Tuesday 30 July 2013

श्राद्धामध्ये गाया आर्यभट खाती...!

वारकरी संतांनी लोकजागृतीसाठी अभंगांची रचना केली. याच धर्तीवर महात्मा जोतिबा फुले यांनी अखंड रचले आहेत. फुले यांच्या अखंडांत ब्राह्मणी धर्मावर जबरदस्त प्रहार करण्यात आले आहेत. फुले यांचे काही निवडक अखंड येथे देत आहोत.

अखंड क्रमांक : २५
श्राद्धामध्ये गाया आर्यभट खाती । मौजा मारिताती । मृतानावे ।।१।।
पडझड गाया दीन मांग खाती । ब्राह्मण निंदिती । त्याला सर्व ।।२।।
अहिंसक जती पाणी काढविती । किड्या मोक्ष देती । तृष्णेसाठी ।।३।।
आर्यासह जत्या नाही सत्य त्या । जाती सर्व वाया । जोती म्हणे ।।४।।

अर्थ :
आर्य ब्राह्मण श्राद्धामध्ये गायी (गोमांस) खातात. मृतांच्या नावे मौजा मारतात.
मातंग समाजातील दीन दलित लोक मेलेल्या गायी (गोमांस) खातात, त्याला मात्र हेच ब्राह्मण नावे ठेवितात.
(विहिरींना पाणी लागावे यासाठी बळी देण्याच्या प्रथेचा उल्लेख करताना महात्मा फुले म्हणतात की,) आपली तहान भागावी यासाठी अहिंसक जती (संन्यासी) बळी देतात. वर बळी दिल्या जाणा-या प्राण्याला मोक्ष मिळाला, अशा भाकडकथा पसरवितात.
जोतिबा म्हणतात की, आर्य ब्राह्मण आणि जती यांच्या वागण्यात सत्य अजिबात नाही. हे लोक धर्माच्या नावाखाली जे जे काही करतात ते सर्व वायाच जाते.

अखंड क्रमांक : २९
कल्पनेचे देव करिले उदंड । रचिले पाखांड । हितासाठी ।।१।।
किन्नर गंधर्व ग्रंथी नाचविले । अज्ञ फसविले । कृत्रिमाने ।।२।।
निर्लज्ज सोवळे त्याचे अधिष्ठान । भोंदिती निदान । शुद्रादिक ।।३।।
ब्राह्मणांनी नित्य होऊनी निसंग । शुद्र केले नंग । जोती म्हणे ।।४।।

अर्थ :
(ब्राह्मणांनी) खूप खोटे देव निर्माण केले आहेत. आपल्या हितासाठी (पोट भरण्यासाठी) त्यांनी हे सारे पाखांड रचले आहे.
(ब्राह्मणांनी) ग्रंथांमध्ये किन्नर आणि गंधर्वांना नाचवून अज्ञ जणांना फसविले. गंधर्व किन्नरांच्या सा-या कथा कृत्रिम म्हणजेच खोट्या आहेत.
निर्लज्ज सोवळे हे ब्राह्मणांचे अधिष्ठाण आहे. त्याचा वापर करून ते शुद्रांना भोंदून खात असतात.
जोतिबा म्हणतात की, ब्राह्मणांनी नेहमीच नि:संग होऊन म्हणजेच लाज-लज्जा सोडून शुद्रांना नागविले आहे.



संदर्भ :
महात्मा फुले सम्रग्र वाङ्मय (पान क्रमांक : ५४२)
संपादक : य. दि. फडके
सुधारित पाचवी आवृत्ती, २८ नोव्हे. १९९१
प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ.

अनुक्रमिका येथे पाहा

Wednesday 24 July 2013

गुजरात महिमा: एका नापास विद्यार्थ्याची गोष्ट

- श्री. महावीर सांगलीकर, (अभ्यासक, विचारवंत)


मोदींच्या काळात गुजरातने प्रचंड प्रगती केली असा आभास तयार करण्यात आला आहे. पण आपण गुजरात विषयक कांही महत्वाच्या गोष्टी माहिती करून घेणे गरजेचे आहे. पहिली गोष्ट म्हणजे भारताच्या संरक्षणात गुजरातमधील लोकांचा कसलाही सहभाग नाही. गुजराती लोक सैन्यात भरती होत नाहीत. देशासाठी रक्त सांडायला हे लोक कधीच तयार होत नाहीत. त्यामुळे आजपर्यंत झालेल्या युद्धांमध्ये गुजरातचे शहीद सैनिक दिसत नाहीत. आडातच नाही तर पोह-यात कुठून येणार?

स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात भारताच्या प्रत्येक प्रदेशात अनेक क्रांतिकारक झाले, त्यांनी छातीवर गोळ्या खाल्ल्या, फासावर चढले, पण गुजरातमध्ये असे झाले नाही.

मुंबई मध्ये सुमारे तीस टक्के लोक गुजराती आहेत. मुंबईवर दहशतवाद्यांचा हल्ला झाला तेंव्हा जे लढले, त्यात गुजराती कुठे होते? मुंबई पोलिसांत अगदी पंजाबी, तमिळ लोक दिसतात, पण गुजराती पोलिस, पोलिस अधिकारी कधी दिसला आहे का? म्हणजे इतरांनी आमचे संरक्षण करावे, मरावे, आम्ही आपला पैसा कमावत रहाणार अशा विचारांचे हे लोक आहेत. दमडी जाये पर चमडी न जाये.

मोदी  हे कधीच पंतप्रधान होवू शकत नाहीत. पण आपण मनोरंजनासाठी असे मानले की मोदी पंतप्रधान झाले, तर हे नक्की आहे की ते युद्ध उकरून काढतील. या युद्धात देशभरचे अनेक सैनिक मरतील, अपंग होतील, पण यात मोदींच्या गुजरातचे काय जाणार आहे? या युद्धात एकही गुजराती मरणार नाही.

महाराष्ट्र, पंजाब आणि इतर अनेक प्रदेशातील लोकांसाठी सैन्याच्या अनेक रेजीमेंट्स आहेत. मराठा रेजिमेंट, महार रेजिमेंट, बॉम्बे स्यापर्स, पंजाब रेजिमेंट, शीख रेजिमेंट, जाट रेजिमेंट, बिहार रेजिमेंट, मद्रास रेजिमेंट, राजपूत रेजिमेंट, राजपुताना रायफल्स, आसाम रायफल्स, जम्मू-काश्मीर रायफल्स वगैरे वगैरे. गुजरातचे काय?  1965 साली भारतीय सैन्याने गुजरात रेजिमेंट उभारायचा प्रयत्न केला होता, पण तो प्रयत्न फसला, कारण गुजरात मधून कोणी भरती व्हायलाच तयार झाले नाही.

जी गोष्ट संरक्षण क्षेत्रात गुजरातच्या योगदानाची तीच गोष्ट खेळातील. भारताला ऑलिम्पिकमध्ये अनेक सुवर्ण पदके मिळवून देण्याच्या वल्गना मोदी करतात, पण आज पर्यंत ऑलिम्पिक राहो, पण आशियाई खेळात देखील एकाही गुजराती खेळाडूने सुवर्ण तर जावो, कास्य पदकही मिळवले नाही.  ज्या लोकांसाठी पैसा हाच खेळ आहे, त्यांच्याकडून तशी अपेक्षाही करता येत नाही. मुळात गुजराती खेळाडू असतातच कोठे?

कला, क्रीडा, साहित्य, साहस, विज्ञान अशा सगळ्याच विषयात गुजरात नापास आहे.

