फसलीशक सुरु केला. परंतु इंग्रजांनी आघाडी मारली आणि संपूर्ण भारत इंग्रजांनी जिंकला. इंग्रजांनी पेशव्यांना देखील पराभूत केले. पेशव्यांचा फसलीशक सुरु करण्यामागचा डाव फसला.
त्यानंतर ब्राह्मणांनी इंग्रज वापरत असलेले ग्रिगेरियन कॅलेंडर (जानेवारी ते डिसेंबर) स्विकारले.  इंग्रजांची सत्ता भारतात आल्याबरोबर सर्व इंग्रजी भाषा, कॅलेंडर, शिक्षण, नोकरी व
इंग्रजांशी मैत्री ब्राह्मणांनी स्विकारली. म्हणजे धन, संपत्ती आणि सत्तेसाठी शिवाजीराजांच्या
स्वराज्याला पेशव्यांनी सुरुंग लावला. (समुद्र ओलांडणे पाप आहे, असे बिंबवणा-या ब्राह्मणांनीच
लंडन येथे जाऊन शिक्षण घेतले. बहुजनसमाजाला जगाचे ज्ञान होऊ नये यासाठीच ब्राह्मणांनीच सिंधूबंदी
सुरु केली होती. स्वेथासाठी ती त्यांनीच मोडली.

ब्राह्मणांचा इंग्रजांना खोटा विरॊध 
ब्राह्मण इंग्रजांना वरवर विरोध करीत होते. यापाठीमागे ब्राह्मणांचा स्वार्थ होता. सावरकरांचे शिक्षण लंडन येथे झाले. वासुदेव बळवंत फडके, मंगल पांडे हे देखील इंग्रजांकडे नोकरीला होते. ब्राह्मण स्वत:ची मुले इंग्रजी
शाळेत घालत; तरीही इंग्रजीला विरोध करत. बहुजनसमाज इंग्रजी भाषा शिकला तर त्यांची
मुले ब्राह्मण मुलांची स्पर्धक होतील म्हणून ब्राह्मण इंग्रजी भाषेला विरोध करत असत. आजही ते हेच करतात. ब्राह्मणांचे मराठी भाषेवरील प्रेमाचे फक्त ढोंग आहे. जगात स्पर्धेत टिकण्यासाठी इंग्रजी भाषा शिकावी. कारण इंग्रजी जगातील सर्वात सोपी भाषा आहे. इंग्रजी ही ज्ञान, संपर्क, वैश्विक भाषा आहे.

पेशव्यांनी रायगडावरील दप्तरखाना जाळला, राणीवसा पाडला, राजदरबार तोडला, समाधी
उद्धस्त केली, राजांनी मुस्लिम सैनिकांसाठी बांधलेली मशिद पाडली, पण जगदिश्वराच्या मंदिराला हात
लावला नाही. म्हणूनच आज रायगडावरील मंदिर चांगले आहे पण राजदरबार नष्ट झालेला आहे.

(शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? या पुस्तकातून)


प्रख्यात इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेले ‘शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?' हा ग्रंथ "अनिता पाटील विचार मंच"च्या वाचकांसाठी येथे उपलब्ध करून देत आहोत. जिज्ञासूंनी त्यावर प्रतिक्रिया जरूर द्याव्यात.

ग्रंथ प्रवेश 
भाग-१
भाग-४
  1. नेताजी पालकरांच्या धर्मांतराला विरोध, गंगाधर कुलकर्णीच्या धर्मांतराला मात्र समर्थन
  2. संभाजीराजांना मोगलांच्या ताब्यात देणारा विश्वासघातकी कवि कुलेश
  3. औरगजेबाने संभाजी राजांना मनुस्मृती संहितेप्रमाणे ठार मारले
  4. शिवशक बंद करुन मोगलांचा फसलीशक सुरु करणारे पेशवे
  5. शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला
  6. शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे

Friday 13 December 2013

औरंगजेबाने संभाजी राजांना मनुस्मृतीसंहितेप्रमाणे ठार मारले

-श्रीमंत कोकाटे (शिवचरित्र अभ्यासक, संशोधक)


औरंगजेबाने संभाजीराजांप्रमाणे आजर्पंत कोणालाही ठार केले नव्हते. राजांना एका घावात ठार
मारण्याऐवजी वेगळी शिक्षा का देण्यात आली असावी? प्रथम राजांची जीभ कापण्यात आली. यावरुन
असे अनुमान निघते की संभाजीराजांनी संस्कृतवर प्रभुत्व मिळविले होते. त्यांनी चार ग्रंथ लिहिले होते
म्हणूनच प्रथम त्यांची जीभ कापण्याचा सल्ला ब्राह्मण सल्लागारांनी दिला. नंतर राजांचे क्रमश: कान,
डोळे, त्वचा काढण्यात आली. ही निर्दय शिक्षा मनुस्मृती संहितेप्रमाणे देण्यात आली. म्हणजेच
औरंगजेबाच्या माध्यमातून राजांना ही शिक्षा ब्राह्मणांनी दिली. कविकुलेशाला देखील औरंगजेबाने
जिवंत ठेवले नाही. कारण जिवापाड प्रेम करणा-या राजांसारख्या स्वाभिमानी, प्रेमळ, निर्मळ आणि
जिवलग मित्रावर उलटलेला कुलेश आपला कधी घात करील हे सांगता येणार नाही, हे औरंगजेब ओळखून होत.  म्हणूनच औरंगजेबाने कुलेशालादेखील ठार मारले.

