Thursday 31 May 2012

जैन, बौद्ध आणि त्यांची अहिंसा


गेस्ट रायटर : महावीर सांगलीकर


जैन आणि बौद्ध धर्मात अहिंसेला फार महत्व आहे. पण त्यांच्या अहिंसेबद्दल समाजात गैरसमजच फार आहेत. हे गैरसमज हिंसेकडे टोकाचा ओढा असणा-या कांही हितसंबंधी लोकांनी या दोन्ही धर्मांना बदनाम करण्यासाठी पद्धतशीरपणे पसरवले आहेत.

मुळात जैन आणि बौद्ध हे दोन्ही धर्म लढाऊ लोकांशी संबंधीत आहेत. अहिंसेचे तत्वज्ञान भारतात शूरांनी आणि वीरांनी मांडले, ही बाब ध्यानात घ्यायला पाहिजे. अहिंसेचे तत्वज्ञान हे भेकडांचे तत्वज्ञान नाही. एवढेच नव्हे तर जे निर्भय असतात तेच अहिंसेचे पालन चांगल्या रीतीने करू शकतात असा जैन व बौद्ध धर्माचा विश्वास आहे.

या दोन्ही धर्मात साधुंसाठी असणारे नियम आणि अनुयायांसाठी असणारे नियम वेगवेगळे आहेत. येथे साधूंना कसल्याही प्रकारची हिंसा करण्यास मनाई आहे, पण अनुयायांना वेळप्रसंगी, स्वसंरक्षणासाठी; परिवार, गाव, देश, धर्म यांच्या रक्षणासाठी हिंसा करण्यास परवानगी आहे. प्राचीन भारतातील अनेक राजघराणी जैन किंवा बौद्ध धर्माचे अनुयायी होती. त्यांच्याकडे बलाढ्य सैन्ये होती. त्यांनी परकीयांशी आणि अन्यायी स्वकीयांशीही युद्धे केली.

जोवर भारतावर जैन व बौद्ध राजघराणी राज्य करत होती, तोवर परकीय आक्रमक भारतात घुसू शकले नाहीत. अगदी जगजेता अलेक्झांडर आणि त्याचा सेनापती सेल्युकस निकेटरला पराभूत व्हावे लागले. पण पुढे अनेक इतर कारणांनी जैन व बौद्ध हे दोन्ही धर्म कमकुवत झाले. बौद्ध धर्माला तर भारतातून परागंदा व्हावे लागले. भारतात वैदिकांच्या ओंजळीने पाणी पिणा-या तथाकथित क्षत्रियांचे राज्य आले. त्यानंतरच भारतात तुर्क, मोगल, इंग्रज आदी परकीयांचा शिरकाव झाला. त्यांच्यापुढे भारतीय राजे टिकू शकले नाहीत. याचा अर्थ ते राजे पराक्रमी नव्हते असा नाही, तर वैदिक धर्मातील वर्णव्यवस्थेचे ते पालन करत असल्यानेच त्यांचा पराभव झाला. लढण्याचे काम फक्त क्षत्रियांनीच करायचे या नियमामुळे त्यांच्या सैन्यात इतरांना प्रवेश नव्हता, आणि क्षत्रियांनी फक्त लढायाचेच असते या नियमामुळे ते विनाकारण आणि एकमेकांशीच लढत बसले.

तरीही ज्यांना वाटते की बौद्ध धर्माच्या अहिंसेमुळे भारतावर परकीयांचे राज्य आले, त्यांनी याचा विचार करावा की चीन, जपान, थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम, कोरिया यासारख्या बौद्ध देशांवर परक्यांचे राज्य का आले नाही? अगदी आपला शेजारी देश असणा-या नेपाळचे उदाहरण घ्या. नेपाळला कोणी कितीही हिंदू राष्ट्र म्हणत असले तरी त्या देशावर बौद्ध धर्म आणि बौद्ध संस्कृती यांचाच प्रभाव आहे. संपूर्ण भारतावर राज्य करणारे इंग्रज नेपाळवर मात्र राज्य करू शकले नाहीत. तो देश शेवट पर्यंत स्वतंत्रच राहिला. याच नेपाळमधील गुरखा तरुण भारतीय व ब्रिटीश सैन्यात मोठ्या संख्येने भरती होत असतात. अतिशय शूर म्हणून प्रसिद्ध असणारे हे गुरखा बौद्ध धर्मीय असतात.

वर मी जैन व बौद्ध साधूंना कसल्याही प्रकारची हिंसा करण्यास मनाई असते असे म्हंटले आहे. पण प्रत्यक्षात प्राचीन काळी या दोन्ही धर्मातील साधू स्वसंरक्षणात तरबेज असत. किंबहुना आजच्या मार्शल आर्ट्सचे मूळ उद्गाते बौद्ध साधू आहेत. राज्यावर आलेल्या संकटकाळी जैन साधूंनी साधुवेशाचा त्याग करून हाती तलवार घेतली अशी अनेक उदाहरणे मिळतात.

ज्यांना अहिंसा या शब्दाचा तिटकारा आहे, त्यांच्यावर सावरकरांच्या सहा सोनेरी पाने या पुस्तकाचा पगडा आहे. या पुस्तकात सावरकरांनी पुष्यमित्र शुंग याचे कौतुक केले आहे. हा पुष्यमित्र शुंग मौर्य सम्राट बृहद्रथ याचा सेनापती होता. त्याने बृहद्रथाला सैन्याची परेड चालू असताना कपटाने मारले. असे मारण्याचे कारण सत्ता बळकावणे हेच असू शकते, पण सावरकरांनी बृहद्रथ हा बौद्ध असल्याने त्याने अहिंसेचे स्तोम माजवले होते म्हणून त्याला मारले असे म्हंटले आहे. असो. पुष्यमित्र शुंग सत्तेवर आल्यावर त्याने त्याच्या राज्यातील बौद्ध आणि जैन साधुंची कत्तल करायला सुरवात केली. त्यावेळी कलिंग येथे खारवेल हा जैन सम्राट राज्य करत होता. त्याने पुष्यामित्राला धडा शिकवण्यासाठी आपल्या बलाढ्य सैन्यासह मगधेकडे कूच केले. पुष्यमित्र घाबरला, पण त्याचवेळी त्याला कळले की दमित्रीस हा ग्रीक राजा भारताच्या पश्चिम सीमेवर आक्रमण करण्यासाठी येत आहे. तेंव्हा खारवेलने आपला मोर्चा पश्चिमेच्या दिशेने वळवला. खारवेल आपला प्रतिकार करणार आहे हे कळताच दमित्रीस माघारी फिरला. मग खारवेलने परत मगधेच्या दिशेने कूच केले. पुष्यमित्र इतका घाबरला होता की तो खारवेलला चक्क शरण आला. सावरकर पुष्यमित्राच्या या शरणागतीची बाब आपल्या पुस्तकात उघड करत नाहीत.

शेवटी एवढेच सांगावेसे वाटते की जैन-बौद्धांची अहिंसा ही प्रॅक्टिकल अहिंसा आहे. तेथे भेकडपणाला जागा नाही. क्वचित कांही लोक अहिंसेचा अतिरेक करत असतील, पण अशा लोकांकडे या दोन्ही धर्मात दुर्लक्ष केले जाते.

Sunday 27 May 2012

लोकमान्य नव्हे भटमान्य!



बाळ गंगाधर टिळक यांना ‘लोकमान्य' ही पदवी कोणी दिली याला तसे महत्त्व नाही, कारण खरा मुद्दा असा आहे की, बाळ गंगाधर टिळक लोकमान्य या पदवीच्या कसोटीला उतरतात का? लोकमान्य नेता कोण, हे ठरविण्यासाठी साध्या ३ कसोट्या लावता येऊ शकतील.

१. सर्व जातींचे आणि धर्माचे लोक ज्याचे अनुयायी आहेत, असा नेता. 
२. लोकमान्य म्हणजे सर्व लोकांची मान्यता असलेला नेता.
३. सर्व जाती आणि धर्मांच्या लोकांचा विचार करून आपला आचार ठरविणारा नेता. 

टिळकांचे अनुयायी कोण होते? 

‘मॅन नोन बाय द कंपनी ही कीपस्' अशी एक म्हण इंग्रजीत आहे. या म्हणीचा अर्थ असा की, माणूस हा त्याच्या आजूबाजूला कोण वावरते, यावरून ओळखला जातो. बाळ गंगाधर टिळक यांच्या आजूबाजूला कोण होते? टिळक नेते म्हणून वावरत असताना दुसèया फळीतील नेतेमंडळी कोण होती? ही पाहा त्यांची नावे : नरसिंह  चिंतामन केळकर, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, दाजीसाहेब खरे,  गंगाधर देशपांडे, दादासाहेब खापर्डे, डॉ. मुंजे, बापूजी अणे. टिळकांच्या दुसऱ्या फळीतील ही सारी नेतेमंडळी ब्राह्मण होती. इतकेच नव्हे, तर यातील बहुतांश मंडळी ही टिळकांच्या चित्पावन या पोटजातीतील होती. भा. द. खेर  यांच्या ‘लोकमान्य टिळक दर्शन' या ३०० पानांच्या पुस्तकात या लोकांव्यतिरिक्त एकही नाव येत नाही. यापैकी केळकर आणि खाडीलकर ही मंडळी टिळकांच्या दृष्टीने घरचीच होती. केळकर हे ‘मराठा' दैनिकाचे संपादक होते. तर खाडिलकर केसरीचे सहसंपादक होते. गंगाधर देशपांडे हे कर्नाटकातील होते. त्यांना कर्नाटक सिंह  अशी उपाधी लावली जात असे. दादासाहेब खापर्डे अमरावतीचे, डॉ. मुंजे नागपूरचे, तर बापूजी अणे यवतमाळचे होते. आळेकर हेही विदर्भातलेच होते.१

टिळकांना बहुजन समाजाची मान्यता होती का?

‘तेल्या तांबोळ्याचे पुढारी' असे संबोधन वापरून टिळकांना बहुजन समाजाचे मोठे पाठबळ होते, असे भासविण्याचा प्रयत्न केला जातो. पण त्यात कोणतेही तथ्य दिसत नाही. आपण चित्पावन ब्राह्मण आहोत, या वास्तवाची तसेच त्यातून आलेल्या मर्यादांची जाणीव खुद्द टिळकांनाही होती. हे त्यांच्या अनेक भाषणांवरून दिसून येते. टिळकांनी स्वदेशीचे आंदोलन पुकारले आणि प्रमुख शहरांत दौरे काढले. मुंबई दौरयावर असताना १५ डिसेंबर १९०७ रोजी चिंचपोकळी येथे मजुरांसमोर टिळकांचे भाषण झाले. त्यात टिळक म्हणाले, ‘‘स्वदेशीबद्दल कोणी तुमचा बुद्धिभेद करतील, पण त्याला भीक घालू नका. स्वदेशी हा पोटापाण्याचा प्रश्न आहे. ‘भटांनी हे काही तरी स्वदेशीचे ढोंग काढले आहे. आपल्याला त्याची जरुरी नाही', असे सांगून तुमच्यामध्ये जातीद्वेषाचे खूळ  माजविण्यात येते. पण स्वदेशीपासून तादृश्य फायदा तुमचा आहे, भटांचा नाही.''२

हे भाषण मजूरांसमोरचे आहे, म्हणून महत्वाचे आहे. टिळकांच्या आंदोलनाबाबत सर्वसामान्य समाजात ‘भटांचे ढोंग' अशी त्याकाळी भावना होती, हे खुद्द टिळकांच्या वक्तव्यातूनच दिसते. तरीही त्यांना ‘तेल्या तांबोळ्या'चे पुढारी ठरविण्याचा अट्टाहास केला जातो. 