येथे सांगायचा उद्देश हाच आहे की मोदी लोकांना मूर्ख बनवत आहेत, आणि अनेक लोक समजून-सवरून मूर्ख बनत आहेत. गुजरातची अवस्था त्या विद्यार्थ्यांसारखी आहे की जे विद्यार्थी एखाद्या विषयात ब-यापैकी मार्क मिळवतात, पण बाकी सगळ्या विषयांमध्ये नापास होतात. मग तो नापास विद्यार्थी एका विषयाच्या जोरावर आपण कसे हुशार आहोत हे सांगत सुटतो. त्याचे ऐकून कमी समज असणारे लोक सगळ्या विषयांमध्ये चांगल्या मार्काने पास होणा-या विद्यार्थ्यांपेक्षा या नापास विद्यार्थ्याने अभ्यासात चांगलीच प्रगती केली आहे असे समजू लागतात.  

(महाविचार या ब्लॉग वरून साभार)


श्री. महावीर सांगलीकर यांचे आणखी काही लेख


Tuesday 23 July 2013

तुकोबांना 'तुक्या' म्हणणारा हा हलकट जोशी कोण?

लोकप्रभा-लोकसत्ताकडून मराठा समाजाचा पुन्हा अवमान

-राजा मइंद, संपादक मंडळ सदस्य, अपाविमं.

मराठा समाजातील आणि अन्य बहुजन समाजातील महापुरूषांचा अवमान करण्याचे सत्रच एक्सप्रेस समूहातील लोकसत्ता आणि लोकप्रभा या पत्रांनी सुरू केले आहे. या दोन्ही पत्रांचा ब्राह्मणी जातीयवाद या ब्लॉगवरून आम्ही वारंवार जगजाहीर केला आहे. लोकप्रभेने आता जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा घोर अवमान केला आहे.

तुकोबांचा उल्लेख तुक्या असा करणारा हाच तो लोकप्रभामधील लेख.
लोकप्रभाचा १९ जुलैचा अंक आषाढी यात्रा विशेषांक म्हणून प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अंकात सुहास जोशी यांचा संत तुकोबांवर एक लेख आहे. ‘सांगे तुक्याचा वारसा' असा या लेखाचा मथळा आहे. हा मथळा अत्यंत आक्षेपार्ह आहे. तुकाराम महाराजांचा उल्लेख ‘तुक्या' असा एकेरी आणि तुच्छतापूर्ण यात करण्यात आला आहे.  एखाद्या गल्लीतील पोराचा उल्लेख करावा त्याप्रमाणे तुकोबांचा उल्लेख येथे करण्यात आला आहे. या लेखाचे लेखक सुहास जोशी आहेत. या जोशीबुवांनी मुद्दामच तुकोबांचा अवमान केला आहे, हे सांगायला कोण्या कुडमुड्या जोश्याची गरज नाही. अनिता पाटील विचार मंचच्या वतीने आम्ही लोकप्रभाचे संपादक विनायक परब आणि या लेखाचे लेखक सुहास जोशी यांचा जाहीर निषेध करीत आहोत. 


संबधित लेख

तानाजी मालुसरे यांचा इतिहास नाकारणा-या रा. चिं. ढेरेला कोण धडा शिकविणार?

लोकसत्तेचे ब्राह्मणी कुटिरोद्योग सुरूच


-राजा मइंद, संपादक मंडळ सदस्य, अपाविमं.

रा. चिं.. ढेरे 
लोकसत्तेने २१ जुलैच्या अंकात छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे शिलेदार तानाजी मालुसरे यांचा अवमान केला आहे. र्कोढणा किल्ला सर करताना तानाजी धारातीर्थी पडले, म्हणून शिवरायांनी कोंढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड ठेवले, असा इतिहास आहे. ‘गड आला पण सिंह गेला', असे शिवरायांचे उद्गार प्रसिद्ध आहेत. लोकसत्तेला मात्र हे मान्य नाही. रा. चिं.. ढेरे नावाच्या एका तोतया संशोधकाचा हवाला देऊन लोकसत्तेने २१ जुलैच्या अंकात अन्वयार्थ या सदरात एक संपादकीय लेख प्रसिद्ध केला आहे. कोंढाणा किल्ल्यावर नरसिंहाचे मंदिर होते, त्यावरून शिवरायांनी या गडाचे नाव सिंहगड असे ठेवले, असा दावा या लेखात करण्यात आला आहे. तानाजीचा पराक्रम दुर्लक्षित करण्यासाठीच हा उपद्व्याप ढेरे आणि लोकसत्तेने केला हे उघड आहे.

नरसिंहाच्या मंदिरावरूनच कोंढाण्याचे  नाव सिंहगड असे ठेवले गेले, याचा पुरावा दर्शविणारी कागदपत्रे ढेरे बुवांकडे आहेत, असा दावा या लेखात करण्यात आला आहे. अशी कागदपत्रे नेमकी ब्राह्मणांकडेच कशी चालत येतात, हा मोठा संशोधनाचा विषय आहे. सिंहगडाचे नाव ठेवण्यापूर्वी शिवरायांनी काही कागदपत्रे तयार करून, ही कागदपत्रे २१ व्या शतकात रा. चिं. ढेरे नावाच्या बुवाच्या हाती पडतील, अशी काही व्यवस्था करून ठेवली होती का? बोगस कागदपत्रे तयार करायची आणि त्यावरून बोगस इतिहास लिहायचा, असे उद्योग ब्राह्मणमंडळी गेली शेकडो वर्षे करीत आहेत. रा. चिं. ढेरे हे बुवाही याच मालिकेतील एक मणी आहेत. 

लोकसत्ता या दैनिकाकडून मराठा समाज तसेच अन्य बहुजन समाजातील महापुरूषांना अपमानित करण्याचा ब्राह्मणी कुटिरोद्योग गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. मागे महात्मा फुले यांचा अवमान करणारा लेख लोकसत्तेने प्रसिद्ध केला होता. त्यावर नंतर लोकसत्ताकारांना माफीही मागावी लागली होती. आता पुन्हा हाच खोडसाळपणा लोकसत्तेने केला आहे. आम्ही लोकसत्तेचा जाहीर निषेध करीत आहोत.

लोकसत्तामध्ये प्रसिद्ध झालेला मूळ लेख येथे वाचा


संबधित लेख

वारकरी विचारधारेचा सत्य अन्वयार्थ सांगणारे पुस्तक

  
   वारकरी विचारधारेचा सत्य अन्वयार्थ सांगणारे 
             एक धाडसी आणि आक्रमक पुस्तक 
 ***************************************
            पुस्तकातील लेख :  
                                       १) विठ्ठल मुळचा बुद्ध 
                                                     २) उत्पात बडवे आले कोठून ?
                                                       ३) पोटोबांचा विठोबा विरोध 

                                                         ४) ग्यानबाची मेख
                                                             ५)  बामणी कावा 
                                                                ( बहुजनच नव्हे तर ब्राम्हण संताविरुद्ही)
                                                                                         
                                                                                                ६) नाथांचा तिढा 
                                                                    ७) नामयाचा मेळा
                                                                      ८) तुकोबांचा सारासार
                                                                        ९) नवव्या अवताराचा 
                                                                              गडबड गुंडा 
                                                                      १०) विठ्ठल  एक स्वगत 
                                                                     
 

Monday 22 July 2013

उत्पात पुन्हा मातले ! बडव्यांची भडवेगिरी!!

-प्रा ऱविन्द्र तहकिक, मुख्य संपादक अपाविमं.  