औरंगजेबाचा हा चालता बोलता इतिहासच होता.
औरंगजेबाने सख्खे भाऊ तसेच जिवलग सरदार दिलेरखान, मिर्झाराजे, जयसिंग या विश्वासू
सरदारांनाही ठार मारले होते. त्यामुळे मदत करणा-या कविकुलेशाला औरंगजेबाने जिवंत ठेवणे शक्य
नव्हते. कारण कुलेशाला त्याचा मोबदला औरंगजेबाने दिला होता.
औरंगजेबाने संभाजीराजांना धर्म व्देषाने ठार मारले नसुन राजकीय संघर्षामुळे ठार मारले.
औरंगजेबाने राजांना फक्त दोनच प्रश्न विचारले. तुमच्या खजिन्याच्या चाव्या कोठे आहेत? आणि
माझ्या सरदारांपैकी तुम्हाला कोण फितूर आहे? म्हणजे औरंगजेबाने राजांना धर्मांतराचा आग्रह धरला
नव्हता व संभाजीराजांनी धर्मांतरासाठी मुलीची मागणी केली नव्हती. राजांची हत्या झाल्यानंतर
ब्राह्मणांनी आनंदोत्सव म्हणुन गुढीपाडवा सुरु केला.


(शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? या पुस्तकातून)


प्रख्यात इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेले ‘शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?' हा ग्रंथ "अनिता पाटील विचार मंच"च्या वाचकांसाठी येथे उपलब्ध करून देत आहोत. जिज्ञासूंनी त्यावर प्रतिक्रिया जरूर द्याव्यात.

ग्रंथ प्रवेश 
भाग-१
भाग-४
  1. नेताजी पालकरांच्या धर्मांतराला विरोध, गंगाधर कुलकर्णीच्या धर्मांतराला मात्र समर्थन
  2. संभाजीराजांना मोगलांच्या ताब्यात देणारा विश्वासघातकी कवि कुलेश
  3. औरगजेबाने संभाजी राजांना मनुस्मृती संहितेप्रमाणे ठार मारले
  4. शिवशक बंद करुन मोगलांचा फसलीशक सुरु करणारे पेशवे
  5. शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला
  6. शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे

संभाजी राजांना मोगलांच्या ताब्यात देणारा विश्वासघातकी कवि कुलेश


-श्रीमंत कोकाटे (शिवचरित्र अभ्यासक, संशोधक)


शिवाजीराजे आणि संभाजीराजे या पिता पुत्रात भांडण लावण्याचा मोरोपंत, अण्णाजी दत्तो
यांनी कसोशीने प्रयत्न केला. यासाठी त्यांनी संभाजीराजांविरुद्ध खोट्या अफवा पसरवल्या. ‘शिवरायांना
संभाजीबद्दल प्रेम नाही, ते राजारामाला वारसदार करणार आहेत' अशा प्रकारच्या अफवा पसरवून
संभाजीराजांना भडकविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ब्राह्मण मंत्र्यांना यश आले नाही. दोघा पिता पुत्रांनी
ब्राह्मणांना चांगलेच ओळखले होते. दिलेरखानाची आक्रमकता रोखण्यासाठी शिवरायांनी
संभाजीराजांना मोगलांकडे पाठविले होते. पुढे हे दिलेरखानाच्या लक्षात येताच शिवरायांनी संभाजीला
सोडवून आणले. आणि संभाजीराजांना पन्हाळ्याचे सुभेदार केले. कवि कुलेश या ब्राह्मणाने संभाजीशी
मैत्री संपादन केली. संभाजीराजे आणि सर्व मराठे सरदार यांच्यात भांडण लावण्याचा कुलेशाने प्रयत्न
केला. संपत्ती आणि पदाच्या लालसेने तो राजांच्या आश्रयाला आला. स्वकर्तृत्वाने मोठे झालेले
बहुजन नेते किंवा  राजाच्या जवळ ब्राह्मण येतात. गरीबांची ते कधीच हांजी-हांजी करत नाहीत. पण नेते
आणि राजे यांच्याजवळ ते पुर्ण स्वार्थ साधण्यासाठी राहतात. पण जास्त संपत्ती दुस-या बाजूकडून
मिळताच ते आपल्या नेत्याचाही घात करतात. अगदी असाच प्रसंग संभाजीराजांच्या जीवनात घडला.
उत्तर भारतातून आलेल्या कुलेशाला राजांनी छंदोगामात्य (मुख्य प्रधान) केले,  त्याच्यावर  संपुर्ण विश्वास  टाकला. त्यानेच राजांचा विश्वासघात केला.