टिळकांच्या राजकीय कारकीर्दीत स्वदेशी आंदोलन सर्वाधिक महत्वाचे होते. त्याचा लोकांवर किती परिणाम झाला, हे पाहणे फारच मनोरंजक ठरेल. या आंदोलनाच्या देशव्यापी परिणामाचे फारसे पुरावे सापडत नाहीत. जे काही सापडतात, ते दुर्दैवाने ब्राह्मण समाजाशीच संबंधित आहेत. भा. द. खेर यांच्या ‘लोकमान्य टिळक दर्शन' या पुस्तकातील एक उल्लेख पाहा : फाळणी : १९०६ मध्ये टिळक आणि बिपिनचंद्र पाल यांनी स्वदेशी आणि बहिष्कार या तत्त्वांचा प्रचार करण्यासाठी व्याख्यान दौरे केले. टिळकांची वर्षभर अविश्रांत परीश्रम घेतले. ‘परदेशी साखर खाणे पाप आहे असे टिळकांनी पटवून दिल्याने बहुसंख्य ब्राह्मणांनी साखर खाणे सोडले. इतकेच नव्हे तर हे पापकर्म करण्यापासून इतरांना वाचविले.

टिळकांच्या आंदोलनाने प्रभावीत होऊन ब्राह्मणांनी साखर खाणे सोडले, पण ब्राह्मणेतरांनी सोडले होते का? हा खरा प्रश्न आहे. तसे काही दिसून येत नाही.

टिळकांचे वैयक्तिक आचार-विचार

आता सर्वाधिक महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर आपण शोधूया. बाळ गंगाधर टिळक यांचे वैयक्ति-आचार विचार लोकनेत्याला साजेशे होते का? या प्रश्नाचे उत्तरही दुर्दैवाने नकारार्थीच येते. २३ जुलै १९०८ रोजी रात्री १० वा. न्या. दावर यांनी टिळकांना ६ वर्षे काळ्यापाण्याची शिक्षा ठोठावली. टिळकांची रवानी मंडालेला करण्यात आली. तुरुंगात ब्राह्मणेतरांनी बनविलेला स्वयंपाक खाल्ल्याने आपले ब्राह्मणपण बाटेल, अशी भीती त्यांना वाटत असावी, असे दिसते. आपण ब्राह्मण असल्यामुळे तुरुंगवासाच्या काळात आपल्याला ब्राह्मण आचारी मिळावा, अशी मागणी टिळकांनी इंग्रज सरकारकडे केली. ती सरकारने मान्य केली. पहिली काही वर्षे टिळकांना गुजरातेतील एक ब्राह्मण कैदी आचारी म्हणून देण्यात आला. त्याची शिक्षा संपल्यानंतर पुण्यातला व्ही. आर. कुलकर्णी नावाचा दुसरा ब्राह्मण कैदी त्यांना आचारी म्हणून मिळाला. त्याची शिक्षा संपल्यानंतर उत्तर भारतातील एक ब्राह्मण कैदी त्यांना आचारी म्हणून देण्यात आला. हे तिन्ही आचारी टिळकांसोबत त्यांच्याच कोठडीत राहत होते. 

ही माहिती ऐकिव नाही. स्वत: टिळकांनीच ती सांगितली आहे. मंडालेतील शिक्षा भोगून टिळक १६ जून १९१४ च्या मध्यरात्री पुण्यातील आपल्या घरी गायकवाडवाड्यात परतले. त्यानंतर लगेचच २३  जून १९१४ रोजी त्यांनी ‘केसरीङ्कला एक मुलाखत दिली. या मुलाखतीतील टिळकांनी पुढील माहिती दिली : 

...माझ्या करिता स्वयंपाक करण्यासाठी एका गुजराथी ब्राह्मण कैद्याची योजना केली होती.४

...माझ्याबरोबर गेलेल्या गुजराथी ब्राह्मण कैद्याची शिक्षेची मुदत संपल्यामुळे एक महिन्याने तो परत गेला आणि त्याच्या जागी येरवड्याच्या तुरुंगातून कुलकर्णी नावाचा ब्राह्मण कैदी आला. त्याला पाच वर्षांची शिक्षा झाली होती. परंतु त्याला दोन वर्षांची माफी मिळाली व माझ्या सुटकेपूर्वी त्याची घरी रवानगी करण्यात आली. नंतर उत्तर हिंदुस्थानातून एक ब्राह्मण कैदी आला व माझ्या मुदतीत तो माझ्याजवळ राहिला.५ 

आपण उभयता ब्राह्मण आहोत!

बाळ गंगाधर टिळक यांचा आचारी व्ही. आर. कुलकर्णी याने मंडालेच्या तुरुंगातील काही आठवणीची टिपणे लिहिली आहेत. त्यात एके ठिकाणी कुलकर्णी म्हणतो : ‘एके दिवशी टिळक मला म्हणाले, येथे मला पुष्कळ वेळ मिळतो. पुण्यात मला जेवायलाही फुरसत मिळत नसे. मी एक गोष्ट सांगतो. आपण उभयता ब्राह्मण आहोत. गायत्रीचा जप केल्यावाचून आणि सूर्याला अर्घ्य दिल्यावाचून आपण जेवता कामा नये. तेव्हापासून आम्ही हा नियम सतत पाळला.'६

अशा प्रकारे बाळ गंगाधर टिळक हे शेवटी ब्राह्मणच उरतात. लोकांच्या दृष्टीने तर ते ब्राह्मण होतेच. परंतु स्वत:लाही त्यांना आपले ब्राह्मण असणेच महत्त्वाचे वाटत असते. 

ब्रिटिशांना टिळकांबद्दल काय वाटत होते?

जाता जाता टिळकांबद्दलचे इंग्रजांचे काय मत होते, याकडेही एक नजर टाकूया. टिळकांनी आपल्या माथेफिरू अनुयायांच्या मदतीने काँग्रेसच्या सुरत अधिवेशनात हाणामा-या घडवून आणल्या. या प्रकाराबाबत लंडन टाईम्सने पुढील टिप्पणी केली होती : ‘टिळक हे विद्वान महाराष्ट्रीय ब्राह्मण आहेत. राजकीय तत्त्वज्ञान असे त्यांच्याजवळ मुळीच नाही. परंतु त्यांचे हेतू केवळ विध्वंसक स्वरूपाचे आहेत. जर काँग्रेसचा कब्जा आपणास मिळणार नसेल, तर ती मोडून टाकण्याचा त्यांनी निर्धारच केला होता. आणि तात्पुर्ता का होईना त्यांचा तो हेतू तडीस गेला आहे.'७ 

लंडन टाईम्सला टिळकांचे ब्राह्मण असणे अधोरेखित करणे महत्त्वाचे वाटते. तसेच टिळकांकडे कोणतेही राजकीय तत्त्वज्ञान नाही, हेही लंडन टाईम्स नमूद करतो.  परकीयांचे वृत्तपत्र म्हणून लंडन टाईम्सच्या या विश्लेषणाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. कारण त्यात वस्तुस्थितीचे दर्शन घडते.

उपसंहार

वरील विवेचनातून पुढील ठोस सत्य हाती येते.

  •  टिळकांचे सर्व लेफ्टनंट ब्राह्मण विशेत: चित्पावन ब्राह्मण होते.
  • बाळ गंगाधर टिळक यांच्या आंदोलनाकडे बहुजन समाज ‘भटांचे ढोंग' म्हणून पाहत होता. स्वत: टिळकच हे नमूद करतात.
  • टिळकांच्या आंदोलनाने प्रभावीत होऊन ब्राह्मणांनी साखर खाणे सोडले, पण ब्राह्मणेतर समाजावर त्याचा फारसा परीणाम झालेला दिसत नाही. 
  • तुरुंगात असतानाही बाळ गंगाधर टिळक ब्राह्मण आचारी मिळावा म्हणून हट्ट धरतात. आणि तो पूर्णही करून घेतात. ब्राह्मणेतर समाजाच्या हातचे खाल्ल्याने आपले ब्राह्मणपण बाटेल, अशी भीती त्यांना वाटत होती. 
  • आपण उभयता ब्राह्मण आहोत आणि म्हणून आपण गायत्री मंत्र म्हटल्याशिवाय जेऊ नये, असा उपदेश टिळक आपल्या आचा-याला करतात. आणि आमलात आणतात. 
  • टिळक हे विद्वान महाराष्ट्रीय ब्राह्मण आहेत, असे विश्लेषण लंडन टाईम्स करतो. टिळक हे भारतातील सर्व समाजाचे नेते आहेत, असे लंडन टाईम्स म्हणत नाही. 


निष्कर्ष

केवळ ब्राह्मणांसाठीच आपली ध्येय धोरणे राबविणा-या व्यक्तीला लोकमान्य म्हणणे योग्य ठरणार नाही. स्वत: टिळकांनाही आपण ब्राह्मण आहोत, हेच अधिक महत्त्वाचे वाटते. अतएव, बाळ गंगाधर टिळक यांना ब्राह्मणमान्य म्हणणे अधिक योग्य ठरेल. स्वत: टिळकांनाही तेच अपेक्षित होते. 

अनिता पाटील 

...............................................................................................................................
संदर्भ : 

१. भा.द. खेर : लोकमान्य टिळक दर्शन. आवृत्ती तिसरी सप्टें. २०००. 
या पुस्तकातील काही उल्लेख पुढील प्रमाणे :

अ) २० जुलै १९०५ रोजी बंगालच्या फाळणीचा निर्णय लॉर्ड कर्झनने घोषित केला. त्याविरुद्ध टिळकांनी केसरीत लेखमाला लिहून रान माजविण्याचा प्रयत्न केला. बंगालची फाळणी रद्द करावी, ब्रिटिश मालावर बहिष्कार टाकावा आणि राष्ट्रीय शिक्षणसंस्थांची स्थापना करून स्वदेशी शिक्षणाची व्यवस्था करावी, अशी त्रिसूत्री टिळकांनी जाहीर केली. (पान ८५)
ब) टिळकांना एकेक समर्थ अनुयायी मिळत होते. ‘मराठा'चे संपादक तात्यासाहेब केळकर, ‘केसरी'चे सहसंपादक कृष्णाजीपंत प्रभाकर खाडिलकर, कर्नाटकसिंह गंगाधर देशपांडे, टिळकांचे परममित्र अमरावतीचे दादासाहेब खापर्डे, नागपूरचे डॉ. मुंजे, यवतमाळचे बापूजी अणे या अनुयायांनी आपल्या नेत्याचा संदेश देशाच्या कानाकोप-यांत पोहोचविला. (पान ८७)
क ) टिळकांनी परिस्थितीचा सांगोपांग विचार करून १९०७ सालचा आपला कार्यक्रम आखला. न. चि. केळकर, कृ. प्र. खाडिलकर, गंगाधर देशपांडे, दादासाहेब खापर्डे आदि कार्यकर्ते टिळकांचा संदेश देशाच्या कानाकोपèयात पोहोचविण्यास सिद्ध होतेच. (पान १०४).