पंढरपूरचा आषाढी एकादशी सोहळा नुकताच पार पडला . विठोबाच्या 
दर्शनाला आलेले खेड्यापाड्यातील भाविक भक्त आपापल्या घरोघरी 
परतले . परंतु या सगळ्या गडबडीत दोनदिवस आधी  रामदेव बाबा नावाचा एक भगवा भडवा वारीत घुसला होता . विठ्ठलाशी , माउली 
तुकोबांच्या पालख्यांशी किंवा दिंडीत पायी चालणाऱ्या वारकऱ्याशी 
या डूचक्या पळपुट्या आर्धनारी नटेश्वराला काही देणे घेणे नव्हते . 
याला तेथे जाऊन वारकऱ्याचा बुद्धीभेद करून महाराष्ट्र शासनाचे 
अंधश्रध्धा विधेयक हाणून पाडायचे होते . त्याच साठी वा ना उत्पात 
नावाच्या पंढरपुरी भडव्याने ( होय , भडव्यानेच ! बडवे हा मुळ भडवे या शब्दाचा सुभ्रंष आहे , हा मराठीतला एकमेव सुभ्रंष.  बाकी सगळे अपभ्रंष!)
या हरामदेव बाबाला बोलाऊन घेतले होते .           
   हरामदेव बाबानेच वारकरी मंडळाचे अध्यक्ष आणि पालखी सोहळ्याचे 
मानकरी यांचा बुद्धिभेद करून हे विधेयक वारकर्यांच्या विरोधात असल्याचे खूळ या मंडळीच्या  डोक्यात घातले . वास्तविक हा सगळा बनाव बामणाच्या भट भिक्षुकीच्या धंद्याला वाचवण्यासाठी होता . 
वारकरी संप्रदायात मुळात कोणत्याच   अंधश्रध्धा नाहीत . वारकरी संप्रदायाची प्रेरणाच   धर्मातील अंधश्रध्धा निर्मुलन ही आहे.  व्रत वैकल्ये
पूजा पाठ , विधी आदी गोष्टी वारी किंवा पंढरपुरात होतच नाहीत , त्या होतात बामणांनी ठिकठिकाणी उघडलेल्या देवळे आणि तीर्थे नावांच्या 
होलसेल मोल्स किंवा गावागावात सत्यनारायण , अभिषेक वैगैरे  रिटेल दुकानात. ते बंद पडले तर बामणांची कमाईच बंद पडेल . म्हणूनच 
नागपूरच्या संघोट्यानि हरामदेवाला वा ना उत्पाताच्या मदतीला पाठवून 
 भोळ्या भाबड्या वारकर्यांना वाटेत गाठले आणि अंधश्रध्धा निर्मूलन
विधेयक हे धर्म संकट असल्याचा कांगावा केला . 
       वारकरी हरामदेवाच्या बोलण्याला भुलले आणि विधेयक मांडू नका 
नाहीतर दिंड्या आहे तिथेच उभ्या करू असा निरोप दिला . असला अडेलतट्टू आणि धार्मिक भावनाचा आधार घेवून ब्ल्याकमेल करण्याचे
कारस्थान फक्त बामनच करू शकतात . वास्तविक या विधेयकात वारकरी संप्रदायाला  अडचणीचा ठरू शकेल असा एकही मुद्दा नाही . 
आहेत ते नागबली नारायण बळी , पूजा विधी , अभिषेक , धर्माच्या नावाखाली दान दक्षिणा गोळा करण्याच्या उद्योगाला आळा घालणारे आणि नरबळी जादू टोणा अघोरी विद्या भानामती इत्यादी गोष्टीना प्रतिबंध घालणारे मुद्दे . यावर वारकर्यांना आक्षेप असण्याचे काहीच कारण नाही , संत तुकाराम ,एकनाथ , गाडगेबाबा आदी संतानी याच बाबतीत तर प्रबोधन केले . 
        उत्पात ( भडवे ) आणि हरामदेव बाबा  जर पुन्हा कर्मकांडाचे समर्थन करण्यासाठी वारकर्यांचा दबावगट म्हणून वापर करत असतील तर 
हा संत विचाराला पुन्हा कर्मकांडाला बांधण्याचा डाव आहे , आणि हा महाभयानक डाव संतानी सांगितलेल्या परिवर्तनवादी विचारधारेवर ( वारकरी संप्रदायावर ) विश्वास असणार्या प्रत्येकाने हाणून  पाहिजे . 
वारकरी तसेच बहुजन मराठी माणसाने उत्पात -भडव्यांच्या भूलथापाना 
बळी पडू नये  साठी त्यांना या मागचा संघोट्याचा बामणी  कुटिल कावा 
 समजाउन सांगण्याची गरज आहे .

कोणी कोणाचा गुरू नाही; कोणी कोणाचा शिष्य नाही..!

तुकोबांना शेवटचे गुरू मानून गुरूपदाचे स्तोम थांबवा

-राजा मइंद, संपादक मंडळ सदस्य, अपाविमं.

गुरू पौर्णिमा विशेष

गुरू या शब्दाएवढा बोगस आणि ढोंगी शब्द दुसरा कोणताही नाही. गुरू ही संकल्पनाच बोगस आहे. भारतातील जातीय विषमता पोसणारी ब्राह्मणी व्यवस्था गुरू या दोन अक्षरांवर टिकून आहे. ब्राह्मणी व्यवस्था नष्ट करून समतेचे राज्य आणायचे असेल, तर प्रथम गुरू हा शब्द गाडून टाकला पाहिजे. गुरू या शब्दाने जेवढी घाण येथे करून ठेवली आहे, तेवढी घाण कोणीही केलेली नाही. गुरू या शब्दाने भारतातील महापुरूषांना अवमानित आणि अपमानित करण्याचे महापाप केले आहे. त्यामागे सुनियोजित षडयंत्र प्राचीन काळापासून येथे राबत आहे.

चंद्रगुप्त ते शिवाजी
महापुरूष जन्माला आला की, त्याच्या मागे खोट्या गुरूचे लचांड लावून देण्याचे काम ब्राह्मणी व्यवस्था करते. हा गुरू हमखास ब्राह्मण जातीतला असतो. पुराणातील गोष्टी मी येथे उगाळणार नाही. फक्त इतिहासाचाच विचार येथे देत आहे. इतिहासात जाता येईल तितके मागे जाऊन बोगस गुरू चिकटविण्याचे काम ब्राह्मणवाद्यांनी ेकेले आहे. याची सुरूवात थेट चंद्रगुप्त मौर्यापासून होते. चंद्रगुप्ताच्या नावामागे चाणक्य नावाचा एक बोगस ब्राह्मण गुरू म्हणून चिकटविण्यात आला. प्रत्येक यशस्वी राजाच्या नावा मागे असे कोणते तरी ब्राह्मणी नाव चिकटावून दिले गेले. छत्रपती शिवरायांचे उदाहरण हे या मालिकेतील सर्वांत अलिकडचे उदाहरण आहे. दादोजी कोंडदेव आणि रामदास असे दोन-दोन बोगस गुरू ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांच्या नावामागे चिकटवून टाकले. हे बनावट गुरू काढून टाकण्यासाठी महाराष्ट्राला अनेक वर्षे लढा द्यावा लागला. 

महापुरूष घडविता येत नसतो
महापुरूष जन्माला यावा लागत असतो. घडविला जात नसतो. अनुबोध करून महापुरूष घडविता आले असते, तर एकेका गुरूने शेकडो महापुरूष निर्माण केले असते.  एक शिवाजी महाराष्ट्रात, एक उत्तर भारतात, एक दक्षिण भारतात असे अनेक शिवाजी निर्माण करून मोगलांचा सहज नि:पात करता आला असता. पण वास्तवात असे होत नसते. शिवाजी एकच असतो आणि तो जिजाऊंच्या पोटीच जन्माला यावा लागत असतो. 