रायगडावर हल्ला करण्याची औरंगजेबाची मोहीम होती. पण त्यासाठी औरंगजेबाला रायगड
माहित नसल्यामुळे गडाची प्रतिकृती (मॉडेल) हवी होती. ही प्रतिकृती तयार करण्याची जोखीम कुलेशाने
घेतली. त्या बदल्यात औरंगजेबाने कुलेशाला खूप पैसा दिला. कुलेशाने हे काम त्याच्या मुलाकडे
सोपविले. म्हणजे कुलेश संभाजीसोबत राहून औरंगजेबाला मदत करीत होता. राजांच्या निर्मळ आणि
प्रेमळ मनाचा कुलेशाने गैरफायदा घेतला. म्हणजे कवि कुलेश हा औरंगजेबाचा हितचिंतक होता आणि
राजांचा शत्रू होता. राजांना पकडून देण्याची जबाबदारी कवि कुलेशानेच स्विकारली. औरंगजेबाने कवि
कुलेशाला खूप पैसा दिला. राजे रायगडावर जाण्यासाठ निघाले, वाटेत संगमेशर येथे थांबले. तेव्हा राजे
कवि कुलेशाला म्हणाले, ‘आपण लवकर रायगडाकडे जाऊ. या ठिकाणी धोका होण्याची शक्यता आहे.' तेव्हा कुलेश म्हणाला, ‘‘येथे कोणीही येणार नाही." कविकुलेश अनुष्ठानास बसला. तेव्हा राजांनी
कविकुलेशाला लवकर निघण्याचा आग्रह केला परंतू कविकुलेशानेच अनुष्ठानात जाणीवपुर्वक वाढ केली.
संभाजीराजांना कविकुलेशाने संगमेशर येथे रोखून धरल्याची खात्रीलायक बातमी औरंगजेबाला
समजली. आणि लगेच औरंगजेबाने मुकर्रबखान आणि इखलासखानाला कोल्हापुरावरुन संगमेशरला
पाठविले. त्यांनी तातडीने येऊन संभाजीराजे व कुलेशाला पकडले. पण या प्रसंगी राजे घोड्यावर निसटले
होते पण कुलेश ओरडला ‘महाराज मै गिर गया'! निसटलेले राजे कवि कुलेशाला वाचवण्यासाठी परत
फिरले आणि लगेच त्यांना पकडण्यात आले (संदर्भ- निकोलाओ मनुची लिखीत "असे होते मोगल" पृ.
२८८) जेव्हा राजांना पकडण्यात आले तेव्हा ते पुर्ण सावध होते. राजे कोणत्याही विधीत मग्न नव्हते.
या उलट राजे लवकर निघण्याचा आग्रह कुलेशाला करत होते. म्हणजे राजांना दुरदृष्टी होती. पण
कुलेशाने अनुष्ठानाचे निमित्त करुन राजांना औरंगजेबाचे सैन्य येईपर्यंत अडवून धरले होते.
संभाजीराजांसारख्या सरळ मनाच्या राजाचा अशा प्रकारे कविकुलेशाने काटा काढला व बदनाम केले 
राजांच्या गणोजी शिर्के व नागोजी शिर्के या मेहुण्यांना. कुलेशाला निर्दोश सोडण्यासाठी ब्राह्मणी
इतिहासकारांनी राजांना गणोजी आणि नागोजी शिर्के यांनी पकडून दिले असे धादांत खोटे लिहिले.
राजकारणात कितीही स्वार्थ असला तरीही आपल्या बहिणीचे कुंकू पुसावे असे कोणत्याही भावाला
वाटत नसते. गणोजी-नागोजी हे येसुबाईचे भाऊ होते. त्यांनीच राजांना पकडून दिले असा अपप्रचार
ब्राह्मणी लेखकांनी केला. म्हणजे कु्रर, स्वार्थी, लबाड कविकुलेशाला निर्दोष सोडण्यासाठी नागोजी-
गणोजीला बदनाम करुन बहिण-भावाचे पवित्र नात्याला देखील अनेक पक्षपाती लेखकांनी
कलंक लावला आहे. (कविकुलेश याच्या फितुरीमुळेच संभाजीराजांना औरंगेबाने पकडले असा स्पष्ट
उल्लेख ईश्वरदास नागर, रॉबर्ट आर्म, निकालाओ मनुची या परकीय लेखकांनी केलेला आहे. संदर्भ- छ.
संभाजी स्मारक ग्रंथ.  पृ. १७०, १९४, १९५, १७१)

(शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? या पुस्तकातून)


प्रख्यात इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेले ‘शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?' हा ग्रंथ "अनिता पाटील विचार मंच"च्या वाचकांसाठी येथे उपलब्ध करून देत आहोत. जिज्ञासूंनी त्यावर प्रतिक्रिया जरूर द्याव्यात.

ग्रंथ प्रवेश 
भाग-१
भाग-४
  1. नेताजी पालकरांच्या धर्मांतराला विरोध, गंगाधर कुलकर्णीच्या धर्मांतराला मात्र समर्थन
  2. संभाजीराजांना मोगलांच्या ताब्यात देणारा विश्वासघातकी कवि कुलेश
  3. औरगजेबाने संभाजी राजांना मनुस्मृती संहितेप्रमाणे ठार मारले
  4. शिवशक बंद करुन मोगलांचा फसलीशक सुरु करणारे पेशवे
  5. शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला
  6. शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे

नेताजी पालकरांच्या धर्म प्रवेशास विरोध, गंगाधर कुलकर्णीच्या धर्म प्रवेशास मात्र समर्थन

-श्रीमंत कोकाटे (शिवचरित्र अभ्यासक, संशोधक)


नेताजी पालकर हे शिवाजीराजे निष्ठावं सेनापती होते. पण त्यांचे सक्तीने धर्मांतर करण्यात आले.
ते महंमदकुलीखान झाले. औरंगजेबाचे नेताजींना अफगाणिस्तानात पाठविले. नेताजींचे नाव बदलले
पण मन बदलले नव्हते. धर्म बदलला पण राजांवरील निष्ठा अभंग होती. राजांकडे यावे यासाठी
नेताजींनी अनेक वेळा पळून येण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना पाठ फुटेपर्यंत मारले, पण एके दिवशी
नेताजी पालकर राजांकडे आले आणि प्रेमाने ते राजांना कडाडून भेटले. त्यांनी स्वधर्मात येण्याची इच्छा
व्यक्त केली. केली हे ब्राह्मणांस समजले तेव्हा त्यांनी नेजाजींना स्वधर्मात येण्यास कडाडून विरोध केला.
तेव्हा राजे भटांना म्हणाले,  "निराश्रीतांना जवळ घेणेणे हाच धर्म आहे. आणि त्यांना दूरूर लोटणे हा अधर्म
आहे. नेताजींना मी धमार्त घेणार. धमाच्या नावाखाली विरोधेध केलेला तरी तुम्ही आणि तुमचा धर्म
गुंडाळून ठेवा. " राजांनी धर्ममार्तंड पुरोहितांची हांजी-हांजी केली नाही. 
संस्कृतीच्या नावाखाली केली जाणारी पिळवणूक थांबविण्यासाठी राजांनी वैदिकांचा विरोध
झुगारुन दिला व नेताजी पालकरांना स्वधर्मात घेतले.