२.  भा.द. खेर : लोकमान्य टिळक दर्शन. आवृत्ती तिसरी सप्टें. २०००. (पान ११६).
३. भा.द. खेर : लोकमान्य टिळक दर्शन. आवृत्ती तिसरी सप्टें. २०००. (पान ९९)
४. भा.द. खेर : लोकमान्य टिळक दर्शन. आवृत्ती तिसरी सप्टें. २०००. (पान १६९)
५. भा.द. खेर : लोकमान्य टिळक दर्शन. आवृत्ती तिसरी सप्टें. २०००. (पान १७०)
६. भा.द. खेर : लोकमान्य टिळक दर्शन. आवृत्ती तिसरी सप्टें. २०००. (पान १७४).
७. भा.द. खेर : लोकमान्य टिळक दर्शन. आवृत्ती तिसरी सप्टें. २०००. (पान १३२.)

लवकरच वाचा ‘टिळक-रहस्य'!


अनिता पाटील घेऊन येत आहेत भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक नेते बाळ गंगाधर टिळक यांच्या कार्यकर्तृत्वाची चिकित्सा करणारी लेखमाला.



1. बाळ गंगाधर टिळक हे लोकमान्य होते की ब्राह्मणमान्य?
2. मंडालेच्या तुरुंगात असताना टिळकांसाठी स्वयंपाक कोण करीत असे? त्यांना पुण्याहून तूप कोण पाठवित असे? मंडालेहून सुटल्यावर टिळकांनी इंग्रज सरकारच्या अटी मान्य करून शरणागती का पत्करली?
3. मंडालेच्या कारागृहात टिळकांनी हालअपेष्टा भोगल्या की त्यांना विशेष वागणूक देण्यात आली?
4. सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? हा अग्रलेख टिळकांनी का लिहिला?
5. वेगवेगळ्या शिक्षेत सूट मिळावी यासाठी टिळकांनी किती अर्ज विनंत्या केल्या?
6. बाळ गंगाधर टिळक हे खरेच भारतीय असंतोषाचे जनक होते का?
7. ताई महाराज यांची संपत्ती बळकावण्यासाठी खोटी कागदपत्रे तयार केल्याच्या आरोपावरून टिळकांना शिक्षा का झाली?
8. ना. गोखले आणि फिरोज शहा मेथा यांच्या विरुद्ध टिळकांनी कशी कटकारस्थाने केली? काँग्रेस नेत्यांशी पटत नसतानाही  स्वतंत्र पक्ष काढण्याऐवजी टिळक लोचटांसारखे काँग्रेस नेत्यांसोबतच का राहिले?
9. वेदोक्त प्रकरणात टिळकांनी ब्राह्मणांचे प्रतिनिधी असल्यासारखी भूमिका का घेतली?

या आणि अशा असंख्य अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे या लेखमालेत वाचायला मिळतील. लेखमालेवर लक्ष ठेवा...

Sunday 13 May 2012

पेशव्याचे गर्वहरण करणारे सुखदेव बाबा

औरंगाबादपासून उत्तरेला सुमारे १५ ते २० किमी अंतरावर चौका हे गाव आहे. चौक्याच्या पूर्वेला डोंगर कपारीत सारोळा नावाचे गावाचे गाव आहे. सारोळ्याच्या डोंगरातून सुखना नदीचा उगम होतो. या उगमाच्या ठिकाणी सुखदेव बाबांचे ठाणे आहे. त्यांच्या नावावरूनच या नदीला सुखना हे हे नाव पडले आहे. मराठवाड्यात सुखदेव बाबांच्या अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. सुखदेव बाबा चिरंजीव आहेत, असे मानले जाते. काही लोक असे मानतात की, सुखदेव बाबा हे कोणा एका व्यक्तीचे नाव नसून ती एक गादी आहे. तिच्यावर बसणाèया प्रत्येक अधिकारी पुरुषास सुखदेव बाबा असेच म्हटले जाई. हे योग्यही वाटते. कारण भारतात अनेक अशा गाद्या आहेत. उदा. शंकराचार्य. लोकांनी प्रत्यक्ष पाहिलेले शेवटचे सुखदेव बाबा विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्र्यत जिवंत होते, असे या परिसरातील आख्यायिकांवरून दिसते. हे सुखदेव बाबा ३५१ वर्षे जगले असे सांगितले जाते. औरंगाबाद परिसरात १८९५ ते १९०५ या १० वर्षांच्या काळात मानमोडीच्या काही साथी एका मागोमाग एक येऊन गेल्या. या साथीतून सुखदेव बाबांनी लोकांना वाचविले, असे सांगितले जाते. साथ संपल्यानंतर एकादशीचा मूहुर्त पाहून सुखदेव बाबा ध्यान लावून बसले. ध्यानात असताना लोकांच्या समोरच ते अंतर्धान पावले. ज्या ठिकाणाहून ते अंतर्धान पावले, त्या ठिकाणी एक गुहा असून गुहेत बाबांची ध्यायस्थ मूर्ती कोरलेली आढळते. शिल्प ओबड धोबड आहे. मी सतत तुमच्यासोबत राहीन, असे आश्वासन त्यांनी जाताना लोकांना दिले होते, अशीही आख्यायिका आहे. सुखदेव बाबांचा वंश मेंढपाळाचा आहे, असे सांगितले जाते. या वरून ते धनगर असावेत, असे मानायला जागा आहे. या परिसरात आजही धनगरांची संख्या मोठी आहे.  

शेवटच्या सुखदेव बाबांनी पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथाचे गर्वहरण केल्याची आख्यायिका सांगितली जाते. सुखदेव बाबा दिवाळीला भ्रमंतीसाठी बाहेर पडत. चैत्र पाडव्याला परत सारोळा पर्वतावर येत. अशाच एका भ्रमंतीत त्यांची गाठ पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ याच्याशी पडली. सुखदेव बाबा दुपारच्या वेळी एका चिन्चेच्या झाडाखाली रस्त्यावरच झोपले. या रस्त्याने बाळाजी विश्वनाथ लवाजम्यासह जात होता. एक दरिद्री मेंढपाळ रस्त्यावर झोपलेला आहे, हे पाहून लवाजमा थांबला. बाळाजी विश्वनाथाला हे कळले तेव्हा त्याने बैराग्याला उचलून शेजारच्या ओढ्यातील तापलेल्या वाळूत फेकून देण्याचा आदेश सोडला. आघाडीच्या शिपायांनी सुखदेव बाबांना तात्काळ उचलून ओढ्यात फेकले. बाबा पाठीवर पडले. बाळाजी विश्वनाथाची स्वारी पुढे निघून गेली. काही मैल चालून गेल्यानंतर बाळाजीच्या पाठीचा दाह होऊ लागला. त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. तोपर्यंत संध्याकाळ झाली. आता मात्र, त्याला वेदना असह्य झाल्या. पाठीला मोठे मोठे फोड आले. सर्वांगात आग भडकली. वैद्यांना पाचारण करण्यात आले. वैद्याच्या औषधांनी कोणताही गुण पडला नाही. दुसèया दिवशी पाठीचे फोड फुटून त्यातून पाणी गळू लागले. या प्रकारामुळे बाळाजी विश्वनाथासह सर्वच घाबरले. बाळाजीच्या बायकोने पुरोहितास पाचारण केले. पुरोहिताने सांगितले की, श्रीमंतांकडून कोणा तरी संत पुरुषाला तसदी पोहोचली आहे. तोच यावर उपचार करू शकतो. 

बाळाजी विश्वनाथाला तात्काळ आदल्या दिवशीचा प्रसंग आठवला. तापलेल्या वाळूत फेकलेल्या दरिद्री मेंढपाळाचा शोध घेण्यासाठी स्वार रवाना करण्यात आले. स्वार आल्या मार्गाने परत गेले. बाबांना जेथे फेकले होते, त्या ओढ्यात स्वार पोहोचले. बाबा अजूनही पाठीवरच पडलेले होते. आता दुसèया दिवशीची दुपार झाली होती. बाबा तापलेल्या वाळूत विठ्ठल भजन करीत होते. स्वारांनी बाबांचे पाय धरले आणि झाला प्रकार सांगितला. पेशव्यांचा दाह दूर करण्यासाठी पेशव्यांच्या तळावर येण्याची विनंती बाबांना केली. बाबा म्हणाले, मी फक्त देवाचा विठ्ठलाचा आदेश मानतो. त्याच्या आदेशाशिवाय मी कोठेही जात नाही. 

स्वार माघारी फिरले. मग स्वत: बाळाजी विश्वनाथ स्वत:च लवाजमा घेऊन सुखदेव बाबांकडे गेला. त्याने सुखदेव बाबांचे पाय धरून क्षमा मागितली. बाबांचे पाय धरताच बाळाजीच्या अंगाचा दाह संपला. पाठीवरचे फोडही नाहीसे झाले. त्यानंतर बाळाजी विश्वनाथाने सुखदेव बाबांचा उपदेश घेतला. आणि त्यांना गुरू करून घेतले. 

ज्या चिन्चेच्या झाडाजवळ हा सर्व प्रकार घडला. त्या ठिकाणाची आठवण म्हणून सुखदेव बाबांचे एक भक्त लिम्बाजी पाटील यांनी एक गाव वसवले. या गावाला चिन्चोली लिम्बाजी हे नाव पडले. कन्नड तालुक्यातील आजचे चिन्चोली लिम्बाजी म्हणजेच सुखदेव बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गाव असावे, असा अंदाज आहे. तथापि, यावर आणखी संशोधन होण्याची गरज आहे.

अनिता पाटील



Saturday 12 May 2012

आंबेडकरांच्या बदनामी मागेही पुण्यातील ब्राह्मण !

 डॉ. सुहास पळशीकर


एनसीईआरटीच्या अकरावीच्या पुस्तकात डॉ. आंबेडकरांचा अवमान करणारे कार्टून घुसडवून बदनामीचा विकृत आनंद लुटणाराही पुण्यातला ब्राह्मणच निघाला. डॉ. सुहास पळशीकर असे त्याचे नाव. तो पुणे विद्यापीठात विभाग प्रमुख आहे. संतप्त भीमसैनिक शनिवारी त्याच्या केबिनमध्ये घुसले. मोडतोड केली. पण अशाने काहीही होणार नाही. डॉ. पळशीकरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांना अटक होऊन, जामीन मिळणार नाही, अशी कलमे लागली पाहिजेत. असे झाले तरच अशा घटनांना पायबंद बसेल. व्यंगचित्रांच्या माध्यमातून विद्याथ्र्यांना शिक्षण देण्याचा हा प्रकार जगातील पहिलाच असावा, असे दिसते. येथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, पुण्यातील ब्राह्मण हीच एक विकृती आहे. ब्राह्मणेतरांच्या यच्चयावत सर्व महापुरुषांची बदनामी करण्यात या लोकांना विकृत आनंद मिळतो. छत्रपती शिवराय आणि माँसाहेब जिजाऊंच्या बदनामीचे केंद्र पुण्यात, ब्राह्मण वसाहतींत होते. डॉ. आंबेडकरांच्या बदनामीचे केंद्रही येथेच आहे. ब्राह्मणेतर महापुरुषांच्या बदनामीसाठी पाठ्यपुस्तकांचा आधार घेण्यापर्यंत या विकृतांची मजल गेली आहे.