बुद्धांनी सर्वप्रथम नाकारला गुरू
ब्राह्मणी व्यवस्था गुरूपदाच्या बोगसगिरीवर उभी आहे, हे सर्वांत आधी भगवान गौतम बुद्धांनी ओळखले. बुद्धांनी कोणताही गुरू केला नाही. स्वत:चा मार्ग स्वत: शोधला. आपल्या अनुयायांनी गुरूपणाच्या बोगसगिरीत अडकू नये म्हणून बुद्धांनी ‘अत्त दीप भव'  म्हणजेच स्वत:चा दीप स्वत:च हो, अशी शिकवण त्यांना दिली. बुद्धानंतर लौकिक अर्थाने गुरू न करणारे दुसरे महापुरूष म्हणजे संत तुकाराम महाराज होत. तुकोबांनी स्वत: कोणताही गुरू केला नाही. संत नामदेवांचा स्वप्नादेश मानून तुकोबांनी अभंग रचना सुरू केली. तसेच बाबाजी चैतन्यांचा स्वप्नबोध मानून अध्यात्मिक उन्नती साधली. आपल्या संपूर्ण आयुष्यात तुकोबांनी कोणालाही गुरूबोध दिला नाही. संत बहिणाबाई आणि संत निळोबा यांनी तुकोबांना गुरू मानले. पण तुकोबांनी त्यांना लौकिकार्थाने अनुबोध दिलेला नव्हता. दोघांनीही तुकोबांचा स्वप्नबोध मानून तुकोबांना गुरूस्थानी मानले. 

शिखांचा आदर्श घ्या
शीख धर्म हा गुरूपंरपरेवर आधारित असला तरी, शिखांचे दहावे गुरू गोविंदसिंगजी  यांनी ही गुरूपरंपरा खंडीत केली. यापुढे आपला कोणीही नवा गुरू होणार नाही, ग्रंथसाहिब हाच आपला आता गुरू, असा आदेश गोविंदसिंगजी  यांनी आपल्या अनुयायांनी दिला. म्हणूनच शिखांच्या पवित्र ग्रंथास गुरूग्रंथसाहिब असे म्हटले जाते. हिंदू धर्मात गुरूंच्या नावाने जी ढोंगबाजी चालते, ती शीख धर्मात दिसून येत नाही. गोविंदसिंगजी  यांनी केलेल्या योजनेचे हे फळ आहे. 

तुकोबा हेच आपले शेवटचे गुरू
महाराष्ट्रात तुकोबांना शेवटचे गुरू मानून गुरूपरंपरा खंडीत करता येऊ शकते. या पुढे आपला कोणताही गुरू नाही. तुकोबांचा गाथा हाच आपला गुरू, असे मान्य केल्यास गुरूच्या नावाने सुरू असलेली बोगसगिरी थांबविता येईल.


Tuesday 16 July 2013

तुकोबांच्या गाथ्यातील बोगस अभंगांची कथा

रामदासाच्या गुरुपदामागील कारस्थान

-राजा मइंद, संपादक मंडळ सदस्य, अनिता पाटील विचार मंच.

इतिहासाची मोडतोड करणे, खोटा इतिहास लिहिणे आणि त्यासाठी खोटे दस्तावेज तयार करणे, हे पाप महाराष्ट्रात गेली अनेक वर्षे नित्यनेमाने सुरू आहे. प्रत्येक ठिकाणी हे पाप करणारे ब्राह्मणच असतात. ब्राह्मण जातीचा आणि ब्राह्मण जातीत जन्मलेल्या महापुरुषांचा महिमा वाढविणे हा एकमेव उद्देश या पापामागे आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या अभंगांचा गाथाही या महापाप्यांनी सोडला नाही. तुकोबांच्या हयातीत ब्राह्मणांनी त्यांना अनन्वयित छळले. पण तुकोबांच्या वैकुंठगमनानंतरही ब्राह्मण स्वस्थ बसले नव्हते. तुकोबांच्या गाथ्यात बोगस अभंग घुसवून त्यांनी रामदासाचे महत्त्व वाढविण्याचा प्रयत्न केला. हे कसे घडले याचा हा थोडक्यात आढावा. 

तुकोबांचे वास्तव्य देहूस होते. तसेच लोहगावी त्यांची किर्तने होत. या दोन्ही ठिकाणांहून पुणे हाकेच्या अंतरावर आहे. शिवराय १० ते १२ वर्षांचे असतील तेव्हाच तुकोबांची कीर्ती महाराष्ट्रभर पसरलेली होती. औरंगाबादजवळील शिऊर येथील बहिणाबाई तुकोबांना गुरू करून घेण्यासाठी देहूला आल्या होत्या. यावरून तुकोबांच्या कीर्तीची कल्पना यावी. पुण्यात राहणा-या शिवरायांच्या कानी तुकोबांची किर्ती जाणे हे स्वाभाविकच होते. समाज जागृतीचे काम करणा-या तुकोबांचा योग्य सन्मान व्हायला हवा, असे मनात आणून शिवरायांनी मानाची वस्त्रे आणि अबदागि-या देहूला पाठविल्या. सोबत जडजवाहीरही पाठविले. तुकोबा ऐहिक मान सन्मानांच्या पलिकडे गेलेले महान संत होते. त्यांनी हा सर्व सरंजाम विनम्रपणे नाकारला. सोने आणि माती, राजा आणि रंक यांची किंमत आमच्या दृष्टीने सारखीच आहे. असे तुकोबांनी शिवरायांच्या दूतांना सांगितले. राजाने पाठविलेला सरंजाम नाकारणे साधी गोष्ट नव्हे. तुकोबांच्या या निष्पृह, निर्भय आणि निर्मोही वृत्तीने शिवराय प्रभावित झाले. या महापुरूषाचे आशीर्वाद आपण घेतलेच पाहिजेत, असा निश्चय करून महाराज स्वत: देहूला आले. असा हा थोडक्यात इतिहास. हा इतिहास विकृत करण्याचे काम चाफळच्या रामदासी मठाने नंतर केले. 

तुकोबांच्या अभंगांना जोडले ५ बोगस अभंगांचे शेपूट
तुकोबांनी आपल्या आयुष्यातील सर्व घडामोडी अभंगरूपाने मांडल्या आहेत. या प्रसंगावरही त्यांनी अभंग लिहिले. हे एकूण ९ अभंग आहेत. तुकोबांच्या मूळ अभंगांना आणखी ५ अभंगांचे शेपूट चाफळच्या रामदासी चेल्यांनी जोडले. कटकारस्थाने करून हे अभंग हस्तलिखित गाथ्यात व्यवस्थित घुसडविण्यात आले. तुकोबा शिवरायांना रामदासांकडे पाठवित आहेत, असे या बोगस अभंगात दाखविण्यात आले आहे. पुण्यातल्या इंदुप्रकाश छापखान्याने तुकोबांच्या अभंगांचा पहिला छापील गाथा प्रसिद्ध केला, त्यात हे अभंग अनायासे आले. पुढे महाराष्ट्र सरकारने गाथा प्रसिद्ध केला, त्यातही हे अभंग आले. रामदास हे शिवरायांचे गुरू होते, हा समज या ५ बोगस अभंगांनी दृढ करण्याचे काम केले. खुद्द तुकाराम महाराजांनीच शिवरायांना रामदासाकडे पाठविले होते, हे दाखविणारा कागदोपत्री पुरावा या कारस्थानाने पुरविला होता.

पापाला वाचा फुटली
पण प्रत्येक कागद खरेच बोलतो, असे गृहित धरता येत नाही. खोटेपणा कितीही बेमालूमपणे केला तरी काही गोष्टी अनवधानाने मागे राहून जातातच. रामदास्यांचेही तेच झाले. तुकोबांच्या तोंडी रामदास्यांनी अशा काही गोष्टी घातल्या की, ज्या तुकोबांच्या काळात अस्तित्वातच नव्हत्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १६३० सालचा आहे. तुकोबांचे वैकुंठगमन हे १६४९ सालचे आहे. म्हणजेच तुकोबा गेले तेव्हा शिवरायांचे वय अवघे १९ वर्षांचे होते. शिवरायांचे स्वराज्य अजून आकाराला आले नव्हते. शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ अजून स्थापन व्हायचे होते. १६७४ साली शिवरायांनी स्वत:ला राज्याभिषेक करवून घेतला. त्यानंतर त्यांचे अष्टप्रधान मंडळ स्थापन झाले. खोटेपणा करणा-या रामदास्यांना याची माहिती कोठून असणार? त्यांनी तुकोबांच्या तोंडी शिवरायांची स्तुती घातली. त्यात अष्टप्रधानांचा उल्लेख करून टाकला. तुकोबांच्या हयातीत शिवरायांकडे प्रधानकीचे काम पाहणा-यास डबीर असे म्हणत. नंतर महाराजांनी या पदाचे नाव बदलून सुमंत असे केले. पण तुकोबांच्या तोंडी घातलेल्या खोट्या अभंगात ही दोन पदे वेगवेगळी असल्याचे दिसून येते! 