आता दुसरी अत्यंत महत्वाची घटना म्हणजे संभाजीराजांच्या काळात औरंगाबाद प्रांतातील
कसबे हरसुल येथील गंगाधर रंगनाथ कुलकर्णी याने धर्मांतर केले होते. त्याने स्वखुशीने मुसलमान धर्म
स्विकारला होता. सक्तीने त्याचे धर्मांतर झाले नव्हते. पण पुढे गंगाधर कुलकर्णीला परत धर्मांत येण्याची
इच्छा झाली. गंगाधरभाई कुलकर्णी संभाजीराजांकडे आला व त्याने राजांजवळ स्वधर्मात येण्याची इच्छा
व्यक्त केली. (संदर्भ: छ.संभाजी स्मारक ग्रंथ. पृ.१८३) पण नेताजी पालकरांना स्वधर्मात घेताना जसा
विरोध केला होता तसा गंगाधर कुलकर्णीला ब्राह्मणांनी विरोध केला नाही. या प्रसंगी सर्व भट-पुरोहित
मूग गिळून गप्प बसले. नेताजींचे सक्तीने धर्मांतर केले होते तसे गंगाधरचे सक्तीचे धर्मांतर नव्हते. तरी
नेताजी पालकर व राजांना ब्राह्मणांनी वैदिक धर्मातील अनेक कारणे सांगून प्रखर विरोध केला. मग
गंगाधर कुलकर्णीच्या वेळेस कुठे गेला धर्म आणि संस्कृती?

नेताजी पालकरांच्या धर्मांतराला वैदिक धर्म ग्रंथातील प्रमाणाव्दारे कडाडून विरोध केला
यापाठीमागे नेताजी पालकरांकडून धर्मांतर विधीसाठी धन-संपत्ती मिळविण्याच्या ब्राह्मणांचा हेतू असावा.
म्हणूनच नेताजी पालकरांच्या धर्मांतरास सर्व ब्राह्मणांनी विरोध केला. म्हणजे ग्रंथांचा आधार घेऊन
विरोध करण्यामागे धर्म, संस्कृती आणि तत्वज्ञान याबाबत ब्राह्मणांना श्रद्धा तर फक्त पैसा-संपत्ती
मिळावी आणि वर्णव्यवस्थेव्दारे ब्राह्मणांचे वर्चस्व सर्व जातींवर रहावे यासाठीच ते धर्मग्रंथांचा  वापर
करतात. याचा अर्थ धर्मग्रंथांचे दोन भाग पडतात. ब्राह्मणांचे धर्मग्रंथ व बहुजनांचे धर्मग्रंथ. यावरुन सिद्ध
होते की, ब्राह्मणांना व्रतवैकल्ये व ग्रंथांचा  प्रामाण्य मान्य नाही. पण त्यांनी बहुजनांना मात्र पाप-पुण्याची
भिती दाखवून अर्थसत्ता प्रस्थापित केली आहे. धर्मांतर प्रसंगी नेताजी पालकरांच्या पैशावर ब्राह्मणांचा
डोळा होता पण गंगाधर कुलकर्णीच्या कडून ब्राह्मणांनी पैशाची का अपेक्षा ठेवली नाही? याचा अर्थ
ब्राह्मणांचा आणि बहुजनसमाजाचा धर्म एक नाही. तसेच ब्राह्मण हे देव, धर्म आणि संस्कृतीला मानत
नाहीत. ब्राह्मण हे स्वत: देव मानत नाहीत फक्त देव मानण्याचे नाटक करता. सुसंस्कृतपणाचे
नाटक करतात. म्हणजे बहुजनसमाज देवाधर्माच्या नादी लागावा हा त्यांचा हेतू असतो. देव हा
ब्राह्मणांनी बहुजन समाजाला गाडण्यासाठीच निर्माण केला आहे. त्यामुळे ब्राह्मण देवाच्या दरबारात
उर्मटपणे पैसा उकळतात, खोटे बोलतात, भक्तांना दमदाटी करतात, देवाला अर्पण केलेल्या सर्व वस्तु
आणि पैसा स्वत: घेतात, मग या ठिकाणी देव मूग गिळून का गप्प बसतो? याच अर्थ ब्राह्मण दैववादी
नाहीत. भारतीय संस्कृतीचे ते पालन करीत नाहीत. पण बहुजनसमाजाने करावे यासाठी ते बहुजनांना
देवा-धर्मांची भिती घालतात. म्हणून नेताजी पालकरांच्या धर्मांतरास ब्राह्मणांनी विरोध केला पण
गंगाधर कुलकर्णीला त्यांनी विरोध केला नाही.

(शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? या पुस्तकातून)


प्रख्यात इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेले ‘शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?' हा ग्रंथ "अनिता पाटील विचार मंच"च्या वाचकांसाठी येथे उपलब्ध करून देत आहोत. जिज्ञासूंनी त्यावर प्रतिक्रिया जरूर द्याव्यात.