डॉ. सुहास पळशीकर एनएसीईआरटीचे सल्लागार होते. त्यांच्या जोडीला होते, डॉ. योगेंद्र यादव. हेच यादव अण्णा हजारे यांच्या आंदोलनात सक्रिय होते. अण्णांचे आणि आरएसएसचे संबंध असल्याचे अलिकडील आंदोलनाने स्पष्ट झाले आहे. अशा प्रकारे आंबेडकरांच्या बदनामीचे धागेदोरे सर्व बाजूंनी ब्राह्मणांनाच जाऊन भिडतात.

केंद्र सरकारच्या एनसीईआरटी अभ्यासक्रमातील राज्यशास्त्राच्या + इंडियन कॉन्स्टिट्यूशन अ‍ॅट वर्क+ या पुस्तकात घटनेच्या निर्मितीप्रक्रियेसंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ५० वर्षापुर्वीचे व्यंगचित्र छापले आहे. त्यावरून शुक्रवारी संसदेत गदोरोळ झाल्यानंतर हे पुस्तक मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर एनसीईआरटीचे सल्लागाप असलेल्या योगेंद्र यादव आणि डॉ. सुहास पळशीकर यांनी पदाचा राजीनामा दिला.

पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे विभागप्रमुख असलेल्या डॉ. सुहास पळशीकर यांच्या कार्यालयावर भीमसैनिकांनी हल्लाबोल केला. या हल्ल्यात पळशीकर यांच्या कार्यालयाचे तोडफोड करण्यात आली. यावेळी पळशीकर कार्यालयात नसल्याने त्यांना कोणतीही इजा पोहचलेली नाही.

व्यंगचित्राच्या मुद्द्यावर भीमसैनिकांनी पळशीकर यांची भेट मागितल्यानंतर त्यांनी त्यांना चर्चेसाठी बोलावले होते. तीन कार्यकत्र्याशी झालेल्या चर्चेनंतरही त्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी हा हल्ला केला असल्याचे बोलले जात आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करण्यासाठी अकरावीच्या
पुस्तकात घुसडण्यात आलेले हेच ते कार्टून. राज्य घटनेच्या
निर्मितीचे काम गोगलगायीच्या पावलांनी सुरू असल्याचा
संदेश या काटूनमधून देण्यात आला आहे. डॉ. सुहास पळशीकर हे
या कार्टूनचे अजूनही निर्लज्जपणे समर्थन करीत आहेत.
.......................................................................................................

डॉ. आंबेडकरांच्या बदनामीचे षडयंत्र उघडकीस आल्यानंतरही डॉ. पळशीकरांचा टार्गटपणा कमी झालेला नाही. या पुस्तकातील आशय अतिशय चांगला आहे, असे निर्लज्ज उद्गार डॉ. पळशीकर यांनी काढले. महाराष्ट्र टाईम्सने त्यांची प्रतिक्रिया प्रसिद्ध केली आहे. त्यात डॉ. पळशीकर म्हणतात : + हे पुस्तक २००६ पासून शिकवले जात असून , त्यातील आशय चांगला असल्याची प्रतिक्रिया अभ्यासक आणि शिक्षणतज्ज्ञांनी यापूर्वी दिलेली आहे. आधीच्या पुस्तकांमधील निरस मजकुराऐवजी संवाद साधणारा आणि सचित्र मजकूर या पुस्तकात आहे. गांधीजी , डॉ.आंबेडकर आणि पंडित नेहरू या तत्कालीन प्रसिद्ध व्यक्तींची त्यावेळी काढल्या गेलेल्या अभिजात व्यंगचित्रांचा समावेश करण्यात आला आहे. आंबेडकर यांच्यावरील व्यंगचित्र वापरतानाही हाच दृष्टिकोन होता. आंबेडकरांचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नाही. घटना तयार करण्याची प्रक्रिया कशी आहे याचा तपशील याच पुस्तकात देण्यात आला आहे. आंबेडकरांची भूमिकाही नंतरच्या पुस्तकात देण्यात आली आहे. राज्यशास्त्रातील ख्यातनाम तज्ज्ञांची मान्यता घेऊनच हे पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले आहे.+

या पुस्तकाला ख्यातनाम तज्ज्ञांची मान्यता होती, असे डॉ. पळशीकर सांगतात. याचाच अर्थ या बदनामीच्या कटात आणखी अनेक जण सहभागी आहेत. हे इतर लोक कोण आहेत, याच शोध घेण्यासाठी डॉ. पळशीकरांची चौकशी होणे आवश्यक आहे. या कथित तज्ज्ञांनाही अटक व्हायला  हवी.

अलिकडे काही दलित विद्वानांना ब्राह्मणांचा भारीच पुळका आलेला आहे. दलितांवरील भूतकाळातील अन्यायाला ब्राह्मणांना जबाबदार धरण्यात येऊ नये, असे या लोकांचे म्हणणे आहे. कार्टून प्रकरणाने अशा विद्वानांच्या डोळ्यांत झणझणीत अंजनच घातले आहे.

ब्राह्मणांच्या अश्लिल शिव्या


अरेरे, संस्कारांचा ठेका मिरविणाèया ब्राह्मणांची किती अवनती झाली आहे! माझ्या ब्लॉगवर रोज ब्राह्मणांकडून दिल्या जाणा-या अश्लिल शिव्यांचा भडिमार पाहिल्यानंतर कोणाच्या तोंडातून हे उद्गार सहजपणे बाहेर पडतील. संपूर्ण ब्राह्मण समाजाला निराशेने घेरले आहे तसेच आता ब्राह्मणांमध्ये पूर्वीसारखी विद्वत्ता राहिलेली नाही, याचा पुरावा  या शिव्यांमधून मिळतो.

मी हा ब्लॉग कोणाही जातीविरुद्ध लिहित नाही, तर प्रवृत्तींविरुद्ध लिहिते, हे मी अनेक वेळा सांगितले आहे. सत्य स्वीकारणा-या सज्जनांबद्दल मला आदरच आहे. परंतु दुर्दैव  पाहा, गेल्या आठ महिन्यांत सत्य स्वीकारणारा एकही सज्जन ब्राह्मण मला भेटला नाही. माझे लिखान मान्य नसेल, तर पुरावे देऊन ते खोडून काढायला हवे. पण अजून तरी तसा कोणी मायीचा लाल पुढे आलेला नाही. ते केवळ मला शिव्या देत आहेत. शिव्या दिल्याने मी माझे लिखान थांबविन असे, जर त्यांना वाटत असेल, तर ते अज्ञानी आहेत.

ब्राह्मणवाद्यांची अडचण अशी आहे की, अनिता पाटील ठोस पुराव्यांशिवाय एक ओळही लिहित नाही. एकच उदाहरण त्यासाठी देते. अलिकडच्या काळापर्यंत ब्राह्मण हे गोमांस खात असत. इतकेच ब्राह्मणांत पाळल्या जाणाèया १६ संस्कारापैकी प्रत्येक संस्कारात गाय कापली जात असे, असे मी लिहिले. त्यासाठी ॠग्वेदी ब्राह्मणांची कर्मकर्तव्ये ठरविणाèया अश्वलायन गृह्य सूत्रातील प्रकरणेच्या प्रकरणे उदधृत केली. याचा प्रतिवाद करणे कोणाही ब्राह्मणाला शक्य नाही. कारण अश्वलायन गृह्य सूत्र आजही ॠग्वेदी ब्राह्मणांच्या घरात उपलब्ध आहे. माझ्याकडे त्याची अत्यंत अस्सल प्रत उपलब्ध आहे. परशुरामावरची माझी लेखमालाही अशाच ठोस पुराव्यांच्या आधारे मी लिहिली आहे.

ब्राह्मणांच्या साधनशुचितेचे पितळच मी उघडे पाडल्यामुळे जातीयवादी ब्राह्मण माझ्यावर दात खाऊन आहेत. त्यामुळे ते मला अश्लिल शिव्या देत आहेत. येथे आणखी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की, उघडपणे शिव्या देण्याचे धाडसही या नेंभळटांमध्ये नाही. ब्लॉगवर निनावी कॉमेंट करून ते आपल्या मनातील मळमळ बाहेर काढतात. किंवा  काही तरी बोगस नावे धारण करतात. असले गलिच्छ प्रकार करणारे कोणत्या मानसिकतेत जगत असतील, हे वेगळे सांगायला नकोच. ‘ब्राह्मण हे स्वप्नरंजन करतात. त्यांची लैंगिगताही याच प्रकारची आहे'  असे खेडेकर साहेबांनी त्यांच्या ‘शिवरायांच्या बदनामीची केंद्रे'  या पुस्तकात लिहिले आहे. ते किती यथार्थ आहे, हे या शिव्यांवरून लक्षात येते. 

माझ्या ब्लॉगवर रोज असंख्य कॉमेंट शिव्यांच्या स्वरूपात येतात. त्यापैकी काही मोजक्या कॉमेंट वाचकांच्या माहितीसाठी खाली देत आहे :


अनिता तू इतके हॉट लिहितेस ना एकदम हत्त्यार कडक होते. भेट रात्री आज पुलाखाली. -कडक हत्त्यार.

sambhaji brigred hi sambhajichya naavala kalank aahe, aahe ti hijadyanchi phauj !!! -Anonymous

ya hari narkyala Telco valyanni nagada karun badavale hote. -Anonymous

tuza janm eka bamanamule zala, brahmanabaroabr shrungar karatana ekdam tuzi zavadi aai dachakali tyamule tu chhakka mhanun janmala aala. tuzi bakichi bhavande bagh kashi chhan janmala aali tuzya bapala kalale tari ka ? - -Anonymous

are bhangi gandichya.... gataratun aalelua wagarya... tuch tuzya bapala wichar kuthun aalayes te mhanun randhichya -Omkar.

Aadhi tu tujhya aaila vichar tujha baap kon te ??? Aathaval tar nashib tujh bhadavya - Anonymous

vinash kaale viprit buddhi........b grade vale brahmin nanncha itka dvesh karayala laagle aahet ki te sagli shakti kharcha karat aahet ki tich jar satahchya development sathi vaparli asti tar kuthlya kuthe gele aste. jitka jaast dvesh kartil titke jaast daridri hotil............. sri guru dev datta.... sri swami samarth.......
-Narendra.