मल्हार रामराव चिटणीसाचे पाप 
हे अभंग रचण्याचे पाप मल्हार रामराव चिटणीसाचे आहे. चिटणिसाच्या बखरीत शिवराय आणि तुकोबांच्या भेटीचा प्रसंग दाखविला आहे. या भेटी प्रसंगी तुकोबा शिवरायांना उपदेश करताना दाखविले आहे. तुकोबांच्या उपदेशात हे बोगस अभंग येतात. 

तुकोबांचे वंशज सदानंद मोरे यांनी संशोधन करून रामदासी चेल्यांचा हा बनाव उघडकीस आणला. देहू संस्थानने गाथा छापला तेव्हा हे प्रक्षिप्त अभंग गाथ्यातून गाळण्यात आले. येथे आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, महाराष्ट्रात वारकरी संस्थांनी छापलेल्या एकाही गाथ्यात हे प्रक्षिप्त अभंग नाहीत. चाफळच्या रामदासी चेल्यांनी केलेल्या या कारस्थानाचा पर्दाफाश करताना सदानंद मोरे यांनी केलेले गाथ्याच्या प्रस्तावनेत विवेचन असे : 

"… ज्या कोणी रामदासभक्ताने हेतुतः किंवा सद्भावनेने (good faith) हे अभंग रचले, तो इतिहासविषयक पूर्ण अडाणी असल्यामुळे त्याने या अभंगांमध्ये अष्टप्रधानांचा उल्लेख करताना प्रतिनिधी, राजाज्ञा अशा शिवोत्तर काळातील अधिकाऱ्यांचा उल्लेख केला आहे. इतकेच नव्हे, १६५० पर्यंत ज्याला शिवरायाचे नावही माहीत असणे सुतराम् शक्य नव्हते, तो भूषण कवी शिवदरबारात आणून बसवला आहे आणि सुमंत व डबीर ही एकाच पदाची दोन भाषांमधील दोन नावे असली; तरी ती दोन स्वतंत्र अधिकाऱ्यांची पदनामे मानली आहेत. त्यातही मौज अशी, की शिवराज्यभिषेकापर्यंत प्रचलित असलेल्या डबीर या फारशी भाषेतील शब्दाला सुमंत हा पर्याय राज्यव्यवहारकोशामुळे त्यानंतर प्रचलित झाला. रामदासभक्तांनी भूषण कवीप्रमाणे राज्यव्यहारकोशकर्ते रघुनाथपंत यांनाही १६५० पूर्वी पुणे परिसरात दाखल करण्याचा चमत्कार केला आहे."

मोरे पुढे लिहितात : "… मुळात रामदासी संप्रदायातच या अभंगांची निर्मिती कशी झाली, याचा उलगडा करणेही फारसे अवघड नाही. मल्हार रामराव चिटणीस हे शिवशाहीचे बखरकार अठराव्या-एकोणिसाव्या शतकाच्या संधिकाळात होऊन गेले. त्यांचा रामदासांच्या संप्रदायाशी निकट संबंध होता. खुद्द सांप्रदायिक बखरकार हनुमंतस्वामी आणि चाफळ संस्थानाधिकारी रंगो लक्ष्मण मेढे व चिटणीस हे एकत्र लिखाण करीत. हनुमंतस्वामीच्या रामदासांच्या बखरीची वाढीव दुसरी आवृत्ती स्वामींच्याच आज्ञेवरून चिटणीस व मेढे यांनी तयार केली. … चिटणीस, हनुमंतस्वामी व कदाचित मेढे यांनी भेटीचे वर्णन करताना बहुधा हे अभंग रचले असावेत. अर्थात त्यात आपण काही गैर करत आहोत, असे त्यांना वाटायचे काही कारण नव्हते. त्यांनी केले, ते प्रामाणिकपणे व रामदासांचा महिमा वाढविण्यासाठी. ही घटना खरोखर घडली व तुकोबांनी शिवरायांना रामदासांकडे जायला सांगितले, ही त्यांची प्रामाणिक समजूत होती. तिच्या पोटी त्यांनी हे केले. तुकोबांनी शिवरायांना गद्यात उपदेश करण्याऐवजी अभंगांत करणे अधिक सयुक्तिक वाटल्याने त्यांची गद्याऐवजी पद्य अभंग करून ते मूळ अभंगांची ओळ विस्कळीत करून त्यांच्यांत मध्येच घुसडले. पण त्यामुळे वृत्तविसंगती निर्माण होते, ओघ बिघडतो, हे त्यांच्या लक्षात आले नाही. परंतु साताऱ्याच्या दरबारात प्रचलित असलेली, पण शिवकाळात मुळातच नसलेली अधिकारपदे त्यांची अडाणीपणे अभंगांत आणली. अर्थात त्यांच्या अडाणी प्रामाणिकपणामुळेच प्रस्तुत प्रक्षेप ओळखणे शक्य झाले."


अपराध अक्षम्यच
चाफळच्या मठाचे कारस्थान उघड करताना डॉ. सदानंद मोरे यांनी तुकोबांच्या वंशजाला साजेसा संयम ठेवला आहे. पण रामदासी चेले आणि त्यानंतर ब्राह्मण इतिहासकारांनी रामदासाला शिवरायांचा गुरू ठरविण्यासाठी केलेली कारस्थाने क्षमा करण्याजोगी निश्चितच नाहीत.


[[Google Search : tukaram, sant tukaram, jagadguru, dehu, gatha, ramdas, malhar ramrao chitnis, lohgao, pune, chatrapati shivji maharaj, brahman]]




Sunday 14 July 2013

वारी सोहळ्यावर आरएसएसचा ताबा

-राजा मइंद, संपादक मंडळ सदस्य, अनिता पाटील विचार मंच.

महाराष्ट्रातील वारकरी चळवळ आरएसएस आणि आरएसएसच्या ब्राह्मणांनी ताब्यात घेतली आहे. त्यामुळेच वारकèयांच्या दिन्डी सोहळ्याच्या व्यासपीठावरून विश्व हिन्दू परिषद आणि बजरंग दलाच्या  तोंडून ऐकू येणाèया मागण्या परवा ऐकू आल्या. गेल्या गुरुवारी (दि. ११ जुलै २०१३) पंढरपूरच्या मार्गावर फलटणच्या पालखी तळावर या मागण्या करण्यात आल्या. पालखी सोहळ्याच्या व्यासपीठावरून करण्यात आलेल्या मागण्यांपैकी प्रमुख ३ मागण्या पाहा : 
  1. गोवंश हत्याबंदीचा कायदा करण्यात यावा.
  2. महाराष्ट्र विधानसभेच्या विचाराधानी असलेला अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा पास करू नये.
  3. संतांनीच जातींचा उल्लेख केला असल्यामुळे जातींचा उल्लेख करण्याची मुभा देण्यात यावी. जातीचा उल्लेख केला म्हणून अ‍ॅट्रासिटीचे गुन्हे दाखल केले जाऊ नयेत.
रामदेव बाबा : सध्याच्या काळातील
आरएसएसचे मुख्य एजंट.
...............................................................
या तिन्ही मागण्या आणि त्या मागचा अजेंडा वारक-यांचा कधीच नव्हता. हा अजेंडा आरएसएसचा आहे. ११ जुलै रोजी अचानक तो वारक-यांच्या पालखी सोहळ्यात प्रकटला. त्या आधी मंगळवारी ९ जुलै राजी रामदेव बाबा पालखी सोहळ्यात येऊन गेले होते.  पुण्याच्या बारामती तालुक्यातील बेलवाडी येथील रिंगण सोहळ्यात रामदेव बाबांनी सहभाग घेतला होता. रामदेव बाबा हे संघाचे सर्वांत मोठे एजंट आहेत. रामदेव बाबा पालखी सोहळ्यात आले, तेव्हाच आमच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. बाबा येऊन गेले आणि तिस-याच दिवशी वारक-यांच्या व्यासपीठावरून आरएसएसचा अजेंडा जाहीर झाला. 