ग्रंथ प्रवेश 
भाग-१
भाग-४
  1. नेताजी पालकरांच्या धर्मांतराला विरोध, गंगाधर कुलकर्णीच्या धर्मांतराला मात्र समर्थन
  2. संभाजीराजांना मोगलांच्या ताब्यात देणारा विश्वासघातकी कवि कुलेश
  3. औरगजेबाने संभाजी राजांना मनुस्मृती संहितेप्रमाणे ठार मारले
  4. शिवशक बंद करुन मोगलांचा फसलीशक सुरु करणारे पेशवे
  5. शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला
  6. शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे

आदिलशहाचा मोकाशी दादू कोंडदेव कुलकर्णी

-श्रीमंत कोकाटे (शिवचरित्र अभ्यासक, संशोधक)


दादू कोंडदेवचे खरे नांव दादू कोंडदेव कुलकर्णी असे आहे. दादू कुलकर्णी हा आदीलशहाचा
मोकाशी म्हणजेच नोकर होता. तुकोबारायांना छळणारे हे दादू कुलकर्णीचे समर्थक होते. म्हणजे दादू
कुलकर्णी या शिवरायांचा शत्रू होता. शत्रू असणा-या देखील ब्राह्मणांनी गुरु केले. दादू कुलकर्णीचा
शिवचरित्राशी काहीही संबंध नाही. दादू कुलकर्णी हा युद्धकलेत अकुशल होता. शिवरायांना युद्धकलेचे
शिक्षण शहाजीराजांनी दिले, त्याचा सराव जिजाऊमाँसाहेबांनी घेतला. कान्होजी जेधे, येसाजी कंक,
मुंढव्याचे गायकवाड, तुपे, मोझे, पायगुडे इ. शहाजीराजांचे पहिल्या फळीतील कार्यकर्ते आहेत. वीर
बाजी पासलकरांनी बाळ शिवबांना पुणे व परिसरात मोलाची मदत केली. ब्राह्मण गुरु असल्याशिवाय
कोणीही मोठे होत नाही हे बिंबविण्यासाठी ब्राह्मणांनी दादू कुलकर्णी शिवचरित्रात घुसविला.
शिवचरित्राच्या कोणत्याही संदर्भ साधनात दादू कुलकर्णीचा साधा उल्लेख देखील नाही.

दादुने केला तुकोबारायांचा छळ
संत तुकोबाराय हे शिवाजीराजांचे खरे गुरु आहेत याबाबत कोणाचेही दुमत नाही, पण
तुकोबारायांचे गुरुपण संपविण्यासाठी रामदास शिवचरित्रात घुसविला. त्यांच्या प्रबोधनामुळेच
शिवरायांचे मावळे प्रभावित झाले. राजांनी तुकोबारायांची अनेक किर्तने प्रत्यक्ष ऐकलेली होती. त्यांच्या
ख-या किर्तनामुळे भटशाही हादरली. त्यामुळे त्यांनी तुकोबारायांना त्रास देणे सुरु केले. त्यांची बदनामी
मंबाजी भट, रामेशरभट याने केली. त्यांच्या अभंगाची गाथा त्यांनी पाण्यात बुडवली. त्यांना शिक्षा
करावी अशी मागणी अशी मागणी देहूच्या दोन ब्राह्मणांनी आदिलशहाचा मोकाशी दादू कोंडदेव याचेकडे
केली. शेवटी त्यांची हत्या करुन ब्राह्मणांनी सदेह वैकुंठगमन असा अपप्रचार सुरु केला. (महापुरुषांची
हत्या झाली म्हणून त्यांच्या योग्यतेला तडा जात नाही. जगातील अनेक महापुरुषांच्या हत्या झालेल्या
आहेत म्हणून त्यांना जनतेने नाकरले नाही.) राज्याभिषेकप्रसंगी देखील ब्राह्मण शिवरायांशी उर्मटपणे
वागत होते. तेथे तुकोबारायांच्या हत्येप्रसंगी ब्राह्मणांची क्रुरता शिगेला पोहचली होती. शिवराय-
तुकोबाराय यांचे आंदोलन संपविण्यासाठी ब्राह्मणांनी मुस्लिमांना हाताशी धरलेले होते.
तुकोबारायांच्या हत्येनंतर पेशव्यांनी गाथा जाळली. त्यांचे अभंग म्हणण्यावर पेशव्यांनी बंदी
घातली. निरुपणासाठी जर कोणी अभंग म्हटले तर पेशवाईत शिक्षा केली जात असे. आजदेखील
ज्ञानेशरांच्या पालखीपुढे तुकोबारायांची आरती म्हणण्यास विरोध केला जातो. देहू आणि आळंदी
यांच्या विकासातील फरक प्रकर्षाने जाणवतो. आळंदीचे उदात्तीकरण तर देहू उपेक्षित ठेवण्यामागील
षडयंत्र कोणाचे? महाराष्ट्रात कोणताही नवीन पाहूणा आला की त्यांना आळंदीला नेले जाते पण देहूला
नेले जात नाही. म्हणजे तुकोबारायांना व शिवरायांना विरोध करणार एकच आहेत.

(शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? या पुस्तकातून)


प्रख्यात इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेले ‘शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?' हा ग्रंथ "अनिता पाटील विचार मंच"च्या वाचकांसाठी येथे उपलब्ध करून देत आहोत. जिज्ञासूंनी त्यावर प्रतिक्रिया जरूर द्याव्यात.