Wednesday 9 May 2012

अनिता पाटील यांचे विचार आता पुस्तकरूपात


भावांनो आणि बहिणींनो,

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मी हा ब्लॉग सुरू केला. गेल्या आठ महिन्यांच्या काळात १३० लेख ब्लॉगवर टाकण्यात आले आहेत. जवळपास ८० हजार वेळा हा ब्लॉग वाचला गेला आहे. दीड हजार प्रतिक्रिया नोंदल्या गेल्या आहेत. हा ब्लॉग सुरू करण्यामागे ‘बुडताहे जन न पाहवे डोळाङ्क ही संत तुकारामांच्या अभंगपंक्तीची प्रेरणा होती तसेच बहुजन समाजाला आपले हीत कशात आहे, हे समजावे हा उद्देश होता. आपले विचार लोकांना पचतील का, असे प्रारंभी वाटले होते. तथापि, ब्लॉगला मिळालेला प्रतिसाद पाहता, या विचारांची महाराष्ट्राला गरज आहे, हेच सिद्ध होते. या लेखांतील विचार पुस्तक रूपाने यावेत, अशी मागणी अनेक भावा-बहिणींकडून होत होती. काही जाणकार मंडळीही यासाठी आग्रही होती. मी ब्लॉगच्या कामातच एवढी व्यस्त होते की, पुस्तकाकडे लक्ष द्यायला वेळच नव्हता. तथापि, आता चळवळीतील काही मंडळींनी पुढाकार घेऊन अनिता पाटील संघ (एपीएस) नावाने स्वतंत्र संस्थाच काढली आहे. या संस्थेच्या माध्यमातून या ब्लॉगवरील लेखन पुस्तक रूपाने प्रसिद्ध करण्यात येणार आहे. येत्या दिवाळीपर्यंत पहिला खंड वाचकांना उपलब्ध होऊ शकेल, या हिशेबाने एपीएसने नियोजन चालविले आहे. एपीएसचे काम ना नफा ना तोटा या तत्वावर चालणार आहे. त्यामुळे ही पुस्तके अगदीच नाममात्र किमतींत वाचकांना उपलब्ध होतील.

या नव्या उपक्रमाला तुमचे आशीर्वाद हवे आहेत.

आपली लाडकी बहीण
अनिता पाटील

वे.शा.सं.? छे, दि.शा.सं.


२१ व्या शतकातील थोर विचारवंत संजय सोनवणी यांनी मला आशीर्वाद दिला. सोनवणी साहेबांचे आशीर्वचन मी या ब्लॉगवर टाकले होते. तथापि, एका ब्राह्मणाने याबद्दल संशय व्यक्त केला आहे. त्याचे म्हणणे असे की, थोड्या दिवसांपूर्वी सोनवणी यांनी अनिताची खरडपट्टी काढली होती. तेव्हा ते अनिताला प्रशस्ती देतीलच कशी? दुसरे असे की, अनिता पाटील यांच्या ब्लॉगवर तो प्रशस्तीचा लेख आता सापडत नाही

दिशाभूल करणे हा ब्राह्मणवाद्यांचा फार प्राचीन धंदा आहे. त्यात ते इतके पारंगत आहेत की, त्यांना वे.शा.सं. (वेद शास्त्र संपन्न) या पदवीऐवजी दि.शा.सं. (दिशाभूल शास्त्र संपन्न) अशी नवी पदवी द्यायला हवी. अपप्रचार करणे, अर्धी माहिती देणे, संदर्भ तोडून माहिती देणे अशा क्लृप्त्या हे लोक अपप्रचारासाठी वापरतात. याने काम भागले नाही, तर थेट खोटे ठोकून देतात. सोनवणी साहेबांनी मला जो आशीर्वाद दिला, त्याबद्दल हा ब्राह्मण अशा सर्व क्लृप्त्या वापरीत आहे. 

रवींद्र तहकिक यांनी लिहिलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या विषयीच्या लेखावर टीका करणारा एक लेख श्री. सोनवणी साहेबांनी लिहिला होता. ७ एप्रिल २०१२ रोजी लिहिला होता. त्याच लेखाच्या प्रतिक्रियांत १८ एप्रिल २०१२ रोजी श्री. सोनवणी साहेबांनी माझ्यासाठी आशीर्वचन लिहिले आहे. मूळ लेखाची लिन्क अशी आहे :
http://sanjaysonawani.blogspot.in/2012/04/blog-post_9158.html


माझ्या ब्लॉगवर या ब्राह्मणाला श्री. सोनवणी साहेबांचे आशीर्वचन सापडत नसेल, तर त्याला मी काय करणार? ब्लॉग कसा वाचावा एवढे साधे ज्ञानही या गृहस्थाला नाही. या अडाण्यासाठी माझ्या ब्लॉगवरील या लेखाची लिन्क इथे देत आहे :
 संजय सोनवणी यांचा अनिता पाटील यांना आशीर्वाद

श्री. संजय सोनवणी साहेब यांच्या अनेक लेखांबद्दल माझे मतभेद आहेत. तरीही माझ्या मनात त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. त्यांच्या ज्या भूमिका मला अजिबातच पटल्या नाहीत, त्याबद्दल मी वेळो वेळी लिहिलेही आहे. तथापि, हे लेखन करताना श्री. सोनवणी साहेबांचा उपमर्द होईल, असे एकही वाक्य माझ्या लेखणीतून बाहेर पडलेले नाही. पडणार नाही. जगातील कोणतीही एक विचारधारा प्रमाण मानणाèया दोन व्यक्ती अगदी समान विचार करीत नसतात. कारण व्यक्ती या काही कार्बन कॉपी नसतात. मतभेद हे होतच असतात. मतभेद हे निरोगी लोकशाहीचे लक्षणही असतात. सर्व लोक एक सारखा विचार करणे हे केवळ हुकूमशाहीतच शक्य असते. कारण विरोधी विचारांना हुकूमशाहीत अजिबातच स्थान नसते. असो. येथे मी एवढेच सांगू इच्छिते की, मतभेद असले तरी श्री. सोनवणी साहेब आमच्यासाठी आदरणीय आहेत, आणि आदरणीयच राहतील. 

श्री. सोनवणी साहेबांनी माझ्यासाठी लिहिलेले आशीर्वचन त्यांच्या ब्लॉगवरून मूळ स्वरूपात येथे देत आहे : 
................................................................................................................
  1. अनिताजी, मी सर्वप्रथम आपले मन:पुर्वक अभिनंदन करतो. आपल्या ब्लोगवर प्रतिक्रिया देण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. आपण जो अत्यंत संतुलित आणि ध्येयवादाला मुळीच तिलांजली न देता जो मार्ग आता पकडला आहे तो नक्कीच प्रशंसनीय आहे. आपला लढा समतेसाठी आहे. बंधुत्वासाठीच आहे. आपले भांडण नाही. खरे तर आपले कोणाशीच भांडण नाही. आपण महान बळीराजाचे वारस आहोत. बळीराजाने आपल्या प्रजेत कसलाही भेद केला नव्हता. आपण भेदातीत जाण्यासाठी कटीबद्ध आहोत यात शंका नाही. भेद माजवु पाहणा-यांना अंधांना जागे मात्र नक्कीच करायला हवे, पण ते बळीराजाच्या व्यापक मानवतावादी द्रुष्टीकोनातुन. माणसे बदलत नाहीत असे आजिबात नाही. माणसे बदलतात कारण बदलणे हाच मानवी स्वभाव आहे. फक्त सांगण्याची पद्धत संयत/सम्यक आणि मुलभुत तत्वद्न्यानावर आधारित अशी हवी. आता तुम्ही नेमके तसेच करत आहात. पानिपतबाबत आपल्या लेखात काही ऐतिहासिक त्रुटी असल्या तरी त्या मुळात हेतुत: नसल्याने त्याकडे दुर्लक्षच करायला हवे. आरएसेस, गडकरी, मोदी, भागवत, हिमानी सावरकर, सनातन प्रभात ईईई हा साराच कंपु देशाच्या समतेच्या वाटचालीकडे जाणा-या मार्गातील अडसर आहेत याबद्दल शंका बाळगायचे कारण नाही. हे अडसर कसे दुर करायचे हे आपल्यापुढचे आव्हान आहे. या संघटना व त्यामागील प्रव्रुत्तींवर आपण सतत प्रकाशझोत टाकणे आवश्यक आहे व त्याच वेळीस बहुजनांना द्न्यानसत्ता, अर्थसत्ता याविषयी जागे करण्याचीही गरज आहे. या संघटनांत दुर्दैवाने बहुजनांची संख्या वाढत आहे. संघटना या प्रव्रुत्ती असतात. या प्रव्रुत्तींना सर्वच समाज (मग ते कोणीही व कोणत्याही जातीचे असोत) अजुन तरी शरण गेलेला नाही. तो जावू नये हीच आपली इच्छा असायला हवी. तुम्हीच तुमच्या ब्लोगवर म्हणता..."कोणाही जीवाचा न घडो मत्सर..." येथे मत्सर हा शब्द तुकोबारायांनी अत्यंत जाणीवपुर्वक वापरला आहे. मत्सरग्रस्त कधीही स्वत:ची वा इतरांची प्रगती साधु शकत नाहीत. अधिक लिहित नाही. कोणाला उपदेश करण्याची माझी योग्यता नाही. पण तुम्ही माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत जो सकारात्मक बदल घडवला ते मात्र अद्भुत आहे एवढे येथे मी आवर्जुन नमुद करतो. मी तुमचा थोरला भाउ आहे आणि हा मान तुम्ही मला दिलात हे तुमच्या परिवर्तनातुन ठळक होते. मी तुम्हाला या परिवर्तनवादी विचारसरणीला अनंत शुभेच्छा व आशिर्वाद देतो.
    Reply

.................................................................................................................

अनिता पाटील

Tuesday 8 May 2012

शेफारलेले बाळे आणि बाळ्या

सचिन, माधुरी, आणि मंगेशकरांचा महाराष्ट्रद्रोह

महाराष्ट्रात काही शेफारलेली बाळे आणि बाळ्या आहेत. सचिन तेंडुलकर, माधुरी दिक्षित, आणि मंगेशकर कुटुंबातील स्त्री-पुरुष यांचा त्यात प्रामुख्याने समावेश करावा लागेल. यांना शेफारून ठेवण्याचे पाप महाराष्ट्रातील प्रसार माध्यमांनी केले आहे. हे लोक महाराष्ट्राची शान आहेत, असा प्रचार माध्यमे गेली अनेक दशके करीत आहेत. एखाद्या खोट्या गोष्टीचा प्रसार सतत करीत राहिले की, ती शेवटी लोकांना खरी वाटू लागते, असे हिटलरचा माहिती आणि प्रसारणमंत्री डॉ. पॉल जोसेफ गोबेल्स म्हणत असे. ही बाळे आणि बाळ्यांच्या बाबतीत नेमके हेच झाले आहे. अत्यंत स्वार्थी आणि आपल्याच कोशात जगणाèया या बाळे-बाळ्यांवर मीडियातून सातत्याने हितसंबंधी प्रशंसेचा वर्षाव होत राहिला. त्यामुळे या बाळे-बाळ्यांना असे वाटायला लागले की आपल्यामुळेच महाराष्ट्राला किम्मत आहे. अतएव आपण सर्व कायदे आणि नियमांच्या वर आहोत. नियम हे सर्वसामान्यांसाठी आहेत. आपल्यासाठी नाहीतच. ही बाळे आणि बाळ्या आता सरकारलाही जुमानीशी झाली आहेत. 

