मित्रहो, आज आपण रामदास स्वामी यांनी बोहल्यावरून पलायन केल्यानंतर त्यांच्या वधूचे काय झाले, याची माहिती घेणार आहोत. अनंत गोपाल कुडाळकर-वाकेणीस यांनी लिहिलेल्या ‘वाकेनिशी’त रामदासांच्या न झालेल्या लग्नाची कहाणी आली आहे. तीच मी आज तुम्हाला येथे सांगणार आहे. रामदासांचे मूळ नाव नारायण सूर्याजी ठोसर. जांब (तालुका-अंबड ,जि. जालना) हे त्यांचे गाव. नारायण हा मुळात एक उनाड, आडदांड होता . महिना-महिना तो घरातून-गावातून गायब राहत असे. रात्री बेरात्री भटकत असे. त्याची ही लक्षणे पाहूनच त्याच्या आईने त्याचे लग्न करायचे ठरवले. लग्न झाल्यानंतर हा सुधारेल असे त्याच्या आईला वाटले. परंतु हा लग्नाला तयारच नव्हता. तरीही त्यांच्या आई ने हट्टाने त्याचे लग्न ठरवले. आपल्या भावाची म्हणजेच नारायणाच्या मामाची मुलगी त्यासाठी पक्की केली. या मुलीचे नाव काशीबाई. ती नागुजी बदनापुरकर यांची मुलगी होती. नागुजी हा नारायणाचा सख्खा मामा होय. विवाह ठरला.
कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पुजनाचे ||| महाराष्ट्रातील समतावादी चळवळीचे नेतृत्व करणारा ब्लॉग ||| संपादक : प्रा. रविन्द्र तहकीक
मुख्यपृष्ठ
▼
Thursday, 29 March 2012
रामदासांच्या वधूचे पुढे काय झाले?
मित्रहो, आज आपण रामदास स्वामी यांनी बोहल्यावरून पलायन केल्यानंतर त्यांच्या वधूचे काय झाले, याची माहिती घेणार आहोत. अनंत गोपाल कुडाळकर-वाकेणीस यांनी लिहिलेल्या ‘वाकेनिशी’त रामदासांच्या न झालेल्या लग्नाची कहाणी आली आहे. तीच मी आज तुम्हाला येथे सांगणार आहे. रामदासांचे मूळ नाव नारायण सूर्याजी ठोसर. जांब (तालुका-अंबड ,जि. जालना) हे त्यांचे गाव. नारायण हा मुळात एक उनाड, आडदांड होता . महिना-महिना तो घरातून-गावातून गायब राहत असे. रात्री बेरात्री भटकत असे. त्याची ही लक्षणे पाहूनच त्याच्या आईने त्याचे लग्न करायचे ठरवले. लग्न झाल्यानंतर हा सुधारेल असे त्याच्या आईला वाटले. परंतु हा लग्नाला तयारच नव्हता. तरीही त्यांच्या आई ने हट्टाने त्याचे लग्न ठरवले. आपल्या भावाची म्हणजेच नारायणाच्या मामाची मुलगी त्यासाठी पक्की केली. या मुलीचे नाव काशीबाई. ती नागुजी बदनापुरकर यांची मुलगी होती. नागुजी हा नारायणाचा सख्खा मामा होय. विवाह ठरला.

वास्तवाला हात घातला , सत्य जगासमोर आलेच पाहिजे
ReplyDeleteसत्य वास्तव मांडणी आपण केली
ReplyDeleteहेच सत्य आहे,मि कुंभार पिम्पलगाव येथे 8 वर्ष नौकरी केली।जे जांब समर्थ पासून अवघे 5 कि मि आहे।जांब ला नेहमी जयचो।त्या परिसरात ह्याच कथा लोक सांगत।
ReplyDeleteधन्यवद
ReplyDeleteजो बहुतेक सर्वांना पडलेले या मागील कोडे उलगडण्याचे आपण कार्य केले
ReplyDelete