ग्रंथ प्रवेश 
भाग-१
भाग-४
  1. नेताजी पालकरांच्या धर्मांतराला विरोध, गंगाधर कुलकर्णीच्या धर्मांतराला मात्र समर्थन
  2. संभाजीराजांना मोगलांच्या ताब्यात देणारा विश्वासघातकी कवि कुलेश
  3. औरगजेबाने संभाजी राजांना मनुस्मृती संहितेप्रमाणे ठार मारले
  4. शिवशक बंद करुन मोगलांचा फसलीशक सुरु करणारे पेशवे
  5. शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला
  6. शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे

रामदास संत नव्हे; तर स्वराज्यातील जंत होता

-श्रीमंत कोकाटे (शिवचरित्र अभ्यासक, संशोधक)


शिवाजी राजांचा सर्वात खतरनाक शत्रू म्हणजे रामदास. त्याला राजांचा गुरु करण्याचा
अनैतिहासिक प्रयत्न जातीयवादी इतिहासकारांनी केला. खरे तर राजे आणि रामदास यांची कधीच भेट
झाली नाही. म्हणून रामदास हा राजांचा गुरु नव्हता हे सिद्ध होते. पण रामदास राजांचा शत्रू होता हे
बहुतांशी लोकांना माहीत नाही.
रामदास हा आदीलशहा आणि औरंगजेबाचा गुप्तहेर होता. अफजलखानाचा मित्र बाजी
घोरपडे याच्या आश्रयाला रामदास होता. एका बाजूला राजे गड जिंकत होते, किल्ले बांधत होते; तर दुसऱ्या बाजूने  रामदास समाजात भोळेपणा पसरविण्याचे काम करत होता. पुरोहित भटांना जगण्यासाठी रामदासांनी मंदिरे उभारली. राजे किल्ले बांधत होते. ज्याचे किल्ले त्याचे राज्य हा तो काळ होता. रामदास मात्र
मंदिर बांधत होता. कारण जेथे मंदीर तेथे ब्राह्मणांचे राज्य. राजे तर प्रयत्नांची पराकाष्टा करणारे
विज्ञाननिष्ठ राजे होते. राजांच्या या क्रांतीकार्याला विरोध करण्याचे काम या रामदासाने केले.
रामदास हा स्वत:च्या लग्नप्रसंगी सावधान म्हणताच बोहल्यावरुन पळाला. पळण्यापूर्वी तो
बोहल्यावर नवरदेव म्हणून उभा होता. म्हणजे त्याने मुलगी पसंत केली होती. लग्न ठरले होते. व-हाडी
मंडळी आली होती. वधू त्याच्या समोर उभी होती. मंगलाष्टके सुरु झाली. सर्व मंगलाष्टके झाली आणि
शेवटचे मंगलअष्टक म्हणजे ‘आता सावधान' म्हणताच रामदास बोहल्यावरुन पळून गेला. हे एक तर
मुर्खपणाचे किंवा समाजद्रोहीपणाचे लक्षण आहे. कारण त्या काळात अंगाला हळद लागली आणि लग्न
मोडले तर मुलींना पुन्हा आजन्म अविवाहित रहावे लागत होते. त्या काळात वधूच्या भवितव्याचा
आजिबात विचार न करता लग्न मंडपातून पळून जाणारा रामदास शिवाजीराजांसारख्या सामर्थ्यशाली
सम्राटाचा गुरु होऊच शकत नाही. खरे तर तो समाजद्रोही होऊ शकतो. कारण त्या वधूच्या जागी आपली
बहीण किवा  मुलगी असती तर आपल्याला काय वाटले असते? पुढे रामदासाला विधवा तरुणीशी
व्याभिचार करण्याची चटक लागली. वेण्णा आणि आक्का यांच्याशी रामदासाचे अनैतिक संबंध होते.
रामदास हा रंगेल आणि व्याभिचारी होता. (संदर्भ- इतिहासाचार्य प्रा. मा.म. देशमुख लिखित रामदास आणि पेशवाई) अशा स्त्रीलंपट
रामदासाचा राजांनी अनुग्रह घेतला अशी कल्पना करणेसुद्धा अक्षम्य गुन्हा आहे. असा स्त्रीलंपट
रामदास समोर जरी आला असता तरी त्याला राजांनी झोडपलेच असते म्हणूनच त्याने राजांची कधीच
भेट घेतली नाही. राजांच्या जीवनात आलेल्या कोणत्याही महत्वाच्या व रोमांचकारी प्रसंगाचेवेळी
रामदासाने राजांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मदत केल्याचा कोठेही इतिहासात उल्लेख नाही.
अफजलखान भेटीच्याप्रसंगी पन्हाळा वेढा, शाईस्तेखानावर हल्ला, आग्रा कैद, राज्याभिषेक या
कोणत्याही प्रसंगी रामदास राजांना मदत करण्यासाठी आलेला नव्हता. समकालीन जेधे शकावली,
सभासद बखर, शिवभारत इतर कोणेणत्याही ग्रंथात रामदासाचा साधा नामोल्लेख देखील नाही.
(जिज्ञासुंनी संदर्भ ग्रंथ वाचावेत ही विनंती)