या सर्वांत एक समान दुवा आहे. तो म्हणजे हे लोक पैशांच्या बाबतीत अत्यंत हावरट आहेत. 

१.

मंगेशकरं

मंगेशकरं हे महाराष्ट्रातील सर्वाधिक शेफारलेले लोक आहेत. लता मंगेशकर, आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर आणि त्यांची इतर भावंड मुंबईतील पेडर रोडवर राहतात. कृष्णकुंज असे त्यांच्या घराचे नाव. मंगेशकर राहत असल्यामुळे कृष्णकुंजला सर्व नियमांतून बाजूला काढण्यात यावे, असे त्यांना वाटते. पेडर रोड हा मुंबईतील सर्वाधिक वर्दळीचा मार्ग आहे. या रोडवर वाहतुकीची सातत्याने कोंडी होते. सर्वसामान्यांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन सरकारने येथे उड्डाण पूल बांधण्याचे ठरवले. कृष्णकुंज समोर उड्डाण पूल? किती घोर पाप? स्वत: लताबाई आणि मंत्रालयात गेल्या. संपूर्ण दशकभर त्यांनी हा पूल रोखून धरला. सामान्य लोकांच्या प्रश्नांसाठी लताबाई कधी अशा बाहेर पडल्या नाहीत. उड्डाण पूल झाला तर आम्ही दुबईला जाऊन राहू, अशी धमकी खुद्द लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी दिली होती. याचाच अर्थ असा की, यांना देशाबद्दल अजिबात प्रेम नाही. मला तर वाटते, हे दुबईला कधी जातात याची वाट सरकारने पाहूच नये. एका बोटीत बसवून त्यांना दुबईच्या दिशेने तोंड करून अरबी समुद्रात सोडून द्यायला हवे. दुबईत जाऊन नवे प्रभूकुंज बांधा म्हणा.  हा उड्डाण पूल करायचाच असा निर्णय आता सरकारने घेतला आहे. ही चांगली गोष्ट झाली.

 सर्व मंगेशकरांनी मिळून महाकपटी विनायक दामोदर सावरकरांनी लिहिलेली ‘सागरा प्राण तळमळला' वगैरे रडगाणी गायिली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसाठी असे एखादे गाणे मंगेशकरांनी गायलेय का? किन्वा छत्रपती शाहू महाराज, महात्मा  फुले यांच्यासाठी एखादे गाणे गायलेय का? येथे प्रश्न असा पडतो की, मंगेशकरांनी सावरकरांसाठीच का बरे एकत्र येऊ गळे काढले? हृदयनाथ मंगेशकरांनी तर अलिडके अत्यंत जात्यंध उपक्रम हाती घेतला आहे. वारकरी संतांमधून ज्ञानेश्वरांना वेगळे काढून केवळ त्यांचेच अभंग मंगेशकर गात फिरत फिरत आहे. इतक्या जात्यंध लोकांना मीडिया कित्येक दशके महाराष्ट्राची शान म्हणत आहे. 


२.

सचिन रमेश तेंडुलकर

क्रिकेटचा देव वगैरे अत्यंत फालतू विशेषणांनी मराठी मीडियाने सचिनला शेफारून ठेवले आहे. याला भारतरत्न द्या, अशी मागणी करण्यात राजकीय पक्षांत मध्यंतरी शर्यतच लागली होती. मुळात प्रश्न असा आहे की, खेळाच्या क्षेत्रात शिखरावर असलेला हा एकच माणूस भारतात आहे का? महाराष्ट्रातून क्रीडा क्षेत्रातून भारतरत्न द्यायचे झाले, तर सर्वांत प्रथम महान कुस्तीपटू खाशाबा जाधव यांना द्यावे लागेल. कुठल्याही सरकारी सुविधा न घेता, केवळ स्वत:च्या सामथ्र्यावर त्यांनी भारताला ऑलिम्पिक मधले पहिले पदक मिळवून दिले आहे. पण मीडिया खाशाबांचे नाव घेत नाही. मंबईतील वांद्रे (पश्चिम) येथील पेरीक्रॉस रोडवर सचिनने आलिशान चार मजली बंगला बांधला आहे. त्याची किंमत शंभर कोटी आहे की, दोनशे कोटी यात आपल्याला जाण्याचे कारण नाही. तो त्याचा खाजगी प्रश्न आहे. परंतु या घरात प्रवेश करण्याआधी ऑक्युपेशन सर्टिफिकेट (भोगवटा प्रमाणपत्र) घेणे कायद्यानुसार आवश्यक होते. ते न घेताच सचिन नव्या घरात गेला. मीडियातून ओरड झाल्यानंतर मुंबई महापालिकेने त्याला ४ लाख ३५ हजारांचा दंड ठोठावला. हा दंड माफ करण्यात यावा यासाठी राजकारण्यांनी महापालिकेकडे नुसता तगादा लावला होता. वर्षाला अडीचशे तीनशे कोटी रुपये कमावणाèया सचिनला ४.३५ लाखांचा दंड का माफ केला जावा? माफ करायचा असेल, तर सर्वांनाच माफ करून टाका. सचिनने हा दंड भरला की नाही हे अजूनही गुलदस्त्यात आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी यासंबंधीची माहिती मिळावी यासाठी महापालिकेत अर्ज केला होता. ही माहिती देऊ नये, असा पवित्रा सचिनने घेतला. त्यामुळे आता पालिकेने ही माहिती देण्यास नकार दिला आहे. कर नाही त्याला डर कशाला? यात नक्कीच काही तरी काळे बेरे असणार म्हणून तर सचिनने ही माहिती रोखली आहे. फावड्याने पैसे ओढणारा सचिनला चार-सव्वाचार लाखांच्या सरकारी कराची नादारी हवी आहे. यातून त्याची कंजुषी तर समोर येतेच, पण त्याचा स्वार्थही दिसून येतो. 


३.

माधुरी दीक्षित 

माधुरीला +धक धक गर्ल+ हा मानाचा किताब दिला गेला आहे. तीसुद्धा हा किताब मिरवत असते. अनिल कपूरसोबतच्या चित्रपटात तिने आपली वक्षस्थळे आणि पाश्र्वभाग (पाश्र्वभाग हा संस्कृत शब्द आहे. मराठीत त्याला qटगर असे म्हणतात.) गाण्याच्या तालावर हलविली म्हणून तिला हा किताब मिळाला आहे. तिच्या गाण्याला qकवा गाण्यातील शारिरिक हालचालींना आमचा अजिबात विरोध नाही. तिला पैसे कमावण्याचा अधिकार घटनेनेच दिला आहे. पण पैसे कमावण्याच्या उद्योगाला कोणी महाराष्ट्राची शान म्हणू नये. घोळ नेमका इथेच आहे. पैशांसाठी काहीही हलवायला तयार असलेल्या दीक्षितांच्या या माधुरी मीडियाने महाराष्ट्राची शान असा किताब स्वत:च्या अखत्यारित देऊन टाकलेला आहे. माधुरीने श्रीराम नेणे नावाच्या एका अनिवासी भारतीय डॉक्टरशी विवाह केला, तेव्हा मीडियाचा उर भरून आला होता. स्वत:चीच मुलगी अमेरिकेत चालली असा आनंद मराठी वृत्तपत्रांच्या संपादकांना झाला होता. हिला वृत्तपत्रांनी इतके डोक्यावर बसवून घेतले की, ही बया आता महाराष्ट्राचाच अपमान करीत आहे. महाराष्ट्र सरकारने तिला नुकताच एक पुरस्कार देऊ केला होता. तो घ्यायला ती फिरकलीही नाही. महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाची ब्रँड अ‍ॅम्बॅसिडर हो, अशी गळ राज्य सरकारने तिला घातली. तेव्हा तिने इतके पैसे मागितले की, सरकारचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली. माधुरीच्या ठुमक्यांचे आंबट शौकिन असलेले लोक आता असे म्हणू लागले आहे की, मेहनतीने पैसे कमावणाèया माधुरीने सरकारसाठी फुकट काम का करावे? हा कृतघ्नपणा आहे. महाराष्ट्र सरकारकडून फुकट सवलती उकळताना लाज वाटली नाही. महाराष्ट्राच्या ११ कोटी लोकांनी प्रेम दिले म्हणून तुम्ही सुपर स्टार झालात. पैसे कमावले. लोकांनी पैसे मोजून तुमचे चित्रपट पाहिले. या ॠणातून थोडेसे उतराई होण्याची वेळ आली, तर तुम्हाला पैसे हवे आहेत. आपल्या आईला वृद्धाश्रमात पाठविणारी अवलादच असे बोलू शकते. केंद्र सरकारची  अतुल्य भारत ही जाहिरात मालिका आमिर खानने एक पैसाही न घेता केली. अमिताभ बच्चन यांनी एक पैसा न घेता उत्तर प्रेदशचे ब्रँड अंबॅसिडर म्हणून काम केले. हे खरे महान कलाकार आहेत. 

अनिता पाटील


संबधित लेख 
मंगेशकर नावाची लोभाची मांजरे
सनी लिओनला भारतरत्न का नाही?
माधुरी दीक्षितच्या बगलेत कोणाचे हात?

Sunday 6 May 2012

हा घ्या ब्राह्मण जातीयवादाचा आणखी एक पुरावा


ब्राह्मण जातीनिरपेक्ष विचार करूच शकत नाही, असा माझा ठाम दावा आहे. माझा दावा सिद्ध व्हावा यासाठी ब्राह्मण लोक सातत्याने जातीयवादी वर्तन करीत असतात. आता हेच पाहा ना. नुकत्याच झालेल्या आयएएस परीक्षेत महाराष्ट्रातील ६० पेक्षा जास्त तरुणांनी बाजी मारली. यात ब्राह्मण किती आणि बिगर ब्राह्मण किती याचा शोध ब्राह्मणांनी सुरू केला आहे. एका जातीयवादी ब्राह्मणाच्या ब्लॉगवर मला खालील पोस्ट आढळली. यशस्वीतांचे निर्मळ मनाने स्वागत करण्याऐवजी या जातीयवाद्याने "ब्राम्हण असा नाहीतर ब्राम्हणेतर - सर्व भावी IAS ओफिसारांचे अभिनंदन!" असा मथळा आपल्या पोस्टला दिला आहे. त्याखाली यशस्वीतांची नावे दिली आहेत. हा मथळा वाचून मन विषण्ण झाले. यात ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर वाद करण्याचे कारणच काय? यशस्वी झालेले महाराष्ट्रीय आहेत. पण ब्राह्मणांना एवढे पुरेसे वाटत नाही. हा जातीयवादी इसम म्हणूनच "ब्राम्हण असा नाहीतर ब्राम्हणेतर - सर्व भावी IAS ओफिसारांचे अभिनंदन!" असा मथळा करतो. ब्राह्मण हे आपल्या जातीपलिकडे विचारच करू शकत नाहीत. ब्राह्मणांची मने पूर्णत: किडली आहेत. ती दुरुस्त होऊ शकत नाही. याचा आणखी कोणता पुरावा हवा.