आरएसएसने वापरला 'जॉईन देम'चा फॉरम्युला
‘इफ यू कान्ट बीट देम जॉईन देम', अशी इंग्रजीत एक म्हण आहे. तुम्ही त्यांना पराभूत करू शकत नसाल, तर त्यांच्यात सहभागी व्हा, असा या म्हणीचा अर्थ. शत्रूच्या सोबत राहून त्याला नेस्तनाबूत करणे सोपे असते. नेमका हाच कावा वापरून वारकरी चळवळीला पराभूत करण्याचा डाव आरएसएस आणि जात्यंध ब्राह्मणवाद्यांनी रचला आहे. हा फॉरम्युला इतका यशस्वी झाला आहे की, पंढरपूरला जाणारा संपूर्ण दिन्डी सोहळा आज आरएसएसच्या ब्राह्मणांनी ताब्यात घेतली आहे. त्याचा हा परिणाम आहे. 

पालखी सोहळा : जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे
सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे रंगलेले गोल रिंगण.
.............................................................................................................................
पालखी सोहळ्याचे मालक म्हणवणारे हे लोक कोण?
वारीत आरएसएसची भाषा बोलणारे लोक कोण आहेत? त्यांची नावे आणि नावामागील पदे वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाली आहेत. ती पाहिली की, सारा खेळ लक्षात येईल. दिन्डी सोहळा प्रमुख डॉ. प्रशांत सुरू, पालखीचे मालक बाळासाहेब आरफळकर, संत ज्ञानेश्वर महाराज दिन्डी संघटनेचे अध्यक्ष भानुदास महाराज ढवळीकर, समस्त वारकरी-फडकरी-दिन्डीकरी संघटनेनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळगावकर ही ती मंडळी आहेत. यापैकी काही जणांनी स्वत:ला पालखी आणि दिन्डी सोहळ्याचे मालक म्हणवून घेतले आहे. हे लोक दिन्डी सोहळ्याचे मालक कधी झाले, त्यांना मालक कोणी केले. या सोहळ्याचा मालक कोणी नाही. वारकरी हेच सोहळ्याचे मालक आहेत. ज्या संघटनांच्या नावाखाली ही मंडळी बोलत आहेत, त्या संघटना कोणी आणि कधी स्थापन केल्या. वारक-यांच्या अशा कोणत्याही संघटना नाहीत. वारकरी कोणत्याही संघटनेत नसतो. पंढरपूरचा विठ्ठल हीच वारक-यांची संघटना आहे आणि विठ्ठल हाच या संघटनेचा मालकही आहे. 

ब्राह्मणांचे राज्य आणण्याचा डाव
आरएसएसचे अध्यक्ष मोहन भागवत :
 आरएसएसला या देशात ब्राह्मणांच्या
वर्चस्वाखालील राज्य आणावयाचे आहे.
......................................................
जातीय ध्रुवीकरण करून ब्राह्मणांचे राज्य या देशावर आणण्याचा डाव वरील तिन्ही मागण्यांच्या मागे आहे. गोहत्याबंदीची मागणी केली की, मुसमान बिथरतात, अ‍ॅट्रासिटी रद्द करण्याची मागणी केली की, दलित बिथरतात. हे दोन्ही वर्ग आक्रमक झाले की, उरलेल्या समाजाला भिती घालून हिन्दूत्वाच्या झेन्ड्याखाली आणणे सोपे जाते. पण हिन्दुत्व नावाची कोणतीही गोष्ट या देशात नाही. ब्राह्मणी राज्य आणण्यासाठी वापरलेला तो एक निरर्थक शब्द आहे. 

अंधश्रद्धेविरुद्ध लढणारी चळवळ अंधश्रद्धेच्या दावणीला कशी?
हे तुकोबांचे वचन आहे : नवसे कन्या पुत्र होती । तरी का करणे लागे पती ।। हे वचन वारक-यांना चांगले पाठ आहे. असे असतानाही अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विधेयकाला वारक-यांकडून विरोध होत आहे, असे चित्र उभे केले जात आहे. वारक-यांचा विठ्ठल सजन कसायासोबत मांस विकायला बसलेला आहे. मांस विकू लागे । सन कसाया संगे ।।  हे संत वचन वारक-यांना माहिती आहे. तरीही गोहत्याबंदीची मागणी वारक-यांच्या तोंडी घातली जात आहे. चोखोबांना छातीशी लावणा-या संत नामदेवांनी वारक-यांची पताका चंद्रभागेच्या वाळवंटात रोवली आहे. पितरांना श्राद्ध देण्याच्या आधी दलितांना जेवण देणारे आणि त्याची शिक्षा म्हणून ब्राह्मणांचा बहिष्कार सहन करणारे संत एकनाथ यांनी वारक-यांच्या चळवळीला खांब दिला आहे. तरीही दलितांना शिव्या घालण्याचा अधिकार वारक-यांच्या तोंडून मागितला जात आहे. हे सारे उलटे खेळ नीट समजून घ्यावे लागतील. वारक-यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून संघवाले गोळीबार करीत आहेत. 

यातील दुर्दैवाची गोष्ट अशी की, ख-या वारक-यांना या गोष्टींशी काही देणे घेणे नाही. तो विठ्ठलाचे दर्शन घेतो आणि घराकडे परततो. त्याचा गैरफायदा ब्राह्मणवादी मंडळी घेत आहेत. त्यांचा वेळीच बंदोबस्त केला गेला नाही, तर वारीचा सोहळा जातीयवाद्यांचे मोठे बलस्थान बनून काम करील.

रामदेव बाबा यांनी पालखी सोहळ्याला भेट दिल्याचे वृत्त येथे वाचा


[[Google search : wari, warkari, vari, varkari, tukaram maharaj, ramdev baba, rss, dindi, palakhi, pandharpur, viththal, vatthhal, pandurang, ringan, brahman]]

या विषयाशी संबंधित इतर लेख

ब्राह्मण व्होट बँकेच्या राजकारणाला न्यायालयाचा दणका
ब्राह्मण व्होट बँक

सावरकराकडून संत एकनाथ चरित्राचा गैरवापर

नव्या प्रश्न पत्रिका






Thursday 11 July 2013

ब्राह्मण व्होट बँकेच्या राजकारणाला न्यायालयाचा दणका


ब्राह्मणांची व्होट बँक बांधण्याचे काम सध्या भारतात सुरू असल्याचे काल आम्ही काही छायाचित्रे ब्लॉगवर टाकून दाखवून दिले होते. आमचे हे निरीक्षण किती वास्तव होते, हे आज दि. ११ जुलै २०१३ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाच्या निर्णयातून स्पष्ट होते. राजकीय पक्षांच्या जातीय संमेलनावर उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. गेल्या काही महिन्यांपासून उत्तर प्रदेशात विविध राजकीय पक्ष ब्राह्मण संमेलने घेत होती. या प्रकरणी स्थानिक वकील मोतीलाल यादव यांनी एक याचिका खंडपीठात दाखल केली होती. त्यावर न्या. उमानाथ सिंग आणि न्या. महेंद्र दयाल यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. ब्राह्मण संमेलनांच्या निमित्ताने सर्वच जातीय संमेलनांना आता चाप बसेल.