ब्राह्मणवादी रामदास 
रामदास हा पूर्ण ब्राह्मणवादी होता. रामदास म्हणतो,
देवी ब्राह्मणी सत्ता करी। तो एक मुर्ख।।६८।। (दासबोध-२:१:६८)
म्हणजे जो ब्राह्मणावर राज्य करतो तो मुर्ख असतो. म्हणजे ब्राह्मणेतराने
फक्त चाकरीच करावी हा त्याचा आग्रह होता. शिवाजीराजे राज्याभिषेकाने राजे झाले. त्यामुळे ब्राह्मणांना
देखील शिक्षा करण्याचा अधिकार राजांना प्राप्त झाला. यामुळे तो अस्वस्थ झाला आणि राजांना मुर्ख
म्हणण्यापर्यंत त्याची मजल गेली. पुढे तो म्हणतो :
निच प्राणी गुरुत्व पावला। तेथे आचरची बुडाला
वेदशास्त्र ब्राह्मणाला । कोण पुसे ।। (दासबोध-१४:७:२९)
रामदासाला बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार झाल्याने कमालीचे दु:ख झाले. अध्ययन हे
फक्त ब्राह्मणांनीच करावे हा त्याचा आग्रह आहे. समाजात अनाचार का वाढला तर शूद्रांनी शिकण्यास
सुरुवात केली म्हणून. आचार बुडाला अशी तक्रार तो करतो. बहुजन समाज शिक्षण घेऊ लागल्याने
वेदशास्त्रात पारंगत असलेल्या ब्राह्मणास कोणी विचारत नाही याचेच त्याला वाईट वाटते. म्हणजे तो
जातियवादी तर होताच पण वर्णव्यवस्थेचा कट्टर समर्थक होता, कडवा ब्राह्मण्यवादी होता. म्हणूनच
शूद्रांनी शिक्षण घेतल्यामुळे त्याच्या पोटात दुखु लागले. म्हणून तो पुढे म्हणतो :
राज्य नेले म्लेंच्छ क्षेत्री । गुरुत्व नेले कुपात्री ।।
आपण अरत्री ना परत्री । काहीच नाही (दासबोध-१४.७.३६)
राज्य मुसलमान आणि क्षत्रियांकडे गेले. शिवाजीराजांचे गुरुत्व संत तुकोबारायांकडे गेले
आपल्या ब्राह्मणांच्या हाती काहीच राहिले नाही म्हणून तो आरडा ओरडा करत होता. हे काही संताचे
लक्षण नव्हे. संताच्या कार्याला जात, पात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, देश आणि धर्माचे बंधन नसते. संत
हे सर्व सजिवांच्या कल्याणाकरता झटणारे असतात. पण तो फक्त ब्राह्मणांसाठीच झगडत होता म्हणूनच
रामदास हा संत नव्हे तर स्वराज्यातील जंत होता. तो ब्राह्मणांच्या उध्दारासाठी व बहुजनांच्या
-हासासाठी कसा झटत होता याचे पुरावे दासबोधातच आढळतात. रामदास म्हणतो :
गुरु तो सकळासी ब्राह्मण । जरी तो झाला क्रियाहीन
म्हणजे ब्राह्मण निष्क्रिय-क्रियाहीन असला तरी सर्व जाति धर्माच्या जनतेने
ब्राह्मणालाच गुरु करावे. म्हणजे ब्राह्मणी वर्चस्व राहावे व ब्राह्मणांना बिगर श्रमाचे धन मिळावे. ही
त्याची ओढ होती. शिक्षक ब्राह्मणांशिवाय कोणी होऊ नये ही त्याची इच्छा होती.
सकळांशी पूज्य ब्राह्मण । हे मुख्य वेदाज्ञा प्रमाण
ब्राह्मण वेद मुर्तिमंत । ब्राह्मण तोचि भगवंत
ब्राह्मणाला सर्वांनी देव मानावे हे वेद सांगतात. ब्राह्मण हाच वेद आणि देव आहे असे रामदास
म्हणतो. म्हणजे सर्वांनी ब्राह्मणांची पूजा करावी हा आग्रह रामदासाचा होता/
लक्षभोजनी ब्राह्मण । आन जातीस पुसे कोण
लक्षभोजन हा ब्राह्मणांचा हक्कच आहे. इतर जातीला विचारण्याचे कारणच नाही. असे त्याचे
मत आहे. म्हणजे ब्राह्मणांना फुकटात भोजन द्यावे असे तो म्हणतो :
असो ब्राह्मण सुरवर वंदिती । तेथे मानव बापुडे किती
आतातर रामदास बहुजन समाजाला भीतीच दाखवितो की ब्राह्मणाला देव वंदन करतात, तर
माणसाची काय गत आहे.
जरी ब्राह्मण मुढमती । तरी तो जगदवंद्य
आता तर रामदासाने कहरच केला तो म्हणतो ब्राह्मण मुर्ख असला तरी चालेल तो जगाला
वंदनिय असतो. (डॉ. आंबेडकरांच्या घटनेने बरे झाले नाहीतर सर्व मूर्ख ब्राह्मण सर्व पदांवर राहिले
असते.)

दलित विरोधक रामदास 
रामदास हा पक्का दलित विरोधक होत. तो म्हणतो:
अंत्यज शब्दज्ञाता बरवा । परी तो नेऊन काय करावा
ब्राह्मण संन्निध पूजावा । हे तो न घडे की ।
अंत्यज म्हणजेच दलित हा शब्दज्ञाता म्हणजेच पंडित असला तरी त्याचा उपयोग काय?  पण ब्राह्मणांची तो बरोबरी करु शकत नसतो. असे म्हणून त्याने जातियवादाचे टोकच गाठले आहे.
रामदास पुढे लिहितो :
अंतर एक तो खरे । परी सांगाते घेऊ न येती महारे
पंडित आणि चाटे पोरे । एक कैसी । ।।३।।
मनुष्य आणि गधडे । राजहंस आणि कोंबडे
राजे आणि माकडे । एक कैसी। ।।४।।
भागीरथीचे जळ आप । मोरी संवदणी तोही आप।
कुश्चिळ उदक अल्प। सेववेना ।।५।।
म्हणजे, ब्राह्मण आणि महार यांचा आत्मा एक असला तरी त्यांची आणि ब्राह्मणांची बरोबरी होऊ शकत नाही.
(या ठिकाणी रामदासाने यमकासाठी महार यांचे उदाहरण घेतले असले तरी सर्व जाती नीच आहेत,
फक्त ब्राह्मणच श्रेष्ठ आहेत असे त्याचे ठाम मत आहे.) ब्राह्मण सोडून सर्व जातीला तो गाढव, माकडे,
कोंबड्या, चावट, गटारीचे पाणी या उपमा देतो. तर ब्राह्मणाला तो राजा, हंस, गंगेचे पाणी या उपमा
देतो.