या जातीयवाद्याची मूळ पोस्ट मुद्दाम खाली देत आहे :



ब्राम्हण असा नाहीतर ब्राम्हणेतर - सर्व भावी

 IAS ओफिसारांचे अभिनंदन!

ब्राम्हण असा नाहीतर ब्राम्हणेतर - सर्व भावी IAS ओफिसारांचे अभिनंदन!

..... तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो. तुम्ही मराठी असण्याचा मला अभिमान आहे
आणि अशा करतो की आपण जातीयवाद आणि ब्राम्हणद्वेष नाहीसा करण्याचा प्रयत्न कराल.

४ मे २०१२
बातमी इथे वाचा.  
  1. अमृतेश औरंगाबादकर - १०
  2. रवींद बिनवडे - ३०
  3. विकास सुरळकर - १२७
  4. अभिजित चौधरी - २०६
  5. कालीचरण खरतडे - २१०
  6. विजय जगधने - २७७
  7. महेश शिंगटे - ३०६
  8. प्रकाश निकम - ३१९
  9. समृद्धी हांडे - ३२३
  10. शिवकुमार साळुंखे - ३६१
  11. सचिन ओंबासे - ४१०
  12. मंगेश जाधव - ४८१
  13. राजेश हलाडकर -४९०
  14. दत्तप्रसाद शिरसाट - ५४६
  15. चंदकांत कदम - ५६७
  16. प्रशांत एस. पाटील - ६५१
  17. युवराज पाटील - ६८०
  18. अभिजित सानप - ७०३
  19. ऋषीकेश सोनावणे - ७४५
  20. विलास पवार - ७४७
  21. हेमंत शिरसाट - ७५३
  22. अभिजित बनसोडे - ८१०
  23. मोतीलाल शेटे - ८२२
  24. पराग गवळी - ८८१
  25. निकिता पवार - १५
  26. अभिषेक तिवारी - ६९
  27. नितेश पाटील - १५४
  28. राहुल फटींग - १६१
  29. तेजस्वी सातपुते - १९८
  30. दीपक (यशदा) शिंदे - २१३
  31. प्रवीण मुंडे - २५९
  32. प्रशांत गवांडे - २८१
  33. रमेश घोलप - २८७
  34. प्रसाद चाफेकर - २८९
  35. विनायक पाटील - ३४९
  36. वैभव तांदळे - ३६०
  37. आदित्य फोटेदार - ३८०
  38. अभिजित भोळे - ४२४
  39. शिवराज मानसपुरे - ४३१
  40. शेखर देशमुख - ४४३
  41. संदीप माडकर -४५६
  42. सलमानतेज पाटील - ४६६
  43. सुशिल घुले - ४६७
  44. रत्नाकर शेळके - ४७९
  45. स्वप्निल सावंत - ५३७
  46. आदित्य सावळे - ५७५
  47. प्रदीप हिराडे - ६४७
  48. दिनेश माटे - ६५०
  49. संग्राम देशमुख - ६८६
  50. भरत मार्कड - ६९२
  51. मुकुल तेलगोटे - ७२३
  52. अविनाश जाधव - ७४०
  53. अविनाश यादव - ७५४
  54. संदीप यादव - ७५७
  55. अमितकुमार निकाळजे - ७६९
  56. क्रांती खोब्रागडे - ७७०
  57. भाग्यश्री बनायत - ८०२
  58. विजया जाधव - ८०७
  59. शिरीष कांबळे - ८४६
  60. रविराज सरतापे - ८६३
  61. रत्नघोष चौरे - ८७४


Thursday 3 May 2012

पेशवे ब्राह्मण होते की क्षत्रिय?



महाभारतातील परशुरामाची गोष्ट सर्वांना माहिती आहे. त्याचप्रमाणे रणांगणावर लढणारे मराठा साम्राज्याचे पंतप्रधान म्हणजेच पेशवेसुद्धा सर्वांनाच माहिती आहेत. परशुराम आणि पेशवे यांना ताडून पाहण्याचा प्रयत्न आजवर कोणी केल्याचे दिसत नाही. तोच प्रयत्न या लेखात मी करणार आहे............................




आधी परशुरामाबद्दल पाहू या. या कथेशी कर्णाचा संदर्भ आहे, म्हणून सुरूवात त्याच्यापासूनच करू या. कर्ण हा कुंतीचा लग्नाआधीचा टाकून दिलेला मुलगा. सारथ्याने सांभाळे म्हणून सूतपूत्र म्हणवला गेला. आयुष्यभर हिणवला गेला. त्याला युद्धशास्त्रात निपून व्हायचे होते. तो द्रोणाचार्यांकडे जातो. ते त्याला शिक्षण देण्यास नकार देतात. कारण कर्ण सूतपूत्र असतो. मग तो परशुरामाकडे जातो. परशुरामाचे क्षत्रियांशी वैर असते. म्हणून तो क्षत्रियांना विद्या शिकवत नाही. केवळ ब्राह्मणांना विद्या शिकवतो. म्हणून कर्ण ब्राह्मण वेष धारण करतो. परशुरामाकडून तो सर्व शस्त्रास्त्र विद्या शिकतो. त्याकाळातील सर्वाधिक विध्वंसकारी अस्त्र मानले जाणारे ब्रह्मास्त्र विद्याही मिळवतो. एके दिवशी परशुराम हा कर्णाच्या मांडीवर डोके टेकवून झापलेला असतो. तेव्हा एक भुंगा कर्णाच्या मांडीला डसतो. गुरूची झोप मोडेल म्हणून कर्ण जराही विचलित न होता, सर्व वेदना सहन करतो. शेवटी हा भुंगा परशुरामाच्या कानाला डसतो. परशुराम जागा होतो. पाहतो तर काय कर्णाची मांडी रक्तबंबाळ झालेली. तेव्हा परशुराम ओळखतो की, कर्ण हा ब्राह्मण नव्हे! परशुराम म्हणतो, ‘‘कोणीही ब्राह्मण एवढी वेदना सहन करू शकत नाही. खरे सांग तू कोण आहेस?ङ्कङ्क कर्णाला सत्य सांगणे भागच पडते. मग परशुराम त्याला शाप देतो की, तू विद्या शिकला असलास तरी गरजेच्या वेळी ती तुला उपयोगी पडणार नाही. परशुरामाचा शाप पुढे भारती युद्धात खरा ठरतो. कर्ण अर्जुनाच्या हातून मारला जातो. अशी थोडक्यातली कथा. यात माझ्या पदरचे काही नाही. जसे महाभारतात लिहिलेय तसेच येथे दिलेय. 

आता पेशव्यांची कहाणी पाहू या. बाळाजी बाजीराव भट हा पेशव्यांचा मूळ पुरुष होय. बाळाजी हा स्मार्तांच्या चित्पावन शाखेचा ब्राह्मण होता. त्याचा जन्म कोकणातील श्रीवर्धन येथे झाला. तो मराठ्यांचा सरसेनापती धनाजी जाधव यांचा आश्रित होता. धनाजीनेच बाळाजीला छत्रपतींच्या सेवेत आणले. बाळाजीची पत्नी राधाबाई ही बर्वे घराण्याची होती. या दाम्पत्याला दोन मुले झाली. १. पहिला बाजीराव २. चिमाजी अप्पा. वंशपरंपरागत पेशवाईची सुरूवात बाळाजी विश्वनाथापासून  होते. छत्रपती शाहू महाराजांनी त्याची पेशवेपदी नेमणूक केली. त्याच्यानंतर त्याचा मुलगा बाजीराव हा पेशवेपदी बसला. हातात समशेर घेऊन लढणारे पेशवे हे पहिले ज्ञात ब्राह्मण होय. मौर्यांची सत्ता उलथवून टाकणारा पुष्यमित्र शुंग हा ब्राह्मण राजा समजला जातो. तथापि, त्याच्या ब्राह्मण असण्याबद्दल अलिकडे संशय व्यक्त केला जाऊ लागला आहे. नव्या पिढीतील सव्यसाची इतिहासकार संजय सोनवणी यांनी असे दाखवून दिले आहे की, पुष्यमित्र हा ब्राह्मण नव्हताच. सावरकरांसारख्या काही लोकांनी उठविलेली ती आवई होती. असो. सांगायचा मुद्दा असा की, ब्राह्मण पुरुष वेदना सहन करू शकत नाही, म्हणजेच युद्धही करू शकत नाहीत, असे परशुरामाने महाभारतात सांगून ठेवले आहे. तर मग पेशव्यांच्या हाती तलवार आली कशी? ब्राह्मण पेशवे लढाया कशा काय मारू शकले? 

आजच्या ब्राह्मण समाजाने परशुराम आणि पेशवे यांना आपले प्रतिकचिन्ह म्हणून निवडले आहे. त्यामुळे मोठीच ऐतिहासिक कोंडी झालेली आहे. मुळात ही दोन्ही प्रतिकेच परस्पर विरोधी आहेत. परशुरामाच्या मते ब्राह्मण हे क्षत्रियांप्रमाणे लढवय्ये असू शकत नाहीत. पेशवे तर लढवय्ये होते. परशुरामाचे म्हणणे खरे मानले तर पेशवे हे ब्राह्मण नव्हते, असे मानाण्याचे संकट ओढवते. अर्थात हे आजच्या ब्राह्मणांना स्वीकारणे जड जाईल. पेशवे हे ब्राह्मणच होते, असे मानायचे असेल, तर मग परशुरामाचे म्हणणे खोटे होते, असे मानावे लागते. दुसèया शब्दांत सांगायचे तर, परशुराम कर्णाला खोटे बोलला किन्वा त्याला वंशशास्त्राविषयी काहीही माहिती नव्हती, असे मानणे भाग पडते. खोटे बोलणाèयाला किन्वा अज्ञानी व्यक्तीला विष्णूचा अवतार मानणे मग धोक्याचे होऊन बसते. अवतारी म्हटल्यानंतर त्याच्या शब्द न शब्द खरा असलाच पाहिजे. अशा प्रकारे परशुराम आणि पेशवे ही दोन प्रतिके एकत्र केल्यानंतर आपण विचित्र खिन्डीत येऊन अडकतो. या दोघांपैकी आपला कोण याचा निर्णय ब्राह्मण समाजाला करावा लागणार आहे,.

एक मात्र खरे की, ब्राह्मणांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र असलेल्या भगवान परशुरामाच्या पवित्र वाणीवर विश्वास ठेवायचा झाल्यास, ‘‘पेशवे हे ब्राह्मण वंशाचे नव्हे, तर क्षत्रिय किन्वा अन्य लढवय्या जमातीचे होते" असे मानणे भाग आहे. पेशवे ब्राह्मण नव्हते, असे मानायचे असेल, तर मग ते कोणत्या वंशाचे होते, याचा शोध घ्यायला हवा. हे काम अर्थातच इतिहास तज्ज्ञांनी करायला हवे.


अनिता पाटील

Wednesday 2 May 2012

मियाँ तानसेन

प्रख्यात चित्रकार लाला देवलाल यांनी
काढलेले मिया तानसेन याचे चित्र.
....................................................................................

ब्राह्मण कधीही जातीमुक्त होऊन नि:पक्ष इतिहास लिहू शकत नाहीत, हे वारंवार सिद्ध होत आले आहे. मोगलांचा इतिहास लिहितानाही ब्राह्मणी इतिहासकारांचा हाच पक्षपात समोर येतो. मोगल सम्राटांची अत्यंत क्रूर अशी प्रतिमा ते उभे करतात. राजपुतान्यातील राजपुतांनी मोगलांना मुली दिल्या म्हणून राजपुतांची ते घोर शब्दांत निर्भत्सना करतात. मोगलांनी हिन्दूंचे (ब्राह्मण सोडून इतर जातींबाबत) जबरदस्तीने इस्लामीकरण केले, अशी खरी-खोटी चित्रे रंगवितात. परंतु, त्याकाळातील अनेक ब्राह्मण विद्वान स्वखुषीने मोगलांच्या आश्रयाला गेले. ब्राह्मणांनी इस्लामचा नुसताच स्वीकार केला नाही, तर प्रसारही केला. त्याबदल्यात मोगलांकडून मानमरातब, पैसा, जहागिèया मिळविल्या. मात्र, हा सर्व इतिहास लिहिणयचे ब्राह्मण इतिहासकार टाळतात. माझ्या नव्या मालिकेत मी हाच इतिहास मांडणार आहे. 

गौड ब्राह्मण तन्ना मिश्र

या लेखमालेची सुरुवात गौड ब्राह्मण तन्ना मिश्र याच्यापासून करूया. हा कोण तन्ना मिश्र? असा प्रश्न वाचकांना नक्कीच पडला असेल. मोगल सम्राट अकबराच्या दरबारातील महान गायक मियाँ तानसेन म्हणजे तन्ना मिद्ध होय! संपत्ती आणि मानमरातबासाठी तन्नाने आपला ब्राह्मण धर्म सोडला. तो मुसमान झाला. इस्लाम त्याच्या अंगात इतका भिनला होता की, आपल्या मुसलमानी गुरुच्या शेजारीच त्याने हट्टाने स्वत:चे दफन करवून घेतले. 


मियाँ तानसेन याचा जन्म मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर जवळच्या बेहर या गावात झाला. त्याच्या पित्याचे नाव मकरंद पांडे असे होते. मकरंद पांडेच्या वंशात मिश्र हे आडनाव लावणयाचीही वहिवाट होती. मकरंद पांडेला १५२० ते ३० या काळात एक मुलगा झाला. त्याचे नाव तन्ना असे ठेवण्यात आले. हाच तन्ना पुढे मिया तानसेन या नावाने जगप्रसिद्ध झाला. तन्नाच्या जन्माबाबत एक आख्यायिका सांगितली जाते. मकरंद पांडेला मूल होत नव्हते. तो आणि त्याची पत्नी अनेक वैद्य आणि संत-महंतांना भेटले. पण गुण आला नाही. ग्वाल्हेरमध्ये महंमद गौस नावाचा एक सुफी फकीर तेव्हा राहत होता. हे जोडपे गौसकडे गेले. गौसने आशीर्वाद दिला. खरोखरच वर्षभराच्या आत त्यांना मुलगा झाला. हाच मियाँ तानसेन होय. धर्मगुरू या नात्याने धर्मरक्षणाची जबाबदारी त्या काळी ब्राह्मणांची होती. ते करायचे सोडून ब्राह्मण मंडळी स्वत:च सुफी फकिरांच्या नादाला लागलेली होती, हे मकरंद पांडेच्या कहाणीवरून स्पष्ट व्हावे.

स्वामी हरिदासांचे शिष्यत्व

तन्ना लहान असतानाच त्या काळातील महान गायक स्वामी हरिदास याची नजर तन्नावर पडली. त्याचा आवाज स्वामीने हेरला. तो त्याला सोबत घेऊन गेला. तन्नाने स्वामीकडे १० वर्षे संगीत साधना केली. या काळात संपूर्ण भारतीय शास्त्रीय संगीत शिकला. शिक्षण संपल्यानंतर तन्ना मिश्र घरी परतला. रिवा संस्थानचा राजा राजाराम याने तानसेनाला राजाश्रय दिला. राजा राजाराम हा मोगल सम्राट अकबराचा मांडलिक होता. एका आख्यायिकेनुसार, राजारामाने तानसेनाला अकबराच्या दरबारात पाठवले, असे मानले जाते. दुसèया एका सम्राट अकबराच्या वैभवाच्या कथा ऐकून तानसेन मोहीत झाला आणि तो स्वत:च राजारामाला सोडून अकबराकडे. काहीही असो, तानसेन अकबराच्या दरबारात आला हे महत्वाचे. त्याची गायकी पाहून अकबराने त्याला नवरत्नांत स्थान दिले. 

इस्लामचा स्वीकार

तानसेनाने इस्लामचा स्वीकार का आणि कसा केला, याबाबतही अनेक आख्यायिका आहेत. तानसेनाने अकबराला खुष करण्यासाठी इस्लामचा स्वीकार केला, असे काही जण मानतात. यासंबंधी आणखीही एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. गायकीत परिपूर्णता मिळविल्यानंतर तन्ना मिश्रचे कुटुंबिय त्याला ग्वाल्हेरचा फकीर महंमद गौस याच्याकडे घेऊन गेले. (गौसच्या आशीर्वादाने तानसेनाचा जन्म झाला होता, हे आपण वर पाहिलेच.) तानसेनाचे गाणे ऐकून फकीर गौस प्रसन्न झाला. त्याने आपल्या तोंडातील उष्टे पान तन्ना मिश्रला खायला दिले. ते खाल्यानंतर तानसेन मुसलमान झाला. कोणी म्हणतात, गौसने त्याला जबरदस्तीने मुसलमान केले. तथापि, जबरदस्ती धर्मांतराच्या आख्यायिका तथ्यहीन दिसतात. कारण तानसेन रस्त्यावरचा गायक नव्हता. तो रिवा संस्थानचा दरबारी गायक होता. त्याची जबरदस्ती सुंता होणे शक्यच नव्हते. गौसने उष्टे पान खायला देऊन तानसेनाचे जबरदस्तीने धर्मांतर घडवून आणले, हे खरे असते तर तानसेनाने आपले दफन गौसच्या शेजारी करवून घेतले नसते. खरे म्हणजे तानसेनला घडविण्याचे सारे श्रेय स्वामी हरिदासाला जाते. स्वामी हरिदासाने तानसेनाला गायकी शिकवली नसती, तर तो अकबराच्या दरबारात जाण्याच्या लायकीचा झालाच नसता. स्वामीचे हे उपकार मात्र, मिया तानसेन पूर्णत: विसरून जातो. नंतरच्या काळात तो हरिदासाचे नावही घेत नाही. तानसेनाला आपल्या मूळ धर्माबद्दल खरोखरच आस्था असती, तर त्याने चिरशांतीसाठी स्वामी हरिदासाचा आश्रम निवडला असता. किमान गौसच्या शेजारी तरी जागा मागितली नसती. येथे आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, मोगल काळात ब्राह्मण विद्वान दिल्लीच्या आश्रयास जाण्यास आतूर असत. जगन्नाथ पंडिताचे ‘दिल्लीश्वरोवा सर्वेश्वरोवाङ्क ही उक्ती त्यासाठी लक्षात घेण्याजोगी आहे. अतएव, तानसेनाचे इस्लामला शरण जाणे हा स्वखुषीचा मामला होता, हेच खरे. 

तानसेनचे इस्लाम प्रेम

तानसेनाला इस्लाम धर्माबद्दल विशेष आस्था होती, असे त्याच्या पुढील सांगितिक कारकिर्दीवरून दिसून येते. त्याने त्याकाळी प्रसिद्ध असलेल्या रागांत फेरफार करून नवे राग बनविले. तानसेनाला दरबारात मियाँ तानसेन असे संबोधले जाई. मियाँ हे संबोधन तानसेनाला अतिप्रिय होते. स्वत: बनविलेल्या नव्या रागांच्या नावापुढे तो मियाँ लावीत असे. उदा. मल्हार रागात फेरफार करून तानसेनाने मियाँ मल्हार बनविला. सारंगमध्ये फेरफार करून मियाँ की सारंग बनविला. याशिवाय मूळच्या कानडा रागात फेरफार करून तानसेनाने अकबराच्या दरबारासाठी दरबारी कानडा हा राग तयार केला. सम्राट अकबराची सेवा करण्यात मियाँ तानसेनाने आपले संपूर्ण जिवित खर्ची घातले. त्याचे त्याला फळही मिळाले. त्याच्या कित्येक पिढ्यांची सोय अकबराने करून दिलसी. तानसेन हा धृपद शैलीचा उद्गाता समजला जातो. इस्लामधर्म स्वीकारण्याच्या आधी, राजारामाच्या दरबारात असताना, त्याने धृपद गायकी शोधली असावी असे मानण्यास जागा आहे. तानसेन गौड ब्राह्मण होता. त्यावरून त्याची धृपद गायकी अजूनही गौड धृपद या नावाचे प्रसिद्ध आहे. ही शैली त्याने अकबराच्या दरबारात रुजू झाल्यानंतर निर्माण केली असती, तर तिचे नाव निश्चितच मियाँ धृपद असे पडले असते. 

ग्वाल्हेरमधील मियासेन याची भव्य कबर. या कबरीच्या बाजूलाच
मियाँ तानसेनचा सुफी गुरू महंमद गौस याची कबर आहे.
...................................................................................................

ग्वाल्हेरात गौच्या शेजारी चिरविश्रांती

फेब्रुवारी १५८५ मध्ये मियाँ तानसेनाचे निधन झाले. आपला अध्यात्मिक गुरू महंमद गौस याच्या कबरीशेजारीच आपल्याला दफन करण्यात यावे, अशी मियाँ तानसेनाची इच्छा होती. त्यानुसार ग्वाल्हेरला मंहमद गौसच्या कबरी शेजारीच त्याचे दफन करण्यात आले. या ठिकाणी दरवर्षी मोठा उरुस भरतो. भारतातील शास्त्रीय संगितातील दिग्गज मंडळी येथे येऊन आपली गायकी पेश करतात. 

मियाँ तानसेनाचा वारसा

तानसेनाची सर्व मुले उत्तम गायक होती. त्याचा एक मुलगा विलास खाँ याने तोडी या स्वतंत्र गायकीची सुरुवात केली. मियाँ तानसेनाच्या प्रेरणेने अनेक विद्वान ब्राह्मण गायकांनी इस्लामचा स्वीकार केला. तसेच त्याने मुस्लिम गायकांनाही भारतीय शास्त्रीय संगीत शिकवले. भारतीय शास्त्रीय संगितात आज अनेक मुस्लिम घराणी दिसतात. त्यांचा कुठे ना कुठे थेट मियाँ तानसेनाशी संबंध येतो. 

अनिता पाटील