या संबंधी टाईम्स इंडियाने दिलेली बातमी खाली देत आहोत.
येथे क्लिक करून टाईम्स ऑफ इंडियाच्या साईटवर ही बातमी वाचता येईल.
ब्राह्मण व्होट बँकेच्या राजकारणाचा सचित्र वृत्तांत येथे वाचा

टाईम्स इंडियाने दिलेली बातमी :

Allahabad high court bans caste-based rallies in Uttar Pradesh

Ashish Tripathi, TNN | Jul 11, 2013, 01.45 PM IST

LUCKNOW: The Lucknow bench of Allahabad high court on Thursday stayed with immediate effect rallies based on caste in Uttar Pradesh (UP). It also issued notices to central and state governments, Election Commission and four major political parties - BJP, Congress, BSP and SP - in the state, asking them to present their point of view. The next date of hearing is on July 25.

The order was passed by a division bench comprising Justice Uma Nath Singh and Justice Mahendra Dayal on the public interest litigation (PIL) of a local lawyer Motilal Yadav, who has prayed ban on caste-based rallies on grounds that they are against the spirit of the constitution which states that all caste and communities are equal before the law and there will be no discrimination on caste and religious lines.

The petitioner also said that such caste-based rallies create enmity among castes and promote caste discrimination. The Centre, state government, ECI, Congress, BJP, SP and BSP have been made respondents in the PIL.

On behalf of the state government, additional advocate general Bulbul Godiyal appeared before the court.

The stay comes a day after Supreme Court in its landmark order ruled that a public representative will stand disqualified as soon as he is convicted for two years or more by a court.

Significantly, the BSP recently concluded its first phase of Brahman conventions in the state in which party organized rallies to woo Brahmans in 38 Lok Sabha constituencies of the state. The rally in Lucknow was addressed by party chief Mayawati. The BSP was also planning to hold similar rallies for other castes and Muslims. The SP had also held conventions for Brahmans, Backward Classes and Dalits in last six months. The BJP and Congress are also holding caste and community based public meetings and convention.

The Election Commission has already banned such caste and community based rallies and events during the election process.

Wednesday 10 July 2013

ब्राह्मण व्होट बँक


भारतात ब्राह्मणांची व्होट बँक उभी करण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. त्याची ही तीन बोलकी छायाचित्रे.

१२ मे २०१३ रोजी उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे परशुराम जयंती सोहळ्यात समाजवादी पार्टीचे नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचा परशुरामाची कुरहाड देऊन असा सत्कार करण्यात आला. ब्राह्मणांच्या व्यासपीठावर सपाच्या नेत्याने हजेरी लावण्याची ही पहिलीच वेळ होती.



७ जुलै २०१३ रोजी लखनौ येथे आयोजित ब्राह्मण संमेलनात बसपा नेत्या मायावती यांचा परशुरामाची कुरहाड देऊन सत्कार केला जात असताना. ब्राह्मणांच्या व्होट बँकेच्या राजकारणाची सुरूवात मायावती यांनी केली.



शिवरायांची बदनामी करण्याचे पाप करणा-या बाबासाहेब पुरंदरे यांचा असा सत्कार करण्याची वेळ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर आली. ब्राह्मण व्होट बँकेचे हे पाप आहे.


Tuesday 9 July 2013

शिवसेनेतील मराठ्यांनी आता तरी बोध घ्यावा

शिवश्री प्रदिप इंगोले 


मराठा ह्या शब्दात एवढी प्रचंड ताकद आहे कि मराठा म्हटलं तर समस्त मानव जातीला स्फूर्ती चढते म्हणूनच आचार्य अत्रे नावाच्या हुशार बाम्नाने स्वत बामन असून मराठा नावाचे वृत्तपत्र सुरु केले ह्यात त्याचा सर्वसमावेशपण नसून मराठा नावाच्या शास्त्राचा वापर करून घेणे हा हेतू होता.त्यानंतर प्रबोधनकार ठाकरे नावाच्या कायस्थाने मराठ्यांच्या शक्तीकडे बघून शिवसेना काढली.मराठ्यांच्या शिवप्रेमाला गोंजारून मराठ्यांचा वापर प्रबोधनकारांचे चिरंजीव बाल ठाकरे याने सुरु केला.खेड्यातील बहुसंख्य बहुजन समाजाला बाल ठाकरे हा मराठा बहुजन वाटायचा कारण हा बाल ठाकरे स्वताला त्याच्या भाषणात मराठा म्हणवून घ्यायचा.हि मराठा ह्या शब्दाची आणि समूहाची ताकद ओळखून शिवसेनेने मराठ्यांचा वापर करून घेतला.

जेम्स लेन प्रकरण घडल्यानंतर शिवसेनेने बहुलकर नावाच्या बामनाची बाजू घेऊन मराठ्यांचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय आणि मासाहेब जिजाऊ ह्यांच्या बदनामीला हातभार लावला.शिवसेनेने मराठ्यांची अस्मिता लाथाडण्याची कृती या प्रकरणापासून सुरु केली.पुढे लालमहालातील दादू कोंडदेव नावाच्या शिपायाचे शिल्प मराठ्यांनी आई जिजाऊ आणि बाल शिवबा ह्यांच्या जवळून हटवून जीजौंची बदनामी थांबवण्याचा प्रयत्न केला पण दादू कोंडदेव हा ब्राम्हण होता आणि एका ब्राम्हणाचा पुतळा जरी त्याचे स्थान आणि कार्य नगण्य असले तरी तो हटवला म्हटल्यावर शिवसेनेला आपल्या बापाच्या ढुंगणावर लाथ मारल्यासारखे वाटले म्हणून ह्या हि वेळेस शिवसेनेनी मराठ्यांच्या ह्या कृतीला विरोध करून जिजाऊ शिवराय ह्यांच्या पेक्षा दादू कोंडदेव त्यांना महत्वाचा हे दाखवून मराठ्यांच्या अस्मितेला दुसरा धक्का दिला.तिसरे प्रकरण म्हणजे वाघ्या कुत्र्याचे काल्पनिक शिल्प टिळकासारख्या जातीयवादी ब्राम्हणाने शिवरायांच्या महाराणीच्या समाधीवर बसविले. मराठा सेवा संघ सारख्या समतावादी संघटनेच्या प्रबोधनामुळे मराठ्यांना हा कळला.   समस्त मराठ्यांनी अशी मागणी लावून धरली कि वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवा परत यालाही शिवसेनेने विरोध केला संभाजी ब्रिगेड नावाच्या मराठा बहुजन संघटनेने २ वर्षांनी हा पुतळा हटवला पण भटांची दलाल शिवसनेने इथेही मराठ्यांची अस्मिता लाटेने तुडवून मराठ्यांच्या नाकावर टिच्चून परत वाघ्या कुत्र्याचा पुतळा बसवला. मराठ्यांची अस्मिता  सलग तिसर्यांदा पायदळी तुडवण्याच काम शिवसेनेने केल.  म्हणजे शिवसेनेच्या दृष्टीकोनातून मराठ्यांपेक्षा खरजुल्या कुत्र्यांना पण जवळचे स्थान आहे. 

यानंतरहि शिवसेनेतील मराठ्यांनी बोध घेतला नाही तर ह्याच वाघ्यासारख्या खरजुल्या कुत्र्याची बामणी पिलावळ मराठ्यांच्या अंगावर टांग वर करून मुताल्याशिवाय राहणार नाही.शिवसेनेतील सर्व मराठ्यांनी लक्षात घ्यावे कि शिवसेनेने पहिल्यांदा मासाहेब जिजाऊ नंतर शिवरायांची महाराणी ह्यांची बदनामी केली आता यानंतरचा टप्पा म्हणजे शिवसेनेत काम करणाऱ्या मराठ्यांच्या आय बहिणी हाच असेल.  सत्तेसाठी स्वताच्या आय बहिणी विकानायची वृत्ती मराठ्यात नाही हे मराठ्यांनी त्या शिवसेनेच्या पदावर लाथ मारून सिध्द करावे अन्यथा पेशावायीतील घटकुंचकी शिवसेनेतील बामणे आणि कायस्थ मराठ्यांच्या स्त्रियांशी खेळल्यावाचून राहणार नाहीत.

वेळीच सुधारून छात्राप्तीचे वंशज आहोत हे सिध्द करावे. 

जय जिजाऊ जय शिवराय.

Sunday 7 July 2013

३ लाख वाचक!

आम्ही कृतज्ञ आहोत!!

शुक्रवार दि. ६ जुलै २०१३ रोजी अनिता पाटील विचार मंच या ब्लॉगने ३ लाख वाचनसंख्येचा टप्पा ओलांडला. ३ लाख वाचने पूर्ण करणारा हा मराठीतील पहिला वैचारिक ब्लॉग आहे. वाचकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल ब्लॉगचे संपादक मंडळ ॠणी आहे. 

आदरणीय अनिता ताई पाटील यांनी सप्टेंबर २०११ मध्ये त्यांच्या वैयक्तिक नावाने हा ब्लॉग सुरू केला होता. सप्टेंबर २०१२ मध्ये काही वैयक्तिक कारणांमुळे त्यांना ब्लॉग लेखन सुरू ठेवणे अशक्य झाले. तेव्हा त्यांनी ब्लॉगची सूत्रे संपादक मंडळाकडे दिली. गेल्या १० महिन्यांपासून संपादक मंडळ हा ब्लॉग चालवित आहे. ब्लॉगसाठी काही नवे लेखक या काळात पुढे आले. त्यामुळे विषयांची विविधता टिकवून ठेवणे संपादक मंडळाला शक्य झाले. विषय कोणतेही असले तरी बहुजन समाजाचे हीत हा उद्देश मंडळाने कधी नजरेआड होऊ दिला नाही. 

वंदनीय अनिता ताई यांनी ब्लॉगची सूत्रे संपादक मंडळाकडे सुपुर्द केली तेव्हा ब्लॉगची दीड लाख वाचने पूर्ण झाली होती. ब्लॉग दोन लाख वाचनांच्या दिशेने घोडदौड करीत होता. गेल्या १० महिन्यांत आणखी दीड लाख वाचनांची भर पडून ब्लॉगची वाचने आता ३ लाखांवर गेली आहेत. याचे श्रेय वंदनीय अनिता ताई यांनाच आहे, याची जाणीव संपादक मंडळाला आहे. अनिता ताई यांच्याबद्दल बहुजन वाचकांच्या मनात असलेल्या अतूट प्रेमामुळेच ३ लाख वाचकांचा टप्पा ब्लॉग गाठू शकला, हे आम्ही नम्रमणे नमूद करू इच्छितो. 

या पुढेही वाचकांचा असाच उदंड प्रतिसाद ब्लॉगला मिळत राहील, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. अधिकाधिक चांगले लेखन ब्लॉगवर वाचायला मिळेल, याची हमी यानिमित्ताने आम्ही देत आहोत. 

समतेच्या विचारांवर श्रद्धा असलेल्या लेखकांसाठी या ब्लॉगची दारे सदैव खुली आहेत.  इ-मेलद्वारे लेखन पाठवा, आम्ही ते ब्लॉगवर प्रसिद्ध करू.

जय जिजाऊ, जय शिवराय.

संपादक मंडळ
अपाविमं.

Wednesday 3 July 2013

हिन्दवी स्वराज्य ही संकल्पनाच बोगस आहे

-राजा मइंद, संपादक मंडळ सदस्य, अनिता पाटील विचार मंच.


छत्रपती शिवाजी महाराज यांना +हिन्दवी स्वराज्य संस्थापक+ अशी पदवी आपल्या इतिहासाच्या पुस्तकात लावली गेली आहे. हिन्दवी स्वराज्य म्हणजे काय आणि हा शब्द आला कोठून हा खरोखरच संशोधनाचा विषय आहे. +हिन्दवी स्वराज्य+ हा शब्द आपल्या पुस्तकात इतका रुळला आहे की, तो आपल्याला मराठीच वाटतो. पण वस्तुस्थिती तशी नाही. +हिन्दवी+ हा शब्द फारशी आहे. फारशी ही भाषा अरबी भाषेपासून आली आहे. मोगलांच्या दरबारातील लिखाणाची ती भाषा होती. 

+हिन्दवी+ हा शब्द +हिन्दू+ या शब्दापासून बनला आहे. हिन्दू या शब्दाला +वी+ हा प्रत्यय लागून हिन्दवी हा शब्द बनला. त्याचा अर्थ आहे हिन्दूंचा, हिन्दूंचे. फारशी आणि अरबी भाषांत +वी+ हा षष्ठी विभक्तीचा प्रत्यय आहे. मराठीत +चा, ची, चे+ हे षष्ठीचे प्रत्यय आहेत. त्यावरून घर-घराचा, गाव-गावाचा अशी शब्दरूपे बनतात. फारशी आणि अरबीत +वी+ हा प्रत्यय जोडून अशी शब्दरूपे होतात. उदा. लखनवी, गझनवी. मराठीत लखनवीचा अर्थ होतो लखनौचा तसेच गझनवीचा अर्थ होतो गझनीचा. मोहंमद गझनवी याला आपण गझनीचा मोहंमद असे म्हणतो. 

या विवेचनावरून असे लक्षात येते की, +हिन्दवी स्वराज्य+ या शब्दाचा अर्थ आहे +हिन्दूंचे स्वराज्य+ येथे प्रश्न असा निर्माण होतो की, छत्रपती शिवाजी महाराजांनी खरेच हिन्दूंचे स्वराज्य स्थापन केले होते का? अजिबात नाही. छत्रपती शिवराय धर्मवादी नव्हते. महाराज सर्वच धर्मांचा समान पातळीवर सन्मान करीत असत. महाराजांनी स्वत:ला कधीही केवळ हिन्दूंचा राजा असे म्हणवून घेतले नाही. आपल्या राज्याला +हिन्दूंचे राज्य+ असेही त्यांनी कधी म्हणवून घेतले नाही. त्यांनी फक्त +राज्य+ हाच शब्द वापरला आहे. +हिन्दवी स्वराज्य+ ही बिरुदावलीच बोगस आहे. ती महाराजांनी वा त्यांच्या समकालीन इतिहासकारांनी कधीही वापरलेली नाही. 

+हिन्दवी स्वराज्य+ ही संकल्पना आणि +हिन्दवी स्वराज्य संस्थापकङ्क ही बिरुदावली महाराष्ट्राबाहेरील कोणताही इतिहासकार वापरीत नाही. केवळ महाराष्ट्रातील पुरंदरीछाप जातीयवादी इतिहासकारच महाराजांना ही उपाधी लावतात. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा पाठ्यपुस्तक अभ्यास मंडळात बहुतांश पुरंदरीछाप जातीयवाद्यांचा भरणा होता. त्यांनी मुस्लिम समाजाच्या विरोधात महाराजांच्या नावाचा गैरवापर करण्यासाठी +हिन्दवी स्वराज्य+ ही बोगस संकल्पना निर्माण केली. महाराजांनी बदनामी करणे, हाही एक अंतस्थ हेतू या उपद्व्यापामागे दिसतो. 

बहुजनांनी या जातीय इतिहासातून आपण लवकर बाहेर पडले पाहिजे.