अशा बहुजनव्देष्ट्या रामदासाच्या "दासबोधव"र महाराष्ट्र शासनाने बंदी घालावी. रामदास व
रामदासी संप्रदायाच्या सर्व वाङमयावर बहुजन समाजाने बकिष्कार टाकावा. जगातील सर्व माणसे समान
आहेत. जगातील सर्व जाती, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, देश हे मानवनिर्मित आहेत. त्यामुळे  जातिभेद
पसरविणा-या रामदासी सांप्रदायावर ‘अ‍ॅट्रॉसिटी' कायद्याखाली खटला भरायला हवा.

औरंगजेबाला अनेकवेळा भेटला रामदास
हर हर महादेव ही राजांची सिंहगर्जना होती. कारण महादेव बहुजन समाजाचा आद्य
क्रांतीकारक होता. महादेव हा देव नव्हे. वैदिकांनी महादेवाचेही दैवतीकरण केलेले आहे. रामदासाची
घोषणा जय जय रघुवीर समर्थ अशी होती. रामदास आणि शिवाजीराजे यांच्या घोषणेतही साम्य नव्हते.
रामदास हा हिरवे कपडे परिधान करीत होता. रामदासाला उत्तम उर्दू येत होती. औरंगजेबाला रामदास
अनेकवेळा भेटलेला होता. दोघांनी मिळून भोजन केले होते. याचा अर्थ रामदास आणि औरंगजेबाचे
घनिष्ठ संबंध होते. दिल्ली येथे रामदासाने औरंगजेबाबरोबर भोजन केले होते ही वस्तुस्थिती आहे.
शिवाजीराजांना केशरी (भगवे) निशाण आणि राजमुद्रा शहाजी राजांना दिलेली होती. म्हणजे
गुरु म्हणून रामदासाचे राजाला कसलेही सहकार्य नाही. शिवरायांच्या अनेक गुप्त योजना त्याने
औरंगजेबाला-आदिलशहाला सांगितल्या होत्या. बाजी घोरपडेंना शिवरायांविरुद्ध चिथावले होते.
राजांच्या विरुद्ध मराठ्यांना भडकविण्याचे काम रामदासाने केले. ब्राह्मणांच्या उद्धारासाठी तो मरेपर्यंत
झिजला यात काही गैर नाही. पण स्वत:च्या जातीसाठी काम करीत असताना बहुजनसमाजाला आणि
शिवरायांना रामदासाने खूप त्रास दिला. शेवटी त्याने ब्राह्मणांच्या भवितव्यासाठी दासबोध ग्रंथ
लिहिला.

संत तुकोबांना संपविण्यासाठी रामदासाला शिवचरित्रात घुसविले 
शिवाजीराजांनी बाबा याकूत, मौनीबाबा, संत तुकाराम यांचा सल्ला घेतल्याचा अनेक ठिकाणी
उल्लेख आहे. कारण ते संत चारित्र्यसंपन्न, नि:स्वार्थी आणि बहुजन समाजाचे उध्दारक होते, म्हणुनच
राजांना त्यांच्याबद्दल नितांत आदर होता. पण राजे रामदासाच्या भेटीला कधीच गेलेले नाहीत. पण
त्याचे शिष्य अनेक वेळा महाराजांकडे भीक मागण्यासाठी आले होते. याप्रसंगी राजे त्यांना विचारतात
‘कोण हा रामदास?' याच अर्थ राजे रामदासाला ओळखत नव्हते. (अधिक माहितीसाठी वाचा
इतिहासाचार्य प्रा. मा.म. देशमुख लिखित रामदास आणि पेशवाई) संत तुकारामासारख्या चारित्र्यसंपन्न, समाजसुधारक गुरुला संपविण्यासाठीच वैदिकांनी रामदास हा शिवचरित्रात घुसवला. रामदासाला राजांचा गुरु ठरविण्यासाठी ब्राह्मणांनी अनेक खोटे पुरावे, दाखले, स्थळे, चित्रे निर्माण केली.

(शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? या पुस्तकातून)


प्रख्यात इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेले ‘शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?' हा ग्रंथ "अनिता पाटील विचार मंच"च्या वाचकांसाठी येथे उपलब्ध करून देत आहोत. जिज्ञासूंनी त्यावर प्रतिक्रिया जरूर द्याव्यात.

ग्रंथ प्रवेश 
भाग-१
भाग-४
  1. नेताजी पालकरांच्या धर्मांतराला विरोध, गंगाधर कुलकर्णीच्या धर्मांतराला मात्र समर्थन
  2. संभाजीराजांना मोगलांच्या ताब्यात देणारा विश्वासघातकी कवि कुलेश
  3. औरगजेबाने संभाजी राजांना मनुस्मृती संहितेप्रमाणे ठार मारले
  4. शिवशक बंद करुन मोगलांचा फसलीशक सुरु करणारे पेशवे
  5. शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला
  6. शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे